* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: MY DAUGHTER MY MOTHER
  • Availability : Available
  • Translators : RAMA NADGUADA
  • ISBN : 9789387789050
  • Edition : 1
  • Publishing Year : APRIL 2018
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 464
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : AUTOBIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Print Books:
"IN 1984 TWO YOUNG MOTHERS MEET AT A TODDLER GROUP IN BIRMINGHAM. AS THEIR FRIENDSHIP GROWS, THEY SHARE WITH EACH OTHER THE DIFFICULTIES AND SECRETS IN THEIR LIVES: JOANNE, A SWEET, SHY GIRL, IS INCREASINGLY AFRAID OF HER HUSBAND. THE LIVELY, PROMISING MAN SHE MARRIED HAS BECOME HOSTILE AND VIOLENT AND SHE IS TOO ASHAMED TO TELL ANYONE. WHEN HER MOTHER, MARGARET IS SUDDENLY RUSHED INTO HOSPITAL, THE BEWILDERED FAMILY FIND THAT THERE ARE THINGS ABOUT THEIR MOTHER OF WHICH THEY HAD NO IDEA. MARGARET WAS EVACUATED FROM BIRMINGHAM AS A CHILD AND HAS SPENT YEARS AVOIDING THE PAIN OF HER CHILDHOOD - BUT FINDS THAT YOU CAN`T RUN FROM THE PAST FOREVER. SOOKY, KIND AND GOOD-NATURED, HAS ALREADY BEEN THROUGH ONE DISASTROUS MARRIAGE AND IS BACK AT HOME LIVING WITH HER PARENTS. BUT BEING `DISGRACED` IS NOT EASY. HER MOTHER, MEENA, REFUSES TO SPEAK TO SOOKY. AT FIRST HER SILENCE SEEMS LIKE A PUNISHMENT, BUT SOOKY GRADUALLY REALIZES IT CONTAINS EMOTIONS WHICH ARE FAR MORE COMPLICATED AND THAT HER MOTHER MAY NEED HER HELP. MEENA HAS SPENT TWENTY YEARS TRYING TO FIT IN WITH LIFE IN BIRMINGHAM, AND TO DEAL WITH THE CONFLICTS WITHIN HER BETWEEN EAST AND WEST, OLD WAYS AND NEW. MY DAUGHTER, MY MOTHER BY BESTSELLING SAGA AUTHOR ANNIE MURRAY, IS THE STORY OF TWO YOUNG WOMEN DISCOVERING THE HEARTBREAK OF THEIR MOTHERS` LIVES, AND OF HOW MOTHERS CREATE DAUGHTERS - AND LEARN FROM THEM. "
"१९८४ साली एका शिशु खेळगटात दोन आया एकमेकींना भेटतात. त्यांची मैत्री वाढत जाते आणि त्या आपलं आयुष्य एकमेकींसोबत वाटून घेतात– अगदी सगळ्या रहस्यांसकट. जोआन – गोड, लाजरी मुलगी जिला दिवसेंदिवस स्वत:च्या नवऱ्याची भीती वाटते आहे. तिने ज्याच्यावर प्रेम करून लग्न केलं तो देखणा, हसतमुख तरुण हिंसक, विरोधात जाणारा का होतो आहे; हे तिला उमजेनासं झालं होतं. हे इतर कुणालाही सांगायची तिला लाज वाटत होती. जोआनची आई – मार्गारेट –हिला अचानक हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं. तेव्हा प्रथमच त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला हे कळलं की, आपल्या आईच्या आयुष्यात असं बरंच काही घडून गेलंय, ज्याची आपल्याला सुतराम कल्पना नाही. मार्गारेटला युद्धकाळात सुरक्षित ठिकाणी हलवलं गेलं होतं आणि तिने आपलं उभं आयुष्य त्या आठवणी गाडून टाकण्यात घालवलं. सुकी – जिने एका लग्नाचा भयाण अनुभव घेतला असून, सध्या स्वत:च्या माहेरी राहते आहे. अशा रीतीने ‘बदनाम’ होणं सोपं नव्हतं. तिच्या आईने – मीनीने – तिच्याबरोबर अबोला धरला आहे. सुरुवातीला हा अबोला सुकीला न केलेल्या गुन्ह्याची अन्याय्य शिक्षा वाटत होता. पण हळूहळू तिला कळत गेलं की, तिच्या आईच्या मनात खूप विचित्र गुंतागुंत आहे. हा अबोला फक्त वरवरचा आहे आणि तिच्या आईला तिची – तिच्या मुलीची – नितांत गरज आहे. ही गोष्ट आहे दोन अस्वस्थ, तरुण मुलींची ज्यांना अपघातानेच आपापल्या आयांच्या आयुष्यातील हृदयद्रावक सत्यं समजतात. आई मुलीला कसं घडवते आणि मुलीकडून जगणं कसं शिकते, याची सुंदर गोष्ट! भूतकाळात अडकलेल्या आया आणि वर्तमानाला आव्हान देऊन भविष्य घडवू पाहणाऱ्या त्यांच्या तरुण मुलींची कहाणी! "

No Records Found
No Records Found
Keywords
#JOANNE MARGARET ASIAN# GURUDWARA# SIKH# KHALISTAN# SOCIAL WORKER# BUGGY WAR# MOM# HOSPITAL# SOOKY# AMY# MEENA# WOMAN# COAT# BHINDRANWALE #TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%#मार्गारेट# जोआन# युद्ध# शीख# सुवर्णमंदिर# प्ले-ग्रुप# गॅरेज# फुटबॉल# सँडविच बाबगाडी# मॉम# डॅड# चहा ड्रिंक# सुकी# आयरिश# समाजसेविका अशियाई# नाताळ# धर्म# आधार# आश्रम# जीन्स# पब# ड्रेस. # माय डॉटर माय मदर# मायलेकी# रमा नाडगौडा# अ‍ॅनी मरे #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAKAL 28-10-2018

    जोआन आणि सुकी या दोन तरुण आयांची आणि त्यांच्या आया- अनुक्रमे मार्गारेट आणि मीनी- यांची ही गोष्ट. शिशु खेळगटात जोआन आणि सुकी भेटतात आणि एकमेकींचं आयुष्य शेअर करायला लागतात. त्यातून त्यांच्या आयांचं आयुष्य त्यांना कळत जातं आणि त्या आया त्यातून कसं शिकतजातात त्याची ही वेगळ्या प्रकारची कथा अ‍ॅनी मरे यांनी लिहिली आहे. रमा नाडगौडा यांनी तिचा अनुवाद केला आहे. भूतकाळात अडकलेल्या आया आणि वर्तमानाला आव्हान देत भविष्य घडवू पाहणाऱ्या मुलींची ही गोष्ट अनेक गोष्टी उकलते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MI GALIB BOLTOY
MI GALIB BOLTOY by SHABBIR ROMANI Rating Star
लोकमत २५.९.२०२३

शब्बीर रोमानी हे व्यवसायाने वकील. मातृभाषा अर्थात उर्दू आणि शिक्षण मराठी माध्यमातून झालेले. २०१८ मध्ये प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या उर्दू पुस्तकाला, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालच्या साहित्य अकादमी केंद्राचे पुरस्कार लाभले आहेत. आता मिर्झागालिबवरचे नवे पुस्तक, `मी गालिब बोलतोय...!` लक्ष वेधून घेत आहे. गालिबच्या एका शेरची पहिली ओळ घेऊन सांगायचे झाल्यास, जिक्र गालिबचा आणि खूबसूरत बयान लेखकाचे असे या पुरस्काराबद्दल म्हणता येईल. मिर्जा असदुल्ला खां,`गालिब` या श्रेष्ठ शायरची शायरी, त्याचे पत्रलेखन, चरित्र यावर आजवर शेकडो पुस्तक प्रसिद्ध आहेत. लेखकाने प्रस्तावनेत नमूद केल्यानुसार गालिबवर अनेक लेखकांनी लिहिले आहे. मराठी, हिंदी-उर्दू लेखकांची ते तपशील पाहून आचंबा वाटतो. शिवाय शब्बीर रोमानी यांनी इथे आपल्या लेखनाचे प्रयोजन सांगताना म्हटले आहे, कि गालिबबद्दल अनेक उलट-सुलट प्रकारच्या कहाण्या, विनोद, (कसलेही शेर गालिबच्या नावाने सांगत राहणे) प्रचलित आहेत; त्यामुळे गालिबची कथा, त्याच्या पत्रांमधल्या मनोरंजक गप्पा-गोष्टी आणि त्याच्याशी निगडित आठवणी हे सगळं साध्या सोप्या भाषेत लिहिण्याचा प्रयत्न म्हणजे हे पुस्तक. सर्वसामान्य माणसाच्या जगण्यातल्या सर्व भावछटा गालिबच्या काव्यातून दिसत असतात. पुस्तक वाचताना गालिबची प्रकृती, त्याची विनोद बुद्धी, संवेदनशील वृत्ती हे आपल्याला जाणवत राहते, आणि लेखकाची तळमळसुद्धा. या पुस्तकाचे वैशिष्टय म्हणजे, मोठी प्रकरण टाळून किस्से सांगावेत अशी रचना. शिवाय लेखकाची साधी-सरळ भाषा, यामुळे शायरीची आणि गालिबबद्दलची सर्वसाधारण माहिती आणि कुतुहूल असणाऱ्या वाचकांना हे पुस्तक रंजक वाटेल. सहसा गालिबचे गाजलेले शेर, किस्से हे आपल्या वाचनात असतात. या पुस्तकात गालिबचे अनेक दुर्मिळ शेर, शिवाय फारसी रचनाही या पुस्तकात समाविष्ट असल्याने त्याला एक संदर्भ ग्रंथाचेही स्वरूप आलेले आहे. गालिबला आंबे फार आवडायचे, `मिर्झा गालिब` या गाजलेल्या चित्रपटातला तो प्रसंग आजही लक्षात आहे. आंबे खाताना एक मित्र गालिबला तुच्छतेने म्हणतो, `आम तो गधेभी नही खाते!` त्यावर गालिबने त्वरित उत्तर देतो. `सिर्फ गधेही नाही खाते!` शब्बीर रोमानी यांनी हा प्रसंग व विनोद म्हणून सांगितला नाही, तर त्याचे तपशिलाने वर्णन तर केलेच शिवाय आंब्यावरची गालिबची मोठी गजल त्यांनी दिलेली असल्याने त्या किश्श्याला एक गांभीर्य आलेले आहे. असाच एक किस्सा, ते कलकत्त्याला असताना साध्या चिकणी-सुपारीवर गालिबला कुणी छेडले होते, यावर तुमची शायरी होऊन जाऊ द्या! असे आवाहन केले. या सुपारीच्या दिसण्या-असण्यावरच्या अफलातून शायरीची भली मोठी झलकच गालिबने पेश केली! गालिबच्या एक महत्वाचा शेर आहे. जिक्र ऊस परी-वंश का और फार बयां अपना बन गया रिकीब आखिर, था जो राजदां अपना त्या परिच्या सौंदर्याचे वर्णन आणि तेही माझ्या भाषेतून, माझ्याकडून ऐकले आणि माझा जवळचा असा मित्र आता या प्रेमाच्या नात्यात माझा प्रतिस्पर्धी झाला (आता तो तिच्यावर प्रेम करायला लागला) कलकत्त्याला गालिब दीडेएक वर्ष राहिला होता. तिथल्या धनिकांनी मुशायरे, मुजरे आयोजित केलेले असायचे, गालिबचा तिथे सन्मानही व्हायचा. गालिबने या बद्दल फार जिव्हाळ्याने लिहिले आहे. या मुशायऱ्यामध्ये गालिबचे फारसीचे काव्यवाचन ऐकून फारसी भाषेचे तज्ञ त्याच्यावर नाराज झाल्याची आठवण आहे! गालिबच्या तोंडून फारसीचे कौतुक ऐकून लोकांनी आक्षेप घेतला! गालिब हा आपल्या दुःख, विवंचनेवर हसणारा अद्भुत असा कलावंत होता. हा शेर वाचल्यावर आपल्याला मुन्शी प्रेमचंद यांच्या `पूस कि रात` मधला हलकू आठवतो! मिर्झा गालिबच्या कुतुहूल असणाऱ्या वाचकांना हा संग्रह आवडण्यासारखाच आहे. लेखनातल्या भाषिक काही त्रुटी वगळल्यास, गालिबचे किस्से, त्याची शायरी हे सगळे रोचक आहे. ...Read more

MRUTYUNJAYEE
MRUTYUNJAYEE by RATNAKAR MATKARI Rating Star
पुस्तकप्रेमी

मीना कश्यप शाह *मृत्युंजयी* भयकथा हा रत्नाकर मतकरींच्या लेखनाचा हातखंडा. मी दहावीच्या सुट्टीत असताना भयकथा वाचायला सुरुवात केली आणि त्यांनी मला पुरात झपाटून टाकलं होतं. ही पुस्तकं असायचीही सुटसुटीत जाडीची. त्यामुळे जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी पुस्तक लगणाऱ्या मला सगळीकडे ती घेऊन जात येत असत. क्लास मध्ये लवकर पोहोचले - वाच पुस्तक, बससाठी उभी आहे, वाच पुस्तक; झोप येत नाही, वाच (हे बहुदा चक्राकार रित्या सुरु राहायचं, झोप नाही म्हणून वाचायचं आणि वाचत असायचे म्हणून झोप नाही... त्या वयात असं सगळं चालायचं - लहानपण देगा देवा...) मृत्युंजयी सुरु केली तेव्हा आधीच खेकडा, रंगांधळा वाचून झालं होतं. अजूनही एक संपवलं होतं, पण नाव नाही आठवत (बहुतेक कबंध). त्या पार्श्वभूमीवर मृत्युंजयी फार आवडलं नाही, आणि खरं तर त्यामुळे रत्नाकर मतकरींच्या भयकथा वाचणं थांबलं. अलीकडेच हे इ-बुक मिळालं किंडल वर, पुन्हा वाचलं - आतासुद्धा शेवटच्या परिच्छेदात काय वळण मिळतं त्याची उत्सुकता होती, पण एकूणच माझा patience खूपच कमी झालाय त्यामुळे skip reading, quick reading करत पुस्तक पटकन वाचून संपलं. मृत्यू, अखेर, शेवट ही भावना प्रत्येकासाठी भीतीदायकच. त्या भीतीवर बेतलेल्या कथा ह्या संग्रहात आहेत. अतिमानवीय, फँटसी, भुताटकी अशा धक्कातंत्राचा उपयोग अनेक लेखक करतात. पण मतकरीचं वैशिष्ठय असं, की ते जळमटं सारखी कथा लिहून जातात. मृत्युंजयी मधील कथांमध्ये मृत्यूची अनेक रूपं दिसतात, कथा जिवंत माणसांच्या - पण मृत्यूची चाहूल, त्याची भीती, कधी त्याचं हवेहवेपण, कधी त्याच्याकडे आपणहून जाणे, अशा अनेक रंगढंगांनी मतकरी गूढता कायम ठेवतात. ह्या पुस्तकातील, मृत्यू अवतीभवती असलेल्या प्रत्येक कथेत, आपणा सर्वांना नक्कीच सुप्त आकर्षण वाटत असलेल्या अनेक गूढ गोष्टी येतातच... मृत्यूवर विजय मिळवण्यासाठी करण्याची अतिमानवीय साधना... स्त्री-पुरुषातील शारीरिक आणि मानसिक ओढ... पूर्वी केलेल्या चुका आणि त्याबद्दलचा सल... जुलमाचा प्रतिशोध... अतिमानवीय शक्तींनी झपाटणे... भूतबाधा, भूतांशी गाठभेट... मृत्यूच्या अनेकविध तऱ्हा... मानसिक संतुलन ढळणे... आणि तत्सम. ह्या कथाप्रकारात महत्वाचं असतं, ते शेवटच्या काही वाक्यांमधे कथेला दिलेलं वळण आणि त्यामुळे वाचकाला बसलेला धक्का. रत्नाकर मतकरींच्या गूढकथा म्हणूनच खूप प्रभावी ठरतात. आता मात्र हे धक्का तंत्र बऱ्याच जागी पाहायला मिळतं - OTT वरच्या अनेक चित्रपट किंवा नाट्यमालांमधे हे तंत्र कथाकार वापरतात, आणि लोकांना हे पहायला खरंच खूप आवडतं, म्हणूनच त्या प्रसिद्ध होतात. अलीकडचं उदाहरण "वाळवी" चित्रपट! मृत्युंजयी मधे देखील काही कथा असा आनंद देऊन जातात. पण असं आहे ना "अति सर्वत्र वर्जयेत" - त्यामुळे बऱ्याच कथांच्या शेवटचा अंदाज लागतो आणि त्यांचा प्रभाव कमी होतो. सुरुवातीला जी गूढकथांची पुस्तकं मी वाचली, तेव्हा हे धक्कातंत्र मला नवीन होतं, त्यामुळे त्यात हा अंदाज लागत नव्हता. कदाचित मृत्युंजयी तेव्हा वाचलं आणि आताही वाचलं ते ह्या तंत्राचा अति वापर झाल्यावर वाचलं गेलं म्हणून असेल, पण कमी प्रभावी वाटलं हे खरं. अर्थात प्रत्येक गोष्टीत (सध्या इतर कथांमधे फारसे न सापडणारे) एक समान सूत्र आहे - ते म्हणजे, *वाईटाचं कधीच भलं होत नाही*. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, कधीही उचलून वाचायला सुरुवात करून काही मिनिटात एक गोष्ट संपते. सध्याच्या व्यग्र काळात हे पुस्तक पुन्हा वाचायला सोपे गेले, नक्कीच. आणि मी पुन्हा एकदा ह्या कथाप्रकाराकडे आकर्षितही झाले आहे... पुन्हा सगळी गूढकथांची पुस्तकं वाचायला हवीत. ...Read more