* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: PALYA VYAKTIMATVACHA KANMANTRA
  • Availability : Available
  • ISBN : 9788177666311
  • Edition : 7
  • Publishing Year : SEPTEMBER 2003
  • Weight : 130.00 gms
  • Pages : 104
  • Language : MARATHI
  • Category : HEALTH & PERSONAL DEVELOPMENT
  • Available in Combos :SANJEEV PARALIKAR COMBO SET - 8 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
EACH PARENT WANTS HIS/HER CHILD TO BE A VERY SUCCESSFUL PERSONALITY. OUT OF THIS WISH PARENTS PUSH THEIR CHILDREN TOWARDS UNHEALTHY COMPETITION IN THEIR EARLY SCHOOL DAYS. THIS OFTEN IS A ROUTE CAUSE OF CHILDREN NOT UNDERSTANDING THE MEANING OF COMPETITION OR SUCCESS IN LIFE. FINALLY THEY DO NOT EMERG INTO SUCCESSFUL PERSONALITY. CONSIDERING THIS I THOUGHT OF SHARING MY EXPERIENCES. SUCCESS IN ACADEMICS IS MEANINGLESS IF A CHILD DOES NOT DEVELOP DECISION MAKING ABILITY, RISK TAKING ABILITY, DEALING WITH PEOPLE, IMPORTANCE OF RELATIONSHIP, MAINTAIN GOOD HEALTH, HUMOR & SMILE, TAKING INITIATIVE ETC. SUCCESS IN ACADEMICS HAS VERY LITTLE CONTRIBUTION TOWARDS SUCCESSFUL PERSONALITY. MAJOR PORTION OF CONTRIBUTION COMES FROM OTHER THINGS WHICH ARE IRONICALLY IGNORED BY PARENTS. THROUGH THIS BOOK I HAVE TRIED TO FOCUS ON ALL SUCH THINGS WHICH ARE MORE WHICH ARE MORE IMPORTANT THAN JUST SCORING FEW MARKS IN THE EXAMINATION PAPER. MANY PARENTS ARE INSENSITIVE & IGNORANT ABOUT CREATING SUCCESSFUL ATTITUDE IN THE CHILD. PARADOX OF LIFE IS, ATTITUDE IS THE SINGLE MOST IMPORTANT THING FOR A SUCCESSFUL PERSONALITY.
आपले पाल्य यशस्वी व्यक्तिमत्त्वामध्ये गणले जावे, अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते. त्यासाठी शालेय जीवनापासूनच त्यांच्या यशोगाथेची घोडदौड यशस्वी राहावी म्हणून पालकांची चढाओढ सुरू होते. ही चढाओढ पाहून काही विचार वाचकांसमोर मांडावेसे वाटतात. मुलांमध्ये आत्मविश्वास, कल्पकता, धडाडी नसेल, पुढाकार घेण्याची तयारी, निर्णय घेण्याची क्षमता नसेल, सुदृढ आरोग्य नसेल, तर मिळालेले मार्क कुचकामी ठरतात. परीक्षेत मिळालेल्या मार्कांचा यशस्वी व्यक्तिमत्त्वामध्ये फक्त पंधरा टक्के वाटा असतो. उरलेला पंच्याऐंशी टक्के वाटा दुर्लक्षित राहिलेला असतो व त्याची कसर कोणतेही क्लासेस भरून काढू शकत नाहीत. याच दुर्लक्षित बाबींकडे पालकांचं लक्ष वेधायचा प्रयत्न ह्या पुस्तकामध्ये केलेला आहे. यात मुलांच्या शालेय अभ्यासाविषयी तसेच अभ्यासाव्यतिरिक्त परंतु अभ्यासाला पूरक अशा गोष्टींची तपशीलवार चर्चा केलेली आहे. कारण याच गोष्टी बयाचवेळा दुर्लक्षित असतात. आपल्या पाल्याचा दृष्टिकोन कसा घडवायचा ह्याबद्दल बरेच पालक उदासीन असतात. महत्त्वाची गोष्ट अशी की, यशस्वी व्यक्तिमत्त्वात ह्याचा खूप मोठा वाटा आहे. प्रत्येक पालकाने जर ह्या गोष्टींची काळजी घेतली, तर पालक आणि पाल्य ह्यांमधील नातेसंबंध अधिक मजबूत होतील.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#पाल्यव्यक्तिमत्त्वाचाकानमंत्र #संजीवपरळीकर #व्यक्तिमत्त्वविकसन #PALYAVYAKTIMATVACHAKANMANTRA #SANJEEVPARLIKAR
Customer Reviews
  • Rating StarMAHARASHTRA TIMES 30-11-2003

    ज्ञान आणि मनोरंजन साथ साथ... सकरात्मक व्यक्तिमत्त्व हे एका रात्रीत घडत नाही. त्यासाठी संस्कारक्षम बालवयापासूनच तसे प्रयत्न व्हायला हवेत. ‘पाल्य व्यक्तिमत्त्वाचा कानमंत्र’ या पुस्तकात त्यासाठी काही उपयुक्त टिपा दिल्या आहेत. रोजच्या व्यवहारातील घटना-उाहरणांमधून अभ्यासाची पूर्वतयारी, आकलनावर भर, उजळणीचे महत्त्व, कला-छंद यांचा व्यक्तित्व विकासातील वाटा, आरोग्य व आहाराचे महत्त्व या बाबींबरोबर विचारांना सुसंस्कृत वळण लावण्याबद्दल चर्चाही यात केली आहे. त्यासाठी वेगवेगळ्या मिथक कथा वा प्रत्यक्ष उदाहरणे दिली आहेत. आजकाल बहुतेक घरात एकेकच मूल असते. अशा मुलांचा स्वभाव बरेचदा हट्टी होतो. मानिकस विकारालाही ती बळी पडू शकतात. मुलांच्या मागण्यांना होकार किंवा नकार देताना पालकांनी अधिक सजग निर्णय घेणं आवश्यक आहे. त्याबाबतीतले नियम तत्त्वाधारित व सर्व घराला लागू पडतील, असे हवेत. मुलांच्या मनाला योग्य वळण लावताना पालकांनी आपल्या सवयीही काबूत आणल्या पाहिजेत. पाच ते पंधरा या संस्कारक्षम कोवळीकीमधल्या मुलांचे त्यांच्या पालकांशी असणारे संबंध; या संबंधांना प्रेमाचे जे परिमाण आहे, तेवढेच ते शिस्तीचेही आहे आणि ते डोळसपणे लागू करणे अधिक गरजेचे आहे, तसे केल्यास मुलांना मायेची किंवा पैशाची जाणीवच नाही, हा त्रागा मोडीत काढता येईल आणि खुद्द मुलाचेही आयुष्य सकारात्मक वाटेला लागेल, हा मंत्र या पुस्तकाने दिला आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 08-10-2006

    पालकांसाठी कानमंत्र... ‘पाल्य व्यक्तिमत्त्वाचा कानमंत्र’ हे संजीव परळीकरांचं पुस्तक, विद्यार्थ्यांबरोबरच पालकांनाही छान मदत करेल. कान देऊन ऐकावा, असाच हा कानमंत्र ठरला आहे. वर्तनशैली, नेतृत्व विकास, व्यक्तिमत्त्व विकास अशा विषयांवर कार्यशाळा घेणार परळीकर पुस्तकाच्या पानापानातून उत्तम हिजगुज करतात. अभ्यासाची पूर्वतयारी कशी करावी, विविध विषय कसे हाताळावे, लिखाणाचे विषय - सरावांचे विषय यावर प्रभुत्व मिळवण्याच्या पायऱ्या कोणत्या हे पहिल्या विभागात सांगितलं आहे. स्मरणशक्ती कशी वाढवावी, अति अभ्यासाने येणाऱ्या रटाळपणावर, रुक्षपणावर काय करावं, छंदाचं महत्त्व, शारीरिक आरोग्य, संतुलित आहार इत्यादी मुद्दे दुसऱ्या भागात चर्चिले आहेत. प्रगल्भ दृष्टिकोनाचं सूत्र कोणतं हे सांगताना व्यवस्थापन कौशल्य, मानसशास्त्र यांचाही परामर्ष यथायोग्य घेतला आहे. ‘‘धडाडी नसेल, पुढाकार घेण्याची तयारी नसेल, निर्णय घेण्याची क्षमता नसेल तर अभ्यासात हुशार असूनसुद्धा काही उपयोग नसतो.’’ हे परळीकरांचं निरीक्षण महत्त्वाचंच आहे. योग्य त्या जागी लहान लहान गोष्टी सांगून उदाहरणं देऊन केलेली प्रतिपादने अत्यंत मार्गदर्शक ठरतील यात शंकाच नाही. -मोहन कान्हेरे ...Read more

  • Rating StarDAINIK LOKSATTA 19-10-2003

    उपयुक्त कानमंत्र... आजच्या काळात बहुतांश पालकांना भेडसावणारा प्रश्न म्हणजे आपला पाल्य. दिवसागणिक मुलांना आकर्षित करणारी अनेक प्रलोभनं मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहेत. त्यात गुंतून न पडता आयुष्याच्या दृष्टीने प्रगती साधण्यासाठी मुलांनी काय काय करावेयाची यादीच पालक सातत्याने ऐकवत असतात. स्पर्धेच्या आहारी जाऊन पाल्यांना अनेक जण अक्षरश: घाण्याला जुंपतात. पण खरोखरच एवढे टोक गाठण्याची गरज असते का? आपला पाल्य यशस्वी व्यक्ती म्हणून समाजात गणला जावा असे वाटणे मुळीच चूक नाही. परंतु, केवळ परीक्षेत उत्तम गुण मिळाल्याने आयुष्यात यशस्वी होता येत नाही. सर्वांगीण यशस्वितेकरीता अभ्यासाच्या बरोबरीनेच पाल्याचा आत्मविश्वास, जाणिवा, कल्पकता, समज, धडाडी, व्यावहारिकता आदी गुणांचा थोडक्यात, पाल्याच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास घडून येणे आवश्यक असते. त्याचा तसा दृष्टिकोन घडवण्याची जबाबदारी पालकांची असते. या दृष्टीने ‘पाल्य व्यक्तिमत्त्वाचा कानमंत्र.’ हे संजीव परळीकर यांचे छोटेखानी पुस्तक मार्गदर्शक ठरणारे आहे. व्यक्तिमत्त्व विकासाच्या दृष्टीने अतिशय माहितीपर, उपयुक्त असे विवेचन लेखकाने केले. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

KHULBHAR DUDHACHI KAHANI
KHULBHAR DUDHACHI KAHANI by SUNANDA AMRAPURKAR Rating Star
श्रीपाद ब्रह्मे

नुकतंच असंच वेगानं वाचून संपवलेलं दुसरं पुस्तक म्हणजे सुनंदा अमरापूरकर यांचं ‘खुलभर दुधाची कहाणी’. दिवंगत ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या त्या पत्नी. अर्थात ही काही त्यांची एकमेव ओळख नव्हे. एक चांगल्या अभिनेत्री, उत्तम अनुवादक म्हणूनही त्या ्रसिद्ध आहेत. त्यांनी ‘खुलभर दुधाची कहाणी’ या आत्मचरित्रवजा लेखनातून त्यांच्या जगण्याचा व्यापक पट अतिशय प्रांजळपणे उलगडला आहे. मला हे पुस्तक विशेष भावण्याचं कारण म्हणजे त्यात आलेलं नगरचं वर्णन. मी स्वत: नगरला फार प्रदीर्घ काळ राहिलो नसलो, तरी ते शेवटी माझ्या जिल्ह्याचं गाव. आणि वयाच्या १३ ते २२ अशा महत्त्वाच्या कुमार व तरुण वयातला माझा तिथला रहिवास असल्यानं नगरच्या आठवणी विसरणं शक्य नाही. सुनंदाताई माझ्या आईच्या वयाच्या. त्यामुळं त्यांच्या लहानपणच्या आठवणी जवळपास माझ्या जन्माच्या २०-२५ वर्षं आधीच्या. असं असलं तरी मी त्या वर्णनाशी, त्या काळातल्या नगरशीही रिलेट होऊ शकलो, याचं कारण मुळात गेल्या शतकात बदलांचा वेग अतिशय संथ होता. नगरसारख्या निम्नशहरी भागात तर तो आणखी संथ होता. त्यामुळं एकूण समाजजीवनात १९६० ते १९९० या तीस वर्षांत तपशिलातले फरक सोडले, तर फार मोठा बदल झाला नव्हता. सुनंदाताई माहेरच्या करमरकर. त्यांचं आजोळ‌ सातारा असलं, तरी त्या जन्मापासून नगरमध्येच लहानाच्या मोठ्या झालेल्या. अगदी पक्क्या ‘नगरी’ म्हणाव्यात अशा. ( आजही त्या स्वत:ला अभिमानानं ‘नगरकर’च म्हणवून घेतात.) सुनंदाताईंचे वडील त्या दहा वर्षांच्या असतानाच गेले. त्यांना मामांचा आधार होता, पण आईनंच लहानाचं मोठं केलं. तेव्हाचं त्यांचं निम्न मध्यमवर्गीय जगणं, नगरमधले वाडे, तिथलं समाजजीवन, तिथल्या शाळा, शिक्षक, नगरमधील दुकानं, दवाखाने, तिथल्या गल्ल्या, बाजार हे सगळं सगळं सुनंदाताई अतिशय तपशीलवार उभं करतात. नगरसारख्या मध्यम शहरात वाढलेल्या महाराष्ट्रातील कुठल्याही शहरातील त्या काळातील व्यक्तीला अतिशय सहज रिलेट होईल, असं त्यांचं हे जगणं होतं. त्यात सुनंदाताईंचं लेखन अतिशय सहज, सोपं आणि प्रांजळ असल्यामुळं ते आपल्याला अगदी भिडतं. एका प्रख्यात अभिनेत्याची पत्नी असल्यानं त्यांचं जीवन इतर सर्वसामान्य स्त्रियांपेक्षा वेगळं झालं असेल, अशी आपली अपेक्षा असते. सुनंदाताईंच्या लेखनातून या ‘वेगळ्या जीवना’ची काही तरी झलक मिळेल, अशीही आपली एक भूमिका तयार झालेली असते. सदाशिव अमरापूरकरांसारख्या मनस्वी अभिनेत्याशी लग्न झाल्यानंतर सुनंदाताईंचं जगणं बदललंही; मात्र ते वेगळ्या पद्धतीनं. सदाशिव अमरापूरकर ऊर्फ नगरकरांचा लाडका बंडू त्यांना नगरमध्ये शाळेपासून कसा भेटला, नंतर कॉलेजमध्ये दोघांनी एकाच ग्रुपमधील नाटकं कशी सादर केली, त्यात अगदी नकळतपणे त्यांचं प्रेम कसं जमलं आणि नंतर नगर सोडून त्या पतीच्या कारकिर्दीसाठी मुंबईत कशा आल्या हा सर्व नाट्यमय प्रवास सुनंदाताई अतिशय तन्मयतेनं मांडतात. अमरापूरकर मंडळींच्या घराविषयीचे तपशील त्यात येतात. अमरापूरकरांचे वडील दत्तोपंत हे नगरमधलं मोठं प्रस्थ. श्रीमंत घराणं. मोठा वाडा, नोकरचाकर वगैरे. त्या तुलनेत सुनंदाताईंची माहेरची परिस्थिती जेमतेम म्हणावी अशी. अशा परिस्थितीत हे लग्न झालं आणि त्या अमरापूरकरांची सून झाल्या, इथपर्यंत पुस्तकाचा निम्मा प्रवास (मध्यंतरच) होतो. पुढल्या दोनशे पानांत आपल्याला खऱ्या अर्थानं सदाशिव अमरापूरकर हे काय व्यक्तिमत्त्व होतं, हे उलगडत जातं. अमरापूरकरांनी शेवटपर्यंत त्यांची मध्यमवर्गीय राहणी व मध्यमवर्गीय मूल्यं सोडली नाहीत. ‘अर्धसत्य’सारख्या सिनेमामुळं एका रात्रीतून ते भारतभरात प्रसिद्ध झाले. या एका ओळखीमुळं अमरापूरकरांचं जीवन पूर्ण बदलून गेलं. तोपर्यंत असलेली आर्थिक ओढगस्तीही संपली. हिंदी चित्रपटसृष्टीत अगदी स्वप्नवत अशा रीतीनं ते मोठे स्टार झाले. एकापाठोपाठ एक खलनायकी भूमिका त्यांच्याकडं येऊ लागल्या. पैसा येऊ लागला. अशा परिस्थितीत एक मध्यमवर्गीय कुटुंब या सगळ्या धबधब्याला कसं तोंड देतं आणि आपली मूल्यं कायम जपत राहतं, हे सुनंदाताईंनी फार हृद्यपणे लिहिलं आहे. सुनंदाताईंनी अनेक वर्षं एलआयसीत नोकरी केली. पतीचं अस्थिर क्षेत्र असल्यानं त्यांनी सुरुवातीला नोकरी केलीच; पण नवरा हिंदी चित्रपटसृष्टीत सुपरस्टार व्हिलन झाल्यावरही त्यांनी ही नोकरी सोडली नाही. त्यांच्या तिन्ही मुलींवर त्यांनी उत्तम संस्कार केले. एका सिनेमाच्या प्रीमियरनंतर हे सगळे कुटुंबीय कसे घरी जाऊन पिठलं-भाकरीचं जेवण तयार करून जेवले हे त्यांनी एका प्रसंगात अतिशय खेळकरपणे सांगितलं आहे. अमरापूरकरांचं नाटकवेड, भौतिक सुखांविषयीची काहीशी विरक्त वृत्ती, त्यांचा मित्रांचा गोतावळा, अनेक माणसांचा घरात राबता असा एकूण ‘देशस्थी’ कारभार यावर सुनंदाताई कधी गमतीत, तर कधी काहीसं वैतागून टिप्पणी करतात. अर्थात त्यांचं सदाशिव अमरापूरकरांवर अतिशय प्रेम होतं आणि त्यांनी हे शेवटपर्यंत उत्तम निभावलं. अशा आत्मचरित्रांत अनेकदा ‘आहे मनोहर तरी... गमते उदास’ असा सूर लागण्याचा धोका असतो. सुनंदाताईंच्या लेखनाचं वैशिष्ट्य म्हणजे, एखादा अपवाद वगळता, त्यांच्या या संपूर्ण पुस्तकात असा रडवा सूर कधीही लागलेला नाही. आपल्याला जे काही मिळालं, ते आपणच निवडलं आहे आणि त्यामुळं त्याविषयी तक्रार करण्याचा आपल्याला काही अधिकार नाही, अशी एक भूमिका त्यांनी घेतलेली दिसते. त्यांच्या या पुस्तकातून विसाव्या शतकातील मध्यमवर्गीय ब्राह्मण घरातील एका तरुणीच्या आशा-आकांक्षांचा, आयुष्यानं दिलेल्या आश्चर्याच्या धक्क्यांचा आणि त्याला सामोरं जाण्यातील धीट दिलदारपणाचा लोभस प्रवास दिसतो. आपली मध्यमवर्गीय मूल्यं जपत, प्रामाणिकपणे व उमेदीनं आयुष्य जगणाऱ्या अनेक महिलांना या पुस्तकात आपल्या जगण्याचं प्रतिबिंब सापडेल. तेच या ‘खुलभर दुधाच्या कहाणी’चं यश आहे. ...Read more

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
प्रभाकर गावंडे, अमरावती

मी विकत घेऊन वाचले आहे हे पुस्तकं, चांगले आहे, नवीन माहिती वाचायला मिळाली.