* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: AFTER KURUKSHETRA
  • Availability : Available
  • Translators : VARSHA KALE
  • ISBN : 9788184980943
  • Edition : 3
  • Publishing Year : JANUARY 2010
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 63
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : SHORT STORIES
Quantity
Buying Options:
  • Print Books:
MAHABHARATA, THE INEVITABLE PART OF INDIAN LIFE AND CULTURE. IT IS AN EPIC. IT HAS MANY QUALITIES. IT DESCRIBES ALL TYPE OF MENTALITIES. IT IS SAID THAT WHATEVER IS PRESENT IN THE WORLD OUTSIDE IS ALREADY DESCRIBED IN THIS EPIC, AND WHATEVER IS NOT THERE IN MAHABHARATA IS NOWHERE IN THE UNIVERSE. IT IS FULL OF INSCRUTABLE HAPPENINGS, ABSTRUSE CHARACTERS, IT CONFUSES A COMMON MAN YET CAPTURES HIM. THE WAR PLAYED ON THE KURUKSHETRA WAS GIVEN A CONVENIENT NAME, DHARMAYUDDHA. IT ENGULFED THE CONTEMPORARY WILD CULTURE TOO. IT BURNT MANY OTHER TRADITIONS AND PERSONALITIES. THE SURPRISING PART IS THE VALUES OF LIFE WHICH HAD ALWAYS MADE LIVING EASY HAD SHATTERED THE VERY CORE OF OUR "BEING` REVEALING THE PHILOSOPHIES OF LIFE. KAURAV AND PANDAVAS HAD BOTH BECOME VERY HAUGHTY. VICE AND VIRTUES HAD BEEN LONG SINCE FORGOTTEN, JUSTICE AND INJUSTICE WERE IGNORED COMPLETELY. ALL THESE VIEWS GIVE US A NEW DIRECTION TO THINK ABOUT. AND WHEN THE READER THINKS THAT HE IS ABOUT TO REVEAL THE ANSWERS TO SOME OF THE QUESTIONS, NEW QUESTIONS RISE UP AGAIN. THIS BOOK WILL CERTAINLY COMPEL THE READER TO THINK ABOUT MAHABHARATA IN A DIFFERENT WAY, LIKE NEVER BEFORE.
भारतीय जीवनाच्या अविभाज्य भाग असणारं महाभारत! अतर्क्य घटना, व्यक्तिरेखा यांच्या अगम्य वागणुकीनं सामान्य माणसाला चक्रावून टाकत विचार करायला लावणारं, तरीही मोहवणारं महाकाव्य! `धर्मयुद्धा`च्या नावाखाली झालेल्या कुरुक्षेत्रावरील या युद्धात समकालीन वन्यजाती-समूह आणि त्यातूनही इतर समाजघटक, व्यक्ती यांची होरपळ झाली. विशिष्ट अशी जीवनमूल्य जी त्यांना जगण्याचं बळ देऊन गेली, तीच आपल्या विचारांच्या अथांग जलाशयाला ढवळून काढत आशावादाचे, प्रवाहीपणाचे तत्त्वज्ञान आपल्याला देतात. पापपुण्याची, न्याय-अन्यायाची दुर्लक्षित बाजू, कौरव-पांडव दोन्ही बाजूंचा सत्तेचा उन्मत्तपणा आपल्याला नवीन विचारसरणी प्रदान करतो. आणि मग... अनेक प्रश्नांची उकल होते आहे, असं वाटत असतानाच वाचक परत नव्या प्रश्नांत गुरफटून जातो. `महाभारत` समजावून घेताना त्याकडे नव्या दृष्टीकोनानं पाहायला लावणारं... वाचकाला वेढून टाकणारं... कुरुक्षेत्रानंतर...
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #KURUKSHETRANANTER #AFTERKURUKSHETRA #कुरुक्षेत्रानंतर #SHORTSTORIES #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #VARSHAKALE #MAHASWETADEVI "
Customer Reviews
  • Rating StarChandrakant Kavathekar

    या पुस्तकातल्या तीनही कथा कालानुक्रमे महायुद्ध संपल्यानंतरच्या काळातील वेगवेगळ्या महत्त्वाच्या तीन टप्प्यांवर घडलेल्या आहेत. पुस्तकाबद्दल वेगळे काही सांगावयाचे नाही.कथा लहान आहेत. एकदा वाचाच.

  • Rating StarJaywant Bhabad

    साहित्यातील निर्भय मुद्रा म्हणजे महाश्वेतादेवी..... महाश्वेता देवी या कार्यकर्त्यां आणि ज्ञानपीठ विजेत्या लेखिका होत्या. त्यांच्या कथांच्या अनुवादांच्या निमित्ताने प्रथम माझा त्यांच्या साहित्याशी परिचय झाला. तेव्हाच त्यांच्या लेखनातून भारतातील दिवासींचे जीवन किती कष्टदायक आहे, त्यांना (विशेषत: बिहार, उत्तर प्रदेश या भागातील) जमीनदार कसे त्रास देतात, वेठबिगार म्हणून राबवून घेतात, काम झाल्यानंतर त्यांचे अगदी खूनही करून ते कसे पचवतात याचे दाहक दर्शन झाले. ‘मीठ आणि इतर कथा’ हा कथासंग्रह त्यासाठी वाचायला हवा. त्यातील ‘बियाणं’, ‘मीठ’ या कथा कशा अस्वस्थ करून सोडतात, याचा अनुभव घ्यायला हवा. *महाश्वेता देवींनी अगदी महाराष्ट्रातल्या आदिवासींवरही कथा लिहिल्या आहेत.कोरकू आदिवासींच्या कुपोषणावर त्यांनी ‘महादू : एक मिथक’ या शीर्षकाची कथा लिहिली आहे. आदिवासींच्या पोटातली भूक आणि त्यांचा एकंदर व्यवस्थेबद्दलचा संताप या कथेत दिसतो. त्या कथेत कुपोषणामुळे महादू हा आदिवासी मरतो, पण त्याच्या मृत्यूनंतरचे महाश्वेता देवींनी केलेले वर्णन कुणी तरी उच्चभ्रूंच्या तोंडात जोरदार झापड मारल्यासारखे आहे. त्या कथेशेवटी लिहितात, ‘मग महादू उठून उभा राहिला. त्याची उंची वाढत वाढत गेली. आपले दोन्ही पाय मुंबईवर रोवून तो उभा राहिला. प्रथम त्याने खाल्ली उषाकिरण बिल्डिंग, मग खाल्ले सीएसटी स्टेशन, मग खाल्ले ताजमहाल हॉटेल. मुंबईतल्या इमारती त्याने खाऊन टाकल्या. आणि तो ओरडत राहिला, ‘मला भूक लागलीय, मला खायला द्या! मला भूक लागलीय, मला खायला द्या!’ (या कथेवर पुण्याचे छायाचित्रकार संदेश भंडारी यांनी ‘महादू’ याच शीर्षकाचा एक मराठी चित्रपट काही वर्षांपूर्वी काढला होता. पण तो महाराष्ट्रभर पोचला नाही. चित्रा पालेकरांनी काढलेला ‘बांयेन’- म्हणजे डाकीण- या कथेवरील ‘मातीमाय’ हा चित्रपट जरा बऱ्यापैकी पोहोचला.) महाराष्ट्र-कर्नाटकच्या सीमेवरील जोगत्याची समस्याही त्यांनी आपल्या ‘शेष जोगता’ या कथेत मांडली आहे. जोगता प्रथा नष्ट व्हायला हवी, असा संकेत त्यांनी या कथेत दिला होता. ...Read more

  • Rating StarDAINIK GAONKARI 30-1-2011

    या पुस्तकातील ‘पंचकन्या’, ‘कुंती आणि निषादीन’, ‘सौवाली’ या तीनही कथा कालानुक्रमे कुरुक्षेत्रावरील महायुद्ध संपल्यानंतरच्या काळातील वेगवेगळ्या महत्त्वाच्या तीन टप्प्यांवर घडलेल्या आहेत. या पुस्तकाद्वारे लेखिका महाश्वेता देवी यांनी महाभारताच्या कथेतील ाही घटना जनसामान्यांच्या दृष्टीने मांडल्या आहेत. धर्मयुद्धाच्या नावाखाली झालेल्या युद्धात, लोकवृत्तीतील जातिसमूह, स्त्री-पुरुष, वन्य जाती यांची भूमिका काय होती? या घटकांची संस्कृती, त्यांच्या चालीरिती, मान्यता, त्यांची विचार पद्धती काय होती? हे या कथांच्या माध्यमातून मांडतात. ‘कुरुक्षेत्रानंतर’ या कथा संग्रहातील कथा प्रथमदर्शनी महाभारतातील उपकथानके वाटली तरी यातील आशय नव्या दृष्टीकोनाची मांडणी करतात. राजवृत्तातील उच्चभ्रू, दांभिक राजसंस्कृती विरुद्ध निसर्ग नियमांशी जास्त सुसंगत असणारी, अधिक मानवी अशी लोकसंस्कृती यांच्यातील संघर्ष, विरोधाभास या सर्व कथांमधून महाश्वेतादेवींनी पुढे आणला आहे. महावेतादेवींच्या या कथांच्या निमित्ताने दोन समांतर संस्कृतीतील संघर्षाकडे अधिक मानवी पद्धतीने पाहण्याची दृष्टी आपल्याला लाभते हेच त्यांच्या साहित्याचे सामर्थ्य आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL, PUNE 6-6-2010

    महाभारत म्हणजे भारतीय जीवनाचा अविभाज्य भाग. त्या ‘धर्मयुद्धात’ अनेकांची होरपळ झाली. हे पुस्तक महाभारताकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन देतं. वाचकाला वेढून टाकतं. महाश्वेतादेवींनी केलेलं हे विचारमंथन आपल्यालाही नवीन विचारसरणी देतं. अनुवाद केला आहे वर्षा काे यांनी. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

राधेय.... लेखक रणजित देसाई... मित्र कसा असावा...कर्णासारखा दातृत्व कसं असावं...कर्णासारखं असा हा कर्ण... त्याला अंगराज म्हणावं, दान देणारा दाता म्हणावं, राधेय म्हणावं कि कौतेय... काहीही म्हणा पण कर्णासारखा दाता कर्णानंतर कधी झाला नाही आणि कधी होणरही नाही... रणजित देसाई लिखीत कर्णचरीत्र राधेय आज हातावेगळं झालं ते अश्रुभरल्या नयनांनी...ज्याचा अंत करायला स्वतः देवाधिदेव कृष्णाला अर्जुनाचं सारथ्य करावं लागलं यातच अंगराज कर्णांचं विरत्व अधोरेखीत होत आहे. जन्मापासुन ज्याला केवळ सुतपुत्र म्हणुन वागणुक मिळाली असा तो कर्ण स्वतःच्या बळावर इतका महान लढवय्या बनला. पुस्तकाच्या प्रास्ताविकात देसाईंनी म्हटलं आहे की राधेय मधला कर्ण महाभारतात शोधायची गरज नाही. प्रत्येकाच्या मनातच तो दडलेला असतो, कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत, तर त्यात हा कर्ण दिसेल. त्याचं दु:खं, पोरकेपण आणि त्यातून पार होवून एक अनोखी ऊंची गाठणारं त्याचं दातृत्व, व्यक्तित्व याचं एक भव्य, शोकात्म चित्र राधेय मधून उभं राहतं. राधेय या कादंबरीत रणजित देसाईंच्या शब्दांनी कर्णाची अनेक रुपे अनुभवता आली. त्यामध्ये राधाई आणि वृषाली सोबतचा कर्ण, दुर्यौधनासोबतचा कर्ण, कृष्णासोबतचा कर्ण, रणांगणावरचा कर्ण आणि नदीकाठी पाठमोरा ऊभा राहत दान करत असलेला कर्ण अशा अनेक रुपांनी प्रत्येकवेळी वेगळा भासला. वृषसेन आणि चक्रधराच्या मृत्युने हळवा झालेला कर्णही वाचकाच्या डोळ्यातही पाणी आणवतो... समोर मृत्यु दिसत असताना सुध्दा केवळ दिलेल्या वचनामुळे हातातील धनुष्याचा त्याग करुन शस्त्रहिन हेणारा कर्ण रणजित देसाईंच्या शब्दांमुळे आजन्म लक्षात राहील. कर्णासारखं होणं कुणालाही कदापि शक्य नाही पण त्यातला एखादा जरी चांगला गुण अंगी बाळगण्याचा प्रयत्न प्रत्येकाने नक्कीच केला पाहीजे... प्रत्येकाच्या संग्रही असावं आणि एकदा तरी वाचावं असं पुस्तक रणजित देसाई लिखीत...राधेय... © विश्वजित शिंत्रे. ...Read more

BAJIND
BAJIND by PAHILWAN GANESH MANUGADE Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

काही पुस्तकं अशी असतात कि कितीही वेळा वाचली तरीही त्या पुस्तकाचा कंटाळा येत नाही. पुन्हा पुन्हा वाचावं असं वाटतं आणि त्याची पारायणं होतचं राहतात. असचं एक पुस्तक म्हणजे *पै.गणेश मानुगडे* लिखीत *बाजिंद.* *बाजिंद* हे एक असं रसायन आहे जे प्रत्ेकाला अक्षरशः वेड लावतं. साधारण चार पाच वर्षांपुर्वी पहील्यांदा वाचलं होतं, त्यानंतर बर्‍याचवेळा आणि आज पुन्हा एकदा. त्याबद्दलची एक सुंदर आठवण म्हणजे माझ्या बहिणीच्या गरोदरपणाच्या दिवसात ग्रहण लागलं होतं आणि त्या ग्रहणकाळात तिला मी *बाजिंद* वाचुन दाखवलं होतं, असं हे पुस्तक. कुस्ती, प्रेमकथा, हेरगिरी, गुढ रहस्यमय बाजिंदचं जंगल, पशु-पक्षी व हिंस्र जनावरांची भाषा, बहीर्जी नाईक आणि अवघ्या हिंदुस्थानाचे आणि मराठी मनाचे आराध्यदैवत *श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज* असा या पुस्तकाचा प्रवास. शेवटाला अंगावर काटा आला कि समजावं आपण या पुस्तकाच्या प्रेमात पडलोय. रायगडच्या डोंगरदरीत वसलेल्या धनगरवाडीचा सखाराम धनगर आणि त्याच्यासोबत मल्हारी, सर्जा आणि नारायण निघालेत छत्रपती शिवरायांना भेटायला. कारण टकमक टोकावरुन ज्या गद्दारांचा कडेलोट व्हायचा ती प्रेतं येऊन पडायची ती थेट धनगरवाडीच्या आसपासच्या जंगलात आणि त्यामुळे आसपासच्या परीसरात जंगली जनावरांचा सुळसुळाट खुप वाढला होता. त्यांची मेजवानी व्हायची पण जर कधी कडेलोट नसायचा तेव्हा ती हिंस्त्र जनावरं आसपासच्या लोकवस्तीत शिरायची. हिच कैफियत मांडायला सखाराम धनगर आणि इतर मंडळी रायगडी निघतात. त्यानंतरचा त्यांचा प्रवास आणि कथा वाचकाला इतकी गुरफटवुन टाकते कि शेवटच्या पानावरची शेवटची ओळ कधी वाचुन संपते, कळतही नाही. त्यांची स्वराज्यहेर खंडोजीची भेट मग सावित्री, वस्तादकाका, वाचतानाही भितीदायक दिसणारं जंगल, कधीही न पाहीलेलं महादेवाचं मंदीर, खंडोजीचा असणारा ट्विस्ट आणि मग बहिर्जी नाईक आणि मग थेट रायगड आणि महाराज, सगळं प्रत्यक्षात आपल्यासमोर घडतयं कि असा भास निर्माण करणारं असं हे पुस्तक. एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी कथा, एकदा वाचली कि पुन्हा एकदा वाचण्याचा मोह आवरता येत नाही अशी कथा, ज्यामध्ये असं बरचं काही जे वाचल्याशिवाय कळणार नाही. अजुन एक असं कि सातासमुद्रापार जगातील अव्वल गणली जाणारी इस्त्राईलची गुप्तहेर संघटना मोसाद यांच्या अभ्यासक्रमात बहिर्जी नाईक आणि आपलं हेरखातं शिकवलं जातं अशी अभिमान वाटणारी घटना आपल्या राज्यात घडलीय त्याचीच हि गोष्ट...बाजिंद... ...इकडे खंडोजीने सावित्रीला उचलुन जंगलातुन बरेच बाहेर आणले होते. पुढे डोंगराची कडेतुट होती आणि हजारो हात खोल फेसाळणार्‍या नदीचे विशाल पात्र...खंडोजीने एकदा मागे पाहीले आणि ताडले कि शिर्क्यांची फौज पाठलाग करत आहे...त्याने कशाचाही विचार न करता सावित्रीसह स्वतःला त्या कडेतुट वरुन त्या विशाल नदीच्या पात्रात झोकुन दिले...आणि... त्यासाठी वाचा *पै.गणेश मानुगडे* लिखीत...*बाजिंद..!!!* © विश्वजीत श्रीपती शिंत्रे. मु.पो.इंचनाळ, ता.गडहिंग्लज,जि.कोल्हापुर ०९९२२३१३९१९ ...Read more