* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Notify Me
     
  • ISBN : 9789386454799
  • Edition : 1
  • Publishing Year : MAY 2017
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 120
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
PAIN & SUFFERING IS PART & PARCEL OF LIFE. IT CAN HELP US TO LEARN IMPORTANT LESSONS IN LIFE. DIPTI JOSHI FOCUSES ON SUCH LESSONS IN HER BOOK ‘NISHABDACHE MAUN’. THOUGH THE WORD ‘MAUN’ REPRESENTS SILENCE , THESE STORIES TALKS ABOUT PHILOSOPHY OF LIFE. DIPTI JOSHI EVEN POINTED OUT VARIOUS SOCIAL PROBLEMS WITH HEARTWARMING WORDS.
‘नि:शब्दाचे मौन’ हा माझा कथासंग्रह म्हणजे नात्यांचे पदर उलगडत जाणारा प्रवास. हा प्रवास कधी, कसा सुरू झाला माहीत नाही; जन्मापासूनच तो मनात सुरू होता. मनाच्या जाणिवा जेव्हा सजग झाल्या त्या क्षणी हे प्रकटीकरण झालं. या प्रवासात अनेक थांब्यांवर वेगवेगळी माणसं भेटली, त्यांच्या जीवनातील सुखाच्या क्षणांचा आनंद आणि दु:खाच्या कडेलोटाचे क्षण जणू मीच जगत होते; इतकी मी त्या क्षणांशी समरस झाले. नऊ महिने स्त्रीने आपल्या अपत्याला प्रेमाने सांभाळावे तशी ही कथाबीजं माझ्या मनाच्या गाभाऱ्यात जोपासली आणि प्रत्येक लिखाणानंतर नव-निर्मितीचा, सृजनाचा आनंद मिळाला. ‘नि:शब्दाचे मौन’मधील आई-वडील, भावंडांच्या प्रेमाला आसुसलेला समीर, हट्टी निग्रही, स्वत:च्या तत्त्वांशी तडजोड न करणारी वरून फणसासारखी काटेरी पण आतून गऱ्यासारखी गोड असणारी ‘श्यामची आजी’, नवीन वर्षाचं स्वागत करताना, ‘प्रत्येकाशी आईच्या भूमिकेतून वागायचं.’ असा चारच शब्दांचा पण आचरणात आणायला अत्यंत अवघड असा संकल्प करणारी, हा संकल्प पार पाडताना नायिकेच्या मनावर राग-लोभांनी मिळवलेला ताबा आणि मनाची होणारी घालमेल अशी ‘विश्वामित्राची तपश्चर्या’ किंवा आपल्या स्वप्नातलं आयुष्य आपल्या पेशंटला जगताना पाहून एका प्रथितयश डॉक्टरची होणारी चिडचिड, संताप, डॉक्टर म्हणून कर्तृत्वशाली तरीही अतृप्त प्रवासाचे ‘प्रतिबिंब’! या कथासंग्रहातील प्रत्येक कथा म्हणजे माझं अपत्य, त्यांना सुंदर संस्कार देऊन, तुम्हा वाचकांच्या हाती सोपवताना अतिशय आनंद होत आहे. त्यांच्या सुख-दु:खात तुम्हीही नक्कीच सहभागी व्हाल.

No Records Found
No Records Found
Keywords
NISHABD# MOUN# AAJI# VISHVAMITRA# TAPASHCHARYA# AATHVAN# MORPEES# PUNARJANM# KALAKAR# TERE FULOSE BHI PYAR# VYATHA# PRATIBIMB# UDHVAST# SHIKSHA# NAJAR# KHAREDI# COSTUME DESIGNER# PAREEKSHA
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAKAL 10-12-2017

    दीप्ती जोशी यांनी लिहिलेल्या कथांचा हा संग्रह. वेगवेगळ्या नात्यांचे पदर जोशींनी या पुस्तकात उलगडून दाखवले आहेत. बाह्यविश्वातून अंतर्मनाचे चित्रण करत आणि मनातल्या संघर्षांचे विविध कंगोरे टिपत जाणाऱ्या या कथा. पात्रं आणि त्यांच्यामुळं घडलेल्या घटना-प्रंगांची गुंफण यांतून लेखिका कथाबीजं विकसित करते. ...Read more

  • Rating StarDAINIK SAMANA 12-11-2017

    वेदनेचे विभिन्न पोत... दीप्ती जोशी यांच्या या संग्रहातील काही कथा संकेतस्थळांवर प्रसिद्ध झालेल्या आहेत. तसेच त्यांच्या दर्जेदार कथांना मासिकांच्या व संकेतस्थळांच्या कथा स्पर्धांमधून अव्वल स्थान मिळाले आहे. ‘निःशब्दाचे मौन’ हा कथासंग्रह १४ आशयसंपन्नव वैविध्यपूर्ण कथावस्तू लेवून आपल्या भावविश्वामध्ये अलगद प्रवेश करतो. शिक्षा ही कथा आयुष्यभर कठोर परीक्षा दिल्यानंतर आयुष्याच्या संध्याकाळी सर्व सुखांवर लाथ मारत नवऱ्याला ‘शिक्षा’ देणाऱ्या अनुराधाच्या स्वाभिमानाची कहाणी सांगते. ‘व्यथा त्या दोघींची’ ही भिन्न जीवनशैली असणाऱ्या एक माणसांच्या गोतावळ्यात व जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली दबलेली तर दुसरी वेळ कसा घालवावा व गुजगोष्टी कोणाशी कराव्यात ही व्यथा कुरवळणारी अशी दोन बहिणींचे चित्र रेखाटणारी. खरेदीमध्ये सासरी जबाबदारीने वागणाऱ्या आणि माहेरी येऊन आईकडून लाड पुरवून घेणाऱ्या, एकाच वेळी अल्लड व जबाबदार दोन्ही असणाऱ्या सायलीचा प्रसन्न संचार डोंबिवलीच्या जुन्या दुकानांमधून होताना डोंबिवलीच्या लोकांनाही तिथून सहज फिरवून आणते. आठवणींची मोरपिसं अरुंधतीच्या तरल भावविश्वाचे दर्शन घडवितानाच सहजच तत्त्वज्ञानाच्या दोन ओळी देऊन जातात. ‘तेरे फुलों से भी प्यारी’ मधली श्रेयाच्या नशिबाचा फेरा डोळ्यात टचकन पाणी आणतो. मात्र तिचे मनोव्यापार बरेच काही शिकवून जातात. ‘उदध्वस्त’मधल्या देवदत्ताच्या वेदनेचा आणि ‘निःशब्दाचे मौन’मधल्या समीरच्या वेदनेचा पोत भिन्न आहे. परंतु त्यातून जन्म घेणारी कल्याणकारी वृत्ती मात्र जिथे मनोमन हात जुळावे अशीच आहे. लेखिकेच्या भावविश्वाचे धागे सांस्कृतिक शहर डोंबिवलीशी घट्ट विणलेले आहेत. अनेक कथांमधून तसा उल्लेख आहे. श्यामची आजी मधल्या आजीची व्यक्तिरेखा देवळाच्या गाभाऱ्यात शांतपणे तेवत राहणाऱ्या मंद ज्योतीशी नातं सांगते. विश्चामित्राची धडपड आणि त्या संकल्पाचा व्यवस्थित अन्वय जाणल्यावर दोन मनांचं जोडलं जाणं मनाला भावून जातं. कधी अंतःकरणाचा ठाव घेणाऱ्या, कधी जीवानाचे तत्त्वज्ञान सोपे करून सांगणाऱ्या, मौनाचे गूढ उकलणाऱ्या, गबाळेपणातल्या सौंदर्याची जाण ठेवणाऱ्या आणि नजरेचे भान जपणाऱ्या या कथा सौम्य व रंजक आहेत. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
डॉ. जयंत वडतकर.अमरावती

मेळघाटचा एन्सायक्लोपिडीया असलेले निवृत्त वनाधिकारी श्री. रविंद्र वानखडे यांच्या अनुभवांवर आधारित कुलामामाच्या देशात हे पुस्तक वाचले तेव्हापासून या पुस्तकाचे लेखक श्री. जी. बी. देशमुख यांना भेटण्याची इच्छा होती. इच्छाशक्ती असली की योग जुळून येतो असं महणतात. रविंद्र वानखडे सरांच्या माध्यमातूनच तो योग जुळून आला. माझ्या एक पुस्तकाचे प्रकाशन बाबत वानखडे सरांशी चर्चा करीत असताना त्यांनी लेखकाचा संदर्भ दिला व जी.बी. ना भेटून घ्या असे सांगितले. भेट घडून आली. अगदी सहज, घरगुती भेट झाली, गप्पा रंगल्या. यावेळी जी. बी. देशमुख यांनी त्यांचे पहिले पुस्तक महारुद्र मला भेट दिले. आमच्या चर्चेतून आणि आंतरराष्ट्रीय फुटबॉल मथला मराठमोळा झंझावात महारुद्र, हे या पुस्तकाचे शीर्षक वाचून पुस्तकाचा विषय थोडक्यात समजला. लेखकाचे वडील भीमराव देशमुख यांनी फुटबॉलपटू म्हणून गाजविलेल्या कारकीदींचा आढावा या पुस्तकात होता. एका मुलाने आपल्या वडिलांवर लिहिलेले पुस्तक कसे असेल? असा प्रश्न अन पुस्तक, दोन्ही घेऊन घरी आलो. भेट मिळालेले पुस्तक वेळ मिळाला तसे एका बैठकीत वाचून काढले. आता गल्ली गल्लीत जसं क्रिकेट खेळल्या व बघितले जाते तसं स्वातंत्र्य पुर्व काळात वऱ्हाडात फुटबॉल खेळला जात असे. गावागावांत टीम असायच्या, सामने अर्थात स्पर्धा भरवल्या जात असत. स्वातंत्र्यपूर्व काळात अशाच रुपयांमधून चमकत, वऱ्हाडाच्या ग्रामीण भागातील एका खेळाडूने थेट मुंबईतील फुटबॉल क्लब व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मुसंडी मारत आपल्या खेळाचा व व्यक्तीमत्त्वाचा ठसा उमटविला होता. तो काळ होता १९३० ते १९५० चा. त्या वल्लीचे नाव होतं भिमराव देशमुख. जी. बी. देशमुख यांनी त्यांच्या वडिलांवर लिहिलेले महारुद्र पुस्तक काही फक्त भिमराव देशमुख यांची जीवन चरित्र नाही. स्वातंत्र्य मिळण्याच्या साधारण वीस वर्षा पुर्वी ३० ते ५० च्या दशकात आपल्या देशातील खेळाची स्थिती कशी होती. विशेषतः वऱ्हाडाच्या ग्रामीण भागातील स्थिती कशी होती. कुठले खेळ खेळले जात असत. स्पर्धा कशा भरवल्या जात असत. शाळा आणि शिक्षण कसं होतं. आर्थिक स्थिती कशी होती. अमरावती जिल्ह्यातील कोणत्या गावात फुटबॉलच्या नावाजलेल्या टीम होत्या. अमरावती कशी होती याची माहिती सुद्धा या पुस्तकातून वाचायला मिळते. पुस्तकाच्या पहिल्याच प्रकरणात भीमराव यांचे व्यक्तिमत्व कसं होतं हे सांगण्यासाठी लेखकाने बाबा म्हणून जरी त्यांची ओळख करून दिली असली तरी पुढील सर्व प्रकरणातून त्यांनी भीमराव अशा एकेरी उल्लेखातून हे व्यक्तिमत्व साकारले आहे. वऱ्हाडातल्या आपल्या सवयीनुसार प्रसिद्धी पासून दूर राहिलेल्या एका नामवंत फुटबॉलपटूची कारकीर्द व फुटबॉल पश्चात कौटुंबिक कारकीर्द तटस्तपणे मांडण्यात लेखक यशस्वी झाले आहेत हे आधीच सांगून टाकतो. अमरावती जिल्ह्यातील खारतळेगाव येथील फुटबॉलच्या टीम मध्ये भीमराव देशमुख यांची कारकीर्द सुरु झाली. ती १९३० सालापासून त्यावेळी ते जेमतेम विशीत होते. प्रथम शालेय स्पर्धापासून पुढे क्लब स्पर्धा पासून भीमरावने आपल्या खेळाचा ठसा उमटविला हळूहळू ख्याती विदर्भांत पोहोचली, भीमराव यांचा खेळ बघण्यासाठी लोक खास वेळ काढून येऊ लागेल, १९३८-३९ मध्ये विदर्भात झालेल्या काही स्पर्धात मुबंईच्या काही टीम सहभागी झाल्या होत्या, त्यामुळे नावाजलेल्या ब्रिटीश खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळाली. मुंबईच्या इंग्रजांच्या टीमला वऱ्हाडातील भीमराव यांच्या टीमने हरविले. वायएमसिए, मुंबईच्या अलेक्झांडर नावाच्या कप्तानाने भीमरावच्या खेळाने प्रभावित होऊन खारतळेगावच्या चार खेळाडूंना मुंबईच्या टीम कडून खेळण्याचे निमंत्रण दिले. १९४० ला भीमराव सह चार खेळाडू मुंबईत पोहोचले. अलेक्झांडरने त्यांना सराव शिबिरीत घातले. पुढील वर्षात भीमराव वायएमसिए टीम कडून खेळण्यासाठी करारबद्ध झाले. जशा आयपीएल मध्ये आज वेगवेगळ्या टीम खेळतात तसे त्यावेळी मुंबईत फुटबॉलचे क्लब होते. पुढील १० वर्षे अनेक टीम कडून खेळत अनेक स्पर्धा गाजविल्या. भीमराव यांचेवर तेव्हाच्या इंग्रजी वृत्तपत्रांतून रकाने छापले जाऊ लागले. मुंबईतील आपल्या १२ वर्षाच्या कार्यकाळात क्लब स्पर्धामधून त्यांनी ४०० सामने खेळले, तब्बल २५० गोल मारलेत. भीमराव वेगवेगळ्या स्पर्धामधून खेळत मैदान गाजवत होते. त्यातूनच १९४८ च्या ऑलम्पिक स्पर्धेच्या टीम मध्ये निवड झाली मात्र एका सराव सामन्यात पाय फॅक्चर झाल्याने देशाकडून खेळण्याची संधी हुकली. पुढील वर्षात भीमराव हे भारतीय टीम सोबत मलेशिया, कंबोडिया, इंडोनेशिया, म्यानमार, फिलिपिन्स, हाँगकाँग, थायलंड अशा देशात खेळले, या दौऱ्यातील २० पैकी १९ सामने जिंकले. भीमराव आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू झाले होते. इतके खेळून भीमराव यांचेकडे आर्थिक नियोजन नसल्याने परिस्थिती जेमतेमच होती. अशातच १९५१ साली त्यांनी निवृत्ती घेतली. अमरावती मध्ये परत आल्यावर त्यांनी आपला संसार थाटला, आर्थिक पाठबळ नसल्याने फुटकळ व्यवसाय केले. मात्र मी कधीकाळी आंतरराष्ट्रीय खेळाडू होते याचा कधी उल्लेख सुद्धा केला नाही, प्रसिद्धी पासून ते कायमच दूर राहिले. या काळात भीमराव यांच्या पत्नी अंजीरा यांनी जबाबदारीनं संसार सांभाळला. मुलांना मोठे केले. भीमराव शेवटपर्यंत मेहनत करीत राहिले. समाजात चांगले स्थान निर्माण केले. मात्र ते इतके मोठे फुटबॉलपटू होते ते अमरावतीकरांना काही माहिती झाले नाही. भीमराव यांच्या निधनानंतर या आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूचे कार्य पुढील पिढीला माहित व्हावे या उद्देशाने जी. बी. देशमुख यांनी या पुस्तकातून आपल्या तीर्थरुपांचे भावचित्र अगदी सोप्या सरळ भाषेत शब्दबद्ध करून महारुद्र च्या रूपाने वाचकांसमोर ठेवले. या लिखाणासाठी त्यांनी मुंबईत जाऊन त्या काळातील टाईम्स वृत्तपत्रांतील भीमराव यांचा उल्लेख असलेली कात्रणे मिळविली, त्यांच्या समवेत खेळलेल्या खेळाडूंना व पत्रकारांना भेटले, अमरावती मधील त्यांच्या समवयस्क परिचितांकडून त्यांची माहिती गोळा केली. त्यासाठी त्यांनी अथक अशी मेहनत घेतली. व २००५ साली हे पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकाच्या पुढील आवृत्ती मेहता प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केल्याने ते पुस्तक महाराष्ट्रभर पोहोचले. या निमित्त्याने भीमराव यांचे कार्य, त्यांचा फुटबॉल खेळातील झंझावात मराठी माणसाला माहिती झाला. अमरावतीकर या नात्याने मला तर आपल्या मातीतील माणूस त्या काळात आंतरराष्ट्रीय पातळीवर झेंडा गाडून आल्याचा अभिमान वाटला. अशा अनेक अर्थाने महारुद्र महत्वाचे आहे. ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
सलिल तांबे

ज्यांना गोष्टींची आवड आहे अशा मुलांसाठी ही मेजवानी आहेच, पण आपल्या पाल्यांमध्ये संवेदनशीलता आणि निसर्गाप्रती आदर जोपासण्यासाठी मोठ्यांनीही हे पुस्तक वाचायला हवे. प्रदूषणाविरुद्ध लहान हातांनी दिलेला लढा असो किंवा निसर्गाचा खरा आनंद पिशवीत भरून आणण्यापक्षा मनात कसा साठवावा, हे सांगणारा दृष्टिकोन असो; हे पुस्तक प्रत्येक वाचकाला समृद्ध करते. पुस्तकातील प्रत्येक कथा संपताना आपल्याला जगण्याकडे बघण्याची एक नवी दृष्टी देऊन जाते. यातलं काही गूढ, काही थरार आणि खूप सारे हळवे प्रसंग अनुभवण्यासाठी तुम्हाला हे पुस्तक स्वतः वाचायलाच हवं. म्हणूनच, आपल्या संग्रही असावा असा हा `हाटूमुटूचा चंद्र` तुम्ही एकदा नक्की अनुभवा! चला तर मग, आपणही शोधूया आपला स्वतःचा ‘हाटूमुटूचा चंद्र’! ...Read more