* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: CHINTAMUKTA JIVAN
  • Availability : Available
  • ISBN : 9788177663228
  • Edition : 4
  • Publishing Year : NOVEMBER 2002
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 224
  • Language : MARATHI
  • Category : SELF HELP, HEALTH & PERSONAL DEVELOPMENT
Quantity
Buying Options:
  • Print Books:
WE NOURISH OUR BODY WITH REGULAR DOSES OF PROTEINS, VITAMINS AND OTHER NUTRITIOUS FOOD ITEMS. LIKEWISE, OUR MIND ALSO NEEDS NOURISHMENT FOR REMAINING ENTHUSIASTIC AND CREATIVE. THIS BOOK UNCOVERS VARIOUS SIMPLE REMEDIES TO OVERCOME ALL YOUR TENSIONS, GRIEF, WHICH ARE HIDDEN DEEP INSIDE YOUR BODY, SOMEWHERE YET DEEP INTO YOUR MIND. THE SOLUTIONS SUGGESTED HERE HAVE A BASE OF PSYCHOLOGY. YOU WILL COME ACROSS VARIOUS INTERESTING WAYS TO MAKE YOUSELF FEARLESS, FRESH, TO UNDERSTAND YOURSELF IN A BETTER WAY, TO MAKE YOUR LIFE TENSION FREE. THIS BOOK IN ALL SENSE ATTEMPTS TO PROVIDE YOUR MIND WITH NOURISHING, UTRITIOUS, WELL-BALANCED DIET.
शरीराला सबल करण्यासाठी ज्याप्रमाणे जीवनसत्वे, प्रथिने व पौष्टिक पदार्थांची जरुरी असते, त्याचप्रमाणे मनाला क्रियाशील व उत्साही बनवण्यासाठी खास ‘मानसिक’ पौष्टिक आहाराची जरुरी असते. मनात व शरीरात खोलवर दडलेले ताणतणाव दूर करून आनंदी जीवन जगण्याचे अनंत उपाय या पुस्तकात दिलेले आहेत. यात भीतीवर विजय कसा मिळवावा, ताजेतवाने कसे व्हावे, स्वत:ला कसे ओळखावे, अशा अनेक समस्यांवर मानसशास्त्रीय सुयोग्य मार्गदर्शन केले आहे. चिंतामुक्त यशस्वी जीवनासाठी सर्वतऱ्हेचा ‘मानसिक पौष्टिक आहार’ पुरवण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला आहे.

No Records Found
No Records Found
Keywords
Customer Reviews
  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 08-12-2002

    चिंतामुक्त जीवन जगण्यासाठी... सध्याच्या जगात ताणतणाव प्रत्येकाला अपरिहार्यच आहेत. त्यामुळे ताणतणाव बाळगत जगणे अवघड बनले आहे. या तणावांपासून मुक्त होण्यासाठी अनेक गुरूंचे अनेक कोर्स आहेत. आर्ट ऑफ लिव्हिंग कोर्सचे प्रणेते श्री. श्री. रविशंकर यांच्या परेरणेने लिहिलेल्या ‘इमोशन्स अँड युवर हेल्थ’ या पुस्तकाचा हा मराठी अनुवाद आहे आपल्या मनोविकारांवर ताबा मिळवून आपण जीवनात आनंदी होऊ शकतो. भावनिक कणखरता, निचरा, तणाव-निर्माण करण्याचे मूळ कमी करा निरोगी राहणे, मानसिक प्रथमोपचार व इतर अनेक प्रकरणे आहेत. ज्यामुळे आपण ‘षड् रिपूवर नियंत्रण मिळवू शकू सध्याच्या युगात जगणाऱ्या प्रत्येकाने वाचावे असेच हे पुस्तक आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK SAMANA (MUMBAI) 08-12-2002

    शरीराला सबल करण्यासाठी ज्याप्रमाणे जीवनसत्वे, पौष्टिके यांची गरज असते, तसेच मनाला उत्साही बनण्यासाठी मानसिक आहाराची जरुरी असते. मनात आणि शरीरात खोलवर दडलेले ताणतणाव दूर करून सुखी आनंदी जीवन जगण्यासाठी काही उपाय या पुस्तकात दिले आहेत. भावनिक कणखरता, आावादी दृष्टिकोन, तणाव कमी करा, मानसिक प्रथमोपचार, मन आणि शरीराचे नाते इत्यादी प्रकरणे बोलकी आहेत. ...Read more

  • Rating StarTARUN BHARAT MUMBAI 5-1-2003

    आपल्याला सुखानं जगण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता असते? या एका ओळीच्या प्रश्नाचं उत्तर अनेक ओळीत देता येईल. अनेक तत्त्ववेत्त्यांनी यावर पुस्तकं लिहिली आहेत. प्राचीन ग्रंथांतील ज्ञान आपल्याला जगणं शिकवतात. धर्मग्रंथ हे नीतिशास्त्राचेच ग्रंथ असतत. असे ग्रंथ आधुनिक काळात आणि विज्ञानयुगात असंख्य चिंतातुरांना औषधोपचाराप्रमाणे जवळचे वाटू लागले आहेत. खरं तर विज्ञानानं अनेक प्रश्न सोडविले आहेत. अनेक प्रश्न सोडविण्याचे मार्ग सोपे झाले आहेत. तरीही साधुसंतांच्या मार्गदर्शनाची गरज मात्र कमी झालीय असं वाटत नाही. म्हणूनच नवनवी पुस्तकं प्रकाशित होताना दिसतात. त्यातही ‘जगावं कसं ?’ या प्रश्नाचा ऊहापोह करणारी अधिक असतात. ‘चिंतामुक्त जीवन’ हे असंच एक पुस्तक प्रकाशित झालंय. ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ या कोर्सचे प्रणेते रविशंकर महाराज यांच्या प्रेरणेनं भावभावनांवर आधारित ‘इमोशन्स् अ‍ॅन्ड युअर हेल्थ’ या मुनोत यांच्या इंग्लिश पुस्तकांचं रुपांतर त्यांनी स्वत:च केलंय. विचार आणि भावना म्हणजे मनाचा खुराक. देहस्वास्थ्य उत्तम राखण्यासाठी सर्वप्रकारची जीवनसत्तवं जशी आवश्यक असतात तसेच मन:शक्ती वाढण्यासाठी ताणतणाव दूर करणं आवश्यक असतात. सुखसमाधानानं जगण्यासाठी निर्भय व्हावं. प्रसन्नपणे जगावं त्यासाठी स्वत:ला ओळखावं या साऱ्या गोष्टी घडवून आणण्यासाठी मार्गदर्शन करण्याचा उद्देश या पुस्तकात स्पष्टपणे मांडला आहे. एकूण बारा प्रकरणात विस्तारानं चिंतामुक्त जीवनाचा आलेख काढला आहे. भावनिक कणखरता ही सुखमय आयुष्याची गुरुकिल्ली आहे. व्यायामाबरोबरच प्रकृतीची जोपासना करावी. भावसंस्करणासाठी मित्र जोडावेत. लोकसंग्रह करावा. अनुकूलतेचा विचार करून आशावादी दृष्टिकोन ठेवावा. सर्वांवर सारखंच प्रेम करावं. इतरांना आवडेल असं वागावं. उगाच ‘जगाचं कसं होईल?’ असल्या मूर्ख प्रश्नानं व्याकुळ होऊन मुर्दाड चेहऱ्यानं जगण्यात काय हंशील? नकारात्मक भावनांचा निचरा करावा. प्रतिकूलतेवर मात करताना राग शांत करण्याचा आरोग्यदायक मार्ग लेखकानं सांगितला आहे. यातनांवर फुंकर घालून भीतीवर विजय मिळवावा. एवढंच नाही तर एकटं रहावं लागलं तरी हरकत नाही पण एकलकोंडं होऊ नये. ‘कंटाळा’ या शब्दाला थारा न देता बुजरेपणा घालवावा. खरं तर अनेक प्रकारे आपणच तणाव निर्माण केलेला असतो. जगातही तो पावलोपावली भेटतो. अशावेळी आपण निरोगी मनानं आणि शरीरानं राहणं जवळजवळ अशक्यच असतं. केव्हा केव्हा तर मानसिक उपचार करण्याचा प्रसंग ओढवतो. तेव्हा काय करावं? या प्रश्नाचं उत्तरही लेखकानं विस्तारपूर्वक दिलंय. स्वत:ची जाणीव उंचावणं तसं कठीणच ! त्यासाठी ‘मी कोण आहे?’ हे शोधावं लागतं. त्या शोधाचं नवं तंत्र शास्त्रज्ञांनी विकसित केलंय. आपल्या निशब्द भावनांना व्यक्त करण्याची प्रतिभा जागृत करावी. तत्पूर्वी व्यसनमुक्त (व्यसने असल्यास!) व्हावं. कामातील दिरंगाई टाळण्याचा प्रयत्न करावा. कामाइतकाच जीवनाचा आनंदही महत्त्वाचा असतो. - अर्थात हे सारे प्रयोग स्वत:वर स्वत:च करताना लेखकानं इशारा दिलाय की ‘जे कराल ते चांगलंच करा’ मर्यादित धोके पत्करण्याचं धाडस मात्र आपल्यात हवंच! आपल्याच भावभावनांचा उपयोग करून आपली मन:स्थिती उत्तम कशी राखावी? दुसऱयांना बरे करणारे स्वत: बरे होतात असं म्हणतात, त्याची प्रचीती येण्यासाठी प्रस्तुत पुस्तकाचा उपयोग समाजातील सर्वच थरांतील व्यक्तींना होईल असा विश्वास वाटतो. मन आणि शरीर यांचं नातं कसं आहे ? या प्रश्नाच्या उत्तरादाखल लेखकानं अनेक महत्त्वपूर्ण मुद्दे दिले आहेत. इच्छाशक्तीच्या बळावर अ‍ॅलर्जी घालविणं तसंच संधिवात, पाठदुखी, कॅन्सर वगैरे अनेक व्याधींवर उपाय सांगितले आहेत. अखेरच्या बाराव्या प्रकरणात ‘मनौषधींचा साठा’ मध्ये लेखकानं काही अंतर्मुख करणाऱ्या गोष्टी सांगितल्या आहेत. रंग, सर्जनशीलता, कौंटुंबिक गाठीभेटी, स्नेहसंमेलनं, हसणं आणि हसवणं वगैरे. दैनंदिन व्यवहारात जीवनसौंदर्य शोधणं आणि वाढवणं कसं गरजेचं आहे हेही पटवून दिलंय. ‘प्रेम’ या विषयावर मात्र केवळ ‘पाव पान’च निवेदन केलंय, असं का? जो विषय संपूर्ण ग्रंथाचा विषय होऊ शकतो त्याची वासलात थोडक्यात लावली आहे हे प्रकर्षानं जाणवतं. संगीत आणि गीत, आवडते पाळीव प्राणी, क्रीडा, कविता, सांत्वन करणाऱ्या वस्तू आणि स्पर्शसुख हे विषयही थोडक्यात आल्यानं लेखकास सुचवावंसं वाटतं की, या विषयांवरही मानसशास्त्रीय पुस्तकं लिहावीत. प्रकाशक ‘मेहतां’ च्या निरामय यशासाठी ध्यान, मनावर विजय आदी मनोवैज्ञानिक पुस्तकांप्रमाणेच हेही पुस्तक वाचकांच्या पसंतीस उतरेल असे वाटते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

BACKSTAGE
BACKSTAGE by MONTEK SINGH AHLUWALIA Rating Star
महाराष्ट्र टाईम्स.. ६.९.२०२६

भारताच्या आर्थिक सुधारणांवर अनेक पुस्तके आजवर प्रसिद्ध झाली आहेत. काहींमध्ये आकडेवारीचे जंजाळ असते, काही धोरणांचे विश्लेषण करतात, तर काही विशिष्ट नेत्यांची जाहिरातबाजी करतात. मात्र माँटेकसिंग अहलुवालिया यांचे `बॅकस्टेज : भारताच्या उच्च वाढीच्या र्षांमागची कहाणी` हे पुस्तक या सगळ्यांपेक्षा वेगळे ठरते. कारण हे पुस्तक भारताच्या आर्थिक परिवर्तनाची कथा बाहेरून पाहणाऱ्या अभ्यासकाने नव्हे, तर त्या परिवर्तनाच्या केंद्रस्थानी उभ्या असलेल्या व्यक्तीने सांगितलेली आहे. जी. बी. देशमुख यांनी मूळ इंग्रजी पुस्तकाचा केलेला मराठी अनुवाद सरस उतरला आहे. पुस्तकाच्या सुरुवातीलाच माँटेकसिंग एक गोष्ट स्पष्ट करतात, ती म्हणजे, हे पुस्तक आत्मकथन नाही. आत्मप्रौढी मिरवण्यासाठी नव्हे, तर भारताच्या आर्थिक सुधारणांचा प्रवास समजावून सांगण्यासाठी अहलुवालिया हे पुस्तक लिहितात. विषयाच्या अनुषंगाने पुस्तकात त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील संदर्भ येतात, पण ते आर्थिक आणि राजकीय घडामोडी समजावून सांगण्यापुरतेच. सिकंदराबादमधील मध्यमवर्गीय वातावरणातून सुरू झालेला त्यांचा प्रवास दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, ऑक्सफर्ड, जागतिक बँक, अर्थ मंत्रालय, योजना आयोग आणि अखेर देशाच्या सर्वोच्च आर्थिक धोरणनिर्मितीच्या केंद्रापर्यंत पोहोचतो. हा प्रवास वाचताना स्वतंत्र भारताच्या आर्थिक विचारसरणीचा विकासक्रम उलगडत जातो. पुस्तकाचे केंद्रस्थान अर्थातच १९९१च्या आर्थिक संकटाचे आहे. त्यावेळी देशाकडे काही आठवड्यांच्या आयातीपुरताही डॉलर शिल्लक नव्हता. सोन्याचा साठा गहाण ठेवण्याची वेळ आली होती आणि आर्थिक दिवाळखोरीची शक्यता प्रत्यक्ष समोर उभी होती. अशावेळी सरकारने घेतलेले निर्णय, त्यामागील तणाव, राजकीय अनिश्चितता आणि प्रशासकीय संघर्ष यांचे वर्णन पुस्तकात अत्यंत जिवंतपणे आले आहे. नाणेनिधी किंवा जागतिक बँकेच्या दबावामुळे या सुधारणा झाल्याची धारणा माँटेकसिंग ठामपणे नाकारतात. हे पुस्तक आर्थिक सुधारणांना कोणत्याही प्रकारच्या विचारधारेच्या चष्म्यातून पाहत नाही. लेखक ना मुक्त बाजाराचे अंधसमर्थन करतात, ना राज्यनियंत्रित व्यवस्थेचे. त्यांचा दृष्टिकोन व्यवहारवादी आहे. भारतासारख्या लोकशाही देशात सुधारणा एका झटक्यात होत नाहीत; त्या राजकीय वास्तवाशी जुळवून घेत हळूहळू पुढे सरकतात, हे ते वारंवार. अधोरेखित करतात. पुस्तकात अनेक ठिकाणी `सुधारणा` हा आर्थिक नव्हे, तर राजकीय प्रक्रियेचाही विषय आहे, हे प्रकर्षाने जाणवते. अहलुवालिया या पुस्तकात अनेक व्यक्ती, अधिकारी, अर्थतज्ज्ञ आणि राजकीय नेत्यांच्या योगदानाचा उल्लेख करतात. नरसिंह राव, मनमोहन सिंग, पी. चिदंबरम, यशवंत सिन्हा, जसवंत सिंह यांच्यापासून ते विविध सनदी अधिकाऱ्यांपर्यंत अनेकांची भूमिका ते प्रामाणिकपणे नोंदवतात. योजना आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून काम करताना अहलुवालिया यांनी जवळून अनुभवलेला काळ येथे उभा राहतो. सन २००४ ते २०११ या काळातील उच्च आर्थिक वाढ, दारिद्रयनिर्मूलनातील प्रगती, पायाभूत सुविधांमध्ये झालेली वाढ आणि ग्रामीण विकासाच्या कार्यक्रमांचे मूल्यमापन ते करतात. विशेषतः भारताने सलग अनेक वर्षे सात ते आठ टक्क्यांच्या दरम्यान वाढ नोंदवली, ती केवळ जागतिक परिस्थितीचा. परिणाम नव्हती; १९९० नंतरच्या सुधारणांनी घातलेल्या पायावर उभे राहून ती शक्य झाली, हा त्यांचा युक्तिवाद पटण्याजोगा वाटतो. मात्र पुस्तकाचे खरे सामर्थ्य यशोगाथेत नाही, तर आत्मपरीक्षणात आहे. यूपीए-२ दरम्यान निर्माण झालेली निर्णयप्रक्रियेतील अडचण, गुंतवणुकीतील वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक मंदी, भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे निर्माण झालेले वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक थेट भाष्य करतात. अनुवादक जी. बी. देशमुख यांनी मूळ पुस्तकातील आर्थिक संकल्पना सहज आणि प्रवाही मराठीत मांडल्या आहेत. यात कृत्रिमता जाणवत नाही. आर्थिक विषयावरील पुस्तक असूनही भाषा जड वाटत नाही. आर्थिक सुधारणांच्या व्यापक सामाजिक परिणामांचा स्वतंत्र आणि सविस्तर ऊहापोह येथे अपेक्षेपेक्षा कमी आढळतो. मात्र, हे पुस्तक ज्या उद्देशाने लिहिले गेले आहे त्या उद्देशात ते अत्यंत यशस्वी ठरते. `बॅकस्टेज` हे केवळ पुस्तक नाही; ते भारताच्या आर्थिक परिवर्तनाचा प्रत्यक्षदर्शी दस्तऐवज आहे. १९९१ नंतर भारताने घेतलेल्या वळणाचा अर्थ समजून घ्यायचा असेल, उच्च वाढीच्या वर्षामागील वास्तविक कथा जाणून घ्यायची असेल आणि धोरणनिर्मितीच्या पडद्यामागे काय घडत असते याचा मागोवा घ्यायचा असेल, तर हे पुस्तक अभ्यासणे आवश्यक ठरते. भारतीय अर्थव्यवस्थेच्या आर्थिक सुधारणांचा इतिहास आणि त्यांचे परिणाम समजून घेण्यासाठी हे पुस्तक एक महत्त्वाचा संदर्भग्रंथ म्हणून ओळखले जाऊ शकते. मराठीत उपलब्ध असलेला हा अनुवाद त्या दृष्टीने विशेष स्वागतार्ह आहे. ...Read more

HACHYUKISUNASKI
HACHYUKISUNASKI by ABA MAHAJAN Rating Star
Dinesh

This is a different planet. This is a different world. And this is a truly different book. I loved it. You should also buy it and read it. I’m sure you will love it too. Hachyukisunaski is a fantastic Book.