* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: CHILDREN: HOW TO MANAGE THEM NOW THAT YOUVE GOT THEM
  • Availability : Available
  • Translators : AVINASH BHOME
  • ISBN : 9788177664171
  • Edition : 14
  • Publishing Year : JULY 1989
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 136
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : SELF HELP, HEALTH & PERSONAL DEVELOPMENT
Quantity
Buying Options:
  • Print Books:
THIS BOOK IS A WONDERFUL GUIDE FOR ALL THE PARENTS DEALING WITH THEIR CHILDREN IN THEIR DAY-TO-DAY LIFE. IT IS VERY INFORMATIVE AND EXPLAINS CLEARLY. IT GUIDES US ABOUT THE WAYS TO BEHAVE WITH THE CHILDREN AND ALSO THE GROWNUPS. THIS BOOK IS LIKE THE BIBLE. IT IS SO INTERESTING AND USEFUL THAT ONCE WE START READING IT, WE WILL NOT BE ABLE TO LEAVE IT FOR A MOMENT TILL COMPLETION. CHILDREN`S UPBRINGING IS A VERY DIFFICULT AND TENDER PROCESS. WE CANNOT LEAVE IT ON OUR FAITH OR DESTINY TO DECIDE THE NATURE AND COURSE OF OUR CHILD`S LIFE. VERY FEW HAVE THE NATURAL KNOWLEDGE ABOUT THIS. IF WE REALLY WISH TO RAISE OUR CHILDREN IN A PROPER WAY THEN WE MUST READ THIS BOOK; IT WILL SURELY GUIDE US IN A MOST APPROPRIATE WAY. WE CAN LEARN FROM IT THE SIMPLE YET EFFECTIVE WAYS OF BRINGING UP OUR CHILDREN. WHETHER YOU ARE A SIMPLE PARENT OR HAVE A DEGREE IN PSYCHOLOGY; THIS BOOK WILL BE EQUALLY HELPFUL TO ALL OF YOU.
संपूर्ण माहितीपूर्ण व अत्यंत सुस्पष्ट विवेचन करणारे हे पुस्तक, सर्व वयोगटांतील मुलांशी वागताना, प्रत्येक पालकाला दैनंदिन व्यवहार्य जीवनात अत्यंत उपयोगी पडेल. लहान बाळापासून ते किशोर - वयातील मोठ्या मुलांशी कसे वागावे. याबाबत मार्गदर्शन करणारे हे पुस्तक, ‘पालकांची गीता’ ठरली नाही, तरच नवल. एकदा वाचायला घेतल्यावर संपूर्ण वाचल्याशिवाय हे पुस्तक खाली ठेवणे हे कोणाही पालकाला जवळजवळ अशक्यच. मुलांचे संगोपन ही गोष्ट दैवावर सोडून चालणार नाही. फारच थोड्यांना ह्याबाबतचे उपजत ज्ञान असते. मुलांना जर योग्य तऱ्हेने वाढवून मोठे करायचे असेल, तर प्रत्येक पालकाला ह्याबाबतीत खूप काही शिकण्यासारखे आहे, अभ्यासण्यासारखे आहे, आणि त्यासाठीच हे पुस्तक अत्यंत मार्गदर्शक ठरणार आहे. उपयुक्त ठरणार आहे. आई-वडिलांची मानसशास्त्रातील उच्च पदवी मिळवलेली असो विंÂवा आयुष्यात एकही परीक्षा दिलेली नसो, सर्वच पालकांना हे पुस्तक ‘लाख मोलाचा सल्ला’ देणारा मार्गदर्शक वाटेल.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#C. NORTHCOTE PARKINSON# M. A. RUSTUMAJI # S. PAVRI, AVINASH BHOME #TUMHI AN TUMCHI MUL #MULBHUT GOSHTI #PRATHAM AMTANIRIKSHAN KARA #SHIKSHA NI PRASHANSA #SHISHTACHAR #MULNANA SACHHIL BANVAN #BALPAN #KHELNARI MUL #SHALKARI MUL #KIRKOL GOSHTI #MUL ANI SHTRI-PURUSH BHED (SEX) #PALAK ANI KISHOR#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLIN EMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #BIOGRAPHY #तुम्ही आणि तुमची मुलं! #अविनाश भोमे #AVINASH BHOME#
Customer Reviews
  • Rating StarDAINIK PUDHARI 17-04-2010

    समवयस्क पालकांमध्ये संवाद आवश्यक… बदलत्या काळात पालकत्व निभावताना पालकांना कसरत करावी लागत आहे, त्यामुळे मुलांना वाढविताना आलेल्या अडचणी, त्यावर केलेले उपाय याविषयी समवयस्क पालकांनी एकमेकांशी संवाद साधणे आवश्यक आहे, असे मत लेखक महेंद्र सेठिया यांनी ्यक्त केले. ज्येष्ठ लेखक अविनाश भोमे यांच्या ‘तुम्ही आणि तुमची मुलं’ या पुस्तकाच्या दहाव्या आवृत्तीचे प्रकाशन ज्येष्ठ व्यवस्थापन तज्ज्ञ डॉ. प्र. चि. शेजवलकर यांच्या हस्ते झाले. यावेळी विनोदी लेखक मुकुंद टाकसाळे, महेंद्र सेठिया, मेहता पब्लिशिंगचे अनिल व सुनील मेहता आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना भोमे म्हणाले, ‘‘सध्याच्या तणावाच्या युगात मुले आणि पालक यांच्यातील सुसंवाद नव्हे संवादच हरवला आहे. संवाद ही एक निरंतर प्रक्रिया आहे. नववीत मार्क कमी पडले म्हणून आता दहावीत त्याच्याशी सुसंवाद करू, असे म्हणून संवाद होत नसतो.’’ कालानुरूप पुस्तकात बदल करणे आवश्यक असल्याचे मत यावेळी मुकुंद टाकसाळे यांनी व्यक्त केले. प्र. चि. शेजवलकर म्हणाले, ‘‘आमच्या वेळी शाळा म्हणजे तुरुंग वाटे, मात्र आताच्या मुलांना प्रेमाने शिकविणारे शिक्षक, पालक लाभले आहेत. आर्थिक दुर्बल घटकातील पालकही आपल्या मुलांच्या जडणघडणीविषयी जागरूक झाले आहेत.’’ महेंद्र सेठिया म्हणाले, ‘‘मुलांच्या करिअरविषयी वाढलेली जागरूकता मुलांसाठी त्रासदायक ठरली आहे. आपल्या मुलांना सर्वकाही आले पाहिजे, हा पालकांचा अट्टाहास असतो. सुट्टीच्या काळात मुले मोकळी राहिली की आई-वडिलांनाच टेंशन येते. वाढत्या स्पर्धेत मुले मागे पडू नयेत, या धास्तीने बालवाडीतच क्लास लावले जातात. शाळेत खेळ, कला यांना मार्क आहेत का किंवा ते कंपलसरी आहे का, असे विचारूनच पालक मुलांना परवानगी देतात. एकाग्रता भंग, मानसिक असंतुलन, निवडकौशल्याचा अभाव या समस्या उद्भवू नये, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.’’ वंदना धर्माधिकारी यांनी सूत्र संचालन व भोमे यांनी आभार मानले. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

KHULBHAR DUDHACHI KAHANI
KHULBHAR DUDHACHI KAHANI by SUNANDA AMRAPURKAR Rating Star
श्रीपाद ब्रह्मे

नुकतंच असंच वेगानं वाचून संपवलेलं दुसरं पुस्तक म्हणजे सुनंदा अमरापूरकर यांचं ‘खुलभर दुधाची कहाणी’. दिवंगत ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या त्या पत्नी. अर्थात ही काही त्यांची एकमेव ओळख नव्हे. एक चांगल्या अभिनेत्री, उत्तम अनुवादक म्हणूनही त्या ्रसिद्ध आहेत. त्यांनी ‘खुलभर दुधाची कहाणी’ या आत्मचरित्रवजा लेखनातून त्यांच्या जगण्याचा व्यापक पट अतिशय प्रांजळपणे उलगडला आहे. मला हे पुस्तक विशेष भावण्याचं कारण म्हणजे त्यात आलेलं नगरचं वर्णन. मी स्वत: नगरला फार प्रदीर्घ काळ राहिलो नसलो, तरी ते शेवटी माझ्या जिल्ह्याचं गाव. आणि वयाच्या १३ ते २२ अशा महत्त्वाच्या कुमार व तरुण वयातला माझा तिथला रहिवास असल्यानं नगरच्या आठवणी विसरणं शक्य नाही. सुनंदाताई माझ्या आईच्या वयाच्या. त्यामुळं त्यांच्या लहानपणच्या आठवणी जवळपास माझ्या जन्माच्या २०-२५ वर्षं आधीच्या. असं असलं तरी मी त्या वर्णनाशी, त्या काळातल्या नगरशीही रिलेट होऊ शकलो, याचं कारण मुळात गेल्या शतकात बदलांचा वेग अतिशय संथ होता. नगरसारख्या निम्नशहरी भागात तर तो आणखी संथ होता. त्यामुळं एकूण समाजजीवनात १९६० ते १९९० या तीस वर्षांत तपशिलातले फरक सोडले, तर फार मोठा बदल झाला नव्हता. सुनंदाताई माहेरच्या करमरकर. त्यांचं आजोळ‌ सातारा असलं, तरी त्या जन्मापासून नगरमध्येच लहानाच्या मोठ्या झालेल्या. अगदी पक्क्या ‘नगरी’ म्हणाव्यात अशा. ( आजही त्या स्वत:ला अभिमानानं ‘नगरकर’च म्हणवून घेतात.) सुनंदाताईंचे वडील त्या दहा वर्षांच्या असतानाच गेले. त्यांना मामांचा आधार होता, पण आईनंच लहानाचं मोठं केलं. तेव्हाचं त्यांचं निम्न मध्यमवर्गीय जगणं, नगरमधले वाडे, तिथलं समाजजीवन, तिथल्या शाळा, शिक्षक, नगरमधील दुकानं, दवाखाने, तिथल्या गल्ल्या, बाजार हे सगळं सगळं सुनंदाताई अतिशय तपशीलवार उभं करतात. नगरसारख्या मध्यम शहरात वाढलेल्या महाराष्ट्रातील कुठल्याही शहरातील त्या काळातील व्यक्तीला अतिशय सहज रिलेट होईल, असं त्यांचं हे जगणं होतं. त्यात सुनंदाताईंचं लेखन अतिशय सहज, सोपं आणि प्रांजळ असल्यामुळं ते आपल्याला अगदी भिडतं. एका प्रख्यात अभिनेत्याची पत्नी असल्यानं त्यांचं जीवन इतर सर्वसामान्य स्त्रियांपेक्षा वेगळं झालं असेल, अशी आपली अपेक्षा असते. सुनंदाताईंच्या लेखनातून या ‘वेगळ्या जीवना’ची काही तरी झलक मिळेल, अशीही आपली एक भूमिका तयार झालेली असते. सदाशिव अमरापूरकरांसारख्या मनस्वी अभिनेत्याशी लग्न झाल्यानंतर सुनंदाताईंचं जगणं बदललंही; मात्र ते वेगळ्या पद्धतीनं. सदाशिव अमरापूरकर ऊर्फ नगरकरांचा लाडका बंडू त्यांना नगरमध्ये शाळेपासून कसा भेटला, नंतर कॉलेजमध्ये दोघांनी एकाच ग्रुपमधील नाटकं कशी सादर केली, त्यात अगदी नकळतपणे त्यांचं प्रेम कसं जमलं आणि नंतर नगर सोडून त्या पतीच्या कारकिर्दीसाठी मुंबईत कशा आल्या हा सर्व नाट्यमय प्रवास सुनंदाताई अतिशय तन्मयतेनं मांडतात. अमरापूरकर मंडळींच्या घराविषयीचे तपशील त्यात येतात. अमरापूरकरांचे वडील दत्तोपंत हे नगरमधलं मोठं प्रस्थ. श्रीमंत घराणं. मोठा वाडा, नोकरचाकर वगैरे. त्या तुलनेत सुनंदाताईंची माहेरची परिस्थिती जेमतेम म्हणावी अशी. अशा परिस्थितीत हे लग्न झालं आणि त्या अमरापूरकरांची सून झाल्या, इथपर्यंत पुस्तकाचा निम्मा प्रवास (मध्यंतरच) होतो. पुढल्या दोनशे पानांत आपल्याला खऱ्या अर्थानं सदाशिव अमरापूरकर हे काय व्यक्तिमत्त्व होतं, हे उलगडत जातं. अमरापूरकरांनी शेवटपर्यंत त्यांची मध्यमवर्गीय राहणी व मध्यमवर्गीय मूल्यं सोडली नाहीत. ‘अर्धसत्य’सारख्या सिनेमामुळं एका रात्रीतून ते भारतभरात प्रसिद्ध झाले. या एका ओळखीमुळं अमरापूरकरांचं जीवन पूर्ण बदलून गेलं. तोपर्यंत असलेली आर्थिक ओढगस्तीही संपली. हिंदी चित्रपटसृष्टीत अगदी स्वप्नवत अशा रीतीनं ते मोठे स्टार झाले. एकापाठोपाठ एक खलनायकी भूमिका त्यांच्याकडं येऊ लागल्या. पैसा येऊ लागला. अशा परिस्थितीत एक मध्यमवर्गीय कुटुंब या सगळ्या धबधब्याला कसं तोंड देतं आणि आपली मूल्यं कायम जपत राहतं, हे सुनंदाताईंनी फार हृद्यपणे लिहिलं आहे. सुनंदाताईंनी अनेक वर्षं एलआयसीत नोकरी केली. पतीचं अस्थिर क्षेत्र असल्यानं त्यांनी सुरुवातीला नोकरी केलीच; पण नवरा हिंदी चित्रपटसृष्टीत सुपरस्टार व्हिलन झाल्यावरही त्यांनी ही नोकरी सोडली नाही. त्यांच्या तिन्ही मुलींवर त्यांनी उत्तम संस्कार केले. एका सिनेमाच्या प्रीमियरनंतर हे सगळे कुटुंबीय कसे घरी जाऊन पिठलं-भाकरीचं जेवण तयार करून जेवले हे त्यांनी एका प्रसंगात अतिशय खेळकरपणे सांगितलं आहे. अमरापूरकरांचं नाटकवेड, भौतिक सुखांविषयीची काहीशी विरक्त वृत्ती, त्यांचा मित्रांचा गोतावळा, अनेक माणसांचा घरात राबता असा एकूण ‘देशस्थी’ कारभार यावर सुनंदाताई कधी गमतीत, तर कधी काहीसं वैतागून टिप्पणी करतात. अर्थात त्यांचं सदाशिव अमरापूरकरांवर अतिशय प्रेम होतं आणि त्यांनी हे शेवटपर्यंत उत्तम निभावलं. अशा आत्मचरित्रांत अनेकदा ‘आहे मनोहर तरी... गमते उदास’ असा सूर लागण्याचा धोका असतो. सुनंदाताईंच्या लेखनाचं वैशिष्ट्य म्हणजे, एखादा अपवाद वगळता, त्यांच्या या संपूर्ण पुस्तकात असा रडवा सूर कधीही लागलेला नाही. आपल्याला जे काही मिळालं, ते आपणच निवडलं आहे आणि त्यामुळं त्याविषयी तक्रार करण्याचा आपल्याला काही अधिकार नाही, अशी एक भूमिका त्यांनी घेतलेली दिसते. त्यांच्या या पुस्तकातून विसाव्या शतकातील मध्यमवर्गीय ब्राह्मण घरातील एका तरुणीच्या आशा-आकांक्षांचा, आयुष्यानं दिलेल्या आश्चर्याच्या धक्क्यांचा आणि त्याला सामोरं जाण्यातील धीट दिलदारपणाचा लोभस प्रवास दिसतो. आपली मध्यमवर्गीय मूल्यं जपत, प्रामाणिकपणे व उमेदीनं आयुष्य जगणाऱ्या अनेक महिलांना या पुस्तकात आपल्या जगण्याचं प्रतिबिंब सापडेल. तेच या ‘खुलभर दुधाच्या कहाणी’चं यश आहे. ...Read more

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
प्रभाकर गावंडे, अमरावती

मी विकत घेऊन वाचले आहे हे पुस्तकं, चांगले आहे, नवीन माहिती वाचायला मिळाली.