* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: AFTER KURUKSHETRA
  • Availability : Available
  • Translators : VARSHA KALE
  • ISBN : 9788184980943
  • Edition : 3
  • Publishing Year : JANUARY 2010
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 63
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : SHORT STORIES
Quantity
Buying Options:
  • Print Books:
MAHABHARATA, THE INEVITABLE PART OF INDIAN LIFE AND CULTURE. IT IS AN EPIC. IT HAS MANY QUALITIES. IT DESCRIBES ALL TYPE OF MENTALITIES. IT IS SAID THAT WHATEVER IS PRESENT IN THE WORLD OUTSIDE IS ALREADY DESCRIBED IN THIS EPIC, AND WHATEVER IS NOT THERE IN MAHABHARATA IS NOWHERE IN THE UNIVERSE. IT IS FULL OF INSCRUTABLE HAPPENINGS, ABSTRUSE CHARACTERS, IT CONFUSES A COMMON MAN YET CAPTURES HIM. THE WAR PLAYED ON THE KURUKSHETRA WAS GIVEN A CONVENIENT NAME, DHARMAYUDDHA. IT ENGULFED THE CONTEMPORARY WILD CULTURE TOO. IT BURNT MANY OTHER TRADITIONS AND PERSONALITIES. THE SURPRISING PART IS THE VALUES OF LIFE WHICH HAD ALWAYS MADE LIVING EASY HAD SHATTERED THE VERY CORE OF OUR "BEING` REVEALING THE PHILOSOPHIES OF LIFE. KAURAV AND PANDAVAS HAD BOTH BECOME VERY HAUGHTY. VICE AND VIRTUES HAD BEEN LONG SINCE FORGOTTEN, JUSTICE AND INJUSTICE WERE IGNORED COMPLETELY. ALL THESE VIEWS GIVE US A NEW DIRECTION TO THINK ABOUT. AND WHEN THE READER THINKS THAT HE IS ABOUT TO REVEAL THE ANSWERS TO SOME OF THE QUESTIONS, NEW QUESTIONS RISE UP AGAIN. THIS BOOK WILL CERTAINLY COMPEL THE READER TO THINK ABOUT MAHABHARATA IN A DIFFERENT WAY, LIKE NEVER BEFORE.
भारतीय जीवनाच्या अविभाज्य भाग असणारं महाभारत! अतर्क्य घटना, व्यक्तिरेखा यांच्या अगम्य वागणुकीनं सामान्य माणसाला चक्रावून टाकत विचार करायला लावणारं, तरीही मोहवणारं महाकाव्य! `धर्मयुद्धा`च्या नावाखाली झालेल्या कुरुक्षेत्रावरील या युद्धात समकालीन वन्यजाती-समूह आणि त्यातूनही इतर समाजघटक, व्यक्ती यांची होरपळ झाली. विशिष्ट अशी जीवनमूल्य जी त्यांना जगण्याचं बळ देऊन गेली, तीच आपल्या विचारांच्या अथांग जलाशयाला ढवळून काढत आशावादाचे, प्रवाहीपणाचे तत्त्वज्ञान आपल्याला देतात. पापपुण्याची, न्याय-अन्यायाची दुर्लक्षित बाजू, कौरव-पांडव दोन्ही बाजूंचा सत्तेचा उन्मत्तपणा आपल्याला नवीन विचारसरणी प्रदान करतो. आणि मग... अनेक प्रश्नांची उकल होते आहे, असं वाटत असतानाच वाचक परत नव्या प्रश्नांत गुरफटून जातो. `महाभारत` समजावून घेताना त्याकडे नव्या दृष्टीकोनानं पाहायला लावणारं... वाचकाला वेढून टाकणारं... कुरुक्षेत्रानंतर...
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #KURUKSHETRANANTER #AFTERKURUKSHETRA #कुरुक्षेत्रानंतर #SHORTSTORIES #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #VARSHAKALE #MAHASWETADEVI "
Customer Reviews
  • Rating StarChandrakant Kavathekar

    या पुस्तकातल्या तीनही कथा कालानुक्रमे महायुद्ध संपल्यानंतरच्या काळातील वेगवेगळ्या महत्त्वाच्या तीन टप्प्यांवर घडलेल्या आहेत. पुस्तकाबद्दल वेगळे काही सांगावयाचे नाही.कथा लहान आहेत. एकदा वाचाच.

  • Rating StarJaywant Bhabad

    साहित्यातील निर्भय मुद्रा म्हणजे महाश्वेतादेवी..... महाश्वेता देवी या कार्यकर्त्यां आणि ज्ञानपीठ विजेत्या लेखिका होत्या. त्यांच्या कथांच्या अनुवादांच्या निमित्ताने प्रथम माझा त्यांच्या साहित्याशी परिचय झाला. तेव्हाच त्यांच्या लेखनातून भारतातील दिवासींचे जीवन किती कष्टदायक आहे, त्यांना (विशेषत: बिहार, उत्तर प्रदेश या भागातील) जमीनदार कसे त्रास देतात, वेठबिगार म्हणून राबवून घेतात, काम झाल्यानंतर त्यांचे अगदी खूनही करून ते कसे पचवतात याचे दाहक दर्शन झाले. ‘मीठ आणि इतर कथा’ हा कथासंग्रह त्यासाठी वाचायला हवा. त्यातील ‘बियाणं’, ‘मीठ’ या कथा कशा अस्वस्थ करून सोडतात, याचा अनुभव घ्यायला हवा. *महाश्वेता देवींनी अगदी महाराष्ट्रातल्या आदिवासींवरही कथा लिहिल्या आहेत.कोरकू आदिवासींच्या कुपोषणावर त्यांनी ‘महादू : एक मिथक’ या शीर्षकाची कथा लिहिली आहे. आदिवासींच्या पोटातली भूक आणि त्यांचा एकंदर व्यवस्थेबद्दलचा संताप या कथेत दिसतो. त्या कथेत कुपोषणामुळे महादू हा आदिवासी मरतो, पण त्याच्या मृत्यूनंतरचे महाश्वेता देवींनी केलेले वर्णन कुणी तरी उच्चभ्रूंच्या तोंडात जोरदार झापड मारल्यासारखे आहे. त्या कथेशेवटी लिहितात, ‘मग महादू उठून उभा राहिला. त्याची उंची वाढत वाढत गेली. आपले दोन्ही पाय मुंबईवर रोवून तो उभा राहिला. प्रथम त्याने खाल्ली उषाकिरण बिल्डिंग, मग खाल्ले सीएसटी स्टेशन, मग खाल्ले ताजमहाल हॉटेल. मुंबईतल्या इमारती त्याने खाऊन टाकल्या. आणि तो ओरडत राहिला, ‘मला भूक लागलीय, मला खायला द्या! मला भूक लागलीय, मला खायला द्या!’ (या कथेवर पुण्याचे छायाचित्रकार संदेश भंडारी यांनी ‘महादू’ याच शीर्षकाचा एक मराठी चित्रपट काही वर्षांपूर्वी काढला होता. पण तो महाराष्ट्रभर पोचला नाही. चित्रा पालेकरांनी काढलेला ‘बांयेन’- म्हणजे डाकीण- या कथेवरील ‘मातीमाय’ हा चित्रपट जरा बऱ्यापैकी पोहोचला.) महाराष्ट्र-कर्नाटकच्या सीमेवरील जोगत्याची समस्याही त्यांनी आपल्या ‘शेष जोगता’ या कथेत मांडली आहे. जोगता प्रथा नष्ट व्हायला हवी, असा संकेत त्यांनी या कथेत दिला होता. ...Read more

  • Rating StarDAINIK GAONKARI 30-1-2011

    या पुस्तकातील ‘पंचकन्या’, ‘कुंती आणि निषादीन’, ‘सौवाली’ या तीनही कथा कालानुक्रमे कुरुक्षेत्रावरील महायुद्ध संपल्यानंतरच्या काळातील वेगवेगळ्या महत्त्वाच्या तीन टप्प्यांवर घडलेल्या आहेत. या पुस्तकाद्वारे लेखिका महाश्वेता देवी यांनी महाभारताच्या कथेतील ाही घटना जनसामान्यांच्या दृष्टीने मांडल्या आहेत. धर्मयुद्धाच्या नावाखाली झालेल्या युद्धात, लोकवृत्तीतील जातिसमूह, स्त्री-पुरुष, वन्य जाती यांची भूमिका काय होती? या घटकांची संस्कृती, त्यांच्या चालीरिती, मान्यता, त्यांची विचार पद्धती काय होती? हे या कथांच्या माध्यमातून मांडतात. ‘कुरुक्षेत्रानंतर’ या कथा संग्रहातील कथा प्रथमदर्शनी महाभारतातील उपकथानके वाटली तरी यातील आशय नव्या दृष्टीकोनाची मांडणी करतात. राजवृत्तातील उच्चभ्रू, दांभिक राजसंस्कृती विरुद्ध निसर्ग नियमांशी जास्त सुसंगत असणारी, अधिक मानवी अशी लोकसंस्कृती यांच्यातील संघर्ष, विरोधाभास या सर्व कथांमधून महाश्वेतादेवींनी पुढे आणला आहे. महावेतादेवींच्या या कथांच्या निमित्ताने दोन समांतर संस्कृतीतील संघर्षाकडे अधिक मानवी पद्धतीने पाहण्याची दृष्टी आपल्याला लाभते हेच त्यांच्या साहित्याचे सामर्थ्य आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL, PUNE 6-6-2010

    महाभारत म्हणजे भारतीय जीवनाचा अविभाज्य भाग. त्या ‘धर्मयुद्धात’ अनेकांची होरपळ झाली. हे पुस्तक महाभारताकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन देतं. वाचकाला वेढून टाकतं. महाश्वेतादेवींनी केलेलं हे विचारमंथन आपल्यालाही नवीन विचारसरणी देतं. अनुवाद केला आहे वर्षा काे यांनी. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

वा. पां. जाधव अमरावती

`अमरावतीचे छप्पन स्वभाव एक मनोरंजक काव्यसंग्रह` `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे अमरावतीचे सुप्रसिद्ध साहित्यिक श्री जी. बी. देशमुख यांचे अमरावती नगरीचा सहज स्वभाव व ह्या नगरीच्या वेगळ्या ओळखीवर आधारित मनोरंजक पुस्तक वाचले. वाचून भरपूर मनोरंजन झाले. खर काय लिहावे या लेखकाबद्दल, मन गोंधळले. ऐतिहासिक असो, प्रवास वर्णन असो, व्यक्ती विशेष असो, अनुभवात्मक घटना घडामोडी असो कशावरही सहज लिखाण करणारा हा लेखक आहे. आता तर त्यांनी लेखनाला विनोद प्रचुर फोडणी देऊन `अमरावतीचे छप्पन स्वभाव` या काव्यसंग्रहातून अमरावतीकरांना मनोरंजनाची मेजवानीच दिली आहे. प्रत्येक शहराची व त्या शहरातील वैशिष्ट्यांची एक वेगळीच ओळख असते. दिवस जातात, काळ लोटतो, पिढ्या बदलतात मात्र जुन्या स्मृतीची चिन्हे नवीन येणाऱ्या पिढीच्या मनात गुढ निर्माण करत कायम हाक देत राहतात. अमरावतीही त्याला अपवाद नाही. बापट चौकात चौक नाही, त्या जागेवर चौरस्ता नसून टी-पॉइंट आहे, खापर्डे बगीचा म्हणून आजही ओळख आहे मात्र तेथे बगिचा नाही किंवा प्रसिद्ध गांधी चौकात गांधीचा पुतळा अथवा स्मृतीदर्शक चिन्ह अथवा उल्लेख नाही मात्र गांधी चौक अशीच ओळख जनमानसात आहे. अशा एक ना अनेक विसंगत नाम दर्शक ओळख असलेली उदाहरणे त्यात सप्रमाण आहेत. पण खरी गंमत म्हणजे कधी काळी घडलेला इतिहास त्यामध्ये दडलेला आहे हे निश्चित. या सोबतच अमरावतीकरांच्या स्वभावातला स्थायी मजेदारपणाच्या एक एका हटके गुण वैशिष्ट्याच्या गमती लेखकाने हुबेहूब अधोरेखित केलेल्या आहेत. आणि त्यावरुन तत्सम रचनांचा उहापोह लेखकाने पुस्तकात केला असावा. विदेशात स्थाईक झालेल्या मूळ अमरावतीकरांना लेखकाने लिहिलेल्या गमती मनोरंजनात्मक वाटाव्या एवढी किमया जी.बी. च्या सहज लेखनाने दाखवली आहे. अमरावतीचे अग्रगण्य वृत्तपत्र दै. हिंदुस्थान मध्ये लेखकाने सतत ६ महीणे लिहीलेल्या काव्य सदरात अमरावतीच्या जनमानसाच्या हृदयाच्या ठाव घेणाऱ्या काव्य रचनांचा आठवणींनी महापूर ओसंडून गेला होता. विशेष म्हणजे ह्यात कुठेही अनावश्यक अभिनीवेष नव्हता. उलट गमतीत केलेले आत्मपरिक्षण मात्र काही प्रमाणात होते. वयस्क अमरावतीकर रसिकांना या रचना ताज्या करून त्यांच्या तारुण्यात घेऊन गेल्या हेच खरे. जी बी देशमुख या लेखकास मिळालेल्या सकारात्मक प्रतिक्रियां वरून दिसून येते. . सदर पुस्तकातील काव्यमय रचना वाचतांना अमरावतीच्या माणसाच्या वऱ्हाडभोळ्या स्वभावाची प्रचीती येते आणि वेगळाच आनंद देऊन जाते. निखळ मनोरंजन करत गुदगुल्या करणारा असा हा काव्यसंग्रह आहे. अमरावती शहराची ऐतिहासिक वैशिष्टे काव्यरूपात वाचण्याचा आनंद अमरावतीकरांना ते जिथं असतील त्या गावात, परगावात, परदेशात पुस्तक मागवून घेता येईल. ...Read more

ज्योती चेडे, मुंबई.

अमरावतीच्या वैशिष्ट्यांवर आधारीत खुमासदार छप्पन्न कवितांच्या संग्रहातील प्रत्येक कविता वाचत असताना अमरावतीच्या वातावरणाची धुंदी आपसुकच मनावर चढु लागली. सगळ्याच कविता सुंदर आहेत. एकेक कविता अमरावतीचे अप्रतिम वर्णन करते. प्रत्येक कवितेचा शेवट कुठेतरी गंभीर विचार करायला भाग पाडतो आणि मन गलबलून जाते. सगळ्याच कविता सुंदर आहेत पण माझ्या मनाला भावलेल्या व भिडलेल्या कविता आहेत `अमरावतीतल्या गमती`, `अमरावतीचे शिक्षण`, `अमरावतीचे हजरजबाबी`, `अमरावतीचे वेडे`, `अमरावतीच्या काकू` व बाकी सगळ्या. `अमरावतीचे वेडे` या कवितेत उल्लेखीत शेवटचा अश्रुंचा एक थेंब जरुर राखला जाईल. तसेच `अमरावतीच्या काकूं` ची उर्जा उरात भरून उरेल. जीवन देणाऱ्या विहीरीने कोणाचेही जीवन घेऊ नये, अशी सद्भावना मनात जागेल. अमरावतीकर जगात कुठेही असो त्यांच्या मनात एका कोपऱ्यात राजकमल चौक असतोच हे सत्य मनावर कोरले जाईल. प्रत्येक अमरावतीकराने ह्या कविता जगाव्यात. त्यासाठी हे पुस्तक संग्रही ठेवावे आणि परगावी राहणाऱ्या आपल्या अमरावतीकर आप्तेष्टांना भेटी दाखल द्याव्या. ...Read more