* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: PAVHNA
  • Availability : Available
  • ISBN : 9789395477963
  • Edition : 3
  • Publishing Year : 1966
  • Weight : 225.00 gms
  • Pages : 92
  • Language : MARATHI
  • Category : NOVEL
  • Available in Combos :MAHADEO MORE COMBO SET - 18 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
BHIMU IS THE YOUTH VISITING HIS MATERNAL UNCLE AT SHIVAPURWADI FOR MHAI. HE FALLS IN LOVE WITH FULI STAYING THERE. HOWEVER, SHE IS MARRIED, AND HER HUSBAND IS IN MUMBAI AND HARDLY COMES TO THE VILLAGE. FULI ALSO GETS ATTRACTED TO BHIMU. A COUPLE OF TIMES, THEY COME TOGETHER. THE LANDLORD’S SON JAISING WHO STUDIES IN THE CITY HAS ALSO RETURNED TO MHAI. BHIMU AND HE GETS ALONG WELL. BAJIRAO BHOSALYA, SIRAPA ATYALYA, YESHYA SHEVALYA AND JANU UPALYA ARE THE BAD FOUR IN THE VILLAGE. THEY ARE NOTORIOUS FOR BREWING LOCAL ALCOHOL, STEALING SHEEP AND GOATS, EYEING YOUNG GIRLS BADLY, FORCING THEM IF AND WHEN POSSIBLE, ETC. THEY DO NOT HESITATE TO BITE THE HELL OUT OF ANYONE TAKING AN OBJECTION TO THEIR DEEDS. KILLING SOMEONE IS NOT UNKNOWN TO THEM. IN BROAD DAYLIGHT, THEY HAD KILLED THE LABOURER, PATIL. BHIMU HEARS ABOUT THE BAD FOUR AND THEIR DEEDS. WHEN HE COMES TO KNOW THAT JAISING WANTS TO TEACH THEM A LESSON, HE DECIDES TO JOIN IN. ONE DAY, BAJIRAO BHOSLYA DRAGS JADHAV’S JANI. JAISING SEES IT AND STOPS HIM. SEEKING THE OPPORTUNITY, JANI RUNS AWAY. BAJIRAO AND JAISING FIGHT TOGETHER. JAISING SEEMS TO OVERPOWER BAJIRAO WHEN THE BAD THREE JOIN IN AND DEFEAT JAISING. THEY HIT HIM ON THE HEAD. HE BECOMES UNCONSCIOUS. LATER, HE TELLS BHIMU ABOUT THIS AND SAYS THAT AFTER MHAI, HE WILL TEACH THE BAD FOUR A LESSON. HE WANTS BHIMU TO ACCOMPANY HIM, TO WHICH BHIMU AGREES. THE DAY OF MHAI ARRIVES. BHIMU AND FULI DECIDE TO MEET AT THE BIROBA MAAL ONCE THE SHOW BEGINS AT NIGHT. LOST IN DRINKING ALCOHOL WITH HIS UNCLE, BHIMU REMEMBERS THE MEETING A LITTLE LATE. SOMEHOW, HE DRAGS HIMSELF TO THE SET SPOT AND FINDS THAT FULI HAS REACHED THERE AND THE BAD FOUR HAVE RAPED HER. THE FOLLOWING DAY, JAISING CALLS BHIMU AND TELLS HIM THAT HE WILL TEACH THE BAD FOUR A LESSON AT NIGHT. HE INVITES BHIMU TO JOIN IN. ANGERED BY FULI’S RAPE, BHIMU AGREES TO JOIN IN. AT NIGHT, THEY REACH UPALYAS HUT, WHERE ALL FOUR ARE PRESENT. JAISING IS CARRYING A GUN, WHILE BHIMU HAS A STRONG STICK. A TERRIBLE FIGHT TAKES PLACE. ALL SIX OF THEM GET HURT, AND THE BAD FOUR ARE SERIOUSLY INJURED. BHIMU CARRIES THE UNCONSCIOUS JAISING AND RUNS AWAY. AFTER A WHILE, JAISING GAINS CONSCIOUSNESS. HE ASKS BHIMU TO RUN BACK TO HIS VILLAGE. ACCORDINGLY, BHIMU RUNS TOWARD ST STAND.
भिमू हा मामाच्या गावी म्हाईसाठी आलेला तरुण...इनामदारांचा शहरात शिकणारा मुलगा जैसिंगही म्हाईसाठी गावात आलेला... बाजीराव भोसल्या, सिरपा आत्याळ्या, येश्या शेवाळ्या आणि जानु उपाळ्या ही गावातली चांडाळ चौकडी... गावठी दारू तयार करणे, गावातील लोकांच्या शेळ्या-मेंढ्या पळवणे, गावातल्या पोरीबाळींवर नजर ठेवून, संधी साधून त्यांच्यावर बळजबरी करणे, त्याबाबत जर कुणी विचारायला आलं तर त्याला बेदम मारणे, प्रसंगी जीव घेणे, असले त्यांचे उद्योग...त्यांना विरोध करू पाहणार्‍या जैसिंगला एकदा ही चांडाळ चौकडी बेदम मारून बेशुद्ध करते...भिमूचा ज्या मुलीवर जीव जडलेला असतो तिची अब्रू हे चौघं लुटतात...जैसिंग आणि भिमू म्हाईच्या दुसर्‍या दिवशी या चौघांना गाठतात...हे दोघं आणि ते चौघं, अशी जोरदार मारामारी होते...त्या चौघांना गंभीर जखमी करून जैसिंग आणि भिमू सटकतात...भिमू रात्रीच्या अंधारात एस. टी. स्टॅन्डच्या दिशेन धावत सुटतो...अस्सल ग्रामीण वातावरणातील कादंबरी
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
मराठीसाहित्य#कादंबरी#महादेवमोरे#पाव्हणा #MARATHIBOOKS #ONLINEMARATHIBOOKS#MEHTAPUBLISHINGHOUSE#PAVHNA#MAHADEO MORE
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more