`THE FIRST NATIONWIDE UPRISING TOOK PLACE IN INDIA IN 1857 FOR INDEPENDENCE. THERE IS NO DOUBT THAT THE REVOLUTIONARY ERA BEGAN FROM THEN ON. THIS REVOLUTIONARY ERA DID NOT END UNTIL INDEPENDENCE. AFTER INDEPENDENCE, IN 1952, SWATANTRYAVEER SAVARKAR`S REVOLUTIONARY ORGANIZATION ABHINAV BHARAT WAS LAUNCHED IN PUNE WITH GREAT POMP AND SHOW.` BEARING WITNESS TO THIS HISTORY, IT HAS TAKEN NOTE OF NOT ONLY THE INDIAN REVOLUTION BUT ALSO OTHER REVOLUTIONARY WORKS OF THE WORLD. `ALL THOSE ARTICLES HAVE BEEN WOVEN TOGETHER IN THE PRESENT BOOK, KEEPING THE BASIC FORMULA OF REVOLUTION. OF COURSE, THE FORM OF REVOLUTION VARIES ACCORDING TO THE COUNTRY AND TIME; BUT IF THE WORD `REVOLUTION` ITSELF IS TAKEN TO MEAN `RADICAL CHANGE`, THEN THE FORMULA OF REVOLUTION IS THE SAME IN ALL THESE COUNTRIES. THIS IS NOT A COMPREHENSIVE HISTORY OF THE REVOLUTION OF ANY ONE NATION!` THE EXPERIENCE OF THIS WRITING BY B. D. KHER COMES ONLY AFTER READING THIS BOOK.
`स्वातंत्र्यप्राप्तीसाठी १८५७साली भारतात पहिला देशव्यापी उठाव झाला. तेव्हापासून क्रांतिकाल प्रारंभित झाला असं मानायला प्रत्यवाय नाही. त्यानंतर स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंत हा क्रांतिकाल संपला नव्हता. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर १९५२साली स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अभिनव भारत या क्रांतिसंस्थेचा पुण्यात मोठ्या थाटामाटात सांगता समोर झाला.’ याच इतिहासास साक्षी ठेवून केवळ भारतीय क्रांतीविषयीच नव्हे, तर जगातील अन्य क्रांतिकार्यांचीही दखल यात घेतलेली आहे. `ते सारे लेख क्रांतीचं मूळ सूत्र धरून, प्रस्तुत पुस्तकात एकत्र गुंफले आहेत. अर्थात देशाप्रमाणे व काळाप्रमाणे क्रांतीचं स्वरूप भिन्न होतं जातं; परंतु `क्रांती’ या शब्दाचाच अर्थ ‘आमूलाग्र बदल’ असा घेतला, तर या सर्व देशांतून क्रांतीचं ते सूत्र समान होतं. हा कोणत्याही एका राष्ट्राच्या क्रांतीचा समग्र इतिहास नव्हे!’ भा. द. खेरांच्या या लेखणीचा अनुभव हे पुस्तक वाचल्यावरच येतो.