* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: SUKHACHA LAPANDAV
  • Availability : Available
  • ISBN : 9789394258853
  • Edition : 3
  • Publishing Year : 1945
  • Weight : 500.00 gms
  • Pages : 188
  • Language : MARATHI
  • Category : NOVEL
  • Available in Combos :B.D.KHER COMBO SET- 17 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
FAMOUS AUTHOR B. D. KHER`S NOVEL `SUKHACHA LAPANDAV` IS A TRAGEDY OF LOVE TRIANGLE. WELL-EDUCATED YOUNG MAN KUMAR WHO FAITHFULLY PARTICIPATED IN THE RSS, INSPIRED BY DR. HEDGEWAR. THIS IS THE LOVE STORY OF DR. SATISH, KUMAR AND PUSHPAMALA. KUMAR RESCUED HER FROM TROUBLE DURING A JOURNEY, SO PUSHPAMALA HAS FEELINGS FOR HIM. BUT STILL SHE REFUSES HIS LOVE FOR KUMAR`S EX-GIRLFRIEND MADHURI. AS A RESULT, HE WAS DEVASTATED AND SUDDENLY DISAPPEARED. EVEN SHE REFUSES DR. SATISH WHO LOVES HER SINCERELY. THE EVENTS IN THIS NOVEL HAVE A PRE-INDEPENDENCE BACKGROUND. THEREFORE, SOME NATIONAL MOVEMENTS AND NATIONAL DISASTERS HAVE BEEN PUT TO GOOD USE IN THE RELEVANT NARRATIVE. KHER`S WRITING STYLE IS SIMPLE AND CLEAR. AS A GAME OF THE FUTURE, THE BEGINNING AND THE END ARE MATCHED SO THAT THEY WILL FIT IN THE SAME DESCRIPTION EVEN WHILE TAKING DIFFERENT TURNS. READING A NOVEL KEEPS YOU ENTERTAINED UNTIL THE VERY END. HOWEVER, THE EFFECT OF THIS WORK OF ART IS TO MAKE THE READER THINK SERIOUSLY ABOUT THE PHILOSOPHY OF LIFE
प्रसिद्ध लेखक भा. द. खेर यांची ‘सुखाचा लपंडाव’ ही कादंबरी प्रेमत्रिकोनाची शोकांतिका म्हणता येईल अशा स्वरूपाची आहे. डॉ. हेडगेवार यांच्या प्रेरणेने संघकार्यात निष्ठेने भाग घेणारा सुखवस्तू व सुशिक्षित तरुण कुमार आणि चारचौघींसारखी दिसणारी, सर्वसाधारण मध्यमवर्गीय कुटुंबातील सुशील, सुस्वभावी कॉलेजयुवती पुष्पमाला तसेच गौर वर्णाचे, बंगाली वाटावेत असे सालस युवक डॉ. सतीश या तिघांची ही प्रेमकहाणी आहे. प्रवासादरम्यान संकटातून सोडवणारा कुमार पुष्पमालेला आपलासा वाटतो; परंतु कुमारची आधीपासूनची मैत्रीण माधुरीसाठी त्याच्या प्रेमाला पुष्पमालेनं नकार दिला; त्यामुळे त्याची दारुण निराशा होऊन तो एकाएकी नाहीसा झाला होता. तसेच तिच्यावर मनापासून प्रेम करणाNया डॉ. सतीशनांही (त्यांच्याविषयी आपल्या मनात केवळ आदरभाव आहे, असे सांगून) त्यांच्याबरोबर जाण्यास पुष्पमालेनं नकार दिला होता; त्यामुळे ते निराश होऊन व्यसनाच्या आहारी गेले होते. अर्थात कादंबरीची नायिका पुष्पमालेनं हे सारं दुःख स्वतःवर बुद्धिपुरस्सर ओढवून घेतलं होतं. आयुष्यात पुढे जे जे दुःखोपभोग तिच्या वाट्याला आले, त्याचं बीज तिच्या आणि कुमारच्या पहिल्या भेटीतच रोवलं गेलं होतं. यापुढील कथा तर आणखी हृदयद्रावक आहे. अचानक नाहीसा झालेला कुमार सैन्यात भरती होतो आणि युद्धात मारला जातो तर विवाहित स्त्रीला पूÂस लावून पळवल्याच्या आरोपावरून डॉ. सतीश यांना तुरुंगवास भोगावा लागतो. अर्थात पोलीस अधिकारी दादासाहेब यांनीच सूडभावनेनं डॉक्टरांविरुद्ध हा बनाव घडवून आणलेला असतो, कारण त्यांची मुलगी अचला हिच्या प्रेमाला डॉ. सतीश यांनी नकार दिलेला असतो. या सर्व घटना-प्रसंगांबद्दल विचार करताना पुष्पमालेला असं वाटू लागतं की, ‘या साNया अनर्थाला मुळात मीच कारणीभूत आहे. हाताशी आलेलं सुख गमावण्यात आपण वेडेपणा तर केला नाही? खोट्या अभिमानाला बळी पडून आपण आत्मवंचना तर केली नाही? असे प्रश्नही तिच्या मनात येतात. तीन वर्षांच्या अवधीत कित्येक वेळा खोट्या अभिमानाला बळी पडून हाती आलेलं सुख मी स्वतःहून दूर लोटलेलं आहे. मला आयुष्यात सुख लाभण्याऐवजी माझी आणि सुखाची वारंवार फारकतच होत गेली. जणू काही सुखाचा आणि माझा लपंडावच चालू आहे.’ अर्थात ही या कादंबरीची मध्यवर्ती कल्पना आहे या कादंबरीतील घटना-प्रसंगांना स्वातंत्र्यपूर्व काळाची पाश्र्वभूमी आहे; त्यामुळे काही राष्ट्रीय चळवळी आणि राष्ट्रीय आपत्ती यांचा प्रासंगिक कथानकात चांगल्या पद्धतीने उपयोग करून घेतलेला आहे. खेर यांची लेखनशैली सोपी व सुबोध आहे. भवितव्यतेचा खेळ म्हणून आदी आणि अंत विविध प्रकारची वळणे घेत असतानासुद्धा एकाच वर्णनात बसतील असे जुळवले आहेत. कादंबरी वाचताना अगदी अखेरपर्यंत मनोरंजन होत राहाते. मात्र, या कलाकृतीचा परिणाम वाचकाला जीवनविषयक तत्त्वज्ञानाचा गंभीरपणे विचार करावयास लावणारा आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#सुखाचालपंडाव #भा.द.खेर #कादंबरी #मराठीपुस्तके #मराठीप्रकाशक #मेहतापब्लिशिंगहाऊस #SUKHACHALAPANDAV #B.D.KHER #KADAMBARI #MARATHIBOOKS #ONLINEMARATHIBOOKS #TRANSLATEDMARATHIBOOKS #TBC #TRANSLATEDBOOKS@50% #MEHTAPUBLISHINGHOUSE "
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

राधेय.... लेखक रणजित देसाई... मित्र कसा असावा...कर्णासारखा दातृत्व कसं असावं...कर्णासारखं असा हा कर्ण... त्याला अंगराज म्हणावं, दान देणारा दाता म्हणावं, राधेय म्हणावं कि कौतेय... काहीही म्हणा पण कर्णासारखा दाता कर्णानंतर कधी झाला नाही आणि कधी होणरही नाही... रणजित देसाई लिखीत कर्णचरीत्र राधेय आज हातावेगळं झालं ते अश्रुभरल्या नयनांनी...ज्याचा अंत करायला स्वतः देवाधिदेव कृष्णाला अर्जुनाचं सारथ्य करावं लागलं यातच अंगराज कर्णांचं विरत्व अधोरेखीत होत आहे. जन्मापासुन ज्याला केवळ सुतपुत्र म्हणुन वागणुक मिळाली असा तो कर्ण स्वतःच्या बळावर इतका महान लढवय्या बनला. पुस्तकाच्या प्रास्ताविकात देसाईंनी म्हटलं आहे की राधेय मधला कर्ण महाभारतात शोधायची गरज नाही. प्रत्येकाच्या मनातच तो दडलेला असतो, कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत, तर त्यात हा कर्ण दिसेल. त्याचं दु:खं, पोरकेपण आणि त्यातून पार होवून एक अनोखी ऊंची गाठणारं त्याचं दातृत्व, व्यक्तित्व याचं एक भव्य, शोकात्म चित्र राधेय मधून उभं राहतं. राधेय या कादंबरीत रणजित देसाईंच्या शब्दांनी कर्णाची अनेक रुपे अनुभवता आली. त्यामध्ये राधाई आणि वृषाली सोबतचा कर्ण, दुर्यौधनासोबतचा कर्ण, कृष्णासोबतचा कर्ण, रणांगणावरचा कर्ण आणि नदीकाठी पाठमोरा ऊभा राहत दान करत असलेला कर्ण अशा अनेक रुपांनी प्रत्येकवेळी वेगळा भासला. वृषसेन आणि चक्रधराच्या मृत्युने हळवा झालेला कर्णही वाचकाच्या डोळ्यातही पाणी आणवतो... समोर मृत्यु दिसत असताना सुध्दा केवळ दिलेल्या वचनामुळे हातातील धनुष्याचा त्याग करुन शस्त्रहिन हेणारा कर्ण रणजित देसाईंच्या शब्दांमुळे आजन्म लक्षात राहील. कर्णासारखं होणं कुणालाही कदापि शक्य नाही पण त्यातला एखादा जरी चांगला गुण अंगी बाळगण्याचा प्रयत्न प्रत्येकाने नक्कीच केला पाहीजे... प्रत्येकाच्या संग्रही असावं आणि एकदा तरी वाचावं असं पुस्तक रणजित देसाई लिखीत...राधेय... © विश्वजित शिंत्रे. ...Read more

BAJIND
BAJIND by PAHILWAN GANESH MANUGADE Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

काही पुस्तकं अशी असतात कि कितीही वेळा वाचली तरीही त्या पुस्तकाचा कंटाळा येत नाही. पुन्हा पुन्हा वाचावं असं वाटतं आणि त्याची पारायणं होतचं राहतात. असचं एक पुस्तक म्हणजे *पै.गणेश मानुगडे* लिखीत *बाजिंद.* *बाजिंद* हे एक असं रसायन आहे जे प्रत्ेकाला अक्षरशः वेड लावतं. साधारण चार पाच वर्षांपुर्वी पहील्यांदा वाचलं होतं, त्यानंतर बर्‍याचवेळा आणि आज पुन्हा एकदा. त्याबद्दलची एक सुंदर आठवण म्हणजे माझ्या बहिणीच्या गरोदरपणाच्या दिवसात ग्रहण लागलं होतं आणि त्या ग्रहणकाळात तिला मी *बाजिंद* वाचुन दाखवलं होतं, असं हे पुस्तक. कुस्ती, प्रेमकथा, हेरगिरी, गुढ रहस्यमय बाजिंदचं जंगल, पशु-पक्षी व हिंस्र जनावरांची भाषा, बहीर्जी नाईक आणि अवघ्या हिंदुस्थानाचे आणि मराठी मनाचे आराध्यदैवत *श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज* असा या पुस्तकाचा प्रवास. शेवटाला अंगावर काटा आला कि समजावं आपण या पुस्तकाच्या प्रेमात पडलोय. रायगडच्या डोंगरदरीत वसलेल्या धनगरवाडीचा सखाराम धनगर आणि त्याच्यासोबत मल्हारी, सर्जा आणि नारायण निघालेत छत्रपती शिवरायांना भेटायला. कारण टकमक टोकावरुन ज्या गद्दारांचा कडेलोट व्हायचा ती प्रेतं येऊन पडायची ती थेट धनगरवाडीच्या आसपासच्या जंगलात आणि त्यामुळे आसपासच्या परीसरात जंगली जनावरांचा सुळसुळाट खुप वाढला होता. त्यांची मेजवानी व्हायची पण जर कधी कडेलोट नसायचा तेव्हा ती हिंस्त्र जनावरं आसपासच्या लोकवस्तीत शिरायची. हिच कैफियत मांडायला सखाराम धनगर आणि इतर मंडळी रायगडी निघतात. त्यानंतरचा त्यांचा प्रवास आणि कथा वाचकाला इतकी गुरफटवुन टाकते कि शेवटच्या पानावरची शेवटची ओळ कधी वाचुन संपते, कळतही नाही. त्यांची स्वराज्यहेर खंडोजीची भेट मग सावित्री, वस्तादकाका, वाचतानाही भितीदायक दिसणारं जंगल, कधीही न पाहीलेलं महादेवाचं मंदीर, खंडोजीचा असणारा ट्विस्ट आणि मग बहिर्जी नाईक आणि मग थेट रायगड आणि महाराज, सगळं प्रत्यक्षात आपल्यासमोर घडतयं कि असा भास निर्माण करणारं असं हे पुस्तक. एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी कथा, एकदा वाचली कि पुन्हा एकदा वाचण्याचा मोह आवरता येत नाही अशी कथा, ज्यामध्ये असं बरचं काही जे वाचल्याशिवाय कळणार नाही. अजुन एक असं कि सातासमुद्रापार जगातील अव्वल गणली जाणारी इस्त्राईलची गुप्तहेर संघटना मोसाद यांच्या अभ्यासक्रमात बहिर्जी नाईक आणि आपलं हेरखातं शिकवलं जातं अशी अभिमान वाटणारी घटना आपल्या राज्यात घडलीय त्याचीच हि गोष्ट...बाजिंद... ...इकडे खंडोजीने सावित्रीला उचलुन जंगलातुन बरेच बाहेर आणले होते. पुढे डोंगराची कडेतुट होती आणि हजारो हात खोल फेसाळणार्‍या नदीचे विशाल पात्र...खंडोजीने एकदा मागे पाहीले आणि ताडले कि शिर्क्यांची फौज पाठलाग करत आहे...त्याने कशाचाही विचार न करता सावित्रीसह स्वतःला त्या कडेतुट वरुन त्या विशाल नदीच्या पात्रात झोकुन दिले...आणि... त्यासाठी वाचा *पै.गणेश मानुगडे* लिखीत...*बाजिंद..!!!* © विश्वजीत श्रीपती शिंत्रे. मु.पो.इंचनाळ, ता.गडहिंग्लज,जि.कोल्हापुर ०९९२२३१३९१९ ...Read more