* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: VASTU AJIT
  • Availability : Notify Me
     
  • ISBN : 9788177668162
  • Edition : 6
  • Publishing Year : JULY 2004
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 228
  • Language : MARATHI
  • Category : ARCHITECTURAL STRUCTURE & DESIGN
  • Sub Category : ARCHITECTURE PROFESSIONAL PRACTICE
  • Available in Combos :VASTUSHASTRA COMBO SET-2 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
WHAT DOES THIS GUIDE CONTAIN? IT HAS INFORMATION RELATED TO ARCHITECT FROM ALL THE HOLY BOOKS OF ALL RELIGIONS; THE FOUR "VEDAS`, THE EIGHTEEN "PURANE`, THE "QURAN`, AND THE "BIBLE`. IT HAS SOLUTION FOR ALL THE PROBLEMS WHILE BUILDING AN INFRASTRUCTURE. THIS BOOK HAS THE DIMENSIONS OF MODERN ASTROLOGY, WITH ALL ITS FIVE MAIN ASPECTS LIKE, DAY, DATE, NAKSHATRA, KARAN AND YOG. THIS BOOK IS VERY USEFUL WHILE BUILDING INDEPENDENT BUNGALOWS, PROJECTS, SCHEMES, ROW HOUSES, APARTMENTS, ETC. AND HAS MANY COLOURED PHOTOGRAPHS. THIS BOOK IS FULL OF PERSPECTIVE DRAWINGS. IT GIVES A FULL PICTURE OF THE PROBLEMS AND SOLUTIONS REGARDING THE CITY SURVEYS BY THE MUNICIPALITY, ESTIMATE, BAR CHART TO R.C.C., STRUCTURAL DESIGN, ETC. WHICH WILL FURTHER ENABLE A PERSON TO BUILD AN INFRASTRUCTURE WITHIN RECORD BREAK PERIOD OF TIME; BE IT A BUILDING OR ROW HOUSE, INDEPENDENT BUNGALOW, APARTMENTS OR ANY OTHER CONSTRUCTION. IT ALSO GIVES ELABORATE INFORMATION ABOUT THE DESIGNS OF INDUSTRIES, SHOPS, BASEMENT, ETC. ANY COMMON MAN WHO WANTS TO BUILD A HOUSE ON HIS PLOT WITH ALL THE GOOD AND NOT SO GOOD POINTS OF THE PLOTS CAN DO SO WITH THE GUIDELINES PROVIDED IN THIS BOOK. FARMERS CAN EARN MORE IN FARMING. SEPARATE CHAPTERS DEAL WITH KITCHEN, TOILETS, BATHROOMS, BEDROOMS, LIVING ROOMS, ETC, HIGHLIGHTING ON ITS ANGLES AND DIRECTIONS. THIS BOOK CASTS LIGHT ON THE AUSPICIOUS AND RELIGIOUS MENTALITIES AT THE SAME TIME, IT BRINGS THE VARIOUS DEVELOPMENTAL STAGES IN THE ASTROLOGY, ARCHITECTURE AND SCIENCE TECHNOLOGY TO OUR NOTICE. IT GIVES US PICTURES OF THE GOLD PLATED "YANTRA`, GEMS, AND OTHER IMPORTANT THINGS. EACH AND EVERY CHAPTER INCLUDED HERE HAS BEEN CHECKED BY THE EXPERTS. EVERYONE OF YOU, BE IT A FARMER, INDUSTRIALIST, SHOP OWNER, TENANT OR THE OWNER OF THE HOUSE, SHOULD STUDY THE BOOK, ACCORDINGLY MAKE CHANGES IN THE INFRASTRUCTURE AND THEN ENJOY A LIFE FULL OF RICHES, SUCCESS, PEACE OF MIND, GOOD HEALTH AND GOOD WISHES TOO. WE WISH THAT THE ALMIGHTY GIVE HEALTH AND WEALTH TO ALL ONCE AGAIN MAKING OUR MOTHERLAND "SUJALAM, SUFALAM`.
चार वेद, अठरा पुराणे, कुराण, बायबल इ. ग्रंथांचा वास्तुशास्त्रीय अर्क या ग्रंथात आहे. आधुनिक वास्तु बांधताना येणा-या समस्यांचे निराकरण, समाधान या ग्रंथात आहे. ज्योतिषशास्त्रानुसार तिथी, वार, नक्षत्र, करण, योग या पंचअंगांचा, आयाचा तौलनिक अभ्यास करून या ग्रंथानुसार सर्व सोयींनी युक्त आदर्श वास्तु निर्माण करता येतात. स्वतंत्र बंगले, संपूर्ण प्रोजेक्ट स्कीम, रो हाऊसेस, अपार्टमेंटस् यांच्या सचित्र रंगीत परस्पेक्टीव्ह ड्रॉर्इंग्जनी युक्त हा ग्रंथ आहे. महानगरपालिका मंजूर नकाशा प्लॅन, एस्टीमेट, बारचार्ट ते आर.सी.सी. स्ट्रक्चरल ड्रॉर्इंग्ज इ.चा अंतर्भाव असलेल्या या ग्रंथानुसार कमीत कमी पैशात, कमीत कमी वेळेत वास्तु, स्वतंत्र बंगले, अपार्टमेंटस्, रो हाऊसेस बांधता येतात. औद्योगिक कारखाने, दुकानगाळे, बेसमेंट कशी असावीत? याची शास्त्रीय, सचित्र, परिपूर्ण माहिती या ग्रंथात आहे. सर्वसामान्य व्यक्तीला कोणत्याही विदिशा, कट, वाढलेले कोपरे असलेल्या प्लॉटवर आपल्या ऐपतीनुसार, बजेटनुसार वैदिक व आधुनिक वास्तु बांधण्याचा आनंद मिळविता येतो. शेतक-यांना योग्य प्रकारे शेती करून अधिकाधिक उत्पन्न मिळविता येते. पाकगृह, शौचालय, स्नानगृह, निद्रागृह, बैठकगृह अशासारख्या उपयुक्त वास्तु प्रकरणात वास्तुविभागांचे व तेथील कर्माचे सूक्ष्म बारकावे, त्याची शास्त्रीय मिमांसा, साधक बाधक तत्त्वे यांची सविस्तर व नाविन्यपूर्ण सचित्र माहिती मिळते. हा ग्रंथ धार्मिक विधीविधान, वेदोपनिषदे, ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र व सायन्स टेक्नॉलॉजी तसेच बांधकामातील विविध टप्पे या सर्व गोष्टींवर प्रकाश टाकणारा आहे. स्वर्णपॉलिशयुक्त वैदिक वास्तुदोष निवारक यंत्रे, रत्ने, दुर्लभ ज्योतिषीय सामग्रीची रंगीत छायाचित्रेही या ग्रंथात आहेत. ग्रंथातील सर्व प्रकरणे प्रत्येक क्षेत्रातील नामवंत व्यक्तींकडून, तज्ज्ञांकडून तपासून घेतलेली आहेत. शेती, कारखाना, दुकाने, भाड्याचे घर यामध्ये वास्तुशास्त्रानुसार योग्य ते बदल करून कुटुंबाला ऐश्वर्यसंपन्नता, यश, सन्मान, कीर्ती, मानसिक शांती व निरोगी प्रकृती लाभावी. भारत पुन्हा एकदा सुजलाम् सुफलाम् सस्यशामलाम् सामथ्र्यशाली व समृद्ध व्हावा. हीच श्री लक्ष्मी नारायणाच्या चरणी प्रार्थना.
YOUTUBE
No Records Found
No Records Found
Keywords
#ARCHITECTURE #ARCHITECTURALSTRUCTURE& DESIGN #ARCHITECTURE PROFESSIONAL PRACTICE #RESIDENTIAL BUILDINGS, DOMESTIC BUILDINGS #PROFESSIONAL INTERIOR DESIGN #LANDSCAPE ART & ARCHITECTURE
Customer Reviews
  • Rating StarDAINIK AIKYA 15-04-2007

    सुखी-समाधानी वास्तूसाठी... नवीन घर बांधल्यावर किंवा सदनिका घेतल्यावर वास्तुशाती करायची आपली प्राचीन परंपरा आहे. ही वास्तू आपल्याला लाभावी, घरातल्या सर्वांना सुख समाधान मिळावे, घरातील काही दोष असल्यास त्याचे निराकरण व्हावे, यासाठीच वास्तुशांती केली जते. आपल्या प्राचीन भारतीयांनी सुखी-समाधानी वास्तू कशी बांधावी, याचा शास्त्रीय अभ्यास करून वास्तुशास्त्राची ही निर्मिती केली आहे. संस्कृतमध्ये वास्तुशास्त्रावरचे ग्रंथही उपलब्ध आहेत. पण अलीकडच्या काळात सिमेंट काँक्रिटची इमारत बांधताना प्राचीन भारतीय वास्तुशास्त्राचा विचार केला जात नाही. प्लॉट विकत घेतानाही तो कसा असावा, याची नियमावलीच प्राचीन भारतीय वास्तुशास्त्राने सांगून ठेवली आहे. या वास्तुशास्त्राचा अभ्यास करून, त्यातील नियम पाळून वास्तू बांधल्यास ती नक्कीच लाभते, असा अनेकांचा अनुभव आहे. वास्तुशास्त्रज्ञ अजित राजाराम जाधव यांनी अथक परिश्रमाने आणि अभ्यास करून वास्तु अजित हा ग्रंथ सुखी वास्तू कशी असावी, याचे मार्गदर्शन सामान्यांना व्हावे, यासाठीच लिहिला आहे. अभियंता असलेले जाधव पूर्वी प्लॉटच्या खरेदी विक्रीचा व्यवसाय करीत असत. एका प्लॉटच्या खरेदीच्या व्यवहारात त्यांना आलेला अनुभव अत्यंत त्रासदायक आणि उद्वेग आणणारा होता. तो प्लॉट अत्यंत चांगला असतानाही एका तथाकथित शास्त्री पंडिताने त्या प्लॉटला विदिशा नावाचा रोग झाल्याचे सांगून तो प्लॉट संबंधिताला विकायला लावला होता. या प्रसंगाने जाधव यांनी वास्तुशास्त्राचा अभ्यास सुरू केला. प्राचीन भारतीय वास्तुशास्त्राचा पूर्णपणे अभ्यास करतानाच, त्यांनी तथाकथित वास्तुशास्त्र सामान्य जनतेला कसे फसवतात, लुबाडतात याचाही अभ्यास केला. कोणताही प्लॉट त्रिकोणी, चौकोनी किंवा खोलगट असला म्हणजे पूर्णपणे दोषी नसतो. या प्लॉटवर शास्त्रीय उपाययोजना करता येते. ती केल्यावर या प्लॉटमधील दोषांचे निराकरण होते, असे जाधव यांनी सांगून ठेवले आहे. कोणत्याही परिस्थितीत तुम्ही फसू नका, असा सर्वसामान्य जनतेला त्यांनी कळवळून आवाहन केले आहे. त्यांनी स्वत:चाच अनुभव देवून, घर बांधाऱ्यांना जागे करायसाठीच हा ग्रंथ लिहिला आहे, हे लक्षात घ्यायला हवे. प्लॉट खरेदी कसा करावा, त्याची किंमत काय असेल, याचे मार्गदर्शन कतानाच त्यांनी पुराणोक्त वास्तुपुरुषाची उत्पत्ती कथा, प्राचीन ऋषीमुनींचे वास्तुशास्त्रावरचे संशोधन, भारतातील वास्तुग्रंथकार, वास्तू व पंचमहाभूतांचे गायत्री मंत्र यांचाही तपशील दिला आहे. सूर्यमाला वास्तू, प्लॉट आणि दिशांची विभागणी कशी करावी, योग्य आणि अनिष्ट बाबी कोणत्या, कोणत्या दिशेला घरातील कोणत्या खोल्या असाव्यात, याचा तपशीलही त्यांनी दिला आहे. वैदिक वास्तू समिती आणि ज्योतिषशास्त्र यांचा परस्पर संबंध, शुभ नक्षत्रे वास्तूचे नक्षत्र, वास्तूचा योग, वास्तू आणि शुभ, अशुभ आय हे सारे त्यांनी समजून दिले आहे. प्लॉटची खरेदी करताना कोणकोणती दक्षता पाळावी, व्यवहार कसा सांभाळावा, प्लॉटचे रस्ते, प्लॉटचे प्रकार, प्लॉटचे वाढलेले किंवा कट झालेले कोपरे, या कोपऱ्यांच्या दोषांचे निराकरण कसे करावे, ते निवारण केले नाही तर होणारा त्रास, प्लॉटचा आणि जमिनीचा चढ उतार याबाबत जाधव यांनी अत्यंत उपयुक्त माहिती दिली आहे. कोणत्याही प्रकारे ग्राहकाने इस्टेट एजंट किंवा प्लॉटचे खरेदी विक्री करणाऱ्या धंदेवाईकाकडून फसू नये, यासाठीच त्यांनी प्लॉट खरेदी करताना पूर्णपणे दक्षता घ्यावी, अशा सूचना दिल्या आहेत. जाधव स्वत: अभियंता तर आहेतच पण त्याशिवाय इमारतींची बांधकामेही त्यांनी पूर्ण केली आहेत. त्यामुळेच घर, व्यवसायाची वास्तू, कारखान्याची वास्तू कशी असावी, याचे मार्गदर्शन त्यांनी अत्यंत अचूकपणे आणि मोजमापासह केले आहे. या ग्रंथात त्यांनी घराचे प्लॅनही दिले आहेत. घराचे कंपाऊंड वॉल कोणत्या दिशेला असावे, ते कसे असावे, त्याची रचना कशी असावी? वास्तुशास्त्रानुसार वास्तूचे बांधकाम सुरू करण्यापूर्वी कोणकोणत्या बाबींची पूर्तता करून घ्यावी. अशुभ परिणामांपासून प्लॉटची सुटका कशी असावी? वास्तुशास्त्रानुसार वास्तूचे बांधकाम सुरू करण्यापूर्वी कोणकोणत्या बाबींची पूर्तता करून घ्यावी, अशुभ परिणामांपासून प्लॉटची प्लॉटची सुटका कशी करून घ्यावी? वास्तूची कुंडली, वास्तूचे भूमिपूजन कोणत्या मुहूर्तावर करावे? वास्तूची अती मर्मस्थाने, वास्तूतील खिडक्या कशा असाव्यात. स्वयंपाकघर कोठे असावे, शयनकक्ष कोणत्या दिशेला असावे, बाथरूम, जिने, देव्हारा कोठे असावा? आणि ही रचना का असावी? याचे विवेचनही त्यांनी प्राचीन भारतीय वास्तुशास्त्रानुसार केले आहे. वास्तू कशी नसावी आणि रचना सदोष कशी नसावी? हेही त्यांनी सांगितले आहे. वास्तूतील हॉल कसा असावा, कोणत्या उंचीवर खिडक्या असाव्यात, भरपूर सूर्यप्रकाश येण्यासाठी खिडक्यांची रचना आणि त्यांचा आकार कसा असावा, मुख्य दरवाजाची उंची आणि त्याची रचना मुख्य दरवाजाच्या चौकटीवर गणपतीची मूर्ती का असावी? निसर्ग चित्र कोणते लावावे आणि ते का? याचेही शंका समाधान जाधव यांनी केलेले आहे. स्वयंपाकघराची रचना तर त्यांनी अत्यंत तपशीलवार दिली आहे. गोमुखी प्लॉट, विथिशुला, विथुशुलतेवर शास्त्रोक्त मत या ग्रंथात आहे. बांधकामाचे साहित्य कोणते आणि कसे वापरावे, साहित्य घेताना कोणती काळजी घ्यावी हेही जाधव आवर्जून सांगतात. नवीन वास्तू बांधताना आर्किटेक्ट इंजिनिअरला आपल्या आर्थिक कुवतीची माहिती द्यावी. तो आपल्या घराचे बांधकाम अत्यंत दर्जेदार आणि आर्थिक बजेटमध्ये करील. नव्या घरासाठी कोणत्याही परिस्थितीत जुने दरवाजे, खिडक्या आणि अन्य वस्तू वापरू नयेत. या वस्तू ज्या वास्तूतून आल्या असतात. त्या वास्तू शापित असल्यास त्या वास्तूचे शापित गुण त्या वास्तूतही येवू शकतात. त्यामुळे नवीन वास्तूत जुने साहित्य वापरू नये, असा त्यांचा सल्ला आहे. टाईल्स कोणत्या आणि कोणत्या रंगाच्या असाव्यात, वास्तुवेध म्हणजे काय? देव्हाऱ्याची रचना, देवपूजा कशी करावी? वास्तूचे छत, वास्तूमधील खिडक्या, अडगळीची खोली, वॉचमन रुम, गाडीचे पार्किंग, जिन्याची रचना, वास्तूचे आणि खोलीचे रंगकाम, वास्तूचे मजले, याबाबतही जाधव यांनी ग्राहकांना अत्यंत अनुभविक आणि शास्त्रीय सल्ला दिला आहे. शहरी भागात आता अपार्टमेंट मधील किंवा मोठ्या उंच बिल्डिंगमधील फ्लॅट विकत घेण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. कारण स्वतंत्र प्लॉट घेवून, तेथे बंगला बांधण्याएवढी ऐपत सर्वसामान्य लोकांची नसते. त्यामुळेच फ्लॅट खरेदी करणे सामान्यांना परवडते. अपार्टमेंटचे बांधकामही वास्तुशास्त्रानुसार कसे करावे? फ्लॅटच्या बांधकामाचा दर काय असेल, फ्लॅट बुकिंग करताना आणि ताबा घेताना ग्राहकाने कोणती काळजी घ्यावी, आपली फसवणूक केली जाते, फ्लॅटधारकाला लुबाडले जाते. त्याचा तपशीलही जाधव यांनी मुद्दाम दिला आहे. फ्लॅटचा सुपर बिल्टअप फायदा किती टक्के असतो? पण सुपर बिल्टअपमध्ये बिल्डरचा फायदा कसा होतो, हे ही त्यांनी स्पष्ट केले आहे. जुळे बंगले आणि ओळीने बंगले, दुकाने, दुकानगाळा, कारखान्याची रचना, प्लॉटमधील वृक्ष, शेती आणि वास्तुशास्त्र, शेताचे बांध कसे असावेत, वास्तू शापित कशी बनते, वास्तुशास्त्रज्ञ कसा असावा, शकुनाचे महत्त्व, भूमीपूजनाची वेळ का चुकवू नये? त्याची कारणे कोणती, हे जाधव यांनी सांगितले आहे. वास्तुशास्त्रानुसार सुखशांतीसाठी सुवर्ण पॉलिश युक्त दुर्लभ दैविंक यंत्रे, आणि ज्योतिषीय वस्तू वापरल्यामुळे कोणता फायदा होतो, याचेही शास्त्रीय विवेचन जाधव यांनी केले आहे. प्राचीन वास्तुशास्त्र आणि आधुनिक वास्तूशास्त्र यांचा मेळ घालून वास्तु सुखी आणि समाधानी कशी मिळेल हे समजावून सांगण्यात जाधव यशस्वी ठरले आहेत. घर बांधण्यापूर्वी, विकत घेण्यापूर्वी, संबंधितांनी हा ग्रंथ आवर्जून वाचावा आणि संग्रही ठेवावा असा आहे. -सौ. वैजयंती कुलकर्णी ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more