* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: INDOMITABLE SPIRIT
  • Availability : Available
  • Translators : SUPRIYA VAKIL
  • ISBN : 9788190734448
  • Edition : 12
  • Publishing Year : OCTOBER 2008
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 232
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : SPEECH
  • Available in Combos :DR. A. P. J. ABDUL KALAM COMBO SET - 4 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS BOOK IS A COLLECTION OF THE SPEECHES AND DISCUSSIONS BY DR. A.P.J ABDUL KALAM AT DIFFERENT FUNCTIONS AND PROGRAMMES. THEY ALL REVEAL THE BRIGHT IMAGE OF HIS JOURNEY FROM THE COAST RAMESHWAR TO THE RASHTRAPATI BHAVAN. THIS BOOK REFLECTS HIS VISION TOWARDS LIFE AND THE EPITOME OF HIS CONTEMPLATION. THIS BOOK PRESENTS KALAM AS A VISIONARY LEADER AND A DETERMINED IDOL WHO SEES INDIA AS A DEVELOPED COUNTRY. THIS IS AN INTERJECTION OF A PATRIOT, A TRUE KNOWLEDGE SEEKER, A PUREST MIND AND A WORTHY PERSON. WE COME ACROSS KALAM IN DIFFERENT ROLES; THAT OF A THINKER, A SCIENTIST, A TEACHER AND LAST BUT NOT THE LEAST, THE PRESIDENT. EACH OF THESE ROLES REVEALS DIFFERENT ASPECTS OF HIS PERSONALITY. EACH HAS MANY DIMENSIONS OF GUIDING AND INSPIRING THOUGHTS. YOUNG OR OLD, EACH MIND WILL BE AWAKENED BY THIS TREASURE.
‘अदम्य जिद्द’ हे डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांनी विविध प्रसंगी, विविध ठिकाणी केलेली भाषणे, संवाद, चर्चा यांचे संकलन आहे. रामेश्वरच्या सागरतीरापासून ते राष्ट्रपती भवनापर्यंतच्या त्यांच्या विलक्षण जीवनप्रवासाचे लख्ख प्रतिबिंब यात उमटले आहे. ‘अदम्य जिद्द’ हे आहे त्यांच्या जीवनविषयक दृष्टिकोनाचे व चिंतनाचे सार. विकसित भारताचे स्वप्न पाहणाऱ्या एका थोर, द्रष्ट्या नेत्याचा कणखर आदर्श या पुस्तकात पाहायला मिळतो. हा आहे एका मूल्यपे्रमी, देशभक्त, सच्च्या ज्ञानोपासकाच्या नितळ काळजाचा उत्कट उद्गार! अनेक घटना, प्रसंग, कथा, सुविचार यांची ओघवती माला गुंफत डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम आपल्याला एका चिंतनशील विचारवंत, वैज्ञानिक, शिक्षक व राष्ट्रपती अशा विविध भूमिकांमध्ये भेटतात, त्यांतून त्यांच्या व्यक्तित्वाचे मार्गदर्शक व प्रेरणादायी असे विविध पैलू झळाळून उठले आहेत. हे अनमोल विचारधन सर्वांनाच विचारास प्रवृत्त करणारे व आदर्शवत आहे.
आपटे वाचन मंदिर आणि इचलकरंजी साहित्य संमेलन स्मृती ट्रस्टतर्फे २००८ सालचा `उत्कृष्ट अनुवादित साहित्यकृती` पुरस्कार
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#INDOMITABLE SPIRIT#A. P. J. ABDUL KALAM #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #ADAMYAJIDDA #INDOMITABLESPIRIT #अदम्यजिद्द #SPEECHTRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #SUPRIYAVAKIL #सुप्रियावकील #A.P.J. ABDUL KALAM #ए.पी.जे.अब्दुलकलाम #INDOMITABLE SPIRIT#A.P. J.ABDULKALAM #ADAMYAJIDDA #SUPRIYA VAKIL #सुप्रियावकील #अदम्य जिद्द #MAZI JIVAN YATRA# MY JOURNEY TRANSFORMING DREAMS INTO ACTIONS #TURNING POINTS #अंजनी नरवणे #ANJANI NARAWANE"
Customer Reviews
  • Rating StarShobha Patil

    मला आवडले हे पुस्तक ऐक प्रेरणादायी ग्रंथ अवश्य वाचा व भेट द्या.

  • Rating Star DAINIK PUDHARI 14-12-2008

    केरळमधल्या दूरवरच्या भागातल्या लवलिगेन नावाच्या तरुणाचं पत्र मला आलं होतं. हा तरु विज्ञान पदवीधर होऊ शकला नव्हता. त्यानं पत्रात लिहिलं होतं की, मी नवा गणिती सिध्दांत शोधला आहे आणि त्या संदर्भात मला तुम्हाला भेटायचं आहे. त्या पत्रातून मला त्या तरुणाचीतळमळ जाणवली. मी विचार केला की, आपली तज्ज्ञ टिम त्याच्या कार्याचा अभ्यास करून त्याला योग्य प्रकारच्या संशोधकांकडे पाठवू शकेल. म्हणून मी त्याला काही दिवसांसाठी दिल्लीला बोलावून घेतले. मी त्याचं काम पाहिलं तेव्हा थक्कच झालो. त्याचे निष्कर्ष काहीअंशी रामानुजनच्या नंबर थिअरीतील समीकरणांजवळ पोहोचले होते; पण या मुलाला त्याची जराही कल्पना नव्हती. त्यानं काही शोधून काढलं होतं, त्यामध्ये काही नव्या मुद्यांची भर घातली होती आणि त्यानं काढलेला निष्कर्षही नवा होता. गणित क्षेत्रातील बहुतेकांची कर्तबगारी निसर्गाचे सुंदर पैलू शोधण्याच्या इच्छेतून निर्माण झालेली दिसते. तारकांनी नटलेल्या नभांगणानं खगोल शास्त्रज्ञांना नेहमीच आकर्षित केले आहे. त्यामध्ये आणखी योगदान देणारा घटक म्हणजे आकृतीबंध (patterns) शोधण्याची उपजत वृत्ती या घटकाची त्यामध्ये भर पडत असावी असं दिसतं. मग हे आकृतीबंध गणिती अनुक्रम वा शृंखला असले तरी लवलिगेन सध्या `पॉवर सिक्वेन्सेस व सिरीज` सारखं या रोमांचक विषयात संशोधन करतोय, ही विशेष नोंद घेण्याजोगी गोष्ट आहे. त्यावेळी मला वाटलं की, याला गणिताच्या उत्तम शिक्षणाची व उत्तम गणित शिक्षकाचं छत्र लाभण्याची गरज आहे. म्हणजे रामानुजन, प्रो. हार्डी लाभले तसं. आपण अशा तरुण व उत्साहानं रसरसलेल्या मनांना कशाप्रकारे प्रेरणा द्यायची? आपले शिक्षक, मानवतावादी किंवा सामाजिक कार्यकर्ते अशा कळ्यांना हेरून त्यांना फुलवण्यात सहाय्य करू शकतील का? १९४९ सालापासून दरवर्षी शंकर आंतरराष्ट्रीय बालक स्पर्धेचं आयोजन केलं जातं. मी `शंकर चिल्ड्रन आर्ट व्हॉल्यूम नं५५` चाळत होतो. या खंडात अडुसष्ट देशांतील मुलांनी रेखलेल्या चित्रांचा संग्रह आहे. मुलांनी त्यांच्या चित्रांतून, कविता-कथा, लेख यातून प्रकट केलेली बुद्धिमत्ता स्तिमित करणारी आहे. मोठी माणसं देश व सीमा, जाती व धर्म, श्रीमंत व गरीब, या विषयांवर बोलायला सुरुवात करतात; पण मुलांचं काम मात्र एकसंध असतं, त्याला सीमान्त नसतो. मुलांचं मन सर्वाधिक विशुद्ध रूपात असतं. त्यांची मतभेद करण्याची वृत्ती नसते. जगातील तरुण खचितच मनुष्यजातीची भावी आशा आहेत आणि त्यांच्या हातात पृथ्वी हा ग्रह सुरक्षित राहील, अशी माझी खात्री आहे. मी पाहिलेलं मुलांचं सगळंच काम माझ्या मनात सदैव टवटवीत राहिल, पण त्यातली काही नावं विशेष उल्लेखनीय आहे. मला अँथिया न्यूम्स नावाच्या जर्मन मुलीनं रेखाटलेलं चित्र फार आवडलं होतं. तिच्या चित्रात ग्रामीण भागातील इस्टरचं वातावरण कसं असतं, त्याचे रंग उमटले होते. तिने या चित्रात निवडलेल्या तेजस्वी रंगांनी मला माझं बालपण गेलं, त्या समुद्रकिनाऱ्यालगतच्या माझ्या गावाची आठवण करून दिली. चौदा वर्षांच्या भारतीय सुप्रजा चक्रवर्तीनं घरोघरी अनुभवाला येणारी मध्यमवर्गीय नैतिकता व निवडणुकीदरम्यान मतं कशी विकतं घेतली जातात, यावर कथा लिहिली आहे. उमलत्या मनांना बदल हवा आहे, ही गोष्ट स्पष्ट आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK LOKSATTA 25-9-2009

    ‘अदम्य जिद्द’ हे डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी विविध प्रसंगी, विविध ठिकाणी केलेली भाषणे, संवाद, चर्चा यांचे संकलन आहे. रामेश्वरच्या सागरतीरापासून ते राष्ट्रपती भवनापर्यंतच्या त्यांच्या विलक्षण जीवनप्रवासाचे लख्ख प्रतिबिंब यात उमटले आहे. ‘अदम्य जद्द’ हे आहे त्यांच्या जीवनविषयक दृष्टिकोनाचे व चिंतनाचे सार. विकसित भारताचे स्वप्न पाहणाNया एका थोर, द्रष्ट्या नेत्याचा कणखर आदर्श या पुस्तकात पाहायला मिळतो. हा आहे एका मूल्यप्रेमी, देशभक्त, सच्च्या ज्ञानोपासकाच्या नितळ काळजाचा उत्कट उद्गार! अनेक घटाना, प्रसंग, कथा, सुविचार यांची ओघवती माला गुंफत डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम आपल्याला एका चिंतनशील विचारवंत, वैज्ञानिक, शिक्षक व राष्ट्रपती अशा विविध भूमिकांमध्ये भेटतात, त्यातून त्यांच्या व्यक्तिमत्वाचे मार्गदर्शक व प्रेरणादायी असे विविध पैलू झळाळून उठले आहेत. हे अनमोल विचारधन सर्वांनाच विचारास प्रवृत्त करणारे व आदर्शवत आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

राधेय.... लेखक रणजित देसाई... मित्र कसा असावा...कर्णासारखा दातृत्व कसं असावं...कर्णासारखं असा हा कर्ण... त्याला अंगराज म्हणावं, दान देणारा दाता म्हणावं, राधेय म्हणावं कि कौतेय... काहीही म्हणा पण कर्णासारखा दाता कर्णानंतर कधी झाला नाही आणि कधी होणरही नाही... रणजित देसाई लिखीत कर्णचरीत्र राधेय आज हातावेगळं झालं ते अश्रुभरल्या नयनांनी...ज्याचा अंत करायला स्वतः देवाधिदेव कृष्णाला अर्जुनाचं सारथ्य करावं लागलं यातच अंगराज कर्णांचं विरत्व अधोरेखीत होत आहे. जन्मापासुन ज्याला केवळ सुतपुत्र म्हणुन वागणुक मिळाली असा तो कर्ण स्वतःच्या बळावर इतका महान लढवय्या बनला. पुस्तकाच्या प्रास्ताविकात देसाईंनी म्हटलं आहे की राधेय मधला कर्ण महाभारतात शोधायची गरज नाही. प्रत्येकाच्या मनातच तो दडलेला असतो, कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत, तर त्यात हा कर्ण दिसेल. त्याचं दु:खं, पोरकेपण आणि त्यातून पार होवून एक अनोखी ऊंची गाठणारं त्याचं दातृत्व, व्यक्तित्व याचं एक भव्य, शोकात्म चित्र राधेय मधून उभं राहतं. राधेय या कादंबरीत रणजित देसाईंच्या शब्दांनी कर्णाची अनेक रुपे अनुभवता आली. त्यामध्ये राधाई आणि वृषाली सोबतचा कर्ण, दुर्यौधनासोबतचा कर्ण, कृष्णासोबतचा कर्ण, रणांगणावरचा कर्ण आणि नदीकाठी पाठमोरा ऊभा राहत दान करत असलेला कर्ण अशा अनेक रुपांनी प्रत्येकवेळी वेगळा भासला. वृषसेन आणि चक्रधराच्या मृत्युने हळवा झालेला कर्णही वाचकाच्या डोळ्यातही पाणी आणवतो... समोर मृत्यु दिसत असताना सुध्दा केवळ दिलेल्या वचनामुळे हातातील धनुष्याचा त्याग करुन शस्त्रहिन हेणारा कर्ण रणजित देसाईंच्या शब्दांमुळे आजन्म लक्षात राहील. कर्णासारखं होणं कुणालाही कदापि शक्य नाही पण त्यातला एखादा जरी चांगला गुण अंगी बाळगण्याचा प्रयत्न प्रत्येकाने नक्कीच केला पाहीजे... प्रत्येकाच्या संग्रही असावं आणि एकदा तरी वाचावं असं पुस्तक रणजित देसाई लिखीत...राधेय... © विश्वजित शिंत्रे. ...Read more

BAJIND
BAJIND by PAHILWAN GANESH MANUGADE Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

काही पुस्तकं अशी असतात कि कितीही वेळा वाचली तरीही त्या पुस्तकाचा कंटाळा येत नाही. पुन्हा पुन्हा वाचावं असं वाटतं आणि त्याची पारायणं होतचं राहतात. असचं एक पुस्तक म्हणजे *पै.गणेश मानुगडे* लिखीत *बाजिंद.* *बाजिंद* हे एक असं रसायन आहे जे प्रत्ेकाला अक्षरशः वेड लावतं. साधारण चार पाच वर्षांपुर्वी पहील्यांदा वाचलं होतं, त्यानंतर बर्‍याचवेळा आणि आज पुन्हा एकदा. त्याबद्दलची एक सुंदर आठवण म्हणजे माझ्या बहिणीच्या गरोदरपणाच्या दिवसात ग्रहण लागलं होतं आणि त्या ग्रहणकाळात तिला मी *बाजिंद* वाचुन दाखवलं होतं, असं हे पुस्तक. कुस्ती, प्रेमकथा, हेरगिरी, गुढ रहस्यमय बाजिंदचं जंगल, पशु-पक्षी व हिंस्र जनावरांची भाषा, बहीर्जी नाईक आणि अवघ्या हिंदुस्थानाचे आणि मराठी मनाचे आराध्यदैवत *श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज* असा या पुस्तकाचा प्रवास. शेवटाला अंगावर काटा आला कि समजावं आपण या पुस्तकाच्या प्रेमात पडलोय. रायगडच्या डोंगरदरीत वसलेल्या धनगरवाडीचा सखाराम धनगर आणि त्याच्यासोबत मल्हारी, सर्जा आणि नारायण निघालेत छत्रपती शिवरायांना भेटायला. कारण टकमक टोकावरुन ज्या गद्दारांचा कडेलोट व्हायचा ती प्रेतं येऊन पडायची ती थेट धनगरवाडीच्या आसपासच्या जंगलात आणि त्यामुळे आसपासच्या परीसरात जंगली जनावरांचा सुळसुळाट खुप वाढला होता. त्यांची मेजवानी व्हायची पण जर कधी कडेलोट नसायचा तेव्हा ती हिंस्त्र जनावरं आसपासच्या लोकवस्तीत शिरायची. हिच कैफियत मांडायला सखाराम धनगर आणि इतर मंडळी रायगडी निघतात. त्यानंतरचा त्यांचा प्रवास आणि कथा वाचकाला इतकी गुरफटवुन टाकते कि शेवटच्या पानावरची शेवटची ओळ कधी वाचुन संपते, कळतही नाही. त्यांची स्वराज्यहेर खंडोजीची भेट मग सावित्री, वस्तादकाका, वाचतानाही भितीदायक दिसणारं जंगल, कधीही न पाहीलेलं महादेवाचं मंदीर, खंडोजीचा असणारा ट्विस्ट आणि मग बहिर्जी नाईक आणि मग थेट रायगड आणि महाराज, सगळं प्रत्यक्षात आपल्यासमोर घडतयं कि असा भास निर्माण करणारं असं हे पुस्तक. एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी कथा, एकदा वाचली कि पुन्हा एकदा वाचण्याचा मोह आवरता येत नाही अशी कथा, ज्यामध्ये असं बरचं काही जे वाचल्याशिवाय कळणार नाही. अजुन एक असं कि सातासमुद्रापार जगातील अव्वल गणली जाणारी इस्त्राईलची गुप्तहेर संघटना मोसाद यांच्या अभ्यासक्रमात बहिर्जी नाईक आणि आपलं हेरखातं शिकवलं जातं अशी अभिमान वाटणारी घटना आपल्या राज्यात घडलीय त्याचीच हि गोष्ट...बाजिंद... ...इकडे खंडोजीने सावित्रीला उचलुन जंगलातुन बरेच बाहेर आणले होते. पुढे डोंगराची कडेतुट होती आणि हजारो हात खोल फेसाळणार्‍या नदीचे विशाल पात्र...खंडोजीने एकदा मागे पाहीले आणि ताडले कि शिर्क्यांची फौज पाठलाग करत आहे...त्याने कशाचाही विचार न करता सावित्रीसह स्वतःला त्या कडेतुट वरुन त्या विशाल नदीच्या पात्रात झोकुन दिले...आणि... त्यासाठी वाचा *पै.गणेश मानुगडे* लिखीत...*बाजिंद..!!!* © विश्वजीत श्रीपती शिंत्रे. मु.पो.इंचनाळ, ता.गडहिंग्लज,जि.कोल्हापुर ०९९२२३१३९१९ ...Read more