* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: ZATPAT VYAKTIMATVAVIKAS : SWAPARIVARTANACHE NAVIN TANTRA
  • Availability : Available
  • ISBN : 9788177667936
  • Edition : 7
  • Publishing Year : MAY 2007
  • Weight : 110.00 gms
  • Pages : 68
  • Language : MARATHI
  • Category : HEALTH & PERSONAL DEVELOPMENT
  • Available in Combos :SANJEEV PARALIKAR COMBO SET - 8 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
EVERYONE LIKES TO BE A WINNER IN THIS COMPETITIVE WORLD. PEOPLE WANT NAME, FAME, MONEY OR SUCCESS QUICKLY. EVERYONE IS IN A HURRY. EVERYONE WANTS IT INSTANTLY. FOR ACHIEVING SUCCESS, ONE IS REQUIRED TO ACQUIRE NEW SKILLS & HABITS. MANY PEOPLE DO NOT KNOW ABOUT NEW SKILLS AND HABITS. THEY SHOULD KNOW THAT. NOONE HAS PATIENCE TO LEARN THESE NEW SKILLS. EACH ONE WANTS IT INSTANTLY. THIS BOOK WILL HELP YOU DISCOVER NEW SKILLS & HABITS WHICH ARE REQUIRED FOR SUCCESS INSTANTLY & LEARN THEM INSTANTLY.
आजचा जमाना हा ‘इन्स्टन्ट’चा जमाना आहे. येथे सर्व काही, अगदी यशसुद्धा इन्स्टन्ट हवे आहे. म्हणजेच झटपट हवे आहे; पण ते तसे मिळत नाही. कारण त्यासाठी आपल्याला मेहनत करावी लागते. आणि इथे कोणालाही थांबायला वेळ नाही. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी स्वत:मध्ये कोणते बदल करावेत व कसे करावेत हेही कित्येकांना माहीत नाही. हे बदलही आपल्याला झटपट हवे असतात. ह्या पुस्तकातील सूचना अमलात आणल्यात, तर कमीतकमी दिवसात तुम्ही स्वत:मध्ये अनेक महत्त्वाचे बदल घडवून विजयश्री स्वत:कडे खेचून आणू शकता.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#पाल्यव्यक्तिमत्त्वाचाकानमंत्र #संजीवपरळीकर #व्यक्तिमत्त्वविकसन #PALYAVYAKTIMATVACHAKANMANTRA #SANJEEVPARLIKAR #PUDHAKARGHYA #ZATPATVYAKTIMTVAVIKASAN #CHARSHABDADYAVEGHYAVE #CHARJABARDASTFANDE #YALAJIVAN AISENAAV #KELYANEHOTAHERE! #VIKRIKAUSHALYASHIKA
Customer Reviews
  • Rating StarDAINIK AIKYA 12-08-2007

    व्यक्तिमत्व परिवर्तनासाठी तीन दिवस... तीन दिवसात आपण आपल्या व्यक्तिमत्त्वात आमूलाग्र बदल घडवून आणू शकतो असे कोणी म्हटले तर आपला विश्वास बसणार नाही. परंतु तसे करणे शक्य आहे अशी खात्री ‘झटपट व्यक्तिमत्त्व विकास’ हे छोटेखानी पुस्तक वाचून होऊ शकेल. स्वपिवर्तनाचे त्यात एक नवीन तंत्र (न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रॅमिंग) विशद करून सांगण्यात आले आहे. आपल्या मराठी माणसाचा ‘मोडेन पण वाकणार नाही’ हा बाणा असल्याचा अभिनिवेश जगजाहीर आहे. त्यामुळे स्वत:ला बदलायला आपण तयार नसतो. समर्थ रामदासांनी सांगून ठेवले आहे– असेल हरी तर देईल खाटल्यावरी. कुणीतरी आयते सगळे आणून देईल. आता या आपल्या लाडक्या गृहीतकृत्यांना घट्ट कवटाळून बसायचे, की ‘महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळी वाचती’ हे वास्तव लक्षात घेऊन परिस्थितीशी सामना देण्याएवढी लवचिकता दाखवायची, परिवर्तनाची तयारी ठेवायची असा विचार करायला हवा की नाही? तुम्ही लवचिक आहात, बदलायला तयार आहात, नव्या स्पर्धेच्या वातावरणात प्रगतीच्या ज्या संधी उपलब्ध आहेत त्यांचा उपयोग करून दैदीप्यमान यश मिळवण्यास उत्सुक आहात असे तुम्हाला वाटत असेल तर झटपट व्यक्तिमत्त्व विकास हे पुस्तक तुम्हाला मार्गदर्शक ठरू शकेल. या नव्या युगातल्या स्पर्धात्मक वातावरणात आपल्या अंगी असणाऱ्या बौद्धिक आणि मानसिक क्षमतांचा जास्तीत जास्त वापर करून ऐहिक विकासाचा प्रयत्न प्रत्येकाने करायला हवा. संन्यस्त जीवन जगण्याची आकांक्षा बाळगून आपल्या वृत्तीप्रवृत्तींना दडपून ठेवण्यात अर्थ नाही. इंग्लंड-अमेरिकेत न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रॅमिंग (एन. एल. पी.) म्हणून परिवर्तनाची एक प्रणाली विकसित केली गेली आहे. त्यामुळे न्यूनगंडाने पछाडलेल्या, नैराश्याने हैराण झालेल्या, काळलीने पोखरलेल्या व्यक्तीमध्ये उत्साह चैतन्याचा तसेच आत्मविश्वास, ध्येयाचा ध्यास, इच्छाशक्ती यांचा झरा खळाळू लागतो असा अनेकांचा अनुभव आहे. आपला मेंदू हा एक महा संगणक आहे. आपल्या इंच्छेप्रमाणे आपल्या भावना, विचार आणि कृती यात बदल होत राहतात. आपल्या सवयीही बदलत असतात. आपण स्वत: सकारात्मक दृष्टिकोन विकसित करून नेहमी उच्च प्रतीची कामगिरी करू शकतो. आपल्या मज्जासंस्थेद्वारे मेंदूकडे ज्ञानेंद्रियांद्वारे गोळा होणारी सर्व माहिती पोहोचविण्याची प्रक्रिया अहोरात्र चालू असते. या प्रक्रियेची विशिष्ट भाषा असते. या भाषेद्वारे मेंदूला सूचना मिळतात. त्या सूचनांच्या संदर्भात मेंदू निर्णय घेतो. ते निर्णय आपण कृतीत उतरवतो. या प्रक्रियेत सूचनांची भाषा हा महत्त्वाचा घटक असतो. भाषा ही वेगवेगळी भाव व्यक्त करते. भाषा वाकवता येते. एकच विचार वेगवेगळ्या प्रकारे प्रकट करता येतात. भाषा वाकली की सूचनांचे अर्थ बदलतात. सूचना बदलल्या म्हणजे मेंदूचे निर्णयही बदलतात. आपल्या कृतीतही त्यामुळे बदल होतो. आपण सूचनांसाठी या शब्दयोजना करतो त्यामुळे मेंदू गोंधळात पडतो. मेंदूला नकारात्मक भाषा कळत नाही. त्यासाठी सकारात्मक कृती घडवून आणतील. चित्त स्थिर ठेव, हसतमुख रहा, रस्ता ओलांडताना दोन्ही बाजूंना लक्ष ठेव. फुप्फुसांची कार्यक्षमता टिकवून ठेव... यासारख्या सकारात्मक भाषेचे-कल्पनाचित्र रंगवत राहिले तर त्याच्याशी मिळवून घेणे मेंदूला सोपे जाते. तशी सूचना मेंदू देतो. त्याप्रमाणे कृतीला आपण प्रवृत्त होतो. कल्पनाचित्राशी जुळवून घेण्याचा मानसिक सराव केला तर होणारी कृतीही सफाईदार होते. उपजत कौशल्य असल्यासारखी ती वृत्ती आपल्यालाही उभारी देते. हे सूत्र लक्षात ठेवले तर तुमच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडून येईल आणि हे शास्त्र वापरून तीन दिवसात आपणास आत्मपरिवर्तन साध्य होऊ शकेल. पहिला दिवस : न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रॅमिंगचा आरंभ करताना आपल्याजवळ काय आहे, आपल्याजवळ काय नाही, आपल्याला काय हवे आहे, आपल्याला काय नको आहे याची नोंद करायची आहे. डावीकडे आवडत्या गोष्टी लिहा. उजवीकडे नावडत्या, नको असलेल्या गोष्टी लिहा. त्याच्यापुढे आपल्याला आवडणाऱ्या ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत, त्यांची नोंद करा. ज्या नाहीत त्यांची नोंद करा. नावडणाऱ्या गोष्टींबाबतही अशीच नोंद करा. दुसरा दिवस : आपल्याकडील टाकाऊ गोष्टींचे रुपांतर आपल्याला हव्या असलेल्या चांगल्या गोष्टींमध्ये कसे करायचे हे दुसऱ्या दिवशीच्या अभ्यासाचे मध्यवर्ती सूत्र आहे. उदा. धूम्रपान आणि मदिरापान या गोष्टी ठाऊक वाटत असतील तर सुदृढ आणि निर्व्यसनी व्यक्तिमत्त्व हे रुपांतर हवेसे वाटेल. त्यासाठी धूम्रपान व मद्यपान यापासून दूर रहायला हवे. (डिस-असोसिएट). त्यामुळे जी उत्तेजना मिळत असे किंवा रंजन होत असे, ते अन्य मार्गाने आवडत्या गोष्टींद्वारे मिळवायचे आहे. (असोसिएट व्हा.) तिसरा दिवस : स्वत:भोवती ऊर्जेचे वर्तुळ तयार करण्यासाठी प्रयोग करणे. पुस्तकात या प्रयोगाचे सविस्तर वर्णन केलेले आहे. या प्रयोगात पाच टप्पे आहेत. स्वत:ला नवीन सवय लावण्यासाठी प्रचंड मानसिक बळ लागते. त्यासाठी ऊर्जा खर्च करावी लागते. सवय अंगवळणी पडली की ऊर्जा जास्त लागत नाही. चांगल्या सवयी लावण्यासाठी निर्णय घ्यावा लागतो. चांगल्या सवयी या गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीसारख्या असतात. बदल आवश्यक असतो तेव्हा झटपट बदलण्याची वृत्ती बाणवा. बदल नको असेल तर बदलण्याएवढा ठामपणाही ठेवा. आपल्या नकारात्मक विचार-वृत्तींना सकारात्मक वळण देण्याचे काम केवळ आपल्या योग्य भाषेद्वारे मेंदूला सूचना देऊन होऊ शकते, या कल्पनेचा शास्त्रीय पातळीवर पाठपुरावा करून, तिचा प्रभावीपणा अजमावण्यात आलेला आहे. त्यामुळे न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रॅमचे हे तंत्र आपल्यालाही उपयुक्त करू शकेल. अवघ्या साठ पृष्ठांमध्ये हे सर्व तंत्र विशद केलेले आहे. त्यामुळे ते आत्मसात करण्याला आणखीनच सुलभ ठरेल. झटपट व्यक्तिमत्व विकास ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

FRANKLIN MALIKA COMBO SET - 29 BOOKS
FRANKLIN MALIKA COMBO SET - 29 BOOKS by PAULETTE BOURGEOIS Rating Star
रश्मी मुसळे-साळगांवकर

लहानग्यांच्या विश्वातल्या छोट्या छोट्या गमतीजमती या पुस्तकांच्या मालिकेतून अगदी मजेशीर पद्धतीने मुलांसमोर येतात..त्या गोष्टी ऐकताना, वाचताना मूलं यात अगदी रमून जातात... शिवाय आजवर ससा आणि कासव यांव्यतिरिक्त इतर कथाविश्वात काहीसा दुर्लक्षित राहिलेलया कासवाच्या जगातही अनेक गंमती घडू शकतात ही नवखी कल्पना मुलांना भारीच आवडते... ...Read more

MARATHI DAULATICHE NARI SHILP
MARATHI DAULATICHE NARI SHILP by GOPAL DESHMUKH Rating Star
लोकसत्ता २२ जानेवारी २०२३.

बाईचे विश्व हे चूल आणि मूल एवढय़ापुरतेच मर्यादित नसते याची उदाहरणे आपल्याला इतिहासातसुद्धा पाहायला मिळतात. इतिहासात डोकावून पाहिले तर स्त्रियांचे आयुष्य हजार बंधनांनी जखडलेले होते. लहान वयातच मुलींची लग्नं केली जात असत. सतीची चाल, विधवांना केशपनाची सक्ती, सती जाणाऱ्या स्त्रियांच्या मरणाइतकेच सती न जाणाऱ्या विधवांचे जगणे भयंकर होते. अशा समाजातच काही स्त्रिया अशासुद्धा होऊन गेल्या ज्यांनी आपल्या कार्याने, आपल्या धाडसाने, शौर्याने महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाची भर टाकली. समाजाचा स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्यात ज्यांचा मोलाचा वाटा आहे अशाच काही निवडक स्त्रियांचे चरित्र रेखाटन गोपाळ देशमुख यांनी ‘मराठी दौलतीचे नारी शिल्प’ या पुस्तकात केले आहे. जिजाऊमातेने बालशिवाजींची जडणघडण केली. अशा कर्तृत्ववान जिजाबाईंचे व्यक्तिचरित्र ‘राजमाता जिजाऊ’ या प्रकरणामध्ये सारांशरूपाने रेखाटण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे. तसेच शिवरायांच्या जीवनात ज्या आठ राण्या आल्या त्यांच्या जीवनकार्याचे वर्णन ‘राणीवसा’ या प्रकरणात येते. ‘महाराणी येसूबाई’ या प्रकरणात त्यांची स्वराज्यनिष्ठा व दूरदृष्टी कशी दिसून येते याचे वर्णन केले आहे. संकटसमयी संभाजी राजांना दिलेल्या सल्ल्यामुळे त्यांच्या कार्यात मदत कशी झाली याचेही वर्णन आले आहे. ताराबाई, उमाबाई दाभाडे, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी युद्धभूमीवर शत्रूला तोंड कसे दिले. दर्याबाई निंबाळकर, पेशवा पत्नी गोपिकाबाई, रमाबाई, गंगाबाई यांनाही व्यक्तिगत सुखदु:खाबरोबरच मराठी दौलतीच्या वाटचालीत आपली भूमिका कशी पार पाडावी लागली याचीही माहिती पुस्तकात देण्यात आली आहे. दौलतीचा कारभार करताना अहिल्याबाईंना तीस वर्षे वैयक्तिक दु:खांना सामोरे जावे लागले. या साऱ्या दु:खांना बाजूला सारून उत्कृष्ट कार्य करून त्या ‘साध्वी पुण्यश्लोक अहिल्या’ कशा झाल्या याचा थोडक्यात आढावा घेतला आहे ‘अहिल्याबाई होळकर’ या प्रकरणात. तसेच पुतळाबाई आणि रमाबाई यांचे पतिनिष्ठेचे वर्णनही वाचायला मिळते. या सर्व व्यक्तिचरित्रांपैकी ‘राणी लक्ष्मीबाई’ यांचे चरित्र वाचताना त्यांची धाडसी वृत्ती, चिकाटी, येईल त्या प्रसंगाला न घाबरता शौर्याने सामोरे जाण्याची वृत्ती व शेवटी त्यांचा झालेला शोकात्मक शेवट आपल्या मनाला चटका लावून गेल्याशिवाय राहात नाही. वयाच्या चौदाव्या वर्षी गंगाधरराव यांच्याशी विवाह झाल्यानंतर आपल्या मुलाच्या आणि पतीच्या निधनानंतर शोक करत न बसता ही वीरांगना आपला दत्तक मुलगा दामोदर याला घेऊन ब्रिटिशांच्या कटू कारस्थानांना तोंड देण्यास सज्ज झाली होती. यातच तिला वीरमरण आले. हे वीरमरण येतानासुद्धा ती मोठय़ा शौर्याने अखेरच्या क्षणापर्यंत लढली आणि जेव्हा आपला देह आपल्याला साथ देत नाही हे लक्षात आले तेव्हा तिने आपल्या अनुयायांना आपला देह शत्रूच्या हातात पडता कामा नये, त्याला अग्नी द्या, असे सांगितले. अशा या वीरांगनेची गर्जना ‘मै मेरी झांसी नही दूंगी’ ही आजही अनेक स्त्रियांना आपल्या कामात प्रेरणा देणारी अशी आहे. राणी लक्ष्मीबाईच्या मरणाविषयी अनेक हकीकती उपलब्ध आहेत. त्यांचा उल्लेखही या पुस्तकात आला आहे. या पुस्तकातील स्त्रिया इतिहासकालीन असल्याने काही ठिकाणी ऐतिहासिक संदर्भाची पुनरावृत्ती झाल्यासारखे वाटते; पण ते येणेसुद्धा गरजेचे आहे. साध्या सोप्या भाषेत ही स्त्री चरित्रे आपल्याला वाचायला मिळतात. थोडक्यात असे म्हणता येईल की, इतिहासकाळातील थोर महिला विभूतींच्या जीवनकार्याचा अल्पांशाने सार वाचकांपुढे मांडण्याचा प्रयत्न लेखक गोपाळ देशमुख यांनी केला आहे, तो कौतुकास्पद आहे. ...Read more