* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: WILD SWANS : THREE DAUGHTERS OF CHINA
  • Availability : Available
  • Translators : VIJAYA BAPAT
  • ISBN : 9788184984576
  • Edition : 1
  • Publishing Year : FEBRUARY 2013
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 652
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : MEMOIR
Quantity
Buying Options:
  • Print Books:
BLENDING THE INTIMACY OF MEMOIR AND THE PANORAMIC SWEEP OF EYEWITNESS HISTORY, WILD SWANS HAS BECOME A BESTSELLING CLASSIC IN THIRTY LANGUAGES, WITH MORE THAN TEN MILLION COPIES SOLD. THE STORY OF THREE GENERATIONS IN TWENTIETH-CENTURY CHINA, IT IS AN ENGROSSING RECORD OF MAO`S IMPACT ON CHINA, AN UNUSUAL WINDOW ON THE FEMALE EXPERIENCE IN THE MODERN WORLD, AND AN INSPIRING TALE OF COURAGE AND LOVE.587~ DESCRIBES THE LIFE OF HER GRANDMOTHER, A WARLORD`S CONCUBINE; HER MOTHER`S STRUGGLES AS A YOUNG IDEALISTIC COMMUNIST; AND HER PARENTS` EXPERIENCE AS MEMBERS OF THE COMMUNIST ELITE AND THEIR ORDEAL DURING THE CULTURAL REVOLUTION. CHANG WAS A RED GUARD BRIEFLY AT THE AGE OF FOURTEEN, THEN WORKED AS A PEASANT, A "BAREFOOT DOCTOR," A STEELWORKER, AND AN ELECTRICIAN. AS THE STORY OF EACH GENERATION UNFOLDS, CHANG CAPTURES IN GRIPPING, MOVING X AND ULTIMATELY UPLIFTING X DETAIL THE CYCLES OF VIOLENT DRAMA VISITED ON HER OWN FAMILY AND MILLIONS OF OTHERS CAUGHT IN THE WHIRLWIND OF HISTORY.
ही कहाणी आहे हिंसाचार , अमानुष छळ, अनन्वित अत्याचार आणि जुलमी व्यवस्था यांच्या काळ्याकुट्ट गर्तेमध्ये सौंदर्याची आस धरणाऱ्या , नवनिर्मितीचा आणि आधुनिकतेचा ध्यास घेणाऱ्या स्त्रियांची, त्यांच्या आयुष्यांची. या कहाणीला पाश्र्वभूमी आहे चीनमधल्या राजकीय, सामाजिक स्थित्यंतरांची, बदलांची. यात क्रांतीमुळे चीनी जनतेच्या आयुष्यावर झालेले परिणाम आहेत; श्रीमंत-गरीब लोकांचं जीवन आहे; समाजजीवनातल्या कथा, मिथकं, चालीरीती यांचे संदर्भ आहेत; आदर्शवादाने भारलेले आणि तो आदर्शवाद फोल ठरल्यानंतर कोसळून गेलेले स्त्री-पुरुषही आहेत. ही कहाणी चीनच्या इतिहासातील एक व्यापक कालखंड तपशीलवारपणे डोळ्यांसमोर उभा करून आपल्याला अंतर्मुख करते.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #MUKTAVIHANGCHINCHYATEENKANYA #WILDSWANS:THREEDAUGHTERSOFCHINA #मुक्तविहंग:चीनच्यातीनकन्या #MEMOIRTRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #VIJAYABAPAT #विजयाबापट #JUNGCHANG "
Customer Reviews
  • Rating StarKiran Borkar

    चीनच्या त्या जगप्रसिद्ध भिंतीमागे काय चालू आहे याची उत्सुकता सगळ्यांच असते. तेथे असलेली कम्युनिस्ट राजवट, राजकारण याची माहिती सर्वानाच हवी असते .या पुस्तकात लेखिका ,तिची आई,आणि तिची आजी अश्या तीन स्त्रियांची वेगवेगळ्या कलखंडातली कहाणी सांगितली आहे चीनमधल्या जुलमी राजवटीची ,अमानुष क्रौर्यची आणि क्रांतीची कहाणी आहे .या क्रांतीमुळे चिनी जनतेवर झालेले परिणाम ,श्रीमंत गरीब लोकांचे जीवन ,त्यांचे राहणीमान अतिशय सुंदर पद्धतीने मांडण्यात आले आहे .या पुस्तकास चीनमध्ये बंदी घातली आहे .पुस्तकाचे मूळ नाव वाइल्ड स्वान्स थ्री डॉटर्स ऑफ चायना हे आहे .यातील अमानुष हिंसाचार वाचून अंगावर काटा येतो. ...Read more

  • Rating StarLOKPRABHA 25-12-2015

    आरसा चीनचा लेखिका युंग चँग चीनमधल्या सेशुआन प्रांतातल्या यी बीन शहरात १९५२ मध्ये जन्मली. सरकारी आज्ञेनुसार शेतात तसंच कारखान्यात काम करत असताना सुरुवातीला चोरुनमारुन आणि नंतर उघडपणे ती इंग्रजी शिकली. नंतर सरकारच्याच एका शिष्यवृत्तीचा आधार घेऊन ती आणी शिकण्यासाठी १९७८ साली इंग्लडला गेली. तिथे तिने यॉर्क विद्यापीठातून भाषाशास्त्राची पीएच. डी. मिळवली. ब्रिटिश विद्यापीठातून डॉक्टरेट मिळवणारी ती पहिली चिनी विद्यार्थिनी. एक स्त्री, तिची मुलगी आणि तिची नात या तीन पिढ्यांच्या प्रतिनिधींची ही कहाणी म्हणजे तेवढ्या वर्षांचा चीनचा राजकीय, सामाजिक इतिहासच आहे, पण तो इतिहासाच्या पटलावर कधीही न दिसणारा. गेल्या काही वर्षात चीनमधल्या जुलमी राजवटीच्या अमानुष छळाच्या, अत्याचारांच्या कहाण्या सांगणारी इतरही पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत. त्यातली काही चिनी माणसांनीच लिहिली आहेत, पण त्या सगळ्यांपेक्षा या पुस्तकाचं वेगळेपण म्हणजे हे आई, मुलगी आणि नात अशा एकाच घरातल्या तीन पिढ्यांची कहाणी सांगत. मुख्य म्हणजे या पुस्तकावर चीनमध्ये बंदी आहे. चीनमध्ये त्या काळात असलेल्या हजारो कानकुबाईन्सपैकी एकीच्या आयुष्यापासून (कानकुबाईन्स अंगवस्त्र) सुरू झालेलं हे पुस्तक तिच्याच इंग्लंडमध्ये राहणाऱ्या, स्वतंत्र, निर्भय आयुष्य जगणाऱ्या नातीच्या आयुष्यापाशी येऊन संपतं. या तीन पिढ्यांच्या दरम्यान हेलकावत राहिलेली अनेक आयुष्य या पुस्तकातून भेटत राहतात, राजसत्तेचा, तिच्याशी संबंधित सगळ्या यंत्रणेचा जुलूम-जबरदस्ती, त्यानंतर माओच्या लहरीनुसार बदलत गेलेलं सगळ्या देशाचं जगणं, सत्तावर्तुळातल्या त्याच्यानंतरच्या उतरंडीतल्या लोकांचं वागणं, या सगळ्यामध्ये दडपली गेलेली चीनची जनता हे सगळं जसजसं आपण वाचत जातो तसतसा एक मोठा आलेख आपल्यासमोर उभा राहतो. चिनी विक्षिप्तपणाचे, अमानुषपणाचे एकच उदाहरण या पुस्तकानं मांडलेलं दाहक वास्तव देण्यासाठी पुरेसं आहे. ‘माओच्या राज्यात इंग्रजीचा अभ्यास’ या प्रकरणात लेखिका लिहिते. एका कापडाच्या गिरणीला आग लागली. सरकारी मालमत्ता वाचवण्याच्या प्रयत्नात तिथली एक वीणकर मुलगी गंभीर जखमी झाली. तिचे हातपाय कापावे लागले. पण तिचा चेहरा आणि बाकी शरीर मात्र नीट राहिलं. पक्षाने तिची इच्छा विचारली. तिला एखाद्या लष्करी अधिकाऱ्याशी लग्न करायचं होतं. लष्करातल्या वरिष्ठ अधिकाऱ्याने लेखिकेच्या लष्करात असलेल्या भावाला तिच्याशी लग्न करायला सांगितलं. त्याचं म्हणणं होतं, त्या मुलीचं शरीर धड होतं आणि त्यामुळे ती मुलांना जन्म द्यायला सक्षम होती, म्हणून तिच्याशी लग्न केलं जावं. तिचे हात-पाय जाऊन ती अपंग झाल्याची करूणा वाटण्यापेक्षा ती मुलांना जन्म द्यायला सक्षम आहे असा विचार करणं आणि तो प्रत्यक्षात आणणं हे अंगावर काटा आणणारंच आहे. दर बदलत्या राजवटीमध्ये चीनमध्ये थोड्याफार फरकाने सामान्य माणसाच्या, स्त्रियांच्या वाट्याला चिरडलं जाण्याखेरीज दुसरं काहीच आलेलं नाही, हे आपल्या अगदी शेजारी असलेल्या चीनचं दाहक वास्तव आपल्या मनावर ओरखडे उमटवत राहतं, पण त्याबरोबरच चिनी समाजाची अशी अनेक अंग, वेगवेगळ्या सामाजिक प्रथा-कुप्रथा, चालीरीती, मिथकं या सगळ्यांत दर्शन या पुस्तकातून घडतं. पुस्तकाचे नाव : मुक्त विहंग चीनच्या तीन कन्या ...Read more

  • Rating StarSMITA PATWARDHAN, SANGLI

    हे पुस्तक वाचताना आपण भारतिय समाजाचेच चित्रण पहात आहोत असा भास होत रहातो . सुरुवातीला जपानी सैनिकांकडुन जनतेचा छळ , त्यानंतर रशियन सैन्याकडुन ,त्यानंतर क्वो-मिन-तॉंग आणि कम्युनिस्टांकडुन केली जाणारी ससे होलपट . त्यातही माओचा आत्मकेंद्रीत राज्यकारभार, कम्युनिझम आणि धार्मिक कट्टारतावाद यात काहीही फरक नाही याचे पुरावे अनेक ठिकाणी मिळतात . प्रत्येकवेळी माओ ’वर्गशत्रु ’म्हणुन कुणा समुहाकडॆ बोट दाखवी . की त्या समुहाचा छळ सुरु होत असे . त्यातुन शिक्षक ,पांढरपेशा वर्गाची भरपुर छळणुक झाली .कोणतेही विधायक काम न करता निव्वळ समाजात तेढ निर्माण केल्याने पडलेले दुष्काळ आणि त्यातुन ३० कोटी मनुष्यांचे मृत्यु माओच्या राज्यात झाले . माओच्या सांस्कृतीक क्रांतीमधे त्याने हुकुम दिला , पोलाद तयार करायचा . शिक्षण बाजुला ठेऊन शिक्षक आणि विद्यार्थी त्यात गुंतले ,नाही त्यांना गुंतावेच लागले .त्यांनी तसे केले नसते तर त्यांना वर्गशत्रु ठरवुन छळले गेले असते . शिक्षकांचे काम शेगडी पेटवायची आणि ती पेटती ठेवायची . विद्यार्थ्यांचे काम जे काही लोखंडाच्या वस्तु मिळतील त्या शेगडीत टाकणे आणि वितळवणे . अख्खा देश या वेडाचारात गुंतला . शेतकरी शेती पिकवण्याऐवजी पोलाद करण्यात गुंतले . शेगडी पेटती ठेवण्यासाठी लाकडे हवीत .त्यासाठी जंगले तोडली गेली . चिमण्या दाणे खातात म्हणुन माओला चिमण्या आवडत नसत . त्याने त्यासाठी सगळ्या जनतेला कामाला लावले . घरातील भांडी वाजवुन चिमण्यांना हाकलत बसण्याचे काम सगळे करु लागले . मोठमोठ्या सुंदर बागा , सरंजामदारीचे लक्षण म्हणुन उध्वस्त केल्या गेल्या . शिल्पे तोडली गेली . माओप्रती आपली निष्ठा दाखवायला लोकांना माओची वचने असलेले पुस्तक वाचावे लागे .माओची स्तुती करणारीच गाणी म्हणावी लागत . हे म्हणजे देवावरची श्रध्दा दाखवायला पोथ्या वाचाव्यात त्यातलाच प्रकार . कोणत्याही सुंदर गोष्टीचा आस्वाद घेणे ,कोणत्याही गोष्टीचा आनंद घेणे हे क्रांतीविरोधी ठरवले गेले . स्वच्छ कपडे घालणे ,रोज आंघोळ करणे हेहेी उजवे ठरवले गेले . एकुणच ,लोकांच्या आयुष्यातला आनंद नाहीसा केला गेला . त्यातुन मनोरुग्णांची संख्या वाढली . आरोग्यव्यवस्थेचे तीनतेरा वाजले . लेखिकेचे वडिल आणि आई दोघेही कम्युनिस्ट असले तरी आपले स्थान बळकट करण्यासाठी कुणाचा तरी बळी देण्याविरुध्द होते . त्याची शिक्षा दोघांनाही छळाला सामोरे जाऊन मिळाली . या सर्व प्रकाराने ५० वर्षांचे तिचे वडिल ७० वर्षांच्या वृध्दासारखे दिसु लागले . आपल्या देशातही पुढारी लोक ,शेतकरी आणि अशिक्षित जनतेची कड घेऊन ,पांढरपेशा समाजाला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करत असतात . हे कोणीही पुढारी कुटुंब नियोजनाला महत्व देताना दिसत नाहीत . एकिकडे ते स्त्रिपुरुष समानतेची भाषा करतात आणि त्याच वेळी स्त्रिला बाळंतपणाच्या त्रासातुन मुक्त करण्यासाठी कुटुंब नियोजनाचा प्रसार करत नाहीत . हाच प्रकार चीन मधे दिसतो . कुटुंब नियोजनाचा प्रसार करणार्‍या मा यीन चुन या अर्थतद्न्याला उजवा ठरवले गेले . आपल्या व्यक्तीगत स्वातंत्र्यावर असलेला सरकारी हस्तक्षेप पाहुन लोक मेंढरासारखे वागु लागले .नवे विचार ,सर्जनशिलतेला काहीही महत्व राहिले नाही . वर्गशत्रु ठरवुन छळ केला जाई .पण नक्की वर्गशत्रु कोण याबाबत जनतेच्या मनात संभ्रमही निर्माण होत असे . आपल्या शेतात जेव्हढे धान्य पिकणे अशक्य आहे तितके धान्य पिकते असा खोटा दावा करायला लोकांना शिकवले गेले . समाजात अवाच्या सव्वा दावे करण्याची चढाओढ लागली . खरे चित्र कधीही समोर येत नव्हते . अडाणी जनता सरकारला प्रश्न विचारत नाही .पण सुशिक्षितांना सरकारची धोरणे समाजविघातक आहेत का ते समजते .म्हणुन माओला सुशिक्षित समाजाबद्दल राग होता . परिक्षा म्हणजे भांडवलशाहीला उजाळा देण्यासारखे आहे अशी मुक्ताफळे उधळणारे महाभाग होते .माओ पत्नी व तिचे साथिदार यांनी शैक्षणिक दर्जावर असलेल्या भराचा ,पांढरपेशी जुलुमशाही असे म्हणत निषेध केला . ’सारा देश अशिक्षित झाला तर काय बिघडले ?सांस्कृतिक क्रांतीचा विजय होणे महत्वाचे ’ असे ते म्हणाले . सांस्कृतिक क्रांतीने समाजसुधारणेकडे काहीही लक्ष दिले नाही . लेखिकेला शेतीचे प्रशिक्षण देण्यासाठी दुरच्या प्रांतात पाठवले गेले . तेथे काही लोकांनी तिच्याकडचे भांडे , नुडल्स शिजवण्यासाठी घेतले . काही कारणाने नुडल्सचा गोळा झाला .यावरुन ते सर्व तिच्याकडे रागाने बघु लागले . त्या रागाचे कारण होते त्यांची अंधश्रध्दा . त्यांनी अशी समजुत करुन घेतली की मासिक पाळीच्या काळात लेखिकेने ते भांडे आंघोळीसाठी वापरल्याने त्या नुडल्स बिघडल्या . असाच दुसरा प्रकार म्हणजे एकदा कावड घेऊन काही तरुण रस्त्याकडेला बसलेले होते .रस्ता अरुंद असल्याने लेखिकेला ती कावड ओलांडुन जावे लागते . तिने कावड ओलांडताच एक तरुण रागारागाने तिच्यासमोर येऊन उभा रहातो .तो तिला मारणार आहे असे तिला वाटते . तो असे करण्यामागची अंधश्रध्दा असते की बाईने कावडीच्या काठीला ओलांडले तर ती वाहुन नेणार्‍याच्या खांद्यावर फोड येतात . अशा परिस्थितीत चांगले शिक्षण मिळणे अशक्य झाले होते . जगणे हे एक ओझे झाले होते . यातुन सुटका नाही हे पक्के झाले होते .पण तरीही लेखिकेची सुटकेची इच्छा होतीच . योगायोगाने तिला इंग्लंडला जाण्याची संधी मिळाली . हे पुस्तक लिहिले तेंव्हा लेखिका इंग्लंडमधेच रहात होती . लेखिकेची आई तिला भेटायला इंग्लंडला गेली होती तेंव्हा तिने लेखिकेला ,स्वत:च्या आईबद्दल आणि स्वत:बद्दल माहिती दिली आणि लिहिण्यास प्रवृत्त केले . या पुस्तकावर चीनमधे बंदी आहे . लेखिका चीनमधे गेली तरी लोकांबरोबर या विषयावर बोलु शकत नाही . ज्या भारतियांना कम्युनिझमचे आकर्षण आहे त्यांनी हे पुस्तक आवश्य वाचावे . समाजाचे काही भले करायची प्रामाणिक इच्छा असणार्‍या व्यक्तीला कम्युनिझमचे कधीही आकर्षण वाटणे अशक्य आहे . लोकशाहीला पर्याय नाही हेच खरे . ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

ANUWADATUN ANUSARJANAKADE
ANUWADATUN ANUSARJANAKADE by LEENA SOHONI Rating Star
कौशिक लेले

पुस्तक – अनुवादातून अनुसर्जनाकडे (Anuwadatun Anusarjanakade) लेखिका – लीना सोहोनी (Leena Sohoni) भाषा – मराठी पाने – २३९ प्रकाशन – मेहता पब्लिशिंग हाऊस. फेब २०२४ छापील किंमत – रु. ३७०/- ISBN – 9789357205337 ह्या परिचयाची माझी वेबसाईट लिंक htps://learnmarathiwithkaushik.com/courses/anuwadatun-anusarjanakade/ मराठी पुस्तकांमध्ये सध्या इतर भाषांतून अनुवादित झालेली पुस्तके सुद्धा मोठ्या संख्येने दिसतात. एखादा सरस अनुवाद वाचताना आपल्या डोक्यात सुद्धा आपल्या आवडीच्या परभाषेतल्या पुस्तकांची यादी तयार होते. ही पुस्तकं सुद्धा मराठीत आली तर काय मजा येईल असं वाटतं. भाषा हा ज्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे त्यांची इच्छा एक पुढचं पाऊल टाकेल. आपणही स्वतः असा अनुवाद केला तर ? आपल्यालाही दोन्ही भाषा चांगल्या येत आहेत मग अनुवाद का करू नये ? हे पिल्लू डोक्यात शिरेलच. असा अनुवाद करायचा स्वतः काही प्रयत्न केला की लक्षात येईल की हे किती किचकट काम आहे. चांगला अनुवाद करायचा असेल तर सराव लागेल. अभ्यास लागेल. त्याची काही तंत्र मंत्र शिकून घ्यावी लागतील. एखाद्या चांगल्या जाणकार व्यक्तीचं, अनुभवी व्यक्तीचं मार्गदर्शनही मिळायला हवं. जर तुमच्याही मनात अशा भावना आल्या असतील तर लीना सोहोनी यांचं “अनुवादाकडून अनुसर्जनाकडे” हे पुस्तक तुम्हाला नक्की आवडेल. लीना सोहोनी हे नाव मराठीत अनुवादिका म्हणून प्रसिद्ध आहे. आत्तापर्यंत त्यांनी अनुवाद केलेली पन्नासच्यावर पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचा अनुभव व अधिकार वेगळा सांगायला नको. त्यांचे हे पुस्तक "अनुवादातून अनुसर्जनाकडे" पुस्तकाचा पहिला भागात लीना सोनी यांनी आपल्या अनुवादाच्या प्रवासाचं सिंहावलोकन केलं आहे. त्यांनी अनुवादाची सुरुवात कशी केली, त्यात प्रगती कशी झाली हे लिहिलं आहे. अनुवादामुळे प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर, सुधा मूर्ती, किरण बेदी यांच्याशी जुळलेले संबंध आणि त्यांच्या भेटीची वर्णनं आहेत. ह्या प्रवासात “मेहता पब्लिशिंग हाऊस” या प्रकाशन संस्थेचा भरभक्कम पाठिंबा त्यांना मिळाला. सुनील मेहता आणि अनिल मेहता यांच्याबरोबरच्या आठवणी सुद्धा पुस्तकात आहेत. पुढच्या भागात अनुवाद या विषयाची एखाद्या शास्त्रीय शोधनिबंधाप्रमाणे माहिती दिलेली आहे. यात अनुवाद प्रक्रियेकडे अतिशय बारकाईने बघितलं आहे. ढोबळमानाने बघितलं तर, अनुवाद म्हणजे तर एका भाषेतल्या शब्दांच्या ऐवजी दुसऱ्या भाषेतले शब्द वापरणे. पण प्रत्येक वेळी एका शब्दाच्या बदल्यात दुसरा भाषेतला एक शब्द असं होतंच असं नाही. त्यामुळे काही वेळा शब्दाची फोड करून दाखवावी लागते. तर काही वेळा मूळ मोठं वाक्य लहान होऊ शकतं. कदाचित तिथे पूर्णपणे वेगळीच शब्दयोजना वाक्यरचना होऊ शकते. या प्रत्येक प्रकाराला एक विशिष्ट शास्त्रीय नाव (पारिभाषिक संज्ञा) आहे हे आपल्याला पुस्तक वाचून कळतं. जे शब्दांच्या बाबतीत तेच वाक्यांच्या बाबतीत. मूळ भाषेतल्या शब्दांसाठी नवीन शब्द वापरून वाक्य तयार झालं तरी ते वाचकाला सहज वाटलं पाहिजे. नाहीतर आपण लगेच म्हणू, “अनुवाद खूप बोजड झाला आहे; ठोकळेबाज झाला आहे”. हे टाळायचं तर वाक्यरचना सुद्धा सुधारायला पाहिजे. याची उदाहरणे पुस्तकात दिली आहेत आणि त्या अनुषंगाने पारिभाषिक संज्ञा (terminology) काय आहे हे मराठी आणि इंग्रजी दोन्हीत दिलं आहे. शब्द, वाक्य ह्यांना लावलेल्या कसोटीचा विस्तार करून ती कसोटी “संकल्पनां”ना लावायला पाहिजे. एखाद्या भाषेत, एखाद्या समाजात असणाऱ्या संकल्पना, प्रथा-परंपरा मराठी भाषेत नसतील तर अनुवाद करताना ते जसंच्या तसं ठेवायचं का तिथे काही वेगळी संकल्पना वापरायची ? का तळ टीप देऊन स्पष्टीकरण द्यायचं? असे एकाच गोष्टीकडे बघण्याचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. हा मुद्दा आपण सोदाहरण स्पष्ट केला आहे. हा ऊहापोह वाचल्यासार अनुवादासाठी दोन्ही भाषांवर आपली किती चांगली पकड पाहिजे हे वाचकाच्या लक्षात येईल. त्याचबरोबर जे पुस्तक आपण वाचतोय त्याची पार्श्वभूमी, त्यातल्या प्रसंगाची सामाजिक पार्श्वभूमी, आणि लेखकाला काय ध्वनीत करायचे आहे हे सगळं समजणं सुद्धा किती महत्त्वाचं हे लक्षात येईल. म्हणजे अनुवाद प्रक्रिया दिसताना शब्दांची दिसली तरी “शब्दांच्या पलीकडले” अनुवादकाला पकडता आले तरच मूळ कृतीला न्याय मिळेल. हे या पुस्तकाच्या वाचनातून अधोरेखित होतं. पुस्तकाचा प्रकारानुसार अनुवादकासमोर असणारी आव्हाने सुद्धा बदलतात. कथा-कादंबरीचा अनुवाद वेगळा तर कवितेचा अनुवाद वेगळा. कारण कवितेमध्ये भावभावनांना महत्त्व आहे तितकेच महत्त्व शब्द, लय, शब्दचमत्कृती यांनाही आहे. म्हणूनच तर ते पद्य आहे गद्य नाही. लीनाजींनी ह्याचाही परामर्श घेतला आहे. नाटकाचा अनुवाद करताना येणारी आव्हाने अजून वेगळी. परिणामकारक संवाद, नेपथ्य, पात्रांची देहबोली, त्याचा प्रेक्षकांवर होणारा परिणाम या सगळ्याचा विचार करून अनुवाद करावा लागतो. म्हणूनच, अनुवाद म्हणजे प्रत्येक वेळी “शंभर टक्के पुस्तक जसेच्या तसे” असं नसतं. तर काही वेळा ते रूपांतर ठरतं. काही वेळा तो स्वैर अनुवाद ठरतो. तर काही वेळा मूळ कलाकृतीवर आधारित नवीन कलाकृती ठरते. हे सुद्धा कितीतरी उदाहरणे देऊन स्पष्ट केले आहे. हे सगळे मुद्दे एकमेकांशी निगडित आहेत त्यामुळे पुस्तकात बऱ्याच वेळा मुद्द्यांची पुनरावृत्ती झाली आहे असं मला वाटलं. ती पुनरुक्ती टाळून कदाचित थोडी पानं कमी करता आली असती. पण मुद्दा वाचकाच्या मनावर ठसावा, कुठलंही विशिष्ट प्रकरण वाचायला घेतले तरी ते त्या मुद्द्यापुरतं पूर्ण असावं हा त्यामागचा हेतू असेल. पुस्तकात पुढे अनुवादकांना नोकरी, व्यवसायाच्या काय संधी आहेत; कुठल्या संस्था याबद्दलचं शिक्षण देतात; कुठले कोर्सेस उपलब्ध आहेत याबद्दलचा तपशील आहे. अनुवाद करायला सुरुवात करायची असेल तर मजकूरनिवड, प्रकाशकांशी संपर्क, परवानगी ह्याचे मार्गदर्शन आहे. त्यांनतर शाळेत आपण जे प्राथमिक व्याकरण शिकतो; म्हणजे कर्ता, कर्म, क्रियापद, ॲक्टिव-पॅसिव्ह व्हॉइस, वेगवेगळे काळ इत्यादींच्या व्याख्या देऊन सगळ्याची उजळणी केली आहे. ज्याला अनुवाद क्षेत्रात उतरायचे आहे त्याला व्याकरणाचा अजून बराच अभ्यास करावा लागणारच आहे. आणि पुस्तकाचा उद्देश व्याकरण शिकवणं नाही तर अनुवादकासाठी व्याकरण अत्यावश्यक आहे हे ठसवणं आहे. त्यामुळे व्याकरणाचा भाग पुस्तकात नसता तरी चालला असता असं मला वाटलं. पुस्तकातील काही पाने वर दिलेल्या लिंकवर शेअर केली आहेत. म्हणजे तुम्हाला पुस्तकाची, लेखनशैलीची अजून चांगली कल्पना येईल. त्यात पुढील मुद्द्यांबद्दलची पाने आहेत १) अनुवादिका म्हणून येणारे कटुगोड अनुभव. २) प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर ह्यांच्या पुस्तकांचा मराठी अनुवाद लीनाजींनी केला आहे. त्यातून जेफ्री आर्चर ह्यांच्याशी भेटीगाठी झाल्या त्यातला एक प्रसंग. ३) अनुवादाचे वर्गीकरण/प्रकार सांगणाऱ्या प्रकरणातली दोन पाने. अनुवाद प्रक्रियेची किती बारकाईने तांत्रिक चिकित्सा केली आहे हे लक्षात येईल. ४) नाटकाचा अनुवाद करताना येणारी आव्हाने ह्याबद्दलच्या प्रकरणातली दोन पाने. लीना सोहोनींचे आत्मकथन असणारा पुस्तकाचा पहिला भाग सर्व वाचकांना वाचायला आवडेलच. पुस्तकाचा दुसरा भाग तांत्रिक आहे. तो सर्वसामान्य वाचकाला वाचायला आवडेलच असं नाही. पण तो वाचल्यावर अनुवादक म्हणून काम करताना किती कटकटी असतात, काय व्यवधानं सांभाळावी लागतात हे वाचकाच्या लक्षात येईल. त्यातून अनुवादकांकडे व त्यांच्या कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन अजून कौतुकाचा आणि कृतज्ञतेचा होईल हे निश्चित. ज्यांना अनुवाद करायचा आहे, या क्षेत्रात शिरायचं आहे किंवा तशी उमेदवारी सुरू झाली आहे त्यांना हा भाग मार्गदर्शक ठरेल. जाण वाढवेल हे नक्की. त्यामुळे या पुस्तकाच्या वाचनातून अनुवादाचा किडा काही वाचकांच्या डोक्यात गेला आणि त्यातून नवे अनुवादक मराठीत निर्माण झाले तर ते सोन्याहून पिवळे ! मराठीत कथा,कादंबऱ्या, चरित्र, सामाजिक विषयांची चर्चा ह्या पद्धतीचे लेखन भरपूर होत असतं. पण ह्या पुस्तकाप्रमाणे शास्त्रीय/तांत्रिक चिकित्सा करणारी, गंभीरपणे शिकवणारी पुस्तकं कमी दिसतात. ती प्रकाशित झाली तरी ती क्रमिक पाठ्यपुस्तक किंवा “अभ्यासाचे पुस्तक” या प्रकारात ढकलली जातात आणि दुर्लक्षित होतात. पण या पुस्तकाच्या लेखिका आणि प्रकाशक यांनी हे पुस्तक मुख्यधारेतल्या पुस्तकाप्रमाणे सादर केलं आहे. त्यातून हे पुस्तक जास्त वाचलं जाईल; जास्त लोकांना विचार प्रवृत्त करेल असं मला वाटतं. अशा प्रकारची पुस्तकं मराठीत प्रकाशित होणे हे मराठी भाषेला ज्ञानभाषा करण्यासाठी मोठे योगदान आहे. त्याबद्दल प्रकाशक आणि लेखिका दोघांचेही एक मराठी भाषा प्रेमी म्हणून मी मनापासून आभार मानतो. —————————— मी दिलेली पुस्तक श्रेणी —————————— अनुवाद करणारे असाल किंवा करायची इच्छा असेल तर आवा ( आवर्जून वाचा ) इतरांनी जवा ( जमल्यास वाचा ) ——————————— आवा ( आवर्जून वाचा ) जवा ( जमल्यास वाचा ) वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक ) नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक ) ...Read more

OMKARACHI REKH JANA
OMKARACHI REKH JANA by MANJUSHRI GOKHALE Rating Star
सौ. जस्मिन जोगळेकर

आमच्या पुस्तकप्रेमी समुहावरचा एकही दिवसाचा खंड न पडता सलग 1730 वा पुस्तक परिचय पुस्तक प्रेमी समूह,पुस्तक परिचय अभियान: एकही दिवस खंड पडू न देता पुस्तकांचा परिचय हे पुस्तकप्रेमी समूहाचे यश ! पुस्तक सत्र:- ३ सप्ताह क्रमांक:- २४८ पुस्तक क्रमांक: १७३० दिनांक: १०/०३/२०२५ पुस्तकाचे नांव:- ओंकाराची रेख जना लेखक:- मंजुश्री गोखले पहिली आवृत्ती: फेब्रुवारी २०१२ पृष्ठ संख्या : ३०८ मूल्य: रु. ३२० प्रकाशन: मेहता पब्लिशिंग हाऊस परिचयकर्ती: सौ. जस्मिन जोगळेकर एखाद्या गोष्टीसाठी वेळ यावी लागते म्हणतात, तसं काहीसं झालं माझं. खरंतर पुस्तक वाचनाच्या बाबतीत असं व्हायला नको होतं पण झालं. `हे खूप सुंदर पुस्तक आहे, तुम्ही वाचाच` म्हणून एक पुस्तक आमच्या हाती आलं. अर्थात ज्यांनी सांगितलं त्यांनी त्यांच्या संग्रहातलं पुस्तक दिलं होतं. तसं बरेच दिवस होतं आमच्याकडे. नवऱ्याने वाचून खूपच सुंदर आहे, वाच नक्की सांगितलं देखील मला. पण पुस्तक परत द्यायची वेळ आली तरी वाचलं गेलं नाही. तरी ते नाव डोक्यात फिट बसलं होतं. अखेर एक दिवस ते एकच पुस्तक नव्हे तर त्याच लेखिकेची चार पुस्तकं विकतच घेऊन आले आणि मग ती वेळ आली…. त्या पुस्तकाच्या, पुस्तकातील भाषेच्या आणि त्या लेखिकेच्या प्रेमात पडण्याची. पुस्तक होतं…मंजुश्री गोखले यांनी संत जनाबाईंवर लिहिलेलं `ओंकाराची रेख जना`. `विठू माझा लेकुरवाळा`, `धरिला पंढरीचा चोर` अशा अभंग रचनेतून जनाबाई आपल्या ओळखीच्या आहेत. किंवा विठूराया त्यांना हर कामात मदत करत असतो वगैरे माहीत आहे. पण त्यांचं संपूर्ण चरित्र सगळ्यांना माहीत असेलच असं नाही. ते माहीत करून देण्याचं सुरेख काम या कादंबरीने केलं आहे. जनाबाईंच्या जन्मापूर्वीची आणि नंतरचीही त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती, छोट्या जनाला मागे ठेऊन दुखण्याने तिला सोडून गेलेली तिची आई, त्यानंतरची बिकट वेळ याचं वर्णन वाचताना डोळ्यातलं पाणी थांबत नाही. पुढेही काही प्रसंग असे आहेत…भागाबाईचं वागणं असेल किंवा सुळावर चढवायचा प्रसंग असेल… डोळ्यात पाणी येतच राहतं. पण एवढं होऊनही त्यांची पंढरीरायावरची भक्ती मात्र गाढ होती. जनाईसुध्दा त्याला पाहायला आतुर होती. सोसले चटके l पोटी नाही घास l विठ्ठलाची आस l जनाईला ll भेटीसाठी त्याच्या l गोळा तनमन l धाडे आवतान l विठूराया ll अखेर विठुरायाकडून आमंत्रण आल्यावर बापलेक पंढरीची वाट चालू लागतात. काळया देवाला पाहायला आसुसलेली जना आणि लेकीला कायमचं परक्या घरी सोडून यायचं या विचाराने जडावलेला दमा… नशिबाची रेख l भिवरेच्या काठी l विठूराया ओढी l जनाईची ll दोघांचा प्रवास विठ्ठलाच्या विश्वासावर सुरू होतो. पुढं जनाईला दामाशेटींच्या घरी सोडून देणं, त्या घराने जनाला आपलंच म्हणणं, नामदेवांसोबत तिचं मोठं होणं अशा कितीतरी प्रसंगांनी सुखावून जायला होतं. तेव्हाची सामाजिक परिस्थिती, जनाचं अतिशूद्र असणं आणि त्यातून स्त्री असणं…त्यासाठी तिला झेलावे लागणारे त्रास, संत म्हणून मोठेपण मिळाल्यावरही त्यांच्यावर आलेला चोरीचा आळ… त्रास होतो वाचताना. जनाची आणि विठ्ठलाची पहिली भेट आणि तिथून त्यांच्यात दृढ होत जाणारे नाते…वाचताना शहारून जायला होतं. जना ते संत जनाबाई हा प्रवास, त्यात जनाबाईंनी रचलेले अभंग, ज्ञानदेवादि भावंडांचा सहवास आणि मुख्य म्हणजे नामदेव आणि जनाबाई यांचे नाते… गुरू शिष्य ऐसी l जोडी कौतुकाची l जनी नामयाची l संतांमधे ll याबद्दल पुस्तकात आलेले उल्लेख मन लावून वाचण्यासारखे आहेत. विठ्ठलाच्या चरणी झालेला जनाबाईंच्या जीवनाचा शेवट म्हणजे तर 🙏 वृंदा कोमेजली l स्तब्ध वारा पाणी l ओघळले मणी l मंजिऱ्यांचे ll थरारली वीट l कंप राऊळाला l श्वास ओलावला l क्षणभर ll आज नाही घाई l विठोबाला काही l जनाईच येई l चरणाशी ll शांता शेळके यांनी अनुवाद केलेलं `चौघीजणी` जसं मनात कायमचं घर करुन बसलं आहे, त्या जोडीला आता `ओंकाराची रेख जना` हे ही अत्यंत आवडीचं झालं आहे. यापूर्वी संत साहित्य किंवा संतांवर लिहिलेलं साहित्य फारसं वाचलं नव्हतं. लताजी किंवा भीमसेनजींमुळे घराघरात पोहोचलेले अभंग तेवढे माहीत होते. त्यामुळं जनाबाईंवर लिहिलेल्या या पुस्तकाबाबत उत्सुकता होतीच. पहिल्या प्रकरणाच्या अगदी पहिल्या ओळीपासून या पुस्तकाशी जी बांधली गेले ते शेवटपर्यंत. पुस्तकातील सगळं वर्णन अगदी बारीक सारीक तपशील देऊन पुढं जात राहतं आणि त्यात आपल्याला गुंतवून ठेवतं. सुरुवातीची काही प्रकरणं तर डोळ्यात अश्रुंच्या धारा घेऊन, पुसट अक्षरं समोर ठेऊन वाचावी लागतात. प्रसंग सगळे l तपशिलासवे l डोळ्यात आसवे l वाचुनिया ll भाषा ही साजिरी l सत्य हेच वाटे l प्रसंग तो घडे l आसपास ll एकूणच पुस्तकातलं वर्णन इतकं जिवंत आहे की सगळे प्रसंग आपल्या आसपास घडताहेत असंच वाटत राहतं कायम. दमा - कुरुंडचं दुर्दैवी आयुष्य, पोटी मूल नसल्याचं त्यांचं दुःख, विठ्ठलाला त्यासाठी साकडं घालण्यासाठी त्यांनी केलेला पंढरपूरचा प्रवास असो किंवा जनाबाईंच्या खोलीत येऊन विठ्ठलाने त्यांच्याशी मारलेल्या गप्पा, त्यांना कामात केलेली मदत…. सगळे अगदी सगळे प्रसंग आपणच जगतोय असं वाटावेत इतके मनाला भिडून जातात. काही ठिकाणं तर अशी… `अरे विठ्ठला, गडबडीत भलतंच काय उचलतोस. तुझा रत्नहार आणि शेला तर घेऊन जा`...असं आपणच विठ्ठलाला हाक मारून सांगावं असं वाटायला लागतं वाचताना. भाषा, वर्णनशैली फार साजिरी आहे. पुस्तकातला `साजिरी` हा शब्द एकदम आवडून गेलाय. एखादा चेहरा पाहिल्यावर कसं आपल्याला कळून जातं ना की, ही व्यक्ती मायाळू आहे किंवा तुसडी आहे वगैरे…तसं पुस्तकाच्या सुरुवातीलाच यातल्या भाषेबद्दल आपुलकी, प्रेम वाटायला लागतं. भाषा साधी पण सुंदर, शब्दांचा वापर असा की यापेक्षा वेगळा शब्द इथं शोभला नसता असं वाटायला लागेल असा. अनवाणी पायाला चटके बसावेत इतकं हवामान अजून बदललं नव्हतं…यासाठी `अजून मातीने माया सोडली नव्हती`... किती सुरेख वाक्य आहे ना! अशी कितीतरी वाक्य आपल्याला त्यांच्या प्रेमात पाडायला लावणारी यात सापडतील. एकूणच सांगायचं झालं तर पुस्तक अप्रतिम आणि सगळ्यांनी आवर्जून वाचावं असंच आहे. एकाच लेखकाची पुस्तकं सलग एका मागोमाग एक अशी माझ्याकडून वाचली जात नाहीत. पण आता खुणावतंय ते… `जोहार मायबाप जोहार`. ...Read more