* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: VASTU AJIT
  • Availability : Available
  • ISBN : 9788177668162
  • Edition : 7
  • Publishing Year : JULY 2004
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 228
  • Language : MARATHI
  • Category : ARCHITECTURAL STRUCTURE & DESIGN
  • Sub Category : ARCHITECTURE PROFESSIONAL PRACTICE
  • Available in Combos :VASTUSHASTRA COMBO SET-2 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
WHAT DOES THIS GUIDE CONTAIN? IT HAS INFORMATION RELATED TO ARCHITECT FROM ALL THE HOLY BOOKS OF ALL RELIGIONS; THE FOUR "VEDAS`, THE EIGHTEEN "PURANE`, THE "QURAN`, AND THE "BIBLE`. IT HAS SOLUTION FOR ALL THE PROBLEMS WHILE BUILDING AN INFRASTRUCTURE. THIS BOOK HAS THE DIMENSIONS OF MODERN ASTROLOGY, WITH ALL ITS FIVE MAIN ASPECTS LIKE, DAY, DATE, NAKSHATRA, KARAN AND YOG. THIS BOOK IS VERY USEFUL WHILE BUILDING INDEPENDENT BUNGALOWS, PROJECTS, SCHEMES, ROW HOUSES, APARTMENTS, ETC. AND HAS MANY COLOURED PHOTOGRAPHS. THIS BOOK IS FULL OF PERSPECTIVE DRAWINGS. IT GIVES A FULL PICTURE OF THE PROBLEMS AND SOLUTIONS REGARDING THE CITY SURVEYS BY THE MUNICIPALITY, ESTIMATE, BAR CHART TO R.C.C., STRUCTURAL DESIGN, ETC. WHICH WILL FURTHER ENABLE A PERSON TO BUILD AN INFRASTRUCTURE WITHIN RECORD BREAK PERIOD OF TIME; BE IT A BUILDING OR ROW HOUSE, INDEPENDENT BUNGALOW, APARTMENTS OR ANY OTHER CONSTRUCTION. IT ALSO GIVES ELABORATE INFORMATION ABOUT THE DESIGNS OF INDUSTRIES, SHOPS, BASEMENT, ETC. ANY COMMON MAN WHO WANTS TO BUILD A HOUSE ON HIS PLOT WITH ALL THE GOOD AND NOT SO GOOD POINTS OF THE PLOTS CAN DO SO WITH THE GUIDELINES PROVIDED IN THIS BOOK. FARMERS CAN EARN MORE IN FARMING. SEPARATE CHAPTERS DEAL WITH KITCHEN, TOILETS, BATHROOMS, BEDROOMS, LIVING ROOMS, ETC, HIGHLIGHTING ON ITS ANGLES AND DIRECTIONS. THIS BOOK CASTS LIGHT ON THE AUSPICIOUS AND RELIGIOUS MENTALITIES AT THE SAME TIME, IT BRINGS THE VARIOUS DEVELOPMENTAL STAGES IN THE ASTROLOGY, ARCHITECTURE AND SCIENCE TECHNOLOGY TO OUR NOTICE. IT GIVES US PICTURES OF THE GOLD PLATED "YANTRA`, GEMS, AND OTHER IMPORTANT THINGS. EACH AND EVERY CHAPTER INCLUDED HERE HAS BEEN CHECKED BY THE EXPERTS. EVERYONE OF YOU, BE IT A FARMER, INDUSTRIALIST, SHOP OWNER, TENANT OR THE OWNER OF THE HOUSE, SHOULD STUDY THE BOOK, ACCORDINGLY MAKE CHANGES IN THE INFRASTRUCTURE AND THEN ENJOY A LIFE FULL OF RICHES, SUCCESS, PEACE OF MIND, GOOD HEALTH AND GOOD WISHES TOO. WE WISH THAT THE ALMIGHTY GIVE HEALTH AND WEALTH TO ALL ONCE AGAIN MAKING OUR MOTHERLAND "SUJALAM, SUFALAM`.
चार वेद, अठरा पुराणे, कुराण, बायबल इ. ग्रंथांचा वास्तुशास्त्रीय अर्क या ग्रंथात आहे. आधुनिक वास्तु बांधताना येणा-या समस्यांचे निराकरण, समाधान या ग्रंथात आहे. ज्योतिषशास्त्रानुसार तिथी, वार, नक्षत्र, करण, योग या पंचअंगांचा, आयाचा तौलनिक अभ्यास करून या ग्रंथानुसार सर्व सोयींनी युक्त आदर्श वास्तु निर्माण करता येतात. स्वतंत्र बंगले, संपूर्ण प्रोजेक्ट स्कीम, रो हाऊसेस, अपार्टमेंटस् यांच्या सचित्र रंगीत परस्पेक्टीव्ह ड्रॉइंग्जनी युक्त हा ग्रंथ आहे. महानगरपालिका मंजूर नकाशा प्लॅन, एस्टीमेट, बारचार्ट ते आर.सी.सी. स्ट्रक्चरल ड्रॉर्इंग्ज इ.चा अंतर्भाव असलेल्या या ग्रंथानुसार कमीत कमी पैशात, कमीत कमी वेळेत वास्तु, स्वतंत्र बंगले, अपार्टमेंटस्, रो हाऊसेस बांधता येतात. औद्योगिक कारखाने, दुकानगाळे, बेसमेंट कशी असावीत? याची शास्त्रीय, सचित्र, परिपूर्ण माहिती या ग्रंथात आहे. सर्वसामान्य व्यक्तीला कोणत्याही विदिशा, कट, वाढलेले कोपरे असलेल्या प्लॉटवर आपल्या ऐपतीनुसार, बजेटनुसार वैदिक व आधुनिक वास्तु बांधण्याचा आनंद मिळविता येतो. शेतक-यांना योग्य प्रकारे शेती करून अधिकाधिक उत्पन्न मिळविता येते. पाकगृह, शौचालय, स्नानगृह, निद्रागृह, बैठकगृह अशासारख्या उपयुक्त वास्तु प्रकरणात वास्तुविभागांचे व तेथील कर्माचे सूक्ष्म बारकावे, त्याची शास्त्रीय मिमांसा, साधक बाधक तत्त्वे यांची सविस्तर व नाविन्यपूर्ण सचित्र माहिती मिळते. हा ग्रंथ धार्मिक विधीविधान, वेदोपनिषदे, ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र व सायन्स टेक्नॉलॉजी तसेच बांधकामातील विविध टप्पे या सर्व गोष्टींवर प्रकाश टाकणारा आहे. स्वर्णपॉलिशयुक्त वैदिक वास्तुदोष निवारक यंत्रे, रत्ने, दुर्लभ ज्योतिषीय सामग्रीची रंगीत छायाचित्रेही या ग्रंथात आहेत. ग्रंथातील सर्व प्रकरणे प्रत्येक क्षेत्रातील नामवंत व्यक्तींकडून, तज्ज्ञांकडून तपासून घेतलेली आहेत. शेती, कारखाना, दुकाने, भाड्याचे घर यामध्ये वास्तुशास्त्रानुसार योग्य ते बदल करून कुटुंबाला ऐश्वर्यसंपन्नता, यश, सन्मान, कीर्ती, मानसिक शांती व निरोगी प्रकृती लाभावी. भारत पुन्हा एकदा सुजलाम् सुफलाम् सस्यशामलाम् सामर्थ्यशाली व समृद्ध व्हावा. हीच श्री लक्ष्मी नारायणाच्या चरणी प्रार्थना.
YOUTUBE
No Records Found
No Records Found
Keywords
#ARCHITECTURE #ARCHITECTURALSTRUCTURE& DESIGN #ARCHITECTURE PROFESSIONAL PRACTICE #RESIDENTIAL BUILDINGS, DOMESTIC BUILDINGS #PROFESSIONAL INTERIOR DESIGN #LANDSCAPE ART & ARCHITECTURE
Customer Reviews
  • Rating StarDAINIK AIKYA 15-04-2007

    सुखी-समाधानी वास्तूसाठी... नवीन घर बांधल्यावर किंवा सदनिका घेतल्यावर वास्तुशाती करायची आपली प्राचीन परंपरा आहे. ही वास्तू आपल्याला लाभावी, घरातल्या सर्वांना सुख समाधान मिळावे, घरातील काही दोष असल्यास त्याचे निराकरण व्हावे, यासाठीच वास्तुशांती केली जते. आपल्या प्राचीन भारतीयांनी सुखी-समाधानी वास्तू कशी बांधावी, याचा शास्त्रीय अभ्यास करून वास्तुशास्त्राची ही निर्मिती केली आहे. संस्कृतमध्ये वास्तुशास्त्रावरचे ग्रंथही उपलब्ध आहेत. पण अलीकडच्या काळात सिमेंट काँक्रिटची इमारत बांधताना प्राचीन भारतीय वास्तुशास्त्राचा विचार केला जात नाही. प्लॉट विकत घेतानाही तो कसा असावा, याची नियमावलीच प्राचीन भारतीय वास्तुशास्त्राने सांगून ठेवली आहे. या वास्तुशास्त्राचा अभ्यास करून, त्यातील नियम पाळून वास्तू बांधल्यास ती नक्कीच लाभते, असा अनेकांचा अनुभव आहे. वास्तुशास्त्रज्ञ अजित राजाराम जाधव यांनी अथक परिश्रमाने आणि अभ्यास करून वास्तु अजित हा ग्रंथ सुखी वास्तू कशी असावी, याचे मार्गदर्शन सामान्यांना व्हावे, यासाठीच लिहिला आहे. अभियंता असलेले जाधव पूर्वी प्लॉटच्या खरेदी विक्रीचा व्यवसाय करीत असत. एका प्लॉटच्या खरेदीच्या व्यवहारात त्यांना आलेला अनुभव अत्यंत त्रासदायक आणि उद्वेग आणणारा होता. तो प्लॉट अत्यंत चांगला असतानाही एका तथाकथित शास्त्री पंडिताने त्या प्लॉटला विदिशा नावाचा रोग झाल्याचे सांगून तो प्लॉट संबंधिताला विकायला लावला होता. या प्रसंगाने जाधव यांनी वास्तुशास्त्राचा अभ्यास सुरू केला. प्राचीन भारतीय वास्तुशास्त्राचा पूर्णपणे अभ्यास करतानाच, त्यांनी तथाकथित वास्तुशास्त्र सामान्य जनतेला कसे फसवतात, लुबाडतात याचाही अभ्यास केला. कोणताही प्लॉट त्रिकोणी, चौकोनी किंवा खोलगट असला म्हणजे पूर्णपणे दोषी नसतो. या प्लॉटवर शास्त्रीय उपाययोजना करता येते. ती केल्यावर या प्लॉटमधील दोषांचे निराकरण होते, असे जाधव यांनी सांगून ठेवले आहे. कोणत्याही परिस्थितीत तुम्ही फसू नका, असा सर्वसामान्य जनतेला त्यांनी कळवळून आवाहन केले आहे. त्यांनी स्वत:चाच अनुभव देवून, घर बांधाऱ्यांना जागे करायसाठीच हा ग्रंथ लिहिला आहे, हे लक्षात घ्यायला हवे. प्लॉट खरेदी कसा करावा, त्याची किंमत काय असेल, याचे मार्गदर्शन कतानाच त्यांनी पुराणोक्त वास्तुपुरुषाची उत्पत्ती कथा, प्राचीन ऋषीमुनींचे वास्तुशास्त्रावरचे संशोधन, भारतातील वास्तुग्रंथकार, वास्तू व पंचमहाभूतांचे गायत्री मंत्र यांचाही तपशील दिला आहे. सूर्यमाला वास्तू, प्लॉट आणि दिशांची विभागणी कशी करावी, योग्य आणि अनिष्ट बाबी कोणत्या, कोणत्या दिशेला घरातील कोणत्या खोल्या असाव्यात, याचा तपशीलही त्यांनी दिला आहे. वैदिक वास्तू समिती आणि ज्योतिषशास्त्र यांचा परस्पर संबंध, शुभ नक्षत्रे वास्तूचे नक्षत्र, वास्तूचा योग, वास्तू आणि शुभ, अशुभ आय हे सारे त्यांनी समजून दिले आहे. प्लॉटची खरेदी करताना कोणकोणती दक्षता पाळावी, व्यवहार कसा सांभाळावा, प्लॉटचे रस्ते, प्लॉटचे प्रकार, प्लॉटचे वाढलेले किंवा कट झालेले कोपरे, या कोपऱ्यांच्या दोषांचे निराकरण कसे करावे, ते निवारण केले नाही तर होणारा त्रास, प्लॉटचा आणि जमिनीचा चढ उतार याबाबत जाधव यांनी अत्यंत उपयुक्त माहिती दिली आहे. कोणत्याही प्रकारे ग्राहकाने इस्टेट एजंट किंवा प्लॉटचे खरेदी विक्री करणाऱ्या धंदेवाईकाकडून फसू नये, यासाठीच त्यांनी प्लॉट खरेदी करताना पूर्णपणे दक्षता घ्यावी, अशा सूचना दिल्या आहेत. जाधव स्वत: अभियंता तर आहेतच पण त्याशिवाय इमारतींची बांधकामेही त्यांनी पूर्ण केली आहेत. त्यामुळेच घर, व्यवसायाची वास्तू, कारखान्याची वास्तू कशी असावी, याचे मार्गदर्शन त्यांनी अत्यंत अचूकपणे आणि मोजमापासह केले आहे. या ग्रंथात त्यांनी घराचे प्लॅनही दिले आहेत. घराचे कंपाऊंड वॉल कोणत्या दिशेला असावे, ते कसे असावे, त्याची रचना कशी असावी? वास्तुशास्त्रानुसार वास्तूचे बांधकाम सुरू करण्यापूर्वी कोणकोणत्या बाबींची पूर्तता करून घ्यावी. अशुभ परिणामांपासून प्लॉटची सुटका कशी असावी? वास्तुशास्त्रानुसार वास्तूचे बांधकाम सुरू करण्यापूर्वी कोणकोणत्या बाबींची पूर्तता करून घ्यावी, अशुभ परिणामांपासून प्लॉटची प्लॉटची सुटका कशी करून घ्यावी? वास्तूची कुंडली, वास्तूचे भूमिपूजन कोणत्या मुहूर्तावर करावे? वास्तूची अती मर्मस्थाने, वास्तूतील खिडक्या कशा असाव्यात. स्वयंपाकघर कोठे असावे, शयनकक्ष कोणत्या दिशेला असावे, बाथरूम, जिने, देव्हारा कोठे असावा? आणि ही रचना का असावी? याचे विवेचनही त्यांनी प्राचीन भारतीय वास्तुशास्त्रानुसार केले आहे. वास्तू कशी नसावी आणि रचना सदोष कशी नसावी? हेही त्यांनी सांगितले आहे. वास्तूतील हॉल कसा असावा, कोणत्या उंचीवर खिडक्या असाव्यात, भरपूर सूर्यप्रकाश येण्यासाठी खिडक्यांची रचना आणि त्यांचा आकार कसा असावा, मुख्य दरवाजाची उंची आणि त्याची रचना मुख्य दरवाजाच्या चौकटीवर गणपतीची मूर्ती का असावी? निसर्ग चित्र कोणते लावावे आणि ते का? याचेही शंका समाधान जाधव यांनी केलेले आहे. स्वयंपाकघराची रचना तर त्यांनी अत्यंत तपशीलवार दिली आहे. गोमुखी प्लॉट, विथिशुला, विथुशुलतेवर शास्त्रोक्त मत या ग्रंथात आहे. बांधकामाचे साहित्य कोणते आणि कसे वापरावे, साहित्य घेताना कोणती काळजी घ्यावी हेही जाधव आवर्जून सांगतात. नवीन वास्तू बांधताना आर्किटेक्ट इंजिनिअरला आपल्या आर्थिक कुवतीची माहिती द्यावी. तो आपल्या घराचे बांधकाम अत्यंत दर्जेदार आणि आर्थिक बजेटमध्ये करील. नव्या घरासाठी कोणत्याही परिस्थितीत जुने दरवाजे, खिडक्या आणि अन्य वस्तू वापरू नयेत. या वस्तू ज्या वास्तूतून आल्या असतात. त्या वास्तू शापित असल्यास त्या वास्तूचे शापित गुण त्या वास्तूतही येवू शकतात. त्यामुळे नवीन वास्तूत जुने साहित्य वापरू नये, असा त्यांचा सल्ला आहे. टाईल्स कोणत्या आणि कोणत्या रंगाच्या असाव्यात, वास्तुवेध म्हणजे काय? देव्हाऱ्याची रचना, देवपूजा कशी करावी? वास्तूचे छत, वास्तूमधील खिडक्या, अडगळीची खोली, वॉचमन रुम, गाडीचे पार्किंग, जिन्याची रचना, वास्तूचे आणि खोलीचे रंगकाम, वास्तूचे मजले, याबाबतही जाधव यांनी ग्राहकांना अत्यंत अनुभविक आणि शास्त्रीय सल्ला दिला आहे. शहरी भागात आता अपार्टमेंट मधील किंवा मोठ्या उंच बिल्डिंगमधील फ्लॅट विकत घेण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. कारण स्वतंत्र प्लॉट घेवून, तेथे बंगला बांधण्याएवढी ऐपत सर्वसामान्य लोकांची नसते. त्यामुळेच फ्लॅट खरेदी करणे सामान्यांना परवडते. अपार्टमेंटचे बांधकामही वास्तुशास्त्रानुसार कसे करावे? फ्लॅटच्या बांधकामाचा दर काय असेल, फ्लॅट बुकिंग करताना आणि ताबा घेताना ग्राहकाने कोणती काळजी घ्यावी, आपली फसवणूक केली जाते, फ्लॅटधारकाला लुबाडले जाते. त्याचा तपशीलही जाधव यांनी मुद्दाम दिला आहे. फ्लॅटचा सुपर बिल्टअप फायदा किती टक्के असतो? पण सुपर बिल्टअपमध्ये बिल्डरचा फायदा कसा होतो, हे ही त्यांनी स्पष्ट केले आहे. जुळे बंगले आणि ओळीने बंगले, दुकाने, दुकानगाळा, कारखान्याची रचना, प्लॉटमधील वृक्ष, शेती आणि वास्तुशास्त्र, शेताचे बांध कसे असावेत, वास्तू शापित कशी बनते, वास्तुशास्त्रज्ञ कसा असावा, शकुनाचे महत्त्व, भूमीपूजनाची वेळ का चुकवू नये? त्याची कारणे कोणती, हे जाधव यांनी सांगितले आहे. वास्तुशास्त्रानुसार सुखशांतीसाठी सुवर्ण पॉलिश युक्त दुर्लभ दैविंक यंत्रे, आणि ज्योतिषीय वस्तू वापरल्यामुळे कोणता फायदा होतो, याचेही शास्त्रीय विवेचन जाधव यांनी केले आहे. प्राचीन वास्तुशास्त्र आणि आधुनिक वास्तूशास्त्र यांचा मेळ घालून वास्तु सुखी आणि समाधानी कशी मिळेल हे समजावून सांगण्यात जाधव यशस्वी ठरले आहेत. घर बांधण्यापूर्वी, विकत घेण्यापूर्वी, संबंधितांनी हा ग्रंथ आवर्जून वाचावा आणि संग्रही ठेवावा असा आहे. -सौ. वैजयंती कुलकर्णी ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more