* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: VASTU AJIT
  • Availability : Available
  • ISBN : 9788177668162
  • Edition : 6
  • Publishing Year : JULY 2004
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 228
  • Language : MARATHI
  • Category : ARCHITECTURAL STRUCTURE & DESIGN
  • Sub Category : ARCHITECTURE PROFESSIONAL PRACTICE
  • Available in Combos :VASTUSHASTRA COMBO SET-3 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
WHAT DOES THIS GUIDE CONTAIN? IT HAS INFORMATION RELATED TO ARCHITECT FROM ALL THE HOLY BOOKS OF ALL RELIGIONS; THE FOUR "VEDAS`, THE EIGHTEEN "PURANE`, THE "QURAN`, AND THE "BIBLE`. IT HAS SOLUTION FOR ALL THE PROBLEMS WHILE BUILDING AN INFRASTRUCTURE. THIS BOOK HAS THE DIMENSIONS OF MODERN ASTROLOGY, WITH ALL ITS FIVE MAIN ASPECTS LIKE, DAY, DATE, NAKSHATRA, KARAN AND YOG. THIS BOOK IS VERY USEFUL WHILE BUILDING INDEPENDENT BUNGALOWS, PROJECTS, SCHEMES, ROW HOUSES, APARTMENTS, ETC. AND HAS MANY COLOURED PHOTOGRAPHS. THIS BOOK IS FULL OF PERSPECTIVE DRAWINGS. IT GIVES A FULL PICTURE OF THE PROBLEMS AND SOLUTIONS REGARDING THE CITY SURVEYS BY THE MUNICIPALITY, ESTIMATE, BAR CHART TO R.C.C., STRUCTURAL DESIGN, ETC. WHICH WILL FURTHER ENABLE A PERSON TO BUILD AN INFRASTRUCTURE WITHIN RECORD BREAK PERIOD OF TIME; BE IT A BUILDING OR ROW HOUSE, INDEPENDENT BUNGALOW, APARTMENTS OR ANY OTHER CONSTRUCTION. IT ALSO GIVES ELABORATE INFORMATION ABOUT THE DESIGNS OF INDUSTRIES, SHOPS, BASEMENT, ETC. ANY COMMON MAN WHO WANTS TO BUILD A HOUSE ON HIS PLOT WITH ALL THE GOOD AND NOT SO GOOD POINTS OF THE PLOTS CAN DO SO WITH THE GUIDELINES PROVIDED IN THIS BOOK. FARMERS CAN EARN MORE IN FARMING. SEPARATE CHAPTERS DEAL WITH KITCHEN, TOILETS, BATHROOMS, BEDROOMS, LIVING ROOMS, ETC, HIGHLIGHTING ON ITS ANGLES AND DIRECTIONS. THIS BOOK CASTS LIGHT ON THE AUSPICIOUS AND RELIGIOUS MENTALITIES AT THE SAME TIME, IT BRINGS THE VARIOUS DEVELOPMENTAL STAGES IN THE ASTROLOGY, ARCHITECTURE AND SCIENCE TECHNOLOGY TO OUR NOTICE. IT GIVES US PICTURES OF THE GOLD PLATED "YANTRA`, GEMS, AND OTHER IMPORTANT THINGS. EACH AND EVERY CHAPTER INCLUDED HERE HAS BEEN CHECKED BY THE EXPERTS. EVERYONE OF YOU, BE IT A FARMER, INDUSTRIALIST, SHOP OWNER, TENANT OR THE OWNER OF THE HOUSE, SHOULD STUDY THE BOOK, ACCORDINGLY MAKE CHANGES IN THE INFRASTRUCTURE AND THEN ENJOY A LIFE FULL OF RICHES, SUCCESS, PEACE OF MIND, GOOD HEALTH AND GOOD WISHES TOO. WE WISH THAT THE ALMIGHTY GIVE HEALTH AND WEALTH TO ALL ONCE AGAIN MAKING OUR MOTHERLAND "SUJALAM, SUFALAM`.
चार वेद, अठरा पुराणे, कुराण, बायबल इ. ग्रंथांचा वास्तुशास्त्रीय अर्क या ग्रंथात आहे. आधुनिक वास्तु बांधताना येणा-या समस्यांचे निराकरण, समाधान या ग्रंथात आहे. ज्योतिषशास्त्रानुसार तिथी, वार, नक्षत्र, करण, योग या पंचअंगांचा, आयाचा तौलनिक अभ्यास करून या ग्रंथानुसार सर्व सोयींनी युक्त आदर्श वास्तु निर्माण करता येतात. स्वतंत्र बंगले, संपूर्ण प्रोजेक्ट स्कीम, रो हाऊसेस, अपार्टमेंटस् यांच्या सचित्र रंगीत परस्पेक्टीव्ह ड्रॉर्इंग्जनी युक्त हा ग्रंथ आहे. महानगरपालिका मंजूर नकाशा प्लॅन, एस्टीमेट, बारचार्ट ते आर.सी.सी. स्ट्रक्चरल ड्रॉर्इंग्ज इ.चा अंतर्भाव असलेल्या या ग्रंथानुसार कमीत कमी पैशात, कमीत कमी वेळेत वास्तु, स्वतंत्र बंगले, अपार्टमेंटस्, रो हाऊसेस बांधता येतात. औद्योगिक कारखाने, दुकानगाळे, बेसमेंट कशी असावीत? याची शास्त्रीय, सचित्र, परिपूर्ण माहिती या ग्रंथात आहे. सर्वसामान्य व्यक्तीला कोणत्याही विदिशा, कट, वाढलेले कोपरे असलेल्या प्लॉटवर आपल्या ऐपतीनुसार, बजेटनुसार वैदिक व आधुनिक वास्तु बांधण्याचा आनंद मिळविता येतो. शेतक-यांना योग्य प्रकारे शेती करून अधिकाधिक उत्पन्न मिळविता येते. पाकगृह, शौचालय, स्नानगृह, निद्रागृह, बैठकगृह अशासारख्या उपयुक्त वास्तु प्रकरणात वास्तुविभागांचे व तेथील कर्माचे सूक्ष्म बारकावे, त्याची शास्त्रीय मिमांसा, साधक बाधक तत्त्वे यांची सविस्तर व नाविन्यपूर्ण सचित्र माहिती मिळते. हा ग्रंथ धार्मिक विधीविधान, वेदोपनिषदे, ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र व सायन्स टेक्नॉलॉजी तसेच बांधकामातील विविध टप्पे या सर्व गोष्टींवर प्रकाश टाकणारा आहे. स्वर्णपॉलिशयुक्त वैदिक वास्तुदोष निवारक यंत्रे, रत्ने, दुर्लभ ज्योतिषीय सामग्रीची रंगीत छायाचित्रेही या ग्रंथात आहेत. ग्रंथातील सर्व प्रकरणे प्रत्येक क्षेत्रातील नामवंत व्यक्तींकडून, तज्ज्ञांकडून तपासून घेतलेली आहेत. शेती, कारखाना, दुकाने, भाड्याचे घर यामध्ये वास्तुशास्त्रानुसार योग्य ते बदल करून कुटुंबाला ऐश्वर्यसंपन्नता, यश, सन्मान, कीर्ती, मानसिक शांती व निरोगी प्रकृती लाभावी. भारत पुन्हा एकदा सुजलाम् सुफलाम् सस्यशामलाम् सामथ्र्यशाली व समृद्ध व्हावा. हीच श्री लक्ष्मी नारायणाच्या चरणी प्रार्थना.
YOUTUBE
No Records Found
No Records Found
Keywords
#ARCHITECTURE #ARCHITECTURALSTRUCTURE& DESIGN #ARCHITECTURE PROFESSIONAL PRACTICE #RESIDENTIAL BUILDINGS, DOMESTIC BUILDINGS #PROFESSIONAL INTERIOR DESIGN #LANDSCAPE ART & ARCHITECTURE
Customer Reviews
  • Rating StarDAINIK AIKYA 15-04-2007

    सुखी-समाधानी वास्तूसाठी... नवीन घर बांधल्यावर किंवा सदनिका घेतल्यावर वास्तुशाती करायची आपली प्राचीन परंपरा आहे. ही वास्तू आपल्याला लाभावी, घरातल्या सर्वांना सुख समाधान मिळावे, घरातील काही दोष असल्यास त्याचे निराकरण व्हावे, यासाठीच वास्तुशांती केली जते. आपल्या प्राचीन भारतीयांनी सुखी-समाधानी वास्तू कशी बांधावी, याचा शास्त्रीय अभ्यास करून वास्तुशास्त्राची ही निर्मिती केली आहे. संस्कृतमध्ये वास्तुशास्त्रावरचे ग्रंथही उपलब्ध आहेत. पण अलीकडच्या काळात सिमेंट काँक्रिटची इमारत बांधताना प्राचीन भारतीय वास्तुशास्त्राचा विचार केला जात नाही. प्लॉट विकत घेतानाही तो कसा असावा, याची नियमावलीच प्राचीन भारतीय वास्तुशास्त्राने सांगून ठेवली आहे. या वास्तुशास्त्राचा अभ्यास करून, त्यातील नियम पाळून वास्तू बांधल्यास ती नक्कीच लाभते, असा अनेकांचा अनुभव आहे. वास्तुशास्त्रज्ञ अजित राजाराम जाधव यांनी अथक परिश्रमाने आणि अभ्यास करून वास्तु अजित हा ग्रंथ सुखी वास्तू कशी असावी, याचे मार्गदर्शन सामान्यांना व्हावे, यासाठीच लिहिला आहे. अभियंता असलेले जाधव पूर्वी प्लॉटच्या खरेदी विक्रीचा व्यवसाय करीत असत. एका प्लॉटच्या खरेदीच्या व्यवहारात त्यांना आलेला अनुभव अत्यंत त्रासदायक आणि उद्वेग आणणारा होता. तो प्लॉट अत्यंत चांगला असतानाही एका तथाकथित शास्त्री पंडिताने त्या प्लॉटला विदिशा नावाचा रोग झाल्याचे सांगून तो प्लॉट संबंधिताला विकायला लावला होता. या प्रसंगाने जाधव यांनी वास्तुशास्त्राचा अभ्यास सुरू केला. प्राचीन भारतीय वास्तुशास्त्राचा पूर्णपणे अभ्यास करतानाच, त्यांनी तथाकथित वास्तुशास्त्र सामान्य जनतेला कसे फसवतात, लुबाडतात याचाही अभ्यास केला. कोणताही प्लॉट त्रिकोणी, चौकोनी किंवा खोलगट असला म्हणजे पूर्णपणे दोषी नसतो. या प्लॉटवर शास्त्रीय उपाययोजना करता येते. ती केल्यावर या प्लॉटमधील दोषांचे निराकरण होते, असे जाधव यांनी सांगून ठेवले आहे. कोणत्याही परिस्थितीत तुम्ही फसू नका, असा सर्वसामान्य जनतेला त्यांनी कळवळून आवाहन केले आहे. त्यांनी स्वत:चाच अनुभव देवून, घर बांधाऱ्यांना जागे करायसाठीच हा ग्रंथ लिहिला आहे, हे लक्षात घ्यायला हवे. प्लॉट खरेदी कसा करावा, त्याची किंमत काय असेल, याचे मार्गदर्शन कतानाच त्यांनी पुराणोक्त वास्तुपुरुषाची उत्पत्ती कथा, प्राचीन ऋषीमुनींचे वास्तुशास्त्रावरचे संशोधन, भारतातील वास्तुग्रंथकार, वास्तू व पंचमहाभूतांचे गायत्री मंत्र यांचाही तपशील दिला आहे. सूर्यमाला वास्तू, प्लॉट आणि दिशांची विभागणी कशी करावी, योग्य आणि अनिष्ट बाबी कोणत्या, कोणत्या दिशेला घरातील कोणत्या खोल्या असाव्यात, याचा तपशीलही त्यांनी दिला आहे. वैदिक वास्तू समिती आणि ज्योतिषशास्त्र यांचा परस्पर संबंध, शुभ नक्षत्रे वास्तूचे नक्षत्र, वास्तूचा योग, वास्तू आणि शुभ, अशुभ आय हे सारे त्यांनी समजून दिले आहे. प्लॉटची खरेदी करताना कोणकोणती दक्षता पाळावी, व्यवहार कसा सांभाळावा, प्लॉटचे रस्ते, प्लॉटचे प्रकार, प्लॉटचे वाढलेले किंवा कट झालेले कोपरे, या कोपऱ्यांच्या दोषांचे निराकरण कसे करावे, ते निवारण केले नाही तर होणारा त्रास, प्लॉटचा आणि जमिनीचा चढ उतार याबाबत जाधव यांनी अत्यंत उपयुक्त माहिती दिली आहे. कोणत्याही प्रकारे ग्राहकाने इस्टेट एजंट किंवा प्लॉटचे खरेदी विक्री करणाऱ्या धंदेवाईकाकडून फसू नये, यासाठीच त्यांनी प्लॉट खरेदी करताना पूर्णपणे दक्षता घ्यावी, अशा सूचना दिल्या आहेत. जाधव स्वत: अभियंता तर आहेतच पण त्याशिवाय इमारतींची बांधकामेही त्यांनी पूर्ण केली आहेत. त्यामुळेच घर, व्यवसायाची वास्तू, कारखान्याची वास्तू कशी असावी, याचे मार्गदर्शन त्यांनी अत्यंत अचूकपणे आणि मोजमापासह केले आहे. या ग्रंथात त्यांनी घराचे प्लॅनही दिले आहेत. घराचे कंपाऊंड वॉल कोणत्या दिशेला असावे, ते कसे असावे, त्याची रचना कशी असावी? वास्तुशास्त्रानुसार वास्तूचे बांधकाम सुरू करण्यापूर्वी कोणकोणत्या बाबींची पूर्तता करून घ्यावी. अशुभ परिणामांपासून प्लॉटची सुटका कशी असावी? वास्तुशास्त्रानुसार वास्तूचे बांधकाम सुरू करण्यापूर्वी कोणकोणत्या बाबींची पूर्तता करून घ्यावी, अशुभ परिणामांपासून प्लॉटची प्लॉटची सुटका कशी करून घ्यावी? वास्तूची कुंडली, वास्तूचे भूमिपूजन कोणत्या मुहूर्तावर करावे? वास्तूची अती मर्मस्थाने, वास्तूतील खिडक्या कशा असाव्यात. स्वयंपाकघर कोठे असावे, शयनकक्ष कोणत्या दिशेला असावे, बाथरूम, जिने, देव्हारा कोठे असावा? आणि ही रचना का असावी? याचे विवेचनही त्यांनी प्राचीन भारतीय वास्तुशास्त्रानुसार केले आहे. वास्तू कशी नसावी आणि रचना सदोष कशी नसावी? हेही त्यांनी सांगितले आहे. वास्तूतील हॉल कसा असावा, कोणत्या उंचीवर खिडक्या असाव्यात, भरपूर सूर्यप्रकाश येण्यासाठी खिडक्यांची रचना आणि त्यांचा आकार कसा असावा, मुख्य दरवाजाची उंची आणि त्याची रचना मुख्य दरवाजाच्या चौकटीवर गणपतीची मूर्ती का असावी? निसर्ग चित्र कोणते लावावे आणि ते का? याचेही शंका समाधान जाधव यांनी केलेले आहे. स्वयंपाकघराची रचना तर त्यांनी अत्यंत तपशीलवार दिली आहे. गोमुखी प्लॉट, विथिशुला, विथुशुलतेवर शास्त्रोक्त मत या ग्रंथात आहे. बांधकामाचे साहित्य कोणते आणि कसे वापरावे, साहित्य घेताना कोणती काळजी घ्यावी हेही जाधव आवर्जून सांगतात. नवीन वास्तू बांधताना आर्किटेक्ट इंजिनिअरला आपल्या आर्थिक कुवतीची माहिती द्यावी. तो आपल्या घराचे बांधकाम अत्यंत दर्जेदार आणि आर्थिक बजेटमध्ये करील. नव्या घरासाठी कोणत्याही परिस्थितीत जुने दरवाजे, खिडक्या आणि अन्य वस्तू वापरू नयेत. या वस्तू ज्या वास्तूतून आल्या असतात. त्या वास्तू शापित असल्यास त्या वास्तूचे शापित गुण त्या वास्तूतही येवू शकतात. त्यामुळे नवीन वास्तूत जुने साहित्य वापरू नये, असा त्यांचा सल्ला आहे. टाईल्स कोणत्या आणि कोणत्या रंगाच्या असाव्यात, वास्तुवेध म्हणजे काय? देव्हाऱ्याची रचना, देवपूजा कशी करावी? वास्तूचे छत, वास्तूमधील खिडक्या, अडगळीची खोली, वॉचमन रुम, गाडीचे पार्किंग, जिन्याची रचना, वास्तूचे आणि खोलीचे रंगकाम, वास्तूचे मजले, याबाबतही जाधव यांनी ग्राहकांना अत्यंत अनुभविक आणि शास्त्रीय सल्ला दिला आहे. शहरी भागात आता अपार्टमेंट मधील किंवा मोठ्या उंच बिल्डिंगमधील फ्लॅट विकत घेण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. कारण स्वतंत्र प्लॉट घेवून, तेथे बंगला बांधण्याएवढी ऐपत सर्वसामान्य लोकांची नसते. त्यामुळेच फ्लॅट खरेदी करणे सामान्यांना परवडते. अपार्टमेंटचे बांधकामही वास्तुशास्त्रानुसार कसे करावे? फ्लॅटच्या बांधकामाचा दर काय असेल, फ्लॅट बुकिंग करताना आणि ताबा घेताना ग्राहकाने कोणती काळजी घ्यावी, आपली फसवणूक केली जाते, फ्लॅटधारकाला लुबाडले जाते. त्याचा तपशीलही जाधव यांनी मुद्दाम दिला आहे. फ्लॅटचा सुपर बिल्टअप फायदा किती टक्के असतो? पण सुपर बिल्टअपमध्ये बिल्डरचा फायदा कसा होतो, हे ही त्यांनी स्पष्ट केले आहे. जुळे बंगले आणि ओळीने बंगले, दुकाने, दुकानगाळा, कारखान्याची रचना, प्लॉटमधील वृक्ष, शेती आणि वास्तुशास्त्र, शेताचे बांध कसे असावेत, वास्तू शापित कशी बनते, वास्तुशास्त्रज्ञ कसा असावा, शकुनाचे महत्त्व, भूमीपूजनाची वेळ का चुकवू नये? त्याची कारणे कोणती, हे जाधव यांनी सांगितले आहे. वास्तुशास्त्रानुसार सुखशांतीसाठी सुवर्ण पॉलिश युक्त दुर्लभ दैविंक यंत्रे, आणि ज्योतिषीय वस्तू वापरल्यामुळे कोणता फायदा होतो, याचेही शास्त्रीय विवेचन जाधव यांनी केले आहे. प्राचीन वास्तुशास्त्र आणि आधुनिक वास्तूशास्त्र यांचा मेळ घालून वास्तु सुखी आणि समाधानी कशी मिळेल हे समजावून सांगण्यात जाधव यशस्वी ठरले आहेत. घर बांधण्यापूर्वी, विकत घेण्यापूर्वी, संबंधितांनी हा ग्रंथ आवर्जून वाचावा आणि संग्रही ठेवावा असा आहे. -सौ. वैजयंती कुलकर्णी ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHASAMRAT RANKHAINDAL
MAHASAMRAT RANKHAINDAL by VISHWAS PATIL Rating Star
गंधार

नमस्ते सर, काल रात्री मी रणखैनदळ मध्ये आपण लिहलेला पावनखिंडीतील थरार वाचून काढला. कालची रात्र मी कधीच विसरणार नाही. जणू काही मीच महाराजांसोबत प्रवास करणारा एक मावळा आहे. महाराज थकल्यावर त्यांच्या तळपायांना राईचं तेल चोळून देतो आहे, त्यांच्यासह नाचणीच भाकर खातो आहे असं मला वाटतं होतं. सर, एखाद्या लहान मुलाला आकाशातल्या तारका दाखवाव्यात त्याचप्रमाणे आपण इतिहासाच्या नभांगणातील असंख्य तारकांचं दर्शन घडवून आणता आणि छत्रपती शिवराय हा अर्थातच ताऱ्यांमधील तारा असा ध्रुवतारा आहे ज्याचं अनोखं असं दर्शन महासम्राट मधून घडतंय. सर, माझी केवळ मागच्या जन्मीची पुण्याई म्हणून मी आपल्याला भेटू शकलो. ...Read more

FOUR SEASONS
FOUR SEASONS by SHARMILA PHADKE Rating Star
लोकसत्ता १०.९.२०२३ (लोकरंग) वंदना बोकील-कुलकर्णी

माणसांवाचून रिकामी गावं, रस्ते, घरं न पाहवणारी, अंजनमाळावरच्या नागदेवीच्या कातळावर रणरण उन्हात सर्वागाने उन्हं पिऊन घेणारी, आपली उन्हात तापून दग्ध तांबूस झालेली देहाकृती व्हिन्सेंटने (व्हान गॉग) पाहावी आत्ता या क्षणी आणि तिच्या मोहात पडून त्यानेती आपल्या कॅनव्हासवर रेखाटावी असं आसुसून वाटणारी एक अतिसंवेदनशील तरुणी कामायनी ही शर्मिला फडके यांच्या ‘फोर सीझन्स’ या कादंबरीची नायिका. या नायिकेची चार प्रदेशात, चार ऋतूंमध्ये, चार पुरुषांच्या सहवासात घडणारी कहाणी म्हणून तिचं शीर्षक ‘फोर सीझन्स’. ‘फोर सीझन्स’ ही खऱ्या अर्थाने आत्ताची कादंबरी आहे. कदाचित पहिली ब्लॉग कादंबरी. कारण लेखिकेने कादंबरीच्या नायिकेच्या नावाने ‘टय़ुलिप्स अॅण्ड ट्वायलाइट’ या ब्लॉगवर पोस्ट्स लिहिल्या. ‘कादंबरीने बऱ्यापैकी आकार घेतल्यावर, व्यक्तिरेखा सुस्पष्ट झाल्यावर’ मग हा ब्लॉग तिने बंद केला. ‘ब्लॉग अर्काइव्हमध्ये जमा झालेल्या शेकडो पोस्ट्सवरून मॅपिंग करत’ कादंबरीचा आत्ताचा आकार तिने सिद्ध केला. हिची निर्मितीप्रक्रिया आत्ताच्या तंत्रसाहाय्याने, समाजमाध्यमांचा शहाणा उपयोग करून घेऊन झाली आहे. या अर्थाने ही आत्ताची कादंबरी. अलीकडे म्हणजे साधारण गेल्या दहा वर्षांत नव्याने लिहू लागलेल्या लेखकांत हिरिरीने आपली भूमिकावाहक पात्रे निर्माण करण्याची जी वृत्ती दिसते तिच्यात न अडकता आपल्या अनुभवांशी प्रामाणिक राहत आणि तरी कथनात्म साहित्याच्या मागण्या नीट कळून घेत लेखन करणाऱ्यांमध्ये शर्मिला फडके ही लेखिका लक्ष वेधून घेते. मोजके लेखन आहे तिचे पण खरेच लक्षात राहणारे. गेल्या पाच-सहा वर्षांत विविध दिवाळी अंकांतून प्रसिद्ध झालेल्या तिच्या कथा पाहिल्या तरी हे पटेल. ‘ये शहर बडा पुराना है’ ही कथा वाचकांना ताबडतोब आठवेल. याशिवाय विविध ठिकाणी कलाइतिहास, कलासमीक्षा, प्रवास याही विषयांवर तिचे लेखन सातत्याने चालू आहे. तिचे मूळ शिक्षण वनस्पतीशास्त्र या विषयातलं. नंतर पत्रकारिता आणि कलाइतिहास यांचेही पदव्युत्तर शिक्षण तिने घेतले. ही तिन्ही क्षेत्रं भटकंतीला पूरक. शर्मिला फडके यांना प्रवासाचीही आवड आहे. फॅशनेबल पर्यटन नव्हे, प्रवास. खरीखुरी हवा, माती, झाडंझुडं, पाणी, नद्या अंगावर घेत केलेला प्रवास. आणि हे करताना त्यांच्या संवेदना तल्लखपणे आजूबाजू टिपून घेत असतात. त्यामुळे त्यांच्या लेखनाचे विषय अनोखे आणि साहजिकपणे त्यांच्या अभ्यासविषयाशी आतून नातं सांगणारे असले तरी आजूबाजूला असलेलं वातावरण, सामाजिक-सांस्कृतिक घडामोडी यांचं भान असलेल्या एका डोळस कलाप्रेमी स्त्रीचं अनुभवविश्व त्यातून आकाराला येतं. ‘फोर सिझन्स’ ही त्यांची कादंबरी लेखक म्हणून त्यांचे जे वृत्तिविशेष आहेत त्यांचा प्रत्यय देणारी आहे. स्त्रियांनी लिहायचे ते खास त्यांच्याच रूढ अनुभवविश्वाविषयी असा जणू पायंडा पडलेला असताना ही लेखिका मात्र अशा विश्वाचा पसारा मांडते की जे खरंच अनवट आहे. या कथनाची नायिका कामायनी मुंबई, सुंदरबन, युरोप आणि माळरान अशा भूप्रदेशांमध्ये काही काळ वावरते. नुसती वावरत नाही तर जिवेभावे तिथे गुंतते. चार भूप्रदेश, तिथे भेटलेले चार पुरुष- तेही भिन्न विचारसरणीचे, प्रभावी व्यक्तिमत्त्वाचे, त्यांच्या विचारांचा खोलवर परिणाम होऊन कच्च्या वयापासून वैचारिक, भावनिक आणि मानसिक गोंधळात वाढत गेलेली ही तीव्र बुद्धिमत्ता आणि कमालीची संवेदनशील असणारी मुलगी. मुंबईमध्ये वडिलांच्या वयाचा त्यांचा मित्र आणि तिला अगदी जन्मापासून ओळखणारा तिचा पालक म्हणावा असा जोसेफ, अनिर्बन बॅनर्जीच्या प्रभावाखाली सुंदरबनात दाखल, पण तिथे मनासारखे काहीच घडत नाही. उलट प्रेमात आणि कामात अपयश घेऊन पळून येणं. मग काही काळ पुन्हा मुंबई. मग जोसेफ तिला युरोपात पाठवतो. तिथे भेटतो इटालियन एरिक. तिथेही तेच घडते. विझून गेलेली, हरलेली आणि आत्मविश्वास गमावून बसलेली ती पुन्हा मुंबईत जोसेफच्या वळचणीला येते. तो तिला एक काम देऊन अंजनमाळ या माळरानावर पाठवतो. तिथे भेटतो विहान. माणूस आहे तिथे मतं आणि मतभेद आहेत, गुंतणं-गाठी बसणं आहे, संघर्ष तर आहेतच. पण या माळरानावर तेवढी ती तिची आहे. ती माळरानाच्याच प्रेमात पडते. कादंबरीत पात्रे म्हणाल तर कामायनीचे आईबाबा, त्यांच्याच बंगल्याच्या दुसऱ्या भागात राहणारे बानिदा, इरादी बॅनर्जी आणि त्यांचा मुलगा अनिर्बन, जोसेफ, एरिक, माळरानावर संशोधन करणारा विहान आणि त्याचे काका आस्ताद, रघु, मधोक हे मित्र आणि ती जिथे काम करते तिथले श्रीरंजन, निर्मल, नाडकर्णी वगैरे सहकारी. गेस्ट हाऊसची राखण करणारे राणू व लाखी आणि दहाबारा वर्षांची त्यांची मुलगी मणी. मरून गेलेली मार्गारेट फिलीप ग्रॅहम ही वनस्पतींची अभ्यासक, तिच्याशी एकनिष्ठ असलेला येशा हा तिचा मदतनीस पोरगा- ज्याची आता शंभरी उलटून गेली आहे. बस्स. माणसांचा आणि त्यांच्या नात्यांचा मोठा पसारा नाही मांडत लेखिका. या सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात जिवंत आहे तो निसर्ग. तोही तुमच्या आमच्या नेहमीच्या सवयीचा, चकचकीत, कॅमेरा किंवा तत्सदृश शब्दांतून दिसणारा, जणू काय आपलं मनोरंजन करण्याच्या डय़ुटीवर नेमलेला नव्हे. इथे त्याची जिवंत स्पंदनं आपल्याला जाणवतात. आपण उन्हात तापतो, आपल्याला उन्हाचा खरपूस वास येऊ लागतो. आपण सुंदरबनातल्या काळय़ा पाण्यात आणि दलदलीत पाय टाकायला कचरतो.. हा असा साक्षात अनुभव लेखिका तुम्हाला देते. अतिशय वैशिष्टय़पूर्ण रचना आहे या कादंबरीची. कधी प्रथमपुरुषी निवेदन, कधी तृतीयपुरुषी. कधी दैनंदिनीतल्या नोंदी. कधी नायिकेने स्वत:शीच केलेले विचार, कधी तिला पडणारी स्वप्नं तर कधी मार्गारेटच्या दैनंदिनीतल्या नोंदी. मुख्य प्रकरणं चार. ऋतू पहिला, ऋतू दुसरा.. अशा शीर्षकांची. त्यात उपशीर्षके असलेले लहान लहान परिच्छेद. कदाचित आधी ब्लॉग लिहून मग त्यातून कादंबरीचे कथानक रचल्यामुळे असेल, पण ही रचना एकाच वेळी अनेक पातळय़ांवर फिरते. त्यामुळे अनेक दिशीय, अनेक स्तरीय वास्तवाचा अनुभव वाचतावाचता येत राहतो. कादंबरीच्या आशयाशी इतकं थेट संलग्न असलेलं विविध पातळय़ांवर फिरणारं निवेदनतंत्र वाचकांच्या सवयीचे नाही. पण एकदा का तुम्ही या नायिकेबरोबर तिच्या पावलांनी चालू लागलात की.. आणि तसे चालताच तुम्ही.. की मात्र या निवेदनाची जादू आणि गंमत समजते. नायिकेची गोष्ट कधी ती सांगते तर कधी निवेदिका सांगते. निवेदनतंत्र इतक्या ताकदीने वापरणं आणि ते ‘वापरलं आहे’ याची जाणीव होऊ न देणं, यात या कादंबरीचं बरंच यश सामावलं आहे. उत्तम भाषाशैली आणि प्रतिमांचा फार नेमका वापर यांचाही त्यात वाटा आहेच. नायिका जशी जगते आहे, निसर्गाच्या चक्रातून स्वत:चे आयुष्य समजून घेते आहे तसं हे लेखन आहे. आखीव नाही, असं वाटणारं. तिची नजर जाते तो तो निसर्गाचा आविष्कार ती सांगते. नायिकेच्या रंग, गंध आणि स्पर्शाच्या संवेदना विशेष तल्लख आहेत. त्यामुळे तिच्या वर्णनांत चित्रकाराच्या पॅलेटवरचे रंग आणि त्यांच्या अगणित छटा येत-जात राहतात. व्हान गॉग, मोने वगैरे चित्रकारांच्या चित्रांचे संदर्भ येतात. सुंदरबन आणि युरोपातल्या आठवणी त्यात आपले धागे मिसळत राहतात. ती मनातले गोंधळ उघड करते. ते गोंधळ का निर्माण झाले, याचा वाचकांच्या साक्षीने शोध घेते. पहिल्याच मोठय़ा प्रकरणात आता लेखिका हे सारे कसे सोडवणार, म्हणून उत्सुकता आणि काळजीही वाटते कारण सरधोपट निवेदनाचा रस्ता तिने सोडून दिला आहे. या कादंबरीत आहे तसं रखरख माळरान कुणी कधी शब्दांतून क्वचितच मांडलं असेल. उन्हाच्या सुया डोळय़ांत घुसत असताना ही एका आंतरिक हट्टानं तिथे राहते. जगते. त्या उन्हात तिच्या आतले बर्फाचे गोठलेले प्रदेश वितळून वहाते होतात. तिची ती तिला सापडत जाते. ज्या प्रश्नांपासून ती पळत होती, त्या प्रश्नांना भिडण्याचे बळ ते ऊन तिला देते. अवघ्या तीस वर्षांच्या तिच्या आयुष्यात झालेले गुंते, गाठी हळूहळू सुटत जातात, सुरुवातीची ‘टय़ुलिपचे फूल वाटणारी ती अखेरीस एखादे रानफूल वाटू लागते.’ त्या प्रवासाची ही कहाणी आहे. या नायिकेला मिथक, लोककथा, झाडं-पानं-फुलं-पक्षी या सगळय़ांत रस आहे. नागदेवीच्या कातळाची कहाणी, आदिवासी तिथे करत असलेले विधी समजून घेण्याचा तिचा प्रयत्न आहे. राणू, त्याचा शंभरी पार केलेला वृद्ध बाप येशा, यांच्याशी संवाद साधण्याची, त्यांच्याकडून जुनी घटितं जाणून घेण्याची आणि ते ठिपके जोडत सलग चित्र पूर्ण करण्याची तिला निकड वाटते. मणी तर तिची छोटी मैत्रीण होऊन जाते. या कादंबरीच्या गाभ्याकडे अनेक वाटांनी जावं लागतं.. नायिकेच्या आई-वडिलांचं नातं विस्कटलेलं असणं, तिचं आईशिवाय मोठ होणं, वडिलांनी कामात बुडवून घेणं, अडनिडय़ा वयातल्या एकटेपणात बॅनर्जीकडे रमणं, त्यांच्या तरुण मुलाच्या प्रेमात पडणं. बाबांना दुखवायचं म्हणून वडीलधारेपण निभावणाऱ्या जोसेफकडे ओढा वाढणं, तरी त्याला जे नको वाटतं तेच तिनं निवडणं, अनिर्बनकडे जाणं. मग तिथून पळून युरोपात. तिथे एरिकच्या प्रेमात पडणं, करियरची वाट लागून, पूर्ण खचून मुंबई- पुन्हा जोसेफ आणि मग माळरान. हा सगळा प्रवास एका स्तरावर आहे. दुसऱ्या पातळीवर, माणसाचा जागतिक स्तरावरचा वावर, त्याला भेटणारी विविध देशीविदेशी माणसं, परदेशातील वास्तव्याची संधी, त्यामुळे होणारी भावनिक-शारीरिक जवळीक, त्यातून निर्माण होणाऱ्या वैयक्तिक जीवनातल्या समस्या आहेत. तिसऱ्या पातळीवर पर्यावरण आणि विकास यासंबंधीचे असंख्य स्थूल-सूक्ष्म धागे आहेत. नायिका जाहिरात क्षेत्रात करियर असणारी. ते क्षेत्र आणि पर्यावरण कायम विरोधी गटात. दोन्ही बाजू जनसामान्यांची करत असलेली अशुद्ध दिशाभूल, विस्थापितांचे पुनर्वसनाचे प्रश्न, ‘विस्थापितांचा प्रश्न केवळ जमिनी गमावण्याचा नसतो, तो मुळं उखडलं जाण्याचा असतो’, याविषयी असणारी कमालीची असंवेदनशीलता, प्रश्नांचा समग्र विचार न करता एकेका सुटय़ा घटकांचा विचार करून योजलेले तात्कालिक उपाय, हत्ती आणि सहा आंधळय़ांच्या प्राचीन गोष्टीतून आपण काहीच शिकलो नसल्याची चरचरीत जाणीव.. हे सगळं ही कादंबरी स्वत:त गुंफून घेते. म्हणजेच कालसमांतर आशय ती आपल्या पदरात घालते. नायिका ज्या जाहिरात क्षेत्रात काम करतेय तिथे येणारे कडवट अनुभव, स्वत:च केलेले सगळे नियम धाब्यावर बसवणाऱ्या सरकारी व्यवस्था, हिरव्या रंगाच्या ‘वॉश’खाली भयानक प्रदूषण करणाऱ्या उत्पादनांना मिळणाऱ्या परवानग्या आणि त्याविषयी उदासीन असणारी विविध पदांवरची माणसं. निकराने त्याला विरोध करणारे पर्यावरणस्नेही कार्यकर्ते आणि संस्था, याविषयी विचार करायला लावते ही कादंबरी. ही सगळी वीण गच्च विणली आहे. म्हणूनच ती वाचायला मजा येते. म्हणजे हिच्यात काही कमतरता वा त्रुटी नाहीत का? नाहीत कशा.. पण दुर्लक्ष कराव्यात अशा नक्कीच. उदा. जोसेफ, रघु, मधोक, आस्ताद, विहान यांच्या आयुष्यात कोणीच स्त्रिया कशा नाहीत? इतक्या जवळिकीच्या आणि प्रदीर्घ काळाच्या नात्यात कधीतरी त्या व नायिका आमनेसामने येऊ शकल्या असत्या. अशा तिढय़ांना सफाईने बगल दिली आहे. त्यामुळे समग्र चित्रात फटी राहिल्या आहेत. सहसा लेखिका ज्या तऱ्हेचं लेखन करत नाहीत तसं वाचायला मिळालं की सुखद वाटतं. स्त्री असण्याच्या परीघरेषा ओलांडून ही नायिका व्यक्ती म्हणून वेगळे आयुष्य जगते. सहजधर्मानं, अभिनिवेशानं नव्हे म्हणून आणखी बरं वाटतं. लेखिका, संपादक, संवादक, समीक्षक आणि कथा अभ्यासक अशा अनेक भूमिकांमध्ये सतत कार्यरत. ‘संवादसेतू’ या लक्षवेधी दिवाळी अंकाचे संपादन. कथक नृत्यांगना रोहिणी भाटे यांच्यावरील ‘रोहिणी निरंजनी’ हा गाजलेला ग्रंथ, ‘मंगला गोडबोले यांच्या निवडक कथां’ यासह अनेक पुस्तकांच्या संपादिका. ...Read more