* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: ANADI-ANANT
  • Availability : Available
  • Translators : AVINASH DESAI, USHA DESAI
  • ISBN : 9788184980851
  • Edition : 2
  • Publishing Year : OCTOBER 2009
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 175
  • Language : Translated From KANNADA to MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS IS THE 8TH NOVEL BY THE AUTHOR AADYA RANGACHARYA. THIS NOVEL CASTS A LIGHT ON THE RELATIONSHIP BETWEEN A MAN AND A WOMAN. ACTUALLY, NOWHERE IN THIS NOVEL HE DESCRIBES THE INTIMATE ACTS BETWEEN A MAN AND WOMAN BUT MERELY SUGGESTS. HIS STYLE REFLECTS THE INNER CORE OF THE HUMAN BEINGS. THOUGH VERY SIMPLE THIS STYLE IS VERY EFFECTIVE. THIS NOVEL IS BASED ON THE RELATIONSHIP OF A HUSBAND AND HIS SICK WIFE, A REAL BED-RIDDEN ONE WHO IS UNABLE TO GIVE HIM ANY PHYSICAL PLEASURE. AFTER HER DEATH, HE MARRIES HER COUSIN TO WHOM HE WAS ATTRACTED TERRIBLY. THE WHOLE NOVEL THEREAFTER IS BASED ON THEIR RELATIONSHIP. IT ENDS ABRUPTLY, WHEN WE THINK THAT IT IS GOING TO TAKE SOME GOOD TURN.
आद्य रंगाचार्य (श्रीरंग) ह्यांच्या लिखाणात विचारनाविन्याची देणगी आणि प्रयोगशीलतेची आवड कटाक्षाने जाणवते. अनादि-अनंत मध्ये त्यांनी स्त्रीपुरुष संबंधांची समर्थपणे उकल केली आहे. डॉ. जी. एस. अमूर. ह्या कादंबरीत पात्रांच्या अंतरंगाचं विश्लेषण आहे. त्यामुळे हिची शैलीच निराळी आहे. मी नाटककार असल्यामुळे ही शैली सहजसुलभ आणि परिणामकारक वाटली असल्यास आश्चर्य नसावे. आद्य रंगाचार्य (श्रीरंग)
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #ANADI-ANANT #ANADI-ANANT #अनादिअनंत #FICTION #TRANSLATEDFROMKANNADATOMARATHI #AVINASHDESAIDESAIUSHA #ADYARANGACHARYA
Customer Reviews
  • Rating StarDAINIK GAONKARI 18-4-2010

    आद्य रंगाचार्य (श्रीरंग) हे कानडी भाषेतील आधुनिक साहित्यिक ते प्रथमत: एक उत्तम नाटककार सुपरिचित आहेत. त्याचबरोबर विविध साहित्य प्रकार आणि संशोधनही त्यांच्याकडून हाताळले गेले आहेत. त्यांचीच अनादी अनंत ही कादंबरी उषा देसाई आणि अविनाश देसाई यांनी अनुवादत केली आहे. या कादंबरीत पात्रांच्या अंतरंगाचे विश्लेषण असल्याने या कादंबरीची शैली निराळी आहे. मी नाटककार असल्याने ही शैली सहज सुंदर आणि परिणामकारक वाटली असल्यास आश्चर्य नसावे, असे आद्य रंगाचार्य यांनीच म्हटल्यामुळे लेखनाच्या शैलीबद्दल वेगळे काही सांगण्याचे कारणच उरत नाही. ...Read more

  • Rating StarDainik Matrubhumi 14-2-2010

    स्त्री-पुरुषांमधील तरल संबंधांचा मागोवा ‘अनादि-अनंत’ या कादंबरीत घेतला आहे. या संबंधाचे विश्लेषण तटस्थपणे कादंबरीत येत राहते. ‘अनादि-अनंत’ ही आद्य रंगाचार्य (श्रीरंग) यांची कादंबरी. या कादंबरीचा अनुवाद उषा देसाई आणि अविनाश देसाई यांनी केला आहे. कर्नाकमधील प्रसिद्ध साहित्यिक आद्य रंगाचार्य यांनी स्त्री-पुरुष संबंधाची अनादि-अनंत काळापासून असलेली उकल समर्थपणे केली आहे. कादंबरीत पात्रांच्या अंतरंगाचे विश्लेषण आहे. साहाजिकच या कादंबरीची शैली स्वत:ची ओळख निर्माण करून देणारी आहे. कादंबरी दोन भागात अनादि आणि अंत या प्रकरणातून उलगत जाते. कुमुद, रामण्णा ही पात्रे जीवनविषयक तत्त्वज्ञान आणि भाष्य सांगत जातात. १९५१मध्ये या कादंबरीचा पहिला भाग ‘अनादि’ प्रसिद्ध झाला. यावेळी अश्लिलतेची पायरी न चढता स्त्री-पुरुष समस्यांची चर्चा करण्यात यश प्राप्त केलेली ही कादंबरी असा अभिप्राय समीक्षकांनी या कादंबरीसंदर्भात व्यक्त केला होता. आजचं साहित्य सामान्यांना समजलं पाहिजे असा उपदेश केला जातो. आपण स्वत: असामान्य आहोत या भ्रमात असा उपदेश करणारी मंडळी जगत असतात. परंतु, कोणताही अभिनिवेश न बाळगता आद्य रंगाचार्यांनी अतिशय जटिल आणि गुंतागुंतीच्या स्त्री-पुरुष संबंधाचा उलगडा सोप्या भाषेत करण्याचा प्रयत्न केला आहे. उषा देसाई आणि अविनाश देसाई या दोघांनी मराठी भाषांतर करताना रंगाचर्यांच्या अक्षरगाभ्याला कोठे धक्का लावला नाही. अत्यंत सोपे आणि तरल स्वरूपाचे भाषांतर त्यांनी केले आहे. वाचकांच्या थेट हृदयास हाक घालणारे हे भाषांतर आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK SAMANA 6-6-2010

    स्त्री-पुरुष नातेसंबंध हा अत्यंत गहन विषय. त्यावर अनेक विचारवंतांनी आपापले विचार, विविध कालखंडात मांडले, तरीही या नातेसंबंधाची उकल अजूनही पुरती कुणाला करता आलेली नाही. नव्या कालखंडात अन् आजूबाजूचं वास्तव बदलत असताना, विस्तारत असताना या नातेसंबंधात नव आयाम दिसू लागतात आणि मग पुन: नव्यानं स्त्री-पुरुष नातेसंबंध आहे तरी काय याचे नवेच निकष सामोरे येऊ लागतात. आद्य रंगाचार्य (श्रीरंग) यांनी आपल्या ‘अनादि-अनंत’ या कादंबरीमध्ये पुन: एकदा स्त्री-पुरुष नातेसंबंधांचा शोध घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. या कादंबरीचे दोन भाग आहेत. पूर्र्वार्ध ‘अनादि’मध्ये नायक रामण्णा, त्यांची अंथरुणाला खिळलेली पत्नी सरला आणि सरलेनेच तिच्या नात्यातील तिला घरकामात मदत व्हावी म्हणून आणलेली तरुणी कुमुद एवढीच तीन पात्रं. रामण्णा हा सृजनशील लेखक, कादंबरीकार. त्याचं सरलावर प्रेम. पण सरलाच्या आजारपणात त्याला तिच्याकडून शारीरिक सुख नाही. मूलही नाही. त्याची आता शक्यताही नाही. सरलाला मात्र तिचं घर मुलाबाळांनी भरलेलं असावं असं वाटतं. त्यासाठी रामण्णानं दुसरं लग्न, तेही कुमुदाशी करावं ही तिची इच्छा. पण तत्पूर्वीच एका मोहाच्या क्षणी रामण्णा आणि कुमुद यांचा शरीरसंबंध होतो. आपण चूक करतोय की बरोबर हा निर्णय होण्यापूर्वीच हे सारं घडतं. यातून प्रश्न निर्माण होतो तो नैतिकतेचा. आद्य रंगाचार्य यांनी या पात्रांच्या मनोवस्थेतून, त्यांच्या विचारातून हा मुद्दा विविध स्तरावर तपासून पाहिला आहे. रामण्णाचं खरं प्रेम कोणतं? सरलेवरचं की शारीरिक उपासमारीतून कुमुदकडे आकर्षिले गेलेलं, कुमुदमध्ये अडकणारं? सरलाच्या मृत्यूनंतर रामण्णा कुमुदशी लग्न करतो. कुमुदही त्यास तयार होते, ती तिच्या पोटात रामण्णाचा अंश वाढत असतो म्हणून की तिला रामण्णा आवडत असतो म्हणून? प्रतारणा कोण कुणाशी करतं? नेमकं प्रेम म्हणजे काय? स्त्री-पुरुष यांच्यातील नात्याचा अर्थ भावनिक पातळीवर श्रेष्ठ की शारीर पातळीवर? लेखक श्रीरंग एके ठिकाणी म्हणतात, ‘हृदयं एक झाली नसता शरीरांना एकत्र आणणं हीच खरी वेश्यावृत्ती, लग्न झालं तरी वेश्यावृत्तीच ना!’ रामण्णश-सरला, रामण्णा-कुमुद या नातेसंबंधांचा विचार करताना श्रीरंग यांनी कालिदास, भवभूती यांच्या काव्याचे दाखले देत त्यांच्या नात्यांचा, वागण्याचा अन्वयार्थ लावायचा प्रयत्न केलेला आहे. पुराणातील उदाहरणं आणि रामण्णा-कुमुदचा पोरकटपणा यातील साम्य मात्र इथठ ओढून-ताणून आणल्यासारखं, कृतक वाटतं. त्या उदाहरणांनी श्रीरंग यांचा व्यासंग दिसतो, पण रामण्णा-कुमुद ही पात्रं मात्र अ-लौकिक होत नाहीत. तरीही कधी कधी त्यांचे अनुभव तत्त्वज्ञानाच्या पातळीवर व्यक्त होतात. उदा. ‘एकाचं सुखदु:ख दुसऱ्याच्या हातात नसतं’किंवा ‘मनुष्याला ज्या घटना अचानक घडल्या असं वाटतं त्या निसर्गाच्या नियमानुसार घडतात.’ उत्तरार्ध ‘अनंत’मध्ये दहा वर्षानंतरचा कालखंड. त्यात कुमुदनं घर सोडलं. रामण्णाशी संबंध ठेवला नाही. मुलगा मोहन दहा वर्षांचा झाला. आता त्या दोघांमधील एकमेव दुवा ‘मोहन’. पण त्याच्या अकस्मात जाण्यानं रामण्णा आणि कुमुद यांच्या नात्याला काय अर्थ राहिला, असा प्रश्न उपस्थित करून ही कादंबरी संपते. अगदी अपवादानंच यात अलंकार येतात. सुंदर अशी श्रीरंगची निवेदनशैली आहे. प्रारंभी कथानक एकाच मुद्याभोवती घोटाळत राहतं. उत्तरार्धातही तसंच. पात्रांचे स्वाभाविक विस्तार जाणवत नाहीत. स्त्रिया तर हिंदुस्थानी पारंपरिक स्त्रियांचं प्रतिनिधित्व करणाNया, त्यादृष्टीनं यात आधुनिक विचारही जाणवत नाही. उषा देसाई-अविनाश देसाई यांचा अनुवाद उत्कृष्ट. चंद्रमोहन कुळकर्णींचं मुखपृष्ठ आशयानुसार अर्थचित्रासारखं सुबक. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RAZOR SHARP
RAZOR SHARP by ASHWIN SANGHI Rating Star
सुनील माने, पुणे

लेखक अश्विन सांघी “द रोझाबल लाइन” या पहिल्याच कादंबरीने खूप लोकप्रिय झाला. प्राचीन भारतीय दंतकथा/ऐतिहासिक संदर्भ घेऊन त्याच्याभोवती आजच्या काळात रहस्यपूर्ण कथा लिहिणारा अश्विन. Chanakya’s Chant, The Krishna Key, The Sialkot Saga, Keepers of the Kalacakra, The Vault of Vishnu, The Magicians of Mazda अशा एकापेक्षा एक सुंदर रहस्य कादंबर्या “भारत सिरीज़” नावाने खूप प्रसिद्ध झाल्या. या सर्व कादंबऱ्या मी इंग्लिश मधेच वाचल्या. यांचा मराठी अनुवाद मेहता पब्लिशिंग हाउस यांच्याकडे उपलब्ध आहे. अश्विन सांघीने या भारत सिरीज शिवाय एक नवीन थ्रिल्लर सिरीज (कुत्ता कदम) सुरू केली आहे. त्यांतील पहिली कादंबरी Razor Sharp. एक सिरियल किलर मुंबईत एकानंतर एक खून पाडतोय. पोलिस चक्रावले आहेत. 1. रविवार दि २ फेब्रुवारी , गोरेगाव पश्चिममधे रवि मेहराचा खून होतो. त्याची बायको खुशी कॅाल सेंटरचा जॅाब करून रात्री ११.३० ला परत येते. खूप वेळा बेल वाजवून दार न उघडल्यामुळे ती उघडून आत येते तर रवि रक्ताच्या थारोळ्यात मरून पडलेला असतो. त्याचे हात पाठीमागे नायलॅान दोरीने बांधलेले असतात. त्याच्या छातीत सुरा खुपसलेला असतो. त्याच्या तोंडात काहीतरी खाद्य पदार्थ असतो. 2. सोमवार दि १० फेब्रुवारी , लोअर परळमधे सुचंद्रा अग्रवालचा खून. तिची कामवाली आल्यावर दार न उघडल्यामुळे सोसायटीवाले दार तोडतात. आत सुचंद्राचा खून झालेला. हात नायलॅान दोरीने मागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात काहीतरी खाद्यपदार्थ. पोलिस चक्रावलेले. मग पोलिसखाते जागे होते. त्यांचा नावाजलेला अधिकारी जो सस्पेंड झालेला आहे, त्या प्रकाश कदम, DCP याला बोलावले जाते. राज्याचे गृहमंत्री ओंकार लोखंडे, त्यांचा माणूस कमिशनर चव्हाण आणि उपगृहमंत्री जयंत गायकवाड व त्यांचा माणूस SCP राणे, मुंबईचा डॅान भाऊ पाटील जो लोखंडेचाच माणूस असतो, हे सर्व या केसच्या मागावर लागतात. कदम हा राणेंच्या ओळखीचा खास ऑफिसर असतो म्हणून त्यालाही इन्व्हेस्टीगेशनला बोलावले जाते. 3. मंगळवार दि १८ फेब्रुवारी , ठाणे येथे मंगला शहाचा खून. तिच्या शेजारणीमुळे हे कळते. मंगलाचे हात नायलॅान दोरीने पाठीमागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात खाद्यपदार्थ. पोलिस अधिकारी शिंदे कदमबरोबर येतात. मंगलाच्या चेहऱ्याजवळ कदमला पेस्टिसाईडचा वास येतो. चेहरा निळसर झालेला. खून झाल्यावर बॅाडीला हलवलेले दिसते. तो ऑफिसमध्ये जुन्या खूनांचे फोटो तपासतो. त्यांचीही बॅाडी खून केल्यावर हलवलेली दिसते. चेहऱ्यावर निळसर झाक दिसते. तिन्ही खून “फिनेक” ब्रॅंडच्या चाकूने केलेले असतात. हे समान धागे कदम त्याची मुलगी केतुल बरोबर चर्चा करतो. केतुलची आई काही वर्षांपूर्वी कदमला सोडून गेलेली असते. ती भाऊ पाटीलची सावत्र बहीण असते. पण सध्या ती कुठे आहे व काय करते हे माहित नसते. केतुल कोर्टात काम करत असते तसेच ती “शक्ती” या NGO मधेही काम करते. शक्ती हे सोनापूरमधुन सुटका केलेल्या वेश्यांचे पुनर्वसन करत असते. निर्मल नावाचा तिचा मित्र एथिकल हॅकर असतो. तिच्यावर प्रेम करत असतो. कदमला हार्ट अटॅक येऊन गेलेला व स्टेंट बसवलेला असतो. Depression मुळे त्याची सायकॅालॅाजिस्टकडे ट्रिटमेंट चालू असते. कदमला या तिन्ही केसमधे आणखी एक धागा सापडतो. हे खून आठ दिवसांच्या अंतरावर झालेले असतात. म्हणजे पुढचा खून बुधवारी होणार असल्याचे तो राणे व शिंदेला सांगतो. 4. बुधवार दि २६ फेब्रुवारी, कांदिवली पश्चिम, लक्ष्मी बुधीराजाचा खून. तोच पॅटर्न. 5. गुरुवार दि ५ मार्च, खार पश्चिम, गुरुराज अदवानीचा खून सेम पॅटर्न. गुरूराज हा युट्युबवरचा प्रसिद्ध सिंगर असतो. 6. शुक्रवार दि १३ मार्च, ताडदेव, दिव्या शुक्रपाणीवर खूनी हल्ला होतो. पण ती जबर जखमी होते. ती फिटनेस ट्रेनर असल्यामुळे खुन्याबरोबर झटापट करते. पण चाकू पोटात घुसल्यामुळे ती जबर जखमी होते. हात बांधलेले असतानाही ती फोनवर “सिरी” ला तिच्या भावाला, ध्रुवला फोन लावायला सांगते. फोन लागतो व ती “हेल्प हेल्प” एव्हढेच बोलून बेशुद्ध होते. म्हणून खुनी पळून जातो. ध्रुव तिथे पोहोचून तिला हॅास्पिटलमधे ॲडमिट करतो. पोलिसांना तिथे खुन्याची बॅग सापडते. त्यांत नायलॅानची दोरी, बेगॅान स्प्रे व राजमाच्या बिया सापडतात. तिसऱ्या खुनाआधी पोलिस संशयित म्हणून राजू दाभाडेला अटक करतात. पण चौथ्या खूनाच्या वेळेस तो कस्टडीतच असतो. मग खूनी कोण? 7. शनिवार दि २१ मार्च, बान्द्रा पश्चिम, शनिया डिसौजाचा खून होतो. सेम मोडस ऑपरेंडी . 8. शनिवार दि २८ मार्च, चेंबूर, ७१ वर्षांच्या राहुल सिंह नावाच्या सिख व्यक्तिचा खून होतो. तीच पध्दत. यानंतर एक दिवस कदम KBC बघत असताना अमिताभ बच्चन एका सिनेमाचं गाणं लावून त्याचा पिक्चर ओळखायला सांगतात. ते गाणं असते- “सोमवार को हम मिले मंगलवार को नयन बुध को मेरी निंद खुली जुम्मेरात को चैन अरे शुक्र शनी कटे मुश्किलसे आज है इतवार सात दिनों में हो गया जैसे सात जनम का प्यार” आणि कदमच्या डोक्यात एकदम प्रकाश पडतो… अरे, हे सर्व खून असेच रविवार ते शनिवार एक एका वारी घडलेत! पण शनिवारी दोन खून कसे? याच्या मागे काही खगोलशास्त्र किंवा भविष्याचा तर संबंध नाही? कदमला आठवतं की शेजारी राहणारा डॉ. देसाईला पण भविष्य-खगोलशास्त्राची आवड व माहिती आहे. ( डॅाक्टर कडे सापडलेल्या नायलॅानचे रंगीत दोर व फिनेक कंपनीचा चाकू यामुळे एक संशयित म्हणून कदमने त्याला अटक करून पुछताछ केलेली असते) कदम लगेच डॅाक्टरांकडे जातो. त्यांची माफी मागून त्यांना या प्रश्नांत मदत करायला सांगतो. तो या सर्व खुनांचा सिक्वेन्स सांगतो. ते प्रत्येक वारी का घडले? मग शनिवारी दोन का? यापुढे कोणता वार? कुणाचा खून? डॅाक्टर सांगतात की भारतीय भविष्य व खगोल शास्त्रात नवग्रहांना खूप महत्व आहे. रवि, सोम(चंद्र), मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनि, राहू आणि केतु. यांचे रंग व धान्य वेगवेगळे असतात. त्या त्या ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी ते वापरले जातात. कदम ही माहिती लिहून घेतो. त्यावरून प्रत्येक खुनात वापरण्यात आलेले फिनेक कंपनीचे चाकू, वेगवेगळ्या रंगांचे नायलॅान दोर व तोंडातील पदार्थ यांचा संबंध जोडून एक तख्ता तयार करतोः- “रवि मेहरा-रविवार-सोनेरी दोर- तोंडात गहू-दिशा पूर्व सुचंद्रा-सोमवार-चंदेरी दोर-तोंडात तांदूळ-दिशा पश्चिम मंगला शाह-मंगळवार-लाल दोर-तोंडात तूर डाळ- दिशा दक्षिण लक्ष्मी बुधीराजा-बुधवार-हिरवा दोर-तोंडात हिरवे मूग-दिशा उत्तर गुरुराज अदवानी-गुरूवार-पिवळा दोर-तोंडात हरबरा डाळ-दिशा उत्तर पूर्व(ईशान्य) दिव्या शुक्रपाणी-शुक्रवार-पांढरा दोर-राजमा-दिशा दक्षिण पूर्व शनिया डिसौजा-शनिवार-काळा दोर-तोंडात काळे तिळ-दिशा उत्तर पश्चिम राहुल सिंग-शनिवार-निळा दोर-तोंडात उडीद दाळ-दिशा दक्षिण पश्चिम” आता उरला एकच ग्रह-केतु. केतुचा वार मंगळवार. ग्रे रंग, चना दाळ, दिशा दक्षिण पश्चिम. “केतु”म्हणजे कदमची मुलगी केतुलचा नंबर लागणार? आज तर मंगळवारच आहे! कदम घाबरून जातो! तो केतुलला फोन करतो पण तो बंद लागतो. ती सध्या कुठे आहे? कोर्टात? कदम आपल्या मुलीला वाचवतो का? खरा खुनी कोण असतो? तो पकडला जातो का? त्याचे यामागचा उद्देश काय असतो? याच्यामध्ये अजून कोण सामिल असतं का? याची उत्तरे मिळण्यासाठी वाचावी लागेल अश्विन सांघी यांची कादंबरी Razor Sharp. ...Read more

BANGARWADI
BANGARWADI by VYANKATESH MADGULKAR Rating Star
Sameer Kazi

सुंदर अशी कादंबरी माणदेशी बनगरवाडी तशी कोरडी रखरखती पण, यातील पात्रात मायेचा करुणेचाओलावा मनात घर करुन जातो