* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
"NARAYANA MURTHY IS A ROLE MODEL FOR MILLIONS OF INDIANS. AN ICONIC FIGURE IN THE COUNTRY, HE IS WIDELY RESPECTED AND LOOKED UP TO NOT ONLY FOR HIS BUSINESS LEADERSHIP BUT ALSO FOR HIS ETHICS AND PERSONAL CONDUCT. HE REPRESENTS THE FACE OF THE NEW RESURGENT INDIA TO THE WORLD. I AM SURE THIS COLLECTION OF HIS SPEECHES WILL INFORM, INSPIRE AND GUIDE MANY IN THE YEARS TO COME." -MANMOHAN SINGH, (PREVIOUS)PRIME MINISTER OF INDIA. "NARAYAN MURTHY OVERCAME MANY OBSTACLES AND DEMONSTRATED THAT IT IS POSSIBLE TO CREATE A WORLD-CLASS, VALUES-DRIVEN COMPANY IN INDIA. THROUGH HIS VISION AND LEADERSHIP MURTHY SPARKED A WAVE OF INNOVATION AND ENTREPRENEURSHIP THAT CHANGED THE WAY WE VIEW OURSELVES AND HOW THE WORLD VIEWS INDIA. IN THIS COLLECTION OF HIS SPEECHES, HE DELIVERS A TIMELY MESSAGE ABOUT THE IMPORTANCE OF VALUES AND LEADERSHIP IN BUSINESS." -BILL GATES, CHAIRMAN OF THE BOARD, MICROSOFT CORPORATION
"लाखो भारतीयांसाठी नारायण मूर्ती हे एक आदर्श व्यक्तिमत्व आहे. केवळ त्यांच्या औद्योगिक क्षेत्रातील कर्तृत्व आणि नेतृत्वामुळे नाही, तर मूल्याधिष्ठित वागणूक आणि व्यक्तिगत आचरणामुळे नारायण मूर्ती हे अवघ्या देशासाठी आदर्श ठरले आहेत. ते जगासमोर भारताच्या नव्या, प्रगतिशील चेहेयाचं प्रतिनिधित्व करतात. त्यांनी दिलेल्या व्याख्यानांचा हा संच येणाऱ्या पिढ्यांना माहितीपर, प्रेरणादायक आणि मार्गदर्शक ठरेल याची मला खात्री आहे." -डॉ. मनमोहन सिंग, पंतप्रधान, भारत. "नारायण मूर्ती यांनी अनेक अडथळे पार करून हे दाखवून दिलं आहे की, भारतात जागतिक दर्जाच्या, मूल्याधिष्ठित कंपनीची उभारणी करणं शक्य आहे. मूर्तीच्या दूरदृष्टी आणि नेतृत्वामुळे नावीन्य आणि उद्योजकतेच्या जगात चमक आली अखे, आपली स्वत:कडे पाहण्याची आणि जगाची भारताकडे पाहण्याची दृष्टी बदलली आहे. व्याख्यानांच्या या संचाद्वारे, व्यवसायातील मूल्यं आणि नेतृत्वगुणाचं महत्व त्यांनी अधोरेखित केलं आहे." -बिल गेट्स, अध्यक्ष, संचालक मंडळ, मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन

No Records Found
No Records Found
Keywords
#SUDHA MURTY #N.R.NARAYANA MURTY #LEENA SOHONI #UMA KULKARNI #WISE & OTHERWISE #GOSHTI MANSANCHYA #PUNYABHUMI BHARAT #THAILIBHAR GOSHTI #SUKESHINI AANI ITAR KATHA #BAKULA #AYUSHYACHE DHADE GIRAVTANA #AAJICHYA POTADITALYA GOSHTI #MAHASHWETA #DOLLAR BAHU #SAMANYATALE ASAMANYA #PARIGH #PITRURHUN #ASTITVA #HARAVALELYA MANDIRACHE RAHASYA #TEEN HAJAR TAKE #SARPACHA SOOD #GARUDJANMACHI KATHA #TRISHANKU #A BETTER INDIA A BETTER WORLD #NARAYAN MURTY : MULYA JAPNARA EK ADWITIYA AAYUSHYA #सुधा मूर्ती #एन.आर.नारायण मूर्ती #लीना सोहोनी #उमा कुलकर्णी #वाइज अँड अदरवाइज #गोष्टी माणसांच्या #पुण्यभूमी भारत #थैलीभर गोष्टी #सुकेशिनी #बकुळा #आयुष्याचे धडे गिरवताना #आजीच्या पोतडीतल्या गोष्टी #महाश्वेता #डॉलर बहू सामान्यांतले असामान्य #परीघ पितृऋण #अस्तित्व #हरवलेल्या मंदिराचे रहस्य #तीन हजार टाके #सर्पाचा सूड #गरुडजन्माची कथा #त्रिशंकू #अ बेटर इंडिया अ बेटर वर्ल्ड : नारायण मूर्ती #नारायण मूर्ती : मूल्यं जपणारं एक अद्वितीय आयुष्य
Customer Reviews
  • Rating StarDainik Aikya ,Satara 1st Aug.2010

    गेल्या काही वर्षात जगभरातील वेगवेगळ्या संस्थांच्या व परिषदांच्या व्यासपीठावरून त्यांनी दीडशेवर व्याख्याने दिली. त्यात व्यवस्थापन, तंत्रज्ञान, उद्योग, आरेखन, कायदा, विदेशी व्यापार, मुक्तकला, शिस्त, टीमवर्क, धर्मनिरपेक्षता, प्रामाणिकपणा, करारांचे पालन,समाजहिताला प्राधान्य, सक्षमीकरण, सांस्कृतिक वारसा वगैरे विषयांवरील आपले अनुभवसिद्ध चिंतन त्यांनी मांडले. आर्थिक सुधारणा, लोकसंख्या, भारतीय राजकारण, नोकरशाही, शहरीकरण, ग्रामीण अर्थव्यवस्था, दारिद्र्य निर्मूलनासाठी तंत्रज्ञानाचा वापर, उच्च शिक्षण, व्यावसायिक नेतृत्व, कॉर्पोरेट गव्हर्नन्स, उद्योजकता, नव्या बाजारपेठा आणि संधी अशा अनेक प्रश्नांचा ऊहापोह त्यांनी केला आहे. या दीडशे प्लस व्याख्यानांतून ३८ व्याख्याने निवडून ‘अ बेटर इंडिया, अ बेटर वर्ल्ड’ हे पुस्तक पेंग्विनने प्रकाशित केले आहे. इन्फोसिसची स्थापना, त्यामागची भूमिका, मूल्यप्रणाली यांचीही चर्चा अधूनमधून होते. ही व्याख्याने जाणूनबुजून सोपी, साधी ठेवली आहेत. युवा पिढीला ती उद्बोधक वाटावीत प्रेरणादायक ठरावीत अशी तळमळ त्यामागे आहे. त्यामुळे या पुस्तकातील विचारांचा पाठपुरावा करायला हवा. १९८१ मध्ये सात सॉफ्टवेअर व्यावसायिकांनी इन्फोसिस ही कंपनी स्थापन केली. भांडवल होते २५० डॉलर्स. १९८२ ते १९९२ या दहा वर्षात इन्फोसिसचा महसूल १,३०,००० डॉलर्सवरून पंधरा लाख डॉलर्स एवढा वाढला. १९९२ ते २००८ या १६ वर्षांत इन्फोसिसचा महसूल ४.१ अब्ज डॉलर्स झाला. इन्फोसिसमध्ये ८८ हजार कर्मचारी आज काम करतात. या कर्मचा-यांमध्ये केवळ भारतातलेच नव्हे तर जगातल्या ९० देशांमधले नागिरक आहेत. इन्फोसिसचे बाजारपेठेतील भांडवली मूल्य २७ अब्ज डॉलर्सवर आहे. भारतातल्या माहिती-तंत्रज्ञान उद्योगाचा नफा इ. स. २००८ मध्ये ४० अब्ज डॉलर्सच्या घरात पोचला आहे. इन्फोसिसची उभारणी ज्या तीन तत्त्वांवर झाली ती तीन तत्त्वे अशी : १) गुंतागुंतीची सॉफ्टवेअर्स ग्राहकांच्या गरजांनुसार तयार करून जागतिक स्पर्धात्मक पातळीवर अव्वल स्थान मिळवणे. २) बाजारपेठेमध्ये आपले निराळे स्थान निर्माण करणे. कार्यप्रणाली व धोरण, नीतिनियम कंपनीच्या माहितीयंत्रणेत अंतर्भूत करणे. ३) ग्राहक समाधानात भर टाकणे, किंमती कमी करणे, उत्पादकता वाढवणे, ग्राहकांची संख्या वाढवणे. या कल्पनेला योग्य अशी बाजारपेठ भारतात उपलब्ध नव्हती. त्यामुळे जागतिक बाजारपेठ शोधणे आवश्यक ठरले. जी-७ देशांमधील कंपन्यांसाठी सॉफ्टवेअर निर्माण करण्याचा प्रयत्न इन्फोसिसने आरंभापासून केला. इन्फोसिसची स्थापना करण्याआधी नारायण मूर्ती यांनी कानपूरच्या आयआयटीत शिक्षण पूर्ण करून फ्रान्समध्ये माहिती तंत्रज्ञानाचे उच्च शिक्षण घेतले. नारायण मूर्ती हे एकेकाळी स्वत:ला पक्के कम्युनिस्ट मानत. परदेशात शिक्षणासाठी ते गेले. कानपूरच्या आयआयटीमध्ये कंट्रोल थिअरीचा अभ्यास त्यांनी केला. त्यावेळी अमेरिकेतील एका विद्यापीठातील एका संगणक अभियंत्याचे भाषण ऐकून नारायण मूर्ती प्रभावित झाले. कॉम्प्युटर सायन्समधील भावी प्रगतीची दिशा त्या अभियंत्याने स्पष्ट केली. पुढचा काळ संगणकाचा आहे असे ते म्हणाले. त्यांनी काही संशोधनपर लेख वाचण्याचीही शिफारस केली. ते लेख वाचल्यावर नारायण मूर्ती यांनी कॉम्प्युटर सायन्स शिकायचे ठरवले. त्यासाठी परदेशात गेले. फ्रान्समध्ये संगणक शास्त्राचे शिक्षण घेतले. नंतर भारतात परतण्यापूर्वी बल्गेरिया, युगोस्लाव्हिया वगैरे कम्युनिस्ट देशांना त्यांनी भेटी दिल्या. बल्गेरिया-युगोस्लाव्हियाच्या सीमेवरच्या नीस या गावी आल्यावर रविवारी बँका बंद असल्याने आणि जवळ स्थानिक चलन नसल्याने नारायण मूर्तींना दिवसभर उपाशी राहावे लागले. रेल्वे स्टेशनवरच बसून राहावे लागले. नंतर रेल्वेत एका तरुणीबरोबर फ्रेंचमध्ये गप्पा मारत असताना बल्गेरियातील साम्यवादी सरकारवर टीका केल्याचा आरोप करून तेथील पोलिसांनी त्यांना रेल्वेतून उतरवले. आठ बाय आठच्या थंडगार खोलीत त्यांनी डांबून ठेवले. बहात्तर तास त्या खोलीत काहीही न खातापिता त्यांना राहावे लागले. नंतर बाहेर काढून इस्तंबूलच्या मालगाडीच्या गार्डच्या डब्यात बंदिस्त करण्यात आले. परत २४ तास उपाशी. सुरक्षारक्षकाने त्यांना म्हटले. भारताचे बल्गेरियाशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत, म्हणून तुम्हाला सोडून देत आहोत. नाहीतर तुरुंगातच खितपत पडला असता. १०८ तास कडकडीत उपास आणि थंडीतला प्रवास यामुळे नारायण मूर्ती यांना कम्युनिस्ट देशांच्या मानवतावादी ़कॉमरेडशिपबद्दलचा भ्रमाचा भोपळा फुटला. माणूस म्हणूनही सौजन्याची वागणूक न देणा-या साम्यवादी देशांच्या मनोवृत्तीचा त्यांना उबग आला. डाव्या विचारसरणीबद्दलचा उरलासुरला कळवळाही लुप्त झाला. साम्यवादाने समाजातील गरिबी दूर होत नाही. सर्वांना समान वागणूक मिळत नाही, हे लक्षात आले. संभ्रमित डावात कट्टर मानवतावादी भांडवलशाहीवाला असे नारायणमूर्ती यांचे त्या एका अनुभवाने परिवर्तन झाले. गरिबी दूर करण्यासाठी मोठ्या संख्येने नोक-या निर्माण करणारे उद्योगधंदेच हवेत, अशी त्यांची खात्री पटली. १९७४ मधील ही घटना. तिचा नारायण मूर्ती यांच्यावर खूप प्रभाव पडला. १९८१ मध्ये इन्फोसिस ही कंपनी सुरू केली. नऊ वर्षात धीम्या गतीने धंदा होत राहिला. दहा लाख रुपयांना इन्फोसिस विकत घेण्याची तयारी एका उद्योजकाने दाखवली. नारायण मूर्ती यांनी या ऑफरला नकार दिला. कंपनी विकायचीच असेल तर मी घेतो असे ते म्हणाले. दहा लाखांची ऑफर आलेल्या इन्फोसिसचे आजचे भांडवल मूल्य २८ अब्ज डॉलर्स आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

रुपाली सोनवणे

#रुक #जाना #नही लेखक: Dr. भावेश भाटिया शब्दांकन: Dr: सचिन पाचोरकर अनुवाद: सुप्रिया वकील ​अंथरून पाहून पाय पसरावे... अह्ह.. त्या निर्जीव अंथरुणासाठी आपल्या सजीव पावलांना का त्रास द्यावा? असेच एक जबरदस्त आत्मचरित्र वाचून संपवलं आणि एक ऊर्जा निर्माणकरून गेलं, पुस्तकाचं नाव आहे `रुक जाना नहीँ ​डॉ. भावेश भाटिया यांची ही प्रेरणादायी कहाणी. शाळेत असताना आलेलं अकाली अंधत्व आणि त्यानंतर खडखडीत खडतर जीवनाचा सुरू झालेला प्रवास, पण या प्रवासात खचलेल्या बालमनाला त्यांच्या आईने दिलेलं बळ, प्रेरणा व आत्मसन्मानाची शिकवण आणि स्वाभिमानाचे धडे लेखकास पुरे होते. हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. चांगल्या धडधाकट व्यक्तीवर संकट आल्यावर दूर दूर पळणारे नातलग, मित्र परिवार, जातभाई... दृष्टी गेलेल्या व्यक्तीस कितपत आधार देतील? पण एक ऑपरेटर ते एक उद्योजक, `सनराईज कॅण्डल`चा विस्तार आणि स्वतःबरोबर अनेक दृष्टिहीन व्यक्तींना स्वतःच्या पायावर उभं करून रोजगार देणारा हा अवलिया किती अडथळे पार करून आलाय हे जाणून घेण्यासाठी पुस्तक वाचायला हवंच. ​कुठलाही वशीला नाही की कोणाची सहानुभूती नाही, स्वबळावर विविध प्रयोग करत उद्योग यशस्वी करणं सोपं नाही. यात ज्या ज्या देवमाणसांनी हातभार लावला त्यांचा पण उल्लेख आहे, पण त्या देवमाणसांनी देखील कधीच उपकारिक भाषा न करता व स्वाभिमान न दुखावता कशी मदत करता येऊ शकते हे त्यांच्या कृतीतून दाखवून दिलंय. लेखक फक्त उद्योग उभारून थांबले नाहीत तर त्यांनी सामाजिक जाणीवेचं भान देखील ठेवलंय. महाबळेश्वरमध्ये सनराईज कॅण्डल नावाने त्यांनी भव्य असा उद्योग परिसर आणि म्युझियम सुरू केलंय, तेथे अनेक दृष्टिहीन व्यक्तींना रोजगार मिळाला आहे त्याचबरोबर सर्वजण स्वाभिमानाने कष्ट करून जगत आहेत. हजारो आयुष्य त्यांनी उजळून टाकली आहेत. दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कार सह एकून 46 पुरस्कारांचे ते मानकरी आहेत.विशेष म्हणजे सर्व पुरस्कार त्यांच्या योग्यतेनुसार दिले आहेत.. आणी अशा हजारो पुरस्कारांचे ते मानकरी आहेत असंच वाटत..त्यांच्या कामाची दखल रिलायन्स ग्रुप ने देखील घेतली आहे.व त्यांच्या पुस्तकास प्रस्तावना देखील नीता अंबानी यांनी दिली आहे.उद्योग करताना छोट्या छोट्या गोष्टी कसा प्रभाव करतात याच वर्णन देखील त्यांनी लिहिल आहे.. ​या कार्यात महत्त्वाचं योगदान त्यांच्या धर्मपत्नी नीता भाटिया यांनी दिलं आहे. दूरदृष्टी ठेवून आपल्या पतीस प्रोत्साहन देऊन, नवीन कल्पनेसह पाठिंबा देऊन त्यांना हुरूप देण्याचं काम त्यांनी केलंय. नीता भाटिया यांचं कर्तृत्व, त्यांचं पवित्र निस्वार्थी प्रेम या पुस्तकातून वाचताना आंतरिक वेगळी ऊर्जा मिळते. कलियुगातील देवी हा शब्द व मान त्यांना समर्पक वाटतो. पुस्तक सर्व वयोगटातील वाचक वाचू शकतात. मनाने खचलेल्या पण शरीराने धडधाकट असलेल्या प्रत्येक व्यक्तीने वरील पुस्तक नक्की वाचावं आणि आत्मसात करावं. एवढ्या उंचीवर असूनही जमिनीवर पाय असलेल व्यक्तिमत्व आहे. अगदी प्रेमळ पणे वागण बोलण सन्मान देण..ही दैवी देणगी त्यांच्या जवळ आहे. ...Read more

RAZOR SHARP
RAZOR SHARP by ASHWIN SANGHI Rating Star
सुनील माने, पुणे

लेखक अश्विन सांघी “द रोझाबल लाइन” या पहिल्याच कादंबरीने खूप लोकप्रिय झाला. प्राचीन भारतीय दंतकथा/ऐतिहासिक संदर्भ घेऊन त्याच्याभोवती आजच्या काळात रहस्यपूर्ण कथा लिहिणारा अश्विन. Chanakya’s Chant, The Krishna Key, The Sialkot Saga, Keepers of the Kalacakra, The Vault of Vishnu, The Magicians of Mazda अशा एकापेक्षा एक सुंदर रहस्य कादंबर्या “भारत सिरीज़” नावाने खूप प्रसिद्ध झाल्या. या सर्व कादंबऱ्या मी इंग्लिश मधेच वाचल्या. यांचा मराठी अनुवाद मेहता पब्लिशिंग हाउस यांच्याकडे उपलब्ध आहे. अश्विन सांघीने या भारत सिरीज शिवाय एक नवीन थ्रिल्लर सिरीज (कुत्ता कदम) सुरू केली आहे. त्यांतील पहिली कादंबरी Razor Sharp. एक सिरियल किलर मुंबईत एकानंतर एक खून पाडतोय. पोलिस चक्रावले आहेत. 1. रविवार दि २ फेब्रुवारी , गोरेगाव पश्चिममधे रवि मेहराचा खून होतो. त्याची बायको खुशी कॅाल सेंटरचा जॅाब करून रात्री ११.३० ला परत येते. खूप वेळा बेल वाजवून दार न उघडल्यामुळे ती उघडून आत येते तर रवि रक्ताच्या थारोळ्यात मरून पडलेला असतो. त्याचे हात पाठीमागे नायलॅान दोरीने बांधलेले असतात. त्याच्या छातीत सुरा खुपसलेला असतो. त्याच्या तोंडात काहीतरी खाद्य पदार्थ असतो. 2. सोमवार दि १० फेब्रुवारी , लोअर परळमधे सुचंद्रा अग्रवालचा खून. तिची कामवाली आल्यावर दार न उघडल्यामुळे सोसायटीवाले दार तोडतात. आत सुचंद्राचा खून झालेला. हात नायलॅान दोरीने मागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात काहीतरी खाद्यपदार्थ. पोलिस चक्रावलेले. मग पोलिसखाते जागे होते. त्यांचा नावाजलेला अधिकारी जो सस्पेंड झालेला आहे, त्या प्रकाश कदम, DCP याला बोलावले जाते. राज्याचे गृहमंत्री ओंकार लोखंडे, त्यांचा माणूस कमिशनर चव्हाण आणि उपगृहमंत्री जयंत गायकवाड व त्यांचा माणूस SCP राणे, मुंबईचा डॅान भाऊ पाटील जो लोखंडेचाच माणूस असतो, हे सर्व या केसच्या मागावर लागतात. कदम हा राणेंच्या ओळखीचा खास ऑफिसर असतो म्हणून त्यालाही इन्व्हेस्टीगेशनला बोलावले जाते. 3. मंगळवार दि १८ फेब्रुवारी , ठाणे येथे मंगला शहाचा खून. तिच्या शेजारणीमुळे हे कळते. मंगलाचे हात नायलॅान दोरीने पाठीमागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात खाद्यपदार्थ. पोलिस अधिकारी शिंदे कदमबरोबर येतात. मंगलाच्या चेहऱ्याजवळ कदमला पेस्टिसाईडचा वास येतो. चेहरा निळसर झालेला. खून झाल्यावर बॅाडीला हलवलेले दिसते. तो ऑफिसमध्ये जुन्या खूनांचे फोटो तपासतो. त्यांचीही बॅाडी खून केल्यावर हलवलेली दिसते. चेहऱ्यावर निळसर झाक दिसते. तिन्ही खून “फिनेक” ब्रॅंडच्या चाकूने केलेले असतात. हे समान धागे कदम त्याची मुलगी केतुल बरोबर चर्चा करतो. केतुलची आई काही वर्षांपूर्वी कदमला सोडून गेलेली असते. ती भाऊ पाटीलची सावत्र बहीण असते. पण सध्या ती कुठे आहे व काय करते हे माहित नसते. केतुल कोर्टात काम करत असते तसेच ती “शक्ती” या NGO मधेही काम करते. शक्ती हे सोनापूरमधुन सुटका केलेल्या वेश्यांचे पुनर्वसन करत असते. निर्मल नावाचा तिचा मित्र एथिकल हॅकर असतो. तिच्यावर प्रेम करत असतो. कदमला हार्ट अटॅक येऊन गेलेला व स्टेंट बसवलेला असतो. Depression मुळे त्याची सायकॅालॅाजिस्टकडे ट्रिटमेंट चालू असते. कदमला या तिन्ही केसमधे आणखी एक धागा सापडतो. हे खून आठ दिवसांच्या अंतरावर झालेले असतात. म्हणजे पुढचा खून बुधवारी होणार असल्याचे तो राणे व शिंदेला सांगतो. 4. बुधवार दि २६ फेब्रुवारी, कांदिवली पश्चिम, लक्ष्मी बुधीराजाचा खून. तोच पॅटर्न. 5. गुरुवार दि ५ मार्च, खार पश्चिम, गुरुराज अदवानीचा खून सेम पॅटर्न. गुरूराज हा युट्युबवरचा प्रसिद्ध सिंगर असतो. 6. शुक्रवार दि १३ मार्च, ताडदेव, दिव्या शुक्रपाणीवर खूनी हल्ला होतो. पण ती जबर जखमी होते. ती फिटनेस ट्रेनर असल्यामुळे खुन्याबरोबर झटापट करते. पण चाकू पोटात घुसल्यामुळे ती जबर जखमी होते. हात बांधलेले असतानाही ती फोनवर “सिरी” ला तिच्या भावाला, ध्रुवला फोन लावायला सांगते. फोन लागतो व ती “हेल्प हेल्प” एव्हढेच बोलून बेशुद्ध होते. म्हणून खुनी पळून जातो. ध्रुव तिथे पोहोचून तिला हॅास्पिटलमधे ॲडमिट करतो. पोलिसांना तिथे खुन्याची बॅग सापडते. त्यांत नायलॅानची दोरी, बेगॅान स्प्रे व राजमाच्या बिया सापडतात. तिसऱ्या खुनाआधी पोलिस संशयित म्हणून राजू दाभाडेला अटक करतात. पण चौथ्या खूनाच्या वेळेस तो कस्टडीतच असतो. मग खूनी कोण? 7. शनिवार दि २१ मार्च, बान्द्रा पश्चिम, शनिया डिसौजाचा खून होतो. सेम मोडस ऑपरेंडी . 8. शनिवार दि २८ मार्च, चेंबूर, ७१ वर्षांच्या राहुल सिंह नावाच्या सिख व्यक्तिचा खून होतो. तीच पध्दत. यानंतर एक दिवस कदम KBC बघत असताना अमिताभ बच्चन एका सिनेमाचं गाणं लावून त्याचा पिक्चर ओळखायला सांगतात. ते गाणं असते- “सोमवार को हम मिले मंगलवार को नयन बुध को मेरी निंद खुली जुम्मेरात को चैन अरे शुक्र शनी कटे मुश्किलसे आज है इतवार सात दिनों में हो गया जैसे सात जनम का प्यार” आणि कदमच्या डोक्यात एकदम प्रकाश पडतो… अरे, हे सर्व खून असेच रविवार ते शनिवार एक एका वारी घडलेत! पण शनिवारी दोन खून कसे? याच्या मागे काही खगोलशास्त्र किंवा भविष्याचा तर संबंध नाही? कदमला आठवतं की शेजारी राहणारा डॉ. देसाईला पण भविष्य-खगोलशास्त्राची आवड व माहिती आहे. ( डॅाक्टर कडे सापडलेल्या नायलॅानचे रंगीत दोर व फिनेक कंपनीचा चाकू यामुळे एक संशयित म्हणून कदमने त्याला अटक करून पुछताछ केलेली असते) कदम लगेच डॅाक्टरांकडे जातो. त्यांची माफी मागून त्यांना या प्रश्नांत मदत करायला सांगतो. तो या सर्व खुनांचा सिक्वेन्स सांगतो. ते प्रत्येक वारी का घडले? मग शनिवारी दोन का? यापुढे कोणता वार? कुणाचा खून? डॅाक्टर सांगतात की भारतीय भविष्य व खगोल शास्त्रात नवग्रहांना खूप महत्व आहे. रवि, सोम(चंद्र), मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनि, राहू आणि केतु. यांचे रंग व धान्य वेगवेगळे असतात. त्या त्या ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी ते वापरले जातात. कदम ही माहिती लिहून घेतो. त्यावरून प्रत्येक खुनात वापरण्यात आलेले फिनेक कंपनीचे चाकू, वेगवेगळ्या रंगांचे नायलॅान दोर व तोंडातील पदार्थ यांचा संबंध जोडून एक तख्ता तयार करतोः- “रवि मेहरा-रविवार-सोनेरी दोर- तोंडात गहू-दिशा पूर्व सुचंद्रा-सोमवार-चंदेरी दोर-तोंडात तांदूळ-दिशा पश्चिम मंगला शाह-मंगळवार-लाल दोर-तोंडात तूर डाळ- दिशा दक्षिण लक्ष्मी बुधीराजा-बुधवार-हिरवा दोर-तोंडात हिरवे मूग-दिशा उत्तर गुरुराज अदवानी-गुरूवार-पिवळा दोर-तोंडात हरबरा डाळ-दिशा उत्तर पूर्व(ईशान्य) दिव्या शुक्रपाणी-शुक्रवार-पांढरा दोर-राजमा-दिशा दक्षिण पूर्व शनिया डिसौजा-शनिवार-काळा दोर-तोंडात काळे तिळ-दिशा उत्तर पश्चिम राहुल सिंग-शनिवार-निळा दोर-तोंडात उडीद दाळ-दिशा दक्षिण पश्चिम” आता उरला एकच ग्रह-केतु. केतुचा वार मंगळवार. ग्रे रंग, चना दाळ, दिशा दक्षिण पश्चिम. “केतु”म्हणजे कदमची मुलगी केतुलचा नंबर लागणार? आज तर मंगळवारच आहे! कदम घाबरून जातो! तो केतुलला फोन करतो पण तो बंद लागतो. ती सध्या कुठे आहे? कोर्टात? कदम आपल्या मुलीला वाचवतो का? खरा खुनी कोण असतो? तो पकडला जातो का? त्याचे यामागचा उद्देश काय असतो? याच्यामध्ये अजून कोण सामिल असतं का? याची उत्तरे मिळण्यासाठी वाचावी लागेल अश्विन सांघी यांची कादंबरी Razor Sharp. ...Read more