BHAGYASHREE NULKAR

About Author


BHAGYASHREE NULKAR IS A PHYSICS GRADUATE. ALSO, SHE HAS OBTAINED A MASTER S DEGREE IN MARATHI SUBJECT. SHE HAS ALSO OBTAINED THE DIPLOMA OF ADVANCED DIPLOMA IN COMPUTER SOFTWARE AND SYSTEM ANALYSIS AND APPLICATION. SHE HAS BEEN WORKING IN BRIHANMUMBAI MUNICIPAL CORPORATION FOR 35 YEARS. MARATHI VIGYAN PARISHAD PATRIKA , AMRIT , NAVAL , PRAPANCH , BHALCHANDRA , ALKA , LALNA , AHER , DARYWARDI , SNEHDA , RANGAI , MAHARASHTRA DINMAN , PUNE PRATISHTHAN , SCIENCE FICTION, SCIENCE POETRY HAVE BEEN PUBLISHED IN VARIOUS MAGAZINES. LOVES MUSIC AND TRAVEL. THE STORY SEEMARESHA IS INCLUDED IN THE COLLECTION OF SCIENCE FICTION MANVANTAR COMPILED BY NIRANJAN GHATE. THE STORY OF DHUDHAVARAI SAI HAS BEEN INCLUDED IN THE SCIENCE FICTION ANTHOLOGY PURVANSCHINT GOF NYATHANCHA ON GRANDPARENT-GRANDCHILD RELATIONSHIP. TWO CHILDREN S STORIES AND TWO POEMS ARE INCLUDED IN THE CHILDREN S BOOK OF 365 STORIES COMPILED BY VIJAYA VAD. SECOND PRIZE OF MAHARASHTRA SAHITYA MANTHAN SANSTHA (1999) FOR THE POEM SUKH , KUSUMANJALI STREE KATHI AWARD AT THE STATEWIDE MARATHI STORYTELLING CONFERENCE ORGANIZED BY KUSUMTAI CHAUDHARY MAHILA KALYAN, AWARD FOR STORIES PUBLISHED IN LALNA (2007, 2010, 2011 2013), PRERNA THEATRES- 2ND PLACE FOR CHILDREN S STORY (2012) ETC. AWARDS HAVE BEEN RECEIVED. PRESENTLY SHE IS HOLDING THE POST OF EXECUTIVE OFFICER OF MUMBAI MARATHI GRANTH MUSEUM MULUND DEPARTMENT. ORGANIZING VARIOUS LITERARY EVENTS, AS WELL AS SCIENCE FICTION STORYTELLING. INVOLVED IN MARATHI SCIENCE COUNCIL S SCI-FI BOARD.

भाग्यश्री नुलकर भौतिकशास्त्राच्या पदवीधर आहेत. तसेच मराठी विषयात त्यांनी पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे.ADVANCED DIPLOMA IN COMPUTER SOFTWARE AND SYSTEM ANALYSIS AND APPLICATION ही पदविकाही त्यांनी प्राप्त केली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेत त्या ३५ वर्षापासून कार्यरत आहेत. ‘मराठी विज्ञान परिषद पत्रिका’, ‘अमृत’, ‘नवल’, ‘प्रपंच’, ‘भालचंद्र’, ‘अलका’, ‘ललना’, ‘अहेर’, ‘दर्यावर्दी’, ‘स्नेहदा’, ‘रंगाई’, ‘महाराष्ट्र दिनमान’, ‘पुणे प्रतिष्ठान अशा विविध मासिकांमधून विज्ञानकथा, विज्ञान कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. संगीत आणि प्रवासाची आवड आहे. निरंजन घाटे संकलित ‘मन्वंतर या विज्ञान कथासंग्रहात ‘सीमारेषा या कथेचा समावेश झाला आहे. आजी-आजोबा व नातवंडं नातेसंबंधावर विज्ञानकथासंग्रह ‘पूर्वसंचित गोफ नात्यांचा’मध्ये ‘दुधावरील साय या कथेचा समावेश झाला आहे. विजया वाड संकलित ३६५ कथांच्या बालकोशात दोन बालकथांचा व कवितांच्या बालकोशात दोन कवितांचा समावेश झाला आहे. ‘सुख या कवितेस महाराष्ट्र साहित्य मंथन संस्थेचा द्वितीय क्रमांक (१९९९), कुसुमताई चौधरी महिला कल्याण आयोजित राज्यव्यापी मराठी कथालेखिका संमेलनात ‘कुसुमांजली स्त्री कथी पुरस्कार, ‘ललना’मध्ये प्रकाशित कथांना पुरस्कार (२००७, २०१०, २०११ २०१३), प्रेरणा थिएटर्स- बालकथेसाठी द्वितीय क्रमांक (२०१२) इ. पुरस्कार मिळाले आहेत. सध्या मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय मुलुंड विभागाचे कार्यवाह पद सांभाळत आहेत. विविध साहित्यिक कार्यक्रमांचे आयोजन, तसेच विज्ञानकथांचे कथाकथन चालू आहे. मराठी विज्ञान परिषदेच्या साय -फाय कट्ट्यावर सहभाग आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
PADCHAYA Rating Star
Add To Cart INR 220

Latest Reviews

वा. पां. जाधव अमरावती

`अमरावतीचे छप्पन स्वभाव एक मनोरंजक काव्यसंग्रह` `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे अमरावतीचे सुप्रसिद्ध साहित्यिक श्री जी. बी. देशमुख यांचे अमरावती नगरीचा सहज स्वभाव व ह्या नगरीच्या वेगळ्या ओळखीवर आधारित मनोरंजक पुस्तक वाचले. वाचून भरपूर मनोरंजन झाले. खर काय लिहावे या लेखकाबद्दल, मन गोंधळले. ऐतिहासिक असो, प्रवास वर्णन असो, व्यक्ती विशेष असो, अनुभवात्मक घटना घडामोडी असो कशावरही सहज लिखाण करणारा हा लेखक आहे. आता तर त्यांनी लेखनाला विनोद प्रचुर फोडणी देऊन `अमरावतीचे छप्पन स्वभाव` या काव्यसंग्रहातून अमरावतीकरांना मनोरंजनाची मेजवानीच दिली आहे. प्रत्येक शहराची व त्या शहरातील वैशिष्ट्यांची एक वेगळीच ओळख असते. दिवस जातात, काळ लोटतो, पिढ्या बदलतात मात्र जुन्या स्मृतीची चिन्हे नवीन येणाऱ्या पिढीच्या मनात गुढ निर्माण करत कायम हाक देत राहतात. अमरावतीही त्याला अपवाद नाही. बापट चौकात चौक नाही, त्या जागेवर चौरस्ता नसून टी-पॉइंट आहे, खापर्डे बगीचा म्हणून आजही ओळख आहे मात्र तेथे बगिचा नाही किंवा प्रसिद्ध गांधी चौकात गांधीचा पुतळा अथवा स्मृतीदर्शक चिन्ह अथवा उल्लेख नाही मात्र गांधी चौक अशीच ओळख जनमानसात आहे. अशा एक ना अनेक विसंगत नाम दर्शक ओळख असलेली उदाहरणे त्यात सप्रमाण आहेत. पण खरी गंमत म्हणजे कधी काळी घडलेला इतिहास त्यामध्ये दडलेला आहे हे निश्चित. या सोबतच अमरावतीकरांच्या स्वभावातला स्थायी मजेदारपणाच्या एक एका हटके गुण वैशिष्ट्याच्या गमती लेखकाने हुबेहूब अधोरेखित केलेल्या आहेत. आणि त्यावरुन तत्सम रचनांचा उहापोह लेखकाने पुस्तकात केला असावा. विदेशात स्थाईक झालेल्या मूळ अमरावतीकरांना लेखकाने लिहिलेल्या गमती मनोरंजनात्मक वाटाव्या एवढी किमया जी.बी. च्या सहज लेखनाने दाखवली आहे. अमरावतीचे अग्रगण्य वृत्तपत्र दै. हिंदुस्थान मध्ये लेखकाने सतत ६ महीणे लिहीलेल्या काव्य सदरात अमरावतीच्या जनमानसाच्या हृदयाच्या ठाव घेणाऱ्या काव्य रचनांचा आठवणींनी महापूर ओसंडून गेला होता. विशेष म्हणजे ह्यात कुठेही अनावश्यक अभिनीवेष नव्हता. उलट गमतीत केलेले आत्मपरिक्षण मात्र काही प्रमाणात होते. वयस्क अमरावतीकर रसिकांना या रचना ताज्या करून त्यांच्या तारुण्यात घेऊन गेल्या हेच खरे. जी बी देशमुख या लेखकास मिळालेल्या सकारात्मक प्रतिक्रियां वरून दिसून येते. . सदर पुस्तकातील काव्यमय रचना वाचतांना अमरावतीच्या माणसाच्या वऱ्हाडभोळ्या स्वभावाची प्रचीती येते आणि वेगळाच आनंद देऊन जाते. निखळ मनोरंजन करत गुदगुल्या करणारा असा हा काव्यसंग्रह आहे. अमरावती शहराची ऐतिहासिक वैशिष्टे काव्यरूपात वाचण्याचा आनंद अमरावतीकरांना ते जिथं असतील त्या गावात, परगावात, परदेशात पुस्तक मागवून घेता येईल. ...Read more

ज्योती चेडे, मुंबई.

अमरावतीच्या वैशिष्ट्यांवर आधारीत खुमासदार छप्पन्न कवितांच्या संग्रहातील प्रत्येक कविता वाचत असताना अमरावतीच्या वातावरणाची धुंदी आपसुकच मनावर चढु लागली. सगळ्याच कविता सुंदर आहेत. एकेक कविता अमरावतीचे अप्रतिम वर्णन करते. प्रत्येक कवितेचा शेवट कुठेतरी गंभीर विचार करायला भाग पाडतो आणि मन गलबलून जाते. सगळ्याच कविता सुंदर आहेत पण माझ्या मनाला भावलेल्या व भिडलेल्या कविता आहेत `अमरावतीतल्या गमती`, `अमरावतीचे शिक्षण`, `अमरावतीचे हजरजबाबी`, `अमरावतीचे वेडे`, `अमरावतीच्या काकू` व बाकी सगळ्या. `अमरावतीचे वेडे` या कवितेत उल्लेखीत शेवटचा अश्रुंचा एक थेंब जरुर राखला जाईल. तसेच `अमरावतीच्या काकूं` ची उर्जा उरात भरून उरेल. जीवन देणाऱ्या विहीरीने कोणाचेही जीवन घेऊ नये, अशी सद्भावना मनात जागेल. अमरावतीकर जगात कुठेही असो त्यांच्या मनात एका कोपऱ्यात राजकमल चौक असतोच हे सत्य मनावर कोरले जाईल. प्रत्येक अमरावतीकराने ह्या कविता जगाव्यात. त्यासाठी हे पुस्तक संग्रही ठेवावे आणि परगावी राहणाऱ्या आपल्या अमरावतीकर आप्तेष्टांना भेटी दाखल द्याव्या. ...Read more