* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
WE ALL KNOW THAT A SAND CASTLE HAS HARDLY ANY LIFE. YET, WE ALL TRY TO MAKE IT AS CONCRETE AS POSSIBLE SO AS TO EXTEND ITS LIFE BY A MERE FEW MORE MOMENTS, JUST FOR THE SAKE OF A CHILD. WE STRUGGLE A LOT FOR THAT. WE GIVE CENT PERCENT EFFORTS FOR THAT. HANMANT’S BEHAVIOUR CANNOT BE CATEGORIZED AS AN ACT OF INSANITY, IN FACT, IT IS AN ACT OF CRUELTY… ANIKET HAS REALIZED THAT NOW NOTHING NEW IS GOING TO TAKE PLACE. ALL THE MONTHS RIGHT FROM SHRAVAN, BHADRAPAD, ASHWIN, KARTIK….. EVERYTHING IS SAME. LILU STOOD FIRMLY BEFORE THE BIG BULL, THE ONE WHOM NONE OF THE STRONG WRESTLERS WERE ABLE TO CONTROL. SHE SIMPLY HAD SOME ‘CONNECTION’ WITH THE BIG AND STRONG BULL…ONE KING, HE WAS ILLSTRICKEN. HE TRIED MANY MEDICINES AND THERAPIES. BUT A ‘SHOCK’ SEEMED TO BE THE REMEDY…TATYA HAS PENNED DOWN MANY OF THE HUMAN NATURES, NONE STRONGER THAN A SAND CASTLE.
वाळू्च्या किल्ल्याचं अस्तित्व केवळ क्षणभंगूर असतं, पण एका चिमुरडीसाठी ते शाश्वत ठरविण्याची धडपड करावी लागते.... हणमंताचं वागणं हे केवळ वेडसरपणा नाही, तर ते एक क्रौर्य आहे.... अनिकेतला कळून चुकलं की, आता काही घडणार नाही; आषाढ, श्रावण, आश्विन, कार्तिक ... सगळं सारखंच.... पहिलवान गड्यांनाही न जुमानणार्या एका खोंडापुढे तेरा वर्षांची लिलू धिटाईनं उभी राहिली, त्या दोघांमधलं नातं खास होतं.... एका राजाला व्याधिमुक्तीसाठी वैद्याच्या औषधांपेक्षा एक ‘धक्का’ रामबाण उपाय ठरला... ’वाळूच्या किल्ल्या’सारखा असणारा मानवी भावभावनांचा हा बंध... आपल्या सजग लेखणीतून ‘तात्यांनी’ साकारला आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#VYANKATESH MADGULKAR#MANTARLELE BET#BIG CITY LITTLE BOY#MANUEL KOMROFF#MANHATAN# #व्यंकटेश माडगुळकर#मंतरलेले बेट#बिग सिटी लिटील बॉय#कॉमरॉफ#
Customer Reviews
  • Rating StarSrikant Birajdar

    वाळूच्या किल्ल्याचं अस्तित्व केवळ क्षणभंगुर असतं, पण एका चिमुरडी साठी ते शाश्वत ठरविण्याची धडपड करावी लागते. हणमंताचं वागणं हे केवळ वेडसरपणा नाही, तर ते एक कौर्य आहे. अनिकेतला कळून चुकले की आता काही घडणार नाही, आषाढ, श्रावण, आश्विन, कार्तिक... गळं सारखंच.. पहिलवान गड्यांनाही न जुमानणाऱ्या एका खोंडापुढे तेरा वर्षाची लिलू धिटाइनं उभी राहिली, त्या दोघांमधलं नातं खास होतं.... एका राजाला व्याधिमुक्तीसाठी वैद्याच्या औषधांपेक्षा एक धक्का रामबाण उपाय ठरला. वाळूच्या किल्ल्या सारखा असणारा मानवी भावभावनांचा हा बंध..... आपल्या सजग लेखणीतून तात्यांनी साकारला आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

रुपाली सोनवणे

#रुक #जाना #नही लेखक: Dr. भावेश भाटिया शब्दांकन: Dr: सचिन पाचोरकर अनुवाद: सुप्रिया वकील ​अंथरून पाहून पाय पसरावे... अह्ह.. त्या निर्जीव अंथरुणासाठी आपल्या सजीव पावलांना का त्रास द्यावा? असेच एक जबरदस्त आत्मचरित्र वाचून संपवलं आणि एक ऊर्जा निर्माणकरून गेलं, पुस्तकाचं नाव आहे `रुक जाना नहीँ ​डॉ. भावेश भाटिया यांची ही प्रेरणादायी कहाणी. शाळेत असताना आलेलं अकाली अंधत्व आणि त्यानंतर खडखडीत खडतर जीवनाचा सुरू झालेला प्रवास, पण या प्रवासात खचलेल्या बालमनाला त्यांच्या आईने दिलेलं बळ, प्रेरणा व आत्मसन्मानाची शिकवण आणि स्वाभिमानाचे धडे लेखकास पुरे होते. हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. चांगल्या धडधाकट व्यक्तीवर संकट आल्यावर दूर दूर पळणारे नातलग, मित्र परिवार, जातभाई... दृष्टी गेलेल्या व्यक्तीस कितपत आधार देतील? पण एक ऑपरेटर ते एक उद्योजक, `सनराईज कॅण्डल`चा विस्तार आणि स्वतःबरोबर अनेक दृष्टिहीन व्यक्तींना स्वतःच्या पायावर उभं करून रोजगार देणारा हा अवलिया किती अडथळे पार करून आलाय हे जाणून घेण्यासाठी पुस्तक वाचायला हवंच. ​कुठलाही वशीला नाही की कोणाची सहानुभूती नाही, स्वबळावर विविध प्रयोग करत उद्योग यशस्वी करणं सोपं नाही. यात ज्या ज्या देवमाणसांनी हातभार लावला त्यांचा पण उल्लेख आहे, पण त्या देवमाणसांनी देखील कधीच उपकारिक भाषा न करता व स्वाभिमान न दुखावता कशी मदत करता येऊ शकते हे त्यांच्या कृतीतून दाखवून दिलंय. लेखक फक्त उद्योग उभारून थांबले नाहीत तर त्यांनी सामाजिक जाणीवेचं भान देखील ठेवलंय. महाबळेश्वरमध्ये सनराईज कॅण्डल नावाने त्यांनी भव्य असा उद्योग परिसर आणि म्युझियम सुरू केलंय, तेथे अनेक दृष्टिहीन व्यक्तींना रोजगार मिळाला आहे त्याचबरोबर सर्वजण स्वाभिमानाने कष्ट करून जगत आहेत. हजारो आयुष्य त्यांनी उजळून टाकली आहेत. दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कार सह एकून 46 पुरस्कारांचे ते मानकरी आहेत.विशेष म्हणजे सर्व पुरस्कार त्यांच्या योग्यतेनुसार दिले आहेत.. आणी अशा हजारो पुरस्कारांचे ते मानकरी आहेत असंच वाटत..त्यांच्या कामाची दखल रिलायन्स ग्रुप ने देखील घेतली आहे.व त्यांच्या पुस्तकास प्रस्तावना देखील नीता अंबानी यांनी दिली आहे.उद्योग करताना छोट्या छोट्या गोष्टी कसा प्रभाव करतात याच वर्णन देखील त्यांनी लिहिल आहे.. ​या कार्यात महत्त्वाचं योगदान त्यांच्या धर्मपत्नी नीता भाटिया यांनी दिलं आहे. दूरदृष्टी ठेवून आपल्या पतीस प्रोत्साहन देऊन, नवीन कल्पनेसह पाठिंबा देऊन त्यांना हुरूप देण्याचं काम त्यांनी केलंय. नीता भाटिया यांचं कर्तृत्व, त्यांचं पवित्र निस्वार्थी प्रेम या पुस्तकातून वाचताना आंतरिक वेगळी ऊर्जा मिळते. कलियुगातील देवी हा शब्द व मान त्यांना समर्पक वाटतो. पुस्तक सर्व वयोगटातील वाचक वाचू शकतात. मनाने खचलेल्या पण शरीराने धडधाकट असलेल्या प्रत्येक व्यक्तीने वरील पुस्तक नक्की वाचावं आणि आत्मसात करावं. एवढ्या उंचीवर असूनही जमिनीवर पाय असलेल व्यक्तिमत्व आहे. अगदी प्रेमळ पणे वागण बोलण सन्मान देण..ही दैवी देणगी त्यांच्या जवळ आहे. ...Read more