* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
"NARAYANA MURTHY IS A ROLE MODEL FOR MILLIONS OF INDIANS. AN ICONIC FIGURE IN THE COUNTRY, HE IS WIDELY RESPECTED AND LOOKED UP TO NOT ONLY FOR HIS BUSINESS LEADERSHIP BUT ALSO FOR HIS ETHICS AND PERSONAL CONDUCT. HE REPRESENTS THE FACE OF THE NEW RESURGENT INDIA TO THE WORLD. I AM SURE THIS COLLECTION OF HIS SPEECHES WILL INFORM, INSPIRE AND GUIDE MANY IN THE YEARS TO COME." -MANMOHAN SINGH, (PREVIOUS)PRIME MINISTER OF INDIA. "NARAYAN MURTHY OVERCAME MANY OBSTACLES AND DEMONSTRATED THAT IT IS POSSIBLE TO CREATE A WORLD-CLASS, VALUES-DRIVEN COMPANY IN INDIA. THROUGH HIS VISION AND LEADERSHIP MURTHY SPARKED A WAVE OF INNOVATION AND ENTREPRENEURSHIP THAT CHANGED THE WAY WE VIEW OURSELVES AND HOW THE WORLD VIEWS INDIA. IN THIS COLLECTION OF HIS SPEECHES, HE DELIVERS A TIMELY MESSAGE ABOUT THE IMPORTANCE OF VALUES AND LEADERSHIP IN BUSINESS." -BILL GATES, CHAIRMAN OF THE BOARD, MICROSOFT CORPORATION
"लाखो भारतीयांसाठी नारायण मूर्ती हे एक आदर्श व्यक्तिमत्व आहे. केवळ त्यांच्या औद्योगिक क्षेत्रातील कर्तृत्व आणि नेतृत्वामुळे नाही, तर मूल्याधिष्ठित वागणूक आणि व्यक्तिगत आचरणामुळे नारायण मूर्ती हे अवघ्या देशासाठी आदर्श ठरले आहेत. ते जगासमोर भारताच्या नव्या, प्रगतिशील चेहेयाचं प्रतिनिधित्व करतात. त्यांनी दिलेल्या व्याख्यानांचा हा संच येणाऱ्या पिढ्यांना माहितीपर, प्रेरणादायक आणि मार्गदर्शक ठरेल याची मला खात्री आहे." -डॉ. मनमोहन सिंग, पंतप्रधान, भारत. "नारायण मूर्ती यांनी अनेक अडथळे पार करून हे दाखवून दिलं आहे की, भारतात जागतिक दर्जाच्या, मूल्याधिष्ठित कंपनीची उभारणी करणं शक्य आहे. मूर्तीच्या दूरदृष्टी आणि नेतृत्वामुळे नावीन्य आणि उद्योजकतेच्या जगात चमक आली अखे, आपली स्वत:कडे पाहण्याची आणि जगाची भारताकडे पाहण्याची दृष्टी बदलली आहे. व्याख्यानांच्या या संचाद्वारे, व्यवसायातील मूल्यं आणि नेतृत्वगुणाचं महत्व त्यांनी अधोरेखित केलं आहे." -बिल गेट्स, अध्यक्ष, संचालक मंडळ, मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन

No Records Found
No Records Found
Keywords
#SUDHA MURTY #N.R.NARAYANA MURTY #LEENA SOHONI #UMA KULKARNI #WISE & OTHERWISE #GOSHTI MANSANCHYA #PUNYABHUMI BHARAT #THAILIBHAR GOSHTI #SUKESHINI AANI ITAR KATHA #BAKULA #AYUSHYACHE DHADE GIRAVTANA #AAJICHYA POTADITALYA GOSHTI #MAHASHWETA #DOLLAR BAHU #SAMANYATALE ASAMANYA #PARIGH #PITRURHUN #ASTITVA #HARAVALELYA MANDIRACHE RAHASYA #TEEN HAJAR TAKE #SARPACHA SOOD #GARUDJANMACHI KATHA #TRISHANKU #A BETTER INDIA A BETTER WORLD #NARAYAN MURTY : MULYA JAPNARA EK ADWITIYA AAYUSHYA #सुधा मूर्ती #एन.आर.नारायण मूर्ती #लीना सोहोनी #उमा कुलकर्णी #वाइज अँड अदरवाइज #गोष्टी माणसांच्या #पुण्यभूमी भारत #थैलीभर गोष्टी #सुकेशिनी #बकुळा #आयुष्याचे धडे गिरवताना #आजीच्या पोतडीतल्या गोष्टी #महाश्वेता #डॉलर बहू सामान्यांतले असामान्य #परीघ पितृऋण #अस्तित्व #हरवलेल्या मंदिराचे रहस्य #तीन हजार टाके #सर्पाचा सूड #गरुडजन्माची कथा #त्रिशंकू #अ बेटर इंडिया अ बेटर वर्ल्ड : नारायण मूर्ती #नारायण मूर्ती : मूल्यं जपणारं एक अद्वितीय आयुष्य
Customer Reviews
  • Rating StarDainik Aikya ,Satara 1st Aug.2010

    गेल्या काही वर्षात जगभरातील वेगवेगळ्या संस्थांच्या व परिषदांच्या व्यासपीठावरून त्यांनी दीडशेवर व्याख्याने दिली. त्यात व्यवस्थापन, तंत्रज्ञान, उद्योग, आरेखन, कायदा, विदेशी व्यापार, मुक्तकला, शिस्त, टीमवर्क, धर्मनिरपेक्षता, प्रामाणिकपणा, करारांचे पालन,समाजहिताला प्राधान्य, सक्षमीकरण, सांस्कृतिक वारसा वगैरे विषयांवरील आपले अनुभवसिद्ध चिंतन त्यांनी मांडले. आर्थिक सुधारणा, लोकसंख्या, भारतीय राजकारण, नोकरशाही, शहरीकरण, ग्रामीण अर्थव्यवस्था, दारिद्र्य निर्मूलनासाठी तंत्रज्ञानाचा वापर, उच्च शिक्षण, व्यावसायिक नेतृत्व, कॉर्पोरेट गव्हर्नन्स, उद्योजकता, नव्या बाजारपेठा आणि संधी अशा अनेक प्रश्नांचा ऊहापोह त्यांनी केला आहे. या दीडशे प्लस व्याख्यानांतून ३८ व्याख्याने निवडून ‘अ बेटर इंडिया, अ बेटर वर्ल्ड’ हे पुस्तक पेंग्विनने प्रकाशित केले आहे. इन्फोसिसची स्थापना, त्यामागची भूमिका, मूल्यप्रणाली यांचीही चर्चा अधूनमधून होते. ही व्याख्याने जाणूनबुजून सोपी, साधी ठेवली आहेत. युवा पिढीला ती उद्बोधक वाटावीत प्रेरणादायक ठरावीत अशी तळमळ त्यामागे आहे. त्यामुळे या पुस्तकातील विचारांचा पाठपुरावा करायला हवा. १९८१ मध्ये सात सॉफ्टवेअर व्यावसायिकांनी इन्फोसिस ही कंपनी स्थापन केली. भांडवल होते २५० डॉलर्स. १९८२ ते १९९२ या दहा वर्षात इन्फोसिसचा महसूल १,३०,००० डॉलर्सवरून पंधरा लाख डॉलर्स एवढा वाढला. १९९२ ते २००८ या १६ वर्षांत इन्फोसिसचा महसूल ४.१ अब्ज डॉलर्स झाला. इन्फोसिसमध्ये ८८ हजार कर्मचारी आज काम करतात. या कर्मचा-यांमध्ये केवळ भारतातलेच नव्हे तर जगातल्या ९० देशांमधले नागिरक आहेत. इन्फोसिसचे बाजारपेठेतील भांडवली मूल्य २७ अब्ज डॉलर्सवर आहे. भारतातल्या माहिती-तंत्रज्ञान उद्योगाचा नफा इ. स. २००८ मध्ये ४० अब्ज डॉलर्सच्या घरात पोचला आहे. इन्फोसिसची उभारणी ज्या तीन तत्त्वांवर झाली ती तीन तत्त्वे अशी : १) गुंतागुंतीची सॉफ्टवेअर्स ग्राहकांच्या गरजांनुसार तयार करून जागतिक स्पर्धात्मक पातळीवर अव्वल स्थान मिळवणे. २) बाजारपेठेमध्ये आपले निराळे स्थान निर्माण करणे. कार्यप्रणाली व धोरण, नीतिनियम कंपनीच्या माहितीयंत्रणेत अंतर्भूत करणे. ३) ग्राहक समाधानात भर टाकणे, किंमती कमी करणे, उत्पादकता वाढवणे, ग्राहकांची संख्या वाढवणे. या कल्पनेला योग्य अशी बाजारपेठ भारतात उपलब्ध नव्हती. त्यामुळे जागतिक बाजारपेठ शोधणे आवश्यक ठरले. जी-७ देशांमधील कंपन्यांसाठी सॉफ्टवेअर निर्माण करण्याचा प्रयत्न इन्फोसिसने आरंभापासून केला. इन्फोसिसची स्थापना करण्याआधी नारायण मूर्ती यांनी कानपूरच्या आयआयटीत शिक्षण पूर्ण करून फ्रान्समध्ये माहिती तंत्रज्ञानाचे उच्च शिक्षण घेतले. नारायण मूर्ती हे एकेकाळी स्वत:ला पक्के कम्युनिस्ट मानत. परदेशात शिक्षणासाठी ते गेले. कानपूरच्या आयआयटीमध्ये कंट्रोल थिअरीचा अभ्यास त्यांनी केला. त्यावेळी अमेरिकेतील एका विद्यापीठातील एका संगणक अभियंत्याचे भाषण ऐकून नारायण मूर्ती प्रभावित झाले. कॉम्प्युटर सायन्समधील भावी प्रगतीची दिशा त्या अभियंत्याने स्पष्ट केली. पुढचा काळ संगणकाचा आहे असे ते म्हणाले. त्यांनी काही संशोधनपर लेख वाचण्याचीही शिफारस केली. ते लेख वाचल्यावर नारायण मूर्ती यांनी कॉम्प्युटर सायन्स शिकायचे ठरवले. त्यासाठी परदेशात गेले. फ्रान्समध्ये संगणक शास्त्राचे शिक्षण घेतले. नंतर भारतात परतण्यापूर्वी बल्गेरिया, युगोस्लाव्हिया वगैरे कम्युनिस्ट देशांना त्यांनी भेटी दिल्या. बल्गेरिया-युगोस्लाव्हियाच्या सीमेवरच्या नीस या गावी आल्यावर रविवारी बँका बंद असल्याने आणि जवळ स्थानिक चलन नसल्याने नारायण मूर्तींना दिवसभर उपाशी राहावे लागले. रेल्वे स्टेशनवरच बसून राहावे लागले. नंतर रेल्वेत एका तरुणीबरोबर फ्रेंचमध्ये गप्पा मारत असताना बल्गेरियातील साम्यवादी सरकारवर टीका केल्याचा आरोप करून तेथील पोलिसांनी त्यांना रेल्वेतून उतरवले. आठ बाय आठच्या थंडगार खोलीत त्यांनी डांबून ठेवले. बहात्तर तास त्या खोलीत काहीही न खातापिता त्यांना राहावे लागले. नंतर बाहेर काढून इस्तंबूलच्या मालगाडीच्या गार्डच्या डब्यात बंदिस्त करण्यात आले. परत २४ तास उपाशी. सुरक्षारक्षकाने त्यांना म्हटले. भारताचे बल्गेरियाशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत, म्हणून तुम्हाला सोडून देत आहोत. नाहीतर तुरुंगातच खितपत पडला असता. १०८ तास कडकडीत उपास आणि थंडीतला प्रवास यामुळे नारायण मूर्ती यांना कम्युनिस्ट देशांच्या मानवतावादी ़कॉमरेडशिपबद्दलचा भ्रमाचा भोपळा फुटला. माणूस म्हणूनही सौजन्याची वागणूक न देणा-या साम्यवादी देशांच्या मनोवृत्तीचा त्यांना उबग आला. डाव्या विचारसरणीबद्दलचा उरलासुरला कळवळाही लुप्त झाला. साम्यवादाने समाजातील गरिबी दूर होत नाही. सर्वांना समान वागणूक मिळत नाही, हे लक्षात आले. संभ्रमित डावात कट्टर मानवतावादी भांडवलशाहीवाला असे नारायणमूर्ती यांचे त्या एका अनुभवाने परिवर्तन झाले. गरिबी दूर करण्यासाठी मोठ्या संख्येने नोक-या निर्माण करणारे उद्योगधंदेच हवेत, अशी त्यांची खात्री पटली. १९७४ मधील ही घटना. तिचा नारायण मूर्ती यांच्यावर खूप प्रभाव पडला. १९८१ मध्ये इन्फोसिस ही कंपनी सुरू केली. नऊ वर्षात धीम्या गतीने धंदा होत राहिला. दहा लाख रुपयांना इन्फोसिस विकत घेण्याची तयारी एका उद्योजकाने दाखवली. नारायण मूर्ती यांनी या ऑफरला नकार दिला. कंपनी विकायचीच असेल तर मी घेतो असे ते म्हणाले. दहा लाखांची ऑफर आलेल्या इन्फोसिसचे आजचे भांडवल मूल्य २८ अब्ज डॉलर्स आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MI GALIB BOLTOY
MI GALIB BOLTOY by SHABBIR ROMANI Rating Star
लोकमत २५.९.२०२३

शब्बीर रोमानी हे व्यवसायाने वकील. मातृभाषा अर्थात उर्दू आणि शिक्षण मराठी माध्यमातून झालेले. २०१८ मध्ये प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या उर्दू पुस्तकाला, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालच्या साहित्य अकादमी केंद्राचे पुरस्कार लाभले आहेत. आता मिर्झागालिबवरचे नवे पुस्तक, `मी गालिब बोलतोय...!` लक्ष वेधून घेत आहे. गालिबच्या एका शेरची पहिली ओळ घेऊन सांगायचे झाल्यास, जिक्र गालिबचा आणि खूबसूरत बयान लेखकाचे असे या पुरस्काराबद्दल म्हणता येईल. मिर्जा असदुल्ला खां,`गालिब` या श्रेष्ठ शायरची शायरी, त्याचे पत्रलेखन, चरित्र यावर आजवर शेकडो पुस्तक प्रसिद्ध आहेत. लेखकाने प्रस्तावनेत नमूद केल्यानुसार गालिबवर अनेक लेखकांनी लिहिले आहे. मराठी, हिंदी-उर्दू लेखकांची ते तपशील पाहून आचंबा वाटतो. शिवाय शब्बीर रोमानी यांनी इथे आपल्या लेखनाचे प्रयोजन सांगताना म्हटले आहे, कि गालिबबद्दल अनेक उलट-सुलट प्रकारच्या कहाण्या, विनोद, (कसलेही शेर गालिबच्या नावाने सांगत राहणे) प्रचलित आहेत; त्यामुळे गालिबची कथा, त्याच्या पत्रांमधल्या मनोरंजक गप्पा-गोष्टी आणि त्याच्याशी निगडित आठवणी हे सगळं साध्या सोप्या भाषेत लिहिण्याचा प्रयत्न म्हणजे हे पुस्तक. सर्वसामान्य माणसाच्या जगण्यातल्या सर्व भावछटा गालिबच्या काव्यातून दिसत असतात. पुस्तक वाचताना गालिबची प्रकृती, त्याची विनोद बुद्धी, संवेदनशील वृत्ती हे आपल्याला जाणवत राहते, आणि लेखकाची तळमळसुद्धा. या पुस्तकाचे वैशिष्टय म्हणजे, मोठी प्रकरण टाळून किस्से सांगावेत अशी रचना. शिवाय लेखकाची साधी-सरळ भाषा, यामुळे शायरीची आणि गालिबबद्दलची सर्वसाधारण माहिती आणि कुतुहूल असणाऱ्या वाचकांना हे पुस्तक रंजक वाटेल. सहसा गालिबचे गाजलेले शेर, किस्से हे आपल्या वाचनात असतात. या पुस्तकात गालिबचे अनेक दुर्मिळ शेर, शिवाय फारसी रचनाही या पुस्तकात समाविष्ट असल्याने त्याला एक संदर्भ ग्रंथाचेही स्वरूप आलेले आहे. गालिबला आंबे फार आवडायचे, `मिर्झा गालिब` या गाजलेल्या चित्रपटातला तो प्रसंग आजही लक्षात आहे. आंबे खाताना एक मित्र गालिबला तुच्छतेने म्हणतो, `आम तो गधेभी नही खाते!` त्यावर गालिबने त्वरित उत्तर देतो. `सिर्फ गधेही नाही खाते!` शब्बीर रोमानी यांनी हा प्रसंग व विनोद म्हणून सांगितला नाही, तर त्याचे तपशिलाने वर्णन तर केलेच शिवाय आंब्यावरची गालिबची मोठी गजल त्यांनी दिलेली असल्याने त्या किश्श्याला एक गांभीर्य आलेले आहे. असाच एक किस्सा, ते कलकत्त्याला असताना साध्या चिकणी-सुपारीवर गालिबला कुणी छेडले होते, यावर तुमची शायरी होऊन जाऊ द्या! असे आवाहन केले. या सुपारीच्या दिसण्या-असण्यावरच्या अफलातून शायरीची भली मोठी झलकच गालिबने पेश केली! गालिबच्या एक महत्वाचा शेर आहे. जिक्र ऊस परी-वंश का और फार बयां अपना बन गया रिकीब आखिर, था जो राजदां अपना त्या परिच्या सौंदर्याचे वर्णन आणि तेही माझ्या भाषेतून, माझ्याकडून ऐकले आणि माझा जवळचा असा मित्र आता या प्रेमाच्या नात्यात माझा प्रतिस्पर्धी झाला (आता तो तिच्यावर प्रेम करायला लागला) कलकत्त्याला गालिब दीडेएक वर्ष राहिला होता. तिथल्या धनिकांनी मुशायरे, मुजरे आयोजित केलेले असायचे, गालिबचा तिथे सन्मानही व्हायचा. गालिबने या बद्दल फार जिव्हाळ्याने लिहिले आहे. या मुशायऱ्यामध्ये गालिबचे फारसीचे काव्यवाचन ऐकून फारसी भाषेचे तज्ञ त्याच्यावर नाराज झाल्याची आठवण आहे! गालिबच्या तोंडून फारसीचे कौतुक ऐकून लोकांनी आक्षेप घेतला! गालिब हा आपल्या दुःख, विवंचनेवर हसणारा अद्भुत असा कलावंत होता. हा शेर वाचल्यावर आपल्याला मुन्शी प्रेमचंद यांच्या `पूस कि रात` मधला हलकू आठवतो! मिर्झा गालिबच्या कुतुहूल असणाऱ्या वाचकांना हा संग्रह आवडण्यासारखाच आहे. लेखनातल्या भाषिक काही त्रुटी वगळल्यास, गालिबचे किस्से, त्याची शायरी हे सगळे रोचक आहे. ...Read more

MRUTYUNJAYEE
MRUTYUNJAYEE by RATNAKAR MATKARI Rating Star
पुस्तकप्रेमी

मीना कश्यप शाह *मृत्युंजयी* भयकथा हा रत्नाकर मतकरींच्या लेखनाचा हातखंडा. मी दहावीच्या सुट्टीत असताना भयकथा वाचायला सुरुवात केली आणि त्यांनी मला पुरात झपाटून टाकलं होतं. ही पुस्तकं असायचीही सुटसुटीत जाडीची. त्यामुळे जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी पुस्तक लगणाऱ्या मला सगळीकडे ती घेऊन जात येत असत. क्लास मध्ये लवकर पोहोचले - वाच पुस्तक, बससाठी उभी आहे, वाच पुस्तक; झोप येत नाही, वाच (हे बहुदा चक्राकार रित्या सुरु राहायचं, झोप नाही म्हणून वाचायचं आणि वाचत असायचे म्हणून झोप नाही... त्या वयात असं सगळं चालायचं - लहानपण देगा देवा...) मृत्युंजयी सुरु केली तेव्हा आधीच खेकडा, रंगांधळा वाचून झालं होतं. अजूनही एक संपवलं होतं, पण नाव नाही आठवत (बहुतेक कबंध). त्या पार्श्वभूमीवर मृत्युंजयी फार आवडलं नाही, आणि खरं तर त्यामुळे रत्नाकर मतकरींच्या भयकथा वाचणं थांबलं. अलीकडेच हे इ-बुक मिळालं किंडल वर, पुन्हा वाचलं - आतासुद्धा शेवटच्या परिच्छेदात काय वळण मिळतं त्याची उत्सुकता होती, पण एकूणच माझा patience खूपच कमी झालाय त्यामुळे skip reading, quick reading करत पुस्तक पटकन वाचून संपलं. मृत्यू, अखेर, शेवट ही भावना प्रत्येकासाठी भीतीदायकच. त्या भीतीवर बेतलेल्या कथा ह्या संग्रहात आहेत. अतिमानवीय, फँटसी, भुताटकी अशा धक्कातंत्राचा उपयोग अनेक लेखक करतात. पण मतकरीचं वैशिष्ठय असं, की ते जळमटं सारखी कथा लिहून जातात. मृत्युंजयी मधील कथांमध्ये मृत्यूची अनेक रूपं दिसतात, कथा जिवंत माणसांच्या - पण मृत्यूची चाहूल, त्याची भीती, कधी त्याचं हवेहवेपण, कधी त्याच्याकडे आपणहून जाणे, अशा अनेक रंगढंगांनी मतकरी गूढता कायम ठेवतात. ह्या पुस्तकातील, मृत्यू अवतीभवती असलेल्या प्रत्येक कथेत, आपणा सर्वांना नक्कीच सुप्त आकर्षण वाटत असलेल्या अनेक गूढ गोष्टी येतातच... मृत्यूवर विजय मिळवण्यासाठी करण्याची अतिमानवीय साधना... स्त्री-पुरुषातील शारीरिक आणि मानसिक ओढ... पूर्वी केलेल्या चुका आणि त्याबद्दलचा सल... जुलमाचा प्रतिशोध... अतिमानवीय शक्तींनी झपाटणे... भूतबाधा, भूतांशी गाठभेट... मृत्यूच्या अनेकविध तऱ्हा... मानसिक संतुलन ढळणे... आणि तत्सम. ह्या कथाप्रकारात महत्वाचं असतं, ते शेवटच्या काही वाक्यांमधे कथेला दिलेलं वळण आणि त्यामुळे वाचकाला बसलेला धक्का. रत्नाकर मतकरींच्या गूढकथा म्हणूनच खूप प्रभावी ठरतात. आता मात्र हे धक्का तंत्र बऱ्याच जागी पाहायला मिळतं - OTT वरच्या अनेक चित्रपट किंवा नाट्यमालांमधे हे तंत्र कथाकार वापरतात, आणि लोकांना हे पहायला खरंच खूप आवडतं, म्हणूनच त्या प्रसिद्ध होतात. अलीकडचं उदाहरण "वाळवी" चित्रपट! मृत्युंजयी मधे देखील काही कथा असा आनंद देऊन जातात. पण असं आहे ना "अति सर्वत्र वर्जयेत" - त्यामुळे बऱ्याच कथांच्या शेवटचा अंदाज लागतो आणि त्यांचा प्रभाव कमी होतो. सुरुवातीला जी गूढकथांची पुस्तकं मी वाचली, तेव्हा हे धक्कातंत्र मला नवीन होतं, त्यामुळे त्यात हा अंदाज लागत नव्हता. कदाचित मृत्युंजयी तेव्हा वाचलं आणि आताही वाचलं ते ह्या तंत्राचा अति वापर झाल्यावर वाचलं गेलं म्हणून असेल, पण कमी प्रभावी वाटलं हे खरं. अर्थात प्रत्येक गोष्टीत (सध्या इतर कथांमधे फारसे न सापडणारे) एक समान सूत्र आहे - ते म्हणजे, *वाईटाचं कधीच भलं होत नाही*. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, कधीही उचलून वाचायला सुरुवात करून काही मिनिटात एक गोष्ट संपते. सध्याच्या व्यग्र काळात हे पुस्तक पुन्हा वाचायला सोपे गेले, नक्कीच. आणि मी पुन्हा एकदा ह्या कथाप्रकाराकडे आकर्षितही झाले आहे... पुन्हा सगळी गूढकथांची पुस्तकं वाचायला हवीत. ...Read more