* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788184980158
  • Edition : 6
  • Publishing Year : MARCH 2009
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 88
  • Language : MARATHI
  • Category : BUSINESS & MANAGEMENT
  • Available in Combos :SANJEEV PARALIKAR COMBO SET - 8 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
SUCCESS, LUCK AND DESTINY HAVE ALWAYS REMAINED DEBATABLE SUBJECTS. WE EASILY BLAME LUCK` OR DESTINY` ESPECIALLY WHEN WE DO NOT GET SUCCESS IN SPITE OF OUR SINCERE HARD WORK. QUESTION ARISES, ARE PEOPLE BORN LUCKY`? ARE PEOPLE DESTINED FOR SUCCESS? DOES DESTINY` EXIST? I NEITHER KNOW ANSWERS OF THESE QUESTIONS NOR WOULD LIKE TO FIND THEM OUT. ANSWERS TO THESE QUESTIONS ARE SELDOM USEFUL TO MY PROGRESS. BUT WHAT I DO KNOW IS VERY SIMPLE. WHAT IS THAT ATTITUDE AND WHICH ARE THOSE SKILLS (WHICH NORMALLY ARE IGNORED) WHICH IF LEARNT, IF IMBIBED PROPERLY AND MANIFESTED IN OUR DAY TO DAY LIFE THEN LUCK` & `DESTINY` WILL HAVE NO OTHER OPTION THAN TO FAVOUR YOU. I HAVE SHARED MY EXPERIENCES IN THIS BOOK. I AM SURE YOU WILL LIKE IT. IF YOU IMBIBE IT THEN YOUR LUCK` OR DESTINY` MAY TILT TOWARDS YOU.
नशीब आणि प्रारब्ध हे नेहमीच वादातील विषय मानले जातात. बरेच प्रयत्न करूनसुद्धा जेव्हा एखादी गोष्ट मिळत नाही तेव्हा नशिबाला आपण खुशाल दोष देऊन मोकळे होतो. पण खरंच नशीब घडवता येत का? नशिबाला दोष देणे योग्य आहे का? यशस्वी लोकांच्या नशिबातच यश लिहलेले असते का? ह्या प्रश्नाची उत्तरे मला माहीत नाहीत, पण नशीब घडविण्यासाठी काय करायला पाहिजे, कोणते दृष्टिकोन अंगिकारायला पाहिजेत, कशावर श्रद्धा ठेवायला पाहिजे, कोणत्या ठिकाणी धाडस करायला पाहिजे, कोणती कौशल्य शिकायला पाहिजेत हे मला कळलेले आहे. ते मी ह्या पुस्तकात माझ्या अनुभवावरून लिहलेले आहे. तुम्ही जर हे वाचलत, तर तुमचही नशीब त्यामुळे बदलून जाईन.

No Records Found
No Records Found
Keywords
Customer Reviews
  • Rating StarDAINIK AIKYA 28-06-2009

    यशस्वी होण्याची सूत्रे... ‘पुढाकार घ्या’ या प्रेरणादायी पुस्तकाद्वारे यशाची आणि व्यवस्थापनाची दहा सूत्रे देणाऱ्या संजीव परळीकरांचे ‘केल्याने होत आहे रे’ हे नवे पुस्तक तरुणवर्गातील कर्तृत्वाला आणि कर्तबगारीला आव्हान देणारे, आवाहन करणारे, ‘तरुणांनो, ुढाकार घ्या आणि नशीब घडवा’ अस शीर्षक त्यांनी त्यातील पहिल्याच लेखाला दिले आहे. चार पृष्ठांच्या या लेखात परळीकरांनी कृतिशील द्दष्टिकोनावर भर दिला आहे. काही मूलभूत गोष्टी सांगितल्या आहेत. उदा. आपल्याला फुकट काही मिळत नाही. प्रत्येक गोष्टीची किंमत असते. ती मोजावी लागते. नशिबाचीही किंमत असते. तीही मोजावी लागते. ही किंमत पैशामध्ये नसते, कृतीमध्ये असते. नशीब विकत घेण्यासाठी पुढाकाराची किंमत मोजावी लागते. तुम्हाला चांगले नशीब हवेय ना? मग पुढाकार घ्या. पुढाकार घेतला तर फायदा होतो. भरपूर ५/१०टक्के नाही,५/१०हजार टक्के.आपल्याला काहीही मिळवायचे असो, पैसा, मान कीर्ती, सुख, समाधान, शांती...पुढाकार घ्यायलाच हवा. यशस्वी होण्यासाठी तीन मुलभूत गोष्टी लागतात. १) शिक्षण - शाळा, कॉलेजातील शिक्षण नव्हे तर दैनंदिन जावनातील प्रॅक्टिकल ज्ञान. आपल्या क्षेत्राचे संपूर्ण ज्ञान. २) कलाकौशल्य मिळालेल्या ज्ञानाचा व्यवहारात उपयोग करून घेण्याचे कौशल्य. ३) जीवनविषयक द्दष्टिकोन - ज्ञान व कौशल्य यांच्या जोडीला जीवनविषयक प्रगल्भ, सकारात्मक द्दष्टिकोन हवा. चांगल्या गोष्टींवर श्रद्धा हवी. नीतीमूल्यांचे भान हवे. देव देवळात नसून अंत:करणात आहे असे मानले तर वाईट विचार करायला मोकळीक राहणार नाही. देवाला बाहेर शोधण्याऐवजी आपल्या मनातच शोध. त्याचा मान ठेवा. सत्कर्मांनी त्याची पूजा करा, तो प्रसन्न होईल. पुढाकार घ्या आणि डोळसपणे देवाकडे पहा. पुढाकार घ्या आणि स्वत:च्याविकासाच्या कामाला लागा. त्यातच तुम्हाला देव सापडल्याचा साक्षात्कार होईल. जागृत देवस्थानाला गेले म्हणजे तुमच्या गंभीरशमस्यांचा निसस होईल अशा भ्रमात राहू नका. यशस्वी होण्यासाठी धाडस हवे. अपयश हसतमुखाने पचवण्याचे धाडस हवे. नवीन ओळखी वाढवण्याचे धाडस हवे. स्वत:बद्दल फीडबॅक घेण्याचे धाडस हवे. कृतज्ञता व्यक्त करणे, क्षमायाचना करणे, आश्वासन देणे,यामुळे फीडबॅक मिळणे शुकर होईल. त्याबद्दल विस्तृत विवेचन ‘चार शब्द द्यावे घ्यावे’ या पुस्तकात परळीकरांनी केले आहे. आपल्याबाबतचा फीडबॅक आपल्यापर्यंत पोचण्याच्या मार्गात अनेक अडसर असतात. आपले व्यक्तिमत्त्व म्हणजे एक राजवाडा. त्याला अनेक दरवाजे. त्या प्रत्येक दरवाजावर राखणदार. तो कोणाला सहजी राजवाड्यात प्रवेश मिळू देत नाही. त्याप्रमाणे आपल्यावर टीका जेथून होण्याची शक्यता असते त्या प्रत्येक दरवाजावर एक राखणदार असतो. म्हणजे आपली बचावात्मक व्यवस्था कार्यरत असते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

वा. पां. जाधव अमरावती

`अमरावतीचे छप्पन स्वभाव एक मनोरंजक काव्यसंग्रह` `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे अमरावतीचे सुप्रसिद्ध साहित्यिक श्री जी. बी. देशमुख यांचे अमरावती नगरीचा सहज स्वभाव व ह्या नगरीच्या वेगळ्या ओळखीवर आधारित मनोरंजक पुस्तक वाचले. वाचून भरपूर मनोरंजन झाले. खर काय लिहावे या लेखकाबद्दल, मन गोंधळले. ऐतिहासिक असो, प्रवास वर्णन असो, व्यक्ती विशेष असो, अनुभवात्मक घटना घडामोडी असो कशावरही सहज लिखाण करणारा हा लेखक आहे. आता तर त्यांनी लेखनाला विनोद प्रचुर फोडणी देऊन `अमरावतीचे छप्पन स्वभाव` या काव्यसंग्रहातून अमरावतीकरांना मनोरंजनाची मेजवानीच दिली आहे. प्रत्येक शहराची व त्या शहरातील वैशिष्ट्यांची एक वेगळीच ओळख असते. दिवस जातात, काळ लोटतो, पिढ्या बदलतात मात्र जुन्या स्मृतीची चिन्हे नवीन येणाऱ्या पिढीच्या मनात गुढ निर्माण करत कायम हाक देत राहतात. अमरावतीही त्याला अपवाद नाही. बापट चौकात चौक नाही, त्या जागेवर चौरस्ता नसून टी-पॉइंट आहे, खापर्डे बगीचा म्हणून आजही ओळख आहे मात्र तेथे बगिचा नाही किंवा प्रसिद्ध गांधी चौकात गांधीचा पुतळा अथवा स्मृतीदर्शक चिन्ह अथवा उल्लेख नाही मात्र गांधी चौक अशीच ओळख जनमानसात आहे. अशा एक ना अनेक विसंगत नाम दर्शक ओळख असलेली उदाहरणे त्यात सप्रमाण आहेत. पण खरी गंमत म्हणजे कधी काळी घडलेला इतिहास त्यामध्ये दडलेला आहे हे निश्चित. या सोबतच अमरावतीकरांच्या स्वभावातला स्थायी मजेदारपणाच्या एक एका हटके गुण वैशिष्ट्याच्या गमती लेखकाने हुबेहूब अधोरेखित केलेल्या आहेत. आणि त्यावरुन तत्सम रचनांचा उहापोह लेखकाने पुस्तकात केला असावा. विदेशात स्थाईक झालेल्या मूळ अमरावतीकरांना लेखकाने लिहिलेल्या गमती मनोरंजनात्मक वाटाव्या एवढी किमया जी.बी. च्या सहज लेखनाने दाखवली आहे. अमरावतीचे अग्रगण्य वृत्तपत्र दै. हिंदुस्थान मध्ये लेखकाने सतत ६ महीणे लिहीलेल्या काव्य सदरात अमरावतीच्या जनमानसाच्या हृदयाच्या ठाव घेणाऱ्या काव्य रचनांचा आठवणींनी महापूर ओसंडून गेला होता. विशेष म्हणजे ह्यात कुठेही अनावश्यक अभिनीवेष नव्हता. उलट गमतीत केलेले आत्मपरिक्षण मात्र काही प्रमाणात होते. वयस्क अमरावतीकर रसिकांना या रचना ताज्या करून त्यांच्या तारुण्यात घेऊन गेल्या हेच खरे. जी बी देशमुख या लेखकास मिळालेल्या सकारात्मक प्रतिक्रियां वरून दिसून येते. . सदर पुस्तकातील काव्यमय रचना वाचतांना अमरावतीच्या माणसाच्या वऱ्हाडभोळ्या स्वभावाची प्रचीती येते आणि वेगळाच आनंद देऊन जाते. निखळ मनोरंजन करत गुदगुल्या करणारा असा हा काव्यसंग्रह आहे. अमरावती शहराची ऐतिहासिक वैशिष्टे काव्यरूपात वाचण्याचा आनंद अमरावतीकरांना ते जिथं असतील त्या गावात, परगावात, परदेशात पुस्तक मागवून घेता येईल. ...Read more

ज्योती चेडे, मुंबई.

अमरावतीच्या वैशिष्ट्यांवर आधारीत खुमासदार छप्पन्न कवितांच्या संग्रहातील प्रत्येक कविता वाचत असताना अमरावतीच्या वातावरणाची धुंदी आपसुकच मनावर चढु लागली. सगळ्याच कविता सुंदर आहेत. एकेक कविता अमरावतीचे अप्रतिम वर्णन करते. प्रत्येक कवितेचा शेवट कुठेतरी गंभीर विचार करायला भाग पाडतो आणि मन गलबलून जाते. सगळ्याच कविता सुंदर आहेत पण माझ्या मनाला भावलेल्या व भिडलेल्या कविता आहेत `अमरावतीतल्या गमती`, `अमरावतीचे शिक्षण`, `अमरावतीचे हजरजबाबी`, `अमरावतीचे वेडे`, `अमरावतीच्या काकू` व बाकी सगळ्या. `अमरावतीचे वेडे` या कवितेत उल्लेखीत शेवटचा अश्रुंचा एक थेंब जरुर राखला जाईल. तसेच `अमरावतीच्या काकूं` ची उर्जा उरात भरून उरेल. जीवन देणाऱ्या विहीरीने कोणाचेही जीवन घेऊ नये, अशी सद्भावना मनात जागेल. अमरावतीकर जगात कुठेही असो त्यांच्या मनात एका कोपऱ्यात राजकमल चौक असतोच हे सत्य मनावर कोरले जाईल. प्रत्येक अमरावतीकराने ह्या कविता जगाव्यात. त्यासाठी हे पुस्तक संग्रही ठेवावे आणि परगावी राहणाऱ्या आपल्या अमरावतीकर आप्तेष्टांना भेटी दाखल द्याव्या. ...Read more