* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: HOW TO HELP YOUR CHILD SUCCEED
  • Availability : Available
  • Translators : PRASHANT TALNIKAR
  • ISBN : 9788177664737
  • Edition : 3
  • Publishing Year : APRIL 2014
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 136
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : HEALTH & PERSONAL DEVELOPMENT
  • Available in Combos :ANANT PAI COMBO SET-4 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
IT IS AN ESTABLISHED BELIEF THAT ONLY THE HIGHLY INTELLIGENT AND THOSE WHO SCORE VERY GOOD MARKS IN EXAMINATIONS; HAVE A VERY BRIGHT FUTURE. BUT THE AUTHOR BELIEVES THAT THIS IS A REAL MISCONCEPTION. ON THE CONTRARY, HE SAYS THAT EVERYONE HAS INTELLIGENCE OF SOME SORT. BUT, PEOPLE JUST FAIL TO UNDERSTAND HOW TO CONVERT THIS INTELLIGENCE IN BEING INTELLIGENT. THIS BOOK WILL SHOW US HOW TO FIGHT EVERY SITUATION ON THE BASIS OF OUR WILL POWER WITH COURAGE AND CONFIDENCE. THE AUTHOR VERY CLEARLY OUTLINES THE PATH TOWARDS CONFIDENCE. HE SHOWS US THE WAY TO CONFIDENCE AND DETERMINATION.
आजच्या युगात, पालकत्व खूप कठीण, गुंतागुंतींचे झालेले आहे. मुलांना कसे वाढवायचे, त्यांचे संगोपन कसे करायचे, ह्याबद्दल सल्ला देणाNयांचा तोटा नाही. पण ह्याबाबतीत पालक मात्र सहसा, आजच्यापेक्षा कदाचित खूपच वेगळ्या सामाजिक परिस्थितीत जन्माला आलेले पायंडे व नियम पाळत असतात. आपण कोणत्या प्रकारचे पालक आहोत आणि आपल्याला कोणत्या प्रकारचे पालक व्हायला आवडेल, हे ढोबळमानाने ठरवण्यामध्ये हे पुस्तक पालकांना मदत करते. हे काम सोपे नाही. कोणताही पालक जाणीवपूर्वक वाईट आणि निष्काळजी असत नाही. पण तरीही, मुलांची कामगिरी चांगली झाली नाही, तो किंवा ती बंडखोरपणे वागत असेल, तर दु:ख होतेच. आपले कुठे आणि काय चुकले असेल बरे? अनंत पै यांचा, गेल्या २५ वर्षांपासून टीनएज (वय वर्षे १३ ते १९) मधील तसेच एकंदरीतच लहान मुलांशी खूप जवळून संबंध आलेला आहे. तरुण मुलामुलींनी त्यांच्याजवळ विश्वासाने आपली मने मोकळी केलेली आहेत, तसेच आपल्या समस्यांच्या संदर्भात त्यांच्याशी मोकळेपणाने चर्चा केलेली आहे. या मुलामुलींशी संवाद साधण्यांतून तसेच ते पालकांसाठी घेत असलेल्या सत्रांमधून त्यांना जे काही ज्ञान मिळाले, ते ज्ञान या पुस्तकाद्वारे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. त्यांनीच म्हटल्याप्रमाणे, `या पुस्तकांत दिलेल्या सूचना तुम्ही आचरणांत आणल्या, तर तुमची मुलं आक्रमक होण्याची वा अंमली िंकवा मादक पदार्थांच्या सेवनाकडे वळण्याची शक्यता जवळजवळ नाहीच.`
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#SELFHELP #ANANTPAI #SUCESS #मार्गदर्शनपर #अनुवाद #अनंतपै #यश #व्यक्तिमत्वविकसन #MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS
Customer Reviews
  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 11-07-2004

    सुजाण पालकत्वाचा संदेश... उमलत्या पिढीला योग्य वळण लावणं हे पालकांपुढे मोठे आव्हानच असते. दुर्दैवाने त्याचे शिक्षण शाळा-कॉलेजात वा अन्यत्र क्वचितच मिळते. ‘पालकपण’ अनेकांकडे नैसर्गिकपणे चालत येते. पण ही भूमिका चांगल्या पद्धतीने निभावून नेण्यासाठी पाकांना स्वत:च्या वागण्यात अनेक प्रकारचे बदल करावे लागतात. अनंत पै यांचं How to help your child succeed हे अतिशय उपयुक्त पुस्तक आहे. प्रत्येक पालकानं वाचावं असंच हे पुस्तक आहे. या इंग्रजी पुस्तकाचा वाचनीय अनुवाद केला आहे, प्रशांत तळणीकर यांनी. अनुवादित पुस्तकांबाबत मेहता पब्लिशिंग हाऊसने सातत्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. हे पुस्तक त्यांनीच प्रकाशित केले आहे. हे छोटेखानी पुस्तक नऊ वेगवेगळ्या शीर्षकांनी विभागलं आहे. पालक म्हणून तुमची काय प्रतिमा आहे? या शीर्षकाने पुस्तक चालू होते. हा पहिला विभाग, विशेष करून त्यात वापरलेली शीर्षके क्लिष्ट वाटतात. तरीपण चिकाटीने ते सर्व वाचा. कारण पुढे त्या शब्दांचा वापर पुस्तकभर केलेला आहे. आत्मसन्मान व आत्मविश्वास या कल्पना पुस्तकात विस्तृतपणे मांडल्या आहेत. त्यांची वाढ कशी करायची याचे स्पष्ट विवेचन केले आहे. अनेक पालकांना मुलांना मोकळीक देणे, स्वातंत्र्य देणे गैर वाटते. तसे केल्यास मुले बिघडतील भीती वाटते. प्रत्यक्षात मुलांना स्वातंत्र्य देणे हे त्यांच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक असते. हा मुद्दा लेखकानं उत्तमरीतीने हाताळला आहे. मुलं अनुकरणप्रिय असतात हे सर्वमान्यच आहे. त्यामुळे पालकांनी स्वत:च्या वागण्यातून त्यांच्यापुढे आदर्श ठेवला पाहिजे. नुसते उपदेशाचे डोस पाजून काही साध्य होणार नाही. मुलांचे म्हणणे सक्रियतेने ऐकणं याबद्दलही अतिशय उपयुक्त विवेचन पुस्तकात आहे. तुमच्या एखाद्या मित्राशी तुम्ही जेवढे आदराने, समजुतीने वागता तसे मुलांशीही वागणे अपेक्षित आहे. पुस्तकातला अखेरचा भाग आहे ‘इच्छाशक्तीवर.’ हा विभाग जणू या पुस्तकाचा मानबिंदू आहे. अतिशय सोप्या भाषेत लिहिलेला सुंदर उदाहरणांनी नटलेला हा विभाग आहे. इच्छाशक्ती कशी जोपासायची, कशी वाढवायची याबद्दल मुद्देसूद विवेचन आहे. इच्छाशक्तीच्या अभावी आपण आपली दिवसाची कामेसुद्ध नीट करू शकणार नाही. आरोग्य नीट राखू शकणार नाही. संपूर्ण पुस्तकभर समर्पक, विनोदी शैलीतील चित्रं आहेत, ती बघणं, हे निश्चितच आनंददायी आहे. तसेच लेखकाने स्वत: आयोजित केलेल्या अनेक स्पर्धांनी मुलांनी कसा प्रतिसाद दिला त्याची उदाहरणे पुस्तकात ठायी ठायी लिहिली आहेत. त्यामुळे ‘पालकांना त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यानुसार स्वत:च्या वागण्यात फेरफार करणं हेच या पुस्तकाचं मूळ उद्दिष्ट आहे. तरुण पिढी सक्षम व समतोल बनवायची असेल तर त्यांचे पालकही सक्षम हवेत. सुजाण पालकत्वाचा संदेश देणारं अतिशय उपयुक्त व्यवहार्य पुस्तक असं या पुस्तकाचं वर्णन केल्यास ती अतिशयोक्ती ठरू नये. ...Read more

  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 02-08-2004

    आजच्या युगात पालकत्व खूप कठीण, गुंतागुंतीचे झालेले आहे. मुलांना कसे वाढवायचे, त्यांचे संगोपन कसे करायचे, याबाबत पालक आजच्यापेक्षा कदाचित खूपच वेगळ्या सामाजिक परिस्थितीत जन्माला आलेले पायंडे व नियम पाळत असतात. आपण कोणत्या प्रकारचे पालक आहोत आणि आपल्याा कोणत्या प्रकारचे पालक व्हायला आवडेल, हे ढोबळमानाने ठरवण्यामध्ये हे पुस्तक पालकांना मदत करते. त्याचबरोबर यातील सूचनांचे व्यवस्थित पालन केल्यास मुलं आक्रमक होण्याची किंवा अमली, मादक पदार्थ सेवनाकडे वळण्याची शक्यता जवळजवळ नाहीच. ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 24-10-2004

    यशस्वी पालकत्वाचा मंत्र... आपले मूल जीवनाच्या सर्व अंगांनी यशस्वी व्हावे, ही प्रत्येक पालकाचीच इच्छा असते; परंतु त्यासाठी स्वत:च्या आचार-विचारांमध्ये काय बदल करायचा, याबद्दल पालक स्वत: फारच गोंधळलेले असतात. तो गोंधळ दूर करण्यासाठी मदत म्हणून ‘आपल्यामुलांच्या यशस्वितेचा कानमंत्र’ अनंत पै यांनी दिला आहे. हल्लीच्या वाढत्या वयातील मुलांना स्वत:चा आत्मसन्मान मोठ्या प्रमाणात असतो. जो जपून, जोपासून, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास कसा निर्माण करावा, स्वायतत्ता देताना स्वातंत्र्यही कसे अबाधित राखावे, पालक-मुलांनी योग्य संपर्कातून समन्वय कसा साधावा, चांगले ऐकणे हा यशस्वी पालकत्वाचा मूलभूत गुण कसा, याची उदबोधक माहिती उदाहरणांसह दिलेली आहे. मूळ पुस्तकाशी साधर्म्य साधण्याच्या प्रयत्नांत अनुवादित पुस्तकाची भाषा काहीशी बोजड झाली आहे. पण तरीही पुस्तक प्रत्येक पालकाने वाचावे असेच आहे. -केदार टाकळकर ...Read more

  • Rating StarMAHARASHTRA TIMES 25-7-2004

    पालकांना घडविणारे पुस्तक... मुलांना लैंगिक शिक्षण देण्याची चर्चा करणाऱ्या या काळात पालकांना पालक म्हणून घडविण्यासाठी कोणता अभ्यासक्रम असावा, याबाबत मात्र उदासिनता दिसते. अशा परिस्थितीत पालक म्हणून आपला विकास कसा करावा, याचे शिक्षण देणारे पुस्तक, किशरांसाठी २५ वर्षे विविध उपक्रम राबविणाऱ्या अंकल पै यांनी लिहिले आहे. बालकावर संस्कार करताना पालक नेमका कुठे चुकतो, त्याने सुधारण्यासाठी काय करावे, हे त्यात पै यांनी समजूतदार शैलीत सांगितले आहे. वेळोवेळी उदाहरणे आणि दाखले दिल्याने लेखन उत्कंठावर्धक आणि ओघवते झाले आहे. मेहता पब्लिशिंगने मूळ इंग्रजी पुस्तकाचा आणलेला हा मराठी अनुवाद आहे. अनुवादकाने अनेक ठिकाणी शब्दश: भाषांतर केल्यामुळे मराठीत इंग्रजी वाक्यबंध प्रत्ययाला येतो. तो खटकला तरी अनंत पै यांच्या अनुभवातील व्यक्ती आणि प्रसंगांनी लेखनात आलेल्या सच्चेपणामुळे पुस्तक पटकन वाचून होते. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

BHARTIYA GANIKA
BHARTIYA GANIKA by DR.S.R. DESHPANDE Rating Star
डॉ. शुचिता नांदापूरकर-फडके

मंडळी, कालच्या ऱ्हासचक्रानंतर मी विचार करत होते की आज काय? पुस्तकं तर काही वाचून ठेवली होती (म्हणजे वाचली आणि ठेवून दिली बाजूला... अक्षरशः). आत्ताची समोर आहेत ती. कदाचित त्यातलं एखादं उद्या घेईन. मध्ये अचानक या पुस्तकाची जाहिरात वाचली, अगदी गेल्या ठवड्यातली गोष्ट. उत्सुकता चाळवली. समूहात काहीतरी आगळं वेगळं पुस्तक घ्यावं हा विचार सतत मनात असतोच. तसं पुस्तक घरी येताच (जय amazon) चाळायला म्हणून बसले, आणि काय सांगू, हातात मार्कर कधी आलं, मी खुणा कधी केल्या, पुस्तक कधी संपलं... कळलंच नाही. एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगते... प्रेयर पुस्तकाला तुम्ही जो भरघोस प्रतिसाद दिलात, अनेकांनी ते विकत घेण्याचा विचार केला तेव्हाच सांगायचं होतं, पण राहिलं. ओळख करून दिलेलं पुस्तक पूर्णपणे वाचनीय असतं असं नाही. त्याचा बरचसं भाग बोजड असतो. पण ते नाही का, डेटिंगच्या काळात मुलगा मुलगी स्वतःमधलं केवळ उत्तम ते दाखवतात, तसं मला प्रेयर बद्दल वाटलं. आय मीन प्रेयर पुस्तकाबद्दल वाटलं आणि गणिका या पुस्तकाबद्दल मला नेमकं तेच वाटत आहे. ========== ‘भारतीय कामशिल्प’ या पुस्तकाचं लेखन करत असताना प्राचीन भारताच्या समाजजीवनाची माहिती देणारे अनेक संदर्भग्रंथ वाचण्यात येऊन लेखकांची उत्सुकता चाळवली गेली आणि जेव्हा या विषयावर मराठीत एकही परिपूर्ण संदर्भग्रंथ नाही हे लक्षात आलं, तेव्हा त्यांनी स्वतःच या पुस्तकाचं लेखन मनावर घेतलं. केवळ सनसनाटी विषय सवंगपणे हाताळला आहे असं कुठेही वाटत नाही. अतिशय अभ्यासपूर्वक लेखन आहे. सोबत जोडलेली संदर्भग्रंथांची यादी (एकूण संख्या ६४) पुरेशी आहे. गणिका आणि उर्वरित श्रेणी या शरीरविक्रय करतात, हा वैश्विक व्यवसाय आहे. कैक काळापासून या व्यवसायाला मान्यता मिळाली आहे आणि त्याची आवश्यकता वाटली आहे. प्राचीन काळात भारतीय गणिका यांना एक संस्कृती आणि दर्जा होता. नीतीनियम होते, ते पाळावे लागत होते. पुस्तकाची प्रकरणं – प्रास्ताविक, विदेशी गणिका, भारतीय साहित्यातील गणिका, गणिकेची प्रशिक्षण व वर्णन, गानिकांची वेशभूषा, सौंदर्यप्रसाधने, विट, गणिकामाता, प्रियकराचा राग-रंग, कथांविषयी थोडेसे आणि कथा (या शेवटच्या प्रकरणात एकूण १३ कथा आहेत – अगदी सुरस आणि चमत्कारिक वाटाव्यात अशा, त्यांचा परिचय मी देणार....... नाही.) प्रास्ताविक – (नऊ पानांचं प्रकरण) कुटुंब किंवा विवाहसंस्था कधी आकाराला आले हे नक्की सांगता येत नसलं तरी स्त्री-पुरुष शरीरसंबंध हे आदिम असून ते पशु – पक्ष्यांप्रमाणेच जनन हेतुस्तव नैसर्गिक होते आणि राहतील. फलन हे स्त्रीदेहामध्ये होतं या जाणीवेतून तिला आदरस्थान प्राप्त झालं. सर्जनाची गूढ शक्ती धारण करणारी ती आदिमाया/माता/ अद्याशक्ती होय. जवळपास प्रत्येक धर्मात प्रजा, पशु आणि धान्य समृद्धीसाठी सुफलता विधी आहेत. भारतीय हिंदू धर्म शास्त्रीय ग्रंथांतून स्त्री पवित्र्याच्या कथा वाचायला मिळतात. पतीला परमेश्वर मानलं जाई. त्याही काळात गणिका हा व्यवसाय होता आणि त्याकडे सहिष्णू वृत्तीने पाहिलं जाई.राजे महाराजे त्यांचे पोशिंदे असतं. शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रिया तिरस्काराला पात्र असत, पण गणिका नाही. त्यांना नगर भूषण, नगर अलंकार, नाग्त रत्न मानलं जाई. प्रसंगी, राजे त्यांचा सल्ला घेत. त्या बहुश्रुत असतं चौसष्ट कलांत पारंगत असतं. संभाषणचतुर, हुशार, समंजस, उदार, योग्य आदर राखणाऱ्या, विनयशील आणि अनुपम सौंदर्यवती असत. एखाद्या गणिकेमुळे त्या राज्याची कीर्ती वाढत असे. धार्मिक समारंभ, सामाजिक कार्यक्रम (विविध झुंजी, शर्यती), करमणुकीचे कार्यक्रम (जलक्रीडा, वनविहार), रंगमंचावर अभिनय, अशा नानाविध ठिकाणी त्यांची ठळक उपस्थिती असे. रथारूढ अथवा सिंहासनाधिष्ठ राजाला वारा घालणे, चवरी ढाळणे, छत्र धरणे अशी कामं त्या करत. त्यांच्याशी संबंध ठेवणं समाजमान्य होतं. प्रतिष्ठितांचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन व्यापक, अगत्यशील आणि स्नेहिल होता. मात्र, त्यांना कडक आणि कठोर नियम पालन करावे लागे.विजयनगर साम्राज्याच्या अस्तानंतर ते पेशवाई संपेपर्यंतच्या काळात, मोगल राजवट येऊन गेली, ब्रिटीश वसवतवादाचा प्रसार सुरू झाला, समाज व्यवस्था बदलली, गणिका संस्कृतीला ओहोटी लागली. ब्रिटीशांचा अंमल सुरू झाल्यावर गणिका संस्था नष्ट होऊन वेश्या व्यवसाय वाढीला लागला. यामागे औद्योगिक क्रांती हे एक कारण आहे. वेश्यागमन निंद्य कृत्य मानलं जाऊ लागलं. तरुण अधिकाधिक सुशिक्षित होऊ लागला तसा शरीरसंबंधांपायी स्वास्थ्य गमवावं लागलं तर काय, हा विचार थोडाफार मूळ धरू लागला. आणि या शौकाची आसक्ती कमी झाली. चरितार्थाकरता पैसे मिळवण्यासाठी वेश्याव्यवसाय हादेखील विश्वसनीय आर्थिक व्यवसाय मानण्यात यावा असा निकाल १९११मध्ये युरोपियन न्यायालयाने दिला. विदेशी गणिका – (२७) बहुतेक सर्व प्राचीन संस्कृतीत गणिकांचे पुरावे मिळतात. इजिप्त, बबिलोन, सिरीया, फिनिशिया, ही काही उदाहरणं. ग्रीस, इटली, भारत इथे त्यांना विशिष्ट दर्जा प्राप्त झाला. त्यांचेही प्रकार होते, सामान्य वेश्या अलेत्रय्डी, आणि सर्वोच्च म्हणजे हेटीअरा (या शब्दाचा अर्थ सोबती). काही हेटीअरा वादविवादपटू होत्या. क्लेप्सीड्रा हिच्या वक्तशीरपणामुळे तिला ते नाव मिळालं होतं त्याचा अर्थ जलघटिकापात्र असा होतो. थीओफ्रत्स याने इ.पू. ३७२ – २८७ या काळात ‘ऑन मरेज’ हा ग्रंथ लिहिला, याचा सविस्तर अभ्यास करून लिओंटीयम या हेटीअराने त्यावर प्रगल्भ टीका लिहिली. रोमन समाजात कोर्टीझन अस्तित्वात होत्या. पॉम्पेई इथे व्हिकोली बाल्कोन पन्सिली नावाच्या इमारतीत शेकडो रमणी वास करत. या संदर्भातली रतिक्रिडेची मूळ चित्रं पॉम्पेईन wall paintings म्हणून प्रसिद्ध असून ती इटलीच्या वस्तुसंग्रहालयात सुरक्षित आहेत. रोमन साम्राज्यात हेटीअरा ऐवजी कोर्टीझन शब्द रूढ झाला. युरोपात पंधरा-अठरा शतकांत कोर्टीझन आणि कलावंतीण यांना समाजात विशिष्ट स्थान आणि आदर मिळत होता. फ्रान्समध्ये सतराव्या शतकात रमणींची सत्कारगृहं (सलो) प्रसिद्ध होती. जपानमध्ये गै (कलात्मक क्षमता) आणि शा (व्यक्ती) यावरून गैशा ही संज्ञा रूढ झाली. त्यांच्यात अलंकारिक सुरावट, सौजन्य, निष्कपट, सुसंस्कृतपण असे. बाराव्या शतकापासून कार्यरत असलेली ही प्रथा इडो काळात (इ.स.१६००-१८६८) अधिक वाढीला लागली. ओकिया ही त्यांची निवासस्थानं होत. विसाव्या शतकात त्यांचं वर्चस्व राजकीय क्षेत्रात वाढीला लागलं. १९२०-३० मध्ये त्यांची संख्या साधारण ८० हजार होती, ती १९७०-८० दम्यान १७ हजार इतकीच उरली आहे. चीनमध्ये पूर्वी पीकिंग (बीजिंग) इथे सिंगसॉंग हाउस हा भाग राखीव होता. शांघाय इथे अत्यंत विलासी वारांगना गृहं आहेत. सिंगापूरमध्येगिटार गर्ल्स (पीपाचाई) या नावाने त्या ओळखल्या जातात. पाकिस्तानात त्या तवायफ, कान्जारी आणि गश्ती नावाने ओळखल्या जातात. आज मात्र सर्वत्र आमुलाग्र बदल झाला आहे. भारतीय साहित्यातील गणिका – (३२) संस्कृत, प्राकृत, पाळी भाषांत, हिंदू, बौद्ध, जैन वान्ग्मयात, त्यांचा उल्लेख आढळतो. त्या वैदिक काळात भारतात होत्या हे काही ऋचांवरून समजतं. (ऋचा १.१६७.४ – अनेक पुरुषांशी सांग करणारी ती साधारणी). पंचचुडा अप्सरेपासून त्यांची उत्पत्ती झाली असं मानतात. महाभारत काळात त्यांना प्रतिष्ठा प्राप्त झाली. (राज, नागरी, गुप्त, देव आणि ब्रह्म असे पाच प्रकार होते). रामायणात फार स्थान नव्हतं. अमरकोश, महाभाष्य, वार्त्तिके, दशरूपक, कौटिलीय अर्थशास्त्र जातक कथा, पंचतंत्र, वेताळकथा, शुकबहात्तरी, गाथासप्तशती, अशा विविध ग्रंथांत त्यांचा उल्लेख आहे. कामसूत्र या ग्रंथात वात्सायनाने ‘वैशिक’ या प्रकरणात त्यांची माहिती दिली आहे. कथासरीत्सागर, राजतरंगिणी, शृंगारतिलक, सरस्वतीकंठभरणा, कलाविलास, मेघदूत, मृच्छकटिक, रत्नावली, नागानंदा, अशा नाटकांतून त्यांचा उल्लेख येतो. भारतात इ.पू. पहिल्या सहस्रकात ती प्रथा अस्तित्वात येऊन ब्रिटीशांच्या आगमनानंतर एकोणिसाव्या शतकात लोप पावली असावी असं समजलं जातं. गणिकेची प्रशिक्षण व वर्णन – (१६) गणिकेला बालपण जवळपास नव्हतच. वयाच्या सहा-सात वर्षापासून तिला घडवायला सुरुवात होत असे. त्यांच्या प्रशिक्षणात आचार, विचार, शिष्टाचार, विविध कला, खेळ, भाषा, वर्तन, सौंदर्यवर्धन, गायन, वादन, नृत्य, अलंकरण, शरीर सौष्ठव, बुद्धिवर्धन अशा प्रत्येक अंगाचा व्यापक विचार होता. काही हस्तकला शिकाव्या लागत. पाककला, सुगंधी द्रव्य निर्मिती, कामशास्त्र, प्रणायाराधन, हिकाव्म लागे. स्वसंरक्षण शिकावं लागे. गणिकांची वेशभूषा, सौंदर्यप्रसाधने – (५) आधीच्या प्रशिक्षणात हाही एक महत्त्वाचा भाग होता. विट – (७) हा शब्द मी पहिल्यांदाच ऐकला. त्याचा इथे दिलेला अर्थ – शृंगाररस नायकानुचराप्रमाणे संपत्तीचा भोग न घेणारा किंवा जो आपल्या पैशाचा वापर कधी करत नाही, असं नाटकातलं लबाड, धूर्त पात्र. गणिका संस्थेत त्याच्या जोडीने वयस्य, अनुचर, धूर्त आणि डिंडिक ही पुरुष पात्र वावरतात. प्रतिवेशिनी ही गणिकेची शेजारीण. ती विश्वासातली. ती गणिकेसाठी विट आणि प्रियकर यांच्याशी संवाद साधते. गणिकामाता – (७) हे पात्र फार महत्त्वाच. तिला संरक्षित स्त्री, कुट्टनी किंवा कुट्टीनी म्हटलं जाई. तिचं काम शिस्त राखणे, थोडक्यात रेक्टर. कामकुजानांना आळा घालणं, गणिकांना खऱ्या प्रेमापासून वंचित ठेवणं. कामुकांचं मानसशास्त्र तिला मुखोद्गत. पुरुषांच्या गुणदोषाच्या’ आधारे अचूक आडाखे बांधत ती गणिकेला सल्ला देता. तिचा दबदबा असतो. ते नसती तर गणिका ही संस्था कधीच नामशेष झाली असती. कारण स्त्रिया या स्त्रिया असल्याने स्त्रीसुलभ भावनेनुसार गणिकागिरीत न रमता त्या केव्हाच संसाराला लागल्या असत्या. प्रियकराचा राग-रंग – (९) रग हे बारा छटांमधली काम आसक्ती असं म्हणता येईल. पुरुषाची मनोवृत्ती, प्रवृत्ती, स्वभाव, गुणविशेष आणि खास करून राग-लोभ जाणून घेत गणिकेला त्याच्याशी वर्तन करावे लागते. कथांविषयी थोडेसे आणि कथा (४८) – ‘शृंगारमंजरीकथा’ हा राजा भोज रचित संस्कृत ग्रंथ असून त्यात स्त्री-पुरुष मनोवृत्ती दर्शन घडवणाऱ्या तेरा कथा आहेत. त्यापैकी काही जीर्ण, काही अपूर्ण आहेत. पैकी एक कथा वाचून दाखवते. संदर्भग्रंथ (४) सोबत फोटो दिले आहेत त्या पानांचे. या पुस्तकात आढळलेले सुंदर शब्द – गरती, लीलासहचारी, पृथुल (अर्थ कळला नाही अजून), रूपाजीवा, सूरसुंदरी परिचय फार लांबला. या विषयावरच्या इतक्या अभ्यासानंतर एखादा पेपर सहज देता येईल. परत अभिमानाने म्हणता येईल, ‘मा, मै फर्स्ट क्लास फर्स्ट आया!’ मनापासून धन्यवाद. माझी परिचय पाळी नसती तर मी हे पुस्तक वाचलंच नसतं. मजा आली मला वाचताना. तशी तुम्हालाही आली असेल अशी खात्री आहे. थांबते. ...Read more

RESHIMREGHA
RESHIMREGHA by SHANTA J SHELAKE Rating Star
मीना कश्यप शाह

शांता शेळके या कवयित्री म्हणून आपल्या सर्वांच्या माहितीच्या आहेतच. गीतकार म्हणूनही त्यांचे मोठे नाव झाले. रेशीमरेघा हे त्यांनी रचलेल्या गीतांचे पुस्तक. मुख्यतः त्यांनी चित्रपट आणि नाटक यासाठी गीते लिहिली आहेत. प्रस्तावनेत शांताबाई म्हणतात, गीते लििणे त्यांना अतिशय आकर्षक वाटत गेले आणि म्हणून केवळ चित्रपट आणि नाटकांसाठीच नाही, तर स्वानंदासाठीही, त्या गीतं लिहित राहिल्या. चालीवर गीते लिहिणे त्यांना आव्हानात्मक वाटायचे, बंधनकारक नाही. पुढे बंगाली, गुजराती अशा काही गीतांच्या चाली आवडल्या, तर त्या, त्या चालींवरही छंद म्हणून गीते लिहू लागल्या. त्यांच्या गीतांमध्ये लावण्या, गवळणी, नृत्यगीते आणि युगुलगीते (त्यांनी द्वंद्वगीते हा शब्द वापरला आहे, जो मला आवडत नाही) जास्त आहेत. ह्या पुस्तकात त्यांचे संकलन आढळून येतं. पुस्तकातील काही गीतांपेक्षा मला त्यांची प्रस्तावनाच जास्त आवडली. आपल्या गीतांबद्दल त्यांनी हळुवार होत लिहिलं आहे. प्रत्येक गाणं ध्वनिमुद्रीत होतानाचे क्षण त्यांना आठवतात. आणि ही गीतं प्रसिद्ध होण्यासाठी संगीतकार, गायक यांचा हातभार नक्कीच आहे याची त्या आठवण काढतात. गीतांचा अर्थ रसिकांपर्यंत पूर्णपणे पोहोचवण्यासाठी गायक-गायिकांचा खूपच मोठा वाटा आहे, त्यांच्याबद्दल त्या अपार कृतज्ञता व्यक्त करतात. हे पुस्तक त्यांनी लावणेसम्राज्ञी यमुनाबाईंना अर्पित केलेले आहे. त्यान्नी लिहिलेल्या "रेशमाच्या रेघांनी" या सर्वात जास्त प्रसिद्ध पावलेल्या लावणीच्या नावावर ह्या पुस्तकाचे नाव आधारित आहे. अनेक प्रसिद्ध गाणी या गीत संग्रहात आढळतात. रेशमाच्या रेघांनी, काय बाई सांगू, मनाच्या धुंदीत लहरीत, हे श्यामसुंदर, राजसा, शालू हिरवा पाच नि मरवा, चाल तुरू तुरू, मनाच्या धुंदीत लहरीत येना आणि अशी अनेक. शांताबाईंचं काव्य सामर्थ्य ह्या लावण्या/गीतांमध्ये देखील दिसून येतं... कळ्या आजच्या, शिळ्या उद्याला, ओठांशी न्याल का, आल्यावर जवळ मला घ्याल का.... अशी अनेक उदाहरणं! पुस्तकातील बहुतेक गाणी ही लावण्यांच्या स्वरूपातली आहेत. त्यामुळे त्याच त्याच भावना सारख्या सारख्या आढळून येतात. बोलावणे किंवा नको जाऊ म्हणणे, भेटी (गिफ्ट्स) घेणे, वाट पाहणे, विरह, सौंदर्याचे वर्णन, शृंगाराचे वर्णन, म्हणजे तुम्हाला काय मिळू शकेल याची कल्पना गीतातून देणे (उदा. कंबरपट्टा रेखून दावी, देहाचा आकार!!) अशा प्रकारचे विषय पुन्हा पुन्हा येत राहतात, पण (शांताबाई बीइंग शांताबाई) कुठेच तोचतोचपणा कंटाळवाणा होत नाही (वाचकाने जरा रोमँटिकपणा दाखवून वाचली ही गीतं तर फारच बहार!) शांताबाई नथ फारच आवडते असं दिसतं... नथ सर्जाची नाकी घालता हसेल डावा गाल किंवा सलगी करते नथ ओठांशी, तो तुमचा अधिकार अशा प्रकारे ती खुलून देखील दिसते ह्या गीतांमधे!! अनेकविध लावण्या आहेत ह्या पुस्तकात. पाडव्याची, रंगपंचमीची, श्रावणाची, अशा विविध दिवसांच्या लावण्या तर हिरव्या रंगाची लावणी देखील आहे. पाडव्याची लावणी म्हणजे पाडव्याला शालू मागते आहे, कारण ती रात्री एकांतात उभारणार आहे. 🙂 "मी सुंदर आहे तर आता मी काय करू?" अशी तक्रारही दिसून येते. "माझ्या नखऱ्याच्या शंभर तऱ्हा" सांगणारीला स्वतःच्या सौंदर्याची पुरेपूर जाणीव आहे आणि त्यापेक्षाही, फक्त शारीरिक सौंदर्यावर विसंबून न राहता, त्याबरोबर तोरा दाखवत भुरळ पाडणे ह्यात ती माहीर आहे. पण त्याचबरोबर ती धोक्याची सूचना पण देते आहे... घटकाभर संग बसून घालवा वेळ, जमल्यास मनांचा जमून येईल मेळ, नाहीतर यायचा अंगाशी हा खेळ, पाय टाकण्याआधी इथे, विचार पुरता करा, माझ्या नखऱ्याच्या शंभर तऱ्हा!! एका लावणीत एका पुरुषाने फसवलंय अशा स्त्रीचे रूप आहे. जत्रेत एक जण भेटला आणि त्याने आपल्याशी फ्लर्ट केलं, जत्रा उलगडल्यावर दुसऱ्या दिवशी मात्र तो डोळ्याला डोळा भिडवत नाही, तोंड चुकवून पुढे जातो, ह्याची तक्रार ह्या लावणीत येते. किती विविधता! अशा लावणी कलाकाराच्या आयुष्याचं विदारक दृश्य देखील शांताबाईंनी दाखवले आहे. तिथे येणारा आज एक, तर उद्या दुसराही असू शकेल किंवा तिथे असणारी आज एक, तर उद्या दुसरीही असू शकेल. हे सांगून त्या म्हणतात... प्रीतीचे नीतीचे व्यर्थ सांगणे, भुकेल्या देहाचे सारे मागणे, जन्माच्या नात्याचे फुका बहाणे, कुणाला सतत इथे राहणे? इथल्या महाली घडीची वस्ती, सुखाचे हिंदोळे आभाळी चढती, घडीत वरती घडीत खालती ऐन विशीतल्या स्त्रीचं सौंदर्याचं अत्युत्तम वर्णन एका गीतात केलं आहे. अनेक गीतांमध्ये पुरुषांनी स्त्रीच्या देहाचे आणि मनाचे केलेले वर्णन दिसून येते. त्यातही नुसता देहच नाही तर स्त्रीचा तोरा (attitude) देखील पुरुषाला कशी भुरळ पाडतो हे दिसतच. "ही चाल तुरुतुरु" आपल्या सगळ्यांच्या आवडीचे आणि माहितीचे आहे. असंच "मनाच्या धुंदीत लहरीत ये ना" हे देखील. गीतांमध्ये श्रावण, पाऊस, विरह, वाट बघणे हे सर्व हमखास येतं. एक गीत आहे "लहरी सजण कुणी दावा" - मीना खडीकर यांचे संगीत, उषा मंगेशकर यांचा आवाज. हे गीत मला ना वाचायला आवडलं ना ऐकायला आवडलं 🫣 श्रीकृष्ण राधेच्या कथा तर आपण गवळणींमधे अनेक वेळा ऐकल्या आहेत. कृष्णाची धून ऐकल्यानंतर अगदी काहीही न सुचता तशीच्या तशी निघालेली राधा! त्यातही तिच्या शृंगारचं वर्णन येतंच. सजण्याची आवड असलेल्या स्त्रीचे वर्णन अतिशय खुबीने शांताबाईंनी केले आहे. मला स्वतःला नटण्या मुरडण्याची अतिशय हौस असल्यामुळे हे सगळं वर्णन वाचून, "हे पुस्तक आपण आधी का नाही वाचलं" याचं दुःख मात्र झालं. ही उदाहरणं बघा ना... माथ्यावर मोतियाची जाळी, भांगेत मोती सर, चंद्रकोर भाळी, कानात झुमके, केसांमध्ये वेल, नाकात नथ, नथित हिरे, बिल्वदळे, वज्रटिक, `बोलताना पाठीवर जिचे रेशमाचे गोंडे खालीवर होतील अशी` पाच पदरी मोहन माळ!! दंडात वाकी रुताव्या, शिंदेशाही तोडे असावेत आणि पायी सांध्यात सोनसळी, गळ्यात तन्मणी, कमरेला कंबरपट्टा, पायी पैंजण.... "शालू हिरवा, पाच नि मरवा, वेणी तीपेडी घाला" हे गीत तर फारच प्रसिद्ध झाले. शृंगार आणि सौंदर्य यांचे वर्णन या सगळ्या गीतांमध्ये अगदी खुलून आलेलं आहे. आणि प्रेम! त्याविषयी किती लिहावं आणि कशाप्रकारे लिहावं असा मोठाच प्रश्न पडला आहे. तरीही एका स्त्रीच्या मनाने वाचलेल्या ह्या चार ओळी लिहीतेच... काय वाजले प्रिय ते पाऊल, तो तर वारा तिची न चाहूल, भास हो फसवा वरचेवरी, शोधितो राधेला श्रीहरी!! ...Read more