* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788177667042
  • Edition : 5
  • Publishing Year : AUGUST 2000
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 176
  • Language : MARATHI
  • Category : ESSAYS
  • Available in Combos :SHANTA SHELKE COMBO SET - 21 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
A FEW YEARS AGO, SHANTABAI WAS RUNNING A COLUMN `KAVITA SMARANATLYA` THROUGH THE MAGAZINE `ANTARNAAD`. IN THIS, SHE WAS PRESENTING THE POEMS WHICH WERE HER FAVOURITE, WHICH SHE HAD LIKED VERY MUCH, WHICH SHE HAD REMEMBERED VERY WELL. WHILE DOING SO, THE ORIGINAL POEM WAS GIVEN WITH SHANTABAI`S REVIEW ABOUT IT. THERE WERE 25 SUCH REVIEWS BY HER IN THE MAGAZINE. THIS BOOK PRESENTS THEM ALL TOGETHER FOR THE CONVENIENCE OF THE READERS. WE ALL ARE AWARE OF THE POETESS SHANTABAI. HER STUDY AND RESEARCH OF ALL THE POEMS, NEW OR OLD, HER LOVE FOR POETRY, HER CHOICE EVERYTHING ITSELF IS EXCLUSIVE. SHE READS OTHER`S POEM WITH AN OPEN MIND. SHE GRASPS THE BEAUTY WITHOUT ANY PREJUDICE. HER REVIEWS ABOUT THE POEMS SHE LIKED THE BEST THUS BECOME MASTER PIECES. THIS BOOK WILL SATISFY THE HUNGER OF THE READERS AS WELL AS THE STUDENTS STUDYING THE POETRY FORMAT IN DETAIL.
आवडलेल्या कवितांवरील शान्ताबाईचे सुंदर रसग्रहण. एक सुंदर स्वप्नरंजन....काही काळापूर्वी ‘अन्तर्नाद’ मासिकामधून ‘कविता स्मरणातल्या’ हे सदर शान्ताबाई चालवत होत्या. आपल्याला आवडलेली, स्मरणात राहिलेली कविता प्रथम संपूर्ण द्यावयाची आणि मग तिच्याबद्दलचा रसग्रहणात्मक लेख लिहायचा, असे सदराचे स्वरूप होते. असे पंचवीस लेख त्या वेळी शान्ताबार्इंनी लिहिले. ‘कविता स्मरणातल्या’ या पुस्तकातून ते इथे प्रथमच एकत्रित स्वरूपात वाचकांसमोर येत आहेत. शान्ताबार्इंचे कविताप्रेम सर्वज्ञात आहे. जुन्यानव्या कवितेचा त्यांचा व्यासंग गाढ; सर्वस्पर्शी आहे. त्या स्वत: कवयित्री आहेत; पण त्यापेक्षा त्या एक चोखंदळ, रसिक आणि काव्यप्रेमी वाचक आहेत. त्यामुळे त्यांचे हे काव्यविषयक लेख अत्यंत वाचनीय झाले आहेत. कवितेवर मन:पूर्वक प्रेम करणाऱ्या रसिकांनाच नव्हे, तर कवितालेखन करणाऱ्या कवींनाही हे लेख कुतूहलजनक वाटतील. त्यांच्या पसंतीला उतरतील, यात शंका नाही....
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#आंधळी#कॅथरिन ओवेन्स पिअर#कादंबरी# शान्ता ज.शेळके#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%#THE HELENKELLERSTORY #CATHERINEOWENSPEARE #SHANTAJ.SHELKE #ANDHALI #ANDHALYACHE DOL #ANOLAKH #ANUBANDH #CHAUGHIJANI #GAVATI SAMUDRA #GONDAN #KAVITA SMARANATALYA #KINARE MANACHE #LEKHAK ANI LEKHANE #MEGHDUT #NIMITTA NIMITTANE #PAVSAAADHICHAPAUS #PURVASANDHYA #RANGRESHA #RESHIMREGHA #SANGAVESEVATALEMHANUN #SANSMARNE #SUVARNAMUDRA #VARSHA
Customer Reviews
  • Rating StarDAINIK LOKSATTA 16-06-2002

    ‘व्यासंगाचे कंगोरे… खरं रसिक मन सुंदर आणि मनस्वी गोष्टींचा मागोवा घेत जातं आणि त्याच वेळेला स्वत:ला दिसलेल्या गोष्टी तितक्याच तन्मयतेनं इतरांना सांगतं. आकाशात उमटलेलं इंद्रधनुष्य जेव्हा आपण जीव भरून पाहतो आणि त्याच वेळी ‘ते बघ’ म्हणून शेजारच्याला दावतो, तेव्हा आपण खरे रसिक असतो... कविता, गीतलेखन, ललित लेखन, कथा, अनुवाद, समीक्षा, संपादन, अध्यापन अशा अनेक मार्गांनी मराठी भाषेमध्ये खोलवर मुळं रुजवलेल्या जेष्ठ साहित्यिका शांता शेळके जेव्हा एका रसिकाच्या भूमिकेत शिरतात तेव्हा ‘सुवर्णमुद्रा’ यासारख्या पुस्तकाची निर्मिती होते. मराठी साहित्यात स्वत:च्या प्रतिभेने मोलाची भर घातलेल्या शांताबाईनी मराठी रसिकांसाठी आपल्या संचिताचं हे जणू मृत्युपूर्व देणंच दिले आहे. ‘कविता स्मरणातल्या’ मध्ये शांताबार्इंनी गोविंदग्रज, लक्ष्मीबाई टिळक, यशवंत, रेंदाळकर, कुसुमाग्रज, बोरकर, अनिल, कांत आदी मान्यवर कवीसोबत, कवी म्हणून फारसे परिचित नसलेल्या अज्ञानवासी, साधुदास, श्रीनिवास पाटणकर, वि.स. खांडेकर, अनंत काणेकर, कवी माधव यासारख्या एकूण २५ कवींच्या कविताचा रसग्रहणात्मक मागोवा घेतलेला आहे. हे पुस्तक म्हणजे, ‘अंतनार्द’ मासिकासाठी लिहिलेल्या लेखमालिकेचं संकलन आहे. प्रत्येक लेखामध्ये एक संपूर्ण कविता, कवीचा साहित्यिक परिचय, तो लिहित असलेल्या काळाचं आरेखन आणि त्या कवितेचा माग घेता घेता टिपलेल्या कंगोऱ्याचं लेखिकेने ओघवत्या शैलीमध्ये वाचकाला घडवलेलं दर्शन आहे. स्वत:बरोबर वाचकालाही कवितेच्या अंतरंगात घेऊन जाण्याचा शांताबार्इंच्या विलक्षण हातोटीचा प्रत्यय हे लेख वाचताना वारंवार येतो. कवितेतील प्रतिमांचा शोध घेता घेता लेखिका त्यावर मार्मिक भाष्यही करतात. त्या एकेक ठिकाणी लिहितात. ‘पद्मा यांनी इथे ज्या प्रतिमा वापरल्या आहेत, त्या चित्रदर्शी तर आहेतच, पण त्यांच्या वास्तव रूपाबरोबर त्यांना सतत पसरत जाणारी विविध परिमाणेही लाभतात आणि त्या अधिकाधिक अर्थपूर्ण होत जातात.’ या लेखांमध्ये कवितेसोबत कवीच्या मानसिकतेचा घेतलेला वेध आहे. काही ठिकाणी कवितेच्या आशयाला समांतर जाणाऱ्या इतर कवींच्या ओळी उद्घृत केल्या आहेत, तर काही ठिकाणी कवितेनं स्वत:वर उमटवलेल्या ठशाचं दर्शनही लेखिका घडवतात. रेंदाळकरांच्या ‘अजुनी चालतोचि वाट’ या कवितेवर लिहीत असताना शांताबाई एक अर्थगर्भ स्वगतच लिहितात. ‘एकीकडे असे राबणे आणि दुसरीकडे वाढत्या वयाबरोबर त्याचे व्यर्थत्व उमगणे, असे होता होता दिवस, महिने, वर्ष ओसरत असतात. आयुष्याचीच सांजवेळ पुढ्यात येऊन ठाकते. आपण कुठून निघालो, कुठे आलो, अखेरचा मुक्काम कुठे आहे काहीच उमगेनासे होते. आयुष्य या वाटचालीतच संपून जाणार की काय असा प्रश्न पडतो.’ बी. रघुनाथांच्या ‘सांज’ या कवितेवरील संपूर्ण लेख मुळातून वाचावा असा भावोत्कट उतरला आहे. शांताबार्इंनी स्वत:मध्ये मुरवून घेतलेली कविता वाचकांपर्यंत पोहोचवताना आस्वादक समीक्षेचं लोभसवाणं रूप कविता स्मरणातल्याच्या प्रकाशनानं साकार झालं आहे हे निश्चित. -निरंजन उजगरे ...Read more

  • Rating StarDAINIK KESRI 19-11-2000

    स्मरणात राहणाऱ्या कविता… शांता शेळके यांचे काव्यप्रेम सर्वज्ञात आहे. त्या स्वत: कवयित्री आहेत; पण त्यापेक्षा त्या एक चोखंदळ, रसिक आणि काव्यप्रेमी वाचक आहेत. काही काळापूर्वी ‘अंतर्नाद’ या मासिकामधून ‘कविता स्मरणातल्या’ हे सदर शांताबाई चालवत होत्या. आल्याला आवडलेली कविता प्रथम संपूर्ण द्यावयाची आणि मग तिच्याबद्दल रसग्रहणात्मक लेख लिहायचा, असे त्यांचे स्वरूप होते. यावेळी या सदरातून लिहिलेल्या पंचवीस लेखांचा एकत्रित संग्रह ‘कविता स्मरणातल्या’ या पुस्तकाद्वारे वाचकांसमोर आला आहे. या संग्रहात रविकिरण मंडळातील कवि आणि त्यानंतरचे अनिल, कुसुमाग्रज आदि कवींच्या कविताचा या संग्रहात समावेश आहे. कवि अनिल, ग. द. माडगूळकर, कवि यशवंत, लक्ष्मीबाई टिळक, माधव ज्युलियन इत्यादी कवींच्या शांताबाईना आवडलेल्या कविता आणि त्या कवितांवरील मर्मग्राही विवेचन असा हो सुंदर काव्यप्रवास आहे. शांताबार्इंनी कवितेच्या रसग्रहणाबरोबरच त्या कवीचे व्यक्तित्वही स्पष्ट करण्यावर प्रयत्न केला असल्याने, वाचकांना कवितेचा आस्वाद घेणे अधिकच सुलभ जाते. -सिद्धार्थ केळकर ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RAZOR SHARP
RAZOR SHARP by ASHWIN SANGHI Rating Star
सुनील माने, पुणे

लेखक अश्विन सांघी “द रोझाबल लाइन” या पहिल्याच कादंबरीने खूप लोकप्रिय झाला. प्राचीन भारतीय दंतकथा/ऐतिहासिक संदर्भ घेऊन त्याच्याभोवती आजच्या काळात रहस्यपूर्ण कथा लिहिणारा अश्विन. Chanakya’s Chant, The Krishna Key, The Sialkot Saga, Keepers of the Kalacakra, The Vault of Vishnu, The Magicians of Mazda अशा एकापेक्षा एक सुंदर रहस्य कादंबर्या “भारत सिरीज़” नावाने खूप प्रसिद्ध झाल्या. या सर्व कादंबऱ्या मी इंग्लिश मधेच वाचल्या. यांचा मराठी अनुवाद मेहता पब्लिशिंग हाउस यांच्याकडे उपलब्ध आहे. अश्विन सांघीने या भारत सिरीज शिवाय एक नवीन थ्रिल्लर सिरीज (कुत्ता कदम) सुरू केली आहे. त्यांतील पहिली कादंबरी Razor Sharp. एक सिरियल किलर मुंबईत एकानंतर एक खून पाडतोय. पोलिस चक्रावले आहेत. 1. रविवार दि २ फेब्रुवारी , गोरेगाव पश्चिममधे रवि मेहराचा खून होतो. त्याची बायको खुशी कॅाल सेंटरचा जॅाब करून रात्री ११.३० ला परत येते. खूप वेळा बेल वाजवून दार न उघडल्यामुळे ती उघडून आत येते तर रवि रक्ताच्या थारोळ्यात मरून पडलेला असतो. त्याचे हात पाठीमागे नायलॅान दोरीने बांधलेले असतात. त्याच्या छातीत सुरा खुपसलेला असतो. त्याच्या तोंडात काहीतरी खाद्य पदार्थ असतो. 2. सोमवार दि १० फेब्रुवारी , लोअर परळमधे सुचंद्रा अग्रवालचा खून. तिची कामवाली आल्यावर दार न उघडल्यामुळे सोसायटीवाले दार तोडतात. आत सुचंद्राचा खून झालेला. हात नायलॅान दोरीने मागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात काहीतरी खाद्यपदार्थ. पोलिस चक्रावलेले. मग पोलिसखाते जागे होते. त्यांचा नावाजलेला अधिकारी जो सस्पेंड झालेला आहे, त्या प्रकाश कदम, DCP याला बोलावले जाते. राज्याचे गृहमंत्री ओंकार लोखंडे, त्यांचा माणूस कमिशनर चव्हाण आणि उपगृहमंत्री जयंत गायकवाड व त्यांचा माणूस SCP राणे, मुंबईचा डॅान भाऊ पाटील जो लोखंडेचाच माणूस असतो, हे सर्व या केसच्या मागावर लागतात. कदम हा राणेंच्या ओळखीचा खास ऑफिसर असतो म्हणून त्यालाही इन्व्हेस्टीगेशनला बोलावले जाते. 3. मंगळवार दि १८ फेब्रुवारी , ठाणे येथे मंगला शहाचा खून. तिच्या शेजारणीमुळे हे कळते. मंगलाचे हात नायलॅान दोरीने पाठीमागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात खाद्यपदार्थ. पोलिस अधिकारी शिंदे कदमबरोबर येतात. मंगलाच्या चेहऱ्याजवळ कदमला पेस्टिसाईडचा वास येतो. चेहरा निळसर झालेला. खून झाल्यावर बॅाडीला हलवलेले दिसते. तो ऑफिसमध्ये जुन्या खूनांचे फोटो तपासतो. त्यांचीही बॅाडी खून केल्यावर हलवलेली दिसते. चेहऱ्यावर निळसर झाक दिसते. तिन्ही खून “फिनेक” ब्रॅंडच्या चाकूने केलेले असतात. हे समान धागे कदम त्याची मुलगी केतुल बरोबर चर्चा करतो. केतुलची आई काही वर्षांपूर्वी कदमला सोडून गेलेली असते. ती भाऊ पाटीलची सावत्र बहीण असते. पण सध्या ती कुठे आहे व काय करते हे माहित नसते. केतुल कोर्टात काम करत असते तसेच ती “शक्ती” या NGO मधेही काम करते. शक्ती हे सोनापूरमधुन सुटका केलेल्या वेश्यांचे पुनर्वसन करत असते. निर्मल नावाचा तिचा मित्र एथिकल हॅकर असतो. तिच्यावर प्रेम करत असतो. कदमला हार्ट अटॅक येऊन गेलेला व स्टेंट बसवलेला असतो. Depression मुळे त्याची सायकॅालॅाजिस्टकडे ट्रिटमेंट चालू असते. कदमला या तिन्ही केसमधे आणखी एक धागा सापडतो. हे खून आठ दिवसांच्या अंतरावर झालेले असतात. म्हणजे पुढचा खून बुधवारी होणार असल्याचे तो राणे व शिंदेला सांगतो. 4. बुधवार दि २६ फेब्रुवारी, कांदिवली पश्चिम, लक्ष्मी बुधीराजाचा खून. तोच पॅटर्न. 5. गुरुवार दि ५ मार्च, खार पश्चिम, गुरुराज अदवानीचा खून सेम पॅटर्न. गुरूराज हा युट्युबवरचा प्रसिद्ध सिंगर असतो. 6. शुक्रवार दि १३ मार्च, ताडदेव, दिव्या शुक्रपाणीवर खूनी हल्ला होतो. पण ती जबर जखमी होते. ती फिटनेस ट्रेनर असल्यामुळे खुन्याबरोबर झटापट करते. पण चाकू पोटात घुसल्यामुळे ती जबर जखमी होते. हात बांधलेले असतानाही ती फोनवर “सिरी” ला तिच्या भावाला, ध्रुवला फोन लावायला सांगते. फोन लागतो व ती “हेल्प हेल्प” एव्हढेच बोलून बेशुद्ध होते. म्हणून खुनी पळून जातो. ध्रुव तिथे पोहोचून तिला हॅास्पिटलमधे ॲडमिट करतो. पोलिसांना तिथे खुन्याची बॅग सापडते. त्यांत नायलॅानची दोरी, बेगॅान स्प्रे व राजमाच्या बिया सापडतात. तिसऱ्या खुनाआधी पोलिस संशयित म्हणून राजू दाभाडेला अटक करतात. पण चौथ्या खूनाच्या वेळेस तो कस्टडीतच असतो. मग खूनी कोण? 7. शनिवार दि २१ मार्च, बान्द्रा पश्चिम, शनिया डिसौजाचा खून होतो. सेम मोडस ऑपरेंडी . 8. शनिवार दि २८ मार्च, चेंबूर, ७१ वर्षांच्या राहुल सिंह नावाच्या सिख व्यक्तिचा खून होतो. तीच पध्दत. यानंतर एक दिवस कदम KBC बघत असताना अमिताभ बच्चन एका सिनेमाचं गाणं लावून त्याचा पिक्चर ओळखायला सांगतात. ते गाणं असते- “सोमवार को हम मिले मंगलवार को नयन बुध को मेरी निंद खुली जुम्मेरात को चैन अरे शुक्र शनी कटे मुश्किलसे आज है इतवार सात दिनों में हो गया जैसे सात जनम का प्यार” आणि कदमच्या डोक्यात एकदम प्रकाश पडतो… अरे, हे सर्व खून असेच रविवार ते शनिवार एक एका वारी घडलेत! पण शनिवारी दोन खून कसे? याच्या मागे काही खगोलशास्त्र किंवा भविष्याचा तर संबंध नाही? कदमला आठवतं की शेजारी राहणारा डॉ. देसाईला पण भविष्य-खगोलशास्त्राची आवड व माहिती आहे. ( डॅाक्टर कडे सापडलेल्या नायलॅानचे रंगीत दोर व फिनेक कंपनीचा चाकू यामुळे एक संशयित म्हणून कदमने त्याला अटक करून पुछताछ केलेली असते) कदम लगेच डॅाक्टरांकडे जातो. त्यांची माफी मागून त्यांना या प्रश्नांत मदत करायला सांगतो. तो या सर्व खुनांचा सिक्वेन्स सांगतो. ते प्रत्येक वारी का घडले? मग शनिवारी दोन का? यापुढे कोणता वार? कुणाचा खून? डॅाक्टर सांगतात की भारतीय भविष्य व खगोल शास्त्रात नवग्रहांना खूप महत्व आहे. रवि, सोम(चंद्र), मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनि, राहू आणि केतु. यांचे रंग व धान्य वेगवेगळे असतात. त्या त्या ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी ते वापरले जातात. कदम ही माहिती लिहून घेतो. त्यावरून प्रत्येक खुनात वापरण्यात आलेले फिनेक कंपनीचे चाकू, वेगवेगळ्या रंगांचे नायलॅान दोर व तोंडातील पदार्थ यांचा संबंध जोडून एक तख्ता तयार करतोः- “रवि मेहरा-रविवार-सोनेरी दोर- तोंडात गहू-दिशा पूर्व सुचंद्रा-सोमवार-चंदेरी दोर-तोंडात तांदूळ-दिशा पश्चिम मंगला शाह-मंगळवार-लाल दोर-तोंडात तूर डाळ- दिशा दक्षिण लक्ष्मी बुधीराजा-बुधवार-हिरवा दोर-तोंडात हिरवे मूग-दिशा उत्तर गुरुराज अदवानी-गुरूवार-पिवळा दोर-तोंडात हरबरा डाळ-दिशा उत्तर पूर्व(ईशान्य) दिव्या शुक्रपाणी-शुक्रवार-पांढरा दोर-राजमा-दिशा दक्षिण पूर्व शनिया डिसौजा-शनिवार-काळा दोर-तोंडात काळे तिळ-दिशा उत्तर पश्चिम राहुल सिंग-शनिवार-निळा दोर-तोंडात उडीद दाळ-दिशा दक्षिण पश्चिम” आता उरला एकच ग्रह-केतु. केतुचा वार मंगळवार. ग्रे रंग, चना दाळ, दिशा दक्षिण पश्चिम. “केतु”म्हणजे कदमची मुलगी केतुलचा नंबर लागणार? आज तर मंगळवारच आहे! कदम घाबरून जातो! तो केतुलला फोन करतो पण तो बंद लागतो. ती सध्या कुठे आहे? कोर्टात? कदम आपल्या मुलीला वाचवतो का? खरा खुनी कोण असतो? तो पकडला जातो का? त्याचे यामागचा उद्देश काय असतो? याच्यामध्ये अजून कोण सामिल असतं का? याची उत्तरे मिळण्यासाठी वाचावी लागेल अश्विन सांघी यांची कादंबरी Razor Sharp. ...Read more

BANGARWADI
BANGARWADI by VYANKATESH MADGULKAR Rating Star
Sameer Kazi

सुंदर अशी कादंबरी माणदेशी बनगरवाडी तशी कोरडी रखरखती पण, यातील पात्रात मायेचा करुणेचाओलावा मनात घर करुन जातो