* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: NISHABDACHE MAUN
  • Availability : Available
  • ISBN : 9789386454799
  • Edition : 1
  • Publishing Year : MAY 2017
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 120
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
PAIN & SUFFERING IS PART & PARCEL OF LIFE. IT CAN HELP US TO LEARN IMPORTANT LESSONS IN LIFE. DIPTI JOSHI FOCUSES ON SUCH LESSONS IN HER BOOK ‘NISHABDACHE MAUN’. THOUGH THE WORD ‘MAUN’ REPRESENTS SILENCE , THESE STORIES TALKS ABOUT PHILOSOPHY OF LIFE. DIPTI JOSHI EVEN POINTED OUT VARIOUS SOCIAL PROBLEMS WITH HEARTWARMING WORDS.
‘नि:शब्दाचे मौन’ हा माझा कथासंग्रह म्हणजे नात्यांचे पदर उलगडत जाणारा प्रवास. हा प्रवास कधी, कसा सुरू झाला माहीत नाही; जन्मापासूनच तो मनात सुरू होता. मनाच्या जाणिवा जेव्हा सजग झाल्या त्या क्षणी हे प्रकटीकरण झालं. या प्रवासात अनेक थांब्यांवर वेगवेगळी माणसं भेटली, त्यांच्या जीवनातील सुखाच्या क्षणांचा आनंद आणि दु:खाच्या कडेलोटाचे क्षण जणू मीच जगत होते; इतकी मी त्या क्षणांशी समरस झाले. नऊ महिने स्त्रीने आपल्या अपत्याला प्रेमाने सांभाळावे तशी ही कथाबीजं माझ्या मनाच्या गाभाऱ्यात जोपासली आणि प्रत्येक लिखाणानंतर नव-निर्मितीचा, सृजनाचा आनंद मिळाला. ‘नि:शब्दाचे मौन’मधील आई-वडील, भावंडांच्या प्रेमाला आसुसलेला समीर, हट्टी निग्रही, स्वत:च्या तत्त्वांशी तडजोड न करणारी वरून फणसासारखी काटेरी पण आतून गऱ्यासारखी गोड असणारी ‘श्यामची आजी’, नवीन वर्षाचं स्वागत करताना, ‘प्रत्येकाशी आईच्या भूमिकेतून वागायचं.’ असा चारच शब्दांचा पण आचरणात आणायला अत्यंत अवघड असा संकल्प करणारी, हा संकल्प पार पाडताना नायिकेच्या मनावर राग-लोभांनी मिळवलेला ताबा आणि मनाची होणारी घालमेल अशी ‘विश्वामित्राची तपश्चर्या’ किंवा आपल्या स्वप्नातलं आयुष्य आपल्या पेशंटला जगताना पाहून एका प्रथितयश डॉक्टरची होणारी चिडचिड, संताप, डॉक्टर म्हणून कर्तृत्वशाली तरीही अतृप्त प्रवासाचे ‘प्रतिबिंब’! या कथासंग्रहातील प्रत्येक कथा म्हणजे माझं अपत्य, त्यांना सुंदर संस्कार देऊन, तुम्हा वाचकांच्या हाती सोपवताना अतिशय आनंद होत आहे. त्यांच्या सुख-दु:खात तुम्हीही नक्कीच सहभागी व्हाल.

No Records Found
No Records Found
Keywords
NISHABD# MOUN# AAJI# VISHVAMITRA# TAPASHCHARYA# AATHVAN# MORPEES# PUNARJANM# KALAKAR# TERE FULOSE BHI PYAR# VYATHA# PRATIBIMB# UDHVAST# SHIKSHA# NAJAR# KHAREDI# COSTUME DESIGNER# PAREEKSHA
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAKAL 10-12-2017

    दीप्ती जोशी यांनी लिहिलेल्या कथांचा हा संग्रह. वेगवेगळ्या नात्यांचे पदर जोशींनी या पुस्तकात उलगडून दाखवले आहेत. बाह्यविश्वातून अंतर्मनाचे चित्रण करत आणि मनातल्या संघर्षांचे विविध कंगोरे टिपत जाणाऱ्या या कथा. पात्रं आणि त्यांच्यामुळं घडलेल्या घटना-प्रंगांची गुंफण यांतून लेखिका कथाबीजं विकसित करते. ...Read more

  • Rating StarDAINIK SAMANA 12-11-2017

    वेदनेचे विभिन्न पोत... दीप्ती जोशी यांच्या या संग्रहातील काही कथा संकेतस्थळांवर प्रसिद्ध झालेल्या आहेत. तसेच त्यांच्या दर्जेदार कथांना मासिकांच्या व संकेतस्थळांच्या कथा स्पर्धांमधून अव्वल स्थान मिळाले आहे. ‘निःशब्दाचे मौन’ हा कथासंग्रह १४ आशयसंपन्नव वैविध्यपूर्ण कथावस्तू लेवून आपल्या भावविश्वामध्ये अलगद प्रवेश करतो. शिक्षा ही कथा आयुष्यभर कठोर परीक्षा दिल्यानंतर आयुष्याच्या संध्याकाळी सर्व सुखांवर लाथ मारत नवऱ्याला ‘शिक्षा’ देणाऱ्या अनुराधाच्या स्वाभिमानाची कहाणी सांगते. ‘व्यथा त्या दोघींची’ ही भिन्न जीवनशैली असणाऱ्या एक माणसांच्या गोतावळ्यात व जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली दबलेली तर दुसरी वेळ कसा घालवावा व गुजगोष्टी कोणाशी कराव्यात ही व्यथा कुरवळणारी अशी दोन बहिणींचे चित्र रेखाटणारी. खरेदीमध्ये सासरी जबाबदारीने वागणाऱ्या आणि माहेरी येऊन आईकडून लाड पुरवून घेणाऱ्या, एकाच वेळी अल्लड व जबाबदार दोन्ही असणाऱ्या सायलीचा प्रसन्न संचार डोंबिवलीच्या जुन्या दुकानांमधून होताना डोंबिवलीच्या लोकांनाही तिथून सहज फिरवून आणते. आठवणींची मोरपिसं अरुंधतीच्या तरल भावविश्वाचे दर्शन घडवितानाच सहजच तत्त्वज्ञानाच्या दोन ओळी देऊन जातात. ‘तेरे फुलों से भी प्यारी’ मधली श्रेयाच्या नशिबाचा फेरा डोळ्यात टचकन पाणी आणतो. मात्र तिचे मनोव्यापार बरेच काही शिकवून जातात. ‘उदध्वस्त’मधल्या देवदत्ताच्या वेदनेचा आणि ‘निःशब्दाचे मौन’मधल्या समीरच्या वेदनेचा पोत भिन्न आहे. परंतु त्यातून जन्म घेणारी कल्याणकारी वृत्ती मात्र जिथे मनोमन हात जुळावे अशीच आहे. लेखिकेच्या भावविश्वाचे धागे सांस्कृतिक शहर डोंबिवलीशी घट्ट विणलेले आहेत. अनेक कथांमधून तसा उल्लेख आहे. श्यामची आजी मधल्या आजीची व्यक्तिरेखा देवळाच्या गाभाऱ्यात शांतपणे तेवत राहणाऱ्या मंद ज्योतीशी नातं सांगते. विश्चामित्राची धडपड आणि त्या संकल्पाचा व्यवस्थित अन्वय जाणल्यावर दोन मनांचं जोडलं जाणं मनाला भावून जातं. कधी अंतःकरणाचा ठाव घेणाऱ्या, कधी जीवानाचे तत्त्वज्ञान सोपे करून सांगणाऱ्या, मौनाचे गूढ उकलणाऱ्या, गबाळेपणातल्या सौंदर्याची जाण ठेवणाऱ्या आणि नजरेचे भान जपणाऱ्या या कथा सौम्य व रंजक आहेत. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

राधेय.... लेखक रणजित देसाई... मित्र कसा असावा...कर्णासारखा दातृत्व कसं असावं...कर्णासारखं असा हा कर्ण... त्याला अंगराज म्हणावं, दान देणारा दाता म्हणावं, राधेय म्हणावं कि कौतेय... काहीही म्हणा पण कर्णासारखा दाता कर्णानंतर कधी झाला नाही आणि कधी होणरही नाही... रणजित देसाई लिखीत कर्णचरीत्र राधेय आज हातावेगळं झालं ते अश्रुभरल्या नयनांनी...ज्याचा अंत करायला स्वतः देवाधिदेव कृष्णाला अर्जुनाचं सारथ्य करावं लागलं यातच अंगराज कर्णांचं विरत्व अधोरेखीत होत आहे. जन्मापासुन ज्याला केवळ सुतपुत्र म्हणुन वागणुक मिळाली असा तो कर्ण स्वतःच्या बळावर इतका महान लढवय्या बनला. पुस्तकाच्या प्रास्ताविकात देसाईंनी म्हटलं आहे की राधेय मधला कर्ण महाभारतात शोधायची गरज नाही. प्रत्येकाच्या मनातच तो दडलेला असतो, कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत, तर त्यात हा कर्ण दिसेल. त्याचं दु:खं, पोरकेपण आणि त्यातून पार होवून एक अनोखी ऊंची गाठणारं त्याचं दातृत्व, व्यक्तित्व याचं एक भव्य, शोकात्म चित्र राधेय मधून उभं राहतं. राधेय या कादंबरीत रणजित देसाईंच्या शब्दांनी कर्णाची अनेक रुपे अनुभवता आली. त्यामध्ये राधाई आणि वृषाली सोबतचा कर्ण, दुर्यौधनासोबतचा कर्ण, कृष्णासोबतचा कर्ण, रणांगणावरचा कर्ण आणि नदीकाठी पाठमोरा ऊभा राहत दान करत असलेला कर्ण अशा अनेक रुपांनी प्रत्येकवेळी वेगळा भासला. वृषसेन आणि चक्रधराच्या मृत्युने हळवा झालेला कर्णही वाचकाच्या डोळ्यातही पाणी आणवतो... समोर मृत्यु दिसत असताना सुध्दा केवळ दिलेल्या वचनामुळे हातातील धनुष्याचा त्याग करुन शस्त्रहिन हेणारा कर्ण रणजित देसाईंच्या शब्दांमुळे आजन्म लक्षात राहील. कर्णासारखं होणं कुणालाही कदापि शक्य नाही पण त्यातला एखादा जरी चांगला गुण अंगी बाळगण्याचा प्रयत्न प्रत्येकाने नक्कीच केला पाहीजे... प्रत्येकाच्या संग्रही असावं आणि एकदा तरी वाचावं असं पुस्तक रणजित देसाई लिखीत...राधेय... © विश्वजित शिंत्रे. ...Read more

BAJIND
BAJIND by PAHILWAN GANESH MANUGADE Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

काही पुस्तकं अशी असतात कि कितीही वेळा वाचली तरीही त्या पुस्तकाचा कंटाळा येत नाही. पुन्हा पुन्हा वाचावं असं वाटतं आणि त्याची पारायणं होतचं राहतात. असचं एक पुस्तक म्हणजे *पै.गणेश मानुगडे* लिखीत *बाजिंद.* *बाजिंद* हे एक असं रसायन आहे जे प्रत्ेकाला अक्षरशः वेड लावतं. साधारण चार पाच वर्षांपुर्वी पहील्यांदा वाचलं होतं, त्यानंतर बर्‍याचवेळा आणि आज पुन्हा एकदा. त्याबद्दलची एक सुंदर आठवण म्हणजे माझ्या बहिणीच्या गरोदरपणाच्या दिवसात ग्रहण लागलं होतं आणि त्या ग्रहणकाळात तिला मी *बाजिंद* वाचुन दाखवलं होतं, असं हे पुस्तक. कुस्ती, प्रेमकथा, हेरगिरी, गुढ रहस्यमय बाजिंदचं जंगल, पशु-पक्षी व हिंस्र जनावरांची भाषा, बहीर्जी नाईक आणि अवघ्या हिंदुस्थानाचे आणि मराठी मनाचे आराध्यदैवत *श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज* असा या पुस्तकाचा प्रवास. शेवटाला अंगावर काटा आला कि समजावं आपण या पुस्तकाच्या प्रेमात पडलोय. रायगडच्या डोंगरदरीत वसलेल्या धनगरवाडीचा सखाराम धनगर आणि त्याच्यासोबत मल्हारी, सर्जा आणि नारायण निघालेत छत्रपती शिवरायांना भेटायला. कारण टकमक टोकावरुन ज्या गद्दारांचा कडेलोट व्हायचा ती प्रेतं येऊन पडायची ती थेट धनगरवाडीच्या आसपासच्या जंगलात आणि त्यामुळे आसपासच्या परीसरात जंगली जनावरांचा सुळसुळाट खुप वाढला होता. त्यांची मेजवानी व्हायची पण जर कधी कडेलोट नसायचा तेव्हा ती हिंस्त्र जनावरं आसपासच्या लोकवस्तीत शिरायची. हिच कैफियत मांडायला सखाराम धनगर आणि इतर मंडळी रायगडी निघतात. त्यानंतरचा त्यांचा प्रवास आणि कथा वाचकाला इतकी गुरफटवुन टाकते कि शेवटच्या पानावरची शेवटची ओळ कधी वाचुन संपते, कळतही नाही. त्यांची स्वराज्यहेर खंडोजीची भेट मग सावित्री, वस्तादकाका, वाचतानाही भितीदायक दिसणारं जंगल, कधीही न पाहीलेलं महादेवाचं मंदीर, खंडोजीचा असणारा ट्विस्ट आणि मग बहिर्जी नाईक आणि मग थेट रायगड आणि महाराज, सगळं प्रत्यक्षात आपल्यासमोर घडतयं कि असा भास निर्माण करणारं असं हे पुस्तक. एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी कथा, एकदा वाचली कि पुन्हा एकदा वाचण्याचा मोह आवरता येत नाही अशी कथा, ज्यामध्ये असं बरचं काही जे वाचल्याशिवाय कळणार नाही. अजुन एक असं कि सातासमुद्रापार जगातील अव्वल गणली जाणारी इस्त्राईलची गुप्तहेर संघटना मोसाद यांच्या अभ्यासक्रमात बहिर्जी नाईक आणि आपलं हेरखातं शिकवलं जातं अशी अभिमान वाटणारी घटना आपल्या राज्यात घडलीय त्याचीच हि गोष्ट...बाजिंद... ...इकडे खंडोजीने सावित्रीला उचलुन जंगलातुन बरेच बाहेर आणले होते. पुढे डोंगराची कडेतुट होती आणि हजारो हात खोल फेसाळणार्‍या नदीचे विशाल पात्र...खंडोजीने एकदा मागे पाहीले आणि ताडले कि शिर्क्यांची फौज पाठलाग करत आहे...त्याने कशाचाही विचार न करता सावित्रीसह स्वतःला त्या कडेतुट वरुन त्या विशाल नदीच्या पात्रात झोकुन दिले...आणि... त्यासाठी वाचा *पै.गणेश मानुगडे* लिखीत...*बाजिंद..!!!* © विश्वजीत श्रीपती शिंत्रे. मु.पो.इंचनाळ, ता.गडहिंग्लज,जि.कोल्हापुर ०९९२२३१३९१९ ...Read more