- Swati Khedekar Borkar
रणजित देसाई यांचं गंधाली हे पुस्तक वाचलं ... गंधाली...म्हणजे सुगंधी द्रव्य ठेवण्याची पेटी..
असं म्हणतात ..शब्दांना गंध गंध नसतो ..पण या गंधाने पुस्तकातील शब्दरूपी कथा वाचून नक्कीच वाचक रसिकांच्या मनात गंध दरवळला शिवाय राहत नाही.
प्रेम आणि वेदना यांच्यातलं नातं जणू पाठीला पाठ लावून जन्माला आलेल्या जुळ्या भावंडांना सारखं असतं ...ही पुस्तकाची टॅगलाईन प्रत्येक कथा वाचताना जाणवते.
पहिली कथा विराणी ... प्रेमासाठी सर्वस्व पणाला लावणारे मेहरुन्निसा आणि सलीम. म्हणजेच नुरजहा आणि जहांगीर ...
असा रंगला विडा मध्ये.. राजनर्तकी माहेलका आणि रावरंभा निंबाळकर ..... रावरंभा निंबाळकर यांच्या प्रगतीसाठी जीव टाकणारी माहेलका ..
अशी छेडली तार मध्ये बंदे अलीच्या जीवनाचा सुर असलेली प्राणप्रिय पत्नी चुन्ना निवर्तल्या नंतर वेदनेने पिळलेला अस्सल कलावंत... तिच्या आठवणीत कायम बीनचे बेसूर सुर जगणारा बंदे अली नक्कीच मनाला चटका लावून जातो .
अशी रंगली प्रित मध्ये बाजीराव आणि मस्तानी यांच्यातील प्रेमाचे वर्णन ..शेवटही अगदी मनाला चटका लावून जाणारा ..
आणि शेवटी नक्षत्र कथा ...शिवाजी महाराज .. महाराष्ट्राच्या जनतेचा देव महाराज गेल्यानंतर.... त्यांच्या चितेवर आपल्याला स्वतःला झोकून देऊन स्वतःच्या आयुष्याच सोनं करून जाणाऱ्या.. पुतळाबाई नक्कीच आपल्याला त्यांच्या पुढे नतमस्तक व्हायला भाग पाडतात .
सगळ्या कथा मनाचा ठाव घेतात .
अप्रतिम पुस्तक.
- SAROJ KOLE
गंधाली हा रणजित देसाई यांच्या कथा संग्रह वाचला..त्यातली विराणी ही जहांगीर याच्यावर लिहिलेली प्रेमकथा मनाला खूप भावली ..आत्ता पर्यंत या राजावरील काहीच माहिती वाचली
नव्हती म्हणून जर उत्सुकता होती.
- Jaywant Bhujbal
वाचनाच्या अगदी सुरुवातीस हे पुस्तक वाचायला मिळाले होते. त्यावेळेस तर खूपच आवडले होते.
- Rajesh Malse
सगळ्याच कथा उत्तम आहेत यातल्या. बंदेअली आणि चुुन्ना यांची कथा डोळ्यात पाणी आणते.
- MANGESH NIMKAR
रणजित देसाई यांच्या स्वामी, श्रीमान योगी या कादंब-या खुप लोकप्रिय आहेत. त्या तुलनेत त्यांच्या इतर पुस्तकांचा जास्त उल्लेख केला जात नाही. गंधाली हा त्यांचा असाच एक कथासंग्रह आहे. इतिहासातील काही स्नेहबंधांवर हे पुस्तक आधारीत आहे. एकुण यात पाच ऐतिहासिक कथा आहेत. प्रेमाच्या विविध छटा या पुस्तकात पहावयास मिळतात. उदा.
(१) जहांगीर, मेहरुन्निंसा उर्फ नूरजहाँ व शेर अफगाण यांचा प्रेमाचा त्रिकोण.
(२) राजे रावरंभा निंबाळकर व माहेलका ही राजनर्तकी यांच्यातील स्नेह. माहेलका आपल्या चातुर्याने प्रेमाचे व राज्याचे कसे रक्षण करते हे वाचनीयच.
(३) पन्नाशी गाठलेले बुजुर्ग बीनवादक बंदेअली व ऐन तारुण्यातील राजगायिका चुन्ना यांचे तरल संगीतमय प्रेम. संगीतावर सुरु होऊन संगीतावरच समाप्त झालेले आगळे प्रेम.
(४) सर्वांच्या ओळखीची जोडी बाजीराव मस्तानी.
(५) प्रेमाचं सोज्वळ नि उदात्त रुप म्हणजे राणी पुतळाबाई. शिवाजीमहाराजांच्या मृत्युनंतर गडावर काही कटु घडामोडी घडतात. याचा परिपाक म्हणजे त्यांना पतीचे अंत्यदर्शनही घेता येत नाही. काही दिवसातच पुतळाबाई संभाजीराजांबरोबर गडावर येतात. पती निधनाने त्या व्याकुळ असतानाही चार समजुतीच्या गोष्टी सर्वांना सांगुन परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न करतात.
अशा या प्रेमाच्या विविध रुपांच्या हळुवार कथा. पुस्तकाचे नावही सुरेखच गंधाली. सुगंधित द्रव्ये ठेवण्याच्या पेटीला गंधाली म्हणतात. प्रेम हे चिरंतन असते या उक्तीप्रमाणेच ही सारी व्यक्तिमत्वे आपल्या स्नेहमय वर्तनातुन वाचकांच्या मनात कायम सुगंधाप्रमाणे दरवळत राहतात.
- श्रीजीवन तोंदले
आज मी तुम्हाला कोल्हापूरचे असलेले आणि महाराष्ट्रातील थोर,सृजनशील,प्रतिभावंत लेखक स्वामीकर रणजित देसाई लिखित गंधाली या पुस्तका विषयी सांगणार आहे.ऐतिहासिक विषयावरच रणजित देसाई यांच लिखाण म्हणजे क्या बात.त्यांनी लिहिलेल्या इतिहासामधील त्या सर्व व्यक्ती ज्वलंत पणे नजरे समोर उभारतात आणि त्या व्यक्ती विषयी ओढ निर्माण होते. जणु त्या व्यक्तीना आपण जवळून ओळखतो असाच भास होतो. मग ते स्वामी कादंबरी मधील थोरले माधवराव पेशवे आणि त्यांची पत्नी रामा बाई असो वा पावनखिंड या त्यांच्या कादंबरी मधील बाजीप्रभु.
पुस्तकाच्या मुखपृष्ठावर दोन सुंदर चाफ्याची फुलं आहेत. चाफ्याची फुलं ही वेगळेच प्रेमाचं प्रतीक आहेत. आजच्या युगातील गुलाबाच्या फुलांनी प्रेम व्यक्त होत असलं तरी त्या काळी चाफ्याच्या फुलांची गंमत काही वेगळीच.
आजच्या रोमँटिक वागु पाहणाऱ्या पिढीला प्रेमाची खरी व्याख्या सांगणारं हे कथा संग्रह आहे. यामध्ये प्रेम आणि वेदना यामधील नातं सांगणाऱ्या कथा आहेत मग ते बाजीरावांच्या मृत्युने विष पिणारी मस्तानी आहे तर बंदेअलींच्या आयुष्याचा सुर असणारी त्यांची पत्नी चुन्ना असो वा छत्रपती शिवरायांच्या मृत्यु नंतर सती जाणाऱ्या पुतळा राणी सरकार. आपल्या बुद्धीने दरबाराचे मन झिंकणारी महेलका. प्रत्येक कथा मनाला स्पर्शुन जाते. प्रत्येक कथा वाचत असताना त्याच विश्वात त्याच युगात आपण गेलो आहोत याचा भास होतो आणि जेव्हा ती कथा संपते तेव्हा त्या प्रेमा विषयी वाचुन मन सुन्न होत.
माझ्या मनाला स्पर्शुन गेलेली कथा म्हणजे अशी छेडली तार आणि अशी रंगली प्रीत. या दोन कथांनी खर प्रेम काय असत आणि निस्वार्थी पणाने केलेलया प्रेमाचं मोल काय असत हे समजलं.
पुस्तका मधील भाषा ऐतिहासिक आहे त्यामुळे आपण त्या इतिहासामध्ये रमुन जातो.१५८ पानाचे हे पुस्तक वाचुन लवकर संपते कारण एक कथा संपली की लगेच दुसरी वाचण्याचा मोह होतो. पुस्तकाचं प्रकाशन मेहता पब्लिकेशन ने केले आहे.ऐतिहासिक वाचण्याची ज्यांना आवड आहे आणि प्रेमाचा खरा गंध समजून घेणाऱ्यांसाठी आणि सर्व वाचकांनी जरूर वाचावे असे हे पुस्तक रणजित देसाई लिखित गंधाली.
-श्रीजीवन तोंदले
- Dakshu Belnekar
खरंच खूप छान पुस्तक आहे .