* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: PASANG
  • Availability : Available
  • ISBN : 9788177667356
  • Edition : 3
  • Publishing Year : AUGUST 1995
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 168
  • Language : MARATHI
  • Category : ESSAYS
  • Available in Combos :DAYA PAWAR COMBO SET - 6 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
WHAT IS MEAN BY PASANG ? `PAASANG` IN MARATHI HAS A DEFINITE MEANING. IT IS ACTUALLY THE SMALL WEIGHT WHICH BALANCES BETWEEN THE TWO SIDES OF A WEIGHING SCALE. GENERALLY, IT IS USED TO SHOW THE MINUTENESS OF A THING. I WAS INVOLVED IN AMBEDKAR MOVEMENT SINCE MY YOUNG AGE. I HAVE COME ACROSS THIS WORD DURING THAT PERIOD SAYING THAT, THE MOVEMENT OF DALIT`S IS VERY WEAK AND THE PLACE THEY HAVE IN POLITICS IS JUST NEGLIGIBLE, IT IS JUST EQUIVALENT TO `PAASANG`. THIS CLEARLY REVEALS THAT DALITS` EXISTENCE IS JUST TO BALANCE THE TWO SIDES OF THE WEIGHING SCALE. DR. BABASAHEB AMBEDKAR BELIEVED THAT POLITICALLY THE PRESENCE OF DALIT WILL BALANCE THE SOCIETY. THROUGH THIS BOOK I AM TRYING TO FIND OUT THE IGNORED INCIDENTS OR PERSONS OF THIS SOCIETY. SOME OF THEM HAVE SUPPORTED THE DALITS FOR SURE, BUT AT THE SAME TIME IT IS A FACT THAT SOME OF THEM HAVE PRESSURIZED THE MOVEMENTS OF DALIT, HAVE ATTACKED THEM VIGOROUSLY.
पासंग म्हणजे काय? `पासंगालाही काही पुरात नाही` या अर्थाची म्हण मराठीत आहे. `क्षुल्लक` या अर्थाने ती वापरली जाते. तराजूच्या दांड्याला, दोन तागडी समतोल राहावीत, म्हणून छोटेसे जे वजन लावले जाते, ते `पासंग`. आंबेडकरी चळवळीत कळू लागल्यापासून एकात आलो आहे, की दलितांचे राजकारण हे पासंगाचे राजकारण आहे. याचा अर्थच असा, की समाज समतोल ठेवायचा असेल, तर दलितांनी पासंगासारखे राहावयास हवे. समाजाचे एकारलेपण दलितांमुळेच समतोल होऊ शकते, हा बाबासाहेब आंबेडकरांचा राजकीय विचार होता. अनेक `पासंगात` जातिधर्मनिरपेक्ष अशा अनेक घटना आणि व्यक्तिरेखा आलेल्या आहेत. केवळ दलितांचे, त्यांच्या चळवळीचे उदात्तीकरण केले नाही, तर त्यांच्यावर त्यांच्या चळवळीवर कठोर आघातही केले आहेत. समाजाच्या सर्व थरांत ज्या घटना किंवा व्यक्ती `फूटनोट` म्हणून आजवर दुर्लक्षित ठेवण्यात आल्या, त्यांचा शोध घेण्याचा हा अल्पसा प्रयत्न.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#PASANG #DAYA PAWAR #DEHAVARCHA KALANK #DALITATVA HE BHUSHANAVAH AHE KAY? #BAI MI DHARAN BANDHITE #TISARYA PIDHICHI CHINTA #BHAKARIBABROBAR PEND KHA #KAMAGAR ZALA GATAI KAMAGAR #JIHAD MHNAJE DHARMAYUDHA NAVHE #DHAVALYASHEJARI PAVALA #EKLAVYACHA ANGATHA #BALBHARTICHA BEERCHA DHADA #TUMBDIBHAR DANA BAJIRAO NANA #TAMRAPAT #RAGHAVVEL #JAT NAHI TI JAT #KULHAD SANSKRUTI #NAMANTAR YERE MAZYA MAGALYA #पासंग #दया पवार #देहावरचा कलंक #दलितत्व हे भूषणावह आहे काय? #बाई मी धरण बांधते #तिसर्या पिढीची चिंता #भाकरीबरोबर पेंड खा #कामगार झाला गटई कामगार #जिहाद म्हणजे धर्मयुद्ध नव्हे #ढवळ्याशेजारी पवळ्या #एकलव्याचा अंगठा #बालभारतीचा बिअरचा धडा #तुबंडीभर दाना बाजीराव नाना #ताम्रपट #राघववेळ #जात नाही ती जात #कुल्हड संस्कृती #नामांतर येरे माझ्या मागल्या
Customer Reviews
  • Rating StarSAPTAHIK SAKAL 03-08-1995

    मराठी साहित्यात ‘बलुतं’ या आत्मकथनाने एक वादळ निर्माण झाले आणि आपला वेगळा असा ठसा त्याचे लेखक दया पवार यांनी निर्माण केला. त्यानंतर मग उचल्या, उपरा आक्करमाशी इत्यादी आत्मकथनाची लाट आली. ‘बलुतं’ या पुस्तकानंतर दलित कवितेत दया पवारांचा ‘कोंडवाडा’ या सं्रहाची भर पडली. अशा या साहित्यिकाचे ‘पासंग’ नावाचे पुस्त्क मेहता पब्लिशिंगने नुकतेच प्रकाशित केले. यापूर्वी ‘लोकसत्ता’ या दैनिकात ‘पासंग’ पुस्तक क्रमश: स्तंभास्तंभाने प्रकाशित झाले आहे. ‘पासंग’ या शब्दाचा अर्थ प्रस्तावनेत श्री. पवार यांनी अत्यंत मार्मिकपणे सांगितला आहे. ‘पासंग’ म्हणजे ‘क्षुल्लक गोष्ट’ तराजूच्या दांड्याला दोन तागडी समतोल राहावा म्हणून छोटेसे पासंग. याचा अर्थ कोणत्याही क्षेत्रात काही क्षुल्लक गोष्टी बरेच मोठे काम करून जातात. अशा गोष्टींविषयी लेखकाने या पुस्तकात छोटे छोटे लेख समाविष्ट केले आहेत. ‘बलुतं’ आत्मकथन लिहिल्यामुळे दलितांतील एक गट लेखकावर नाराज झाला होता. पण त्यांच्याच ‘पासंग’ या पुस्तकातील लेख वाचून ते नक्कच शांत होतील, असा विश्वास लेखकाला वाटतो. ‘जात नाही ती जात’ या स्तंभात वाचकाला अंतर्मुख करणारे विचार व्यक्त केले आहेत. ‘संस्कार’ या शब्दाबाबत लेखकाने मेहतांचं उदाहरणही समर्पक असेच दिले आहे. फार पुराणकाळापासून दहशतवादाचा राक्षस थैमान घालतो आहे. त्यावरही लेखकाने प्रकाश टाकला आहे. कथनी आणि करणी या लेखात साहित्यिक प्रचार माध्यमांपासून दूर राहण्याचा कसा प्रयत्न करतो याचे वर्णन आहे. काही व्यक्ती कष्ट करून मोठ्या पदापर्यंत पोहोचतात. अशांची छोटी व्यक्तिचित्रेही लेखकाने सुंदर रंगवली आहेत. ‘जो आला तो नडला’ या लेखात अनसुया शेवते ही हालअपेष्टा सहन करून नोकरी करते. पती निधनानंतर एकटी नोकरी करते पण तिला फारच त्रास होतो. तिच्याच या जीवनाबद्दल लेखकाने फारच सुंदर लिहिले आहे. लेखकाची समाजाकडे पाहण्याची चिकित्सक दृष्टी पुस्तकाच्या पानापानात दिसून येते. पासंगातील या लेखामध्ये जातिधर्म निरपेक्ष अशा अनेक घटना व व्यक्तिरेखा आलेल्या आहेत. अगदी मोजक्या शब्दात उपेक्षित गरीब समाजाबद्दलची माहिती विचार करायला लावणारी आहे. मोहन रणसिंग, पप्पू जाधव, रमेश शिंदे, कोल्हटकर या व इतर विविध क्षेत्रातील लोकांबद्दल मार्मिक पासंगालाही काही पुरत नाही. साहित्यात एका चांगल्या पुस्तकाची भर पडली आहे. असे म्हणवेसे वाटते. -विलास पगारे ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

राधेय.... लेखक रणजित देसाई... मित्र कसा असावा...कर्णासारखा दातृत्व कसं असावं...कर्णासारखं असा हा कर्ण... त्याला अंगराज म्हणावं, दान देणारा दाता म्हणावं, राधेय म्हणावं कि कौतेय... काहीही म्हणा पण कर्णासारखा दाता कर्णानंतर कधी झाला नाही आणि कधी होणरही नाही... रणजित देसाई लिखीत कर्णचरीत्र राधेय आज हातावेगळं झालं ते अश्रुभरल्या नयनांनी...ज्याचा अंत करायला स्वतः देवाधिदेव कृष्णाला अर्जुनाचं सारथ्य करावं लागलं यातच अंगराज कर्णांचं विरत्व अधोरेखीत होत आहे. जन्मापासुन ज्याला केवळ सुतपुत्र म्हणुन वागणुक मिळाली असा तो कर्ण स्वतःच्या बळावर इतका महान लढवय्या बनला. पुस्तकाच्या प्रास्ताविकात देसाईंनी म्हटलं आहे की राधेय मधला कर्ण महाभारतात शोधायची गरज नाही. प्रत्येकाच्या मनातच तो दडलेला असतो, कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत, तर त्यात हा कर्ण दिसेल. त्याचं दु:खं, पोरकेपण आणि त्यातून पार होवून एक अनोखी ऊंची गाठणारं त्याचं दातृत्व, व्यक्तित्व याचं एक भव्य, शोकात्म चित्र राधेय मधून उभं राहतं. राधेय या कादंबरीत रणजित देसाईंच्या शब्दांनी कर्णाची अनेक रुपे अनुभवता आली. त्यामध्ये राधाई आणि वृषाली सोबतचा कर्ण, दुर्यौधनासोबतचा कर्ण, कृष्णासोबतचा कर्ण, रणांगणावरचा कर्ण आणि नदीकाठी पाठमोरा ऊभा राहत दान करत असलेला कर्ण अशा अनेक रुपांनी प्रत्येकवेळी वेगळा भासला. वृषसेन आणि चक्रधराच्या मृत्युने हळवा झालेला कर्णही वाचकाच्या डोळ्यातही पाणी आणवतो... समोर मृत्यु दिसत असताना सुध्दा केवळ दिलेल्या वचनामुळे हातातील धनुष्याचा त्याग करुन शस्त्रहिन हेणारा कर्ण रणजित देसाईंच्या शब्दांमुळे आजन्म लक्षात राहील. कर्णासारखं होणं कुणालाही कदापि शक्य नाही पण त्यातला एखादा जरी चांगला गुण अंगी बाळगण्याचा प्रयत्न प्रत्येकाने नक्कीच केला पाहीजे... प्रत्येकाच्या संग्रही असावं आणि एकदा तरी वाचावं असं पुस्तक रणजित देसाई लिखीत...राधेय... © विश्वजित शिंत्रे. ...Read more

BAJIND
BAJIND by PAHILWAN GANESH MANUGADE Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

काही पुस्तकं अशी असतात कि कितीही वेळा वाचली तरीही त्या पुस्तकाचा कंटाळा येत नाही. पुन्हा पुन्हा वाचावं असं वाटतं आणि त्याची पारायणं होतचं राहतात. असचं एक पुस्तक म्हणजे *पै.गणेश मानुगडे* लिखीत *बाजिंद.* *बाजिंद* हे एक असं रसायन आहे जे प्रत्ेकाला अक्षरशः वेड लावतं. साधारण चार पाच वर्षांपुर्वी पहील्यांदा वाचलं होतं, त्यानंतर बर्‍याचवेळा आणि आज पुन्हा एकदा. त्याबद्दलची एक सुंदर आठवण म्हणजे माझ्या बहिणीच्या गरोदरपणाच्या दिवसात ग्रहण लागलं होतं आणि त्या ग्रहणकाळात तिला मी *बाजिंद* वाचुन दाखवलं होतं, असं हे पुस्तक. कुस्ती, प्रेमकथा, हेरगिरी, गुढ रहस्यमय बाजिंदचं जंगल, पशु-पक्षी व हिंस्र जनावरांची भाषा, बहीर्जी नाईक आणि अवघ्या हिंदुस्थानाचे आणि मराठी मनाचे आराध्यदैवत *श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज* असा या पुस्तकाचा प्रवास. शेवटाला अंगावर काटा आला कि समजावं आपण या पुस्तकाच्या प्रेमात पडलोय. रायगडच्या डोंगरदरीत वसलेल्या धनगरवाडीचा सखाराम धनगर आणि त्याच्यासोबत मल्हारी, सर्जा आणि नारायण निघालेत छत्रपती शिवरायांना भेटायला. कारण टकमक टोकावरुन ज्या गद्दारांचा कडेलोट व्हायचा ती प्रेतं येऊन पडायची ती थेट धनगरवाडीच्या आसपासच्या जंगलात आणि त्यामुळे आसपासच्या परीसरात जंगली जनावरांचा सुळसुळाट खुप वाढला होता. त्यांची मेजवानी व्हायची पण जर कधी कडेलोट नसायचा तेव्हा ती हिंस्त्र जनावरं आसपासच्या लोकवस्तीत शिरायची. हिच कैफियत मांडायला सखाराम धनगर आणि इतर मंडळी रायगडी निघतात. त्यानंतरचा त्यांचा प्रवास आणि कथा वाचकाला इतकी गुरफटवुन टाकते कि शेवटच्या पानावरची शेवटची ओळ कधी वाचुन संपते, कळतही नाही. त्यांची स्वराज्यहेर खंडोजीची भेट मग सावित्री, वस्तादकाका, वाचतानाही भितीदायक दिसणारं जंगल, कधीही न पाहीलेलं महादेवाचं मंदीर, खंडोजीचा असणारा ट्विस्ट आणि मग बहिर्जी नाईक आणि मग थेट रायगड आणि महाराज, सगळं प्रत्यक्षात आपल्यासमोर घडतयं कि असा भास निर्माण करणारं असं हे पुस्तक. एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी कथा, एकदा वाचली कि पुन्हा एकदा वाचण्याचा मोह आवरता येत नाही अशी कथा, ज्यामध्ये असं बरचं काही जे वाचल्याशिवाय कळणार नाही. अजुन एक असं कि सातासमुद्रापार जगातील अव्वल गणली जाणारी इस्त्राईलची गुप्तहेर संघटना मोसाद यांच्या अभ्यासक्रमात बहिर्जी नाईक आणि आपलं हेरखातं शिकवलं जातं अशी अभिमान वाटणारी घटना आपल्या राज्यात घडलीय त्याचीच हि गोष्ट...बाजिंद... ...इकडे खंडोजीने सावित्रीला उचलुन जंगलातुन बरेच बाहेर आणले होते. पुढे डोंगराची कडेतुट होती आणि हजारो हात खोल फेसाळणार्‍या नदीचे विशाल पात्र...खंडोजीने एकदा मागे पाहीले आणि ताडले कि शिर्क्यांची फौज पाठलाग करत आहे...त्याने कशाचाही विचार न करता सावित्रीसह स्वतःला त्या कडेतुट वरुन त्या विशाल नदीच्या पात्रात झोकुन दिले...आणि... त्यासाठी वाचा *पै.गणेश मानुगडे* लिखीत...*बाजिंद..!!!* © विश्वजीत श्रीपती शिंत्रे. मु.पो.इंचनाळ, ता.गडहिंग्लज,जि.कोल्हापुर ०९९२२३१३९१९ ...Read more