* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: PALYA VYAKTIMATVACHA KANMANTRA
  • Availability : Available
  • ISBN : 9788177666311
  • Edition : 7
  • Publishing Year : SEPTEMBER 2003
  • Weight : 130.00 gms
  • Pages : 104
  • Language : MARATHI
  • Category : HEALTH & PERSONAL DEVELOPMENT
  • Available in Combos :SANJEEV PARALIKAR COMBO SET - 8 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
EACH PARENT WANTS HIS/HER CHILD TO BE A VERY SUCCESSFUL PERSONALITY. OUT OF THIS WISH PARENTS PUSH THEIR CHILDREN TOWARDS UNHEALTHY COMPETITION IN THEIR EARLY SCHOOL DAYS. THIS OFTEN IS A ROUTE CAUSE OF CHILDREN NOT UNDERSTANDING THE MEANING OF COMPETITION OR SUCCESS IN LIFE. FINALLY THEY DO NOT EMERG INTO SUCCESSFUL PERSONALITY. CONSIDERING THIS I THOUGHT OF SHARING MY EXPERIENCES. SUCCESS IN ACADEMICS IS MEANINGLESS IF A CHILD DOES NOT DEVELOP DECISION MAKING ABILITY, RISK TAKING ABILITY, DEALING WITH PEOPLE, IMPORTANCE OF RELATIONSHIP, MAINTAIN GOOD HEALTH, HUMOR & SMILE, TAKING INITIATIVE ETC. SUCCESS IN ACADEMICS HAS VERY LITTLE CONTRIBUTION TOWARDS SUCCESSFUL PERSONALITY. MAJOR PORTION OF CONTRIBUTION COMES FROM OTHER THINGS WHICH ARE IRONICALLY IGNORED BY PARENTS. THROUGH THIS BOOK I HAVE TRIED TO FOCUS ON ALL SUCH THINGS WHICH ARE MORE WHICH ARE MORE IMPORTANT THAN JUST SCORING FEW MARKS IN THE EXAMINATION PAPER. MANY PARENTS ARE INSENSITIVE & IGNORANT ABOUT CREATING SUCCESSFUL ATTITUDE IN THE CHILD. PARADOX OF LIFE IS, ATTITUDE IS THE SINGLE MOST IMPORTANT THING FOR A SUCCESSFUL PERSONALITY.
आपले पाल्य यशस्वी व्यक्तिमत्त्वामध्ये गणले जावे, अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते. त्यासाठी शालेय जीवनापासूनच त्यांच्या यशोगाथेची घोडदौड यशस्वी राहावी म्हणून पालकांची चढाओढ सुरू होते. ही चढाओढ पाहून काही विचार वाचकांसमोर मांडावेसे वाटतात. मुलांमध्ये आत्मविश्वास, कल्पकता, धडाडी नसेल, पुढाकार घेण्याची तयारी, निर्णय घेण्याची क्षमता नसेल, सुदृढ आरोग्य नसेल, तर मिळालेले मार्क कुचकामी ठरतात. परीक्षेत मिळालेल्या मार्कांचा यशस्वी व्यक्तिमत्त्वामध्ये फक्त पंधरा टक्के वाटा असतो. उरलेला पंच्याऐंशी टक्के वाटा दुर्लक्षित राहिलेला असतो व त्याची कसर कोणतेही क्लासेस भरून काढू शकत नाहीत. याच दुर्लक्षित बाबींकडे पालकांचं लक्ष वेधायचा प्रयत्न ह्या पुस्तकामध्ये केलेला आहे. यात मुलांच्या शालेय अभ्यासाविषयी तसेच अभ्यासाव्यतिरिक्त परंतु अभ्यासाला पूरक अशा गोष्टींची तपशीलवार चर्चा केलेली आहे. कारण याच गोष्टी बयाचवेळा दुर्लक्षित असतात. आपल्या पाल्याचा दृष्टिकोन कसा घडवायचा ह्याबद्दल बरेच पालक उदासीन असतात. महत्त्वाची गोष्ट अशी की, यशस्वी व्यक्तिमत्त्वात ह्याचा खूप मोठा वाटा आहे. प्रत्येक पालकाने जर ह्या गोष्टींची काळजी घेतली, तर पालक आणि पाल्य ह्यांमधील नातेसंबंध अधिक मजबूत होतील.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#पाल्यव्यक्तिमत्त्वाचाकानमंत्र #संजीवपरळीकर #व्यक्तिमत्त्वविकसन #PALYAVYAKTIMATVACHAKANMANTRA #SANJEEVPARLIKAR
Customer Reviews
  • Rating StarMAHARASHTRA TIMES 30-11-2003

    ज्ञान आणि मनोरंजन साथ साथ... सकरात्मक व्यक्तिमत्त्व हे एका रात्रीत घडत नाही. त्यासाठी संस्कारक्षम बालवयापासूनच तसे प्रयत्न व्हायला हवेत. ‘पाल्य व्यक्तिमत्त्वाचा कानमंत्र’ या पुस्तकात त्यासाठी काही उपयुक्त टिपा दिल्या आहेत. रोजच्या व्यवहारातील घटना-उाहरणांमधून अभ्यासाची पूर्वतयारी, आकलनावर भर, उजळणीचे महत्त्व, कला-छंद यांचा व्यक्तित्व विकासातील वाटा, आरोग्य व आहाराचे महत्त्व या बाबींबरोबर विचारांना सुसंस्कृत वळण लावण्याबद्दल चर्चाही यात केली आहे. त्यासाठी वेगवेगळ्या मिथक कथा वा प्रत्यक्ष उदाहरणे दिली आहेत. आजकाल बहुतेक घरात एकेकच मूल असते. अशा मुलांचा स्वभाव बरेचदा हट्टी होतो. मानिकस विकारालाही ती बळी पडू शकतात. मुलांच्या मागण्यांना होकार किंवा नकार देताना पालकांनी अधिक सजग निर्णय घेणं आवश्यक आहे. त्याबाबतीतले नियम तत्त्वाधारित व सर्व घराला लागू पडतील, असे हवेत. मुलांच्या मनाला योग्य वळण लावताना पालकांनी आपल्या सवयीही काबूत आणल्या पाहिजेत. पाच ते पंधरा या संस्कारक्षम कोवळीकीमधल्या मुलांचे त्यांच्या पालकांशी असणारे संबंध; या संबंधांना प्रेमाचे जे परिमाण आहे, तेवढेच ते शिस्तीचेही आहे आणि ते डोळसपणे लागू करणे अधिक गरजेचे आहे, तसे केल्यास मुलांना मायेची किंवा पैशाची जाणीवच नाही, हा त्रागा मोडीत काढता येईल आणि खुद्द मुलाचेही आयुष्य सकारात्मक वाटेला लागेल, हा मंत्र या पुस्तकाने दिला आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 08-10-2006

    पालकांसाठी कानमंत्र... ‘पाल्य व्यक्तिमत्त्वाचा कानमंत्र’ हे संजीव परळीकरांचं पुस्तक, विद्यार्थ्यांबरोबरच पालकांनाही छान मदत करेल. कान देऊन ऐकावा, असाच हा कानमंत्र ठरला आहे. वर्तनशैली, नेतृत्व विकास, व्यक्तिमत्त्व विकास अशा विषयांवर कार्यशाळा घेणार परळीकर पुस्तकाच्या पानापानातून उत्तम हिजगुज करतात. अभ्यासाची पूर्वतयारी कशी करावी, विविध विषय कसे हाताळावे, लिखाणाचे विषय - सरावांचे विषय यावर प्रभुत्व मिळवण्याच्या पायऱ्या कोणत्या हे पहिल्या विभागात सांगितलं आहे. स्मरणशक्ती कशी वाढवावी, अति अभ्यासाने येणाऱ्या रटाळपणावर, रुक्षपणावर काय करावं, छंदाचं महत्त्व, शारीरिक आरोग्य, संतुलित आहार इत्यादी मुद्दे दुसऱ्या भागात चर्चिले आहेत. प्रगल्भ दृष्टिकोनाचं सूत्र कोणतं हे सांगताना व्यवस्थापन कौशल्य, मानसशास्त्र यांचाही परामर्ष यथायोग्य घेतला आहे. ‘‘धडाडी नसेल, पुढाकार घेण्याची तयारी नसेल, निर्णय घेण्याची क्षमता नसेल तर अभ्यासात हुशार असूनसुद्धा काही उपयोग नसतो.’’ हे परळीकरांचं निरीक्षण महत्त्वाचंच आहे. योग्य त्या जागी लहान लहान गोष्टी सांगून उदाहरणं देऊन केलेली प्रतिपादने अत्यंत मार्गदर्शक ठरतील यात शंकाच नाही. -मोहन कान्हेरे ...Read more

  • Rating StarDAINIK LOKSATTA 19-10-2003

    उपयुक्त कानमंत्र... आजच्या काळात बहुतांश पालकांना भेडसावणारा प्रश्न म्हणजे आपला पाल्य. दिवसागणिक मुलांना आकर्षित करणारी अनेक प्रलोभनं मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहेत. त्यात गुंतून न पडता आयुष्याच्या दृष्टीने प्रगती साधण्यासाठी मुलांनी काय काय करावेयाची यादीच पालक सातत्याने ऐकवत असतात. स्पर्धेच्या आहारी जाऊन पाल्यांना अनेक जण अक्षरश: घाण्याला जुंपतात. पण खरोखरच एवढे टोक गाठण्याची गरज असते का? आपला पाल्य यशस्वी व्यक्ती म्हणून समाजात गणला जावा असे वाटणे मुळीच चूक नाही. परंतु, केवळ परीक्षेत उत्तम गुण मिळाल्याने आयुष्यात यशस्वी होता येत नाही. सर्वांगीण यशस्वितेकरीता अभ्यासाच्या बरोबरीनेच पाल्याचा आत्मविश्वास, जाणिवा, कल्पकता, समज, धडाडी, व्यावहारिकता आदी गुणांचा थोडक्यात, पाल्याच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास घडून येणे आवश्यक असते. त्याचा तसा दृष्टिकोन घडवण्याची जबाबदारी पालकांची असते. या दृष्टीने ‘पाल्य व्यक्तिमत्त्वाचा कानमंत्र.’ हे संजीव परळीकर यांचे छोटेखानी पुस्तक मार्गदर्शक ठरणारे आहे. व्यक्तिमत्त्व विकासाच्या दृष्टीने अतिशय माहितीपर, उपयुक्त असे विवेचन लेखकाने केले. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RESHIMREGHA
RESHIMREGHA by SHANTA J SHELAKE Rating Star
मीना कश्यप शाह

शांता शेळके या कवयित्री म्हणून आपल्या सर्वांच्या माहितीच्या आहेतच. गीतकार म्हणूनही त्यांचे मोठे नाव झाले. रेशीमरेघा हे त्यांनी रचलेल्या गीतांचे पुस्तक. मुख्यतः त्यांनी चित्रपट आणि नाटक यासाठी गीते लिहिली आहेत. प्रस्तावनेत शांताबाई म्हणतात, गीते लििणे त्यांना अतिशय आकर्षक वाटत गेले आणि म्हणून केवळ चित्रपट आणि नाटकांसाठीच नाही, तर स्वानंदासाठीही, त्या गीतं लिहित राहिल्या. चालीवर गीते लिहिणे त्यांना आव्हानात्मक वाटायचे, बंधनकारक नाही. पुढे बंगाली, गुजराती अशा काही गीतांच्या चाली आवडल्या, तर त्या, त्या चालींवरही छंद म्हणून गीते लिहू लागल्या. त्यांच्या गीतांमध्ये लावण्या, गवळणी, नृत्यगीते आणि युगुलगीते (त्यांनी द्वंद्वगीते हा शब्द वापरला आहे, जो मला आवडत नाही) जास्त आहेत. ह्या पुस्तकात त्यांचे संकलन आढळून येतं. पुस्तकातील काही गीतांपेक्षा मला त्यांची प्रस्तावनाच जास्त आवडली. आपल्या गीतांबद्दल त्यांनी हळुवार होत लिहिलं आहे. प्रत्येक गाणं ध्वनिमुद्रीत होतानाचे क्षण त्यांना आठवतात. आणि ही गीतं प्रसिद्ध होण्यासाठी संगीतकार, गायक यांचा हातभार नक्कीच आहे याची त्या आठवण काढतात. गीतांचा अर्थ रसिकांपर्यंत पूर्णपणे पोहोचवण्यासाठी गायक-गायिकांचा खूपच मोठा वाटा आहे, त्यांच्याबद्दल त्या अपार कृतज्ञता व्यक्त करतात. हे पुस्तक त्यांनी लावणेसम्राज्ञी यमुनाबाईंना अर्पित केलेले आहे. त्यान्नी लिहिलेल्या "रेशमाच्या रेघांनी" या सर्वात जास्त प्रसिद्ध पावलेल्या लावणीच्या नावावर ह्या पुस्तकाचे नाव आधारित आहे. अनेक प्रसिद्ध गाणी या गीत संग्रहात आढळतात. रेशमाच्या रेघांनी, काय बाई सांगू, मनाच्या धुंदीत लहरीत, हे श्यामसुंदर, राजसा, शालू हिरवा पाच नि मरवा, चाल तुरू तुरू, मनाच्या धुंदीत लहरीत येना आणि अशी अनेक. शांताबाईंचं काव्य सामर्थ्य ह्या लावण्या/गीतांमध्ये देखील दिसून येतं... कळ्या आजच्या, शिळ्या उद्याला, ओठांशी न्याल का, आल्यावर जवळ मला घ्याल का.... अशी अनेक उदाहरणं! पुस्तकातील बहुतेक गाणी ही लावण्यांच्या स्वरूपातली आहेत. त्यामुळे त्याच त्याच भावना सारख्या सारख्या आढळून येतात. बोलावणे किंवा नको जाऊ म्हणणे, भेटी (गिफ्ट्स) घेणे, वाट पाहणे, विरह, सौंदर्याचे वर्णन, शृंगाराचे वर्णन, म्हणजे तुम्हाला काय मिळू शकेल याची कल्पना गीतातून देणे (उदा. कंबरपट्टा रेखून दावी, देहाचा आकार!!) अशा प्रकारचे विषय पुन्हा पुन्हा येत राहतात, पण (शांताबाई बीइंग शांताबाई) कुठेच तोचतोचपणा कंटाळवाणा होत नाही (वाचकाने जरा रोमँटिकपणा दाखवून वाचली ही गीतं तर फारच बहार!) शांताबाई नथ फारच आवडते असं दिसतं... नथ सर्जाची नाकी घालता हसेल डावा गाल किंवा सलगी करते नथ ओठांशी, तो तुमचा अधिकार अशा प्रकारे ती खुलून देखील दिसते ह्या गीतांमधे!! अनेकविध लावण्या आहेत ह्या पुस्तकात. पाडव्याची, रंगपंचमीची, श्रावणाची, अशा विविध दिवसांच्या लावण्या तर हिरव्या रंगाची लावणी देखील आहे. पाडव्याची लावणी म्हणजे पाडव्याला शालू मागते आहे, कारण ती रात्री एकांतात उभारणार आहे. 🙂 "मी सुंदर आहे तर आता मी काय करू?" अशी तक्रारही दिसून येते. "माझ्या नखऱ्याच्या शंभर तऱ्हा" सांगणारीला स्वतःच्या सौंदर्याची पुरेपूर जाणीव आहे आणि त्यापेक्षाही, फक्त शारीरिक सौंदर्यावर विसंबून न राहता, त्याबरोबर तोरा दाखवत भुरळ पाडणे ह्यात ती माहीर आहे. पण त्याचबरोबर ती धोक्याची सूचना पण देते आहे... घटकाभर संग बसून घालवा वेळ, जमल्यास मनांचा जमून येईल मेळ, नाहीतर यायचा अंगाशी हा खेळ, पाय टाकण्याआधी इथे, विचार पुरता करा, माझ्या नखऱ्याच्या शंभर तऱ्हा!! एका लावणीत एका पुरुषाने फसवलंय अशा स्त्रीचे रूप आहे. जत्रेत एक जण भेटला आणि त्याने आपल्याशी फ्लर्ट केलं, जत्रा उलगडल्यावर दुसऱ्या दिवशी मात्र तो डोळ्याला डोळा भिडवत नाही, तोंड चुकवून पुढे जातो, ह्याची तक्रार ह्या लावणीत येते. किती विविधता! अशा लावणी कलाकाराच्या आयुष्याचं विदारक दृश्य देखील शांताबाईंनी दाखवले आहे. तिथे येणारा आज एक, तर उद्या दुसराही असू शकेल किंवा तिथे असणारी आज एक, तर उद्या दुसरीही असू शकेल. हे सांगून त्या म्हणतात... प्रीतीचे नीतीचे व्यर्थ सांगणे, भुकेल्या देहाचे सारे मागणे, जन्माच्या नात्याचे फुका बहाणे, कुणाला सतत इथे राहणे? इथल्या महाली घडीची वस्ती, सुखाचे हिंदोळे आभाळी चढती, घडीत वरती घडीत खालती ऐन विशीतल्या स्त्रीचं सौंदर्याचं अत्युत्तम वर्णन एका गीतात केलं आहे. अनेक गीतांमध्ये पुरुषांनी स्त्रीच्या देहाचे आणि मनाचे केलेले वर्णन दिसून येते. त्यातही नुसता देहच नाही तर स्त्रीचा तोरा (attitude) देखील पुरुषाला कशी भुरळ पाडतो हे दिसतच. "ही चाल तुरुतुरु" आपल्या सगळ्यांच्या आवडीचे आणि माहितीचे आहे. असंच "मनाच्या धुंदीत लहरीत ये ना" हे देखील. गीतांमध्ये श्रावण, पाऊस, विरह, वाट बघणे हे सर्व हमखास येतं. एक गीत आहे "लहरी सजण कुणी दावा" - मीना खडीकर यांचे संगीत, उषा मंगेशकर यांचा आवाज. हे गीत मला ना वाचायला आवडलं ना ऐकायला आवडलं 🫣 श्रीकृष्ण राधेच्या कथा तर आपण गवळणींमधे अनेक वेळा ऐकल्या आहेत. कृष्णाची धून ऐकल्यानंतर अगदी काहीही न सुचता तशीच्या तशी निघालेली राधा! त्यातही तिच्या शृंगारचं वर्णन येतंच. सजण्याची आवड असलेल्या स्त्रीचे वर्णन अतिशय खुबीने शांताबाईंनी केले आहे. मला स्वतःला नटण्या मुरडण्याची अतिशय हौस असल्यामुळे हे सगळं वर्णन वाचून, "हे पुस्तक आपण आधी का नाही वाचलं" याचं दुःख मात्र झालं. ही उदाहरणं बघा ना... माथ्यावर मोतियाची जाळी, भांगेत मोती सर, चंद्रकोर भाळी, कानात झुमके, केसांमध्ये वेल, नाकात नथ, नथित हिरे, बिल्वदळे, वज्रटिक, `बोलताना पाठीवर जिचे रेशमाचे गोंडे खालीवर होतील अशी` पाच पदरी मोहन माळ!! दंडात वाकी रुताव्या, शिंदेशाही तोडे असावेत आणि पायी सांध्यात सोनसळी, गळ्यात तन्मणी, कमरेला कंबरपट्टा, पायी पैंजण.... "शालू हिरवा, पाच नि मरवा, वेणी तीपेडी घाला" हे गीत तर फारच प्रसिद्ध झाले. शृंगार आणि सौंदर्य यांचे वर्णन या सगळ्या गीतांमध्ये अगदी खुलून आलेलं आहे. आणि प्रेम! त्याविषयी किती लिहावं आणि कशाप्रकारे लिहावं असा मोठाच प्रश्न पडला आहे. तरीही एका स्त्रीच्या मनाने वाचलेल्या ह्या चार ओळी लिहीतेच... काय वाजले प्रिय ते पाऊल, तो तर वारा तिची न चाहूल, भास हो फसवा वरचेवरी, शोधितो राधेला श्रीहरी!! ...Read more

MRUTYUNJAYEE
MRUTYUNJAYEE by RATNAKAR MATKARI Rating Star
मीना कश्यप शाह

भयकथा हा रत्नाकर मतकरींच्या लेखनाचा हातखंडा. मी दहावीच्या सुट्टीत असताना भयकथा वाचायला सुरुवात केली आणि त्यांनी मला पुरात झपाटून टाकलं होतं. ही पुस्तकं असायचीही सुटसुटीत जाडीची. त्यामुळे जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी पुस्तक लागणाऱ्या मला सगळीकडे ती घेऊनजात येत असत. क्लास मध्ये लवकर पोहोचले - वाच पुस्तक, बससाठी उभी आहे, वाच पुस्तक; झोप येत नाही, वाच (हे बहुदा चक्राकार रित्या सुरु राहायचं, झोप नाही म्हणून वाचायचं आणि वाचत असायचे म्हणून झोप नाही... त्या वयात असं सगळं चालायचं - लहानपण देगा देवा...) मृत्युंजयी सुरु केली तेव्हा आधीच खेकडा, रंगांधळा वाचून झालं होतं. अजूनही एक संपवलं होतं, पण नाव नाही आठवत (बहुतेक कबंध). त्या पार्श्वभूमीवर मृत्युंजयी फार आवडलं नाही, आणि खरं तर त्यामुळे रत्नाकर मतकरींच्या भयकथा वाचणं थांबलं. अलीकडेच हे इ-बुक मिळालं किंडल वर, पुन्हा वाचलं - आतासुद्धा शेवटच्या परिच्छेदात काय वळण मिळतं त्याची उत्सुकता होती, पण एकूणच माझा patience खूपच कमी झालाय त्यामुळे skip reading, quick reading करत पुस्तक पटकन वाचून संपलं. मृत्यू, अखेर, शेवट ही भावना प्रत्येकासाठी भीतीदायकच. त्या भीतीवर बेतलेल्या कथा ह्या संग्रहात आहेत. अतिमानवीय, फँटसी, भुताटकी अशा धक्कातंत्राचा उपयोग अनेक लेखक करतात. पण मतकरीचं वैशिष्ठय असं, की ते जळमटं सारखी कथा लिहून जातात. मृत्युंजयी मधील कथांमध्ये मृत्यूची अनेक रूपं दिसतात, कथा जिवंत माणसांच्या - पण मृत्यूची चाहूल, त्याची भीती, कधी त्याचं हवेहवेपण, कधी त्याच्याकडे आपणहून जाणे, अशा अनेक रंगढंगांनी मतकरी गूढता कायम ठेवतात. ह्या पुस्तकातील, मृत्यू अवतीभवती असलेल्या प्रत्येक कथेत, आपणा सर्वांना नक्कीच सुप्त आकर्षण वाटत असलेल्या अनेक गूढ गोष्टी येतातच... मृत्यूवर विजय मिळवण्यासाठी करण्याची अतिमानवीय साधना... स्त्री-पुरुषातील शारीरिक आणि मानसिक ओढ... पूर्वी केलेल्या चुका आणि त्याबद्दलचा सल... जुलमाचा प्रतिशोध... अतिमानवीय शक्तींनी झपाटणे... भूतबाधा, भूतांशी गाठभेट... मृत्यूच्या अनेकविध तऱ्हा... मानसिक संतुलन ढळणे... आणि तत्सम. ह्या कथाप्रकारात महत्वाचं असतं, ते शेवटच्या काही वाक्यांमधे कथेला दिलेलं वळण आणि त्यामुळे वाचकाला बसलेला धक्का. रत्नाकर मतकरींच्या गूढकथा म्हणूनच खूप प्रभावी ठरतात. आता मात्र हे धक्का तंत्र बऱ्याच जागी पाहायला मिळतं - OTT वरच्या अनेक चित्रपट किंवा नाट्यमालांमधे हे तंत्र कथाकार वापरतात, आणि लोकांना हे पहायला खरंच खूप आवडतं, म्हणूनच त्या प्रसिद्ध होतात. अलीकडचं उदाहरण "वाळवी" चित्रपट! मृत्युंजयी मधे देखील काही कथा असा आनंद देऊन जातात. पण असं आहे ना "अति सर्वत्र वर्जयेत" - त्यामुळे बऱ्याच कथांच्या शेवटचा अंदाज लागतो आणि त्यांचा प्रभाव कमी होतो. सुरुवातीला जी गूढकथांची पुस्तकं मी वाचली, तेव्हा हे धक्कातंत्र मला नवीन होतं, त्यामुळे त्यात हा अंदाज लागत नव्हता. कदाचित मृत्युंजयी तेव्हा वाचलं आणि आताही वाचलं ते ह्या तंत्राचा अति वापर झाल्यावर वाचलं गेलं म्हणून असेल, पण कमी प्रभावी वाटलं हे खरं. अर्थात प्रत्येक गोष्टीत (सध्या इतर कथांमधे फारसे न सापडणारे) एक समान सूत्र आहे - ते म्हणजे, *वाईटाचं कधीच भलं होत नाही*. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, कधीही उचलून वाचायला सुरुवात करून काही मिनिटात एक गोष्ट संपते. सध्याच्या व्यग्र काळात हे पुस्तक पुन्हा वाचायला सोपे गेले, नक्कीच. आणि मी पुन्हा एकदा ह्या कथाप्रकाराकडे आकर्षितही झाले आहे... पुन्हा सगळी गूढकथांची पुस्तकं वाचायला हवीत. ...Read more