* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE MAD TIBETIAN
  • Availability : Available
  • Translators : SUNANDA AMRAPURKAR
  • ISBN : 9789386342263
  • Edition : 1
  • Publishing Year : JANUARY 2017
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 136
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : SHORT STORIES
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS IS THE MAIDEN ANTHOLOGY BY DEEPTI NAVAL, THE CRITICALLY ACCLAIMED ACTOR, PAINTER, DIRECTOR AND POET. EACH STORY IN THIS ANTHOLOGY CARRIES A VISUAL AND EMOTIONAL IMPACT AND VIVACITY OF A FILM. WHILE THULLI DRAWS YOU DEEP INTO THE SORDID AND BLEAK LIFE OF A PROSTITUTE IN KAMATHIPURA IN MUMBAI, THE PIANO TUNER GENTLY TUGS AT THE HEART WITH MUSIC. RUTH MAYBERRY INSPIRES WITH HER NEVER-SAY-DIE SPIRIT, YET GRAPPLES WITH LONELINESS. THE MORNING AFTER, THE MAD TIBETAN, PREMONITION, SISTERS, BIRDS ARE ALL FACETS OF LIFE ITSELF - EACH SPEAKS IN A VOICE THAT IS RESONANT OF HOPE, LOVE AND JOY OF ANOTHER DAY.
दीप्ती नवल या एक उत्तम अभिनेत्री म्हणून सर्वांना परिचित आहेत. त्यांनी आपलं अनुभवविश्व ‘द मॅड तिबेटियन’ या पुस्तकात कथारूपाने/लेखांच्या रूपाने चित्रित केलं आहे. ‘पियानो ट्युनर’ ही एका वृद्ध पियानो वादकाची कथा आहे. वयोमानामुळे तो पियानो वाजवू शकत नाही, त्याची अगतिकता आणि तरुणपणातील त्याच्या एका स्मृतीतून त्याला मिळणारा दिलासा, याचं संमिश्र चित्र या कथेतून प्रभावीपणे चित्रित केलं आहे. थर ‘दोघी बहिणी’ कथेतून गिनी आणि बनी या दोन बहिणींचं जगणं समोरं येतं. केवळ आई नसल्यामुळे या मुलींचं भावविश्व कसं उद्ध्वस्तझालंय हे एकाच घटनेतून ठाशीवपणे पुढे येतं. ‘अघटिताची चाहूल’ ही कथा वास या तरुणाचा मनोव्यापार अधोरेखित करते. थर ‘पाखरं’ लेखिकेची पाखरांबाबतची संवेद्यता मांडते. ‘मुंबई सेंट्रल’, ‘नवी सकाळ’, ‘द...द...दामन’, ‘द मॅड तिबेटियन’, ‘थुल्ली’ या कथा असचं नवल यांचं भावविश्वं उलगडतात. एवूÂण या कथा आणि अनुभव यातून मानवी मनाचे वंÂगोरे लेखिकेने टिपले आहेत. व्यक्तिचित्रांच्या कुशल रेखाटनातून जीवनाचं वास्तव दर्शन लेखिकेने घडवलं आहे. या कथा आणि अनुभव मुळातून वाचण्यासारखे आहेत.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
THE MAD TIBETAN #DEEPTI NAVAL THE PIANO TUNER# SISTERS# PREMONITION, BIRDS# BOMBAY CENTRAL# THE MORNING AFTER# THE MAD TIBETAN# D# THULLI# BALRAJ SAHANI# RUTH MAYBERRY SUNANDA AMRAPURKAR
Customer Reviews
  • Rating StarVijay Nimbalkar

    कुंटणखाण्यातील वेश्या, त्यांची दलाली करणारे भडवे, त्यांच्यावर निगराणी ठेवणारी मालकीण, त्या वस्तीचा दादा आणि वासनेची आग विझवायला तिथे जाणारी सभ्य समाजातली गिर्‍हाईकं. सभ्यता व संस्कारांना नागडं करून त्यांचं प्रदर्शन मांडणारी ही दुनिया. त्या दुनियेचं बलणं, चालणं, वागणं सगळं कसं अंगावर येणारं. रेड लाईट एरियाला भेट द्यायची तर मनाची भक्कम तयारी हवी. मुंबईच्या फाॅकलंड परिसरातली वेश्यावस्ती. चार जणांना घेऊन एक अँबेसिडर त्या भागात पाच चकरा मारते व शेवटी एका ठिकाणी थांबते. तोकडे कपडे, भडक मेकअप, तोंडात अर्वाच्य शिव्या असलेली एक उत्तान पोरगी गिऱ्हाईकांना पागल करणारे हावभाव करत कडेला उभी असते. अ‍ॅम्बेसिडरचा ड्रायव्हर तिच्याकडे पाहतोय हे लक्षात येताच एक दलाल गाडीजवळ येऊन काच खाली करायला सांगतो. ‘क्या मंगता है साऽब? बोलो ना! एकदम झकास माल देगा! तुम लोग के स्टँडर्ड का, साब!’ दलालाने प्रस्ताव दिला पण त्याच्या बोलण्यावर गाडीतल्या लोकांना काय बोलावं ते सुचलं नाही. ‘क्या बोलते साब? तीनों को ले लेगी! मंगता क्या?’ त्या वेश्येकडे बघत दलालाने या तिघांना डोळा मारला आणि गाडीतले तिन्ही पुरूष तोंड लपवून खाली बघू लागले. गाडीतल्या पुरुषांपैकी एक चित्रपट दिग्दर्शक तर दुसरे दोन अभिनेते होते. दलालाच्या बोलण्याने ते शरमिंदा झालेले. त्या वस्तीत ते `तसल्या` कामासाठी आले नव्हते. तेवढ्यात दलालाचं लक्ष गाडीत बसलेल्या, तोंडाला स्कार्फ गुंडाळलेल्या स्त्रीकडे गेलं. ‘बाजू में एक धरेली है, फिर भी इधरीच घूम रहेले साले!’ दलालाची शिवी त्या स्त्रीच्या जिव्हारी लागली. आणि ती स्त्री होती अभिनेत्री दीप्ती नवल. तिच्या बरोबर गाडीत बसलेल्या पुरुषांमध्ये एक होता तिच्या `चिरूथा` नावाच्या चित्रपटाचा दिग्दर्शक तन्वीर तर दुसरे पुरूष त्याच चित्रपटातील तिचे सहअभिनेते होते. विकृत शेवट असलेल्या एका घटनेविषयी दीप्तीने वर्तमानपत्रात वाचलेलं. एका वेश्येच्या आयुष्यात घडलेल्या त्या घटनेचा विषय अतिशय संवेदनशील व अस्वस्थ करणारा होता. त्या घटनेचं कात्रण दीप्तीने तन्वीरला दाखवलं आणि त्यांनी त्या विषयावर चित्रपट बनवायचं ठरवलं. पण वेश्येची भूमिका करण्याअगोदर आपण स्वतः वेश्यावस्तीत जाऊन, एखाद्या वेश्येला भेटून, तिच्याशी चर्चा करून ती भूमिका साकारावी असं दीप्तीला वाटलं. त्यासाठीच ते चौघे पावसाच्या रात्री त्या वेश्यावस्तीत आलेले. प्रसिध्द अभिनेत्री असल्याने तसंच तिथले लोक ओळखत असल्याने दीप्तीला एका वेश्येच्या खोलीत प्रवेश मिळाला. तिचं नाव थुल्ली. अंधारी, अतिशय छोटी खोली. उजेड नावालाच. हवा येण्या-जाण्यासाठी एकही खिडकी नाही. अस्वच्छ, घाणेरडी जागा. दीप्ती खोलीत आली त्यावेळी रात्रीचे तीन वाजलेले. थुल्ली, खोलीची मालकीण, खिडकीत बसलेली तर तिच्या देखरेखीखाली शरीरविक्रय करणाऱ्या नऊ वेश्या भुईवर आडव्या तिडव्या झोपलेल्या. त्या वेश्यांत दहा-बारा वर्षांच्या मुलीही होत्या. खोलीत दोन छोट्या खाटा मांडलेल्या. जागा इतकी अपुरी की नऊ पोरी एकमेकींत हात पाय अडकवून झोपल्यावर तिथे फुटभरही जागा शिल्लक नव्हती. थुल्ली व दीप्तीमध्ये गप्पा सुरू झाल्या. `आणि... ते पुरुष आल्यावर कुठे झोपतात?` दीप्तीने बिचकत विचारलं. `इथेच! एका वेळी दोन बेडवर दोन!` थुल्ली सहज बोलली. `एखाद्या कष्टमरला घाई असली की माझी पोरगी त्याला जिन्यातच घेते.` `हे सगळं चालतं त्यावेळी तुम्ही कुठे जाता?` मती गुंग झालेल्या दीप्तीने पुढचा प्रश्न विचारला. `कुठं जाणार? इथंच असतो! एखादी बाई खाटेवर गिऱ्हाईक घेत असली की त्याच खाटेखाली दुसरी पोरगी खेळत असते...` `काय?` थुल्लीला मध्येच थांबवत दिप्तीने विचारलं. `तुम्हाला `ते` आवाज येत नाहीत का?` `सगळे आवाज येतात! त्यांचं आरडणं, ओरडणं, चित्कार, घाण बोलणं... आम्हाला त्याची सवय झालेय.` कान बंद करावेत, डोळे झाकावेत आणि असंच इथून पळून जावं असं दीप्तीला वाटलं. वेश्येच्या जीवनाचा अभ्यास करावा म्हणून तिथे आलेली दीप्ती प्रचंड अस्वस्थ झाली. अभिनेत्री होण्यासाठी दीप्ती अमेरिका सोडून मुंबईला आलेली तसंच थुल्लीलाही `तू सुंदर आहेस. पिच्चरमध्ये छोटी-मोठी काम देतो` म्हणून कुणीतरी मुंबईत आणलेलं. दोघीही कामासाठी मुंबईत आलेल्या स्त्रिया. पण त्यांचं जग किती भिन्न होतं. एक स्त्री म्हणून दीप्तीला थुल्लीची कहाणी ऐकवेना पण त्याच वेळी तिच्यातील अभिनेत्रीचं थुल्लीच्या जगाविषयीचं कुतूहल वाढलं होतं. पहाटेचे चार वाजले आणि खाली गोंधळ सुरू झाला. कुंटणखाण्याचा दादा जिन्याने वर येत होता. `तिथे येणाऱ्या प्रत्येक नव्या स्त्रीचा उपभोग घ्यायचा पहिला हक्क आपलाच` असं समजणारा दादा खोलीत आल्यावर काय होईल याची दीप्तीला कल्पना नव्हती. - विजय निंबाळकर, लोहगाव - पुणे #दमॅडतिबेटियन #दीप्तीनवल #सुनंदाअमरापूरकर #मेहतापब्लिशिंगहाऊस #कथासंग्रह ...Read more

  • Rating StarChitra Rajendra Joshi

    फेसबुकच्या आठवणींतून वर आलेली ही चार वर्षांपूर्वीची पोस्ट. त्यावेळी हा ग्रुप नव्हता बहुधा, म्हणून इथे देत आहे. ------------------------ द मॅड तिबेटियन.. गोष्टी तेव्हाच्या आणि आत्ताच्या! दीप्ती नवल - अनुवाद: सुनंदा अमरापूरकर - मेहता पब्लिशिं हाऊस - प्रथमावृत्ती: जानेवारी २०१७ - किंमत: रु.१५०/- पृष्ठे:१३० कोणताही कथासंग्रह वाचताना त्या कथा `कोणी` लिहिल्या आहेत याला कितीसं महत्त्व असावं-द्यावं? त्यातील कथाभाग काय आहे, त्या कशा मांडल्या-विस्तारल्या आहेत, त्यात ‘पुढे काय होणार’ अशी उत्सुकता वाटतेय, त्या गुंगवून ठेवताहेत की कंटाळवाण्या वाटताहेत, त्यातील मतितार्थ काय आहे ... कथांमधे निसर्ग आहे, शहरं आहेत, डोंगराळ भागातील गावं आहेत, वेगवेगळ्या वयाची-वातावरणातील माणसं आहेत. थोडक्या आणि प्रभावी शब्दांतील अनुभव वाचून आपल्याला आनंद मिळाला, आपल्या परिघात नसलेल्या पण आपल्याला नवीन वाटणार्‍या दुनियेचं दर्शन घडलं. हे पुरेसं न ठरता त्या `कोणी` लिहिल्या आहेत याचं इतकं महत्त्व का वाटतं? लेखिका जर झगमगत्या चित्रपट दुनियेतील सुप्रसिध्द अभिनेत्री शिवाय आवडतीही असेल तर कुतूहल जरा जास्तच जागं होतं. अभिनेत्री, चित्रकार, फोटोग्राफर, कवयित्री आणि कथालेखिका दीप्ती नवल. ती अभिनय-दिग्दर्शन करते, पेंटिंग करते, फोटोग्राफी करते, तिला कविता होतात आणि ती कथा लिहिते. मनातली अभिव्यक्तीसाठी निरनिराळ्या माध्यमांवर तिचं प्रभुत्व आहे. ‘लम्हा लम्हा’ हा आसावरी काकडे यांनी मराठीत अनुवादित केलेला कवितासंग्रह आणि नुकताच वाचलेला, सुनंदा अमरापूरकरांनी मराठीत अनुवाद केलेला कथासंग्रह - द मॅड तिबेटियन.. गोष्टी तेव्हाच्या आणि आत्ताच्या! हे दोन्ही वाचल्यानंतर प्रश्न पडला - ह्यातील कोणती दीप्ती नवल जास्त आवडते? दृश्य माध्यमातून निरनिराळ्या भूमिका साकारणारी की थोडक्या शब्दांतील कवितांतून स्वत:च्या भावनांना मोकळं करणारी की कथांतून ‘तेव्हाच्या आणि आत्ताच्या’ गोष्टी सांगणारी? ह्याचं साधं सोपं उत्तर इतकंच आहे की प्रत्येक माध्यमातून अस्सलपणे व्यक्त होणारी दीप्ती नवल आवडली/ आवडते. तिची एक कविता आहे, ‘आठवणी’. त्या ‘आठवणीं’ना काळाचं बंधन नाही, त्यांत इंद्रधनुष्याप्रमाणे रंगीबेरंगी असणार्‍या सुंदर गाठीभेटी आहेत, हरवलेली स्मितं-विखुरलेल्या प्रतिमा आहेत. हिरवेगार डोंगरघाट अन त्यात थांबून थांबून पडणारा पाऊस आहे. आणि ह्याच आठवणींचा विस्तार म्हणजे ‘द मॅड तिबेटियन.. गोष्टी तेव्हाच्या आणि आत्ताच्या!’ आहेत. एकूण अकरा कथांचा हा संग्रह! लेखिकेच्या नजरेने टिपलेलं आणि नेटकेपणे साकारलेलं मुंबई, लडाख, दिल्ली, उ. हिंदुस्थान अशा अनेक ठिकाणी वास्तव्य करणार्‍या माणसांचं जगणं जसं ह्यात आहे तद्वतच आत्मकथनाप्रमाणे वाटणारे खास अनुभवही कथा-रूपाने व्यक्त झाले आहेत. देहबोली अथवा शब्दबोलीतून भूमिका साकारणे हे ह्या कलावतीत मुरलेलं आहे. चित्रपटाच्या पटकथेप्रमाणे दिग्दर्शकाच्या मार्गदर्शनाखाली निरनिराळ्या व्यक्तिरेखांच्या भूमिका साकारताना त्यांच्यात देहप्रवेश करणे असो वा कथेनुसार त्या-त्या व्यक्तिरेखांचा विस्तार करण्यासाठी शब्दांच्या माध्यमातून त्यांच्यात शिरणे असो. ‘सहजता’ हा उपजत स्वभाव तिच्या प्रत्येक आविष्कारात आहेच आहे. कामाठीपुर्‍यातील दोन खोल्या-चार खाटा यावर कुंटणखाना चालवणारी मूळ नेपाळची असणारी ‘थुल्ली’. ती निव्वळ एक वेश्या नव्हे तर एक स्त्री म्हणून असणारी तिची अगतिकता ह्या कथेत सार्थ व्यक्त झाली आहे. एका सिनेमात वेश्येच्या भूमिकेचा पूर्वाभ्यास करण्यासाठी लेखिका तिला थेट तिकडेच जाऊन भेटते. अंदाधुंदपणे कोसळणार्‍या मुसळधार पावसातून आपल्या तीन पुरूष सहकार्‍यांसह उपनगरातून ती निघते. कामाठीपुर्‍यात वाटा चुकत, रस्ता शोधत, रात्री अपरात्री थुल्लीच्या खोल्यांवर पोचते. लेखिका एकटीच आत जाऊन थुल्लीशी गप्पा मारते, तिच्या व्यवसायाची(!) माहिती घेत रहाते. तिथून निघेपर्यंत उशीर होत रहातो, जवळ-जवळ पहाट होते. त्याच वेळी कुंटणखान्याचा तथाकथित मालक असलेला दादा दारू पिरून झिंगलेल्या अवस्थेत पोचतो. कुणी नवीन पाखरू इथे आलाय अशी त्याला कुणकुण लागलेली असते. त्याच्यापासून वाचण्यासाठी लेखिकेला अक्षरश: तिथून पळ काढावा लागतो. तिला तिथून निसटता यावं यासाठी थुल्ली जे काही करते ते वाचताना आपलाही जीव थुल्लीसाठी व्याकुळतो. दिल्लीत अत्यंत घाई-गडबडीत असताना शाळेतील एक जुनी मैत्रीण भेटते. लेखिका तिला ओळखते. तिच्याशी बोलताना एकीकडे तिचं नाव खूप प्रयत्न करूनही लेखिकेला आठवत नाही. ‘ही आता मोठी अभिनेत्री झालीये तरीही आपली ओळख ठेवतेय. परंतु हिला आपलं नावही आठवत नाही म्हणजे ही आपल्याला विसरली आणि तोंडदेखलेपणाने ती आपल्याशी बोलतेय’ असं समजून ती मैत्रीण नाराज होत ‘सॉरी, तुमचा वेळ घेतला’ असं म्हणून निघून गेल्यानंतर लेखिकेला काही क्षणांतच तिचं नाव आठवतं आणि ती हाका मारते तोवर मैत्रीण निघून गेलेली असते. ओशाळून गेलेली लेखिका आपल्या मनाशी विचार करत रहाते की मी खोटी ओळख दिली का? माणसांच्या अति वावरापासून अजूनही बर्‍यापैकी दूर असलेला लेह-लडाखचा पहाडी-बर्फाळ-रंगीबेरंगी निसर्ग आणि तिथल्या एकांतवासात अवचितपणे भेटलेला द मॅड तिबेटियन.. न्योनबा! ह्या कथेतील गूढता शेवटपर्यंत टिकवून ठेवण्यात लेखिका यशस्वी झाली आहे. ३ नोव्हेंबर १९६३. दीप्ती नवल नऊ वर्षांची होती. तिच्या गावात, अमृतसर, बलराज साहनींना नाटकात बघण्याची, त्यांची सही घेण्याची संधी तिला मिळाली आणि त्याचवेळी तिचा निश्चय झाला की - ‘मी बलराज साहनीसारखी रुबाबदार होणार.. त्याच्यासारखीच तरल.. कुठलीही भूमिका केली किंवा आयुष्यात काहीही केलं, तरी ते अस्सल असेल. मी अभिनेत्री झाले तर बलराज साहनीसारखी होणार, अस्सल!’ तिने अंमलात आणलेला हा निश्चय, तिचं ‘अस्सलपण’ जसं आपण तिच्या सगळयाच चित्रपटांमधून अनुभवलेलं आहे तेच तिच्या कविता-कथांमधून झिरपलेलं आहे. चित्रा राजेन्द्र जोशी.... 9.5.2017 ...Read more

  • Rating StarKiran Borkar

    सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि चित्रकार दीप्ती नवल यांचा हा कथासंग्रह .यातील कथा छोट्या आहेत .पण त्या वाचताना आपण त्यात गुंतून जातो .जणूकाही आपल्याच आजूबाजूला घडणाऱ्या या गोष्टी आहेत.त्यांच्या पियानो ट्युनर मधील हताश म्हातारा .तर डोके भादरले म्हणून सैरभैर ालेल्या दोन छोट्या बहिणी .अपघाताची जाणीव झालेला आणि स्वतःला वाचविण्याचा प्रयत्न करणारा तरुण.या कथा वाचून मन हेलावून जाते . ...Read more

  • Rating StarSAPTAHIK SAKAL 12-08-2017

    ठसा उमटवणाऱ्या कथा... दीप्ती नवल एक संवेदनशील अभिनेत्री, चित्रकार, कवयित्री आणि लेखिका. १९८०च्या सुमारास आलेल्या ‘चष्मेबद्दूर’ सिनेमातील तीच ती मिस चमको... हिंदी चित्रपटसृष्टीतील आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रत्येक भूमिकेवर एक उत्कट ठसा उमटवणारी अभिने्री. अमेरिकेत राहून फाइनआर्टचे शिक्षण घेतलेली. तरुणपणीच ‘लम्हा लम्हा’ सारख्या रोमन्टिक मूड टिपणाऱ्या कविता लिहिणारी आणि आता आपली चित्रकाराची आणि फोटोग्राफीची नजर घेऊन, आयुष्याची गुंतागुंत जाणत शब्दातून कथा उभी करणारी दीप्ती नवल ‘द मॅड तिबेटियन’ या कथासंग्रहात भेटते आहे. तिच्या शैलीचा उत्कट स्वर सुनंदा अमरापूरकर यांनी मराठी अनुवादात उत्तम उमटवला आहे. खूप वेळा सेलिब्रेटीजनी लिहिलेल्या लेखनाचे स्वरूप त्यांच्या चाहत्यांनी कौतुकाने वाचावे इतपतच असते किंवा त्यांच्या स्वत:च्या प्रमोशनचा भाग असते. साहित्य म्हणून त्याचा विचार करण्याइतके त्याचे आयुष्य नसते. पण दीप्ती नवल यांच्या लेखनाचे छोटेखानी अवकाशाची ताकद ओळखून त्यांचे शब्द कधी एखाद्या व्यक्तीच्या भावना, मनातील स्पंदनं, आशा, प्रेम, आनंद, एकाकीपणा, जगण्याचा परीघ दाखवत जातात. वृत्तीची काव्यात्मता, प्रवासीपण, सिनेमा तंत्राचा प्रभाव या गोटींनी त्यांची शैली घडवलेली आहे असे म्हणण्यापेक्षा ही शैली सहज घडली आहे असे म्हणणे योग्य ठरेल. एकेकाळच्या उत्तम पियानो वादक आणि आजचा ‘पियानोट्यूनर’, आयुष्याच्या एकटेपणाची चौकट बांधली गेल्यावरही आपल्यापुढे ठसा ठेवतो तो एका निर्धाराचा! ‘अघटिताची चाहूल’ लागलेला तरुण प्रवासी अघटित घडून गेल्यावर ‘ती’ वाचत असलेले पुस्तक दडपण्यासाठी धडपडतो. ‘ती’ तर गेली, तिचं नावही कळणार नाही आता, पण तिचे पुस्तक सुरक्षित होतं, तो पान उघडून पाहतो तर त्या यु. आर. अनंतमूर्तींच्या कथा असतात. ‘दोघी बहिणी’च्या मनातली आई परत येईल ही आशा स्वातंत्र्यापेक्षा मोठी ठरते. ‘मुंबई सेंट्रल’ कथेतील सोळा वर्षाच्या मुलाला अचानक मोठा करून गेलेला अनुभव. एका रात्रीत लीलीच्या आयुष्यात सुरू झालेली नवी सकाळ आणि नवा दिवस. खूप घाई-गर्दीच्या दिवसात केवळ वेळेवर नाव न आठवल्याने दुखावून दूर गेलेली ‘द... द... दामन’ या कथा एका ओघात वाचकांना बरोबर नेतात. ‘द मॅड तिबेटियन’, ‘थुल्ली’, ‘बलराज साहनी’, ‘रुथ मेबेरी’ या कथा खास दीप्ती नवलचा स्पेशल टच ठळक करतात. लडाखच्या दऱ्या-खोऱ्यात फोटोग्राफीसाठी भटकंती करताना भेटलेला ‘द मॅड तिबेटियन’ त्याला भेटण्याचा क्षण कॅमेऱ्यात बंदिस्त करणं म्हणजे अन्याय केल्यासारखेच. त्याच्या या मॅडपणातली स्वभावाची आनंदी फकिरी छटा कॅमेऱ्यात कशी पकडता येणार म्हणून शब्दबद्ध झालेली. तर भूमिकेचा अभ्यास करण्यासाठी मुंबईच्या कामाठीपुऱ्यात गेल्यावर भेटलेली ‘थुल्ली’ एक स्त्री म्हणून नातं जोडताना मानवी संबंधाचे विस्कटलेले समीकरणच समोर ठेवून थक्क करते. ‘रुथ मेबेरी’ ही एका पटकथा लेखिकेची अशीच सुन्न करणारी कहाणी. सतरा वर्षे एका पटकथेचं लेखन करणारी रुथ, तिची लेखननिष्ठा (जीवननिष्ठा?), तिचे उतारवयाने येत चाललेले एकाकीपण, काहीसे विक्षिप्तपण, तिला एक्झिट घेण्याची वेळ आल्याची झालेली जाणीव आणि सर्व डिलीट करून टाकण्याचा निर्णय, त्याचा भोवतालच्या जगावर एखादा तरंगही न उठणं जगाच्या संवेदनशीलतेलाच प्रश्न करते. उत्कट जाणिवेच्या प्रवासाला नेणाऱ्या कथांचा वाचनीय असा कथासंग्रह. -आशा साठे ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more