* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: A METHODICAL ENGLISH GRAMMAR
  • Availability : Available
  • ISBN : 9788177665161
  • Edition : 7
  • Publishing Year : JANUARY 2000
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 548
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : GRAMMAR
Quantity
Buying Options:
  • Print Books:
FOR SOME REASON MARATHI STUDENTS ALWAYS TEND TO TURN AWAY FROM THE ENGLISH LANGUAGE. THEIR MINDS SEEM TO HARBOR A VAGUE FEAR ABOUT IT. THEY ARE RELUCTANT TO CONVERSE IN ENGLISH. AS A RESULT, THEY ALWAYS REMAIN LAGGARDS IN COMPETITIVE EXAMINATIONS. THE REASONS FOR THIS STATE OF AFFAIRS ARE TWO-FOLD. ONE IS A DISLIKE FOR ENGLISH GRAMMAR; AND OTHER, A PERVASIVE FEAR COMPLEX IN THE MINDS. THIS BOOK HAS BEEN SPECIALLY CONCEIVED WITH THE FOCUS ON THE STUDENT, AFTER DEVELOPING A NEW METHOD OF TEACHING AND LEARNING. IT AIMS TO HELP CONQUER THIS FEAR COMPLEX AND TO WIPE AWAY THE DISLIKE. EACH SECTION OF THE BOOK HAS BEEN PAINSTAKINGLY EDITED. IT ALSO GIVES ELABORATE MARATHI EXPLANATIONS, DOING AWAY WITH THE OBSTACLE OF TECHNICAL WORDS. THE LANGUAGE HAS BEEN PRESENTED IN A SIMPLE AND INTERESTING MANNER BY USING EASY-TO-UNDERSTAND EXAMPLES. THIS BOOK IS A MUST-HAVE FOR SECONDARY SCHOOL AND JUNIOR COLLEGE STUDENTS, AND ESPECIALLY SO FOR THOSE DESIROUS OF APPEARING FOR COMPETITIVE EXAMINATIONS AS WELL AS FOR GENERAL STUDENTS OF ENGLISH.
मराठी मुलं इंग्रजी या विषयापासून, का, कोण जाणे, सतत दूर राहतात. त्यांच्या मनांत इंग्रजीविषयी एक अनामिक भीती वसत असते. इंग्रजी मधे संभाषण करतानाही ती बिचकतात. परिणामी स्पर्धात्मक परीक्षांमधे त्यांची सतत पीछेहाट होताना दिसते. याचं मुख्य कारण म्हणजे, इंग्रजी व्याकरणाबद्दल असलेली नावड आणि एवूण इंग्रजीबद्दल मनात घर करून बसलेला भयगंड. ही नावड नाहीशी व्हावी, म्हणून; आणि या भयगंडावर मात करता यावी, म्हणून विद्यार्थ्यांच्याच दृष्टिकोनातून व्याकरणाच्या अध्ययन-अध्यापनाची एक नवी पद्धती (शूप्द्) विकसित करून, हे पुस्तक सिद्ध करण्यात आलं आहे. यातील प्रत्येक विभाग अत्यंत कष्टपूर्वक संपादित करण्यात आला आहे. शिवाय मराठी भाषेत विस्तारपूर्वक स्पष्टीकरण देऊन, पारिभाषिक शब्दांचा अडथळा दूर करण्यात आला आहे. सोप्या सोप्या उदाहरणांच्या साहाय्यानं इंग्रजी हा विषय सुलभ व रोचक करण्यात आला आहे. माध्यमिक शाळा, ज्यूनिअर कॉलेजमधील विद्यार्थी-विद्यार्थिनी व विशेषकरून स्पर्धात्मक परीक्षार्थी व इंग्रजीचे अभ्यासक या सर्वांना हा ग्रंथ सतत हाताशी ठेवावासा वाटेल.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#ENGLISH GRAMMAR #G.D.MORAY #LANGUAGE #SPELLING #NOUNS #PRONOUNS #ADJECTIVES #VERBS #TENSES #PHONETIC SYMBOLS #ADVERBS #INFINITIVE #PARTICIPLES #GERUND #PREPOSITIONS #CONSTRUCTIONS #TRANSFORMATION OF SENTENCES # CLAUSES #SYNTHESIS OF SENTENCES #DIRECT AND INDIRECT SPEECH # FIGURES OF SPEECH #WORD FORMATION #PUNCTUATION #WREN AND MARTINE ENGLISH GRAMMAR BOOK #OXFORD #अ मेथॉडिकल इंग्लिश ग्रामर # जी. डी. मोरे #ध्वनिचीन्हे #नामे # सर्वनामे #विशेषणे #क्रियाविशेषणे # युक्त रूप # कृदंत # शब्दयोगी अव्यये # रचना # काळांचे उपयोग # वाक्यारुपांतर # वाक्याखंड # वाक्यासंयोग # भाषालंकार # प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कथन # विरामचिन्हे # शब्दसिद्धी #धातुसाधित नाम
Customer Reviews
  • Rating StarSHIVMARG - MARCH 2019

    इंग्रजी भाषेचा समग्र आणि सोदाहरण घेतलेला वेध... विविध कारणांसाठी इंग्रजी भाषा चांगल्या रीतीने लिहिता-बोलता येणं महत्त्वाचं आहे. स्पर्धा परीक्षा, नोकरीसाठी मुलाखत देणं इ. हे महत्त्व लक्षात घेऊन जी. डी. मोरे यांनी ‘A Methodical English Grammar’ हे पस्तक लिहिलं. मोरे हे स्वत: इंग्रजीचे अध्यापक आहेत. विद्यार्थाना इंग्रजी शिकवताना त्यांनी नवनवीन प्रयोग केले आणि त्या प्रयोगांचा परिपाक म्हणजे हे पुस्तक. ध्वनिचिन्हे – उच्चार व आघात, नामे, सर्वनामे, विशेषणे, क्रियापदे, काळ, काळांचे उपयोग, क्रियाविशेषणे, युक्तरूप, कृदन्त, धातुसाधित नाम, शब्दयोगी अव्यये, रचना, वाक्यरूपान्तर, वाक्यखंड, वाक्यसंयोग, प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कथन, भाषालंकार, शब्दसिद्धी, विरामचिन्हे याबाबत सविस्तर विवेचन या पुस्तकात केलं आहे. तसेच हे पुस्तक कसे अभ्यासावे, लिप्यंतर याविषयीही माहिती दिली आहे. या पुस्तकातील सर्व exercise ची उत्तरे शेवटी दिली आहेत. इंग्रजी हा विषय अनेक सोप्या उदाहरणांच्या मदतीने सुलभ व रोचक करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. इंग्रजीमध्ये विभक्तीचे कार्य prepositions (शब्दयोगी अव्यय) कशी करतात याचं सविस्तर आणि सोदाहरण विवेचन मोरे यांनी केलं आहे. त्यासाठी त्यांनी ३२ पानं खर्ची घातली आहेत. Phonetic Symbols Key To Pronunciation And Stress (ध्वनिचिन्हे, उच्चार व आघात) हे प्रकरण, या पुस्तकाचं वेगळेपण दर्शवतं. शिवाय लेखकाने केलेला सूत्रांचा वापर हा भाग महत्त्वाचा आहे. लेखकाने स्वत: सूत्रे तयार केली आहेत. या सूत्रांमुळे मुलांचा आत्मविश्वास वाढेल आणि मुलं इंग्रजीचा अचूक वापर करण्यास शिकतील. या पुस्तकाची प्रस्तावनाही अभ्यासपूर्ण आहे. हे पुस्तक वाचून विद्यार्थाच्या मनामध्ये इंग्रजीविषयी गोडी निर्माण होईल. शाळा-ज्युनियर कॉलेजमधील विद्यार्थी-विद्यार्थिनी व विशेषकरून स्पर्धात्मक परीक्षार्थी व इंग्रजीचे अभ्यासक, इंग्रजीचे शिक्षक या सर्वांना या पुस्तकाचा उपयोग होईल आणि यापूर्वीही अनेकांना या पुस्तकाचा उपयोग झाला असेल; कारण या पुस्तकाची ही सातवी आवृत्ती आहे. व्याकरणासारख्या पुस्तकाची सातवी आवृत्ती प्रकाशित होणं, हे नक्कीच प्रशंसनीय आहे. -अंजली पटवर्धन ...Read more

  • Rating StarRATNAGIRI TIMES 28-10-2001

    आजतरी आपल्या देशात इंग्रजी भाषेला अनन्यसाधारण महत्व आहे. स्पर्धापरिक्षा, नोकरीकरिता मुलाखती इत्यादिकरिता चांगले इग्लिश हे भांडवल आहे. इंग्रजी भाषेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात व वेगवेगळया शास्त्रीय शोधांची ओळख होते. विष्णूशास्त्री चिपळूणकर यांचे मरठी भाषेवर प्रभुत्व होते. तरीदेखील त्यांनी इंग्रजी भाषेला ‘वाघीणीचे दूध’असे संबोधले. आज अध्र्या जगात इंग्रजी भषा बोलली जाते. विज्ञान, वाणिज्य, कला व विधी शाखांमध्ये इंग्रजी हे वरदान आहे. कोणतीही भाषा आत्मसात करावयाची असेल तर त्या भाषेच्या व्याकरणाला महत्व आहे व तो एक भक्कम पाया आहे. व्याकरणाशिवाय भाषा शिकणे किंवा व्याकरणाच्या अभ्यासातून भाषा शिकणे हा एक वादाचा मुद्दा होऊ शकेल. पण व्याकरणाने एक प्रकारचा आत्मविश्वास वाढतो व त्या भाषेतील वाक्यरचना समजण्यास सुलभता येते. आपण लिहिलेले वा बोललेले बरोबर आहे विंâवा नाही, हे व्याकरणाशिवाय समजणार नाही. आजतागायत इंग्रजीत बरीच व्याकरणाची पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. पण विद्याथ्र्यांची गरज संपूर्णपणे भागविणारी व्याकरणाची पुस्तके विरळच! इंग्रजी भाषेचा एक अभ्यासक या नात्याने मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे यांनी प्रसिद्ध केलेले जी.डी. मोरे यांचे A Methodical English Grammar हे पुस्तक संपूर्ण अभ्यासिले. मोरे हे इंग्रजी शिकविण्याच्या व्यवसायात बरीच वर्षे (जवळजवळ आयुष्यभर म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही) असल्यामुळे ते विविध थरांतील गरजा, त्यांना जाणवणाNया त्रुटी लक्षात घेऊन त्यांनी वरील पुस्तकाचे लिखाण केले आहे. नानाविध इंग्रज लेखकांच्या व्याकराणाच्या पुस्तकांचा संदर्भ घेऊन इंग्रजी भाषेची मर्मस्थाने व बारकावे ओळखून त्यांनी सोप्या भाषेत अभ्यासकाला सहज समजेल, असे पुस्तक लिहिले आहे. मोरे यांना सर्व प्रकरणांचे प्रयोग मुलांसमोर केले आहेत. त्यासर्व प्रयोगांचे फलित म्हणजे हे पुस्तक साहजिकच त्यांचे पुस्तक वेगळे उतरले आहे. आजच्या काळी एका वर्षाच्या आत इंग्रजी व्याकरणाच्या पुस्तकाची दुसरी आवृत्ती निघालेली माझ्या ऐकिवात नाही. ए मिथॉडिकल इंग्लिश ग्रामरची दुसरी आवृत्ती बाजारात आलेली आहे. सर्व विषय मराठी भारुोत समजावून सांगितल्याने विद्यार्थी व शिक्षकांची चांगजीच सोय झाली आहे. शहरातून या पुस्तकाला मागणी आहेच पण खेड्यापाड्यातून या पुस्तकाला भरघोस पाठिंबा मिळत आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more