* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: ANADI-ANANT
  • Availability : Available
  • Translators : AVINASH DESAI, USHA DESAI
  • ISBN : 9788184980851
  • Edition : 2
  • Publishing Year : OCTOBER 2009
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 175
  • Language : Translated From KANNADA to MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS IS THE 8TH NOVEL BY THE AUTHOR AADYA RANGACHARYA. THIS NOVEL CASTS A LIGHT ON THE RELATIONSHIP BETWEEN A MAN AND A WOMAN. ACTUALLY, NOWHERE IN THIS NOVEL HE DESCRIBES THE INTIMATE ACTS BETWEEN A MAN AND WOMAN BUT MERELY SUGGESTS. HIS STYLE REFLECTS THE INNER CORE OF THE HUMAN BEINGS. THOUGH VERY SIMPLE THIS STYLE IS VERY EFFECTIVE. THIS NOVEL IS BASED ON THE RELATIONSHIP OF A HUSBAND AND HIS SICK WIFE, A REAL BED-RIDDEN ONE WHO IS UNABLE TO GIVE HIM ANY PHYSICAL PLEASURE. AFTER HER DEATH, HE MARRIES HER COUSIN TO WHOM HE WAS ATTRACTED TERRIBLY. THE WHOLE NOVEL THEREAFTER IS BASED ON THEIR RELATIONSHIP. IT ENDS ABRUPTLY, WHEN WE THINK THAT IT IS GOING TO TAKE SOME GOOD TURN.
आद्य रंगाचार्य (श्रीरंग) ह्यांच्या लिखाणात विचारनाविन्याची देणगी आणि प्रयोगशीलतेची आवड कटाक्षाने जाणवते. अनादि-अनंत मध्ये त्यांनी स्त्रीपुरुष संबंधांची समर्थपणे उकल केली आहे. डॉ. जी. एस. अमूर. ह्या कादंबरीत पात्रांच्या अंतरंगाचं विश्लेषण आहे. त्यामुळे हिची शैलीच निराळी आहे. मी नाटककार असल्यामुळे ही शैली सहजसुलभ आणि परिणामकारक वाटली असल्यास आश्चर्य नसावे. आद्य रंगाचार्य (श्रीरंग)
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #ANADI-ANANT #ANADI-ANANT #अनादिअनंत #FICTION #TRANSLATEDFROMKANNADATOMARATHI #AVINASHDESAIDESAIUSHA #ADYARANGACHARYA
Customer Reviews
  • Rating StarDAINIK GAONKARI 18-4-2010

    आद्य रंगाचार्य (श्रीरंग) हे कानडी भाषेतील आधुनिक साहित्यिक ते प्रथमत: एक उत्तम नाटककार सुपरिचित आहेत. त्याचबरोबर विविध साहित्य प्रकार आणि संशोधनही त्यांच्याकडून हाताळले गेले आहेत. त्यांचीच अनादी अनंत ही कादंबरी उषा देसाई आणि अविनाश देसाई यांनी अनुवादत केली आहे. या कादंबरीत पात्रांच्या अंतरंगाचे विश्लेषण असल्याने या कादंबरीची शैली निराळी आहे. मी नाटककार असल्याने ही शैली सहज सुंदर आणि परिणामकारक वाटली असल्यास आश्चर्य नसावे, असे आद्य रंगाचार्य यांनीच म्हटल्यामुळे लेखनाच्या शैलीबद्दल वेगळे काही सांगण्याचे कारणच उरत नाही. ...Read more

  • Rating StarDainik Matrubhumi 14-2-2010

    स्त्री-पुरुषांमधील तरल संबंधांचा मागोवा ‘अनादि-अनंत’ या कादंबरीत घेतला आहे. या संबंधाचे विश्लेषण तटस्थपणे कादंबरीत येत राहते. ‘अनादि-अनंत’ ही आद्य रंगाचार्य (श्रीरंग) यांची कादंबरी. या कादंबरीचा अनुवाद उषा देसाई आणि अविनाश देसाई यांनी केला आहे. कर्नाकमधील प्रसिद्ध साहित्यिक आद्य रंगाचार्य यांनी स्त्री-पुरुष संबंधाची अनादि-अनंत काळापासून असलेली उकल समर्थपणे केली आहे. कादंबरीत पात्रांच्या अंतरंगाचे विश्लेषण आहे. साहाजिकच या कादंबरीची शैली स्वत:ची ओळख निर्माण करून देणारी आहे. कादंबरी दोन भागात अनादि आणि अंत या प्रकरणातून उलगत जाते. कुमुद, रामण्णा ही पात्रे जीवनविषयक तत्त्वज्ञान आणि भाष्य सांगत जातात. १९५१मध्ये या कादंबरीचा पहिला भाग ‘अनादि’ प्रसिद्ध झाला. यावेळी अश्लिलतेची पायरी न चढता स्त्री-पुरुष समस्यांची चर्चा करण्यात यश प्राप्त केलेली ही कादंबरी असा अभिप्राय समीक्षकांनी या कादंबरीसंदर्भात व्यक्त केला होता. आजचं साहित्य सामान्यांना समजलं पाहिजे असा उपदेश केला जातो. आपण स्वत: असामान्य आहोत या भ्रमात असा उपदेश करणारी मंडळी जगत असतात. परंतु, कोणताही अभिनिवेश न बाळगता आद्य रंगाचार्यांनी अतिशय जटिल आणि गुंतागुंतीच्या स्त्री-पुरुष संबंधाचा उलगडा सोप्या भाषेत करण्याचा प्रयत्न केला आहे. उषा देसाई आणि अविनाश देसाई या दोघांनी मराठी भाषांतर करताना रंगाचर्यांच्या अक्षरगाभ्याला कोठे धक्का लावला नाही. अत्यंत सोपे आणि तरल स्वरूपाचे भाषांतर त्यांनी केले आहे. वाचकांच्या थेट हृदयास हाक घालणारे हे भाषांतर आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK SAMANA 6-6-2010

    स्त्री-पुरुष नातेसंबंध हा अत्यंत गहन विषय. त्यावर अनेक विचारवंतांनी आपापले विचार, विविध कालखंडात मांडले, तरीही या नातेसंबंधाची उकल अजूनही पुरती कुणाला करता आलेली नाही. नव्या कालखंडात अन् आजूबाजूचं वास्तव बदलत असताना, विस्तारत असताना या नातेसंबंधात नव आयाम दिसू लागतात आणि मग पुन: नव्यानं स्त्री-पुरुष नातेसंबंध आहे तरी काय याचे नवेच निकष सामोरे येऊ लागतात. आद्य रंगाचार्य (श्रीरंग) यांनी आपल्या ‘अनादि-अनंत’ या कादंबरीमध्ये पुन: एकदा स्त्री-पुरुष नातेसंबंधांचा शोध घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. या कादंबरीचे दोन भाग आहेत. पूर्र्वार्ध ‘अनादि’मध्ये नायक रामण्णा, त्यांची अंथरुणाला खिळलेली पत्नी सरला आणि सरलेनेच तिच्या नात्यातील तिला घरकामात मदत व्हावी म्हणून आणलेली तरुणी कुमुद एवढीच तीन पात्रं. रामण्णा हा सृजनशील लेखक, कादंबरीकार. त्याचं सरलावर प्रेम. पण सरलाच्या आजारपणात त्याला तिच्याकडून शारीरिक सुख नाही. मूलही नाही. त्याची आता शक्यताही नाही. सरलाला मात्र तिचं घर मुलाबाळांनी भरलेलं असावं असं वाटतं. त्यासाठी रामण्णानं दुसरं लग्न, तेही कुमुदाशी करावं ही तिची इच्छा. पण तत्पूर्वीच एका मोहाच्या क्षणी रामण्णा आणि कुमुद यांचा शरीरसंबंध होतो. आपण चूक करतोय की बरोबर हा निर्णय होण्यापूर्वीच हे सारं घडतं. यातून प्रश्न निर्माण होतो तो नैतिकतेचा. आद्य रंगाचार्य यांनी या पात्रांच्या मनोवस्थेतून, त्यांच्या विचारातून हा मुद्दा विविध स्तरावर तपासून पाहिला आहे. रामण्णाचं खरं प्रेम कोणतं? सरलेवरचं की शारीरिक उपासमारीतून कुमुदकडे आकर्षिले गेलेलं, कुमुदमध्ये अडकणारं? सरलाच्या मृत्यूनंतर रामण्णा कुमुदशी लग्न करतो. कुमुदही त्यास तयार होते, ती तिच्या पोटात रामण्णाचा अंश वाढत असतो म्हणून की तिला रामण्णा आवडत असतो म्हणून? प्रतारणा कोण कुणाशी करतं? नेमकं प्रेम म्हणजे काय? स्त्री-पुरुष यांच्यातील नात्याचा अर्थ भावनिक पातळीवर श्रेष्ठ की शारीर पातळीवर? लेखक श्रीरंग एके ठिकाणी म्हणतात, ‘हृदयं एक झाली नसता शरीरांना एकत्र आणणं हीच खरी वेश्यावृत्ती, लग्न झालं तरी वेश्यावृत्तीच ना!’ रामण्णश-सरला, रामण्णा-कुमुद या नातेसंबंधांचा विचार करताना श्रीरंग यांनी कालिदास, भवभूती यांच्या काव्याचे दाखले देत त्यांच्या नात्यांचा, वागण्याचा अन्वयार्थ लावायचा प्रयत्न केलेला आहे. पुराणातील उदाहरणं आणि रामण्णा-कुमुदचा पोरकटपणा यातील साम्य मात्र इथठ ओढून-ताणून आणल्यासारखं, कृतक वाटतं. त्या उदाहरणांनी श्रीरंग यांचा व्यासंग दिसतो, पण रामण्णा-कुमुद ही पात्रं मात्र अ-लौकिक होत नाहीत. तरीही कधी कधी त्यांचे अनुभव तत्त्वज्ञानाच्या पातळीवर व्यक्त होतात. उदा. ‘एकाचं सुखदु:ख दुसऱ्याच्या हातात नसतं’किंवा ‘मनुष्याला ज्या घटना अचानक घडल्या असं वाटतं त्या निसर्गाच्या नियमानुसार घडतात.’ उत्तरार्ध ‘अनंत’मध्ये दहा वर्षानंतरचा कालखंड. त्यात कुमुदनं घर सोडलं. रामण्णाशी संबंध ठेवला नाही. मुलगा मोहन दहा वर्षांचा झाला. आता त्या दोघांमधील एकमेव दुवा ‘मोहन’. पण त्याच्या अकस्मात जाण्यानं रामण्णा आणि कुमुद यांच्या नात्याला काय अर्थ राहिला, असा प्रश्न उपस्थित करून ही कादंबरी संपते. अगदी अपवादानंच यात अलंकार येतात. सुंदर अशी श्रीरंगची निवेदनशैली आहे. प्रारंभी कथानक एकाच मुद्याभोवती घोटाळत राहतं. उत्तरार्धातही तसंच. पात्रांचे स्वाभाविक विस्तार जाणवत नाहीत. स्त्रिया तर हिंदुस्थानी पारंपरिक स्त्रियांचं प्रतिनिधित्व करणाNया, त्यादृष्टीनं यात आधुनिक विचारही जाणवत नाही. उषा देसाई-अविनाश देसाई यांचा अनुवाद उत्कृष्ट. चंद्रमोहन कुळकर्णींचं मुखपृष्ठ आशयानुसार अर्थचित्रासारखं सुबक. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more