* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: ARISE, AWAKE
  • Availability : Available
  • Translators : SUNITI KANE
  • ISBN : 9789353171186
  • Edition : 1
  • Publishing Year : SEPTEMBER 2018
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 212
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
  • Available in Combos :RASHMI BANSAL COMBO SET - 6 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE BOOK, ARISE, AWAKE:THE INSPIRING STORIES OF 10 YOUNG ENTREPRENEURS WHO GRADUATED FROM COLLEGE INTO A BUSINESS OF THEIR OWN IS AN INSPIRATIONAL BOOK THAT REVEALS THE SUCCESS STORIES OF 10 YOUNGSTERS WHO INSTEAD OF TAKING UP A JOB OPTED FOR ENTREPRENEURSHIP AND ACHIEVED SUCCESS. THIS BOOK NOT ONLY PEEPS IN THEIR LIVES BUT ALSO DEMONSTRATES VARIOUS SKILLS THAT ARE REQUIRED FOR ACHIEVING SUCCESS ON THE BUSINESS FRONT. ONLY A FEW HAVE THE STRENGTH TO DEFY CONVENTIONS AND START SOMETHING OF THEIR OWN IN THIS FRANTIC CORPORATE WORLD OF TODAY. THIS BOOK SHARES STORIES OF INDIVIDUALS WHO TOOK VISIONARY DECISIONS WHICH LED THEM ON THEIR PATH TO CREATE SUCCESSFUL VENTURES. IT INCLUDES STORIES OF INOPEN TECHNOLOGIES THAT WAS ESTABLISHED BY RUPESH SHAH. A GRADUATE FROM IET ALWAR, RUPESH SHOWED IMMENSE FAITH IN OPEN SOURCE TECHNOLOGIES AND DESIGNED A PRODUCT THAT INCREASES EFFICIENCY OF TEACHING METHODS. ARUJ GARG STARTED THE FOOD CHAIN, BHUKKAD WHICH FOCUSES ON FAST FOOD WHICH IS NATURAL AND HEALTHIER. A CA FINAL STUDENT, APURVA JOSHI LEARNT THE POTENTIAL OF FRAUD RISK ASSESSMENT DURING HER INTERNSHIP AT INDIAFORENSIC AND DECIDED TO TAP THIS POTENTIAL BY CREATING HER OWN AGENCY FRAUDEXPRESS. ESHWAR VIKAS AND SUDEEP SABAT WERE STUDENTS AT SRM ENGINEERING COLLEGE IN CHENNAI WHEN THEY REALIZED THE UNTAPPED MARKET OF DOSA MACHINE, WHICH IS WHY THEY FOUNDED DOSAMATIC. ANURAG ARORA ESTABLISHED GANPATI FACILITIES DURING HIS STAY AT ICFAI BUSINESS SCHOOL IN PUNE. HE WAS FED UP BY THE HORRIBLE FACILITIES PROVIDED BY THEIR HOSTEL AND DECIDED TO CREATE HIS OWN HOSTEL AND THUS GANPATI FACILITIES WAS BORN. THIS BOOK INCLUDES OTHER SUCH INSPIRING TALES WHICH WILL SATIATE YOUR SENSES IF YOU ARE EXCITED BY THE IDEA OF ENTREPRENEURSHIP.
अराइज, अवेक हे तरुणांना उद्योजक होण्यासाठी प्रवृत्त करणारं आणि त्यासाठी मार्गदर्शन करणारं पुस्तक आहे. विविध युवकांनी विविध क्षेत्रांमध्ये व्यवसाय सुरू केले. त्या व्यवसायाची संकल्पना त्यांना कशी सुचली, कल्पना सुचल्यावर त्यांनी काय केलं, भांडवल कसं उभं केलं, आपल्या व्यवसायाची जाहिरात कशी केली, त्या व्यवसायाला लोकांचा (गिह्राईकांचा) कसा प्रतिसाद मिळाला, आपलं उत्पादन तयार करताना, त्याची जाहिरात करताना, तसेच आर्थिक बाबतीत किंवा अन्य स्वरूपाच्या त्यांना कोणत्या अडचणी आल्या आणि त्यावर त्यांनी कशी मात केली याचं सविस्तर विवेचन या पुस्तकात केलं आहे. कोणी डॉक्टरांसाठीचं सॉफ्टवेअर तयार केलं, तर कोणी सिमेंट काँक्रीटच्या विटा, कोणी पूजा किट्स तयार केली, तर कोणी टी शर्ट्स, कोणी कॅपचावर लक्ष केंद्रित केलं, तर कोणी कॉम्प्यूटर सायन्स शिकवण्यावर, अशा अनेक युवा उद्योजकांच्या या प्रेरणादायी कथा युवा वर्गाने आणि सगळ्यांनीच अवश्य वाचाव्या अशा आहेत.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#शशांक एन डी अभिनव लाल#पुनीत मित्तल सौरभ बन्सल#सिद्धार्थ बन्सल#प्रकाश मुन्द्धारा#प्रभाकिरण सिंग#सिद्धार्थ मुनोत#अंकित गुप्ता#ध्रुव सोगानी#रुपेश शाह#अरुज गर्ग#अनुराग अरोरा#अपूर्वा जोशी#ईश्वर विकास#सुदीप सबात#
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAKAL 11-11-2018

    रश्मी बन्सल यांनी दहा तरुण उद्योजकांच्या प्रेरणादायी कहाण्या लिहिल्या आहेत. महाविद्यालयाची पदवी मिळताक्षणी स्वत:चे उद्योग स्थापन करणारे हे उद्योजक. ‘बेवकूफ ब्रँड्स’ अशा अजब ब्रँडचे निर्माते प्रभाकिरणसिंग आणि सिद्धार्थ मुनोत, ‘भुक्कड’ या नावानं तरुणां्या पोटभरीचा उद्योग करणारा अरुज गर्ग, वैद्यकीय अहवाल संगणकावर ऑनलाईन उपलब्ध करून देणारे शशांक एन. डी. आणि अभिनव लाल असे अनेक उद्योजक या पुस्तकात भेटतात. त्यांचा हा सगळा प्रवास आणि त्यांची मतं वाचनीय आहेत. सुनीती काणे यांनी अनुवाद केला आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

राधेय.... लेखक रणजित देसाई... मित्र कसा असावा...कर्णासारखा दातृत्व कसं असावं...कर्णासारखं असा हा कर्ण... त्याला अंगराज म्हणावं, दान देणारा दाता म्हणावं, राधेय म्हणावं कि कौतेय... काहीही म्हणा पण कर्णासारखा दाता कर्णानंतर कधी झाला नाही आणि कधी होणरही नाही... रणजित देसाई लिखीत कर्णचरीत्र राधेय आज हातावेगळं झालं ते अश्रुभरल्या नयनांनी...ज्याचा अंत करायला स्वतः देवाधिदेव कृष्णाला अर्जुनाचं सारथ्य करावं लागलं यातच अंगराज कर्णांचं विरत्व अधोरेखीत होत आहे. जन्मापासुन ज्याला केवळ सुतपुत्र म्हणुन वागणुक मिळाली असा तो कर्ण स्वतःच्या बळावर इतका महान लढवय्या बनला. पुस्तकाच्या प्रास्ताविकात देसाईंनी म्हटलं आहे की राधेय मधला कर्ण महाभारतात शोधायची गरज नाही. प्रत्येकाच्या मनातच तो दडलेला असतो, कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत, तर त्यात हा कर्ण दिसेल. त्याचं दु:खं, पोरकेपण आणि त्यातून पार होवून एक अनोखी ऊंची गाठणारं त्याचं दातृत्व, व्यक्तित्व याचं एक भव्य, शोकात्म चित्र राधेय मधून उभं राहतं. राधेय या कादंबरीत रणजित देसाईंच्या शब्दांनी कर्णाची अनेक रुपे अनुभवता आली. त्यामध्ये राधाई आणि वृषाली सोबतचा कर्ण, दुर्यौधनासोबतचा कर्ण, कृष्णासोबतचा कर्ण, रणांगणावरचा कर्ण आणि नदीकाठी पाठमोरा ऊभा राहत दान करत असलेला कर्ण अशा अनेक रुपांनी प्रत्येकवेळी वेगळा भासला. वृषसेन आणि चक्रधराच्या मृत्युने हळवा झालेला कर्णही वाचकाच्या डोळ्यातही पाणी आणवतो... समोर मृत्यु दिसत असताना सुध्दा केवळ दिलेल्या वचनामुळे हातातील धनुष्याचा त्याग करुन शस्त्रहिन हेणारा कर्ण रणजित देसाईंच्या शब्दांमुळे आजन्म लक्षात राहील. कर्णासारखं होणं कुणालाही कदापि शक्य नाही पण त्यातला एखादा जरी चांगला गुण अंगी बाळगण्याचा प्रयत्न प्रत्येकाने नक्कीच केला पाहीजे... प्रत्येकाच्या संग्रही असावं आणि एकदा तरी वाचावं असं पुस्तक रणजित देसाई लिखीत...राधेय... © विश्वजित शिंत्रे. ...Read more

BAJIND
BAJIND by PAHILWAN GANESH MANUGADE Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

काही पुस्तकं अशी असतात कि कितीही वेळा वाचली तरीही त्या पुस्तकाचा कंटाळा येत नाही. पुन्हा पुन्हा वाचावं असं वाटतं आणि त्याची पारायणं होतचं राहतात. असचं एक पुस्तक म्हणजे *पै.गणेश मानुगडे* लिखीत *बाजिंद.* *बाजिंद* हे एक असं रसायन आहे जे प्रत्ेकाला अक्षरशः वेड लावतं. साधारण चार पाच वर्षांपुर्वी पहील्यांदा वाचलं होतं, त्यानंतर बर्‍याचवेळा आणि आज पुन्हा एकदा. त्याबद्दलची एक सुंदर आठवण म्हणजे माझ्या बहिणीच्या गरोदरपणाच्या दिवसात ग्रहण लागलं होतं आणि त्या ग्रहणकाळात तिला मी *बाजिंद* वाचुन दाखवलं होतं, असं हे पुस्तक. कुस्ती, प्रेमकथा, हेरगिरी, गुढ रहस्यमय बाजिंदचं जंगल, पशु-पक्षी व हिंस्र जनावरांची भाषा, बहीर्जी नाईक आणि अवघ्या हिंदुस्थानाचे आणि मराठी मनाचे आराध्यदैवत *श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज* असा या पुस्तकाचा प्रवास. शेवटाला अंगावर काटा आला कि समजावं आपण या पुस्तकाच्या प्रेमात पडलोय. रायगडच्या डोंगरदरीत वसलेल्या धनगरवाडीचा सखाराम धनगर आणि त्याच्यासोबत मल्हारी, सर्जा आणि नारायण निघालेत छत्रपती शिवरायांना भेटायला. कारण टकमक टोकावरुन ज्या गद्दारांचा कडेलोट व्हायचा ती प्रेतं येऊन पडायची ती थेट धनगरवाडीच्या आसपासच्या जंगलात आणि त्यामुळे आसपासच्या परीसरात जंगली जनावरांचा सुळसुळाट खुप वाढला होता. त्यांची मेजवानी व्हायची पण जर कधी कडेलोट नसायचा तेव्हा ती हिंस्त्र जनावरं आसपासच्या लोकवस्तीत शिरायची. हिच कैफियत मांडायला सखाराम धनगर आणि इतर मंडळी रायगडी निघतात. त्यानंतरचा त्यांचा प्रवास आणि कथा वाचकाला इतकी गुरफटवुन टाकते कि शेवटच्या पानावरची शेवटची ओळ कधी वाचुन संपते, कळतही नाही. त्यांची स्वराज्यहेर खंडोजीची भेट मग सावित्री, वस्तादकाका, वाचतानाही भितीदायक दिसणारं जंगल, कधीही न पाहीलेलं महादेवाचं मंदीर, खंडोजीचा असणारा ट्विस्ट आणि मग बहिर्जी नाईक आणि मग थेट रायगड आणि महाराज, सगळं प्रत्यक्षात आपल्यासमोर घडतयं कि असा भास निर्माण करणारं असं हे पुस्तक. एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी कथा, एकदा वाचली कि पुन्हा एकदा वाचण्याचा मोह आवरता येत नाही अशी कथा, ज्यामध्ये असं बरचं काही जे वाचल्याशिवाय कळणार नाही. अजुन एक असं कि सातासमुद्रापार जगातील अव्वल गणली जाणारी इस्त्राईलची गुप्तहेर संघटना मोसाद यांच्या अभ्यासक्रमात बहिर्जी नाईक आणि आपलं हेरखातं शिकवलं जातं अशी अभिमान वाटणारी घटना आपल्या राज्यात घडलीय त्याचीच हि गोष्ट...बाजिंद... ...इकडे खंडोजीने सावित्रीला उचलुन जंगलातुन बरेच बाहेर आणले होते. पुढे डोंगराची कडेतुट होती आणि हजारो हात खोल फेसाळणार्‍या नदीचे विशाल पात्र...खंडोजीने एकदा मागे पाहीले आणि ताडले कि शिर्क्यांची फौज पाठलाग करत आहे...त्याने कशाचाही विचार न करता सावित्रीसह स्वतःला त्या कडेतुट वरुन त्या विशाल नदीच्या पात्रात झोकुन दिले...आणि... त्यासाठी वाचा *पै.गणेश मानुगडे* लिखीत...*बाजिंद..!!!* © विश्वजीत श्रीपती शिंत्रे. मु.पो.इंचनाळ, ता.गडहिंग्लज,जि.कोल्हापुर ०९९२२३१३९१९ ...Read more