* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: CHINTAMUKTA JIVAN
  • Availability : Available
  • ISBN : 9788177663228
  • Edition : 4
  • Publishing Year : NOVEMBER 2002
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 224
  • Language : MARATHI
  • Category : SELF HELP, HEALTH & PERSONAL DEVELOPMENT
Quantity
Buying Options:
  • Print Books:
WE NOURISH OUR BODY WITH REGULAR DOSES OF PROTEINS, VITAMINS AND OTHER NUTRITIOUS FOOD ITEMS. LIKEWISE, OUR MIND ALSO NEEDS NOURISHMENT FOR REMAINING ENTHUSIASTIC AND CREATIVE. THIS BOOK UNCOVERS VARIOUS SIMPLE REMEDIES TO OVERCOME ALL YOUR TENSIONS, GRIEF, WHICH ARE HIDDEN DEEP INSIDE YOUR BODY, SOMEWHERE YET DEEP INTO YOUR MIND. THE SOLUTIONS SUGGESTED HERE HAVE A BASE OF PSYCHOLOGY. YOU WILL COME ACROSS VARIOUS INTERESTING WAYS TO MAKE YOUSELF FEARLESS, FRESH, TO UNDERSTAND YOURSELF IN A BETTER WAY, TO MAKE YOUR LIFE TENSION FREE. THIS BOOK IN ALL SENSE ATTEMPTS TO PROVIDE YOUR MIND WITH NOURISHING, UTRITIOUS, WELL-BALANCED DIET.
शरीराला सबल करण्यासाठी ज्याप्रमाणे जीवनसत्वे, प्रथिने व पौष्टिक पदार्थांची जरुरी असते, त्याचप्रमाणे मनाला क्रियाशील व उत्साही बनवण्यासाठी खास ‘मानसिक’ पौष्टिक आहाराची जरुरी असते. मनात व शरीरात खोलवर दडलेले ताणतणाव दूर करून आनंदी जीवन जगण्याचे अनंत उपाय या पुस्तकात दिलेले आहेत. यात भीतीवर विजय कसा मिळवावा, ताजेतवाने कसे व्हावे, स्वत:ला कसे ओळखावे, अशा अनेक समस्यांवर मानसशास्त्रीय सुयोग्य मार्गदर्शन केले आहे. चिंतामुक्त यशस्वी जीवनासाठी सर्वतNहेचा ‘मानसिक पौष्टिक आहार’ पुरवण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला आहे.

No Records Found
No Records Found
Keywords
Customer Reviews
  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 08-12-2002

    चिंतामुक्त जीवन जगण्यासाठी... सध्याच्या जगात ताणतणाव प्रत्येकाला अपरिहार्यच आहेत. त्यामुळे ताणतणाव बाळगत जगणे अवघड बनले आहे. या तणावांपासून मुक्त होण्यासाठी अनेक गुरूंचे अनेक कोर्स आहेत. आर्ट ऑफ लिव्हिंग कोर्सचे प्रणेते श्री. श्री. रविशंकर यांच्या परेरणेने लिहिलेल्या ‘इमोशन्स अँड युवर हेल्थ’ या पुस्तकाचा हा मराठी अनुवाद आहे आपल्या मनोविकारांवर ताबा मिळवून आपण जीवनात आनंदी होऊ शकतो. भावनिक कणखरता, निचरा, तणाव-निर्माण करण्याचे मूळ कमी करा निरोगी राहणे, मानसिक प्रथमोपचार व इतर अनेक प्रकरणे आहेत. ज्यामुळे आपण ‘षड् रिपूवर नियंत्रण मिळवू शकू सध्याच्या युगात जगणाऱ्या प्रत्येकाने वाचावे असेच हे पुस्तक आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK SAMANA (MUMBAI) 08-12-2002

    शरीराला सबल करण्यासाठी ज्याप्रमाणे जीवनसत्वे, पौष्टिके यांची गरज असते, तसेच मनाला उत्साही बनण्यासाठी मानसिक आहाराची जरुरी असते. मनात आणि शरीरात खोलवर दडलेले ताणतणाव दूर करून सुखी आनंदी जीवन जगण्यासाठी काही उपाय या पुस्तकात दिले आहेत. भावनिक कणखरता, आावादी दृष्टिकोन, तणाव कमी करा, मानसिक प्रथमोपचार, मन आणि शरीराचे नाते इत्यादी प्रकरणे बोलकी आहेत. ...Read more

  • Rating StarTARUN BHARAT MUMBAI 5-1-2003

    आपल्याला सुखानं जगण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता असते? या एका ओळीच्या प्रश्नाचं उत्तर अनेक ओळीत देता येईल. अनेक तत्त्ववेत्त्यांनी यावर पुस्तकं लिहिली आहेत. प्राचीन ग्रंथांतील ज्ञान आपल्याला जगणं शिकवतात. धर्मग्रंथ हे नीतिशास्त्राचेच ग्रंथ असतत. असे ग्रंथ आधुनिक काळात आणि विज्ञानयुगात असंख्य चिंतातुरांना औषधोपचाराप्रमाणे जवळचे वाटू लागले आहेत. खरं तर विज्ञानानं अनेक प्रश्न सोडविले आहेत. अनेक प्रश्न सोडविण्याचे मार्ग सोपे झाले आहेत. तरीही साधुसंतांच्या मार्गदर्शनाची गरज मात्र कमी झालीय असं वाटत नाही. म्हणूनच नवनवी पुस्तकं प्रकाशित होताना दिसतात. त्यातही ‘जगावं कसं ?’ या प्रश्नाचा ऊहापोह करणारी अधिक असतात. ‘चिंतामुक्त जीवन’ हे असंच एक पुस्तक प्रकाशित झालंय. ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ या कोर्सचे प्रणेते रविशंकर महाराज यांच्या प्रेरणेनं भावभावनांवर आधारित ‘इमोशन्स् अ‍ॅन्ड युअर हेल्थ’ या मुनोत यांच्या इंग्लिश पुस्तकांचं रुपांतर त्यांनी स्वत:च केलंय. विचार आणि भावना म्हणजे मनाचा खुराक. देहस्वास्थ्य उत्तम राखण्यासाठी सर्वप्रकारची जीवनसत्तवं जशी आवश्यक असतात तसेच मन:शक्ती वाढण्यासाठी ताणतणाव दूर करणं आवश्यक असतात. सुखसमाधानानं जगण्यासाठी निर्भय व्हावं. प्रसन्नपणे जगावं त्यासाठी स्वत:ला ओळखावं या साऱ्या गोष्टी घडवून आणण्यासाठी मार्गदर्शन करण्याचा उद्देश या पुस्तकात स्पष्टपणे मांडला आहे. एकूण बारा प्रकरणात विस्तारानं चिंतामुक्त जीवनाचा आलेख काढला आहे. भावनिक कणखरता ही सुखमय आयुष्याची गुरुकिल्ली आहे. व्यायामाबरोबरच प्रकृतीची जोपासना करावी. भावसंस्करणासाठी मित्र जोडावेत. लोकसंग्रह करावा. अनुकूलतेचा विचार करून आशावादी दृष्टिकोन ठेवावा. सर्वांवर सारखंच प्रेम करावं. इतरांना आवडेल असं वागावं. उगाच ‘जगाचं कसं होईल?’ असल्या मूर्ख प्रश्नानं व्याकुळ होऊन मुर्दाड चेहऱ्यानं जगण्यात काय हंशील? नकारात्मक भावनांचा निचरा करावा. प्रतिकूलतेवर मात करताना राग शांत करण्याचा आरोग्यदायक मार्ग लेखकानं सांगितला आहे. यातनांवर फुंकर घालून भीतीवर विजय मिळवावा. एवढंच नाही तर एकटं रहावं लागलं तरी हरकत नाही पण एकलकोंडं होऊ नये. ‘कंटाळा’ या शब्दाला थारा न देता बुजरेपणा घालवावा. खरं तर अनेक प्रकारे आपणच तणाव निर्माण केलेला असतो. जगातही तो पावलोपावली भेटतो. अशावेळी आपण निरोगी मनानं आणि शरीरानं राहणं जवळजवळ अशक्यच असतं. केव्हा केव्हा तर मानसिक उपचार करण्याचा प्रसंग ओढवतो. तेव्हा काय करावं? या प्रश्नाचं उत्तरही लेखकानं विस्तारपूर्वक दिलंय. स्वत:ची जाणीव उंचावणं तसं कठीणच ! त्यासाठी ‘मी कोण आहे?’ हे शोधावं लागतं. त्या शोधाचं नवं तंत्र शास्त्रज्ञांनी विकसित केलंय. आपल्या निशब्द भावनांना व्यक्त करण्याची प्रतिभा जागृत करावी. तत्पूर्वी व्यसनमुक्त (व्यसने असल्यास!) व्हावं. कामातील दिरंगाई टाळण्याचा प्रयत्न करावा. कामाइतकाच जीवनाचा आनंदही महत्त्वाचा असतो. - अर्थात हे सारे प्रयोग स्वत:वर स्वत:च करताना लेखकानं इशारा दिलाय की ‘जे कराल ते चांगलंच करा’ मर्यादित धोके पत्करण्याचं धाडस मात्र आपल्यात हवंच! आपल्याच भावभावनांचा उपयोग करून आपली मन:स्थिती उत्तम कशी राखावी? दुसऱयांना बरे करणारे स्वत: बरे होतात असं म्हणतात, त्याची प्रचीती येण्यासाठी प्रस्तुत पुस्तकाचा उपयोग समाजातील सर्वच थरांतील व्यक्तींना होईल असा विश्वास वाटतो. मन आणि शरीर यांचं नातं कसं आहे ? या प्रश्नाच्या उत्तरादाखल लेखकानं अनेक महत्त्वपूर्ण मुद्दे दिले आहेत. इच्छाशक्तीच्या बळावर अ‍ॅलर्जी घालविणं तसंच संधिवात, पाठदुखी, कॅन्सर वगैरे अनेक व्याधींवर उपाय सांगितले आहेत. अखेरच्या बाराव्या प्रकरणात ‘मनौषधींचा साठा’ मध्ये लेखकानं काही अंतर्मुख करणाऱ्या गोष्टी सांगितल्या आहेत. रंग, सर्जनशीलता, कौंटुंबिक गाठीभेटी, स्नेहसंमेलनं, हसणं आणि हसवणं वगैरे. दैनंदिन व्यवहारात जीवनसौंदर्य शोधणं आणि वाढवणं कसं गरजेचं आहे हेही पटवून दिलंय. ‘प्रेम’ या विषयावर मात्र केवळ ‘पाव पान’च निवेदन केलंय, असं का? जो विषय संपूर्ण ग्रंथाचा विषय होऊ शकतो त्याची वासलात थोडक्यात लावली आहे हे प्रकर्षानं जाणवतं. संगीत आणि गीत, आवडते पाळीव प्राणी, क्रीडा, कविता, सांत्वन करणाऱ्या वस्तू आणि स्पर्शसुख हे विषयही थोडक्यात आल्यानं लेखकास सुचवावंसं वाटतं की, या विषयांवरही मानसशास्त्रीय पुस्तकं लिहावीत. प्रकाशक ‘मेहतां’ च्या निरामय यशासाठी ध्यान, मनावर विजय आदी मनोवैज्ञानिक पुस्तकांप्रमाणेच हेही पुस्तक वाचकांच्या पसंतीस उतरेल असे वाटते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RADHIKASANTVANAM
RADHIKASANTVANAM by MUDDUPALANI Rating Star
केदार मारुलकर

एक डॉक्टर काय काय करू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे आजच्या पुस्तक परिचयासाठी निवडलेल्या पुस्तकाचे लेखक (खरे तर अनुवादक) *डॉ. शंतनू अभ्यंकर.* पुण्याच्या बीजे मेडिकल मधून एमबीबीएस. त्यानंतर पदव्युत्तर शिक्षण. आयएमए तसेच इतर संघटनेत विविध पदांवर काम. अनक परिषदांमध्ये शास्त्रीय विषयावर शुद्ध मराठीत व्याख्याने. २५ वर्षाहून अधिक काळ ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा. लोकविज्ञान संघटना, अंधश्रद्धा निर्मूलन समिती अशा संघटनांमध्ये काम. विज्ञान लेखक, भाषांतरकार, ब्लॉगर आणि त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे समाजात सर्वसाधारणपणे *न बोलल्या जाणाऱ्या विषयांवर लेखन* आणि प्रसंगी *प्रचलित समजाला तडा देणारे परखड भाष्य* करण्याची धमक. *पुस्तक परिचय* मुद्दूपलनी ही अठराव्या शतकातील राजे प्रतापसिंह यांची भोगपत्नी. अनुपम सौंदर्य, बुद्धिमत्ता, चातुर्य, शृंगारनिपुणता बहुभाषाकोविद अशी देवदासी स्त्री. राधिकासांत्वनमु हे तेलगू भाषेतील काव्य तिने रचले. परंतु नंतरच्या काळात अश्लील ठरवून त्यावर बंदी घालण्यात आली. देश स्वतंत्र झाल्यानंतर पुन्हा एकदा या काव्याला प्रकाशित होण्याचे भाग्य लाभले. गेल्याच वर्षी हे काव्य मराठीत अनुवादित करून डॉ. शंतनू अभ्यंकर यांनी मराठी रसिकांना हा सांस्कृतिक ठेवा उपलब्ध करून दिला आहे. तंजावरच्या तत्कालीन मराठी राजवटीचं एक वेगळंच वैशिष्ट्य होतं. मराठी राजे आणि तमिळ प्रजा. या राज्याची प्रसिद्धी इतर कलांइतकीच कलावंतिणींसाठीही होती. देवदासी, देवरंडीयल, कलावती, गुडिसानी, भोगदासी, नगरशोभिनी, राजगणिका अशी, काही आज आपल्याला खळबळजनक वाटतील अशी, नावं होती. एक समृद्ध परंपरा होती. तिथे गणिकांनाही प्रतिष्ठा होती. अशीच एक गणिका-मुद्दूपलनी. तिची एक रचना म्हणजेच राधिकासांत्वनमु. तेलुगूमध्ये सांत्वन म्हणजे रुसवा काढणे. अतिशय शृंगारिक, भावनाप्रधान, बिनधास्त आणि प्रसंगी अश्लील म्हणावं असं हे काव्य. अर्थात श्लिलाश्लिलतेच्या कल्पना कालसापेक्ष असतात. राधा-कृष्ण आणि इलाची गोष्ट सांगतासांगता ती राजे राजवाड्यांच्या राज्याचीच नाही, तर स्त्रियांच्या अंत:करणाचीही दारे सताड उघडून दाखवते. मराठीमध्ये इतकं शृंगारीक काव्य लिहिलं गेलं नाही.त्यात शृंगारीक लेखन म्हणजे लिहिलंच तर पुरुषांनी लिहावं, असा अलिखित नियम. शृंगार आणि अश्लीलता याच्या सीमारेषेवर असलेलं हे काव्य एका स्त्रीने लिहावं हे म्हणूनच आगळंवेगळं ठरतं. राधा-कृष्णाच्या कथेने भल्याभल्यांना मोहात पाडले आहे. पण राधाकृष्णाची बहुतेक प्रेमकाव्ये कितीही सुंदर आणि शृंगारिक वर्णनांनी भरलेली असली तरी अखेरीस राधाकृष्णाचे मिलन म्हणजे; पुरुष आणि प्रकृतीचे मिलन, असा शोध लावून त्याला एकदम अध्यात्मिक रूप दिलं जातं. राधिका सांत्वनम् मध्ये कृष्ण आणि राधा, कृष्ण आणि या काव्यातील प्रेमत्रिकोणाचा तिसरा कोन- इला, यांचे नाते अगदी सर्वसाधारण स्त्रीपुरुषांसारखे रेखाटले आहे. आपली पार्श्वभूमी सांगून ही गणिका राधिकासांत्वनमची मुख्य कथा सुरू करते. राधा-कृष्णाच्या प्रणयलीला तर सगळ्यानाच माहीत आहेत. या काव्यातील प्रौढ राधा, तरुण कृष्णाचे आणि नुकत्याच यौवनात आलेल्या इलाचे लग्न लावून देते. कृष्ण इलेवर असा काही भाळतो की राधा रहाते बाजूला. आता राधेला पश्चात्ताप होतो. विरहाने पोळलेली राधा, कृष्णाला विनवून परत बोलवते. तो येतो. पण दुखावली गेलेली राधा त्याला फार महत्व देत नाही. त्याला राधेची आर्जवं करायला लागतात. तरीही राधा त्याला बधत नाही. मग कृष्ण आपले हुकूमी अस्त्र काढतो. आपल्या कामलीलांनी तिला घायाळ करतो, राधा पुन्हा आकृष्ट होते, दोघांचे मिलन होतं. इथे राधिकासांत्वन सुफळ संपूर्ण होतं, अशी ही काव्यरुप कथा. यातील दोन्ही नायिका अगदी मुद्दूपलनी सारख्याच आहेत. रुपगर्विता, हुशार तितक्याच हट्टी. इला नवथर तरुणी; तर राधा प्रौढ, प्रेमस्वरूप कृष्णसखी आणि दोघींचा नायक कृष्णसखा. पण सारा भर आहे तो ह्या दोन नायिकांच्या मनतरंगांवर. यातल्या दोन्ही नायिका कृष्णावर वर्चस्व गाजवणाऱ्या आहेत. प्रेमासाठी आसुसलेल्या आहेत. अनुभूती मोकळेपणानी व्यक्त करणाऱ्या आहेत. वयात येणे, विरह,असूया, प्रेम-द्वेष अशी भावनांची लपाछपी, असं बरंच काही हे काव्य उलगडून दाखवते आणि तेही एक स्त्रीच्या नजरेतून. हा नजारा थक्क करणारा आहे. हे शृंगारीक असलं तरी उत्कट आणि रसाळ काव्य आहे. या काव्याचा इंग्रजीतही अनुवाद झाला आहे. डॉ. शंतनू यांनी छंदोबद्ध भाषांतर करण्याचा निर्णय घेतला. छंदोबद्ध असल्याशिवाय भाषांतर त्या काळातील वाटणारच नाही. मूळ छंद/वृत्त काय आहे याचा अंदाज अर्थातच इंग्लिश ओळी वाचून येत नाही. मग काही ओळी वाचायच्या, एखादी ओळ सुचेल तशी लिहायची आणि मग कारागिरी करत करत इतर ओळी जुळवायच्या; असा प्रकार करत भाषांतर केल्याचे मनोगतात लिहिले आहे. मराठीत हे सगळे काव्य लिहिताना पुणेरी भाषा वापरली असली,तरी त्यात दुर्बोधता नाही. अभंग, मंदाक्रांता, मालिनी, दिंडी, हरिभगिनी आणि लावणीसदृश ठेक्यात बसणाऱ्या काही चाली यात वापरल्या आहेत. काही ठिकाणी पद्यमय संवाद लिहिले आहेत. पुस्तक परिचय लिहिताना यातील काही ओळी उद्धृत करण्याचा मोह आवरत नाही. काव्याची सुरवातच राधेच्या बहारदार वर्णनाने होते. _थोरांनी नावाजली, गौरांगी सर्वांहुनी, शकुंतला, शुकभाषिणी, नंदाक्का राधा ही. आणि तिचे ते डोळे, नसते जर कृष्णकळे; का हरी कटाक्ष पुरे, चमकाया नयनदले?_ यानंतर षोडशा इलेचं वर्णन या शब्दांत _कृशांगा, नाजुकांगा, वेणीसंभार सोसवेना; मुखमोती दिव्य ज्योती, देवी इला, यौवना ही_ कृष्णावर भाळलेल्या इलाचे मनतरंग रेखाटताना म्हटले आहे- _लपंडावी डोळे झाकाया, फक्त मुरारी हवा इलेला. शिवशिवीचा खेळ रंगता,हिचे इशारे पळता पळता. नदीकिनारी साधून मौका, इला झोंबते हरीच्या अंगा. सदैव हरी-सह, हरीच सहचर, खेळ मिषे सुखस्पर्श अनावर. सख्यांस कौतुक सखिचे नवथर उधळून यौवन, धीट, खोडकर इला भाळली श्री कृष्णावर!_ कृष्ण आणि राधेचा प्रणय तिच्या नजरेतून सुटत नाही... _ओठ आरक्तही देता राधा, इला तुळीतसे ओष्ठ सौष्ठवा; दंतपंक्ती त्या सहज चमकता, फिके जाणी स्मित आपुले इला, शेजघरी ने कृष्णा, राधा; म्हणे ‘आले मी’, इला बाला!! मजेत हसती श्रीकृष्ण-राधा!_ राधेलाही इला मोठी होण्याची आतुरता, उत्सुकता आहेच... _कधी म्हणे विनोदे राधा, ‘ही मला सवत होई का?’ पण पाहताच इलेला, उरी उधाण ये मायेला, कुस्करी मग वारंवार, चुंबीते गोबरे गाल._ पण लग्नानंतर राधाने इलेला दिलेला संदेश आणि कृष्णाला दिलेला `दम` बहारदार आहे. इलेला संदेश _दे विश्वास अन् दे प्रोत्साहन. जाण असे तो प्रीत पुरुषोत्तम काम निपुण तो प्रेमिक उत्तम ...दे, कोमल तन, कोमल दे मन, प्रीत मनस्वी, तुझाच प्रीतम.’_ कृष्णाला `दम` _‘कठोर कांचन माझी काया, लता जणू ती, तनू कोमला, धिटाई हळू, बुजेल इला, सांभाळा तुम्ही गोपाळा!’_ काही ओळी मात्र आजही सर्वसामान्य पुरुषांनाही लागू पडतील की काय, इतक्या चपखल झाल्या आहेत. _नाही कशी मुळी लाज ;हवी मजा, वरती माज ; पुरूषांचे नीत्य काज ; बाईच्या मनीची आस कोणी ना पुसे त्यास_ चार भाग आणि ५८४ पदं असलेलं हे काव्य शृंगारीक असेलही, नव्हे आहेच. पण स्त्रीसन्मानाचा, प्रतिष्ठेचा आणि संवेदनशील मनाचा ठाव घेणारा तो एक ठेवा आहे. _इतिश्री शंतनूविरचितम् राधिका सांत्वनम् भावानुवादस्य केदारकृतपरिचयम् संपूर्णम् ...Read more

ANUWADATUN ANUSARJANAKADE
ANUWADATUN ANUSARJANAKADE by LEENA SOHONI Rating Star
अक्षरनामा

https://www.aksharnama.com/client/article_detail/7120?fbclid=IwZXh0bgNhZW0CMTAAAR06UVpU4k8DLSaBDkgmglzUuRMuX2XQ3OKxRAdL-tQo1-DZwHV7_Q3uLE4_aem_ATgHVeQrpR7vbtSsdHKWSXs5EHm0mPjS_5lEI-n3B5uorlbUPMjKGOX9doFKfROrOtk