* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: SAHA BHASHANE
  • Availability : Available
  • ISBN : 9788171615940
  • Edition : 3
  • Publishing Year : JANUARY 1941
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 120
  • Language : MARATHI
  • Category : SPEECH
  • Available in Combos :V.S KHANDEKAR COMBO SET-119 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS BOOK CONTAINS SPEECHES BY V.S.KHANDEKAR WHICH HE HAS DELIVERED ON THE PLATFORM OF VARIOUS LITERARY FESTIVALS. IT COVERS SPEECHES DELIVERED AT MARATHI SAHITYA SAMMELAN , BADODA, GOMANTAK SAHITYA SAMMELAN, MADGAO, SHARDOPASAK SAMMELAN, MUMBAI MARATHI SAHITYA SAMMELAN & SOLAPUR JILHA SAHITYA SAMMELAN. IN THESE SPEECHES V.S.KHANDEKAR PUTS LIGHT ON VARIOUS FLOWS IN MARATHI LITERATURE .
विष्णु सखराम तथा भाऊसाहेब खांडेकर हे आपल्याला माहित आहेत ते एक ज्येष्ठ आणि श्रेस्ट लघुकथाकार,लघुनिबंधकार, रूपककथाकार,कादंबरीकार आणि चिकित्सिक समीक्षक म्हणून. विविध साहित्यपीठांवरून अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेल्या भाषणांंपैकी पाच निवडक भाषणांचा हा साक्षेपी संग्रह आहे. सहावे भाषण हे न केलेले भाषण आहे. या सहाही भाषणांंमधे त्यांनी मराठी वाङ्मयसृष्टीतील विविध साहित्यकृतींच्या निर्मितीप्रेरणांचा शोध घेतला आहे आणि त्यांची चिकित्सक समीक्षा करीत मराठी साहित्य अधिकाधिक गुणसमृद्ध कसे होईल,याविषयी नि:संदिग्ध मते सुस्पष्टपणे मांडली आहेत. विचारधनाने संपृक्त असलेल्या भाषणांचा हा संग्रह प्रत्येक साहित्यप्रेमीने अगत्याने संग्रही ठेवावा, एवढ्या मोलाचा खचितच आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
# 11TH JANUARY #YAYATI #AMRUTVEL #RIKAMA DEVHARA #SONERI SWAPNA- BHANGALELI #SUKHACHA SHODH #NAVI STRI #PAHILE PREM #JALALELA MOHAR #PANDHARE DHAG #ULKA #KRAUNCHVADH #HIRVA CHAPHA #DON MANE #DON DHRUV #ASHRU #SARTYA SARI #ABOLI #SWAPNA ANI SATYA #PHULE AANI KATE #JEEVANKALA #PAKALYA #USHAAP #SAMADHIVARLI PHULE #VIKASAN #PRITICHA SHODH #DAVABINDU #CHANDERI SWAPNE #STREE AANI PURUSH #VIDYUT PRAKASH #PHULE ANI DAGAD #SURYAKAMLE #SURYAKAMLE #DHAGAADACHE CHANDANE #DHAGAADACHE CHANDANE #PAHILI LAT #HASTACHA PAUS #SANJVAT #AAJCHI SWAPNE #PRASAD #CHANDRAKOR #KALACHI SWAPNE #ASHRU ANI HASYA #GHARTYABAHER #KAVI #MURALI #BUDDHACHI GOSHTA #BHAUBIJ #SURYASTA #ASTHI #GHARATE #MADHYARATRA #YADNYAKUNDA #SONERI SAVLYA #VECHALELI PHULE #KALIKA #MRUGAJALATIL KALYA #KSHITIJSPARSH #SUVARNAKAN #VANDEVATA #DHUKE #KALPALATA #MANDAKINI #AJUN YETO VAS FULANA #TISARA PRAHAR #VASANTIKA #RANPHULE #AVINASH #HIRWAL #MANJIRYA #SANJSAVLYA #MUKHAVATE #VAYULAHARI #MANZADHAR #CHANDANYAT #SAYANKAL #ZIMZIM #PAHILE PAN #ADNYATACHYA MAHADWARAT #VANHI TO CHETVAVA #GOKARNICHI PHULE #DUSARE PROMETHEUS : MAHATMA GANDHI #RANG ANI GANDH #RESHA ANI RANG #VAMAN MALHAAR JOSHI : VYAKTI ANI VICHAR #GOPAL GANESH AGARKAR : VYAKTI ANI VICHAR #KESHAVSUT : KAVYA ANI KALA #RAM GANESH GADAKARI : VYAKTI ANI VANGAMAY #PRADNYA ANI PRATIBHA #SAHITYA PRATIBHA : SAMARTHYA ANI MARYADA #GADHAVACHI GEETA ANI GAJRACHI PUNGI #SASHACHE SINHAVALOKAN #PAHILI PAVALA #EKA PANACHI KAHANI #RUTU NYAHALANARE PAN #SANGEET RANKACHE RAJYA # V. S. KHANDEKARANCHI KAVITA #TEEN SAMELANE #SAHA BHASHANE #ABHISHEK #SWAPNASRUSHTI #TE DIVAS TEE MANASE #SAMAJSHILPI #JEEVANSHILPI #SAHITYA SHILPI # AASTIK #SUSHILECHA DEV #RAGINI #MUKYA KALYA #INDRADHANUSHYA #ANTARICHA DIVA #NAVE KIRAN #AGNINRUTYA #KAVYAJYOTI #TARAKA #RANGDEVTA #ययाति # (ज्ञानपीठ पुरस्कार १९७६) #अमृतवेल #रिकामा देव्हारा #सोनेरी स्वप्नं-भंगलेली #सुखाचा शोध #नवी स्त्री #पहिले प्रेम #जळलेला मोहर #पांढरे ढग #उल्का #क्रौंचवध #सहा भाषणे
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAKAL 22-12-1996

    साठ वर्षांपूर्वीची भाषणे आजही तितकीच ताजी... मराठीतील पहिले ‘ज्ञानपीठ’चे मानकरी वि. स. खांडेकर यांच्या जन्मशताब्दीचे हे वर्ष. त्या निमित्ताने त्यांची बहुतांशी पुस्तके उपलब्ध करून देण्याचा मेहता पब्लिशिंग हाऊसचा संकल्प आहे. गेल्या तीन वर्षांपासून त्यंनी या संकल्पपूर्तीच्या दिशेने वाटचाल सुरू केली. आजवर तिसेक पुस्तकांची पुनर्मुद्रणे पूर्ण झाली आहेत. खांडेकरांनी १९३४ ते १९३६ या तीन वर्षांत मराठी साहित्य संमेलन कथा शाखा, गोमंतक साहित्य संमेलन - मडगाव, शारदोपासक संमेलन - पुणे, मुंबई मराठी साहित्य संमेलन आणि सोलापूर जिल्हा साहित्य संमेलन अशा पाच संमेलनात अध्यक्ष म्हणून भाषणे केली. या पाच भाषणात एका न झालेल्या भाषणाची भर घालून ‘सहा भाषणे’ हे पुस्तक १९४१ मध्ये प्रसिद्ध केले गेले. त्याची दुसरी आवृत्ती नुकतीच निघाली आहे. ‘अभिषेक’ हा दुसरा अध्यक्षीय व वाङ्मयीन भाषणांचा संग्रहही नंतर निघाला. खांडेकरांची वाङ्मयीन भूमिका समजून घेण्यास या भाषणांचा थोडासा उपयोग होऊ शकेल. कलावाद विरुद्ध जीवनवाद यांचे प्रारंभीचे पडसाद यात वरचेवर उमटले आहेत. १९३४ मधील कथासंग्रहांचा आढावा घेऊन त्या वर्षी कृष्णाबाई, नाट्यछटाकार दिवाकार, वि.वि. बोकील, ना.सी. फडके, लक्ष्मणराव सरदेसाई यांच्या कथा प्रथमच संग्रहरूपात आल्या याकडे लक्ष वेधले आहे, आनंदीबाई शिर्के, य.गो. जोशी, कुमार रघुवीर वगैरेचीही पुस्तके आली. नियतकालिकांमून बाहेर पडणाऱ्या या कथांना कला व वाङ्मय यांच्या कसोट्या लावल्या, तर हाताच्या बोटावर मोजण्याइतका कथाही मिळणार नाहीत, असे ते मान्य करतात. पण या हौशी लेखकांतून उद्याचा सेनापती मिळेल, अशी अपेक्षाही प्रकट करतात. कथा वाङ्मय बहुजनांसाठी मानवी हृदयाशी क्रीडा करण्यासाठी जन्मास येते; ज्ञानदान हा तिचा मुख्य हेतू नसतो. कथनकला ही वसंतसेनेसारखी जी आनंदरूपी चारुदत्ताला माळ घालणार; चारूदत्ताची नीती म्हणून एखादी पत्नी असली तरी ती कुणाची पर्वा करणार नाही, असे उपमेद्वारे ते पटवू पाहतात. हेतूप्राधन्यतेने कथा रूक्ष व ओबडधोबड होते. कथेला कोणताही विषय चालतो. पण तो विषय कलासुंदर रीतीने मांडला पाहिजे. कथा, प्रणय व नीती यांचा तिरंगी सामना सदैव रंगत असतो. अद्भूतरम्य कथांतही भरपूर प्रणय सापडतो. पुराणनीतिवाद्यावर खांडेकर टीका करतात; तसेच इतर भाषापेक्षा मराठी कथा विपुलता, वैचारिक व कलागुण यात मागे रेंगाळते आहे. अशी त्यांची तक्रार आहे. या सुमार दर्जाचे कारण म्हणून मागणी तसा पुरवठा व गाजरपारखी प्रकाशन यांना ते दोष देतात. टीकाकारांचेही बक-शुक-पिक-काक असे चार वर्ग ते पाडतात. वृत्तपत्रांतील परीक्षण पांचट असतात; वाचकवर्गाने अभिरुचिसंपन्न व्हावे, लेखकाने आत्मतत्त्वाची जाण ठेवावी; कल्पनारम्यतेचा अतिरेक करू नये इ. सूत्रे सांगून कथालेखकांना काही सूचनाही देतात. त्यातील एक वाचनावर भर न देता, स्वत:च्या भल्याबुऱ्या अनुभवांतून कथा निर्माण करा. विनोदी, शास्त्रीय, चमत्कृतिजनक, अद्भूतरम्य ऐतिहासिक अशा कथाही हव्या असेही सुचवतात. आजही हे सर्व मुद्दे गैरलागू ठरत नाहीत. यात खांडेकरीय चिंतनाचा दीर्घपल्ला लक्षात येतो. सौंदर्यदृष्टी, सहदयता वैयक्तिक तत्त्वज्ञान, सूक्ष्म निरीक्षण व कलाचातुरी हे ललित लेखनाचे पंचप्राण असतात. याकडे अंगुलीनिर्देश करून खांडेकरांनी म्होपासॉ, वाल्मीकी, क्युप्रित, ब्रिओ प्रभृतींचे हवाले देत गोममकीय भाषण रंगवले आहे. छोट्या संमेलनांची आवश्यकता व कोकणी - मराठी भाषेची निकटता यांचीही आठवण देतात. शारदोपासक संमेलनात मराठी वाङ्मय कल्पनारम्यतेच्या आसपास घुटमळत असल्याची तक्रार करून केळकर, वा.म. जोशी, वरेरकर, फडके, अत्रे या सर्वांच्या कृतीत कल्पनारम्यतेचे धुके दिसते, हे दाखवून दिले आहे. पिरांदेलो, टर्जिनेव्ह यांची उदाहरणे देऊन, पावित्र्यविंडबन, मूर्तिभंजन, बदलता जीवनविषयक दृष्टिकोन यांची जाणीव देऊन भविष्यकाळ उज्ज्वल आहे, अशी ग्वाही दिली आहे. मुंबई मराठी साहित्य संमेलनातील भाषणात प्रथम, मुंबई हे शहरही मराठी ग्रंथकारांच्या दृष्टीने संपन्न आहे. मराठी पुस्तकांची आणि दैनिक साप्ताहिकांची हीच मुख्य बाजारपेठ आहे. ज्येष्ठ लेखकाप्रमाणेच बुद्धिमान तरुण लेखक येथे आहेत. याकडे लक्ष वेधले आहे. या भाषणत ललित वाङमय कलावादी भूमिकेच्या मर्यादा, जीवनवादी - ध्येयवादी दृष्टी यांचे विवेचन करताना ‘वास्तव जीवनाचे सोने, विचारांचा प्रज्वलित अग्नी आणि कलाकुशल सुवर्णकारांची निर्माणशक्ती यांच्या त्रिवेणी संगमावाचून शारदेच्या भांडारात मोलाची भर घालणारा अलंकार तयार होणेच शक्य नसते.’ असे प्रतिमात्मक भाषेत विधान केले आहे. परंतु आपले लेखक चिंतनात कमी पडतात असे, ते म्हणतात. इंग्लंडमधील बेनेट (व्यवसायिक लेखक), एव.जी. वेल्स (पढिक पंडित), गॉल्सवर्दी (न्यायाधीशांची समतोल वृत्ती) जॉर्ज बनॉर्ड शॉ (कुशल शस्त्रवैद्याची बुद्धी) हे चौघे लेखक कलावंताने विचारवंत असणेही आवश्यक आहे हे स्पष्ट करतात, असे खांडेकर म्हणतात. प्रचलित समाजाचे सत्य सर्वस्पर्शी चित्रण वाङ्मयसौंदर्याला प्रेरकच होते, असे सांगताना टर्जिनेव्ह, डोस्टोवस्की, टॉलस्टॉय्र मॅक्झिम गॉर्की यांचे दाखले देतात. ललित वाङ्मयात जीवनदृष्टी ही असायलाच हवी, मार्क्स व फ्राईड यांचाही अभ्यास हवा, लेखकांनी सामाजिक बंडखोरी करायला हवी इत्यादी विचारही मांडले आहेत. सोलापुरात झालेल्या पहिल्याच जिल्हा साहित्य संमेलनात तेथील साहित्यकारांचा प्रथम गौरवपूर्ण उल्लेख करून, मराठी साहित्याची सद्य:स्थिती आशावादी आहे, केळकर-वरेरकर-फडके यांचे लेखनवैपुल्य पाश्चात्य लेखकांच्या तोडीचे आहे, लघुकथा-लघुनिंबध, एकांकिका वगैरे नवे प्रकार उत्साहाने लिहिले जात आहेत, वाङ्मयीन वादही लढवले जात आहेत, याची नोंद घेतलेली आहे. कला व जीवन या वादाच्या विस्तृत परामर्श घेतांना आपली जीवनवादी भूमिका कशी महत्त्वपूर्ण आहे. याचे समर्थन केले आहे. वास्तववादी व सामाजिक चित्रण प्रमुख भूमिकांभोवती असणारे विभूतिमत्त्वाचे वलय, भाषेचा सुबोधपणा भाषाशुद्धी वाद, सावरकरांची लिपी सुधारणा चळवळ अशा अनेक बाबींवरचे मतप्रदर्शन आहे. सहाव्या न झालेल्या भाषणात या पाच भाषणांच्या वेळची स्थिती, समारंभातील मौजमजा (एका हाता छापील भाषण व दुसऱ्या हातात माईक घेऊन बोलताना करावी लागलेली कसरत - यामुळे पुâटलेला घाम) खांडेकर सांगतात. अध्यक्षीय भाषण हे सद्य:स्थितीत मामुली व परिणामकारक होत असल्याची खंतही त्यांना वाटते. संमेलनातील चर्चाविषयात नावीन्य हवे, अभ्यासू व वक्तृत्वशैली असणारे वक्ते हवेत अशी सूचना ते करतात. आजही या सर्व बाबींबद्दल परिस्थितीत फरक पडलेला नाही. असे दिसते. गेल्या साठ वर्षांत मराठी वाङ्मय लेखकांच्या भूमिका, विविध वाङ्मयीन वाद, सभा संमेलनाबाबतच्या भूमिका यात काही फरक पडलेला नाही. या भाषणांतील मुद्यांवरून जाणवते. खांडेकरांचे विचार वक्तृत्वपूर्ण अलंकारिक शैलीत प्रकट होतात. आपल भूमिका मांडताना ते समन्वयवादी होतात. त्यामुळे टोकाला जात नाहीत. कुठलाच विचार पूर्णत्वाला जात नाही, हेही ते जाणतात. ही भाषणे वाचताना खांडेकर आपल्याशी बोलत आहेत असे वाटते. साठ वर्षांपूर्वीची ही भाषणे असली तरी ती आजही जुनी वा कालविसंगत नाहीत. खांडेकरांचे शरसंधानही रंजक व मार्मिक असे. ‘हरिभाऊंच्या वङ्काघाताचे पहिले प्रकरण वाचावे. कापड दुकान व शिंप्याचे दुकान यातील बारकावे त्यातील मेहेरजनाचे वर्णन वाचून कळणार नाही. हे खरे (पृष्ठ ८०) मतप्रतिपादनाच्या धोंड्याने वरेरकरांच्या कलेचा कपाळमोक्ष झाला, असे नाही. (पृष्ठ ८१) ‘गाय हा उपयुक्त प्राणी आहे, याबद्दल चहा, दूध, तूप वगैरेवर सर्रास बहिष्कार पडेपर्यत तरी मतभेद होणार नाहीत. पण ती देवता आहे, असे आजच्या तरुणांना सांगितले तर या देवतेच्या मारक्या शिंगांची व्यवस्था काय, या प्रश्नांचे उत्तर देण्याची तयारी हवी.’ (पृष्ठ ६४) ‘गणपतीच्या लहानपणी मी कसा झालो हे पुस्तक नव्हते म्हणून बरे नाही तर त्याने पार्वतीला नाही नाही ते प्रश्न विचारून पुरे केले असते आणि ते प्रश्न ऐकून स्मशानापेक्षाही अधिक एकान्तांची जागा शोधण्याचा मोह शंकराला झाला असता’ (पृ. ६४) पुणे हे महाराष्ट्राचे माहेरघर आहे, असे मी म्हटले तर छे! छे! तिथे साऱ्या महाराष्ट्राला सासुरवास भोगावा लागतो.’ असे उद्गार काढणारे तीर्थस्वरूप वाङ्मयसेवक मला ठाऊक आहेत. (पृ ४९) ‘पण या संमेलनाच्या निमित्ताने एक आणा किमतीचे पुणेवर्णन लिहिणे योग्य होणार नाही.’ (पृ. ४९) ‘नाटकात खादाड विदूषकाची जागा आचरट कवीने घेतलेली दिसते. क्वचित कवी रजेवर गेला तर मास्तर त्याचे बदली काम करतो. दोघेही बिचारे गरीब प्राणी! (पृ. ६२). अशा कल्पक विधानामुळे खांडेकरांच्या भाषणांना रंगत येई. -शंकर सारडा ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more

I HAVE A DREAM
I HAVE A DREAM by RASHMI BANSAL Rating Star
Krishna Diwate

‘स्टे हंग्री स्टे फूलीश’ आणि ‘कनेक्ट द डॉटस’ या बेस्ट सेलर पुस्तकाच्या लेखिका ‘समाजातल्या परंपरागत समस्या सोडवण्याचा नवा मार्ग शोधून काढणार्‍या वीस सामाजिक उद्योजकांच्या प्रेरणादायी कहाण्या’ हे वाक्य पुस्तकाचे पहिले पान उघडले आणि दिसले. त्यामुळे माझ कुतुहल चाळवले आणि ते पुस्तक वाचायला सुरुवात केली. मनोगतात लेखिका म्हणतात की, आता नव्या दमाचे, डोक्याने आणि मनाने ही विचार करणारे काही जण एखाद्याच्या नजरेतील दुःख ओळखतात, पेटून उठतात; पण ते त्याच्यावर विचार एखाद्या उद्योजकाप्रमाणे करतात. म्हणून ते ‘सामाजिक उद्योजक.’ नफा मिळविण्याचा हव्यास नसला तरी ते बिझनेस मधील तत्वे वापरून ती गोष्ट साध्य करतात. हे काही तरी वेगळे आपण वाचत आहोत असे मला वाटले. त्यामुळेच ते पुस्तक वाचायला घेतले. ह्या मध्ये वीस लोकांची चरीत्रे आहेत. ते सर्व भारतीय, उच्चशिक्षित तरूण तरूणी आहेत. कोणी त्यातील शास्त्रज्ञ आहेत तर कोणी मरिन बायोलॉजिस्ट, आयआयटी, आयआयएम ग्रॅज्युएट आहेत पण कोणत्या कोणत्या सामाजिक प्रश्नाने ते अस्वस्थ झाले आणि नेहमीच्या मार्गाने न जाता वेगळीच वाट पकडली. पुस्तकात ‘रेनमेकर्स,’ ‘चेंजमेकर्स’ व ‘स्पिरिच्युअल कॅपिटॅलिस्ट’ असे तीन भाग आहेत. प्रत्येकात अनुक्रमे अकरा,सहा व तीन व्यक्तीमत्वांची ओळख करून दिली आहे. ‘सुलभ’ ही आधुनिक टॉयलेटस उभारणारे बिंदेश्वर पाठक ह्याच्या चरित्राने पुस्तकाची सुरुवात होते. जातीने बिहारमधील ब्राह्मण. पण लहानपणी टॉयलेटस साफ करणार्‍याला हात लावला त्यामुळे आजीने अक्षरशः शेण, गोमुत्र खायला लावले. पण त्याच बिंद्रेश्वरांनी अगदी योगायोगाने ह्याच क्षेत्रात काम करण्याचे ठरविले. अर्थात ही वाट निश्चितच सोपी नव्हती. अनेक हालअपेष्टा सोसत, जगाचे धक्के खात, अनेक समस्यांना तोंड देत आपले स्वप्न ‘सुलभ शौचालयाच्या’ माध्यमातून सुरु केले. तो सगळा खडतर प्रवास अर्थात पुस्तकातूनच वाचायला हवा. त्यासाठी त्यांनी केवळ ती यंत्रणा तयार केली नाही तर ती टॉयलेटस बांधून, त्यासाठी लागणारी प्रेरणा, शिक्षण, संभाषण, ट्रेनिंग, पाठपुरावा अशा सर्वच गोष्टी ‘सुलभ’ तर्फेच संभाळल्या जातात. सध्या ही संस्था स्वबळावर चालते. 100 ते 125 कोटी इतके तिचे वर्षाचे उपन्न आहे. इतकेच नाही पूर्वी जे लोक सफाईचे काम करत असत त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च संस्था करत आहे. ‘सुलभ पब्लिक स्कूल’ नावाने शाळा सुरु केली आहे. तरूणांसाठी व्होकेशनल क्लासेस चालवले जातात. म्हणजे मिळालेला नफा पुन्हा त्याच सफाई कामगारांच्या कल्याणासाठी वापरला जातो. टॉयलेटस बांधून भरपूर पैसा मिळवता येतो हे वाक्य पचायला जरा जडच जाते. अनिता आहुजा ही दिल्लीत सुखवस्तू कुटूंबात रहाणारी सामान्य स्त्री. पण कचरा वेचणार्‍या मुलांचे हाल पाहून त्यांच्यासाठी काही तरी करावे असे तिने ठरविले. तिने 1998 मध्ये कॉन्झर्व्ह नावाची संस्था उभी केली. व त्यातून पहिला प्रोजेक्ट सुरु केला तो म्हणजे आजुबाजूच्या परिसरातील कचरा उचलून त्याचे कंपोस्टखत तयार करणे. कचरा गोळा करण्यासाठी चांगल्या ढकलगाड्या आणल्या, युनिफॉर्म, आय कार्डची सोय केली. 2002 पर्यंत एक पूर्ण वेळ काम करणारी मोठी संस्था बनली. त्याचवेळी त्यांनी प्लॅस्टीकच्या कचर्‍यावर प्रयोग सुरु केले. तिचे पती शलभ ह्यांनी बिटस पिलानी मधून इंजिनिअरींग केले आहे. त्यांच्या मदतीने तिने फॅक्टरी सुरु करण्याचे ठरविले. शलभने मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक शीटस निर्मिती करू शकेल असे मशीन तयार केले. त्यासाठी अर्थातच अनेक प्रश्न समोर उभॆ राहिले. चुका झाल्या, ठोकरा खाल्या पण त्यातून वाट काढत त्यांनी चिकाटीने प्रयत्न सुरुच ठेवले. आज दोघे मिळून कचर्‍यातील प्लॅस्टिक पिशव्या वापरून आकर्षक अशा हॅडबॅगस तयार करण्याचा कारखाना चालवतात. जे लोक सुरुवातीला केवळ कचरा उचलण्याचे काम करत होते, त्यांच्या काही कौशल्य दिसले की त्यांना वेगळे काढून ट्रेनिंग दिले जाते. मशीनवर असिस्टंटचे काम करू लागतात त्यातून काही लोक तर ग्रुप लिडर ही झाले आहेत. कटींग करणॆ, क्वालिटी तपासणॆ, फिनिंशींग, पॅकिंग अशी सर्व महत्वाची कामे ते करतात. आता ते कामगार झाल्यामुळॆ त्यांना चांगला पगार, प्रॉव्हिडंट फंड, ओव्हरटाईम अशा सुविधा मिळू लागल्या त्यापेक्षा ही जास्त त्यांना समाजात प्रतिष्ठा मिळाली. त्यांच्या साठी हे नवीनच आहे. अनिता व शलभ दोघॆही मेहनत घेतात पण एनजीओ असून ही भरपूर पैसा कमावणे त्यांना चुकीचे वाटत नाही. कारण आज ह्या एका उद्योगामुळे कित्येक कुटूंबाची आर्थिक स्थिती बदलून गेली आहे. अशीच अजून एक प्रेरणादायी कथा दिल्लीतील रंगसूत्र कंपनी चालविणार्‍या सुमिता घोस ह्यांची. स्वतः ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यावर मास्टर इन इकॉनॉमिक्स ची पदवी घेतल्यावर संजॉय घोस ह्या या आय आर एम मधून शिक्षण घेतलेल्या ध्येयवादी तरूणाशी लग्न केले. पण दुर्दैवाने आसाममध्ये काम करत असताना त्यांची 1998 मध्ये उल्फाच्या अतिरेक्यांनी हत्या केली. त्यानंतर अनेक टक्केटोणपे खात, दोन लहान मुलांचा संभाळ करत सुमिताने ‘रंगसूत्र’ नावाची कंपनी काढली. त्याच्या मार्फत ती खॆडॆगावातल्या लोकांकडून कापड, शोभॆच्या वस्तू, बनवून घेते आणि त्या फॅब ईंडीयासारख्या प्रसिध्द कंपन्यांना विकते. जैसलमेर, बारमेर जिल्ह्यातले कारागिर तिच्यासोबत काम करत आहेत. अजून एक अशीच ध्येयवादी तरूणी म्हणजे इशिता खन्ना. डेहराडून मध्ये जन्म झालेली एक सर्वसामान्य मुलगी. पण निसर्गसंवर्धन आणि भूगोल या विषयांची आवड असलेली. म्हणूनच तिने आपल्या ग्रॅज्युएशन नंतर टाटा इंन्स्टीट्यूट मधून मास्टर्स केले. पर्यावरण क्षेत्रातच काम करायचे आहे हे निश्चित ठरवून तिने काही वर्षे नोकरी केली. त्यानंतर 2002 मध्ये नोकरी सोडून आपल्या दोन मित्रांसोबत स्पिती व्हॅलीमध्ये मूस नावाची एन्जीओ सुरु केली. तेथील स्थानिक महिलांचे ग्रुपस करून त्यांना तिथे असणार्‍या सीबक थॉर्न ह्या फळांच्या लागवडीचे ट्रेनिंग दिले. त्यावर प्रक्रिया करायला शिकवले. ही झाडॆ मातीला धरून ठेवतात त्यामुळे धूप रोखली जाते, शिवाय नायट्रोजन ही धरून ठेवत असल्याने जमिनीचा पोत सुधारतो. त्यामुळे ह्या फळांवर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे तिथल्या बायकांना चांगला रोजगार मिळू लागला. त्याचबरोबर तिने स्थानिक तरूणांना पर्यटकांना ट्रेक किंवा जीप सफारीसाठी नेणे, कॅम्प लावणे, गरज पडल्यास प्रथमोपचार करणे ही कामे ही करायला शिकवले. कारण हळूहळू तिथे पर्यटन वाढू लागले. ते इको-फ्रेंडली करण्याकडॆ तिच्या इकोस्पियर संस्थेचा भर आहे. आता दरवर्षी पर्यटनातून 35 ते 40 लाखाचे उत्पन्न मिळते.आणि त्यातून नफा ही मिळतो. इकोस्पियर संस्थेने शेजारच्य़ा ‘लाहुल’ व्हॅलीमध्ये ही विकास कामे सुरु केली आहेत. पर्वतावर तयार होणार्‍या कचर्‍याच्या समस्येवरही तिला काहीतरी करायचे आहे. तिची संस्था लोकांना मुद्दाम तिथले लोक किती अवघड परिस्थितीत रहातात हे दाखवते. अतिशय थंडीत तिथे तापमान मायनस 35 पर्यंत खाली गेल्यावर हॅंडपंपने पाणी काढणे सुध्दा किती कठीण होते हे सांगितले जाते. तेव्हा आपल्यासारख्य़ा पर्यटकांना काय काय करता येईल याबद्दल ती जागरूकता निर्माण करते. मूळात हे पुस्तक 2012 साली लिहिलेले आहे. त्यामुळे आता ह्या वेगवेगळ्या प्रकारचे काम करणार्‍या संस्थेचे काम या दहा वर्षात खूपच वाढले असेल यात काही शंका नाही. दीनबंधू साहू हे मरिन बायोलॉजिस्ट आहेत पण ते प्रयोगशाळेतून बाहेर पडून समाजासाठी काम करतात. ‘प्रोजेक्ट चिलका’ ह्या त्यांच्या संस्थेमार्फत ओरिसातील लोकांना समुद्राची शेती करायला शिकवतात. ओरिसा मधील पुरी येथे जन्म झालेल्या दीनबंधूनी अतिशय हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेतल्यानंतर दिल्लीत एमएसीला ॲडमिशन घेतली. परंतु योगायोगाने १९८७ मध्ये अंटार्क्टिक वर जाण्याची संधी मिळाली. नंतर पीएचडी पूर्ण केल्यानंतर अनेक देशांमध्ये नोकरी निमित्ताने फिरले. पण तरीही शेवटी दिल्ली युनिव्हर्सिटी मध्ये प्रोफेसर म्हणून काम सुरू केले. त्यांना समुद्री वनस्पती बद्दल विशेष आस्था होती; पण त्या बद्दल आपल्या देशात फारशी जागरूकता नव्हती. ही लागवड पर्यावरण पूरक असते शिवाय त्यातून स्थानिक लोकांना उत्पन्नाचे साधन मिळते. त्यासाठी डिएसटीने निधी मंजूर केला. मग त्यांनी चिल्का सरोवराची पहाणी केली, त्यामध्ये वाढू शकतील अशा चार जातींची निवड करून स्थानिक लोकांना समजेल अशा सोप्या भाषेत माहिती दिली. प्रात्यक्षिके दाखवली, वर्कशॉप्स घेतली. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना रोजगार मिळू लागला. यातूनच पर्यावरण संरक्षण ही होऊ लागले. यातून त्यांना प्रत्यक्ष कांहीं आर्थिक फायदा होत नसला तरी ते म्हणतात, की आम्हाला दोघांना दिल्लीत चांगली नोकरी आहे. त्यामुळे पैसे कमावणे हा उद्देश नाही; पण अजून तीस वर्षांनंतर मला मी काही तरी काम केलेले दिसेल. असे जर काहीच तुम्हाला दिसणार नसेल तर जगायचे कशाला? भूषण पुनानी हे असेच अत्यंत बुध्दीमान विद्यार्थी. मेडीकलची ॲडमिशन हुकल्यामुळे डेअरी कोर्ससाठी ॲडमिशन घेतली. तिथे ही विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळविला. नंतर पीएचडी केले. ग्रामविकास शिकण्यासाठी आयआयएम मध्ये एमबीए केले. हे झाल्यावर 1979 मध्ये ब्लाईंड स्कूल मध्ये दोन वर्षांसाठी नोकरी सुरु केली ती सुधा ह्याच हेतूने की मॅनेजमेंट शिकताना जी थेअरी शिकलो ती विकासाच्या क्षेत्रात वापरता येईल का? हळूहळू त्यांना अनेक लोक मिळत गेले. सर्वांनी मिळून आज संस्था खूप मोठी केली आहे.त्यांनी काम सुरु केले तेव्हा फक्त एक कॅपस होता, आज गुजरात मध्ये आठ कॅपस आहेत. दहा लाख मूल्य असलेली संस्था आज दोन कोटी रुपयांची आहे. अपंग लोकांनी स्वावलंबी व्हावे ह्यासाठी संस्था काम करते. दृष्टीहीन मुली ब्यूटी पार्लरसारखे कोर्स चालवतात, फिजिओथेरपी शिकून सेंटर मध्ये काम करतात. विकास साधण्यासाठी योग्य व्यवस्थापनेची गरज असते हे त्यांनी दाखवून दिले आहे. हजारो लोकांच्या आयुष्यात नवा प्रकाश निर्माण करून त्यांना सामान्य आयुष्य जगण्याची संधी मिळवून दिली आहे. अशी ही एकापेक्षा एक वेगवेगळ्या प्रकारची माणसे. कोणत्या तरी ध्येयाने पछाडलेली . सामाजिक कार्य करत असतानाच त्या लोकांचे कल्याण कसे होईल असा विचार करणारी. लेखिकेने त्या सर्वांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या आहेत, त्यांचे काम प्रत्यक्ष पाहून जाणून घेतले आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित गोळा करून आपल्यासमोर मांडली आहे. त्यामुळेच त्या मनोगतात म्हणतात, ‘तुमचं आयुष्य कसे ही असले तरी इतरांसाठी एखादा क्षण द्या. इतरांना प्रेम, आनंद, चांगुलपण द्या. जितकं द्याल तितकं तुम्हाला परत मिळेल.’ हेच वाक्य मलाही अतिशय उर्जा देऊन गेले. माझ्याकडे जे आहे, जे मला देणे शक्य आहे ते निरपेक्षपणे ज्यांना गरज आहे त्याला देणे ह्या सारखा आनंद अजून काय असणार? ह्याच वाक्याने मी आपली ह्या आठवड्यात रजा घेते. उद्या पासून सुरु होणार्‍या नवीन सत्रासाठी सारिका ताईंना हार्दिक शुभेच्छा. ...Read more