* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9789386454973
  • Edition : 2
  • Publishing Year : MAY 2017
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 100
  • Language : MARATHI
  • Category : SCIENCE
  • Available in Combos :D.S.ITOKAR COMBO SET-13 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
WE ALL LIKE TO SEE THE GREENERY ALL AROUND US. SIMILARLY, MOST OF US WOULD LOVE TO UNDERSTAND MORE ABOUT THE PLANT KINGDOM AND THE SCIENCE BEHIND IT. ALL THE YOUNG READERS WOULD SPECIALLY LOVE TO KNOW ABOUT THE PLANTS VIA THE CONTENTS OF ‘PRAYOG-VANASPATI VIDNYANACHE’ (THE EXPERIMENTS TO UNDERSTAND PLANT SCIENCE). THE MANY ILLUSTRATIONS THROUGHOUT WILL HELP CHILDREN TO LEARN ABOUT PLANTS AND WILL ALLOW THEM TO DO SMALL EXPERIMENTS. THE BEAUTIFUL AND SIMPLE DRAWINGS WILL ENABLE THEM TO LEARN ABOUT THE VARIOUS PARTS OF PLANTS. A SEED, ITS STAGES, REPRODUCTION, GROWTH, ETC. ARE ALSO WELL EXPLAINED AND SUPPORTED WITH DIAGRAMS AND SIMPLE EXPERIMENTS. SPONGE FARMING IS A NOVEL CONCEPT INTRODUCED HERE. ‘POMATO’ WILL BE A COMPLETELY NEW CONCEPT WHERE A SINGLE PLANT WILL YIELD POTATO AS UNDERGROUND STEM AND TOMATO AS A FRUIT. THIS BOOK WILL HELP CHILDREN TO ENJOY VARIOUS EXPERIMENTS WITHOUT PURCHASING EXPENSIVE INSTRUMENTS OR SPENDING A LOT ON ANYTHING. THESE ALL CAN BE DONE OUT IN THE OPEN. A MUST BOOK FOR ALL THE GROWING YOUNGSTERS.
हिरव्या वनस्पती पाहणे कुणाला आवडत नाही? दृष्टीसुखाबरोबरच या वनस्पतींचे विज्ञान जाणून घ्यायला बाल दोस्तांना नक्कीच आवडेल. बालदोस्तांना हे विज्ञान सप्रयोग जाणून घेण्याची संधी मिळेल ‘प्रयोग – वनस्पती विज्ञानाचे’ या पुस्तकाद्वारे. वनस्पतींविषयी जाणून घेण्यासाठी त्यांचे प्रयोग कसे करावेत याचे सचित्र मार्गदर्शन या पुस्तकातून केले आहे. वनस्पतींचे अवयव आणि त्यांची रचना याविषयीची माहिती या पुस्तकातून मिळते. बियांचे पुनरुत्पादन असो किंवा बियांचे रुजणे किंवा त्यांचे अंकुरणे हे सगळे बाल दोस्तांना कळू शकते रंजक प्रयोगांतून. एक गंमत म्हणून स्पंज शेतीचा प्रयोगही या पुस्तकात सांगितला आहे. एकाच झाडाच्या मुळांना बटाटे आणि वरच्या भागाला टोमॅटो लागल्याचं नवल अनुभवायचं असेल तर ‘पोमॅटोचे झाड’ हा प्रयोग करा. असे अनेक प्रयोग या पुस्तकात समाविष्ट आहेत. हे सगळे प्रयोग करा महागड्या उपकरणांशिवाय आणि पर्यावरणाच्या खुल्या अंगणात. असे अनेक प्रयोग करण्यासाठी बालदोस्तांनी हे पुस्तक घेतलंच पाहिजे असं आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #PRAYOGVANASPATIVIDNYANACHE #PRAYOGVANASPATIVIDNYANACHE #प्रयोगवनस्पतीविज्ञानाचे #SCIENCE #MARATHI #ITOKARDS "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAMANA 15-04-2018

    वनस्पती विज्ञानाचे प्रयोग शालेय अभ्यासक्रमात अनेक विषयांसह केले जातात. भौतिक विज्ञानही मोठ्या प्रमाणात अभ्यासले जाते त्यात वनस्पतींची मुळे, खोड, पाने, फुले आणि फळे हे सारे घटक प्रयोगात असल्याने आपल्या आसपासच्या वृक्षवल्लरींचा उपयोग करून ज्ञान मिळवू शणाऱ्या विद्यार्थ्यांना अत्यंत आवश्यक आहे. मात्र हे सर्व प्रयोग रसायन शास्त्रप्रमाणे झटपट होत नाही उदाहरणार्थ बियांपासून पुनरुत्पादन. स्पंजवरील शेती, मुळे कशी वाढतात, बटाट्याने झाड वाढविणे, गाजराला कोंब फुटणे, पांढरे फुल रंगीत करणे, बोनसाय अशा प्रकारचे अनेक प्रयोग प्रत्यक्ष यशस्वी करण्यासाठी वाट पाहावी लागते. प्रतीक्षा करण्यासाठी मनाची तयारी हवी. लेखकाने आरंभी वनस्पतींचे वर्गीकरण करून, वनस्पतींचे अवयव आणि रचना सांगून एकूण प्रयोगांची व्यापकता समोर ठेवली आहे नंतर बिया कशा रुजतात, त्या कशा अंकुरतात. बियांची मुळे पाण्याकडे कशी वळतात, ती कशी वाढतात हे वाचल्यावर लक्षात येते की निसर्गप्रेमाची ही शिकवण फार गरजेची आहे. शालेय जीवनात ही दीक्षा मिळायला हवी, असे या पुस्तकावरून स्पष्टपणे जाणवते. याशिवाय प्रकाशाच्या गमती, प्राणवायू, रोपांच्या गमती, कलम करण्याचे प्रकार, नाकतोड्या, सुरवंट, फुलपाखरे आदींची माहिती मनोरंजक आहे. पाखरांची काळजी हा विषय तर रोजचाच आहे. -अरुण मालेगावकर ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 25-06-2017

    विज्ञानातल्या वेगवेगळ्या प्रयोगांबाबत डी. एस. इटोकर यांनी लिहिलेली ही पुस्तकं. विज्ञानाची तत्त्वं अतिशय छोट्या छोट्या प्रयोगाद्वारे त्यांनी समजावून दिली आहेत. काही प्रयोग तर अगदी घरात नेहमी सापडणाऱ्या वस्तूंचा वापर करून करता येतील. ‘प्रयोग वनस्पती वि्ञानाचे’ या पुस्तकात इटोकर यांनी वनस्पतींची मुळं, खोड, पानं अशा सर्व अवयावांशी संबंधित किंवा अनुषंगिक गोष्टींशी संबंधित प्रयोग दिले आहेत. पानाला असणारी छिद्रं, पाण्याकडं वळणारी बियांची मुळं, पानांचं ऑक्सिजन सोडणं अशा अनेक गोष्टी या प्रयोगातून माहीत करून घेता येतील. ‘विज्ञानातील रंजकता’ या पुस्तकात दृष्टीसातत्य, पृष्ठताण, गुरुत्वमध्य आदी तत्त्वांबाबतच्या प्रयोगांचा समावेश आहे. डोलणारा पक्षी, बाटलीतील पाणचक्की, वर चढणारा संकू, लाकडी नाव, हालचाल करणारं चित्र, चिकटणारं वर्तृळ, उडणारं बूच अशा अनेक गमतीदार वस्तूही तयार करून त्यांद्वारे विज्ञान शिकण्याची सुविधा या पुस्तकात उपलब्ध करून देण्यात आली आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more