* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: PALYA VYAKTIMATVACHA KANMANTRA
  • Availability : Available
  • ISBN : 9788177666311
  • Edition : 7
  • Publishing Year : SEPTEMBER 2003
  • Weight : 130.00 gms
  • Pages : 104
  • Language : MARATHI
  • Category : HEALTH & PERSONAL DEVELOPMENT
  • Available in Combos :SANJEEV PARALIKAR COMBO SET - 8 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
EACH PARENT WANTS HIS/HER CHILD TO BE A VERY SUCCESSFUL PERSONALITY. OUT OF THIS WISH PARENTS PUSH THEIR CHILDREN TOWARDS UNHEALTHY COMPETITION IN THEIR EARLY SCHOOL DAYS. THIS OFTEN IS A ROUTE CAUSE OF CHILDREN NOT UNDERSTANDING THE MEANING OF COMPETITION OR SUCCESS IN LIFE. FINALLY THEY DO NOT EMERG INTO SUCCESSFUL PERSONALITY. CONSIDERING THIS I THOUGHT OF SHARING MY EXPERIENCES. SUCCESS IN ACADEMICS IS MEANINGLESS IF A CHILD DOES NOT DEVELOP DECISION MAKING ABILITY, RISK TAKING ABILITY, DEALING WITH PEOPLE, IMPORTANCE OF RELATIONSHIP, MAINTAIN GOOD HEALTH, HUMOR & SMILE, TAKING INITIATIVE ETC. SUCCESS IN ACADEMICS HAS VERY LITTLE CONTRIBUTION TOWARDS SUCCESSFUL PERSONALITY. MAJOR PORTION OF CONTRIBUTION COMES FROM OTHER THINGS WHICH ARE IRONICALLY IGNORED BY PARENTS. THROUGH THIS BOOK I HAVE TRIED TO FOCUS ON ALL SUCH THINGS WHICH ARE MORE WHICH ARE MORE IMPORTANT THAN JUST SCORING FEW MARKS IN THE EXAMINATION PAPER. MANY PARENTS ARE INSENSITIVE & IGNORANT ABOUT CREATING SUCCESSFUL ATTITUDE IN THE CHILD. PARADOX OF LIFE IS, ATTITUDE IS THE SINGLE MOST IMPORTANT THING FOR A SUCCESSFUL PERSONALITY.
आपले पाल्य यशस्वी व्यक्तिमत्त्वामध्ये गणले जावे, अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते. त्यासाठी शालेय जीवनापासूनच त्यांच्या यशोगाथेची घोडदौड यशस्वी राहावी म्हणून पालकांची चढाओढ सुरू होते. ही चढाओढ पाहून काही विचार वाचकांसमोर मांडावेसे वाटतात. मुलांमध्ये आत्मविश्वास, कल्पकता, धडाडी नसेल, पुढाकार घेण्याची तयारी, निर्णय घेण्याची क्षमता नसेल, सुदृढ आरोग्य नसेल, तर मिळालेले मार्क कुचकामी ठरतात. परीक्षेत मिळालेल्या मार्कांचा यशस्वी व्यक्तिमत्त्वामध्ये फक्त पंधरा टक्के वाटा असतो. उरलेला पंच्याऐंशी टक्के वाटा दुर्लक्षित राहिलेला असतो व त्याची कसर कोणतेही क्लासेस भरून काढू शकत नाहीत. याच दुर्लक्षित बाबींकडे पालकांचं लक्ष वेधायचा प्रयत्न ह्या पुस्तकामध्ये केलेला आहे. यात मुलांच्या शालेय अभ्यासाविषयी तसेच अभ्यासाव्यतिरिक्त परंतु अभ्यासाला पूरक अशा गोष्टींची तपशीलवार चर्चा केलेली आहे. कारण याच गोष्टी बयाचवेळा दुर्लक्षित असतात. आपल्या पाल्याचा दृष्टिकोन कसा घडवायचा ह्याबद्दल बरेच पालक उदासीन असतात. महत्त्वाची गोष्ट अशी की, यशस्वी व्यक्तिमत्त्वात ह्याचा खूप मोठा वाटा आहे. प्रत्येक पालकाने जर ह्या गोष्टींची काळजी घेतली, तर पालक आणि पाल्य ह्यांमधील नातेसंबंध अधिक मजबूत होतील.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#पाल्यव्यक्तिमत्त्वाचाकानमंत्र #संजीवपरळीकर #व्यक्तिमत्त्वविकसन #PALYAVYAKTIMATVACHAKANMANTRA #SANJEEVPARLIKAR
Customer Reviews
  • Rating StarMAHARASHTRA TIMES 30-11-2003

    ज्ञान आणि मनोरंजन साथ साथ... सकरात्मक व्यक्तिमत्त्व हे एका रात्रीत घडत नाही. त्यासाठी संस्कारक्षम बालवयापासूनच तसे प्रयत्न व्हायला हवेत. ‘पाल्य व्यक्तिमत्त्वाचा कानमंत्र’ या पुस्तकात त्यासाठी काही उपयुक्त टिपा दिल्या आहेत. रोजच्या व्यवहारातील घटना-उाहरणांमधून अभ्यासाची पूर्वतयारी, आकलनावर भर, उजळणीचे महत्त्व, कला-छंद यांचा व्यक्तित्व विकासातील वाटा, आरोग्य व आहाराचे महत्त्व या बाबींबरोबर विचारांना सुसंस्कृत वळण लावण्याबद्दल चर्चाही यात केली आहे. त्यासाठी वेगवेगळ्या मिथक कथा वा प्रत्यक्ष उदाहरणे दिली आहेत. आजकाल बहुतेक घरात एकेकच मूल असते. अशा मुलांचा स्वभाव बरेचदा हट्टी होतो. मानिकस विकारालाही ती बळी पडू शकतात. मुलांच्या मागण्यांना होकार किंवा नकार देताना पालकांनी अधिक सजग निर्णय घेणं आवश्यक आहे. त्याबाबतीतले नियम तत्त्वाधारित व सर्व घराला लागू पडतील, असे हवेत. मुलांच्या मनाला योग्य वळण लावताना पालकांनी आपल्या सवयीही काबूत आणल्या पाहिजेत. पाच ते पंधरा या संस्कारक्षम कोवळीकीमधल्या मुलांचे त्यांच्या पालकांशी असणारे संबंध; या संबंधांना प्रेमाचे जे परिमाण आहे, तेवढेच ते शिस्तीचेही आहे आणि ते डोळसपणे लागू करणे अधिक गरजेचे आहे, तसे केल्यास मुलांना मायेची किंवा पैशाची जाणीवच नाही, हा त्रागा मोडीत काढता येईल आणि खुद्द मुलाचेही आयुष्य सकारात्मक वाटेला लागेल, हा मंत्र या पुस्तकाने दिला आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 08-10-2006

    पालकांसाठी कानमंत्र... ‘पाल्य व्यक्तिमत्त्वाचा कानमंत्र’ हे संजीव परळीकरांचं पुस्तक, विद्यार्थ्यांबरोबरच पालकांनाही छान मदत करेल. कान देऊन ऐकावा, असाच हा कानमंत्र ठरला आहे. वर्तनशैली, नेतृत्व विकास, व्यक्तिमत्त्व विकास अशा विषयांवर कार्यशाळा घेणार परळीकर पुस्तकाच्या पानापानातून उत्तम हिजगुज करतात. अभ्यासाची पूर्वतयारी कशी करावी, विविध विषय कसे हाताळावे, लिखाणाचे विषय - सरावांचे विषय यावर प्रभुत्व मिळवण्याच्या पायऱ्या कोणत्या हे पहिल्या विभागात सांगितलं आहे. स्मरणशक्ती कशी वाढवावी, अति अभ्यासाने येणाऱ्या रटाळपणावर, रुक्षपणावर काय करावं, छंदाचं महत्त्व, शारीरिक आरोग्य, संतुलित आहार इत्यादी मुद्दे दुसऱ्या भागात चर्चिले आहेत. प्रगल्भ दृष्टिकोनाचं सूत्र कोणतं हे सांगताना व्यवस्थापन कौशल्य, मानसशास्त्र यांचाही परामर्ष यथायोग्य घेतला आहे. ‘‘धडाडी नसेल, पुढाकार घेण्याची तयारी नसेल, निर्णय घेण्याची क्षमता नसेल तर अभ्यासात हुशार असूनसुद्धा काही उपयोग नसतो.’’ हे परळीकरांचं निरीक्षण महत्त्वाचंच आहे. योग्य त्या जागी लहान लहान गोष्टी सांगून उदाहरणं देऊन केलेली प्रतिपादने अत्यंत मार्गदर्शक ठरतील यात शंकाच नाही. -मोहन कान्हेरे ...Read more

  • Rating StarDAINIK LOKSATTA 19-10-2003

    उपयुक्त कानमंत्र... आजच्या काळात बहुतांश पालकांना भेडसावणारा प्रश्न म्हणजे आपला पाल्य. दिवसागणिक मुलांना आकर्षित करणारी अनेक प्रलोभनं मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहेत. त्यात गुंतून न पडता आयुष्याच्या दृष्टीने प्रगती साधण्यासाठी मुलांनी काय काय करावेयाची यादीच पालक सातत्याने ऐकवत असतात. स्पर्धेच्या आहारी जाऊन पाल्यांना अनेक जण अक्षरश: घाण्याला जुंपतात. पण खरोखरच एवढे टोक गाठण्याची गरज असते का? आपला पाल्य यशस्वी व्यक्ती म्हणून समाजात गणला जावा असे वाटणे मुळीच चूक नाही. परंतु, केवळ परीक्षेत उत्तम गुण मिळाल्याने आयुष्यात यशस्वी होता येत नाही. सर्वांगीण यशस्वितेकरीता अभ्यासाच्या बरोबरीनेच पाल्याचा आत्मविश्वास, जाणिवा, कल्पकता, समज, धडाडी, व्यावहारिकता आदी गुणांचा थोडक्यात, पाल्याच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास घडून येणे आवश्यक असते. त्याचा तसा दृष्टिकोन घडवण्याची जबाबदारी पालकांची असते. या दृष्टीने ‘पाल्य व्यक्तिमत्त्वाचा कानमंत्र.’ हे संजीव परळीकर यांचे छोटेखानी पुस्तक मार्गदर्शक ठरणारे आहे. व्यक्तिमत्त्व विकासाच्या दृष्टीने अतिशय माहितीपर, उपयुक्त असे विवेचन लेखकाने केले. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more