* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: AFTER KURUKSHETRA
  • Availability : Available
  • Translators : VARSHA KALE
  • ISBN : 9788184980943
  • Edition : 3
  • Publishing Year : JANUARY 2010
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 63
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : SHORT STORIES
Quantity
Buying Options:
  • Print Books:
MAHABHARATA, THE INEVITABLE PART OF INDIAN LIFE AND CULTURE. IT IS AN EPIC. IT HAS MANY QUALITIES. IT DESCRIBES ALL TYPE OF MENTALITIES. IT IS SAID THAT WHATEVER IS PRESENT IN THE WORLD OUTSIDE IS ALREADY DESCRIBED IN THIS EPIC, AND WHATEVER IS NOT THERE IN MAHABHARATA IS NOWHERE IN THE UNIVERSE. IT IS FULL OF INSCRUTABLE HAPPENINGS, ABSTRUSE CHARACTERS, IT CONFUSES A COMMON MAN YET CAPTURES HIM. THE WAR PLAYED ON THE KURUKSHETRA WAS GIVEN A CONVENIENT NAME, DHARMAYUDDHA. IT ENGULFED THE CONTEMPORARY WILD CULTURE TOO. IT BURNT MANY OTHER TRADITIONS AND PERSONALITIES. THE SURPRISING PART IS THE VALUES OF LIFE WHICH HAD ALWAYS MADE LIVING EASY HAD SHATTERED THE VERY CORE OF OUR "BEING` REVEALING THE PHILOSOPHIES OF LIFE. KAURAV AND PANDAVAS HAD BOTH BECOME VERY HAUGHTY. VICE AND VIRTUES HAD BEEN LONG SINCE FORGOTTEN, JUSTICE AND INJUSTICE WERE IGNORED COMPLETELY. ALL THESE VIEWS GIVE US A NEW DIRECTION TO THINK ABOUT. AND WHEN THE READER THINKS THAT HE IS ABOUT TO REVEAL THE ANSWERS TO SOME OF THE QUESTIONS, NEW QUESTIONS RISE UP AGAIN. THIS BOOK WILL CERTAINLY COMPEL THE READER TO THINK ABOUT MAHABHARATA IN A DIFFERENT WAY, LIKE NEVER BEFORE.
भारतीय जीवनाच्या अविभाज्य भाग असणारं महाभारत! अतर्क्य घटना, व्यक्तिरेखा यांच्या अगम्य वागणुकीनं सामान्य माणसाला चक्रावून टाकत विचार करायला लावणारं, तरीही मोहवणारं महाकाव्य! `धर्मयुद्धा`च्या नावाखाली झालेल्या कुरुक्षेत्रावरील या युद्धात समकालीन वन्यजाती-समूह आणि त्यातूनही इतर समाजघटक, व्यक्ती यांची होरपळ झाली. विशिष्ट अशी जीवनमूल्य जी त्यांना जगण्याचं बळ देऊन गेली, तीच आपल्या विचारांच्या अथांग जलाशयाला ढवळून काढत आशावादाचे, प्रवाहीपणाचे तत्त्वज्ञान आपल्याला देतात. पापपुण्याची, न्याय-अन्यायाची दुर्लक्षित बाजू, कौरव-पांडव दोन्ही बाजूंचा सत्तेचा उन्मत्तपणा आपल्याला नवीन विचारसरणी प्रदान करतो. आणि मग... अनेक प्रश्नांची उकल होते आहे, असं वाटत असतानाच वाचक परत नव्या प्रश्नांत गुरफटून जातो. `महाभारत` समजावून घेताना त्याकडे नव्या दृष्टीकोनानं पाहायला लावणारं... वाचकाला वेढून टाकणारं... कुरुक्षेत्रानंतर...
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #KURUKSHETRANANTER #AFTERKURUKSHETRA #कुरुक्षेत्रानंतर #SHORTSTORIES #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #VARSHAKALE #MAHASWETADEVI "
Customer Reviews
  • Rating StarChandrakant Kavathekar

    या पुस्तकातल्या तीनही कथा कालानुक्रमे महायुद्ध संपल्यानंतरच्या काळातील वेगवेगळ्या महत्त्वाच्या तीन टप्प्यांवर घडलेल्या आहेत. पुस्तकाबद्दल वेगळे काही सांगावयाचे नाही.कथा लहान आहेत. एकदा वाचाच.

  • Rating StarJaywant Bhabad

    साहित्यातील निर्भय मुद्रा म्हणजे महाश्वेतादेवी..... महाश्वेता देवी या कार्यकर्त्यां आणि ज्ञानपीठ विजेत्या लेखिका होत्या. त्यांच्या कथांच्या अनुवादांच्या निमित्ताने प्रथम माझा त्यांच्या साहित्याशी परिचय झाला. तेव्हाच त्यांच्या लेखनातून भारतातील दिवासींचे जीवन किती कष्टदायक आहे, त्यांना (विशेषत: बिहार, उत्तर प्रदेश या भागातील) जमीनदार कसे त्रास देतात, वेठबिगार म्हणून राबवून घेतात, काम झाल्यानंतर त्यांचे अगदी खूनही करून ते कसे पचवतात याचे दाहक दर्शन झाले. ‘मीठ आणि इतर कथा’ हा कथासंग्रह त्यासाठी वाचायला हवा. त्यातील ‘बियाणं’, ‘मीठ’ या कथा कशा अस्वस्थ करून सोडतात, याचा अनुभव घ्यायला हवा. *महाश्वेता देवींनी अगदी महाराष्ट्रातल्या आदिवासींवरही कथा लिहिल्या आहेत.कोरकू आदिवासींच्या कुपोषणावर त्यांनी ‘महादू : एक मिथक’ या शीर्षकाची कथा लिहिली आहे. आदिवासींच्या पोटातली भूक आणि त्यांचा एकंदर व्यवस्थेबद्दलचा संताप या कथेत दिसतो. त्या कथेत कुपोषणामुळे महादू हा आदिवासी मरतो, पण त्याच्या मृत्यूनंतरचे महाश्वेता देवींनी केलेले वर्णन कुणी तरी उच्चभ्रूंच्या तोंडात जोरदार झापड मारल्यासारखे आहे. त्या कथेशेवटी लिहितात, ‘मग महादू उठून उभा राहिला. त्याची उंची वाढत वाढत गेली. आपले दोन्ही पाय मुंबईवर रोवून तो उभा राहिला. प्रथम त्याने खाल्ली उषाकिरण बिल्डिंग, मग खाल्ले सीएसटी स्टेशन, मग खाल्ले ताजमहाल हॉटेल. मुंबईतल्या इमारती त्याने खाऊन टाकल्या. आणि तो ओरडत राहिला, ‘मला भूक लागलीय, मला खायला द्या! मला भूक लागलीय, मला खायला द्या!’ (या कथेवर पुण्याचे छायाचित्रकार संदेश भंडारी यांनी ‘महादू’ याच शीर्षकाचा एक मराठी चित्रपट काही वर्षांपूर्वी काढला होता. पण तो महाराष्ट्रभर पोचला नाही. चित्रा पालेकरांनी काढलेला ‘बांयेन’- म्हणजे डाकीण- या कथेवरील ‘मातीमाय’ हा चित्रपट जरा बऱ्यापैकी पोहोचला.) महाराष्ट्र-कर्नाटकच्या सीमेवरील जोगत्याची समस्याही त्यांनी आपल्या ‘शेष जोगता’ या कथेत मांडली आहे. जोगता प्रथा नष्ट व्हायला हवी, असा संकेत त्यांनी या कथेत दिला होता. ...Read more

  • Rating StarDAINIK GAONKARI 30-1-2011

    या पुस्तकातील ‘पंचकन्या’, ‘कुंती आणि निषादीन’, ‘सौवाली’ या तीनही कथा कालानुक्रमे कुरुक्षेत्रावरील महायुद्ध संपल्यानंतरच्या काळातील वेगवेगळ्या महत्त्वाच्या तीन टप्प्यांवर घडलेल्या आहेत. या पुस्तकाद्वारे लेखिका महाश्वेता देवी यांनी महाभारताच्या कथेतील ाही घटना जनसामान्यांच्या दृष्टीने मांडल्या आहेत. धर्मयुद्धाच्या नावाखाली झालेल्या युद्धात, लोकवृत्तीतील जातिसमूह, स्त्री-पुरुष, वन्य जाती यांची भूमिका काय होती? या घटकांची संस्कृती, त्यांच्या चालीरिती, मान्यता, त्यांची विचार पद्धती काय होती? हे या कथांच्या माध्यमातून मांडतात. ‘कुरुक्षेत्रानंतर’ या कथा संग्रहातील कथा प्रथमदर्शनी महाभारतातील उपकथानके वाटली तरी यातील आशय नव्या दृष्टीकोनाची मांडणी करतात. राजवृत्तातील उच्चभ्रू, दांभिक राजसंस्कृती विरुद्ध निसर्ग नियमांशी जास्त सुसंगत असणारी, अधिक मानवी अशी लोकसंस्कृती यांच्यातील संघर्ष, विरोधाभास या सर्व कथांमधून महाश्वेतादेवींनी पुढे आणला आहे. महावेतादेवींच्या या कथांच्या निमित्ताने दोन समांतर संस्कृतीतील संघर्षाकडे अधिक मानवी पद्धतीने पाहण्याची दृष्टी आपल्याला लाभते हेच त्यांच्या साहित्याचे सामर्थ्य आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL, PUNE 6-6-2010

    महाभारत म्हणजे भारतीय जीवनाचा अविभाज्य भाग. त्या ‘धर्मयुद्धात’ अनेकांची होरपळ झाली. हे पुस्तक महाभारताकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन देतं. वाचकाला वेढून टाकतं. महाश्वेतादेवींनी केलेलं हे विचारमंथन आपल्यालाही नवीन विचारसरणी देतं. अनुवाद केला आहे वर्षा काे यांनी. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RAZOR SHARP
RAZOR SHARP by ASHWIN SANGHI Rating Star
सुनील माने, पुणे

लेखक अश्विन सांघी “द रोझाबल लाइन” या पहिल्याच कादंबरीने खूप लोकप्रिय झाला. प्राचीन भारतीय दंतकथा/ऐतिहासिक संदर्भ घेऊन त्याच्याभोवती आजच्या काळात रहस्यपूर्ण कथा लिहिणारा अश्विन. Chanakya’s Chant, The Krishna Key, The Sialkot Saga, Keepers of the Kalacakra, The Vault of Vishnu, The Magicians of Mazda अशा एकापेक्षा एक सुंदर रहस्य कादंबर्या “भारत सिरीज़” नावाने खूप प्रसिद्ध झाल्या. या सर्व कादंबऱ्या मी इंग्लिश मधेच वाचल्या. यांचा मराठी अनुवाद मेहता पब्लिशिंग हाउस यांच्याकडे उपलब्ध आहे. अश्विन सांघीने या भारत सिरीज शिवाय एक नवीन थ्रिल्लर सिरीज (कुत्ता कदम) सुरू केली आहे. त्यांतील पहिली कादंबरी Razor Sharp. एक सिरियल किलर मुंबईत एकानंतर एक खून पाडतोय. पोलिस चक्रावले आहेत. 1. रविवार दि २ फेब्रुवारी , गोरेगाव पश्चिममधे रवि मेहराचा खून होतो. त्याची बायको खुशी कॅाल सेंटरचा जॅाब करून रात्री ११.३० ला परत येते. खूप वेळा बेल वाजवून दार न उघडल्यामुळे ती उघडून आत येते तर रवि रक्ताच्या थारोळ्यात मरून पडलेला असतो. त्याचे हात पाठीमागे नायलॅान दोरीने बांधलेले असतात. त्याच्या छातीत सुरा खुपसलेला असतो. त्याच्या तोंडात काहीतरी खाद्य पदार्थ असतो. 2. सोमवार दि १० फेब्रुवारी , लोअर परळमधे सुचंद्रा अग्रवालचा खून. तिची कामवाली आल्यावर दार न उघडल्यामुळे सोसायटीवाले दार तोडतात. आत सुचंद्राचा खून झालेला. हात नायलॅान दोरीने मागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात काहीतरी खाद्यपदार्थ. पोलिस चक्रावलेले. मग पोलिसखाते जागे होते. त्यांचा नावाजलेला अधिकारी जो सस्पेंड झालेला आहे, त्या प्रकाश कदम, DCP याला बोलावले जाते. राज्याचे गृहमंत्री ओंकार लोखंडे, त्यांचा माणूस कमिशनर चव्हाण आणि उपगृहमंत्री जयंत गायकवाड व त्यांचा माणूस SCP राणे, मुंबईचा डॅान भाऊ पाटील जो लोखंडेचाच माणूस असतो, हे सर्व या केसच्या मागावर लागतात. कदम हा राणेंच्या ओळखीचा खास ऑफिसर असतो म्हणून त्यालाही इन्व्हेस्टीगेशनला बोलावले जाते. 3. मंगळवार दि १८ फेब्रुवारी , ठाणे येथे मंगला शहाचा खून. तिच्या शेजारणीमुळे हे कळते. मंगलाचे हात नायलॅान दोरीने पाठीमागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात खाद्यपदार्थ. पोलिस अधिकारी शिंदे कदमबरोबर येतात. मंगलाच्या चेहऱ्याजवळ कदमला पेस्टिसाईडचा वास येतो. चेहरा निळसर झालेला. खून झाल्यावर बॅाडीला हलवलेले दिसते. तो ऑफिसमध्ये जुन्या खूनांचे फोटो तपासतो. त्यांचीही बॅाडी खून केल्यावर हलवलेली दिसते. चेहऱ्यावर निळसर झाक दिसते. तिन्ही खून “फिनेक” ब्रॅंडच्या चाकूने केलेले असतात. हे समान धागे कदम त्याची मुलगी केतुल बरोबर चर्चा करतो. केतुलची आई काही वर्षांपूर्वी कदमला सोडून गेलेली असते. ती भाऊ पाटीलची सावत्र बहीण असते. पण सध्या ती कुठे आहे व काय करते हे माहित नसते. केतुल कोर्टात काम करत असते तसेच ती “शक्ती” या NGO मधेही काम करते. शक्ती हे सोनापूरमधुन सुटका केलेल्या वेश्यांचे पुनर्वसन करत असते. निर्मल नावाचा तिचा मित्र एथिकल हॅकर असतो. तिच्यावर प्रेम करत असतो. कदमला हार्ट अटॅक येऊन गेलेला व स्टेंट बसवलेला असतो. Depression मुळे त्याची सायकॅालॅाजिस्टकडे ट्रिटमेंट चालू असते. कदमला या तिन्ही केसमधे आणखी एक धागा सापडतो. हे खून आठ दिवसांच्या अंतरावर झालेले असतात. म्हणजे पुढचा खून बुधवारी होणार असल्याचे तो राणे व शिंदेला सांगतो. 4. बुधवार दि २६ फेब्रुवारी, कांदिवली पश्चिम, लक्ष्मी बुधीराजाचा खून. तोच पॅटर्न. 5. गुरुवार दि ५ मार्च, खार पश्चिम, गुरुराज अदवानीचा खून सेम पॅटर्न. गुरूराज हा युट्युबवरचा प्रसिद्ध सिंगर असतो. 6. शुक्रवार दि १३ मार्च, ताडदेव, दिव्या शुक्रपाणीवर खूनी हल्ला होतो. पण ती जबर जखमी होते. ती फिटनेस ट्रेनर असल्यामुळे खुन्याबरोबर झटापट करते. पण चाकू पोटात घुसल्यामुळे ती जबर जखमी होते. हात बांधलेले असतानाही ती फोनवर “सिरी” ला तिच्या भावाला, ध्रुवला फोन लावायला सांगते. फोन लागतो व ती “हेल्प हेल्प” एव्हढेच बोलून बेशुद्ध होते. म्हणून खुनी पळून जातो. ध्रुव तिथे पोहोचून तिला हॅास्पिटलमधे ॲडमिट करतो. पोलिसांना तिथे खुन्याची बॅग सापडते. त्यांत नायलॅानची दोरी, बेगॅान स्प्रे व राजमाच्या बिया सापडतात. तिसऱ्या खुनाआधी पोलिस संशयित म्हणून राजू दाभाडेला अटक करतात. पण चौथ्या खूनाच्या वेळेस तो कस्टडीतच असतो. मग खूनी कोण? 7. शनिवार दि २१ मार्च, बान्द्रा पश्चिम, शनिया डिसौजाचा खून होतो. सेम मोडस ऑपरेंडी . 8. शनिवार दि २८ मार्च, चेंबूर, ७१ वर्षांच्या राहुल सिंह नावाच्या सिख व्यक्तिचा खून होतो. तीच पध्दत. यानंतर एक दिवस कदम KBC बघत असताना अमिताभ बच्चन एका सिनेमाचं गाणं लावून त्याचा पिक्चर ओळखायला सांगतात. ते गाणं असते- “सोमवार को हम मिले मंगलवार को नयन बुध को मेरी निंद खुली जुम्मेरात को चैन अरे शुक्र शनी कटे मुश्किलसे आज है इतवार सात दिनों में हो गया जैसे सात जनम का प्यार” आणि कदमच्या डोक्यात एकदम प्रकाश पडतो… अरे, हे सर्व खून असेच रविवार ते शनिवार एक एका वारी घडलेत! पण शनिवारी दोन खून कसे? याच्या मागे काही खगोलशास्त्र किंवा भविष्याचा तर संबंध नाही? कदमला आठवतं की शेजारी राहणारा डॉ. देसाईला पण भविष्य-खगोलशास्त्राची आवड व माहिती आहे. ( डॅाक्टर कडे सापडलेल्या नायलॅानचे रंगीत दोर व फिनेक कंपनीचा चाकू यामुळे एक संशयित म्हणून कदमने त्याला अटक करून पुछताछ केलेली असते) कदम लगेच डॅाक्टरांकडे जातो. त्यांची माफी मागून त्यांना या प्रश्नांत मदत करायला सांगतो. तो या सर्व खुनांचा सिक्वेन्स सांगतो. ते प्रत्येक वारी का घडले? मग शनिवारी दोन का? यापुढे कोणता वार? कुणाचा खून? डॅाक्टर सांगतात की भारतीय भविष्य व खगोल शास्त्रात नवग्रहांना खूप महत्व आहे. रवि, सोम(चंद्र), मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनि, राहू आणि केतु. यांचे रंग व धान्य वेगवेगळे असतात. त्या त्या ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी ते वापरले जातात. कदम ही माहिती लिहून घेतो. त्यावरून प्रत्येक खुनात वापरण्यात आलेले फिनेक कंपनीचे चाकू, वेगवेगळ्या रंगांचे नायलॅान दोर व तोंडातील पदार्थ यांचा संबंध जोडून एक तख्ता तयार करतोः- “रवि मेहरा-रविवार-सोनेरी दोर- तोंडात गहू-दिशा पूर्व सुचंद्रा-सोमवार-चंदेरी दोर-तोंडात तांदूळ-दिशा पश्चिम मंगला शाह-मंगळवार-लाल दोर-तोंडात तूर डाळ- दिशा दक्षिण लक्ष्मी बुधीराजा-बुधवार-हिरवा दोर-तोंडात हिरवे मूग-दिशा उत्तर गुरुराज अदवानी-गुरूवार-पिवळा दोर-तोंडात हरबरा डाळ-दिशा उत्तर पूर्व(ईशान्य) दिव्या शुक्रपाणी-शुक्रवार-पांढरा दोर-राजमा-दिशा दक्षिण पूर्व शनिया डिसौजा-शनिवार-काळा दोर-तोंडात काळे तिळ-दिशा उत्तर पश्चिम राहुल सिंग-शनिवार-निळा दोर-तोंडात उडीद दाळ-दिशा दक्षिण पश्चिम” आता उरला एकच ग्रह-केतु. केतुचा वार मंगळवार. ग्रे रंग, चना दाळ, दिशा दक्षिण पश्चिम. “केतु”म्हणजे कदमची मुलगी केतुलचा नंबर लागणार? आज तर मंगळवारच आहे! कदम घाबरून जातो! तो केतुलला फोन करतो पण तो बंद लागतो. ती सध्या कुठे आहे? कोर्टात? कदम आपल्या मुलीला वाचवतो का? खरा खुनी कोण असतो? तो पकडला जातो का? त्याचे यामागचा उद्देश काय असतो? याच्यामध्ये अजून कोण सामिल असतं का? याची उत्तरे मिळण्यासाठी वाचावी लागेल अश्विन सांघी यांची कादंबरी Razor Sharp. ...Read more

BANGARWADI
BANGARWADI by VYANKATESH MADGULKAR Rating Star
Sameer Kazi

सुंदर अशी कादंबरी माणदेशी बनगरवाडी तशी कोरडी रखरखती पण, यातील पात्रात मायेचा करुणेचाओलावा मनात घर करुन जातो