* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS IS A STORY BOOK WRITTEN BY SUDHA MURTI ESPECIALLY FOR THE CHILDREN. THIS BOOK IS A COMBINATION OF SOME INDIAN AND SOME FOREIGN STORIES AND YET SOME STORIES ARE A RESULT OF SUDHA MURTI`S OWN IMAGINATION. HERE THE CUNNING FOX MEETS US IN THE FORM OF A BENEVOLENT ROLE. YOU WILL ALSO MEET THE COW, MONKEY AND THE SCARECROW WHO WERE ALL FAVOURED BY THE GRANDFATHER AND WHO STILL ARE STILL GRATEFUL FOR THAT. WE WILL ALSO COME ACROSS MANY WOMEN WHO ARE NOT SCARED OF ANY CALAMITIES. ON THE CONTRARY, WE WILL FIND THEM COOL AND MAINTAINING THEIR CALMNESS THROUGH IT. YOU WILL MEET THOSE YOUNG PEOPLE WHO ARE GAINING LOTS OF MONEY BUT ARE USING THAT TO HELP THE NEEDY AND WHO THEMSELVES ARE STILL RELYING ON THEIR HARD WORK. THESE STORIES WILL SURELY TAKE YOU TO A DIFFERENT WORLD.
सुधा मूर्तींनी लिहिलेल्या बालकथांचं हे पुस्तक. यात काही भारतीय आणि काही विदेशी कथा आहेत, तर काही सुधा मूर्ती यांनी स्वत: लिहिलेल्या आहेत. नेहमी लबाडपणा करणाया कोल्ह्याचं इथे परोपकारी रूप पहायला मिळेल. आजोबांनी केलेल्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारी गाय, माकड आणि बुजगावणं इथे भेटतील. आलेल्या संकटांनी घाबरून न जाता चतुराईने त्यांवर मात करणाNया अनेक स्त्रिया पहायला मिळतील. जादूच्या मदतीनं संपत्ती मिळू लागल्यावर लोकांना मदत करणारे आणि तरीही श्रमांवरच भिस्त ठेवणारे तरुणही भेटतील. एका वेगळ्याच विश्वाची सफर या गोष्टी घडवून आणतील.

No Records Found
No Records Found
Keywords
#SUDHA MURTY #N.R.NARAYANA MURTY #LEENA SOHONI #UMA KULKARNI #WISE & OTHERWISE #GOSHTI MANSANCHYA #PUNYABHUMI BHARAT #THAILIBHAR GOSHTI #SUKESHINI AANI ITAR KATHA #BAKULA #AYUSHYACHE DHADE GIRAVTANA #AAJICHYA POTADITALYA GOSHTI #MAHASHWETA #DOLLAR BAHU #SAMANYATALE ASAMANYA #PARIGH #PITRURHUN #ASTITVA #HARAVALELYA MANDIRACHE RAHASYA #TEEN HAJAR TAKE #SARPACHA SOOD #GARUDJANMACHI KATHA #TRISHANKU #A BETTER INDIA A BETTER WORLD #NARAYAN MURTY : MULYA JAPNARA EK ADWITIYA AAYUSHYA #सुधा मूर्ती #एन.आर.नारायण मूर्ती #लीना सोहोनी #उमा कुलकर्णी #वाइज अँड अदरवाइज #गोष्टी माणसांच्या #पुण्यभूमी भारत #थैलीभर गोष्टी #सुकेशिनी #बकुळा #आयुष्याचे धडे गिरवताना #आजीच्या पोतडीतल्या गोष्टी #महाश्वेता #डॉलर बहू सामान्यांतले असामान्य #परीघ पितृऋण #अस्तित्व #हरवलेल्या मंदिराचे रहस्य #तीन हजार टाके #सर्पाचा सूड #गरुडजन्माची कथा #त्रिशंकू #अ बेटर इंडिया अ बेटर वर्ल्ड : नारायण मूर्ती #नारायण मूर्ती : मूल्यं जपणारं एक अद्वितीय आयुष्य
Customer Reviews
  • Rating StarDAINIK PUDHARI 16-12-2007

    किशोरवयीन मुलांसाठी रोचक, वेगळ्या कथा... संवेदनशील मनाने टिपलेले जीवनानुभव अत्यंत प्रांजळपणे रसाळ वाणीने कथन करणाऱ्या सिद्धहस्त लेखिका सुधामूर्ती यांनी जाणीवपूर्वक काही कथा किशोरवयीन मुलांसाठी लिहिल्या आहेत. ‘थैलीभर गोष्टी’ आणि ‘सुकेशिनी आणि इतर कथा या दोन पुस्तकांत त्या समाविष्ट आहेत. बालवयातच नैतिकतेचे संस्कार होणे गरजेचे असते. ही संस्कारांची शिदोरी जन्मभर पुरते असे सुधातार्इंना वाटते म्हणूनच त्यांनी बाल्यावस्था संपवून किशोरावस्थेत प्रवेश केलेल्या मुला-मुलींसाठी या वेगळ्या प्रकारच्या कथा लिहिल्या आहेत. या कथांसाठी सुधातार्इंनी मुद्दामच राजा-राणी अशी पौराणिक पार्श्वभूमी निवडली आहे, ज्यामुळे आपली संस्कृती आणि आपण लहानपणी ऐकलेल्या कथांचे पुर्नकथन स्वत:च्या शैलीत करणे त्यांना सुलभ झाले आहे. ‘सुकेशिनी आणि इतर कथा’ या संग्रहात चाळीस कथा असून सर्वच प्रामाणिकपणा, परोपकार, कष्ट यांचे संस्कार देणाऱ्या आहेत. पहिल्याच कथेतील सुकेशिनी गावाचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी अत्यंत धाडसाने मृत्यूच्या दाढेत प्रवेश करते. स्वप्ने माणसाच्या जगण्याचा आधार असतात हे ‘देवसुंदरी’त येते. ‘जादूचं झाड’मध्ये बंधुप्रेम आहे. ईर्ष्या करणारे अपयशाचे धनी होतात तर प्रामाणिक, निर्लोभी सुखी होतात हे ‘इमानी’ व ‘विंचवाचं दुकान’ कथेत कळतं. प्रसंगावधान ठेवून वागल्यास संकटातून कसं सुटता येतं हे ‘दुष्ट सिंह’, ‘साहसी गृहिणी’ रोहिणी समजतं. एकंदरीत, किशोरवयीन मुलांसाठी असलेल्या या कथा आबालवृद्धांना आनंद देणाऱ्या, मनोरंजनाबरोबरच मनाचे उद् बोधन करणाऱ्या, रसाळ वाणीच्या छान गोष्टी आहेत. त्यातील घटनांची मांडणी वेधक असून मानवी स्वभावाचे नमुने अचूकपणे टिपून कथांची रचना केलेली आहे. अनेक कथापात्रांचे तर्कशुद्ध बोलणे, गणिती बुद्धी मनाला भावते. काहीत आलेली शेवटची कलाटणी सुंदर वाटते. सर्वच कथा सुंदर आहेत. -डॉ. विभा शहा ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more