* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: YALA JIVAN AISE NAV
  • Availability : Available
  • ISBN : 9788184984064
  • Edition : 3
  • Publishing Year : AUGUST 2012
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 80
  • Language : MARATHI
  • Category : HEALTH & PERSONAL DEVELOPMENT
  • Available in Combos :SANJEEV PARALIKAR COMBO SET - 8 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
MANY A TIMES, WE TEND TO FORGET THAT `POLICE` IS ALSO A HUMAN BEING. HE FACES MANY DANGERS WHILE PERFORMING HIS DUTIES. HE COMES ACROSS MANY TEMPTATIONS WHILE ON DUTY, HE HAS TO ACCEPT SLAVERY IN FRONT OF THE POLITICIANS, THE SO CALLED PRESTIGIOUS AND HIGHCLASS PEOPLE, THE INFLUENTIAL PEOPLE. WHILE WORKING ON A SCENE OF CRIME, WHILE STRUGGLING TO FIND A CRIMINAL, WHILE BEING WITH THE COMMON MAN, EVERY POLICE COMES ACROSS INCIDENCES WHICH MAKE HIM LOSE HIS SENSE OF MIND. SOMETIMES, EVEN THOUGH HE KNOWS THE CRIMINAL, HE IS IN NO POSITION TO PUNISH HIM, SUCH TIMES MAKE HIM DESPERATE. HERE IS A STORY OF A SINCERE OFFICER WHO ALWAYS CONSIDERED HIS DUTY MOST RELIGIOUSLY, AND WHO STRIVED HARD TO FIND A WAY THROUGH ALL THE NEGATIVITIES TO REACH HIS GOALS.
गोष्टीची पुस्तके आपल्याला नेहमीच आवडतात. छोट्या छोट्या गोष्टींचा संग्रह जर एकाच पुस्तकात मिळाला तर आपल्याला आणखीनच आवडते, त्यातूनही त्या पुस्तकात जर प्राण्यांच्या गोष्टी असतील तर मग काय विचारता! तुम्ही जर माझ्याशी सहमत असाल तर हे पुस्तक तुम्हाला निश्चितपणे आवडेल. ह्या पुस्तकात मी छोट्या छोट्या चौदा गोष्टी लिहिल्या आहेत. काही गोष्टी काल्पनिक आहेत, काही सत्यकथा आहेत, काही प्राण्यांच्या गोष्टी आहेत, तर काही इमेलद्वारे माझ्यापर्यंत पोहोचल्या आहेत. ह्या गोष्टींतून जे मोठे मोठे धडे घ्यायचे आहेत, ते तात्पर्यामध्ये लिहिलेच आहेत, पण हे धडे अमलात आणले तर आयुष्यावर दूरगामी परिणाम काय होतील ते मी सांराशामध्ये लिहिले आहेत. माझे हे गोष्टीचे पुस्तक तुम्हाला निश्चित आवडेल.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#पाल्यव्यक्तिमत्त्वाचाकानमंत्र #संजीवपरळीकर #व्यक्तिमत्त्वविकसन #PALYAVYAKTIMATVACHAKANMANTRA #SANJEEVPARLIKAR #PUDHAKARGHYA #ZATPATVYAKTIMTVAVIKASAN #CHARSHABDADYAVEGHYAVE #CHARJABARDASTFANDE #YALAJIVAN AISENAAV #KELYANEHOTAHERE! #VIKRIKAUSHALYASHIKA
Customer Reviews
  • Rating StarDAINIK LOKPRABHA 15-07-2016

    गोष्ट सांगणे आणि ऐकणे प्रत्येकाने बालपणी केलेलं असतं. काहींनी त्या गोष्टींचा संग्रहसुद्धा केलेला असतो. राजा-प्रधान, प्राणी-पक्षी, लहान मुलं, परी, राजकुमार अशा अनेक व्यक्तिरेखा त्या गोष्टींमध्ये असतात. बालपणी ऐकलेल्या, वाचलेल्या प्रत्येक गोष्टीनंतर ता्पर्य असायचं. प्रत्येकाला बालपणाची आठवण करून देणारे ‘याला जीवन ऐसे नाव’ हे पुस्तक वाचण्यासारखे आहे. संजय परळीकर यांच्या या पुस्तकातून मांडलेल्या गोष्टी आणि त्यांचे तात्पर्य विचार करायला लावण्यासारखे आहेत. ‘याला जीवन ऐसे नाव’ या पुस्तकात छोट्या चौदा गोष्टींचा संग्रह आहे. यातील प्रत्येक गोष्टीनंतर तात्पर्यही दिलं आहे. सकारात्मक दृष्टिकोन कसा ठेवावा. कॉर्पोरेट जगात कसं वागावं, इतरांना सहकार्य करावं, महत्त्वाच्या गोष्टींचा प्राधान्यक्रम ठरवणे असे अनेक मुद्दे या तात्पर्यांध्ये आहेत. रोजच्या जगण्यात उपयुक्त अशा महत्त्वाच्या गोष्टींबाबत या तात्पर्यांमध्ये समावेश आहे. साध्या, सोप्या भाषेत मांडलेल्या गोष्टींतून चांगला बोध होतो. या संग्रहात काही सत्यकथा, काही प्राण्यांच्या गोष्टी, तर काही लेखकाकडे ईमेलद्वारे आलेल्या गोष्टी आहेत. या पुस्तकातील गोष्टींनंतर तात्पर्य मांडले आहेच तसंच त्यातील धडे अमलात आणले तर आयुष्यावर परिणाम होतील याबाबत सारांशमध्ये लिहिले आहे. असा बोधपर गोष्टींचा संग्रह वाचनीय आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more