* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788177667356
  • Edition : 3
  • Publishing Year : AUGUST 1995
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 168
  • Language : MARATHI
  • Category : ESSAYS
  • Available in Combos :DAYA PAWAR COMBO SET - 6 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
WHAT IS MEAN BY PASANG ? `PAASANG` IN MARATHI HAS A DEFINITE MEANING. IT IS ACTUALLY THE SMALL WEIGHT WHICH BALANCES BETWEEN THE TWO SIDES OF A WEIGHING SCALE. GENERALLY, IT IS USED TO SHOW THE MINUTENESS OF A THING. I WAS INVOLVED IN AMBEDKAR MOVEMENT SINCE MY YOUNG AGE. I HAVE COME ACROSS THIS WORD DURING THAT PERIOD SAYING THAT, THE MOVEMENT OF DALIT`S IS VERY WEAK AND THE PLACE THEY HAVE IN POLITICS IS JUST NEGLIGIBLE, IT IS JUST EQUIVALENT TO `PAASANG`. THIS CLEARLY REVEALS THAT DALITS` EXISTENCE IS JUST TO BALANCE THE TWO SIDES OF THE WEIGHING SCALE. DR. BABASAHEB AMBEDKAR BELIEVED THAT POLITICALLY THE PRESENCE OF DALIT WILL BALANCE THE SOCIETY. THROUGH THIS BOOK I AM TRYING TO FIND OUT THE IGNORED INCIDENTS OR PERSONS OF THIS SOCIETY. SOME OF THEM HAVE SUPPORTED THE DALITS FOR SURE, BUT AT THE SAME TIME IT IS A FACT THAT SOME OF THEM HAVE PRESSURIZED THE MOVEMENTS OF DALIT, HAVE ATTACKED THEM VIGOROUSLY.
पासंग म्हणजे काय? `पासंगालाही काही पुरात नाही` या अर्थाची म्हण मराठीत आहे. `क्षुल्लक` या अर्थाने ती वापरली जाते. तराजूच्या दांड्याला, दोन तागडी समतोल राहावीत, म्हणून छोटेसे जे वजन लावले जाते, ते `पासंग`. आंबेडकरी चळवळीत कळू लागल्यापासून एकात आलो आहे, की दलितांचे राजकारण हे पासंगाचे राजकारण आहे. याचा अर्थच असा, की समाज समतोल ठेवायचा असेल, तर दलितांनी पासंगासारखे राहावयास हवे. समाजाचे एकारलेपण दलितांमुळेच समतोल होऊ शकते, हा बाबासाहेब आंबेडकरांचा राजकीय विचार होता. अनेक `पासंगात` जातिधर्मनिरपेक्ष अशा अनेक घटना आणि व्यक्तिरेखा आलेल्या आहेत. केवळ दलितांचे, त्यांच्या चळवळीचे उदात्तीकरण केले नाही, तर त्यांच्यावर त्यांच्या चळवळीवर कठोर आघातही केले आहेत. समाजाच्या सर्व थरांत ज्या घटना किंवा व्यक्ती `फूटनोट` म्हणून आजवर दुर्लक्षित ठेवण्यात आल्या, त्यांचा शोध घेण्याचा हा अल्पसा प्रयत्न.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#PASANG #DAYA PAWAR #DEHAVARCHA KALANK #DALITATVA HE BHUSHANAVAH AHE KAY? #BAI MI DHARAN BANDHITE #TISARYA PIDHICHI CHINTA #BHAKARIBABROBAR PEND KHA #KAMAGAR ZALA GATAI KAMAGAR #JIHAD MHNAJE DHARMAYUDHA NAVHE #DHAVALYASHEJARI PAVALA #EKLAVYACHA ANGATHA #BALBHARTICHA BEERCHA DHADA #TUMBDIBHAR DANA BAJIRAO NANA #TAMRAPAT #RAGHAVVEL #JAT NAHI TI JAT #KULHAD SANSKRUTI #NAMANTAR YERE MAZYA MAGALYA #पासंग #दया पवार #देहावरचा कलंक #दलितत्व हे भूषणावह आहे काय? #बाई मी धरण बांधते #तिसर्या पिढीची चिंता #भाकरीबरोबर पेंड खा #कामगार झाला गटई कामगार #जिहाद म्हणजे धर्मयुद्ध नव्हे #ढवळ्याशेजारी पवळ्या #एकलव्याचा अंगठा #बालभारतीचा बिअरचा धडा #तुबंडीभर दाना बाजीराव नाना #ताम्रपट #राघववेळ #जात नाही ती जात #कुल्हड संस्कृती #नामांतर येरे माझ्या मागल्या
Customer Reviews
  • Rating StarSAPTAHIK SAKAL 03-08-1995

    मराठी साहित्यात ‘बलुतं’ या आत्मकथनाने एक वादळ निर्माण झाले आणि आपला वेगळा असा ठसा त्याचे लेखक दया पवार यांनी निर्माण केला. त्यानंतर मग उचल्या, उपरा आक्करमाशी इत्यादी आत्मकथनाची लाट आली. ‘बलुतं’ या पुस्तकानंतर दलित कवितेत दया पवारांचा ‘कोंडवाडा’ या सं्रहाची भर पडली. अशा या साहित्यिकाचे ‘पासंग’ नावाचे पुस्त्क मेहता पब्लिशिंगने नुकतेच प्रकाशित केले. यापूर्वी ‘लोकसत्ता’ या दैनिकात ‘पासंग’ पुस्तक क्रमश: स्तंभास्तंभाने प्रकाशित झाले आहे. ‘पासंग’ या शब्दाचा अर्थ प्रस्तावनेत श्री. पवार यांनी अत्यंत मार्मिकपणे सांगितला आहे. ‘पासंग’ म्हणजे ‘क्षुल्लक गोष्ट’ तराजूच्या दांड्याला दोन तागडी समतोल राहावा म्हणून छोटेसे पासंग. याचा अर्थ कोणत्याही क्षेत्रात काही क्षुल्लक गोष्टी बरेच मोठे काम करून जातात. अशा गोष्टींविषयी लेखकाने या पुस्तकात छोटे छोटे लेख समाविष्ट केले आहेत. ‘बलुतं’ आत्मकथन लिहिल्यामुळे दलितांतील एक गट लेखकावर नाराज झाला होता. पण त्यांच्याच ‘पासंग’ या पुस्तकातील लेख वाचून ते नक्कच शांत होतील, असा विश्वास लेखकाला वाटतो. ‘जात नाही ती जात’ या स्तंभात वाचकाला अंतर्मुख करणारे विचार व्यक्त केले आहेत. ‘संस्कार’ या शब्दाबाबत लेखकाने मेहतांचं उदाहरणही समर्पक असेच दिले आहे. फार पुराणकाळापासून दहशतवादाचा राक्षस थैमान घालतो आहे. त्यावरही लेखकाने प्रकाश टाकला आहे. कथनी आणि करणी या लेखात साहित्यिक प्रचार माध्यमांपासून दूर राहण्याचा कसा प्रयत्न करतो याचे वर्णन आहे. काही व्यक्ती कष्ट करून मोठ्या पदापर्यंत पोहोचतात. अशांची छोटी व्यक्तिचित्रेही लेखकाने सुंदर रंगवली आहेत. ‘जो आला तो नडला’ या लेखात अनसुया शेवते ही हालअपेष्टा सहन करून नोकरी करते. पती निधनानंतर एकटी नोकरी करते पण तिला फारच त्रास होतो. तिच्याच या जीवनाबद्दल लेखकाने फारच सुंदर लिहिले आहे. लेखकाची समाजाकडे पाहण्याची चिकित्सक दृष्टी पुस्तकाच्या पानापानात दिसून येते. पासंगातील या लेखामध्ये जातिधर्म निरपेक्ष अशा अनेक घटना व व्यक्तिरेखा आलेल्या आहेत. अगदी मोजक्या शब्दात उपेक्षित गरीब समाजाबद्दलची माहिती विचार करायला लावणारी आहे. मोहन रणसिंग, पप्पू जाधव, रमेश शिंदे, कोल्हटकर या व इतर विविध क्षेत्रातील लोकांबद्दल मार्मिक पासंगालाही काही पुरत नाही. साहित्यात एका चांगल्या पुस्तकाची भर पडली आहे. असे म्हणवेसे वाटते. -विलास पगारे ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
डॉ. जयंत वडतकर.अमरावती

मेळघाटचा एन्सायक्लोपिडीया असलेले निवृत्त वनाधिकारी श्री. रविंद्र वानखडे यांच्या अनुभवांवर आधारित कुलामामाच्या देशात हे पुस्तक वाचले तेव्हापासून या पुस्तकाचे लेखक श्री. जी. बी. देशमुख यांना भेटण्याची इच्छा होती. इच्छाशक्ती असली की योग जुळून येतो असं महणतात. रविंद्र वानखडे सरांच्या माध्यमातूनच तो योग जुळून आला. माझ्या एक पुस्तकाचे प्रकाशन बाबत वानखडे सरांशी चर्चा करीत असताना त्यांनी लेखकाचा संदर्भ दिला व जी.बी. ना भेटून घ्या असे सांगितले. भेट घडून आली. अगदी सहज, घरगुती भेट झाली, गप्पा रंगल्या. यावेळी जी. बी. देशमुख यांनी त्यांचे पहिले पुस्तक महारुद्र मला भेट दिले. आमच्या चर्चेतून आणि आंतरराष्ट्रीय फुटबॉल मथला मराठमोळा झंझावात महारुद्र, हे या पुस्तकाचे शीर्षक वाचून पुस्तकाचा विषय थोडक्यात समजला. लेखकाचे वडील भीमराव देशमुख यांनी फुटबॉलपटू म्हणून गाजविलेल्या कारकीदींचा आढावा या पुस्तकात होता. एका मुलाने आपल्या वडिलांवर लिहिलेले पुस्तक कसे असेल? असा प्रश्न अन पुस्तक, दोन्ही घेऊन घरी आलो. भेट मिळालेले पुस्तक वेळ मिळाला तसे एका बैठकीत वाचून काढले. आता गल्ली गल्लीत जसं क्रिकेट खेळल्या व बघितले जाते तसं स्वातंत्र्य पुर्व काळात वऱ्हाडात फुटबॉल खेळला जात असे. गावागावांत टीम असायच्या, सामने अर्थात स्पर्धा भरवल्या जात असत. स्वातंत्र्यपूर्व काळात अशाच रुपयांमधून चमकत, वऱ्हाडाच्या ग्रामीण भागातील एका खेळाडूने थेट मुंबईतील फुटबॉल क्लब व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मुसंडी मारत आपल्या खेळाचा व व्यक्तीमत्त्वाचा ठसा उमटविला होता. तो काळ होता १९३० ते १९५० चा. त्या वल्लीचे नाव होतं भिमराव देशमुख. जी. बी. देशमुख यांनी त्यांच्या वडिलांवर लिहिलेले महारुद्र पुस्तक काही फक्त भिमराव देशमुख यांची जीवन चरित्र नाही. स्वातंत्र्य मिळण्याच्या साधारण वीस वर्षा पुर्वी ३० ते ५० च्या दशकात आपल्या देशातील खेळाची स्थिती कशी होती. विशेषतः वऱ्हाडाच्या ग्रामीण भागातील स्थिती कशी होती. कुठले खेळ खेळले जात असत. स्पर्धा कशा भरवल्या जात असत. शाळा आणि शिक्षण कसं होतं. आर्थिक स्थिती कशी होती. अमरावती जिल्ह्यातील कोणत्या गावात फुटबॉलच्या नावाजलेल्या टीम होत्या. अमरावती कशी होती याची माहिती सुद्धा या पुस्तकातून वाचायला मिळते. पुस्तकाच्या पहिल्याच प्रकरणात भीमराव यांचे व्यक्तिमत्व कसं होतं हे सांगण्यासाठी लेखकाने बाबा म्हणून जरी त्यांची ओळख करून दिली असली तरी पुढील सर्व प्रकरणातून त्यांनी भीमराव अशा एकेरी उल्लेखातून हे व्यक्तिमत्व साकारले आहे. वऱ्हाडातल्या आपल्या सवयीनुसार प्रसिद्धी पासून दूर राहिलेल्या एका नामवंत फुटबॉलपटूची कारकीर्द व फुटबॉल पश्चात कौटुंबिक कारकीर्द तटस्तपणे मांडण्यात लेखक यशस्वी झाले आहेत हे आधीच सांगून टाकतो. अमरावती जिल्ह्यातील खारतळेगाव येथील फुटबॉलच्या टीम मध्ये भीमराव देशमुख यांची कारकीर्द सुरु झाली. ती १९३० सालापासून त्यावेळी ते जेमतेम विशीत होते. प्रथम शालेय स्पर्धापासून पुढे क्लब स्पर्धा पासून भीमरावने आपल्या खेळाचा ठसा उमटविला हळूहळू ख्याती विदर्भांत पोहोचली, भीमराव यांचा खेळ बघण्यासाठी लोक खास वेळ काढून येऊ लागेल, १९३८-३९ मध्ये विदर्भात झालेल्या काही स्पर्धात मुबंईच्या काही टीम सहभागी झाल्या होत्या, त्यामुळे नावाजलेल्या ब्रिटीश खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळाली. मुंबईच्या इंग्रजांच्या टीमला वऱ्हाडातील भीमराव यांच्या टीमने हरविले. वायएमसिए, मुंबईच्या अलेक्झांडर नावाच्या कप्तानाने भीमरावच्या खेळाने प्रभावित होऊन खारतळेगावच्या चार खेळाडूंना मुंबईच्या टीम कडून खेळण्याचे निमंत्रण दिले. १९४० ला भीमराव सह चार खेळाडू मुंबईत पोहोचले. अलेक्झांडरने त्यांना सराव शिबिरीत घातले. पुढील वर्षात भीमराव वायएमसिए टीम कडून खेळण्यासाठी करारबद्ध झाले. जशा आयपीएल मध्ये आज वेगवेगळ्या टीम खेळतात तसे त्यावेळी मुंबईत फुटबॉलचे क्लब होते. पुढील १० वर्षे अनेक टीम कडून खेळत अनेक स्पर्धा गाजविल्या. भीमराव यांचेवर तेव्हाच्या इंग्रजी वृत्तपत्रांतून रकाने छापले जाऊ लागले. मुंबईतील आपल्या १२ वर्षाच्या कार्यकाळात क्लब स्पर्धामधून त्यांनी ४०० सामने खेळले, तब्बल २५० गोल मारलेत. भीमराव वेगवेगळ्या स्पर्धामधून खेळत मैदान गाजवत होते. त्यातूनच १९४८ च्या ऑलम्पिक स्पर्धेच्या टीम मध्ये निवड झाली मात्र एका सराव सामन्यात पाय फॅक्चर झाल्याने देशाकडून खेळण्याची संधी हुकली. पुढील वर्षात भीमराव हे भारतीय टीम सोबत मलेशिया, कंबोडिया, इंडोनेशिया, म्यानमार, फिलिपिन्स, हाँगकाँग, थायलंड अशा देशात खेळले, या दौऱ्यातील २० पैकी १९ सामने जिंकले. भीमराव आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू झाले होते. इतके खेळून भीमराव यांचेकडे आर्थिक नियोजन नसल्याने परिस्थिती जेमतेमच होती. अशातच १९५१ साली त्यांनी निवृत्ती घेतली. अमरावती मध्ये परत आल्यावर त्यांनी आपला संसार थाटला, आर्थिक पाठबळ नसल्याने फुटकळ व्यवसाय केले. मात्र मी कधीकाळी आंतरराष्ट्रीय खेळाडू होते याचा कधी उल्लेख सुद्धा केला नाही, प्रसिद्धी पासून ते कायमच दूर राहिले. या काळात भीमराव यांच्या पत्नी अंजीरा यांनी जबाबदारीनं संसार सांभाळला. मुलांना मोठे केले. भीमराव शेवटपर्यंत मेहनत करीत राहिले. समाजात चांगले स्थान निर्माण केले. मात्र ते इतके मोठे फुटबॉलपटू होते ते अमरावतीकरांना काही माहिती झाले नाही. भीमराव यांच्या निधनानंतर या आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूचे कार्य पुढील पिढीला माहित व्हावे या उद्देशाने जी. बी. देशमुख यांनी या पुस्तकातून आपल्या तीर्थरुपांचे भावचित्र अगदी सोप्या सरळ भाषेत शब्दबद्ध करून महारुद्र च्या रूपाने वाचकांसमोर ठेवले. या लिखाणासाठी त्यांनी मुंबईत जाऊन त्या काळातील टाईम्स वृत्तपत्रांतील भीमराव यांचा उल्लेख असलेली कात्रणे मिळविली, त्यांच्या समवेत खेळलेल्या खेळाडूंना व पत्रकारांना भेटले, अमरावती मधील त्यांच्या समवयस्क परिचितांकडून त्यांची माहिती गोळा केली. त्यासाठी त्यांनी अथक अशी मेहनत घेतली. व २००५ साली हे पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकाच्या पुढील आवृत्ती मेहता प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केल्याने ते पुस्तक महाराष्ट्रभर पोहोचले. या निमित्त्याने भीमराव यांचे कार्य, त्यांचा फुटबॉल खेळातील झंझावात मराठी माणसाला माहिती झाला. अमरावतीकर या नात्याने मला तर आपल्या मातीतील माणूस त्या काळात आंतरराष्ट्रीय पातळीवर झेंडा गाडून आल्याचा अभिमान वाटला. अशा अनेक अर्थाने महारुद्र महत्वाचे आहे. ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
सलिल तांबे

ज्यांना गोष्टींची आवड आहे अशा मुलांसाठी ही मेजवानी आहेच, पण आपल्या पाल्यांमध्ये संवेदनशीलता आणि निसर्गाप्रती आदर जोपासण्यासाठी मोठ्यांनीही हे पुस्तक वाचायला हवे. प्रदूषणाविरुद्ध लहान हातांनी दिलेला लढा असो किंवा निसर्गाचा खरा आनंद पिशवीत भरून आणण्यापक्षा मनात कसा साठवावा, हे सांगणारा दृष्टिकोन असो; हे पुस्तक प्रत्येक वाचकाला समृद्ध करते. पुस्तकातील प्रत्येक कथा संपताना आपल्याला जगण्याकडे बघण्याची एक नवी दृष्टी देऊन जाते. यातलं काही गूढ, काही थरार आणि खूप सारे हळवे प्रसंग अनुभवण्यासाठी तुम्हाला हे पुस्तक स्वतः वाचायलाच हवं. म्हणूनच, आपल्या संग्रही असावा असा हा `हाटूमुटूचा चंद्र` तुम्ही एकदा नक्की अनुभवा! चला तर मग, आपणही शोधूया आपला स्वतःचा ‘हाटूमुटूचा चंद्र’! ...Read more