* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788177660944
  • Edition : 5
  • Publishing Year : OCTOBER 1993
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 420
  • Language : MARATHI
  • Category : GRAMMAR
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
"GRAMMAR IS THE CORE OF A LANGUAGE; IT IS THE FOUNDATION OF THE LANGUAGE. HENCE A STUDENT OF MARATHI LANGUAGE MUST KNOW THE BASIC PRINCIPLES AND ITS SCIENTIFIC ANALYSIS. TO DO SO, A STUDENT HAS TO GO THROUGH MANY BOOKS WHICH HE MIGHT FIND LENGTHY AND BORING. AFTER REALIZING THE PROBLEMS OF THE STUDENTS, AN ATTEMPT HAS BEEN MADE TO OVERCOME IT. IN THIS CURRENT BOOK, THE OPINIONS OF THE GREAT SCHOLARS OF MARATHI GRAMMAR HAVE BEEN DISCUSSED COVERING ALL THE POINTS IN DETAIL. WHEREVER, THE AUTHOR HAD A DOUBT, HE HAS JOTTED IT DOWN ALONGSIDE AND WHEREVER NECESSARY, HE HAS SHARED HIS OWN VIEWS TOO. THE THREE NEW CHAPTERS INCLUDED IN THIS BOOK ARE `SWANIM VICHAR`, `PADMI VICHAR`, AND `VAKYAVINYAS`. WE ARE SURE THAT THE STUDENTS WILL ENJOY THE DETAILED DISCUSSIONS ON ALL THE IMPORTANT AND DEBATABLE CONTROVERSIES, AND WILL BE BENEFITTED BY IT.
भाषा ही एक पद्धती आहे आणि भाषेचे घटक सामान्यपणे विशिष्ट नियमांना अनुसरून वागत असतात. पुन्हा हे नियम सुटे सुटे नसतात, तर एका समठा नियम व्यवस्थेचे ते भाग असतात. भाषेतल्या ध्वनींची व अर्थवाहक घटकांची रचना व कार्य यांचे दिग्दर्शन ही समठा नियम व्यवस्था करीत असते. ही नियमव्यवस्था पूर्णपणे समजावून घेणे, तिच्या मर्यादा जाणणे, तिने स्वीकारलेल्या अपवादांची माहिती करून घेणे आणि अशा अभ्यासानिशी समठा नियमव्यवस्थेची पुन्हा जास्तीत जास्त शास्त्रशुद्ध मांडणी करणे, हेच व्याकरणाचे कार्य होय. पतंजलीच्या ’व्यक्रियते अनेन इति व्याकरणम्’ या व्याख्येचा हाच अर्थ सांगता येतो. हा अर्थ लक्षात घेऊनच डॉ. लीला गोविलकर यांनी प्रस्तुत ठांथात मराठी भाषेचे व्याकरण सिद्ध केल्याचे दिसेल. मराठीच्या विद्यमान प्राध्यापकांमध्ये व्याकरणशास्त्राचा मूलभूत अभ्यास करणाऱ्या प्राध्यापकांची संख्या हाताच्या बोटांवर मोजता येईल, इतकी अत्यल्प आहे. डॉ. लीला गोविलकर यांचा समावेश या अत्यल्प प्राध्यापकांत होतो. व्याकरणशास्त्राच्या अभ्यासक म्हणूनच त्या सर्वांना परिचित आहेत. त्यांनी अद्ययावत दृष्टी बाळगून तयार केलेला प्रस्तुत ठांथ व्याकरणाच्या अभ्यासकांना मार्गदर्शक ठरेल.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #MARATHICHEVYAKARAN #MARATHICHEVYAKARAN #मराठीचेव्याकरण #GRAMMAR #MARATHI #LEELAGOVILKAR "
Customer Reviews
  • Rating Starमराठी ग्रामर

    Write More Marathi

  • Rating StarDAINIK LOKSATTA 03-07-201994

    व्याकरणाचा शास्त्रशुद्ध विचार... कोणत्याही भाषेच्या शास्त्रशुद्ध अभ्यासासाठी व्याकरणाचा मुलभूत अभ्यास आवश्यक आहे हे ठाऊक असूनही या विषयामध्ये व्यासंग असणाऱ्या अभ्यासकांची संख्या फार कमी असते ही वस्तुस्थिती आहे. मराठी भाषादेखील या गोष्टीला अपवाद नाही विद्यमान काळात तर ज्यांना खऱ्या अर्थाने ‘वैय्याकरणी’ म्हणता येईल असे व्याकरणशास्त्राचे अभ्यासक मराठी भाषेत फारच मोजके सापडतील. अशा विवेचक आणि साक्षेपी अभ्यासकांत डॉ. लीला गोविलकर यांची गणना होते. व्याकरण शास्त्राविषयीच्या आस्थेमुळेच त्यांनी या विषयाचा सांगोपांग अभ्यास करुन आपला प्रबंध सादर करुन डॉक्टरेट मिळविली. ‘मराठीचे व्याकरण’ हा त्यांचा ग्रंथ त्या प्रयत्नाचीच फलश्रुती. प्राध्यापिका या नात्याने व्याकरणाचे अध्ययन - अध्यापन करीत असताना लेखिकेच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित झाले. मराठीतील व्याकरणकारांची व्याकरणे अभ्यासताना त्यामध्ये डॉ. लीला गोविलकरांना अनेक प्रकारची विविधता आणि मतभिन्नता आढळली. व्याकरणाच्या या अभ्यासकांची व्याकरणाकडे पाहण्याची भूमिका, व्याकरणातील अभ्यासघटकांचे त्यांचे विवरण इ. गोष्टींमध्ये वैविध्य असले तर त्यामध्ये एक ‘आंतरिक सुसंगती’ असल्याचे लेखिकेला जाणवले. एकूण या विषयाच्या खोलात शिरताना डॉ. गोविलकरांच्या लक्षात आले की, अजूनही हा विषय बराच दुर्लक्षित आहे आणि त्याच्या मूलभूत शास्त्रशुद्ध व विवेचक अभ्यासाची गरज आहे. या गरजेतूनच त्यांना प्रस्तुत ग्रंथलेखनाची प्रेरणा मिळाली. डॉक्टरेटसाठी हा शोधनिबंध लिहिला असल्याने साहजिकच ग्रंथाची मांडणी त्या अनुषंगाने झालेली आहे. व्याकरणातील शब्दांच्या जातीबरोबरच शब्दसिद्धी, विभक्तिविचार, विकरणविचार, वाक्यविचार इत्यादी घटकांचा विचार ग्रंथात केलेला आढळतो. त्याशिवाय मराठी व्याकरणाची परंपरा, व्याकरणविषयक काही प्रश्न, शुद्धलेखन व मराठीतील काही प्रमुख व्याकरणकार इ. विषयांचाही ऊहापोह केलेला आहे. एकंदरीत मराठी व्याकरणाच्या सर्व अंगांची/घटकांची साधकबाधक चर्चा करुन डॉ. गोविलकर यांनी काही निष्कर्ष मांडण्याचा प्रयत्न प्रस्तुत ग्रंथात केला आहे. कोणत्याही चांगल्या प्रबंधलेखनासाठी आवश्यक असणारी अभ्यासाची शिस्त डॉ. गोविलकर यांच्या लेखनात आहे याचा प्रत्यय ‘मराठीचे व्याकरण’ हा ग्रंथ वाचताना आल्याखेरीज राहत नाही. एकूण वीस प्रकरणांमध्ये विषयाचे विवेचन विभागले असून प्रत्येक प्रकरणाची विशेष अशी मांडणी केलेली आहे. प्रतिपाद्य घटकांसंबंधीचे प्रास्ताविक, त्यानंतर उपशिर्षके देऊन घटकाचे विश्लेषण आणि शेवटी समारोप अशा मांडणीतून प्रत्येक प्रकरण सिद्ध झालेले आहे. समारोपामध्ये लेखिकेने सांगोपांग विश्लेषणानंतर काढलेले निष्कर्ष आहेत. अभ्यासकाच्या सहजपणे लक्षात यावेत यासाठी हे निष्कर्ष ठळक अक्षरात दिले आहेत. प्रतिपादनात आवश्यक तेथे इंग्रजी प्रतिशब्द आणि इंग्रजी अवतरणेही दिली आहेत. उपोद्घाचे ‘मराठी व्याकरणाची परंपरा’ आणि उपसंहारामध्ये दिलेले ‘मराठीतील काही प्रमुख व्याकरणकार’ ही दोन्ही प्रकरणे एकत्रित वाचणे उद्बोधक ठरावे. या उभय प्रकरणांची छाया परस्परांवर पडलेली आढळते. मराठी व्याकरणातील विविध मतप्रवाह आणि त्यांचे वेगळेपण जाणून घेण्यासाठी जिज्ञासूंनी ही प्रकरणे अवश्य अभ्यासावीत. या प्रकरणांच्या अनुषंगाने डॉ. गोविलकरांनी मराठी व्याकरणांचा घेतलेला आढावा आणि मराठी व्याकरण-लेखनाची केलेली समीक्षा अभ्यासकांना वेगळी दृष्टी देऊन जाते. लेखिकेने शुद्धलेखनाच्या संदर्भात प्रतिपादिलेले विचारही चिंतनीय आहेत. ग्रंथाच्या शेवटी दिलेली संदर्भग्रंथसूची अभ्यासकांना/जिज्ञासूंना उपयुक्त ठरावी. मराठी व्याकरणाचा शास्त्रशुद्ध विचार करणाऱ्या या पुस्तकाचे भाषेचे अभ्यासक, शिक्षकवर्ग, प्राध्यापकवर्ग व विद्यार्थीवर्ग मनापासून स्वागत करील अशी प्रांजल अपेक्षा बाळगायला हरकत नाही. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more