* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: HOW TO HELP YOUR CHILD SUCCEED
  • Availability : Available
  • Translators : PRASHANT TALNIKAR
  • ISBN : 9788177664737
  • Edition : 3
  • Publishing Year : APRIL 2014
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 136
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : HEALTH & PERSONAL DEVELOPMENT
  • Available in Combos :ANANT PAI COMBO SET-4 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
IT IS AN ESTABLISHED BELIEF THAT ONLY THE HIGHLY INTELLIGENT AND THOSE WHO SCORE VERY GOOD MARKS IN EXAMINATIONS; HAVE A VERY BRIGHT FUTURE. BUT THE AUTHOR BELIEVES THAT THIS IS A REAL MISCONCEPTION. ON THE CONTRARY, HE SAYS THAT EVERYONE HAS INTELLIGENCE OF SOME SORT. BUT, PEOPLE JUST FAIL TO UNDERSTAND HOW TO CONVERT THIS INTELLIGENCE IN BEING INTELLIGENT. THIS BOOK WILL SHOW US HOW TO FIGHT EVERY SITUATION ON THE BASIS OF OUR WILL POWER WITH COURAGE AND CONFIDENCE. THE AUTHOR VERY CLEARLY OUTLINES THE PATH TOWARDS CONFIDENCE. HE SHOWS US THE WAY TO CONFIDENCE AND DETERMINATION.
आजच्या युगात, पालकत्व खूप कठीण, गुंतागुंतींचे झालेले आहे. मुलांना कसे वाढवायचे, त्यांचे संगोपन कसे करायचे, ह्याबद्दल सल्ला देणाऱ्यांचा तोटा नाही. पण ह्याबाबतीत पालक मात्र सहसा, आजच्यापेक्षा कदाचित खूपच वेगळ्या सामाजिक परिस्थितीत जन्माला आलेले पायंडे व नियम पाळत असतात. आपण कोणत्या प्रकारचे पालक आहोत आणि आपल्याला कोणत्या प्रकारचे पालक व्हायला आवडेल, हे ढोबळमानाने ठरवण्यामध्ये हे पुस्तक पालकांना मदत करते. हे काम सोपे नाही. कोणताही पालक जाणीवपूर्वक वाईट आणि निष्काळजी असत नाही. पण तरीही, मुलांची कामगिरी चांगली झाली नाही, तो किंवा ती बंडखोरपणे वागत असेल, तर दु:ख होतेच. आपले कुठे आणि काय चुकले असेल बरे? अनंत पै यांचा, गेल्या २५ वर्षांपासून टीनएज (वय वर्षे १३ ते १९) मधील तसेच एकंदरीतच लहान मुलांशी खूप जवळून संबंध आलेला आहे. तरुण मुलामुलींनी त्यांच्याजवळ विश्वासाने आपली मने मोकळी केलेली आहेत, तसेच आपल्या समस्यांच्या संदर्भात त्यांच्याशी मोकळेपणाने चर्चा केलेली आहे. या मुलामुलींशी संवाद साधण्यांतून तसेच ते पालकांसाठी घेत असलेल्या सत्रांमधून त्यांना जे काही ज्ञान मिळाले, ते ज्ञान या पुस्तकाद्वारे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. त्यांनीच म्हटल्याप्रमाणे, `या पुस्तकांत दिलेल्या सूचना तुम्ही आचरणांत आणल्या, तर तुमची मुलं आक्रमक होण्याची वा अंमली किंवा मादक पदार्थांच्या सेवनाकडे वळण्याची शक्यता जवळजवळ नाहीच.`
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#SELFHELP #ANANTPAI #SUCESS #मार्गदर्शनपर #अनुवाद #अनंतपै #यश #व्यक्तिमत्वविकसन #MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS
Customer Reviews
  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 11-07-2004

    सुजाण पालकत्वाचा संदेश... उमलत्या पिढीला योग्य वळण लावणं हे पालकांपुढे मोठे आव्हानच असते. दुर्दैवाने त्याचे शिक्षण शाळा-कॉलेजात वा अन्यत्र क्वचितच मिळते. ‘पालकपण’ अनेकांकडे नैसर्गिकपणे चालत येते. पण ही भूमिका चांगल्या पद्धतीने निभावून नेण्यासाठी पाकांना स्वत:च्या वागण्यात अनेक प्रकारचे बदल करावे लागतात. अनंत पै यांचं How to help your child succeed हे अतिशय उपयुक्त पुस्तक आहे. प्रत्येक पालकानं वाचावं असंच हे पुस्तक आहे. या इंग्रजी पुस्तकाचा वाचनीय अनुवाद केला आहे, प्रशांत तळणीकर यांनी. अनुवादित पुस्तकांबाबत मेहता पब्लिशिंग हाऊसने सातत्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. हे पुस्तक त्यांनीच प्रकाशित केले आहे. हे छोटेखानी पुस्तक नऊ वेगवेगळ्या शीर्षकांनी विभागलं आहे. पालक म्हणून तुमची काय प्रतिमा आहे? या शीर्षकाने पुस्तक चालू होते. हा पहिला विभाग, विशेष करून त्यात वापरलेली शीर्षके क्लिष्ट वाटतात. तरीपण चिकाटीने ते सर्व वाचा. कारण पुढे त्या शब्दांचा वापर पुस्तकभर केलेला आहे. आत्मसन्मान व आत्मविश्वास या कल्पना पुस्तकात विस्तृतपणे मांडल्या आहेत. त्यांची वाढ कशी करायची याचे स्पष्ट विवेचन केले आहे. अनेक पालकांना मुलांना मोकळीक देणे, स्वातंत्र्य देणे गैर वाटते. तसे केल्यास मुले बिघडतील भीती वाटते. प्रत्यक्षात मुलांना स्वातंत्र्य देणे हे त्यांच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक असते. हा मुद्दा लेखकानं उत्तमरीतीने हाताळला आहे. मुलं अनुकरणप्रिय असतात हे सर्वमान्यच आहे. त्यामुळे पालकांनी स्वत:च्या वागण्यातून त्यांच्यापुढे आदर्श ठेवला पाहिजे. नुसते उपदेशाचे डोस पाजून काही साध्य होणार नाही. मुलांचे म्हणणे सक्रियतेने ऐकणं याबद्दलही अतिशय उपयुक्त विवेचन पुस्तकात आहे. तुमच्या एखाद्या मित्राशी तुम्ही जेवढे आदराने, समजुतीने वागता तसे मुलांशीही वागणे अपेक्षित आहे. पुस्तकातला अखेरचा भाग आहे ‘इच्छाशक्तीवर.’ हा विभाग जणू या पुस्तकाचा मानबिंदू आहे. अतिशय सोप्या भाषेत लिहिलेला सुंदर उदाहरणांनी नटलेला हा विभाग आहे. इच्छाशक्ती कशी जोपासायची, कशी वाढवायची याबद्दल मुद्देसूद विवेचन आहे. इच्छाशक्तीच्या अभावी आपण आपली दिवसाची कामेसुद्ध नीट करू शकणार नाही. आरोग्य नीट राखू शकणार नाही. संपूर्ण पुस्तकभर समर्पक, विनोदी शैलीतील चित्रं आहेत, ती बघणं, हे निश्चितच आनंददायी आहे. तसेच लेखकाने स्वत: आयोजित केलेल्या अनेक स्पर्धांनी मुलांनी कसा प्रतिसाद दिला त्याची उदाहरणे पुस्तकात ठायी ठायी लिहिली आहेत. त्यामुळे ‘पालकांना त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यानुसार स्वत:च्या वागण्यात फेरफार करणं हेच या पुस्तकाचं मूळ उद्दिष्ट आहे. तरुण पिढी सक्षम व समतोल बनवायची असेल तर त्यांचे पालकही सक्षम हवेत. सुजाण पालकत्वाचा संदेश देणारं अतिशय उपयुक्त व्यवहार्य पुस्तक असं या पुस्तकाचं वर्णन केल्यास ती अतिशयोक्ती ठरू नये. ...Read more

  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 02-08-2004

    आजच्या युगात पालकत्व खूप कठीण, गुंतागुंतीचे झालेले आहे. मुलांना कसे वाढवायचे, त्यांचे संगोपन कसे करायचे, याबाबत पालक आजच्यापेक्षा कदाचित खूपच वेगळ्या सामाजिक परिस्थितीत जन्माला आलेले पायंडे व नियम पाळत असतात. आपण कोणत्या प्रकारचे पालक आहोत आणि आपल्याा कोणत्या प्रकारचे पालक व्हायला आवडेल, हे ढोबळमानाने ठरवण्यामध्ये हे पुस्तक पालकांना मदत करते. त्याचबरोबर यातील सूचनांचे व्यवस्थित पालन केल्यास मुलं आक्रमक होण्याची किंवा अमली, मादक पदार्थ सेवनाकडे वळण्याची शक्यता जवळजवळ नाहीच. ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 24-10-2004

    यशस्वी पालकत्वाचा मंत्र... आपले मूल जीवनाच्या सर्व अंगांनी यशस्वी व्हावे, ही प्रत्येक पालकाचीच इच्छा असते; परंतु त्यासाठी स्वत:च्या आचार-विचारांमध्ये काय बदल करायचा, याबद्दल पालक स्वत: फारच गोंधळलेले असतात. तो गोंधळ दूर करण्यासाठी मदत म्हणून ‘आपल्यामुलांच्या यशस्वितेचा कानमंत्र’ अनंत पै यांनी दिला आहे. हल्लीच्या वाढत्या वयातील मुलांना स्वत:चा आत्मसन्मान मोठ्या प्रमाणात असतो. जो जपून, जोपासून, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास कसा निर्माण करावा, स्वायतत्ता देताना स्वातंत्र्यही कसे अबाधित राखावे, पालक-मुलांनी योग्य संपर्कातून समन्वय कसा साधावा, चांगले ऐकणे हा यशस्वी पालकत्वाचा मूलभूत गुण कसा, याची उदबोधक माहिती उदाहरणांसह दिलेली आहे. मूळ पुस्तकाशी साधर्म्य साधण्याच्या प्रयत्नांत अनुवादित पुस्तकाची भाषा काहीशी बोजड झाली आहे. पण तरीही पुस्तक प्रत्येक पालकाने वाचावे असेच आहे. -केदार टाकळकर ...Read more

  • Rating StarMAHARASHTRA TIMES 25-7-2004

    पालकांना घडविणारे पुस्तक... मुलांना लैंगिक शिक्षण देण्याची चर्चा करणाऱ्या या काळात पालकांना पालक म्हणून घडविण्यासाठी कोणता अभ्यासक्रम असावा, याबाबत मात्र उदासिनता दिसते. अशा परिस्थितीत पालक म्हणून आपला विकास कसा करावा, याचे शिक्षण देणारे पुस्तक, किशरांसाठी २५ वर्षे विविध उपक्रम राबविणाऱ्या अंकल पै यांनी लिहिले आहे. बालकावर संस्कार करताना पालक नेमका कुठे चुकतो, त्याने सुधारण्यासाठी काय करावे, हे त्यात पै यांनी समजूतदार शैलीत सांगितले आहे. वेळोवेळी उदाहरणे आणि दाखले दिल्याने लेखन उत्कंठावर्धक आणि ओघवते झाले आहे. मेहता पब्लिशिंगने मूळ इंग्रजी पुस्तकाचा आणलेला हा मराठी अनुवाद आहे. अनुवादकाने अनेक ठिकाणी शब्दश: भाषांतर केल्यामुळे मराठीत इंग्रजी वाक्यबंध प्रत्ययाला येतो. तो खटकला तरी अनंत पै यांच्या अनुभवातील व्यक्ती आणि प्रसंगांनी लेखनात आलेल्या सच्चेपणामुळे पुस्तक पटकन वाचून होते. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more