MAHASAMRAT COMBO SET - ZANZAVAT & RANKHAINDAL & ASMAN BHARARI

* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • Weight : 1500.00 gms
  • Pages : 1404
  • Language : MARATHI
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
Sr.No.Book NamePriceISBN
1MAHASAMRAT ASMANBHARARI750.009789357209403
2MAHASAMRAT RANKHAINDAL625.009789357200424
3MAHASAMRAT ZANZAVAT625.009789394258358
  2000.00 
VISHWAS PATIL`S `MAHASAMRAT` TRILOGY IS AN EPIC NARRATIVE THAT MASTERFULLY CAPTURES THE BLAZING LIFE STORY AND REVOLUTIONARY SPIRIT OF CHHATRAPATI SHIVAJI MAHARAJ. THE FIRST VOLUME, ZANZAVAT, EXPLORES THE UNTOLD HISTORY BEFORE HIS BIRTH AND HIS FOUNDATIONAL TRAINING UNDER THE GUIDANCE OF RAJMATA JIJAU AND SHAHAJI RAJE. THE SECOND PART, RANKHAINDAL, DEPICTS THE MID-YEARS OF INTENSE WARFARE, FEATURING THE RAID ON SHAISTA KHAN, THE LOOTING OF SURAT, AND THE VISIONARY CREATION OF THE SINDHUDURG SEA FORT. IN THE FINAL INSTALLMENT, ASMAN BHARARI, THE FOCUS SHIFTS TO THE FIERCE CONFLICT WITH AURANGZEB AND THE LEGENDARY, HIGH-STAKES ESCAPE FROM THE AGRA CAPTIVITY. THROUGH DEEP HISTORICAL RESEARCH, THIS SERIES PORTRAYS MAHARAJ NOT JUST AS A WARRIOR, BUT AS A STRATEGIC GENIUS AND A SYMBOL OF SOVEREIGN PRIDE, MAKING IT A DEFINITIVE AND INSPIRING DOCUMENT OF INDIAN HISTORY.
विश्वास पाटील यांची `महासम्राट` ही त्रयी छत्रपती शिवाजी महाराजांच्या धगधगत्या जीवनगाथेचा एक महाकाव्यरूपी प्रवास आहे. पहिल्या खंडात (झंझावात) स्वराज्याच्या निर्मितीपूर्वीचा अज्ञात इतिहास आणि जिजाऊ-शहाजीराजांच्या मार्गदर्शनाखालील शिवरायांची जडणघडण चितारली आहे. दुसऱ्या खंडात (रणखैंदळ) पस्तीशीच्या उंबरठ्यावरील महाराजांचे अचाट शौर्य, शाहिस्तेखानाची फजिती, सुरतेची लूट आणि सिंधुदुर्ग उभारणीचे स्वप्न साकारताना दिसते. तिसऱ्या खंडात (अस्मानभरारी) औरंगजेबाशी झालेला प्रखर संघर्ष, पुरंदरचा लढा आणि आग्र्याच्या बंदिवासातून महाराजांनी घेतलेली ऐतिहासिक भरारी याचे थरारक चित्रण आहे. लेखकाने सखोल संशोधनातून महाराजांच्या लष्करी, प्रशासकीय आणि भावनिक पैलूंना या तीनही खंडातून अत्यंत प्रभावीपणे गुंफले आहे. ही कादंबरीमाला केवळ इतिहास नाही, तर स्वराज्याच्या अस्मितेचा एक दैदिप्यमान आणि प्रेरणादायी दस्तऐवज ठरते.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MAHASAMRAT#VISHWASPATIL#MEHTAPUBLISHINGHOUSE#RANKHAINDAL#ASMANBHARARI#ZANZAVAT
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

रुपाली सोनवणे

#रुक #जाना #नही लेखक: Dr. भावेश भाटिया शब्दांकन: Dr: सचिन पाचोरकर अनुवाद: सुप्रिया वकील ​अंथरून पाहून पाय पसरावे... अह्ह.. त्या निर्जीव अंथरुणासाठी आपल्या सजीव पावलांना का त्रास द्यावा? असेच एक जबरदस्त आत्मचरित्र वाचून संपवलं आणि एक ऊर्जा निर्माणकरून गेलं, पुस्तकाचं नाव आहे `रुक जाना नहीँ ​डॉ. भावेश भाटिया यांची ही प्रेरणादायी कहाणी. शाळेत असताना आलेलं अकाली अंधत्व आणि त्यानंतर खडखडीत खडतर जीवनाचा सुरू झालेला प्रवास, पण या प्रवासात खचलेल्या बालमनाला त्यांच्या आईने दिलेलं बळ, प्रेरणा व आत्मसन्मानाची शिकवण आणि स्वाभिमानाचे धडे लेखकास पुरे होते. हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. चांगल्या धडधाकट व्यक्तीवर संकट आल्यावर दूर दूर पळणारे नातलग, मित्र परिवार, जातभाई... दृष्टी गेलेल्या व्यक्तीस कितपत आधार देतील? पण एक ऑपरेटर ते एक उद्योजक, `सनराईज कॅण्डल`चा विस्तार आणि स्वतःबरोबर अनेक दृष्टिहीन व्यक्तींना स्वतःच्या पायावर उभं करून रोजगार देणारा हा अवलिया किती अडथळे पार करून आलाय हे जाणून घेण्यासाठी पुस्तक वाचायला हवंच. ​कुठलाही वशीला नाही की कोणाची सहानुभूती नाही, स्वबळावर विविध प्रयोग करत उद्योग यशस्वी करणं सोपं नाही. यात ज्या ज्या देवमाणसांनी हातभार लावला त्यांचा पण उल्लेख आहे, पण त्या देवमाणसांनी देखील कधीच उपकारिक भाषा न करता व स्वाभिमान न दुखावता कशी मदत करता येऊ शकते हे त्यांच्या कृतीतून दाखवून दिलंय. लेखक फक्त उद्योग उभारून थांबले नाहीत तर त्यांनी सामाजिक जाणीवेचं भान देखील ठेवलंय. महाबळेश्वरमध्ये सनराईज कॅण्डल नावाने त्यांनी भव्य असा उद्योग परिसर आणि म्युझियम सुरू केलंय, तेथे अनेक दृष्टिहीन व्यक्तींना रोजगार मिळाला आहे त्याचबरोबर सर्वजण स्वाभिमानाने कष्ट करून जगत आहेत. हजारो आयुष्य त्यांनी उजळून टाकली आहेत. दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कार सह एकून 46 पुरस्कारांचे ते मानकरी आहेत.विशेष म्हणजे सर्व पुरस्कार त्यांच्या योग्यतेनुसार दिले आहेत.. आणी अशा हजारो पुरस्कारांचे ते मानकरी आहेत असंच वाटत..त्यांच्या कामाची दखल रिलायन्स ग्रुप ने देखील घेतली आहे.व त्यांच्या पुस्तकास प्रस्तावना देखील नीता अंबानी यांनी दिली आहे.उद्योग करताना छोट्या छोट्या गोष्टी कसा प्रभाव करतात याच वर्णन देखील त्यांनी लिहिल आहे.. ​या कार्यात महत्त्वाचं योगदान त्यांच्या धर्मपत्नी नीता भाटिया यांनी दिलं आहे. दूरदृष्टी ठेवून आपल्या पतीस प्रोत्साहन देऊन, नवीन कल्पनेसह पाठिंबा देऊन त्यांना हुरूप देण्याचं काम त्यांनी केलंय. नीता भाटिया यांचं कर्तृत्व, त्यांचं पवित्र निस्वार्थी प्रेम या पुस्तकातून वाचताना आंतरिक वेगळी ऊर्जा मिळते. कलियुगातील देवी हा शब्द व मान त्यांना समर्पक वाटतो. पुस्तक सर्व वयोगटातील वाचक वाचू शकतात. मनाने खचलेल्या पण शरीराने धडधाकट असलेल्या प्रत्येक व्यक्तीने वरील पुस्तक नक्की वाचावं आणि आत्मसात करावं. एवढ्या उंचीवर असूनही जमिनीवर पाय असलेल व्यक्तिमत्व आहे. अगदी प्रेमळ पणे वागण बोलण सन्मान देण..ही दैवी देणगी त्यांच्या जवळ आहे. ...Read more