* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: WILD SWANS : THREE DAUGHTERS OF CHINA
  • Availability : Available
  • Translators : VIJAYA BAPAT
  • ISBN : 9788184984576
  • Edition : 1
  • Publishing Year : FEBRUARY 2013
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 652
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : MEMOIR
Quantity
Buying Options:
  • Print Books:
BLENDING THE INTIMACY OF MEMOIR AND THE PANORAMIC SWEEP OF EYEWITNESS HISTORY, WILD SWANS HAS BECOME A BESTSELLING CLASSIC IN THIRTY LANGUAGES, WITH MORE THAN TEN MILLION COPIES SOLD. THE STORY OF THREE GENERATIONS IN TWENTIETH-CENTURY CHINA, IT IS AN ENGROSSING RECORD OF MAO`S IMPACT ON CHINA, AN UNUSUAL WINDOW ON THE FEMALE EXPERIENCE IN THE MODERN WORLD, AND AN INSPIRING TALE OF COURAGE AND LOVE.587~ DESCRIBES THE LIFE OF HER GRANDMOTHER, A WARLORD`S CONCUBINE; HER MOTHER`S STRUGGLES AS A YOUNG IDEALISTIC COMMUNIST; AND HER PARENTS` EXPERIENCE AS MEMBERS OF THE COMMUNIST ELITE AND THEIR ORDEAL DURING THE CULTURAL REVOLUTION. CHANG WAS A RED GUARD BRIEFLY AT THE AGE OF FOURTEEN, THEN WORKED AS A PEASANT, A "BAREFOOT DOCTOR," A STEELWORKER, AND AN ELECTRICIAN. AS THE STORY OF EACH GENERATION UNFOLDS, CHANG CAPTURES IN GRIPPING, MOVING X AND ULTIMATELY UPLIFTING X DETAIL THE CYCLES OF VIOLENT DRAMA VISITED ON HER OWN FAMILY AND MILLIONS OF OTHERS CAUGHT IN THE WHIRLWIND OF HISTORY.
ही कहाणी आहे हिंसाचार , अमानुष छळ, अनन्वित अत्याचार आणि जुलमी व्यवस्था यांच्या काळ्याकुट्ट गर्तेमध्ये सौंदर्याची आस धरणाऱ्या , नवनिर्मितीचा आणि आधुनिकतेचा ध्यास घेणाऱ्या स्त्रियांची, त्यांच्या आयुष्यांची. या कहाणीला पाश्र्वभूमी आहे चीनमधल्या राजकीय, सामाजिक स्थित्यंतरांची, बदलांची. यात क्रांतीमुळे चीनी जनतेच्या आयुष्यावर झालेले परिणाम आहेत; श्रीमंत-गरीब लोकांचं जीवन आहे; समाजजीवनातल्या कथा, मिथकं, चालीरीती यांचे संदर्भ आहेत; आदर्शवादाने भारलेले आणि तो आदर्शवाद फोल ठरल्यानंतर कोसळून गेलेले स्त्री-पुरुषही आहेत. ही कहाणी चीनच्या इतिहासातील एक व्यापक कालखंड तपशीलवारपणे डोळ्यांसमोर उभा करून आपल्याला अंतर्मुख करते.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #MUKTAVIHANGCHINCHYATEENKANYA #WILDSWANS:THREEDAUGHTERSOFCHINA #मुक्तविहंग:चीनच्यातीनकन्या #MEMOIRTRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #VIJAYABAPAT #विजयाबापट #JUNGCHANG "
Customer Reviews
  • Rating StarKiran Borkar

    चीनच्या त्या जगप्रसिद्ध भिंतीमागे काय चालू आहे याची उत्सुकता सगळ्यांच असते. तेथे असलेली कम्युनिस्ट राजवट, राजकारण याची माहिती सर्वानाच हवी असते .या पुस्तकात लेखिका ,तिची आई,आणि तिची आजी अश्या तीन स्त्रियांची वेगवेगळ्या कलखंडातली कहाणी सांगितली आहे चीनमधल्या जुलमी राजवटीची ,अमानुष क्रौर्यची आणि क्रांतीची कहाणी आहे .या क्रांतीमुळे चिनी जनतेवर झालेले परिणाम ,श्रीमंत गरीब लोकांचे जीवन ,त्यांचे राहणीमान अतिशय सुंदर पद्धतीने मांडण्यात आले आहे .या पुस्तकास चीनमध्ये बंदी घातली आहे .पुस्तकाचे मूळ नाव वाइल्ड स्वान्स थ्री डॉटर्स ऑफ चायना हे आहे .यातील अमानुष हिंसाचार वाचून अंगावर काटा येतो. ...Read more

  • Rating StarLOKPRABHA 25-12-2015

    आरसा चीनचा लेखिका युंग चँग चीनमधल्या सेशुआन प्रांतातल्या यी बीन शहरात १९५२ मध्ये जन्मली. सरकारी आज्ञेनुसार शेतात तसंच कारखान्यात काम करत असताना सुरुवातीला चोरुनमारुन आणि नंतर उघडपणे ती इंग्रजी शिकली. नंतर सरकारच्याच एका शिष्यवृत्तीचा आधार घेऊन ती आणी शिकण्यासाठी १९७८ साली इंग्लडला गेली. तिथे तिने यॉर्क विद्यापीठातून भाषाशास्त्राची पीएच. डी. मिळवली. ब्रिटिश विद्यापीठातून डॉक्टरेट मिळवणारी ती पहिली चिनी विद्यार्थिनी. एक स्त्री, तिची मुलगी आणि तिची नात या तीन पिढ्यांच्या प्रतिनिधींची ही कहाणी म्हणजे तेवढ्या वर्षांचा चीनचा राजकीय, सामाजिक इतिहासच आहे, पण तो इतिहासाच्या पटलावर कधीही न दिसणारा. गेल्या काही वर्षात चीनमधल्या जुलमी राजवटीच्या अमानुष छळाच्या, अत्याचारांच्या कहाण्या सांगणारी इतरही पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत. त्यातली काही चिनी माणसांनीच लिहिली आहेत, पण त्या सगळ्यांपेक्षा या पुस्तकाचं वेगळेपण म्हणजे हे आई, मुलगी आणि नात अशा एकाच घरातल्या तीन पिढ्यांची कहाणी सांगत. मुख्य म्हणजे या पुस्तकावर चीनमध्ये बंदी आहे. चीनमध्ये त्या काळात असलेल्या हजारो कानकुबाईन्सपैकी एकीच्या आयुष्यापासून (कानकुबाईन्स अंगवस्त्र) सुरू झालेलं हे पुस्तक तिच्याच इंग्लंडमध्ये राहणाऱ्या, स्वतंत्र, निर्भय आयुष्य जगणाऱ्या नातीच्या आयुष्यापाशी येऊन संपतं. या तीन पिढ्यांच्या दरम्यान हेलकावत राहिलेली अनेक आयुष्य या पुस्तकातून भेटत राहतात, राजसत्तेचा, तिच्याशी संबंधित सगळ्या यंत्रणेचा जुलूम-जबरदस्ती, त्यानंतर माओच्या लहरीनुसार बदलत गेलेलं सगळ्या देशाचं जगणं, सत्तावर्तुळातल्या त्याच्यानंतरच्या उतरंडीतल्या लोकांचं वागणं, या सगळ्यामध्ये दडपली गेलेली चीनची जनता हे सगळं जसजसं आपण वाचत जातो तसतसा एक मोठा आलेख आपल्यासमोर उभा राहतो. चिनी विक्षिप्तपणाचे, अमानुषपणाचे एकच उदाहरण या पुस्तकानं मांडलेलं दाहक वास्तव देण्यासाठी पुरेसं आहे. ‘माओच्या राज्यात इंग्रजीचा अभ्यास’ या प्रकरणात लेखिका लिहिते. एका कापडाच्या गिरणीला आग लागली. सरकारी मालमत्ता वाचवण्याच्या प्रयत्नात तिथली एक वीणकर मुलगी गंभीर जखमी झाली. तिचे हातपाय कापावे लागले. पण तिचा चेहरा आणि बाकी शरीर मात्र नीट राहिलं. पक्षाने तिची इच्छा विचारली. तिला एखाद्या लष्करी अधिकाऱ्याशी लग्न करायचं होतं. लष्करातल्या वरिष्ठ अधिकाऱ्याने लेखिकेच्या लष्करात असलेल्या भावाला तिच्याशी लग्न करायला सांगितलं. त्याचं म्हणणं होतं, त्या मुलीचं शरीर धड होतं आणि त्यामुळे ती मुलांना जन्म द्यायला सक्षम होती, म्हणून तिच्याशी लग्न केलं जावं. तिचे हात-पाय जाऊन ती अपंग झाल्याची करूणा वाटण्यापेक्षा ती मुलांना जन्म द्यायला सक्षम आहे असा विचार करणं आणि तो प्रत्यक्षात आणणं हे अंगावर काटा आणणारंच आहे. दर बदलत्या राजवटीमध्ये चीनमध्ये थोड्याफार फरकाने सामान्य माणसाच्या, स्त्रियांच्या वाट्याला चिरडलं जाण्याखेरीज दुसरं काहीच आलेलं नाही, हे आपल्या अगदी शेजारी असलेल्या चीनचं दाहक वास्तव आपल्या मनावर ओरखडे उमटवत राहतं, पण त्याबरोबरच चिनी समाजाची अशी अनेक अंग, वेगवेगळ्या सामाजिक प्रथा-कुप्रथा, चालीरीती, मिथकं या सगळ्यांत दर्शन या पुस्तकातून घडतं. पुस्तकाचे नाव : मुक्त विहंग चीनच्या तीन कन्या ...Read more

  • Rating StarSMITA PATWARDHAN, SANGLI

    हे पुस्तक वाचताना आपण भारतिय समाजाचेच चित्रण पहात आहोत असा भास होत रहातो . सुरुवातीला जपानी सैनिकांकडुन जनतेचा छळ , त्यानंतर रशियन सैन्याकडुन ,त्यानंतर क्वो-मिन-तॉंग आणि कम्युनिस्टांकडुन केली जाणारी ससे होलपट . त्यातही माओचा आत्मकेंद्रीत राज्यकारभार, कम्युनिझम आणि धार्मिक कट्टारतावाद यात काहीही फरक नाही याचे पुरावे अनेक ठिकाणी मिळतात . प्रत्येकवेळी माओ ’वर्गशत्रु ’म्हणुन कुणा समुहाकडॆ बोट दाखवी . की त्या समुहाचा छळ सुरु होत असे . त्यातुन शिक्षक ,पांढरपेशा वर्गाची भरपुर छळणुक झाली .कोणतेही विधायक काम न करता निव्वळ समाजात तेढ निर्माण केल्याने पडलेले दुष्काळ आणि त्यातुन ३० कोटी मनुष्यांचे मृत्यु माओच्या राज्यात झाले . माओच्या सांस्कृतीक क्रांतीमधे त्याने हुकुम दिला , पोलाद तयार करायचा . शिक्षण बाजुला ठेऊन शिक्षक आणि विद्यार्थी त्यात गुंतले ,नाही त्यांना गुंतावेच लागले .त्यांनी तसे केले नसते तर त्यांना वर्गशत्रु ठरवुन छळले गेले असते . शिक्षकांचे काम शेगडी पेटवायची आणि ती पेटती ठेवायची . विद्यार्थ्यांचे काम जे काही लोखंडाच्या वस्तु मिळतील त्या शेगडीत टाकणे आणि वितळवणे . अख्खा देश या वेडाचारात गुंतला . शेतकरी शेती पिकवण्याऐवजी पोलाद करण्यात गुंतले . शेगडी पेटती ठेवण्यासाठी लाकडे हवीत .त्यासाठी जंगले तोडली गेली . चिमण्या दाणे खातात म्हणुन माओला चिमण्या आवडत नसत . त्याने त्यासाठी सगळ्या जनतेला कामाला लावले . घरातील भांडी वाजवुन चिमण्यांना हाकलत बसण्याचे काम सगळे करु लागले . मोठमोठ्या सुंदर बागा , सरंजामदारीचे लक्षण म्हणुन उध्वस्त केल्या गेल्या . शिल्पे तोडली गेली . माओप्रती आपली निष्ठा दाखवायला लोकांना माओची वचने असलेले पुस्तक वाचावे लागे .माओची स्तुती करणारीच गाणी म्हणावी लागत . हे म्हणजे देवावरची श्रध्दा दाखवायला पोथ्या वाचाव्यात त्यातलाच प्रकार . कोणत्याही सुंदर गोष्टीचा आस्वाद घेणे ,कोणत्याही गोष्टीचा आनंद घेणे हे क्रांतीविरोधी ठरवले गेले . स्वच्छ कपडे घालणे ,रोज आंघोळ करणे हेहेी उजवे ठरवले गेले . एकुणच ,लोकांच्या आयुष्यातला आनंद नाहीसा केला गेला . त्यातुन मनोरुग्णांची संख्या वाढली . आरोग्यव्यवस्थेचे तीनतेरा वाजले . लेखिकेचे वडिल आणि आई दोघेही कम्युनिस्ट असले तरी आपले स्थान बळकट करण्यासाठी कुणाचा तरी बळी देण्याविरुध्द होते . त्याची शिक्षा दोघांनाही छळाला सामोरे जाऊन मिळाली . या सर्व प्रकाराने ५० वर्षांचे तिचे वडिल ७० वर्षांच्या वृध्दासारखे दिसु लागले . आपल्या देशातही पुढारी लोक ,शेतकरी आणि अशिक्षित जनतेची कड घेऊन ,पांढरपेशा समाजाला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करत असतात . हे कोणीही पुढारी कुटुंब नियोजनाला महत्व देताना दिसत नाहीत . एकिकडे ते स्त्रिपुरुष समानतेची भाषा करतात आणि त्याच वेळी स्त्रिला बाळंतपणाच्या त्रासातुन मुक्त करण्यासाठी कुटुंब नियोजनाचा प्रसार करत नाहीत . हाच प्रकार चीन मधे दिसतो . कुटुंब नियोजनाचा प्रसार करणार्‍या मा यीन चुन या अर्थतद्न्याला उजवा ठरवले गेले . आपल्या व्यक्तीगत स्वातंत्र्यावर असलेला सरकारी हस्तक्षेप पाहुन लोक मेंढरासारखे वागु लागले .नवे विचार ,सर्जनशिलतेला काहीही महत्व राहिले नाही . वर्गशत्रु ठरवुन छळ केला जाई .पण नक्की वर्गशत्रु कोण याबाबत जनतेच्या मनात संभ्रमही निर्माण होत असे . आपल्या शेतात जेव्हढे धान्य पिकणे अशक्य आहे तितके धान्य पिकते असा खोटा दावा करायला लोकांना शिकवले गेले . समाजात अवाच्या सव्वा दावे करण्याची चढाओढ लागली . खरे चित्र कधीही समोर येत नव्हते . अडाणी जनता सरकारला प्रश्न विचारत नाही .पण सुशिक्षितांना सरकारची धोरणे समाजविघातक आहेत का ते समजते .म्हणुन माओला सुशिक्षित समाजाबद्दल राग होता . परिक्षा म्हणजे भांडवलशाहीला उजाळा देण्यासारखे आहे अशी मुक्ताफळे उधळणारे महाभाग होते .माओ पत्नी व तिचे साथिदार यांनी शैक्षणिक दर्जावर असलेल्या भराचा ,पांढरपेशी जुलुमशाही असे म्हणत निषेध केला . ’सारा देश अशिक्षित झाला तर काय बिघडले ?सांस्कृतिक क्रांतीचा विजय होणे महत्वाचे ’ असे ते म्हणाले . सांस्कृतिक क्रांतीने समाजसुधारणेकडे काहीही लक्ष दिले नाही . लेखिकेला शेतीचे प्रशिक्षण देण्यासाठी दुरच्या प्रांतात पाठवले गेले . तेथे काही लोकांनी तिच्याकडचे भांडे , नुडल्स शिजवण्यासाठी घेतले . काही कारणाने नुडल्सचा गोळा झाला .यावरुन ते सर्व तिच्याकडे रागाने बघु लागले . त्या रागाचे कारण होते त्यांची अंधश्रध्दा . त्यांनी अशी समजुत करुन घेतली की मासिक पाळीच्या काळात लेखिकेने ते भांडे आंघोळीसाठी वापरल्याने त्या नुडल्स बिघडल्या . असाच दुसरा प्रकार म्हणजे एकदा कावड घेऊन काही तरुण रस्त्याकडेला बसलेले होते .रस्ता अरुंद असल्याने लेखिकेला ती कावड ओलांडुन जावे लागते . तिने कावड ओलांडताच एक तरुण रागारागाने तिच्यासमोर येऊन उभा रहातो .तो तिला मारणार आहे असे तिला वाटते . तो असे करण्यामागची अंधश्रध्दा असते की बाईने कावडीच्या काठीला ओलांडले तर ती वाहुन नेणार्‍याच्या खांद्यावर फोड येतात . अशा परिस्थितीत चांगले शिक्षण मिळणे अशक्य झाले होते . जगणे हे एक ओझे झाले होते . यातुन सुटका नाही हे पक्के झाले होते .पण तरीही लेखिकेची सुटकेची इच्छा होतीच . योगायोगाने तिला इंग्लंडला जाण्याची संधी मिळाली . हे पुस्तक लिहिले तेंव्हा लेखिका इंग्लंडमधेच रहात होती . लेखिकेची आई तिला भेटायला इंग्लंडला गेली होती तेंव्हा तिने लेखिकेला ,स्वत:च्या आईबद्दल आणि स्वत:बद्दल माहिती दिली आणि लिहिण्यास प्रवृत्त केले . या पुस्तकावर चीनमधे बंदी आहे . लेखिका चीनमधे गेली तरी लोकांबरोबर या विषयावर बोलु शकत नाही . ज्या भारतियांना कम्युनिझमचे आकर्षण आहे त्यांनी हे पुस्तक आवश्य वाचावे . समाजाचे काही भले करायची प्रामाणिक इच्छा असणार्‍या व्यक्तीला कम्युनिझमचे कधीही आकर्षण वाटणे अशक्य आहे . लोकशाहीला पर्याय नाही हेच खरे . ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MI GALIB BOLTOY
MI GALIB BOLTOY by SHABBIR ROMANI Rating Star
लोकमत २५.९.२०२३

शब्बीर रोमानी हे व्यवसायाने वकील. मातृभाषा अर्थात उर्दू आणि शिक्षण मराठी माध्यमातून झालेले. २०१८ मध्ये प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या उर्दू पुस्तकाला, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालच्या साहित्य अकादमी केंद्राचे पुरस्कार लाभले आहेत. आता मिर्झागालिबवरचे नवे पुस्तक, `मी गालिब बोलतोय...!` लक्ष वेधून घेत आहे. गालिबच्या एका शेरची पहिली ओळ घेऊन सांगायचे झाल्यास, जिक्र गालिबचा आणि खूबसूरत बयान लेखकाचे असे या पुरस्काराबद्दल म्हणता येईल. मिर्जा असदुल्ला खां,`गालिब` या श्रेष्ठ शायरची शायरी, त्याचे पत्रलेखन, चरित्र यावर आजवर शेकडो पुस्तक प्रसिद्ध आहेत. लेखकाने प्रस्तावनेत नमूद केल्यानुसार गालिबवर अनेक लेखकांनी लिहिले आहे. मराठी, हिंदी-उर्दू लेखकांची ते तपशील पाहून आचंबा वाटतो. शिवाय शब्बीर रोमानी यांनी इथे आपल्या लेखनाचे प्रयोजन सांगताना म्हटले आहे, कि गालिबबद्दल अनेक उलट-सुलट प्रकारच्या कहाण्या, विनोद, (कसलेही शेर गालिबच्या नावाने सांगत राहणे) प्रचलित आहेत; त्यामुळे गालिबची कथा, त्याच्या पत्रांमधल्या मनोरंजक गप्पा-गोष्टी आणि त्याच्याशी निगडित आठवणी हे सगळं साध्या सोप्या भाषेत लिहिण्याचा प्रयत्न म्हणजे हे पुस्तक. सर्वसामान्य माणसाच्या जगण्यातल्या सर्व भावछटा गालिबच्या काव्यातून दिसत असतात. पुस्तक वाचताना गालिबची प्रकृती, त्याची विनोद बुद्धी, संवेदनशील वृत्ती हे आपल्याला जाणवत राहते, आणि लेखकाची तळमळसुद्धा. या पुस्तकाचे वैशिष्टय म्हणजे, मोठी प्रकरण टाळून किस्से सांगावेत अशी रचना. शिवाय लेखकाची साधी-सरळ भाषा, यामुळे शायरीची आणि गालिबबद्दलची सर्वसाधारण माहिती आणि कुतुहूल असणाऱ्या वाचकांना हे पुस्तक रंजक वाटेल. सहसा गालिबचे गाजलेले शेर, किस्से हे आपल्या वाचनात असतात. या पुस्तकात गालिबचे अनेक दुर्मिळ शेर, शिवाय फारसी रचनाही या पुस्तकात समाविष्ट असल्याने त्याला एक संदर्भ ग्रंथाचेही स्वरूप आलेले आहे. गालिबला आंबे फार आवडायचे, `मिर्झा गालिब` या गाजलेल्या चित्रपटातला तो प्रसंग आजही लक्षात आहे. आंबे खाताना एक मित्र गालिबला तुच्छतेने म्हणतो, `आम तो गधेभी नही खाते!` त्यावर गालिबने त्वरित उत्तर देतो. `सिर्फ गधेही नाही खाते!` शब्बीर रोमानी यांनी हा प्रसंग व विनोद म्हणून सांगितला नाही, तर त्याचे तपशिलाने वर्णन तर केलेच शिवाय आंब्यावरची गालिबची मोठी गजल त्यांनी दिलेली असल्याने त्या किश्श्याला एक गांभीर्य आलेले आहे. असाच एक किस्सा, ते कलकत्त्याला असताना साध्या चिकणी-सुपारीवर गालिबला कुणी छेडले होते, यावर तुमची शायरी होऊन जाऊ द्या! असे आवाहन केले. या सुपारीच्या दिसण्या-असण्यावरच्या अफलातून शायरीची भली मोठी झलकच गालिबने पेश केली! गालिबच्या एक महत्वाचा शेर आहे. जिक्र ऊस परी-वंश का और फार बयां अपना बन गया रिकीब आखिर, था जो राजदां अपना त्या परिच्या सौंदर्याचे वर्णन आणि तेही माझ्या भाषेतून, माझ्याकडून ऐकले आणि माझा जवळचा असा मित्र आता या प्रेमाच्या नात्यात माझा प्रतिस्पर्धी झाला (आता तो तिच्यावर प्रेम करायला लागला) कलकत्त्याला गालिब दीडेएक वर्ष राहिला होता. तिथल्या धनिकांनी मुशायरे, मुजरे आयोजित केलेले असायचे, गालिबचा तिथे सन्मानही व्हायचा. गालिबने या बद्दल फार जिव्हाळ्याने लिहिले आहे. या मुशायऱ्यामध्ये गालिबचे फारसीचे काव्यवाचन ऐकून फारसी भाषेचे तज्ञ त्याच्यावर नाराज झाल्याची आठवण आहे! गालिबच्या तोंडून फारसीचे कौतुक ऐकून लोकांनी आक्षेप घेतला! गालिब हा आपल्या दुःख, विवंचनेवर हसणारा अद्भुत असा कलावंत होता. हा शेर वाचल्यावर आपल्याला मुन्शी प्रेमचंद यांच्या `पूस कि रात` मधला हलकू आठवतो! मिर्झा गालिबच्या कुतुहूल असणाऱ्या वाचकांना हा संग्रह आवडण्यासारखाच आहे. लेखनातल्या भाषिक काही त्रुटी वगळल्यास, गालिबचे किस्से, त्याची शायरी हे सगळे रोचक आहे. ...Read more

MRUTYUNJAYEE
MRUTYUNJAYEE by RATNAKAR MATKARI Rating Star
पुस्तकप्रेमी

मीना कश्यप शाह *मृत्युंजयी* भयकथा हा रत्नाकर मतकरींच्या लेखनाचा हातखंडा. मी दहावीच्या सुट्टीत असताना भयकथा वाचायला सुरुवात केली आणि त्यांनी मला पुरात झपाटून टाकलं होतं. ही पुस्तकं असायचीही सुटसुटीत जाडीची. त्यामुळे जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी पुस्तक लगणाऱ्या मला सगळीकडे ती घेऊन जात येत असत. क्लास मध्ये लवकर पोहोचले - वाच पुस्तक, बससाठी उभी आहे, वाच पुस्तक; झोप येत नाही, वाच (हे बहुदा चक्राकार रित्या सुरु राहायचं, झोप नाही म्हणून वाचायचं आणि वाचत असायचे म्हणून झोप नाही... त्या वयात असं सगळं चालायचं - लहानपण देगा देवा...) मृत्युंजयी सुरु केली तेव्हा आधीच खेकडा, रंगांधळा वाचून झालं होतं. अजूनही एक संपवलं होतं, पण नाव नाही आठवत (बहुतेक कबंध). त्या पार्श्वभूमीवर मृत्युंजयी फार आवडलं नाही, आणि खरं तर त्यामुळे रत्नाकर मतकरींच्या भयकथा वाचणं थांबलं. अलीकडेच हे इ-बुक मिळालं किंडल वर, पुन्हा वाचलं - आतासुद्धा शेवटच्या परिच्छेदात काय वळण मिळतं त्याची उत्सुकता होती, पण एकूणच माझा patience खूपच कमी झालाय त्यामुळे skip reading, quick reading करत पुस्तक पटकन वाचून संपलं. मृत्यू, अखेर, शेवट ही भावना प्रत्येकासाठी भीतीदायकच. त्या भीतीवर बेतलेल्या कथा ह्या संग्रहात आहेत. अतिमानवीय, फँटसी, भुताटकी अशा धक्कातंत्राचा उपयोग अनेक लेखक करतात. पण मतकरीचं वैशिष्ठय असं, की ते जळमटं सारखी कथा लिहून जातात. मृत्युंजयी मधील कथांमध्ये मृत्यूची अनेक रूपं दिसतात, कथा जिवंत माणसांच्या - पण मृत्यूची चाहूल, त्याची भीती, कधी त्याचं हवेहवेपण, कधी त्याच्याकडे आपणहून जाणे, अशा अनेक रंगढंगांनी मतकरी गूढता कायम ठेवतात. ह्या पुस्तकातील, मृत्यू अवतीभवती असलेल्या प्रत्येक कथेत, आपणा सर्वांना नक्कीच सुप्त आकर्षण वाटत असलेल्या अनेक गूढ गोष्टी येतातच... मृत्यूवर विजय मिळवण्यासाठी करण्याची अतिमानवीय साधना... स्त्री-पुरुषातील शारीरिक आणि मानसिक ओढ... पूर्वी केलेल्या चुका आणि त्याबद्दलचा सल... जुलमाचा प्रतिशोध... अतिमानवीय शक्तींनी झपाटणे... भूतबाधा, भूतांशी गाठभेट... मृत्यूच्या अनेकविध तऱ्हा... मानसिक संतुलन ढळणे... आणि तत्सम. ह्या कथाप्रकारात महत्वाचं असतं, ते शेवटच्या काही वाक्यांमधे कथेला दिलेलं वळण आणि त्यामुळे वाचकाला बसलेला धक्का. रत्नाकर मतकरींच्या गूढकथा म्हणूनच खूप प्रभावी ठरतात. आता मात्र हे धक्का तंत्र बऱ्याच जागी पाहायला मिळतं - OTT वरच्या अनेक चित्रपट किंवा नाट्यमालांमधे हे तंत्र कथाकार वापरतात, आणि लोकांना हे पहायला खरंच खूप आवडतं, म्हणूनच त्या प्रसिद्ध होतात. अलीकडचं उदाहरण "वाळवी" चित्रपट! मृत्युंजयी मधे देखील काही कथा असा आनंद देऊन जातात. पण असं आहे ना "अति सर्वत्र वर्जयेत" - त्यामुळे बऱ्याच कथांच्या शेवटचा अंदाज लागतो आणि त्यांचा प्रभाव कमी होतो. सुरुवातीला जी गूढकथांची पुस्तकं मी वाचली, तेव्हा हे धक्कातंत्र मला नवीन होतं, त्यामुळे त्यात हा अंदाज लागत नव्हता. कदाचित मृत्युंजयी तेव्हा वाचलं आणि आताही वाचलं ते ह्या तंत्राचा अति वापर झाल्यावर वाचलं गेलं म्हणून असेल, पण कमी प्रभावी वाटलं हे खरं. अर्थात प्रत्येक गोष्टीत (सध्या इतर कथांमधे फारसे न सापडणारे) एक समान सूत्र आहे - ते म्हणजे, *वाईटाचं कधीच भलं होत नाही*. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, कधीही उचलून वाचायला सुरुवात करून काही मिनिटात एक गोष्ट संपते. सध्याच्या व्यग्र काळात हे पुस्तक पुन्हा वाचायला सोपे गेले, नक्कीच. आणि मी पुन्हा एकदा ह्या कथाप्रकाराकडे आकर्षितही झाले आहे... पुन्हा सगळी गूढकथांची पुस्तकं वाचायला हवीत. ...Read more