* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: AFTER KURUKSHETRA
  • Availability : Available
  • Translators : VARSHA KALE
  • ISBN : 9788184980943
  • Edition : 3
  • Publishing Year : JANUARY 2010
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 63
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : SHORT STORIES
Quantity
Buying Options:
  • Print Books:
MAHABHARATA, THE INEVITABLE PART OF INDIAN LIFE AND CULTURE. IT IS AN EPIC. IT HAS MANY QUALITIES. IT DESCRIBES ALL TYPE OF MENTALITIES. IT IS SAID THAT WHATEVER IS PRESENT IN THE WORLD OUTSIDE IS ALREADY DESCRIBED IN THIS EPIC, AND WHATEVER IS NOT THERE IN MAHABHARATA IS NOWHERE IN THE UNIVERSE. IT IS FULL OF INSCRUTABLE HAPPENINGS, ABSTRUSE CHARACTERS, IT CONFUSES A COMMON MAN YET CAPTURES HIM. THE WAR PLAYED ON THE KURUKSHETRA WAS GIVEN A CONVENIENT NAME, DHARMAYUDDHA. IT ENGULFED THE CONTEMPORARY WILD CULTURE TOO. IT BURNT MANY OTHER TRADITIONS AND PERSONALITIES. THE SURPRISING PART IS THE VALUES OF LIFE WHICH HAD ALWAYS MADE LIVING EASY HAD SHATTERED THE VERY CORE OF OUR "BEING` REVEALING THE PHILOSOPHIES OF LIFE. KAURAV AND PANDAVAS HAD BOTH BECOME VERY HAUGHTY. VICE AND VIRTUES HAD BEEN LONG SINCE FORGOTTEN, JUSTICE AND INJUSTICE WERE IGNORED COMPLETELY. ALL THESE VIEWS GIVE US A NEW DIRECTION TO THINK ABOUT. AND WHEN THE READER THINKS THAT HE IS ABOUT TO REVEAL THE ANSWERS TO SOME OF THE QUESTIONS, NEW QUESTIONS RISE UP AGAIN. THIS BOOK WILL CERTAINLY COMPEL THE READER TO THINK ABOUT MAHABHARATA IN A DIFFERENT WAY, LIKE NEVER BEFORE.
भारतीय जीवनाच्या अविभाज्य भाग असणारं महाभारत! अतर्क्य घटना, व्यक्तिरेखा यांच्या अगम्य वागणुकीनं सामान्य माणसाला चक्रावून टाकत विचार करायला लावणारं, तरीही मोहवणारं महाकाव्य! `धर्मयुद्धा`च्या नावाखाली झालेल्या कुरुक्षेत्रावरील या युद्धात समकालीन वन्यजाती-समूह आणि त्यातूनही इतर समाजघटक, व्यक्ती यांची होरपळ झाली. विशिष्ट अशी जीवनमूल्य जी त्यांना जगण्याचं बळ देऊन गेली, तीच आपल्या विचारांच्या अथांग जलाशयाला ढवळून काढत आशावादाचे, प्रवाहीपणाचे तत्त्वज्ञान आपल्याला देतात. पापपुण्याची, न्याय-अन्यायाची दुर्लक्षित बाजू, कौरव-पांडव दोन्ही बाजूंचा सत्तेचा उन्मत्तपणा आपल्याला नवीन विचारसरणी प्रदान करतो. आणि मग... अनेक प्रश्नांची उकल होते आहे, असं वाटत असतानाच वाचक परत नव्या प्रश्नांत गुरफटून जातो. `महाभारत` समजावून घेताना त्याकडे नव्या दृष्टीकोनानं पाहायला लावणारं... वाचकाला वेढून टाकणारं... कुरुक्षेत्रानंतर...
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #KURUKSHETRANANTER #AFTERKURUKSHETRA #कुरुक्षेत्रानंतर #SHORTSTORIES #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #VARSHAKALE #MAHASWETADEVI "
Customer Reviews
  • Rating StarChandrakant Kavathekar

    या पुस्तकातल्या तीनही कथा कालानुक्रमे महायुद्ध संपल्यानंतरच्या काळातील वेगवेगळ्या महत्त्वाच्या तीन टप्प्यांवर घडलेल्या आहेत. पुस्तकाबद्दल वेगळे काही सांगावयाचे नाही.कथा लहान आहेत. एकदा वाचाच.

  • Rating StarJaywant Bhabad

    साहित्यातील निर्भय मुद्रा म्हणजे महाश्वेतादेवी..... महाश्वेता देवी या कार्यकर्त्यां आणि ज्ञानपीठ विजेत्या लेखिका होत्या. त्यांच्या कथांच्या अनुवादांच्या निमित्ताने प्रथम माझा त्यांच्या साहित्याशी परिचय झाला. तेव्हाच त्यांच्या लेखनातून भारतातील दिवासींचे जीवन किती कष्टदायक आहे, त्यांना (विशेषत: बिहार, उत्तर प्रदेश या भागातील) जमीनदार कसे त्रास देतात, वेठबिगार म्हणून राबवून घेतात, काम झाल्यानंतर त्यांचे अगदी खूनही करून ते कसे पचवतात याचे दाहक दर्शन झाले. ‘मीठ आणि इतर कथा’ हा कथासंग्रह त्यासाठी वाचायला हवा. त्यातील ‘बियाणं’, ‘मीठ’ या कथा कशा अस्वस्थ करून सोडतात, याचा अनुभव घ्यायला हवा. *महाश्वेता देवींनी अगदी महाराष्ट्रातल्या आदिवासींवरही कथा लिहिल्या आहेत.कोरकू आदिवासींच्या कुपोषणावर त्यांनी ‘महादू : एक मिथक’ या शीर्षकाची कथा लिहिली आहे. आदिवासींच्या पोटातली भूक आणि त्यांचा एकंदर व्यवस्थेबद्दलचा संताप या कथेत दिसतो. त्या कथेत कुपोषणामुळे महादू हा आदिवासी मरतो, पण त्याच्या मृत्यूनंतरचे महाश्वेता देवींनी केलेले वर्णन कुणी तरी उच्चभ्रूंच्या तोंडात जोरदार झापड मारल्यासारखे आहे. त्या कथेशेवटी लिहितात, ‘मग महादू उठून उभा राहिला. त्याची उंची वाढत वाढत गेली. आपले दोन्ही पाय मुंबईवर रोवून तो उभा राहिला. प्रथम त्याने खाल्ली उषाकिरण बिल्डिंग, मग खाल्ले सीएसटी स्टेशन, मग खाल्ले ताजमहाल हॉटेल. मुंबईतल्या इमारती त्याने खाऊन टाकल्या. आणि तो ओरडत राहिला, ‘मला भूक लागलीय, मला खायला द्या! मला भूक लागलीय, मला खायला द्या!’ (या कथेवर पुण्याचे छायाचित्रकार संदेश भंडारी यांनी ‘महादू’ याच शीर्षकाचा एक मराठी चित्रपट काही वर्षांपूर्वी काढला होता. पण तो महाराष्ट्रभर पोचला नाही. चित्रा पालेकरांनी काढलेला ‘बांयेन’- म्हणजे डाकीण- या कथेवरील ‘मातीमाय’ हा चित्रपट जरा बऱ्यापैकी पोहोचला.) महाराष्ट्र-कर्नाटकच्या सीमेवरील जोगत्याची समस्याही त्यांनी आपल्या ‘शेष जोगता’ या कथेत मांडली आहे. जोगता प्रथा नष्ट व्हायला हवी, असा संकेत त्यांनी या कथेत दिला होता. ...Read more

  • Rating StarDAINIK GAONKARI 30-1-2011

    या पुस्तकातील ‘पंचकन्या’, ‘कुंती आणि निषादीन’, ‘सौवाली’ या तीनही कथा कालानुक्रमे कुरुक्षेत्रावरील महायुद्ध संपल्यानंतरच्या काळातील वेगवेगळ्या महत्त्वाच्या तीन टप्प्यांवर घडलेल्या आहेत. या पुस्तकाद्वारे लेखिका महाश्वेता देवी यांनी महाभारताच्या कथेतील ाही घटना जनसामान्यांच्या दृष्टीने मांडल्या आहेत. धर्मयुद्धाच्या नावाखाली झालेल्या युद्धात, लोकवृत्तीतील जातिसमूह, स्त्री-पुरुष, वन्य जाती यांची भूमिका काय होती? या घटकांची संस्कृती, त्यांच्या चालीरिती, मान्यता, त्यांची विचार पद्धती काय होती? हे या कथांच्या माध्यमातून मांडतात. ‘कुरुक्षेत्रानंतर’ या कथा संग्रहातील कथा प्रथमदर्शनी महाभारतातील उपकथानके वाटली तरी यातील आशय नव्या दृष्टीकोनाची मांडणी करतात. राजवृत्तातील उच्चभ्रू, दांभिक राजसंस्कृती विरुद्ध निसर्ग नियमांशी जास्त सुसंगत असणारी, अधिक मानवी अशी लोकसंस्कृती यांच्यातील संघर्ष, विरोधाभास या सर्व कथांमधून महाश्वेतादेवींनी पुढे आणला आहे. महावेतादेवींच्या या कथांच्या निमित्ताने दोन समांतर संस्कृतीतील संघर्षाकडे अधिक मानवी पद्धतीने पाहण्याची दृष्टी आपल्याला लाभते हेच त्यांच्या साहित्याचे सामर्थ्य आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL, PUNE 6-6-2010

    महाभारत म्हणजे भारतीय जीवनाचा अविभाज्य भाग. त्या ‘धर्मयुद्धात’ अनेकांची होरपळ झाली. हे पुस्तक महाभारताकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन देतं. वाचकाला वेढून टाकतं. महाश्वेतादेवींनी केलेलं हे विचारमंथन आपल्यालाही नवीन विचारसरणी देतं. अनुवाद केला आहे वर्षा काे यांनी. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

A-AMITABHCHA
A-AMITABHCHA by G.B. DESHMUKH Rating Star
प्रा. डॉ . वैशाली रवी देशमुख, अमरावती

वाचनाचे फायदे सांगताना प्रसिद्ध इंग्रजी लेखक फ्रान्सिस बेकन म्हणतो `रीडिंग मेकेथ अ फुल मॅन`. वाचनामुळे माणूस परिपूर्ण होतो. क्वचित एखादं असं पुस्तक हाती येतं जे वाचल्यानंतर ह्या परिपूर्णतेची , आत्यंतिक समाधानाची जाणीव होते . नुकतंच जी. बी. देशुख यांचं `अ- अमिताभचा` हे पुस्तक हाती पडलं एका बैठकीत ते वाचून संपवलं आणि काहीतरी माहितीपर तरीही दर्जेदार आणि साहित्यिक मूल्य असणारं पुस्तक वाचण्याचा आनंद प्राप्त झाला. सीमा आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात काम करून निवृत्त झालेल्या जीबी देशमुखांनी २०२० मध्ये अमिताभ बच्चनच्या कारकिर्दीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त त्यांच्या विविध ५० सिनेमातील भूमिकांचे विश्लेषण करणारे साप्ताहिक सदर दैनिक सकाळ मध्ये प्रकाशित केले. कोरोना काळात लिहिलेल्या या लेखमालेला त्यावेळी प्रचंड प्रतिसाद मिळाला. केवळ ज्येष्ठच नाही तर तरुण वाचकांनीही या लेखमालिकेला पसंतीची पावती दिली. २०२२ मध्ये मेहता पब्लिकेशनने अमिताभ बच्चनच्या एकूण ६२ सिनेमांवर आधारित लेख `अ अमिताभचा` या पुस्तक रूपाने प्रकाशित केले. १९६९ पासून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीला पाच दशकांपेक्षा अधिक काळ लोटला तरीही त्याचे सिनेरसिकांच्या भावविश्वावर असलेले अधिराज्य कायम आहे. ती जादू कमी ओसरण्याचं नावच घेत नाही तर ती दिवसेंदिवस वाढत आहे . किरकोळ शरीरयष्टी, भरमसाठ उंची आणि सौंदर्याच्या साचेबंद व्याख्येत न बसणारा चेहरा असलेला अमिताभ आणि त्याला मिळालेली अफाट लोकप्रियता याची सांगड घालणे सर्वसामान्य व्यक्तीच्या आकलनापलीकडचे आहे. अमिताभ बच्चनचे प्रचंड चाहते असलेले जी . बी देशमुख यांच्यासाठी `अ` हा अमिताभचाच आहे. परंतु केवळ एक चाहते म्हणून त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं नाही तर अमिताभ बच्चनचे जे गारुड कित्येक दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर आहे त्यामागची नेमकी कारणे कोणती असू शकतात हे अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने शोधण्याचा प्रयत्न त्यांनी या पुस्तकात केलेला आहे. एक रसिक, चोखंदळ प्रेक्षक, अभ्यासक आणि समीक्षक म्हणून या पुस्तकात लेखक आपल्या समोर येतात. `बेमिसाल` पासून `झुंड` या चित्रपटा पर्यंत अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीतील उत्तमोत्तम ६२ सिनेमांचा लेखकांनी या पुस्तकात परामर्ष घेतलेला आहे. या चित्रपटांमधील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित सर्व बाबींचे अत्यंत अभ्यास पूर्वक रसग्रहण केलेले आहे. `अमिताभ बच्चन चांगला कलाकार आहे` किंवा `अमुक अमुक चित्रपट चांगला आहे` असं जेव्हा एखादा सर्वसामान्य प्रेक्षक म्हणतो त्यावेळेस हे आवडणं किंवा चांगलं असणं नेमकं का आहे याची उत्तरं देण्याचा प्रयत्न लेखकाने प्रत्येक लेखात केलेला आहे. प्रत्येक चित्रपटातील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित हायलाइट्स जसे की, एखादा उत्कट प्रसंग, गाणे, नृत्य, मारामारीचे दृश्य यावर लेखकाने प्रकाश टाकलेला आहे. आपण जर तो चित्रपट पाहिला असेल तर लेखकाने वर्णन केलेले प्रसंग जसेच्या तसे डोळ्यासमोर उभे राहतात आणि बघितला नसेल तर तो चित्रपट आपण पाहिलाच पाहिजे अशी तीव्र इच्छा मनात निर्माण होते. उदाहरणार्थ, शोले या चित्रपटातील रसग्रहणात ,चेहऱ्यावरचे रेषाही ढळू न देता अमिताभने फेकलेले वन लाइनर्स, बुद्धीची चमक दाखवणारे शांतपणे केलेले विनोद, हळुवार प्रेमासाठी त्याचं आतल्या आत झुरणं , मित्राच्या मांडीवर प्राणत्यागाचे उत्कट दृश्य, आणि पिढ्यानपिढ्या लक्षात राहिलेला मावशी लीला मिश्रा सोबतचा विनोदी संवाद यांचे परिणामकारक वर्णन करून त्यांनी अमिताभची उत्तुंग अभिनय क्षमता उलगडून दाखवली आहे. या पुस्तकाला वाचनीय बनवणारा एक घटक म्हणजे लेखकाने वापरलेली भाषा. अत्यंत साध्या, सोप्या आणि अनुभवातून आलेल्या शब्दातून लेखकाने अमिताभ बच्चन भूमिकांचा उत्तरोत्तर चढत जाणारा आलेख शब्दांकित केला आहे. लेखकाच्या भाषा प्रभुत्वाचे साक्ष देणारी अनेक वाक्य पुस्तकांमध्ये जागजागी आढळतात. एका ठिकाणी ते लिहितात, `अमिताभने सिनेमातील विनोदाची सूत्र हाती घेतली तेव्हापासून विनोदी कलाकारांवर जणू बेकारीचं संकट कोसळलं होतं. प्रेक्षकांना दिलेल्या मनोरंजनाच्या वचनाशी `नमक हलाली` करणाऱ्या प्रकाश मेहरा आणि अमिताभ या जोडीने प्रेक्षकांना `और हम नाचे बिन घुंगरू के` असा आनंद दिला होता. असेच एक सुंदर वाक्य- `अमिताभचा उंट मनोरंजनाचा अख्खा तंबू व्यापून बसला होता`. लेखकाच्या ओघवत्या आणि मनाला भिडणाऱ्या भाषा शैलीचं एक उदाहरण मिली चित्रपटाच्या रसग्रहणातील या परिषदेतून दिसून येत: "शेखरच्या मनावर चढलेली उदासीची पुटं अमिताभच्या कसदार अभिनयामुळे आपल्याला अस्वस्थ,उदास करून सोडतात. दारूच्या नशेतील अमिताभचं एक दृश्य मस्त जमलं होतं . मोबाईल, टीव्ही इत्यादी आधुनिक साधनं व्यवहारात येण्याच्या आधीचा तो काळ होता. मिली आजारामुळे घरात बंदिस्त झाल्यानंतर त्या दोघात नोकराच्या माध्यमातून जो पत्र व्यवहार होतो तो आजच्या मोबाईल चॅटिंग पेक्षाही प्रभावी वाटतो. रोज मिलीला वरच्या मजल्यावरून खालच्या मजल्यावर गुलदस्ता पाठवणारा अमिताभ एका चिठ्ठीत लिहितो `जो गुलदस्ता बनके खुद आ जाऊ तो कहा रखुं . ` हे रोमँटिसिझम खूप वरच्या स्तराचं होतं. अमर्याद दुःखाची वीण घट्ट करत जाताना किशोर कुमारच्या दर्दभऱ्या स्वरात `बडी सुनी, सुनी है जिंदगी ये जिंदगी` आणि `आये तुम याद मुझे गाने लगी हर धडकन` ही दोन गाणी वातावरण औदासिन्यानं भरून टाकतात. मनाचा चांगला पण लहानपणी आई वडिलांच्या बाबतीत घडलेल्या घटनेने आणि लोकांनी त्याकरिता डिवचल्यानं कच खाल्लेला, प्रेमाची आस लागलेला एक तरुण अमिताभने लाजवाब रंगवला होता. या पुस्तकाच्या रंजकतेत भर टाकणारा आणखी एक घटक म्हणजे लेखकाचे आत्मचरित्रात्मक निवेदन. प्रत्येक चित्रपटाच्या बाबतीत तो चित्रपट त्यांनी केव्हा पाहिला, कुणाबरोबर पाहिला,त्यावेळी ते किती वर्षांचे होते आणि त्या चित्रपटाचा त्यांच्या भावविश्वावर कसा परिणाम झाला याचा उल्लेख जागजागी केलेला आहे. लेखकाच्या पिढीतील वाचकांना यातून पुनः प्रत्ययाचा आनंद मिळतो. आणि आजच्या पिढीतील इतर वाचकांसाठीही ही बाब रंजक ठरते. पुस्तकाच्या मलपृष्ठावर लेखक म्हणतात, `1973 साली आम्ही पाचवीत असताना आम्हाला प्रथमच हिंदी सिनेमातील नायकाची `ये पोलीस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नही`, अशी आगळीवेगळी मिजास पडद्यावर बघायला मिळाली आणि आता निवृत्तीला आलो तर हाच अद्भुत माणूस आम्हाला `पिंक` या महिलाप्रधान सिनेमात `ना का मतलब सिर्फ ना होता है`, असं ठणकावतो, `बदला` ह्या रहस्यपटात तितक्याच जोरकसपणे `सबका सच अलग अलग होता है ,` असं तत्वज्ञान मांडतो आणि अगदी अलीकडच्या `झुंड` मध्ये झोपडपट्टीतील धटिंगण मुलांच्या घोळक्याला `झुंड नाही, टीम... `म्हणायची शिकवण देतो तेव्हा आजही त्याचं म्हणणं आमच्या हृदयात थेट उतरतं .` पुस्तक वाचत असताना लेखकाच्या अफाट निरीक्षणशक्तीचे आणि अभ्यासू वृत्तीचे दर्शन घडते . विविध दिग्दर्शकांनी अमिताभच्या अभिनयक्षमतेचा केलेला वापर , अमिताभच्या डोळ्यातून सशक्तपणे व्यक्त झालेले हृदयस्पर्शी भाव, वेगवेगळ्या चित्रपटात त्याने केलेला लाथेचा उपयोग, त्याची वैशिष्ट्यपूर्ण नृत्य, आणि भारदस्त आवाजातील संवाद आणि गाणी यांचं वर्णन वाचत असताना लेखकाची संशोधक वृत्ती तर जाणवतेच परंतु आपणही हे चित्रपट पाहून हा रसास्वाद घ्यायलाच हवा ही इच्छा वाचकांच्या मनात प्रकर्षाने निर्माण होते.यातच या पुस्तकाचे फार मोठे यश सामावले आहे हे नक्की! ...Read more

SAAD GHALATO KALAHARI
SAAD GHALATO KALAHARI by MARK & DELIA OWENS Rating Star
मोहन देशपांडे नागपुर

cry of kalahari ह्या पुस्तके अनुवाद हिंदी सर्वोत्तम (RD) मध्ये कित्येक वर्षापूर्वी वाचले होते. माझ्याजवळ, जपून ठेवलेल्या पुस्तकामधे ते पुस्तक गहाळ झाले. मग 4 वर्षापूर्वी हे पुस्तक मिळाले व विकत घेतले. ते अनेक वेळा वाचून काढले, तरी प्रत्येकवेळी वेगळा नंद होतो. ती तुमची रसाळ भाषेची किमया. ह्या मुळेच Deceiption valley एकदा तरी बघता यावी ही इच्छा तुमचे अभिनंदन व धन्यवाद... ...Read more