DAINIK SAKAL 02-05-2002दुर्दम्य इच्छाशक्तीचा विजय...
शीर्षकावरूनच त्यातला आशावाद स्पष्ट करणारे किरण बेदी यांनी लिहिलेलं ‘इट्स ऑलवेज पॉसिबल’ हे पुस्तक प्रत्येकानं वाचायलाच हवं ते त्यातल्या प्रयत्नवादासाठी. माणूस शून्यातून विश्व कसं घडवू शकतो, हे वाचायचं असेल तर हे पुस्तक आर्श मानायला हवं. ही सत्यकथा आहे तिहार तुरुंगाची. हा प्रवास आहे तिहार जेलचा तिहार आश्रम होण्यापर्यंतचा. पुस्तकाच्या मुखपृष्ठावर म्हटल्याप्रमाणे ही आहे जगातील एका प्रचंड मोठ्या तुरुंगाचा कायापालट. पण तो कायपालट इतका आमूलाग्र आहे. की त्यावर विश्वास बसणं कठीण आहे.
मिझोरात राज्याच्या इन्स्पेक्टर जनरल ऑफ पुलिस म्हणून काम केल्यावर नऊ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर त्यांना इन्स्पेक्टर जनरल (प्रिझम) म्हणून बदली झाली ते थेट तिहार जेलमध्येच. त्या वेळी या पदावर यायला कुणी इच्छुक, उत्सुक नव्हतं. आणि कुणी महिला तर नाहीच नाही. त्या पदावर आलेल्या त्या पहिल्या महिला तिथं काहीही काम नसणार; अशी अनेकांची कल्पना; पण किरण बेदींना स्वत:वर विश्वास होता आणि त्या एके सकाळी तिथं जाऊन पोहोचल्या त्या ७२०० कैद्यांची अधिकृत पालक म्हणूनच. त्यांनीही आपलं स्वागत असंच करावं, अशी भूमिका घेऊन त्या कैद्यांना भेटल्या आणि पहिल्याच दिवशी त्यांनी कैद्यांच्या मनात स्नेह निर्माण केला. सगळ्यांच्या मनात आशावाद निर्माण केला जे त्या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं होतं. त्यांनी तुरुंगाला आपलं मानलं कारण त्या म्हणतात, ‘तिहार हीच माझी नियती होती, माझी कर्मभूमी होती.’
कैदी असले तरी त्यांना किमान जीवन जगता आलं पाहिजे, ही भूमिका घेऊन मानवतावादी दृष्टिकोनातून किरण बेदींनी या कैद्यांकडे बघायला सुरुवात केली. आणि त्याच दृष्टीनं तुरुंगाची पाहणी करायला सुरुवात केली. ते चित्र भीषण होतं. २५०० जणांच्या जागेत सुमारे आठ हजार कैदी राहत होते. नाश्ता तर नाहीच; पण जेवणही चांगलं नाही. गलिच्छ आचारी, अस्वच्छ जमिनीवर चपात्या लाटून तिथंच भाजल्या जायच्या. त्या इतक्या कडक असायच्या की कैदी त्या खाण्याऐवजी जळण म्हणून उपयोग करून त्याच्यावर मिळवलेलं अन्न शिजवत. डाळ म्हणजे तिखटजाळ पाणी. त्यातही अनेक किडे, कीटक तरंगत असायचे. इतके की कुणाला ते खायची इच्छा होऊ नये ती डाळ ज्यात घ्यायची ते लोखंडी भांडं जेवणाबरोरच अंघोळ आणि अन्यत्रही वापरायचं, पाण्याची प्रचंड टंचाई त्यामुळे ओसंडून वाहणारी, स्वच्छतागृह, प्रसाधनगृह, पिण्याचं पाणी नाही, तर आंघोळ, कपडे धुणं म्हणजे तर आनंदच. विजेची टंचाई, आजारी कैदी वैद्यकीय सेवा नाही, रोज भरती होणारे कुपोषित कैदी, त्यातच चालू असलेला भ्रष्टाचार पैशाच्या जोरावर चालू असलेली दादागिरी, वर्षानुवर्षे चाललेले खटले, स्त्री कैद्याचा तर वेगळाच प्रश्न. काहींबरोबर तर लहान मुलंही होती. त्यांची दैनावस्था भयानक होती हे एकूण चित्रच विदारक होतं. हे सगळं वर्णन करण्यासाठी किरण बेदी यांची पृष्ठक्रमांक १२ ते १५१ इतकी पानं खर्ची पडली आहेत. यावरून या प्रश्नांची व्याप्ती लक्षात यावी.
‘इच्छा तेथे मार्ग’ या प्रत्यय किरण बेदी अगदी पहिल्या महिन्यापासूनच आला. त्यांनी फक्त इच्छा व्यक्त केली आणि मदतीचा ओघ अक्षरश: त्यांच्याकडे वाहत आला. त्यात अगदी ब्रह्माकुमारीपासून मदर तेरेसापर्यंत सर्वांचा समावेश होता. वेगवेगळ्या संस्था होत्या.
किरण बेदींनी सुरुवात केली ती तक्रारपेटीपासून, त्यातून उलगडत गेली तिथल्या कैद्यांची गरज मोकळ्या मनानं लिहिलेल्या या पात्रातून अगदी प्रशासनाविरुद्धचा कडवा राग व्यक्त झाला, तसा गैरवर्तणूंक करणाऱ्या आपल्याच कैद्यांच्या तक्रारीही होत्या. आणि मग अस्वच्छतेनं, भ्रष्टाचारानं, निराशावादानं बरबटलेल्या, त्यात यथेच्छ बुडालेल्या तिहार तुरुंगानं कात टाकायला सुरुवात केली.
तुरुंगात पंचायत व्यवस्थेला सुरुवात झाली शैक्षणिकपंचायत, वैद्यकीयपंचायत, जेवणघरपंचायत, क्रीडापंचायत, योगपंचायत, नाईपंचायत, कायदेविषय सल्लाची पंचायत, विपश्यनापंचायत अशा अनेक पंचायतींनी आपलं काम सुरू केलं आणि हळूहळू बदल होऊ लागला. व्यसनमुक्ती केंद्र सुरू झालं. स्त्रियांसाठी प्रशिक्षण वर्ग सुरू झाले. त्यांच्या मुलांसाठी पाळणाघर, अभ्यासवर्ग सहली सुरू झाल्या आणि परिस्थितीमुळे नरक भोगायला लागणाऱ्या मुलांना या बदलानं स्वर्गप्राप्तीचा आनंद झाला. विपश्यना माणसात किती बदल घडवून आणते, याचा प्रत्ययही हे पुस्तक वाचताना येतो. आपल्या मनातली कटुता बाहेर काढून शांततेचं जीवन जगू पाहणाऱ्या या कैद्याचं मनोगत निश्चितच कौतुकास्पद आहे. आणि हे घडलं किरण बेदी आणि त्यांच्या सहकाऱ्यामुळे. निश्चित ध्येय, त्या दृष्टीनं प्रयत्न यामुळेच तिहार तुरुंगाचा तिहार आश्रम झाला.
-आरती कदम ...Read more
DAINIK LOKSATTA 06-02-2000कुणी विश्वास ठेवो अगर न ठेवो, पण काही गोष्टी जर घडायच्या असतील तर त्या घडतातच, पण ह्या पुस्तकाची निर्मिती हा मात्र फार मोठ्या ईश्वरी योजनेचा भाग आहे, असं मी मानते. इन्स्पेक्टर जनरल (प्रिझन्स)चं पद भूषंवावं, असं मला कधीही वाटलं नव्हतं. या तुरुंगात येणयापूर्वी मला दीर्घकाळ बदलीसाठी प्रतीक्षा करावी लागली होती. भारताच्या ईशान्य भागी असलेल्या मिझोराम राज्याची इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस म्हणून काम केल्यानंतर मी नऊ महिने बदलीसाठी वाट पाहत होते. भारत सरकारच्या ‘मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स’ने माझं भवितव्य ठरवण्यात खूप वेळा घेतला. त्यामुळे मी पूर्ण पगार घेऊन नुसती ‘प्रतीक्षा करीत थांबून होते, परंतु ऑडिटरच्या ऑफिसकडून त्यांना तंबी मिळाली. असं दीर्घकाळ काही न करता पूर्ण पगार देऊन मला ठेवता येत नव्हतं, म्हणे. मग मला इकडे टाकलं.
आय. जी. (प्रिझन)ची ही जागा अनेक महिने रिकामी पडून होती. तिथे बदली करून घेण्यास कोणीच उत्सुक नव्हतं आणि ज्या कुणाची बदली तिथे होई ती व्यक्ती तिहारच्या शक्यतो बाहेरच राहण्याचा प्रयत्न करी. खरं तर मला दिल्ली पोलीस खात्यात परत पाठवणं योग्य ठरलं असतं, पण तिथे जे दिग्गज जागा अडवून बसले होते ते काही केल्या हटायला तयार नव्हते, मग स्वाभाविकच त्या जागी बदलून जाण्याची ‘राजी खुशीची’ सक्ती माझ्यावर झाली. माझ्यासारख्या व्यक्तीला ‘टाकायला’ याहून चांगली जागा शोधूनही सापडली नसती! आमच्यासारख्यांच्या मनात तुरुंगासारख्या ठिकाणी बदली होणं म्हणजे काळ्या पाण्याची शिक्षा, अशीच भावना असते. काही लोकांच्या मते माझ्या बाबतीत जे झालं ते योग्य होतं. उगीच प्रवाहाविरुद्ध जाऊन काहीतरी नवा मार्ग चोखाळायला निघालेल्यांची ही अशीच गत होते हे तरी निदान त्यामुळे मला समजून चुकलं.
माझ्या मनात खोलवर कुठेतरी नियती आपल्याला हाताला धरून नेत असल्याची जाणीव झाली आणि ही नियती आपल्याला अगदी योग्यच ठिकाणी नेऊन पोचवत आहे, ही पण जाणीव झाली. त्या ठिकाणी आपण जरूर जावं, अशी जबरदस्त अंत:प्रेरणा मला झाली. सुधारणावादी दृष्टिकोन आणि सर्वांना बरोबर घेऊन नेण्याचं धोरण तेथे जाऊन अवलंबावं, असं मला वाटू लागलं.
एका वीकएंडच्या आदल्या दिवशी या बदलीचा हुकूम माझ्या हातात पडला. मला ताबडतोब आय. जी. (प्रिझन्स) म्हणून कामावर रुजू व्हायचं होतं. बदली जेव्हा होते तेव्हा ती किती दिवसांसाठी असते, ह्याचा त्या आदेशात कधीही उल्लेख नसतो. मी दुसऱ्याच दिवशी सकाळी कामावर रुजू झाले. तो शुक्रवार होता. आता सुमारे ७२०० कैद्यांची मी ‘अधिकृत पालक’ होते.
माझा पोलीस खात्यातील २१ वर्षांचा अनुभव लक्षात घेता यात वेगळं असं काहीच नव्हतं. मला ती वर्षं अजून आठवतात. माझ्या हद्दीत कोणाही गुन्हेगाराला अटक झाली की त्याला काही विशिष्ट प्रश्न आम्ही विचारत असू. त्याच्या गुन्हेगारी वृत्तीपासून त्याला परावृत्त कसं करता येईल, हे तपासण्यासाठी ही प्रश्नोत्तरं असत. त्यातील काही प्रश्न असे होते-
१) त्याने तो गुन्हा का केला?
२) तो गुन्हा करण्यास त्याला कोणती परिस्थिती कारणीभूत झाली?
३) त्यामागे काही मानशास्त्रीय, सामाजिक व आर्थिक कारणे होती का? ती कोणती?
४) त्याच्या कुटुंबियांचा किंवा मित्रमंडळींचा त्याच्यावर किती प्रमाणात दबाव होता.
५) त्याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीविषयी पोलिसांना आधी काही माहिती होती का? (हा गुन्हा आम्हाला थांबवता आला असता का? आम्ही यात कुठे अपयशी ठरलो? याचे विश्लेषण.)
६) त्याची कोठडीतून सुटका झाल्यानंतर तो काय करण्याची शक्यता होती?
७) गुन्हा-तुरुंगवास-जामीन-गुन्हा-तुरुंगवास-जामीन हे दुष्टचक्र पोलिसांना अधिकृतपणे थांबवता आले असते का? त्याच्यासाठी त्या गुन्हेगारास आम्ही कशाप्रकारे मदत करू शकलो असतो?
अशा प्रकारच्या विश्लेषणात्मक प्रक्रियेद्वारा आम्ही-सामूहिकरित्या अनेक गुन्हेगारांमध्ये सुधारणा घडवून आणली होती. गुन्हा घडणेच कसे थांबवता येईल यासाठी आम्ही नवनवीन धोरणे विकसित करीत होतो. त्यातील प्रत्येक धोरण प्रमाणाबाहेर यशस्वी झाले होते. आम्ही पोलीस स्टेशन्सशी संलग्न अशी काही व्यसनमुक्ती केंद्रे चालू केली होती व त्यामुळेच न्यू दिल्लीच्या नॉर्थ डिस्ट्रिक्टमध्ये डेप्युटी पोलीस कमिशनर म्हणून माझी नियुक्ती झाली. ज्या व्यक्ती व्यसनाच्या अतिरिक्त आहारी जाऊन त्या व्यसनाची पूर्तता करण्यासाठी चोऱ्यामाऱ्या किंवा हिंसाचारासारखे गुन्हे करत, अशा व्यक्तींना व्यसनमुक्त करण्यासाठी हा उपक्रम आम्ही करत होतो. मी तेथे काम करत असतानाच या उपक्रमाची सुरुवात झाली आणि आज त्रूाची व्याप्ती फार मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आज या ‘नवज्योती’ केंद्रास युनायटेड नेशन्सनेसुद्धा मान्यता देऊन निरीक्षकाचा दर्जा दिला आहे. अशा प्रकारच्या गुन्हेगारी प्रवृत्तीने तिहार तुरुंग ओसंडून वाहत होता. त्याचा सामना मला तुरुंगाच्या बाहेरून करायचा होता आणि त्या कामात यश मिळवायचं होतं.
माणूस जेव्हा अथकपणे, सातत्याने, नि:स्वार्थीपणाने आणि कळकळीने सुसंवाद प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याला त्यात नक्की यश मिळतं, असा माझा अनुभव होता. अगदी उलट्या काळजाच्या, कठोर व्यक्तीच्या सुद्धा हृदयास तो स्पर्श केल्यावाचून राहत नाही. केवळ आमच्या मनातील सच्च्या भावनांवर जोरावर आम्ही अनेक निर्ढावलेल्या अट्टल गुन्हेगारांना चांगल्या मार्गाला लावून त्यांचे पुनर्वसनसुद्धा केले होते. तिहारमध्ये मला एकलक्षीपणाने जे काही काम करायला मिळणार होते ते माझं सर्वांत आवडतं, माझ्या हृदयाच्या सर्वांत जवळचं काम होतं.
या सर्व तुरुंगांमध्ये अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा आणि काम करण्याच्या संधी उपलब्ध होत्या. मला विविध उपक्रमांची सुंदर माहितीपत्रके दाखविण्यात आली, पण त्यांना देण्यासाठी मात्र माझ्यापाशी असं काही नव्हतं. माझ्याकडे केवळ १८९४ सालच्या प्रिझन अॅक्टवरून तयार केलेलं जुनंपुराणं माहितीपत्रक होतं. त्या कैद्यांचा शैक्षणिक कार्यक्रम चालू असताना मी त्यांच्याशी बोलले. पण माझ्या तुरुंगात बिनसरकारी सेवाभावी संस्थांचे ३०० हून अधिक कार्यकर्ते जसे कैद्यांच्या बरोबरीने काम करीत होते तसे मात्र इतर कोठेही नव्हते. तेथे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना तुरुंगाच्या आत पाऊल ठेवण्यासही परवानगी नव्हती, तर आमच्याकडे त्याच्या अगदी विरुद्ध परिस्थिती होती. आमच्याकडे मात्र या प्रतिनिधींना आम्ही भेटीची परवानगी देत होतो, तुरुंगातील परिस्थिती जशी आहे तशी दाखवत होतो आणि समाजहिताशी संबंधित मुद्दे समाजापुढे मांडण्यास सांगत होतो.
माझ्या या भेटींमध्ये विदेशी तुरुंगात उपलब्ध असलेल्या सुसज्ज शिस्तबद्ध यंत्रणेबद्दल मला त्यांचा हेवा वाटला आणि माझ्या तुरुंगातील प्रत्येक उपक्रमात आमचे कैदी ज्या आनंदाने, स्वेच्छेने सहभागी होत, त्याबद्दल त्यांना माझा हेवा वाटला. या दोन्ही गोष्टींचा समन्वय मी फक्त एकाच तुरुंगात पाहिला. तो यूके मधील ग्रेंडन प्रिझन येथे. इंग्लिश पीनल सिस्टिमच्या अखत्यारीत येणारी ही एक लक्षणीय संस्था आहे. या ठिकाणी गेली ३३ वर्षे मानसिक संतुलन बिघडलेल्या व्यक्तींवर मानसोपचार करण्यात येतात. ग्रेंडन प्रिझनमध्ये संगीत, कला, मार्गदर्शन, ध्यानधारणा, कैद्यांना मात्र कैद्यांना इतका वेळ मोकळ्यावर सोडण्याची पद्धत नव्हती. त्याची कारणे असंख्य होती: जागेची कमतरता (व्हिएन्ना प्रिझन), हिंसाचाराची भीती (सान फ्रान्सिस्को), खराब हवामान इत्यादी. याला अपवाद फक्त कोपनहेगनच्या तुरुंगाचा. येथे मात्र शिक्षा झालेल्या कैद्यांना बसने शहरात जाऊन एखाद्या शिक्षणवर्गात जाऊन, शिकून सायंकाळी तुरुंगात परत येण्याची मुभा होती आणि हा विश्वास त्यांनी अनेक वर्षांच्या कालावधीमध्ये संपादन केला होता. यु. के. येथी ग्रेंडन प्रिझनमध्ये ही त्यांच्याशी मिळते-जुळते वातावरण मला बघायला मिळाले.
मला एका गोष्टीने सर्वांत मोठे समाधान मिळाले ते म्हणजे आम्ही ज्या प्रमाणात कैद्यांच्या जवळ जाऊन पोहोचलो होतो, त्यांच्या हृदयात शिरकाव केला होता, ते फार महत्त्वाचं होतं आणि त्याचे परिणाम फार उत्तम झाले होते. या खुल्या वातावरणामुळे देशभर सर्वत्र आमच्या उपक्रमाचे स्वागत झाले होते व त्याची प्रशंसा केली जात होती. याचीच परिणती १९९४ सालच्या रॅमन मॅगसेसे पुरस्कारात झाली. त्याचप्रमाणे नोबेल प्राइझ ऑफ एशिया आणि जोसेफ बॉइज फाऊंडेशनतर्फे जोसफ बॉइज पुरस्कार (१९९७ साली स्वित्झर्लंड येथे) प्राप्त झाला.
३१ ऑगस्ट १९९४ मध्ये मॅनिला येथे फिलीपाईन्सचे प्रेसिडेंट-हिज एक्सलन्सी-फीडेल रॅमोस यांच्या हस्ते प्रतिष्ठित एशियन अॅवॉर्डचा मी स्वीकार करत होते तेव्हा आपल्या देशात तिहारमधील सुमारे दहा हजारांच्यावर कैदी तुरुंगाच्या आत याबद्दल आनंदोत्सव साजरा करत होते. सुधार कार्यक्रमाची धुरा खांद्यावर घेऊन त्याचा पुरस्कार केल्याबद्दल हे अॅवॉर्ड आज आपल्यालाच तपशील व्यवस्थित ठेवले गेले. त्या सर्व तपशिलाचा उपयोग पुढे हे पुस्तक लिहित असताना पुरावा म्हणून होईल असे मला स्वप्नातसुद्धा वाटले नव्हते. योगायोगाची गोष्ट अशी की, या काळात सुटून चाललेले अनेक कैदी मला व्यक्तिश: भेटण्यासाठी किंवा निरोप घेण्यासाठी आले. मी या फेलोशिपचे काम करत आहे हे त्यांना माहीत असल्यामुळे त्यांनी आपण होऊन मला कितीतरी माहिती पुरवली. त्यांनी त्यांचे मनोगत छापण्यास मला परवानगी दिली, त्याचप्रमाणे अनेक रेखाचित्रेही काढून दिली. हे काम ज्या सर्वांमुळे शक्य झालं त्या सर्वांनाच मी हे पुस्तक अर्पण करते. बदल घडवून आणण्यास मला ज्यांनी शिकवले त्या सर्वांना. ज्यांनी मला मार्ग दाखवला त्या सर्वांना आणि जे सामूहिक आणि सुधारणावादी समाजरचनेचा हिस्सा बनले त्या सर्वांना. पुस्तक वाचत असताना भारतातील सर्वांत मोठ्या तुरुंगाचा कायापालट कसा झाला व तो होत असतानाच्या प्रक्रियेत ज्या वेदना आणि जो आनंद आम्हाला मिळाला त्याचा प्रत्ययकारी अनुभव तुम्हालाही मिळेल. आणि सरतेशेवटी माझ्याप्रमाणे तुमचाही या वचनावर विश्वास बसेल- ‘इट्स ऑलवेज पॉसिबल’ (सारं काही शक्य आहे...)
या पुस्तकातून उभा होणारा निधी इंडियन व्हिजन फाऊंडेशनच्या कायमस्वरुपी उपक्रमास देण्यात येत आहे. ज्या बालकांचे आई-वडील तुरुंगात आहेत किंवा तुरुंगाबाहेर असूनसुद्धा त्यांच्या शिक्षणाची हेळसांड करत आहेत, अशा बालकांना शिक्षण देण्याचे कार्य या उपक्रमाद्वारे केले जाते. पुढच्या बळीस आणि तिहारमधील भविष्यकालीन कैद्यास वाचवणं हे आमचं उद्दिष्ट आहे. ...Read more
DAINIK LOKMAT 13-2-2000‘इट्स ऑलवेज पॉसिबल’ खतरनाक तिहार…
‘इट्स ऑलवेज पॉसिबल’ या चारशे पृष्ठांच्या पुस्तकात विख्यात पोलीस अधिकारी किरण बेदी यांनी दिल्लीच्या तिहार जेलमध्ये घडवून आणलेल्या आमूलाग्र बदलाची कहाणी सांगितली आहे. भारतातील हा एक अतिप्रचंड तुरुंग बावीसशे कैद्यांची ोय असलेल्या या तुरुंगात सात हजार दोनशे कैदी ठेवण्यात आलेले आहेत. कधी-कधी आठ हजारापर्यंतही ही संख्या जाते. मे १९९३ ते मे १९९५ अशी दोन वर्षे या तुरुंगाची सूत्रे ‘इन्स्पेक्टर जनरल (प्रिझन्स)’ म्हणून किरण बेदी यांनी सांभाळली, या तुरुंगाची ख्याती अशी की या पदावरचे अधिकारी तुरुंगात पाऊल टाकणे टाळत; घरीच फायली बघत. क्वचितच प्रत्यक्ष तुरुंगाला भेट देत तुरुंगातील कैद्यांची एकमेकांवर चालणारी दादागिरी, टोळीयुद्धे, कर्मचाऱ्यांचा भ्रष्टाचार, हिंसाचार, मादक द्रव्यांची रेलचेल असणाऱ्या या कारागृहाचे अधीक्षकपद म्हणजे एक शिक्षाच असे मानले जाई. किरण बेदी यांनी एक आव्हान म्हणून हे पद स्वीकारले. या तुरुंगातील कैद्यांपैकी फक्त १० टक्के न्यायालयाने शिक्षा ठोठावल्याने गुन्हेगार म्हणून तेथे राहत होते. उरलेल्या ९० टक्के कैद्यांवरचे खटले चालू होते. काहींच्यावर खटले सुरू व्हायचे होते. या कैद्यात ३०० स्त्रिया, ५० चार वर्षांखालील मुले, बाराशे तरुण (१८ ते २१ वर्षे वय), दीडशे परदेशी व्यक्ती (३८ देशातील अनेक वयोवृद्ध यांचा समावेश होता.
रोज २०० ते २५० कैद्यांची सुटका होई; आणि तेवढेच नवे कैदी दाखल होत. या सात-आठ हजार कैद्यांसाठी केवळ अकराच डॉक्टर. ७० टक्के कैदी क्षयग्रस्त नव्या कैद्यांपैकी २५ टक्के तरी मादक द्रव्यांच्या आहारी गेलेले. विड्रावल सिप्टम्सचे बळी असत, औषधांची वानवा असे. कैद्यांना देण्यात येणारे अन्न निकृष्ट दर्जाचे असे. पाणी व वीजपुरवठा लहरी व अनियमित नियमाप्रमाणे दोन हजार कर्मचारी तेथे असायला हवे होते; पण प्रत्यक्षात फक्त ५८४ कर्मचारी होते. त्यांना तुरुंगातर्फे कोणतेही प्रशिक्षण दिले जात नसे. हे कर्मचारी सतत कैद्यांच्या सहवासात राहिल्याने कैद्यांसारख्याच मानसिकतेचे बनत. दारू, मादक द्रव्यांचे सेवन, कुटुंबातील कलह, मारहाण यांचे प्रमाण त्यांच्यातही मोठे होते. कर्मचाऱ्यांच्या निवासात घरोघर बायकांना मारहाण चाले.
भयंकर भ्रष्टाचार कर्मचाऱ्यांना चोवीस तास ड्युटीवर राहावे लागे. जेलर्स अशिक्षित असत. कैद्यांच्या समस्या सोडवण्याबाबत अपुऱ्या साधनसामग्रीमुळे कर्मचारी संवेदनाशुन्य बेफिकिरी दाखवत. तेथील कार्यपद्धतीबाबत भ्रमनिरासाची भावना त्यांच्या मनात रुजलेली असे, तिहारमधील नेमणूक म्हणजे आपलीही जन्मठेप, बढतीची संधी नाही; आपण उपेक्षित, वाळीत टाकलेले असे ते मानत.
तुरुंगात भ्रष्टाचार ही भयंकर, त्याच्या नाना तऱ्हा. स्वच्छतागृहच्या कामाला न्यायालयाची संमती नसेल पण कैद्यांना ते करण्याची सक्ती असे. त्यातून सुटका होण्यासाठी दादा लोकांना खंडणी द्यावी लागे. स्वयंपाकाचे काम २४० कैदी बिनपगारी फुकट करीत. गरीब कैद्यांना त्यासाठी राबवले जाई. मुन्शींचे काम करणारे लोक हे जन्मठेपेचे कैदी असत.
किरण बेदी यांना हा सर्व प्रकार पाहून संताप आला. ‘काही मूठभर लोकांना एक पैशाचाही मोबदला न देता हे काम सक्तीने करायला लावणे हे अमानुष आहे. व्यक्तींच्या आत्मप्रतिष्ठेला धक्का बसतो; अशी शुद्रासारखी वागणूक मिळाल्याने ती व्यक्ती पार कोलमडूनच पडते.
तेथील भ्रष्टाचाराच्याही सर्वंकष स्वरूपाची कल्पना किरण बेदी यांना अल्पावधीतच आली. नवीन भरती झालेल्या कैद्याला कुठल्या बराकीत पाठवायचे, याचा निर्णय त्यांचे सामाजिक स्थान, आर्थिक पत, राजकीय व गुन्हेगारी लागेबांधे यावर ठरे. स्वतंत्र कक्षात सर्व सुखसोयी असत. जनरल वॉर्डातल्या कैद्यांना अंगमेहनीतीची कामे, स्वच्छता गृहसफाई वगैरे कामे करणे क्रमप्राप्त असे. वॉर्ड देण्याच्या क्षणापासून भ्रष्टाचार सुरू. झोपण्यासाठी सिमेंटचे कट्टे योग्य किंमत दिली तर मिळू शकत. एरव्ही खाली जमिनीवर झोपावे लागे. संडासाजवळ जागा मिळणे ही भयंकर शिक्षा. कैद्याला नातलग भेटायला येत. तेव्हाही त्यांनी आणलेल्या वस्तू व पैसे कैद्यांना वॉर्डर जेलरला चहापाणी देऊनच मिळत. तुरुंगातील खरेदीसाठी कूपन्स घ्यावी लागत. भेट लौकर मिळावी म्हणून पैसे चारावे लागत. एका वेळी दोनच व्यक्तींना भेटण्याची परवानगी असे. प्रत्यक्षात जास्त व्यक्तीही भेटू शकत. अर्थात पैसे चारून... तुरुंगातील कँटिनमध्ये बिस्किटे, ब्रेड, फळभाज्या, फळे विकत मिळत; परंतु त्यातही तेथील पहारेकरी व चालक भरमसाठ दर आकारत. वॉर्डर लहान ऑफिसर-गुंड-अधिकारी सारेच या भ्रष्टाचाराचा फायदा उठवत.
लहानमोठ्या सुधारणा
मादक द्रव्यांचाही पुरवठा सर्रास होत असे. त्यासाठी भरपूर पैसे गुंड आकारत. अशा अनेक प्रकारच्या भ्रष्टाचारांतून आणि अधिकाऱ्यांच्या लहरी अकार्यक्षम कारभारातून वाट काढत किरण बेदी यांनी या कारागृहाचा कायापालट घडवून आणला. हे एक आश्चर्यच! पहिल्या १३० पृष्ठात तिहारची एकूण त्यावेळची परिस्थिती रंगवण्यात आली आहे. पुढच्या भागात त्यांतील परिवर्तनाची, बदलाची हकीकत आली आहे.
त्या कायापालटाची कहाणी स्वत: किरण बेदी यांनी अनेक कागदपत्रांच्या आधारे या पुस्तकात सांगितली आहे. ती अनेक दृष्टींनी महत्त्वाची आहे. गुन्हेगाराकडे माणूस म्हणून पाहण्यास प्रवृत्त करणारी आहे. गुन्हेगारातील माणुसकीला आवाहन केले तर त्याच्यात क्रांती होऊ शकते. असा विश्वास निर्माण करणारी ही कहाणी आहे.
या भेटींमधून मला तौलानिक अभ्यास करता आला. जगातील अतिप्रचंड मोठ्या तुरुंगांपैकी एक असलेला आमचा तुरुंग इतर देशांमधील मोठमोठ्या तुरुंगांच्या तुलनेत कसा आहे हे समजून घेता आलं. माझ्यासारखी पाच फूट साडेतीन इंच उंचीची आणि पंचावन्न किलो वजन असलेली स्त्री भारतातील सर्वांत मोठ्या तुरुंग संकुलाची मुख्याधिकारी आहे, या गोष्टीवर तेथे भेटलेल्या कोणाचाही प्रथम विश्वासच बसत नसे आणि या दौऱ्यामध्ये एकाही ठिकाणी केवळ एका प्रिझन सुपरवायझरच्या, गव्हर्नरच्या अथवा वॉर्डरच्या हाताखाली इतका प्रचंड जनसंख्या असलेला तुरुंग नव्हता. त्याचप्रमाणे पुरुष कैदी असलेल्या तुरुंगाच्या मुख्यपदी एखादी स्त्री असल्याचंही कोठेही आढळलं नाही. उलट लंडनमध्ये हॅलोवे येथील स्त्रीयांच्या कैद्यांचा गव्हर्नर एक पुरुष होता. आमचा हा तुरुंग हिंसाचारापासून संपूर्णतया मुक्त आहे, त्या संपूर्ण तुरुंगाच्या परिसरात धूम्रपानास मनाई आहे आणि एका वेळी सुमारे १००० स्त्री-पुरुष कैद्यांसाठी आमच्या येथे विपश्यना शिबिरांचे आयोजन करता येते, या गोष्टीवर अक्षरश: कोणाचाच विश्वास बसेना. अखेर मी काही लिखित आणि दृश्य स्वरूपाचा भरपूर पुरावा सादर केल्यावर त्यांना ते पटलं. त्याचप्रमाणे आमच्या तुरुंगात कैदेत असलेल्या व्यक्तींपैकी ९० टक्के कैद्यांवर खटले चालू आहेत व अनेक वर्षांपासून ते काही आठवड्यांपर्यंतच्या कालावधीपर्यंत खटल्यांच्या निकालाची प्रतीक्षा करणारे कैदी येथे आहेत ही गोष्टही त्यांना अत्यंत अविश्वसनीय वाटे.
या सर्व तुरुंगामध्ये अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा आणि काम करण्याच्या संधी उपलब्ध होत्या. मला विविध उपक्रमांची सुंदर माहितीपत्रके मधूनमधून त्यांच्या घरी घेऊन जाणे आणि अल्प प्रमाणावर बिनसरकारी संस्थांचा सहभाग या सर्व गोष्टी आढळतात. या सर्व भेटींमुळे एक मोठाच फायदा मला झाला. मी एक भारतीय असल्याचा मला अत्यंत अभिमान वाटला. आम्हा भारतीयांचा अहिंसा, क्षमा, करुणा, स्वार्थत्याग, बलिदान, नि:स्वार्थी वृत्ती अशा अनेक मूलभूत संकल्पनांवर जो दृढविश्वास आहे त्यातूनच आम्ही तिहारमध्ये जे काही घडवून आणलं ते करणं शक्य झालं.
मुळातच फरक असा होता की, सुधारणेचे उपक्रम राबवताना आमच्या कैद्यांवर आम्ही दृढ विश्वास ठेवून उपक्रमाची सुरुवात केली, परंतु विदेशी तुरुंगात सर्व कार्यक्रमांच्या मुळाशी कैद्यांवरील अविश्वासाची बैठक असे. उदाहरणार्थ, एखाद्या कैद्याने मादक द्रव्ये जवळ बाळगली आहेत की नाही याची तपासणी करताना त्याचे सर्व कपडे काढून त्याला नग्न करणे, त्याने शरीराच्या इतर कोणत्याही गुप्त भागत मादक द्रव्य लपवले तर नाही याची तपासणी करणे आणि असं असूनही अनेक कैदी वाटेल त्या मार्गाने बरेचदा शरीराच्या गुह्येंद्रियांमध्ये लपवून मादक द्रव्ये तुरुंगात आणत.
आम्ही आमच्या कैद्यांना तुरुंगाच्या कोठड्यांमधून बाहेर काढून बाहेर मोकळ्या पटांगणात सोडत असू. त्यांच्या वॉर्डच्या कुंपणाच्या आत त्यांना फिरण्याची मुभा होती. पाश्चात्त्य देशात मात्र कैद्यांना इतका वेळ मोकळ्यावर सोडण्याची पद्धत नव्हती. त्याची कारणे असंख्य होती : जागेची कमतरता (व्हिएन्ना प्रिझन), हिंसाचाराची भीती (सान फ्रान्सिस्को), खराब हवामान इत्यादी. प्रदान करण्यात येत आहे, याची त्यांच्यातील प्रत्येकाचीच आज भावना होती. मी ते अॅवॉर्ड घेऊन दिल्लीला परत येताच पुन्हा एकदा हा आनंदसोहळा साजरा करण्यात आला. अशा प्रकारची घटना यापूर्वी कधी कोठे घडली होती की नाही, कोणास ठाऊक! हे सगळं घडलं कसं, याविषयी हे पुस्तक सांगतं. यापाठीमागे काय घडत होतं? आणि का? यात कोणी कोणी सहकार्य केले? कशा प्रकारे कोणत्या मर्यादेपर्यंत? आणि कशासाठी? आमच्यापुढे कोणती आव्हाने उभी होती? आमच्यातील प्रत्येकाने व्यक्तिश: तसेच आम्ही सर्वांनी सामूहिकरीत्या, या आव्हानांचा सामना कसा काय केला? आणि हे सगळं मी नक्की कोठे सोडून आले आहे...? या पुस्तकात जो काही तपशील छापलेला आहे तो पूर्णपणे अधिकृत आहे, याचे कारण मला प्रत्येक कागदपत्र, चिठ्ठीचपाटी, लहानसा कागदाचा तुकडासुद्धा, व्यवस्थित लावून ठेवायची सवय आहे व त्या प्रत्येकातून कोणता ना कोणता तरी प्रसंग समोर उभा राहतो. मी माझ्या संपूर्ण कारकीर्दीत जेथे कुठे काम केले, त्या सर्वच ठिकाणी ही पद्धती अनुसरत असते, पण तिहारच्या बाबतीत जमा करून ठेवण्याच्या कागदपत्रांची संख्या अतिप्रचंड होती. उदाहरणार्थ, फाईल्स, पिटिशन्स (विनंती अर्ज), व्हिडीओ कॅसेट्स आणि छायाचित्रे. माझ्या मनातील कृतज्ञता आणि तिहार उपक्रमाचे यश यातून हे सर्व तपशील व्यवस्थित ठेवले गेले. त्या सर्व तपशिलाचा उपयोग पुढे हे पुस्तक लिहीत असताना पुरावा म्हणून होईल असे मला स्वप्नातसुद्धा वाटले नव्हते. योगायोगाची गोष्ट अशी की, या काळात जाऊन पोहोचणं, त्यांना समजून घेणं, त्यांच्याशी बोलणं व सुसंवाद साधणं. त्यांच्यासाठी योग्य ती वातावरणनिर्मिती करून त्यांना अंतर्मुख होण्यास उद्युक्त करणं. आत्मावलोकन, आत्मपरीक्षण करण्यास प्रवृत्त करणं (भाग पाडणं नव्हे)
तुरुंग- तो चालवणारी संपूर्ण यंत्रणा आणि त्यातील कैदी यांच्यात मी काय पाहिलं ते या पुस्तकातील विविध प्रकरणांमधून तुम्हालाही पाहायला मिळेल. कुठे काय चुकत होतं, ते किती प्रमाणात, किती मर्यादेपर्यंत चुकत होतं आणि त्याची दृश्य कारणे काय होती, ते मला कळलं. त्यानंतर त्या बाबतीत आम्ही काय केलं? त्या परिस्थितीची हाताळणी कशी केली? आमची वाटचाल कोणत्या दिशेने होती? आमची उद्दिष्टे कोणती होती? आणि अखेर आम्ही कोठे येऊन पोहोचलो?
या पुस्तकलेखनासाठी प्रत्येक गोष्ट अगदी स्पष्टपणे, जशीच्या तशी आठवणं आवश्यक होतं. कागदपत्रे जपून ठेवण्याची माझी सवय येथे कामी आली. प्रत्येक चिठ्ठी चपाटी, कागदाचा तुकडा, नोंदवलेली निरीक्षणे व्यवस्थित ठेवलेली होती. ती मी लेखनापूर्वी नजरेखालून घातली तेव्हा ती सचेतन झाली. जणू माझ्याशी बोलू लागली. त्या बरोबरीने मी शक्य सर्व व्यक्तींच्या, अधिकाऱ्यांच्या, साध्या माणसांच्या, सुटका झालेल्या कैद्यांच्या मुलाखती घेतल्या. अशांपैकी एक म्हणजे हाँगकाँगचा एक तिशीचा तरुण डेव्हिड मिंग याने तुरुंगात ध्यानधारणचा उपक्रम राबवण्यात खूप मोठा पुढाकार घेतला होता. त्याची सुटका झाल्यावर तो माझ्या घरी आला. एक दिवस मी काम संपवून घरी आले तर दारात ओळखीची आकृती उभी. मी गाडी थांबवायला सांगितली आणि खिडकीची काच उघडली. तो डेव्हिड होता. त्याची सुटका झाल्याचं पाहून मला खूप आनंद झाला. ‘तू कधी सुटलास? आणि इथे काय करतोयस?’ असं मी विचारताच तो उत्तरला, ‘का बरं?’ मी विचारले. त्यावर तो म्हणाला, ‘मॅडम, माझी सुटका झाल्यावर माझ्या एंबसीने मला भलत्यासलत्या, मादक द्रव्ये घेणाऱ्या लोकांमध्ये राहण्यासाठी पाठवलं. मला त्याची लागण झाली असती. ते मला नको होतं. आता मला राहयला जागाच नाही. मला घरी व्यवस्थित, उत्तम प्रकृतीनीशी जायचं आहे.’ मला आठवलं, तुरुंगात सुद्धा त्याच्या जेवणाखाण्याबद्दल तो अत्यंत दक्ष असे. त्याला भारतीय जेवण मुळीच चालत नसे. मी म्हणाले, ‘ठीक आहे. हवं तर माझ्या सेक्युरिटी गार्डांच्या सोबत त्यांच्या तंबूत राहा.’ त्यावर तो म्हणाला, ‘फार उपकार होतील मॅडम.’ मग तो काही महिने राहिला. अगदी क्वचित कधीतरी माझ्या घरून त्याला डबा जाई. तो गार पाणी मागून घेई. पण तेवढंच. तो स्व:ताची अगदी व्यवस्थित काळजी घेत असे. माझ्याकडे असंख्य टेप्स (ध्वनिमुद्रित मुलाखती) होत्या. त्या त्याने माझ्यासाठी लिहून काढल्या. माझ्याबरोबर तुरुंगात येऊन त्याने विदेशी कैद्यांच्या मुलाखती घेण्याच्या कामातसुद्धा मला मदत केली.
हे पुस्तक लिहायचं असं मी ठरवलेलं नव्हतं. तो दैवी संकेत होता. ते घडायचंच होतं. हाती घेतलेलं काम ज्या झपाट्यानं वाढलं, त्याचं एखाद्या चळवळीत रूपांतर झालं, त्या कामाला अमरत्व प्राप्त झालं आणि मग त्या कामाविषयी लिहिणं माझं कर्तव्य होऊन बसलं.
मग मी शिक्षणक्षेत्रामध्ये शक्यता अजमावण्यास सुरुवात केली. फोर्ड फाउंडेशन, मॉक ऑर्थर फाऊंडेशन आणि इतर काही संस्थांमध्ये चौकशी केली. माझ्या गुरू डॉ. कमला चौधरींनी नेहरू फेलोशिपचं नाव सुचवलं. (भारताचे पहले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या नावाने ही देण्यात येते) योगायोगाची गोष्ट अशी की, राजीव गांधी फाउंडेशनतर्फे सिमला येथे त्याच वेळी एक परिषद भरवण्यात आली होती. त्याचा विषय होता- ‘उत्तम समाजाची नवी व्याख्या.’ व या परिषदेस मी उपस्थित होते. येथून परत येत असताना जवाहरलाल नेहरू मेमोरियल व म्युझियमचे डायरेक्टर प्रोफेसर रवींद्रन हे व मी एकाच गाडीतून प्रवास करत होतो. तिहारमध्ये काम करत असताना मला जे अनुभव मिळाले त्यावर आधारित काही लेखन करता येईल का, अशी आमची चर्चा झाली. त्यांनी पण यासाठी मला नेहरू फेलोशिपचं नाव सुचवलं. मग मी तसा लेखी प्रस्ताव तयार केला व जवाहरलाल नेहरू मेमोरियल फंडाचे व्हाइस चेअरमन डॉ. करण सिंग यांच्याकडे तो पाठवला. जवाहरलाल नेहरू मेमोरियल फंडाचे सचिव श्री. नटवरसिंग यांचीही मी गाठ घेतली. त्यांनी ह्या उपक्रमात बराच रस घेतला. हा संशोधनाचाही विषय होऊ शकेल असंही त्यांना वाटलं. मात्र या फेलोशिपची एकच अट होती- ह्याचं काम करण्यास सुरुवात केल्यापासून तीन वर्षं पुरी होण्याच्या आत ते प्रकाशित झालं पाहिजे. मला १९९५ साली ही शिष्यवृत्ती देण्यात आली आणि त्यानुसार नेमून दिलेल्या कालावधीत हे पुस्तक प्रकाशित होत आहे.
शैक्षणिक संशोधनासाठी ‘नेहरू मेमोरियल स्कॉलरशिप’ ही भारतातील सर्वांत उल्लेखनीय शिष्यवृत्ती आहे. या शिष्यवृत्तीतून मिळणाऱ्या आर्थिक मदतीने तसेच मी स्वत: जमा केलेल्या रकमेचा उपयोग करून मी जगभरात पसरलेल्या पूर्वेच्या व पश्चिमेच्या देशांमधील काही निवडक तुरुंगांना परत एकदा भेटी दिल्या. लंडन, एडिंबरो, कोपनहेगन, झुरिच, फ्रॅंकफर्ट, ब्राटिस्लाव्हा, व्हिएन्ना, वॉशिग्टन, फिलाडेल्फिया, सान फ्रान्सिस्को, हवाई, क्वाई, टोकियो, हाँगकाँग, मनिला आणि कोलंबो इत्यादी अनेक ठिकाणच्या तुरुंगांचा मी दौरा केला. माणसांवर, गुन्हेगारांच्या मनासिकतेवर व आचारणावर प्रभाव पडतो हे सिद्ध करणारी ही कहाणी आहे. अधिकाऱ्यांच्या उदासीनतेला पळवून लावणारी आणि एकूण नोकरशाही मनोवृत्तीला गदगदा हलवणारी ही कहाणी आहे.
किरण बेदी यांनी सकाळी पावणेनऊला रोज तुरुंगाचा फेरफटका करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे बरेच अधिकारी आणि डॉक्टर्स नाराज झाले. ‘‘आपण जे प्रत्यक्ष डोळ्याने पाहिले असेल त्यावरच विश्वास ठेवायचा’’ हे किरण बेदींचे सूत्र. बरोबरच्या नोंदवहीत खटकलेल्या गोष्टींची त्या नोंद करीत व त्या नोंदी संबंधित लोकांना कारवाईसाठी त्या पाठवत. ‘मुलाकात’ असे लिहिलेल्या खिडकीवरील पाटी नव्याने रंगावा, भेटीच्या नियमांच्या यादीचा बोर्ड स्पष्ट लिहा, भेटीला येणाऱ्यांसाठी स्वच्छतागृहे व आसनव्यवस्था करा, वॉटर कूलर दुरुस्त करा, जेल क्रमांक एकला रंगसेफती करा, स्त्रियांच्या वॉर्डसाठी योगशिक्षक नेमा, स्त्री कैद्यांमधील शिक्षकांची सूची तयार करा, लहान मुलांसाठी बालवाडीची व्यवस्था करा, स्त्री कैद्यांना प्रौढ शिक्षण विषयक चित्रपट दाखवा यासारख्या साध्या साध्या सूचनांपासून कैद्यांच्या सर्व प्रकारच्या तक्रारींची गंभीरपणे दखल घेण्याचे पर्व सुरू झाले. कैद्यांना पत्रे पाठवण्यासाठी पोस्टाची पेटी ठेवणे, दूरचित्रवाणी संच दुरुस्त करून कार्यक्रम दाखवणे, पंखे व्यवस्थित चालू करणे, कोठारात पुरेसे अन्नधान्य सतत उपलब्ध ठेवणे, साक्षरत वर्गासाठी फळे बसवणे, मुदपाकखात्यात ब्लीचिंग पावडरचे फवारे मारणे, कैद्यांना मासिके पुस्तके पुरवणे, प्रत्येक वॉर्डात लायब्ररीची व्यवस्था करणे, पितळी भांड्यांना कल्हई करणे, स्वयंपाकासाठी मोठी भांडी आणणे, डासांचा बंदोबस्त करण्यासाठी फ्लिटचे मोठे पंप आणणे, चपात्या बनवल्यावर त्या जमिनीवर टाकण्याऐवजी परातीत ठेवणे, रुग्ण कैद्यांसाठी योग्य ती औषधे उपलब्ध ठेवणे, अशी जंत्री वाढतच राहिली. त्याबरोबर अधिकाऱ्यांची हालचालही वाढली. सुस्ती गेली. पुढे इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाचे वर्ग कैद्यांसाठी सुरू झाले. विपश्यना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कैद्यांना ब्लँकेटस्चा पुरवठा केला गेला. कैद्यांच्या कथाकथनाचे कार्यक्रम होऊ लागले. टीच युवरसेल्फ हिंदी या पस्तकाच्या शंभर प्रती मागवून घेण्यात आल्या. कैद्यांचे मानसिक, शारीरिक आरोग्य उत्तम राहावे, त्यांनी आध्यात्मिक उत्पादक, सृजनात्मक कामात गुंतवून घ्यावे, शैक्षणिक प्रगती साधावी, कैद्यांना स्वत:चे घड्याळ, पुस्तके, दूरचित्रवाणी संच वापरण्यास लेखी परवानगी द्यावी. अशीही तुरुंगाच्या कल्पनेत सहज न बसणारी सोयीसुविधांची सद्दी तिहार जेलमध्ये किरण बेदींच्या कारकीर्दीत सुरू झाली.
तक्रार पेट्यांची योजना
तुरुंगातील कैद्यांना आपल्या तक्रारी मोकळेपणाने सांगता याव्या यासाठी जागोजागी तक्रारपेट्यांची योजना करण्यात आली. १९९३ च्या जून महिन्यातील तक्रारींपैकी २३१ वैद्यकीय सेवेबद्दल ६८ अधिकाऱ्यांच्या लाच खोटीबद्दल, २५ अन्नपुरवठ्याबद्दल, १९ पाणीटंचाईबद्दल, १३ वीजपुरवठ्याबद्दल व १३४ इतर अशी वर्गवारी दिसून आली. पुढच्या महिन्यात तक्रारींची दखल घेण्यात आली. आरंभी काही अधिकारी या तक्रारींकडे दुर्लक्ष करीत. पण अल्पावधीतच त्यांना आपली वर्तणूक बदलणे भाग पडले. प्रत्येक तक्रार करणाऱ्या कैद्याला किरण बेदींच्या सहीने गुलाबी कार्डावर साभार पाच देण्यात येई. त्यामुळे कैद्यांच्या मनात विश्वास वाढत राहिला. तक्रार करण्यात काही चूक नाही, उलट आपल्याकडे वैयक्तिक लक्ष पुरवले जात आहे, असा अनुभव त्याला येई. काही निवडक तक्रारी सायंकाळी भरणाऱ्या कैद्यांच्या मेळाव्यात वाचून दाखवण्यात दिले जाई. एक तक्रार तुरुंगात बनावट नकली विड्या विकल्या जाता अशी होती. कैद्यांना अस्सल विड्याच विकण्यात याव्या असा दंडक नंतर घालण्यात आला.
काही गोपनीय बाबींवरील तक्रारी किरण बेदी स्वत: हाताळत. त्यांची वाच्यता होऊ देत नसत. जून ९३ मध्ये एकूण तक्रारी ५१३ होत्या; त्या नोव्हेंबर ९४ मध्ये ८३ इतक्या कमी झाल्या. याचाच अर्थ तुरुंगाच्या कामकाजात बरीच सुधारणा झाली. हे स्पष्ट होते.
तुरुंगातील वॉडर्सना वॉर्डात प्रार्थना, योगाभ्यास, सामूहिक कवायत, बागकाम, साक्षरता वर्ग सुरू करण्यास प्रोत्साहन देण्यात आले. त्यांना त्यासाठी प्रशिक्षण दिले. त्यामुळे त्यांचा आत्मसन्मान वाढला. ते कामे उत्साहाने करून लागले.
विपश्यना शिबिर
ब्रह्माकुमारी, रजनीश भक्त, होमिओपाथीचे चिकित्सक, व आकारकवी, प्रवचनकार यांची तिहारमध्ये वर्दळ वाढली. प्रवचनांना कैदी गर्दी करू लागले. योगाच्या वर्गाची कैदी वाट बघू लागले. तुरुंगाच्या आवारात २००० फळझाडांची लागवड करण्यात आली. कचऱ्यातून खतनिर्मिती प्रकल्पातून १० लाख रुपयांचे उत्पन्न वर्षभरात मिळाले. बाहेरचे डॉक्टर्स वैद्यकीय मदतीसाठी येऊ लागले. वॉर्डावॉर्डात कैद्यांच्या पंचायती (समित्या) निर्माण करण्यात आल्या. त्याद्वारे परस्परसंबंधित उपक्रमांमध्ये एकसूत्रता आणणे, कार्यपद्धती ठरवणे, समस्यांचे निराकरण करणे, सुधारणांना चालना देणे, वगैरे कामांना गती मिळाली. जेलमध्ये शंभर टक्के साक्षरतेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शैक्षणिक पंचायतीची स्थापना करण्यात आली. वैद्यकीय पंचायतीचे सदस्य रुग्णांना शोधून तातडीचे वैद्यकीय मदत मिळवून देऊ लागले. या पंचायतीद्वारे जबाबदारीची जाणीव कैद्यांमध्ये निर्माण झाली आणि स्वयंशासन, स्वव्यवस्थापन या दिशेने त्यांची वाटचाल सुरू झाली. श्रमदानाने आपापल्या बराकींची स्वच्छता व परिसराचे सुशोभीकरण होऊ लागले.
व्यसनमुक्तीच्या दिशेनेही जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू झाले. वैद्यकीय सुविधा व्यापक करण्यात आल्या.
नोव्हेंबर ९३मध्ये विपश्यना शिबिर (दहा दिवसांचे) घेण्यात आले. त्याला स्वत: गुरू सत्यनारायण गोएंका उपस्थित राहिले. एप्रिल ९४ मध्ये एक हजार कैद्यांसाठी पुन्हा विपश्यना शिबिर घेण्यात आले. या शिबिराने अनेक कैद्यांमध्ये वेगळीच जागृती झाली. त्यांच्या प्रतिक्रिया पृष्ठ ३०९ ते ३१२ वर देण्यात आल्या आहेत. ‘‘हा कोर्स म्हणजे स्वत:च्या पुनर्वसनाचं एक तंत्र आहे’’, ‘क्रोधावर मात करून शांततापूर्ण आयुष्य जगण्यास शिकवणारी विपश्यना ही कला आहे,’’ या शिबिरातून विलक्षण अनुभव आला, मी यापुढे कोणतेही गैरकृत्य करणार नाही’’ यासारख्या प्रतिक्रियावरून ‘विपश्यना’ची परिणामकारकता लक्षात येऊ शकेल.
यंत्रणा संवेदनाक्षम झाली.
वृत्तपत्रांनी आणि प्रसारमाध्यमांनी या सर्व परिवर्तनाची वेळोवेळी दखल घेतली. त्यामुळे संपूर्ण यंत्रणा संवेदनाक्षम बनण्यास मदत झाली. मानवी हक्कासाठी काम करणाऱ्या संस्थाही कार्यप्रवण झाल्या.
त्यावेळची संबंधित कागदपत्रे, अहवाल, आकडेवाऱ्या वृत्तपत्रातील बातम्यांचे उतारे, अधिकाऱ्यांची व कैद्यांची परिपत्रके व पत्रे, भरपूर आकृत्यांसह देण्यात आल्यामुळे तिहार कारागृहाच्या कायापलटाच्या वाचकांना वाटेल. समाजातील एक गर्हणीय मानला गेलेला गुन्हेगार हा घटक जर दोन वर्षांत बदलू शकतो तर सर्वसामान्य समाजात परिवर्तन होणे इतके अवघड का वाटावे? असा प्रश्न हे पुस्तक वाचून जागरूक वाचकांना पडेल. किरण बेदी यांच्यासारख्याची ‘उत्कट इच्छाशक्ती असणारे प्रामाणिक नेते त्यासाठी हवेत. समाज बदलू शकतो. माणूस हा मूलत: सत् प्रवृत्त आहे, संवेदनाक्षम आहे. यावरचा विश्वास दृढ करणारे हे पुस्तक कुठल्याही क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तीला प्रेरणादायक वाटेल.
मूळ पुस्तकाचा लीना सोहोनी यांनी अत्यंत कळकळीने अनुवाद केला आहे. दलाई लामा यांची प्रस्तावनाही छोटी पण प्रेरक आहे. ज्यांच्या हातात सत्ता आहे, ते सत्तेचा वापर करतानाही माणुसकीचा ओलावा निर्माण करू शकतात याचे हे पुस्तक त्यांना निदर्शक वाटते. ...Read more