* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
"NARAYANA MURTHY IS A ROLE MODEL FOR MILLIONS OF INDIANS. AN ICONIC FIGURE IN THE COUNTRY, HE IS WIDELY RESPECTED AND LOOKED UP TO NOT ONLY FOR HIS BUSINESS LEADERSHIP BUT ALSO FOR HIS ETHICS AND PERSONAL CONDUCT. HE REPRESENTS THE FACE OF THE NEW RESURGENT INDIA TO THE WORLD. I AM SURE THIS COLLECTION OF HIS SPEECHES WILL INFORM, INSPIRE AND GUIDE MANY IN THE YEARS TO COME." -MANMOHAN SINGH, (PREVIOUS)PRIME MINISTER OF INDIA. "NARAYAN MURTHY OVERCAME MANY OBSTACLES AND DEMONSTRATED THAT IT IS POSSIBLE TO CREATE A WORLD-CLASS, VALUES-DRIVEN COMPANY IN INDIA. THROUGH HIS VISION AND LEADERSHIP MURTHY SPARKED A WAVE OF INNOVATION AND ENTREPRENEURSHIP THAT CHANGED THE WAY WE VIEW OURSELVES AND HOW THE WORLD VIEWS INDIA. IN THIS COLLECTION OF HIS SPEECHES, HE DELIVERS A TIMELY MESSAGE ABOUT THE IMPORTANCE OF VALUES AND LEADERSHIP IN BUSINESS." -BILL GATES, CHAIRMAN OF THE BOARD, MICROSOFT CORPORATION
"लाखो भारतीयांसाठी नारायण मूर्ती हे एक आदर्श व्यक्तिमत्व आहे. केवळ त्यांच्या औद्योगिक क्षेत्रातील कर्तृत्व आणि नेतृत्वामुळे नाही, तर मूल्याधिष्ठित वागणूक आणि व्यक्तिगत आचरणामुळे नारायण मूर्ती हे अवघ्या देशासाठी आदर्श ठरले आहेत. ते जगासमोर भारताच्या नव्या, प्रगतिशील चेहेयाचं प्रतिनिधित्व करतात. त्यांनी दिलेल्या व्याख्यानांचा हा संच येणाऱ्या पिढ्यांना माहितीपर, प्रेरणादायक आणि मार्गदर्शक ठरेल याची मला खात्री आहे." -डॉ. मनमोहन सिंग, पंतप्रधान, भारत. "नारायण मूर्ती यांनी अनेक अडथळे पार करून हे दाखवून दिलं आहे की, भारतात जागतिक दर्जाच्या, मूल्याधिष्ठित कंपनीची उभारणी करणं शक्य आहे. मूर्तीच्या दूरदृष्टी आणि नेतृत्वामुळे नावीन्य आणि उद्योजकतेच्या जगात चमक आली अखे, आपली स्वत:कडे पाहण्याची आणि जगाची भारताकडे पाहण्याची दृष्टी बदलली आहे. व्याख्यानांच्या या संचाद्वारे, व्यवसायातील मूल्यं आणि नेतृत्वगुणाचं महत्व त्यांनी अधोरेखित केलं आहे." -बिल गेट्स, अध्यक्ष, संचालक मंडळ, मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन

No Records Found
No Records Found
Keywords
#SUDHA MURTY #N.R.NARAYANA MURTY #LEENA SOHONI #UMA KULKARNI #WISE & OTHERWISE #GOSHTI MANSANCHYA #PUNYABHUMI BHARAT #THAILIBHAR GOSHTI #SUKESHINI AANI ITAR KATHA #BAKULA #AYUSHYACHE DHADE GIRAVTANA #AAJICHYA POTADITALYA GOSHTI #MAHASHWETA #DOLLAR BAHU #SAMANYATALE ASAMANYA #PARIGH #PITRURHUN #ASTITVA #HARAVALELYA MANDIRACHE RAHASYA #TEEN HAJAR TAKE #SARPACHA SOOD #GARUDJANMACHI KATHA #TRISHANKU #A BETTER INDIA A BETTER WORLD #NARAYAN MURTY : MULYA JAPNARA EK ADWITIYA AAYUSHYA #सुधा मूर्ती #एन.आर.नारायण मूर्ती #लीना सोहोनी #उमा कुलकर्णी #वाइज अँड अदरवाइज #गोष्टी माणसांच्या #पुण्यभूमी भारत #थैलीभर गोष्टी #सुकेशिनी #बकुळा #आयुष्याचे धडे गिरवताना #आजीच्या पोतडीतल्या गोष्टी #महाश्वेता #डॉलर बहू सामान्यांतले असामान्य #परीघ पितृऋण #अस्तित्व #हरवलेल्या मंदिराचे रहस्य #तीन हजार टाके #सर्पाचा सूड #गरुडजन्माची कथा #त्रिशंकू #अ बेटर इंडिया अ बेटर वर्ल्ड : नारायण मूर्ती #नारायण मूर्ती : मूल्यं जपणारं एक अद्वितीय आयुष्य
Customer Reviews
  • Rating StarDainik Aikya ,Satara 1st Aug.2010

    गेल्या काही वर्षात जगभरातील वेगवेगळ्या संस्थांच्या व परिषदांच्या व्यासपीठावरून त्यांनी दीडशेवर व्याख्याने दिली. त्यात व्यवस्थापन, तंत्रज्ञान, उद्योग, आरेखन, कायदा, विदेशी व्यापार, मुक्तकला, शिस्त, टीमवर्क, धर्मनिरपेक्षता, प्रामाणिकपणा, करारांचे पालन,समाजहिताला प्राधान्य, सक्षमीकरण, सांस्कृतिक वारसा वगैरे विषयांवरील आपले अनुभवसिद्ध चिंतन त्यांनी मांडले. आर्थिक सुधारणा, लोकसंख्या, भारतीय राजकारण, नोकरशाही, शहरीकरण, ग्रामीण अर्थव्यवस्था, दारिद्र्य निर्मूलनासाठी तंत्रज्ञानाचा वापर, उच्च शिक्षण, व्यावसायिक नेतृत्व, कॉर्पोरेट गव्हर्नन्स, उद्योजकता, नव्या बाजारपेठा आणि संधी अशा अनेक प्रश्नांचा ऊहापोह त्यांनी केला आहे. या दीडशे प्लस व्याख्यानांतून ३८ व्याख्याने निवडून ‘अ बेटर इंडिया, अ बेटर वर्ल्ड’ हे पुस्तक पेंग्विनने प्रकाशित केले आहे. इन्फोसिसची स्थापना, त्यामागची भूमिका, मूल्यप्रणाली यांचीही चर्चा अधूनमधून होते. ही व्याख्याने जाणूनबुजून सोपी, साधी ठेवली आहेत. युवा पिढीला ती उद्बोधक वाटावीत प्रेरणादायक ठरावीत अशी तळमळ त्यामागे आहे. त्यामुळे या पुस्तकातील विचारांचा पाठपुरावा करायला हवा. १९८१ मध्ये सात सॉफ्टवेअर व्यावसायिकांनी इन्फोसिस ही कंपनी स्थापन केली. भांडवल होते २५० डॉलर्स. १९८२ ते १९९२ या दहा वर्षात इन्फोसिसचा महसूल १,३०,००० डॉलर्सवरून पंधरा लाख डॉलर्स एवढा वाढला. १९९२ ते २००८ या १६ वर्षांत इन्फोसिसचा महसूल ४.१ अब्ज डॉलर्स झाला. इन्फोसिसमध्ये ८८ हजार कर्मचारी आज काम करतात. या कर्मचा-यांमध्ये केवळ भारतातलेच नव्हे तर जगातल्या ९० देशांमधले नागिरक आहेत. इन्फोसिसचे बाजारपेठेतील भांडवली मूल्य २७ अब्ज डॉलर्सवर आहे. भारतातल्या माहिती-तंत्रज्ञान उद्योगाचा नफा इ. स. २००८ मध्ये ४० अब्ज डॉलर्सच्या घरात पोचला आहे. इन्फोसिसची उभारणी ज्या तीन तत्त्वांवर झाली ती तीन तत्त्वे अशी : १) गुंतागुंतीची सॉफ्टवेअर्स ग्राहकांच्या गरजांनुसार तयार करून जागतिक स्पर्धात्मक पातळीवर अव्वल स्थान मिळवणे. २) बाजारपेठेमध्ये आपले निराळे स्थान निर्माण करणे. कार्यप्रणाली व धोरण, नीतिनियम कंपनीच्या माहितीयंत्रणेत अंतर्भूत करणे. ३) ग्राहक समाधानात भर टाकणे, किंमती कमी करणे, उत्पादकता वाढवणे, ग्राहकांची संख्या वाढवणे. या कल्पनेला योग्य अशी बाजारपेठ भारतात उपलब्ध नव्हती. त्यामुळे जागतिक बाजारपेठ शोधणे आवश्यक ठरले. जी-७ देशांमधील कंपन्यांसाठी सॉफ्टवेअर निर्माण करण्याचा प्रयत्न इन्फोसिसने आरंभापासून केला. इन्फोसिसची स्थापना करण्याआधी नारायण मूर्ती यांनी कानपूरच्या आयआयटीत शिक्षण पूर्ण करून फ्रान्समध्ये माहिती तंत्रज्ञानाचे उच्च शिक्षण घेतले. नारायण मूर्ती हे एकेकाळी स्वत:ला पक्के कम्युनिस्ट मानत. परदेशात शिक्षणासाठी ते गेले. कानपूरच्या आयआयटीमध्ये कंट्रोल थिअरीचा अभ्यास त्यांनी केला. त्यावेळी अमेरिकेतील एका विद्यापीठातील एका संगणक अभियंत्याचे भाषण ऐकून नारायण मूर्ती प्रभावित झाले. कॉम्प्युटर सायन्समधील भावी प्रगतीची दिशा त्या अभियंत्याने स्पष्ट केली. पुढचा काळ संगणकाचा आहे असे ते म्हणाले. त्यांनी काही संशोधनपर लेख वाचण्याचीही शिफारस केली. ते लेख वाचल्यावर नारायण मूर्ती यांनी कॉम्प्युटर सायन्स शिकायचे ठरवले. त्यासाठी परदेशात गेले. फ्रान्समध्ये संगणक शास्त्राचे शिक्षण घेतले. नंतर भारतात परतण्यापूर्वी बल्गेरिया, युगोस्लाव्हिया वगैरे कम्युनिस्ट देशांना त्यांनी भेटी दिल्या. बल्गेरिया-युगोस्लाव्हियाच्या सीमेवरच्या नीस या गावी आल्यावर रविवारी बँका बंद असल्याने आणि जवळ स्थानिक चलन नसल्याने नारायण मूर्तींना दिवसभर उपाशी राहावे लागले. रेल्वे स्टेशनवरच बसून राहावे लागले. नंतर रेल्वेत एका तरुणीबरोबर फ्रेंचमध्ये गप्पा मारत असताना बल्गेरियातील साम्यवादी सरकारवर टीका केल्याचा आरोप करून तेथील पोलिसांनी त्यांना रेल्वेतून उतरवले. आठ बाय आठच्या थंडगार खोलीत त्यांनी डांबून ठेवले. बहात्तर तास त्या खोलीत काहीही न खातापिता त्यांना राहावे लागले. नंतर बाहेर काढून इस्तंबूलच्या मालगाडीच्या गार्डच्या डब्यात बंदिस्त करण्यात आले. परत २४ तास उपाशी. सुरक्षारक्षकाने त्यांना म्हटले. भारताचे बल्गेरियाशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत, म्हणून तुम्हाला सोडून देत आहोत. नाहीतर तुरुंगातच खितपत पडला असता. १०८ तास कडकडीत उपास आणि थंडीतला प्रवास यामुळे नारायण मूर्ती यांना कम्युनिस्ट देशांच्या मानवतावादी ़कॉमरेडशिपबद्दलचा भ्रमाचा भोपळा फुटला. माणूस म्हणूनही सौजन्याची वागणूक न देणा-या साम्यवादी देशांच्या मनोवृत्तीचा त्यांना उबग आला. डाव्या विचारसरणीबद्दलचा उरलासुरला कळवळाही लुप्त झाला. साम्यवादाने समाजातील गरिबी दूर होत नाही. सर्वांना समान वागणूक मिळत नाही, हे लक्षात आले. संभ्रमित डावात कट्टर मानवतावादी भांडवलशाहीवाला असे नारायणमूर्ती यांचे त्या एका अनुभवाने परिवर्तन झाले. गरिबी दूर करण्यासाठी मोठ्या संख्येने नोक-या निर्माण करणारे उद्योगधंदेच हवेत, अशी त्यांची खात्री पटली. १९७४ मधील ही घटना. तिचा नारायण मूर्ती यांच्यावर खूप प्रभाव पडला. १९८१ मध्ये इन्फोसिस ही कंपनी सुरू केली. नऊ वर्षात धीम्या गतीने धंदा होत राहिला. दहा लाख रुपयांना इन्फोसिस विकत घेण्याची तयारी एका उद्योजकाने दाखवली. नारायण मूर्ती यांनी या ऑफरला नकार दिला. कंपनी विकायचीच असेल तर मी घेतो असे ते म्हणाले. दहा लाखांची ऑफर आलेल्या इन्फोसिसचे आजचे भांडवल मूल्य २८ अब्ज डॉलर्स आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more