* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: ZATPAT VYAKTIMATVAVIKAS : SWAPARIVARTANACHE NAVIN TANTRA
  • Availability : Available
  • ISBN : 9788177667936
  • Edition : 8
  • Publishing Year : MAY 2007
  • Weight : 110.00 gms
  • Pages : 68
  • Language : MARATHI
  • Category : HEALTH & PERSONAL DEVELOPMENT
  • Available in Combos :SANJEEV PARALIKAR COMBO SET - 8 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
EVERYONE LIKES TO BE A WINNER IN THIS COMPETITIVE WORLD. PEOPLE WANT NAME, FAME, MONEY OR SUCCESS QUICKLY. EVERYONE IS IN A HURRY. EVERYONE WANTS IT INSTANTLY. FOR ACHIEVING SUCCESS, ONE IS REQUIRED TO ACQUIRE NEW SKILLS & HABITS. MANY PEOPLE DO NOT KNOW ABOUT NEW SKILLS AND HABITS. THEY SHOULD KNOW THAT. NOONE HAS PATIENCE TO LEARN THESE NEW SKILLS. EACH ONE WANTS IT INSTANTLY. THIS BOOK WILL HELP YOU DISCOVER NEW SKILLS & HABITS WHICH ARE REQUIRED FOR SUCCESS INSTANTLY & LEARN THEM INSTANTLY.
आजचा जमाना हा ‘इन्स्टन्ट’चा जमाना आहे. येथे सर्व काही, अगदी यशसुद्धा इन्स्टन्ट हवे आहे. म्हणजेच झटपट हवे आहे; पण ते तसे मिळत नाही. कारण त्यासाठी आपल्याला मेहनत करावी लागते. आणि इथे कोणालाही थांबायला वेळ नाही. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी स्वत:मध्ये कोणते बदल करावेत व कसे करावेत हेही कित्येकांना माहीत नाही. हे बदलही आपल्याला झटपट हवे असतात. ह्या पुस्तकातील सूचना अमलात आणल्यात, तर कमीतकमी दिवसात तुम्ही स्वत:मध्ये अनेक महत्त्वाचे बदल घडवून विजयश्री स्वत:कडे खेचून आणू शकता.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#पाल्यव्यक्तिमत्त्वाचाकानमंत्र #संजीवपरळीकर #व्यक्तिमत्त्वविकसन #PALYAVYAKTIMATVACHAKANMANTRA #SANJEEVPARLIKAR #PUDHAKARGHYA #ZATPATVYAKTIMTVAVIKASAN #CHARSHABDADYAVEGHYAVE #CHARJABARDASTFANDE #YALAJIVAN AISENAAV #KELYANEHOTAHERE! #VIKRIKAUSHALYASHIKA
Customer Reviews
  • Rating StarDAINIK AIKYA 12-08-2007

    व्यक्तिमत्व परिवर्तनासाठी तीन दिवस... तीन दिवसात आपण आपल्या व्यक्तिमत्त्वात आमूलाग्र बदल घडवून आणू शकतो असे कोणी म्हटले तर आपला विश्वास बसणार नाही. परंतु तसे करणे शक्य आहे अशी खात्री ‘झटपट व्यक्तिमत्त्व विकास’ हे छोटेखानी पुस्तक वाचून होऊ शकेल. स्वपिवर्तनाचे त्यात एक नवीन तंत्र (न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रॅमिंग) विशद करून सांगण्यात आले आहे. आपल्या मराठी माणसाचा ‘मोडेन पण वाकणार नाही’ हा बाणा असल्याचा अभिनिवेश जगजाहीर आहे. त्यामुळे स्वत:ला बदलायला आपण तयार नसतो. समर्थ रामदासांनी सांगून ठेवले आहे– असेल हरी तर देईल खाटल्यावरी. कुणीतरी आयते सगळे आणून देईल. आता या आपल्या लाडक्या गृहीतकृत्यांना घट्ट कवटाळून बसायचे, की ‘महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळी वाचती’ हे वास्तव लक्षात घेऊन परिस्थितीशी सामना देण्याएवढी लवचिकता दाखवायची, परिवर्तनाची तयारी ठेवायची असा विचार करायला हवा की नाही? तुम्ही लवचिक आहात, बदलायला तयार आहात, नव्या स्पर्धेच्या वातावरणात प्रगतीच्या ज्या संधी उपलब्ध आहेत त्यांचा उपयोग करून दैदीप्यमान यश मिळवण्यास उत्सुक आहात असे तुम्हाला वाटत असेल तर झटपट व्यक्तिमत्त्व विकास हे पुस्तक तुम्हाला मार्गदर्शक ठरू शकेल. या नव्या युगातल्या स्पर्धात्मक वातावरणात आपल्या अंगी असणाऱ्या बौद्धिक आणि मानसिक क्षमतांचा जास्तीत जास्त वापर करून ऐहिक विकासाचा प्रयत्न प्रत्येकाने करायला हवा. संन्यस्त जीवन जगण्याची आकांक्षा बाळगून आपल्या वृत्तीप्रवृत्तींना दडपून ठेवण्यात अर्थ नाही. इंग्लंड-अमेरिकेत न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रॅमिंग (एन. एल. पी.) म्हणून परिवर्तनाची एक प्रणाली विकसित केली गेली आहे. त्यामुळे न्यूनगंडाने पछाडलेल्या, नैराश्याने हैराण झालेल्या, काळलीने पोखरलेल्या व्यक्तीमध्ये उत्साह चैतन्याचा तसेच आत्मविश्वास, ध्येयाचा ध्यास, इच्छाशक्ती यांचा झरा खळाळू लागतो असा अनेकांचा अनुभव आहे. आपला मेंदू हा एक महा संगणक आहे. आपल्या इंच्छेप्रमाणे आपल्या भावना, विचार आणि कृती यात बदल होत राहतात. आपल्या सवयीही बदलत असतात. आपण स्वत: सकारात्मक दृष्टिकोन विकसित करून नेहमी उच्च प्रतीची कामगिरी करू शकतो. आपल्या मज्जासंस्थेद्वारे मेंदूकडे ज्ञानेंद्रियांद्वारे गोळा होणारी सर्व माहिती पोहोचविण्याची प्रक्रिया अहोरात्र चालू असते. या प्रक्रियेची विशिष्ट भाषा असते. या भाषेद्वारे मेंदूला सूचना मिळतात. त्या सूचनांच्या संदर्भात मेंदू निर्णय घेतो. ते निर्णय आपण कृतीत उतरवतो. या प्रक्रियेत सूचनांची भाषा हा महत्त्वाचा घटक असतो. भाषा ही वेगवेगळी भाव व्यक्त करते. भाषा वाकवता येते. एकच विचार वेगवेगळ्या प्रकारे प्रकट करता येतात. भाषा वाकली की सूचनांचे अर्थ बदलतात. सूचना बदलल्या म्हणजे मेंदूचे निर्णयही बदलतात. आपल्या कृतीतही त्यामुळे बदल होतो. आपण सूचनांसाठी या शब्दयोजना करतो त्यामुळे मेंदू गोंधळात पडतो. मेंदूला नकारात्मक भाषा कळत नाही. त्यासाठी सकारात्मक कृती घडवून आणतील. चित्त स्थिर ठेव, हसतमुख रहा, रस्ता ओलांडताना दोन्ही बाजूंना लक्ष ठेव. फुप्फुसांची कार्यक्षमता टिकवून ठेव... यासारख्या सकारात्मक भाषेचे-कल्पनाचित्र रंगवत राहिले तर त्याच्याशी मिळवून घेणे मेंदूला सोपे जाते. तशी सूचना मेंदू देतो. त्याप्रमाणे कृतीला आपण प्रवृत्त होतो. कल्पनाचित्राशी जुळवून घेण्याचा मानसिक सराव केला तर होणारी कृतीही सफाईदार होते. उपजत कौशल्य असल्यासारखी ती वृत्ती आपल्यालाही उभारी देते. हे सूत्र लक्षात ठेवले तर तुमच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडून येईल आणि हे शास्त्र वापरून तीन दिवसात आपणास आत्मपरिवर्तन साध्य होऊ शकेल. पहिला दिवस : न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रॅमिंगचा आरंभ करताना आपल्याजवळ काय आहे, आपल्याजवळ काय नाही, आपल्याला काय हवे आहे, आपल्याला काय नको आहे याची नोंद करायची आहे. डावीकडे आवडत्या गोष्टी लिहा. उजवीकडे नावडत्या, नको असलेल्या गोष्टी लिहा. त्याच्यापुढे आपल्याला आवडणाऱ्या ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत, त्यांची नोंद करा. ज्या नाहीत त्यांची नोंद करा. नावडणाऱ्या गोष्टींबाबतही अशीच नोंद करा. दुसरा दिवस : आपल्याकडील टाकाऊ गोष्टींचे रुपांतर आपल्याला हव्या असलेल्या चांगल्या गोष्टींमध्ये कसे करायचे हे दुसऱ्या दिवशीच्या अभ्यासाचे मध्यवर्ती सूत्र आहे. उदा. धूम्रपान आणि मदिरापान या गोष्टी ठाऊक वाटत असतील तर सुदृढ आणि निर्व्यसनी व्यक्तिमत्त्व हे रुपांतर हवेसे वाटेल. त्यासाठी धूम्रपान व मद्यपान यापासून दूर रहायला हवे. (डिस-असोसिएट). त्यामुळे जी उत्तेजना मिळत असे किंवा रंजन होत असे, ते अन्य मार्गाने आवडत्या गोष्टींद्वारे मिळवायचे आहे. (असोसिएट व्हा.) तिसरा दिवस : स्वत:भोवती ऊर्जेचे वर्तुळ तयार करण्यासाठी प्रयोग करणे. पुस्तकात या प्रयोगाचे सविस्तर वर्णन केलेले आहे. या प्रयोगात पाच टप्पे आहेत. स्वत:ला नवीन सवय लावण्यासाठी प्रचंड मानसिक बळ लागते. त्यासाठी ऊर्जा खर्च करावी लागते. सवय अंगवळणी पडली की ऊर्जा जास्त लागत नाही. चांगल्या सवयी लावण्यासाठी निर्णय घ्यावा लागतो. चांगल्या सवयी या गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीसारख्या असतात. बदल आवश्यक असतो तेव्हा झटपट बदलण्याची वृत्ती बाणवा. बदल नको असेल तर बदलण्याएवढा ठामपणाही ठेवा. आपल्या नकारात्मक विचार-वृत्तींना सकारात्मक वळण देण्याचे काम केवळ आपल्या योग्य भाषेद्वारे मेंदूला सूचना देऊन होऊ शकते, या कल्पनेचा शास्त्रीय पातळीवर पाठपुरावा करून, तिचा प्रभावीपणा अजमावण्यात आलेला आहे. त्यामुळे न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रॅमचे हे तंत्र आपल्यालाही उपयुक्त करू शकेल. अवघ्या साठ पृष्ठांमध्ये हे सर्व तंत्र विशद केलेले आहे. त्यामुळे ते आत्मसात करण्याला आणखीनच सुलभ ठरेल. झटपट व्यक्तिमत्व विकास ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RAZOR SHARP
RAZOR SHARP by ASHWIN SANGHI Rating Star
सुनील माने, पुणे

लेखक अश्विन सांघी “द रोझाबल लाइन” या पहिल्याच कादंबरीने खूप लोकप्रिय झाला. प्राचीन भारतीय दंतकथा/ऐतिहासिक संदर्भ घेऊन त्याच्याभोवती आजच्या काळात रहस्यपूर्ण कथा लिहिणारा अश्विन. Chanakya’s Chant, The Krishna Key, The Sialkot Saga, Keepers of the Kalacakra, The Vault of Vishnu, The Magicians of Mazda अशा एकापेक्षा एक सुंदर रहस्य कादंबर्या “भारत सिरीज़” नावाने खूप प्रसिद्ध झाल्या. या सर्व कादंबऱ्या मी इंग्लिश मधेच वाचल्या. यांचा मराठी अनुवाद मेहता पब्लिशिंग हाउस यांच्याकडे उपलब्ध आहे. अश्विन सांघीने या भारत सिरीज शिवाय एक नवीन थ्रिल्लर सिरीज (कुत्ता कदम) सुरू केली आहे. त्यांतील पहिली कादंबरी Razor Sharp. एक सिरियल किलर मुंबईत एकानंतर एक खून पाडतोय. पोलिस चक्रावले आहेत. 1. रविवार दि २ फेब्रुवारी , गोरेगाव पश्चिममधे रवि मेहराचा खून होतो. त्याची बायको खुशी कॅाल सेंटरचा जॅाब करून रात्री ११.३० ला परत येते. खूप वेळा बेल वाजवून दार न उघडल्यामुळे ती उघडून आत येते तर रवि रक्ताच्या थारोळ्यात मरून पडलेला असतो. त्याचे हात पाठीमागे नायलॅान दोरीने बांधलेले असतात. त्याच्या छातीत सुरा खुपसलेला असतो. त्याच्या तोंडात काहीतरी खाद्य पदार्थ असतो. 2. सोमवार दि १० फेब्रुवारी , लोअर परळमधे सुचंद्रा अग्रवालचा खून. तिची कामवाली आल्यावर दार न उघडल्यामुळे सोसायटीवाले दार तोडतात. आत सुचंद्राचा खून झालेला. हात नायलॅान दोरीने मागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात काहीतरी खाद्यपदार्थ. पोलिस चक्रावलेले. मग पोलिसखाते जागे होते. त्यांचा नावाजलेला अधिकारी जो सस्पेंड झालेला आहे, त्या प्रकाश कदम, DCP याला बोलावले जाते. राज्याचे गृहमंत्री ओंकार लोखंडे, त्यांचा माणूस कमिशनर चव्हाण आणि उपगृहमंत्री जयंत गायकवाड व त्यांचा माणूस SCP राणे, मुंबईचा डॅान भाऊ पाटील जो लोखंडेचाच माणूस असतो, हे सर्व या केसच्या मागावर लागतात. कदम हा राणेंच्या ओळखीचा खास ऑफिसर असतो म्हणून त्यालाही इन्व्हेस्टीगेशनला बोलावले जाते. 3. मंगळवार दि १८ फेब्रुवारी , ठाणे येथे मंगला शहाचा खून. तिच्या शेजारणीमुळे हे कळते. मंगलाचे हात नायलॅान दोरीने पाठीमागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात खाद्यपदार्थ. पोलिस अधिकारी शिंदे कदमबरोबर येतात. मंगलाच्या चेहऱ्याजवळ कदमला पेस्टिसाईडचा वास येतो. चेहरा निळसर झालेला. खून झाल्यावर बॅाडीला हलवलेले दिसते. तो ऑफिसमध्ये जुन्या खूनांचे फोटो तपासतो. त्यांचीही बॅाडी खून केल्यावर हलवलेली दिसते. चेहऱ्यावर निळसर झाक दिसते. तिन्ही खून “फिनेक” ब्रॅंडच्या चाकूने केलेले असतात. हे समान धागे कदम त्याची मुलगी केतुल बरोबर चर्चा करतो. केतुलची आई काही वर्षांपूर्वी कदमला सोडून गेलेली असते. ती भाऊ पाटीलची सावत्र बहीण असते. पण सध्या ती कुठे आहे व काय करते हे माहित नसते. केतुल कोर्टात काम करत असते तसेच ती “शक्ती” या NGO मधेही काम करते. शक्ती हे सोनापूरमधुन सुटका केलेल्या वेश्यांचे पुनर्वसन करत असते. निर्मल नावाचा तिचा मित्र एथिकल हॅकर असतो. तिच्यावर प्रेम करत असतो. कदमला हार्ट अटॅक येऊन गेलेला व स्टेंट बसवलेला असतो. Depression मुळे त्याची सायकॅालॅाजिस्टकडे ट्रिटमेंट चालू असते. कदमला या तिन्ही केसमधे आणखी एक धागा सापडतो. हे खून आठ दिवसांच्या अंतरावर झालेले असतात. म्हणजे पुढचा खून बुधवारी होणार असल्याचे तो राणे व शिंदेला सांगतो. 4. बुधवार दि २६ फेब्रुवारी, कांदिवली पश्चिम, लक्ष्मी बुधीराजाचा खून. तोच पॅटर्न. 5. गुरुवार दि ५ मार्च, खार पश्चिम, गुरुराज अदवानीचा खून सेम पॅटर्न. गुरूराज हा युट्युबवरचा प्रसिद्ध सिंगर असतो. 6. शुक्रवार दि १३ मार्च, ताडदेव, दिव्या शुक्रपाणीवर खूनी हल्ला होतो. पण ती जबर जखमी होते. ती फिटनेस ट्रेनर असल्यामुळे खुन्याबरोबर झटापट करते. पण चाकू पोटात घुसल्यामुळे ती जबर जखमी होते. हात बांधलेले असतानाही ती फोनवर “सिरी” ला तिच्या भावाला, ध्रुवला फोन लावायला सांगते. फोन लागतो व ती “हेल्प हेल्प” एव्हढेच बोलून बेशुद्ध होते. म्हणून खुनी पळून जातो. ध्रुव तिथे पोहोचून तिला हॅास्पिटलमधे ॲडमिट करतो. पोलिसांना तिथे खुन्याची बॅग सापडते. त्यांत नायलॅानची दोरी, बेगॅान स्प्रे व राजमाच्या बिया सापडतात. तिसऱ्या खुनाआधी पोलिस संशयित म्हणून राजू दाभाडेला अटक करतात. पण चौथ्या खूनाच्या वेळेस तो कस्टडीतच असतो. मग खूनी कोण? 7. शनिवार दि २१ मार्च, बान्द्रा पश्चिम, शनिया डिसौजाचा खून होतो. सेम मोडस ऑपरेंडी . 8. शनिवार दि २८ मार्च, चेंबूर, ७१ वर्षांच्या राहुल सिंह नावाच्या सिख व्यक्तिचा खून होतो. तीच पध्दत. यानंतर एक दिवस कदम KBC बघत असताना अमिताभ बच्चन एका सिनेमाचं गाणं लावून त्याचा पिक्चर ओळखायला सांगतात. ते गाणं असते- “सोमवार को हम मिले मंगलवार को नयन बुध को मेरी निंद खुली जुम्मेरात को चैन अरे शुक्र शनी कटे मुश्किलसे आज है इतवार सात दिनों में हो गया जैसे सात जनम का प्यार” आणि कदमच्या डोक्यात एकदम प्रकाश पडतो… अरे, हे सर्व खून असेच रविवार ते शनिवार एक एका वारी घडलेत! पण शनिवारी दोन खून कसे? याच्या मागे काही खगोलशास्त्र किंवा भविष्याचा तर संबंध नाही? कदमला आठवतं की शेजारी राहणारा डॉ. देसाईला पण भविष्य-खगोलशास्त्राची आवड व माहिती आहे. ( डॅाक्टर कडे सापडलेल्या नायलॅानचे रंगीत दोर व फिनेक कंपनीचा चाकू यामुळे एक संशयित म्हणून कदमने त्याला अटक करून पुछताछ केलेली असते) कदम लगेच डॅाक्टरांकडे जातो. त्यांची माफी मागून त्यांना या प्रश्नांत मदत करायला सांगतो. तो या सर्व खुनांचा सिक्वेन्स सांगतो. ते प्रत्येक वारी का घडले? मग शनिवारी दोन का? यापुढे कोणता वार? कुणाचा खून? डॅाक्टर सांगतात की भारतीय भविष्य व खगोल शास्त्रात नवग्रहांना खूप महत्व आहे. रवि, सोम(चंद्र), मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनि, राहू आणि केतु. यांचे रंग व धान्य वेगवेगळे असतात. त्या त्या ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी ते वापरले जातात. कदम ही माहिती लिहून घेतो. त्यावरून प्रत्येक खुनात वापरण्यात आलेले फिनेक कंपनीचे चाकू, वेगवेगळ्या रंगांचे नायलॅान दोर व तोंडातील पदार्थ यांचा संबंध जोडून एक तख्ता तयार करतोः- “रवि मेहरा-रविवार-सोनेरी दोर- तोंडात गहू-दिशा पूर्व सुचंद्रा-सोमवार-चंदेरी दोर-तोंडात तांदूळ-दिशा पश्चिम मंगला शाह-मंगळवार-लाल दोर-तोंडात तूर डाळ- दिशा दक्षिण लक्ष्मी बुधीराजा-बुधवार-हिरवा दोर-तोंडात हिरवे मूग-दिशा उत्तर गुरुराज अदवानी-गुरूवार-पिवळा दोर-तोंडात हरबरा डाळ-दिशा उत्तर पूर्व(ईशान्य) दिव्या शुक्रपाणी-शुक्रवार-पांढरा दोर-राजमा-दिशा दक्षिण पूर्व शनिया डिसौजा-शनिवार-काळा दोर-तोंडात काळे तिळ-दिशा उत्तर पश्चिम राहुल सिंग-शनिवार-निळा दोर-तोंडात उडीद दाळ-दिशा दक्षिण पश्चिम” आता उरला एकच ग्रह-केतु. केतुचा वार मंगळवार. ग्रे रंग, चना दाळ, दिशा दक्षिण पश्चिम. “केतु”म्हणजे कदमची मुलगी केतुलचा नंबर लागणार? आज तर मंगळवारच आहे! कदम घाबरून जातो! तो केतुलला फोन करतो पण तो बंद लागतो. ती सध्या कुठे आहे? कोर्टात? कदम आपल्या मुलीला वाचवतो का? खरा खुनी कोण असतो? तो पकडला जातो का? त्याचे यामागचा उद्देश काय असतो? याच्यामध्ये अजून कोण सामिल असतं का? याची उत्तरे मिळण्यासाठी वाचावी लागेल अश्विन सांघी यांची कादंबरी Razor Sharp. ...Read more

BANGARWADI
BANGARWADI by VYANKATESH MADGULKAR Rating Star
Sameer Kazi

सुंदर अशी कादंबरी माणदेशी बनगरवाडी तशी कोरडी रखरखती पण, यातील पात्रात मायेचा करुणेचाओलावा मनात घर करुन जातो