* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: CHINTAMUKTA JIVAN
  • Availability : Available
  • ISBN : 9788177663228
  • Edition : 4
  • Publishing Year : NOVEMBER 2002
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 224
  • Language : MARATHI
  • Category : SELF HELP, HEALTH & PERSONAL DEVELOPMENT
Quantity
Buying Options:
  • Print Books:
WE NOURISH OUR BODY WITH REGULAR DOSES OF PROTEINS, VITAMINS AND OTHER NUTRITIOUS FOOD ITEMS. LIKEWISE, OUR MIND ALSO NEEDS NOURISHMENT FOR REMAINING ENTHUSIASTIC AND CREATIVE. THIS BOOK UNCOVERS VARIOUS SIMPLE REMEDIES TO OVERCOME ALL YOUR TENSIONS, GRIEF, WHICH ARE HIDDEN DEEP INSIDE YOUR BODY, SOMEWHERE YET DEEP INTO YOUR MIND. THE SOLUTIONS SUGGESTED HERE HAVE A BASE OF PSYCHOLOGY. YOU WILL COME ACROSS VARIOUS INTERESTING WAYS TO MAKE YOUSELF FEARLESS, FRESH, TO UNDERSTAND YOURSELF IN A BETTER WAY, TO MAKE YOUR LIFE TENSION FREE. THIS BOOK IN ALL SENSE ATTEMPTS TO PROVIDE YOUR MIND WITH NOURISHING, UTRITIOUS, WELL-BALANCED DIET.
शरीराला सबल करण्यासाठी ज्याप्रमाणे जीवनसत्वे, प्रथिने व पौष्टिक पदार्थांची जरुरी असते, त्याचप्रमाणे मनाला क्रियाशील व उत्साही बनवण्यासाठी खास ‘मानसिक’ पौष्टिक आहाराची जरुरी असते. मनात व शरीरात खोलवर दडलेले ताणतणाव दूर करून आनंदी जीवन जगण्याचे अनंत उपाय या पुस्तकात दिलेले आहेत. यात भीतीवर विजय कसा मिळवावा, ताजेतवाने कसे व्हावे, स्वत:ला कसे ओळखावे, अशा अनेक समस्यांवर मानसशास्त्रीय सुयोग्य मार्गदर्शन केले आहे. चिंतामुक्त यशस्वी जीवनासाठी सर्वतNहेचा ‘मानसिक पौष्टिक आहार’ पुरवण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला आहे.

No Records Found
No Records Found
Keywords
Customer Reviews
  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 08-12-2002

    चिंतामुक्त जीवन जगण्यासाठी... सध्याच्या जगात ताणतणाव प्रत्येकाला अपरिहार्यच आहेत. त्यामुळे ताणतणाव बाळगत जगणे अवघड बनले आहे. या तणावांपासून मुक्त होण्यासाठी अनेक गुरूंचे अनेक कोर्स आहेत. आर्ट ऑफ लिव्हिंग कोर्सचे प्रणेते श्री. श्री. रविशंकर यांच्या परेरणेने लिहिलेल्या ‘इमोशन्स अँड युवर हेल्थ’ या पुस्तकाचा हा मराठी अनुवाद आहे आपल्या मनोविकारांवर ताबा मिळवून आपण जीवनात आनंदी होऊ शकतो. भावनिक कणखरता, निचरा, तणाव-निर्माण करण्याचे मूळ कमी करा निरोगी राहणे, मानसिक प्रथमोपचार व इतर अनेक प्रकरणे आहेत. ज्यामुळे आपण ‘षड् रिपूवर नियंत्रण मिळवू शकू सध्याच्या युगात जगणाऱ्या प्रत्येकाने वाचावे असेच हे पुस्तक आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK SAMANA (MUMBAI) 08-12-2002

    शरीराला सबल करण्यासाठी ज्याप्रमाणे जीवनसत्वे, पौष्टिके यांची गरज असते, तसेच मनाला उत्साही बनण्यासाठी मानसिक आहाराची जरुरी असते. मनात आणि शरीरात खोलवर दडलेले ताणतणाव दूर करून सुखी आनंदी जीवन जगण्यासाठी काही उपाय या पुस्तकात दिले आहेत. भावनिक कणखरता, आावादी दृष्टिकोन, तणाव कमी करा, मानसिक प्रथमोपचार, मन आणि शरीराचे नाते इत्यादी प्रकरणे बोलकी आहेत. ...Read more

  • Rating StarTARUN BHARAT MUMBAI 5-1-2003

    आपल्याला सुखानं जगण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता असते? या एका ओळीच्या प्रश्नाचं उत्तर अनेक ओळीत देता येईल. अनेक तत्त्ववेत्त्यांनी यावर पुस्तकं लिहिली आहेत. प्राचीन ग्रंथांतील ज्ञान आपल्याला जगणं शिकवतात. धर्मग्रंथ हे नीतिशास्त्राचेच ग्रंथ असतत. असे ग्रंथ आधुनिक काळात आणि विज्ञानयुगात असंख्य चिंतातुरांना औषधोपचाराप्रमाणे जवळचे वाटू लागले आहेत. खरं तर विज्ञानानं अनेक प्रश्न सोडविले आहेत. अनेक प्रश्न सोडविण्याचे मार्ग सोपे झाले आहेत. तरीही साधुसंतांच्या मार्गदर्शनाची गरज मात्र कमी झालीय असं वाटत नाही. म्हणूनच नवनवी पुस्तकं प्रकाशित होताना दिसतात. त्यातही ‘जगावं कसं ?’ या प्रश्नाचा ऊहापोह करणारी अधिक असतात. ‘चिंतामुक्त जीवन’ हे असंच एक पुस्तक प्रकाशित झालंय. ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ या कोर्सचे प्रणेते रविशंकर महाराज यांच्या प्रेरणेनं भावभावनांवर आधारित ‘इमोशन्स् अ‍ॅन्ड युअर हेल्थ’ या मुनोत यांच्या इंग्लिश पुस्तकांचं रुपांतर त्यांनी स्वत:च केलंय. विचार आणि भावना म्हणजे मनाचा खुराक. देहस्वास्थ्य उत्तम राखण्यासाठी सर्वप्रकारची जीवनसत्तवं जशी आवश्यक असतात तसेच मन:शक्ती वाढण्यासाठी ताणतणाव दूर करणं आवश्यक असतात. सुखसमाधानानं जगण्यासाठी निर्भय व्हावं. प्रसन्नपणे जगावं त्यासाठी स्वत:ला ओळखावं या साऱ्या गोष्टी घडवून आणण्यासाठी मार्गदर्शन करण्याचा उद्देश या पुस्तकात स्पष्टपणे मांडला आहे. एकूण बारा प्रकरणात विस्तारानं चिंतामुक्त जीवनाचा आलेख काढला आहे. भावनिक कणखरता ही सुखमय आयुष्याची गुरुकिल्ली आहे. व्यायामाबरोबरच प्रकृतीची जोपासना करावी. भावसंस्करणासाठी मित्र जोडावेत. लोकसंग्रह करावा. अनुकूलतेचा विचार करून आशावादी दृष्टिकोन ठेवावा. सर्वांवर सारखंच प्रेम करावं. इतरांना आवडेल असं वागावं. उगाच ‘जगाचं कसं होईल?’ असल्या मूर्ख प्रश्नानं व्याकुळ होऊन मुर्दाड चेहऱ्यानं जगण्यात काय हंशील? नकारात्मक भावनांचा निचरा करावा. प्रतिकूलतेवर मात करताना राग शांत करण्याचा आरोग्यदायक मार्ग लेखकानं सांगितला आहे. यातनांवर फुंकर घालून भीतीवर विजय मिळवावा. एवढंच नाही तर एकटं रहावं लागलं तरी हरकत नाही पण एकलकोंडं होऊ नये. ‘कंटाळा’ या शब्दाला थारा न देता बुजरेपणा घालवावा. खरं तर अनेक प्रकारे आपणच तणाव निर्माण केलेला असतो. जगातही तो पावलोपावली भेटतो. अशावेळी आपण निरोगी मनानं आणि शरीरानं राहणं जवळजवळ अशक्यच असतं. केव्हा केव्हा तर मानसिक उपचार करण्याचा प्रसंग ओढवतो. तेव्हा काय करावं? या प्रश्नाचं उत्तरही लेखकानं विस्तारपूर्वक दिलंय. स्वत:ची जाणीव उंचावणं तसं कठीणच ! त्यासाठी ‘मी कोण आहे?’ हे शोधावं लागतं. त्या शोधाचं नवं तंत्र शास्त्रज्ञांनी विकसित केलंय. आपल्या निशब्द भावनांना व्यक्त करण्याची प्रतिभा जागृत करावी. तत्पूर्वी व्यसनमुक्त (व्यसने असल्यास!) व्हावं. कामातील दिरंगाई टाळण्याचा प्रयत्न करावा. कामाइतकाच जीवनाचा आनंदही महत्त्वाचा असतो. - अर्थात हे सारे प्रयोग स्वत:वर स्वत:च करताना लेखकानं इशारा दिलाय की ‘जे कराल ते चांगलंच करा’ मर्यादित धोके पत्करण्याचं धाडस मात्र आपल्यात हवंच! आपल्याच भावभावनांचा उपयोग करून आपली मन:स्थिती उत्तम कशी राखावी? दुसऱयांना बरे करणारे स्वत: बरे होतात असं म्हणतात, त्याची प्रचीती येण्यासाठी प्रस्तुत पुस्तकाचा उपयोग समाजातील सर्वच थरांतील व्यक्तींना होईल असा विश्वास वाटतो. मन आणि शरीर यांचं नातं कसं आहे ? या प्रश्नाच्या उत्तरादाखल लेखकानं अनेक महत्त्वपूर्ण मुद्दे दिले आहेत. इच्छाशक्तीच्या बळावर अ‍ॅलर्जी घालविणं तसंच संधिवात, पाठदुखी, कॅन्सर वगैरे अनेक व्याधींवर उपाय सांगितले आहेत. अखेरच्या बाराव्या प्रकरणात ‘मनौषधींचा साठा’ मध्ये लेखकानं काही अंतर्मुख करणाऱ्या गोष्टी सांगितल्या आहेत. रंग, सर्जनशीलता, कौंटुंबिक गाठीभेटी, स्नेहसंमेलनं, हसणं आणि हसवणं वगैरे. दैनंदिन व्यवहारात जीवनसौंदर्य शोधणं आणि वाढवणं कसं गरजेचं आहे हेही पटवून दिलंय. ‘प्रेम’ या विषयावर मात्र केवळ ‘पाव पान’च निवेदन केलंय, असं का? जो विषय संपूर्ण ग्रंथाचा विषय होऊ शकतो त्याची वासलात थोडक्यात लावली आहे हे प्रकर्षानं जाणवतं. संगीत आणि गीत, आवडते पाळीव प्राणी, क्रीडा, कविता, सांत्वन करणाऱ्या वस्तू आणि स्पर्शसुख हे विषयही थोडक्यात आल्यानं लेखकास सुचवावंसं वाटतं की, या विषयांवरही मानसशास्त्रीय पुस्तकं लिहावीत. प्रकाशक ‘मेहतां’ च्या निरामय यशासाठी ध्यान, मनावर विजय आदी मनोवैज्ञानिक पुस्तकांप्रमाणेच हेही पुस्तक वाचकांच्या पसंतीस उतरेल असे वाटते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more