* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: DESIGN YOUR CAREER
  • Availability : Notify Me
     
  • Translators : SUPRIYA VAKIL
  • ISBN : 9788177668353
  • Edition : 3
  • Publishing Year : MAY 2007
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 140
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : SELF HELP, HEALTH & PERSONAL DEVELOPMENT
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
IN TODAY`S WORLD, THE WORST PROBLEM IS UNEMPLOYMENT. THIS PHASE IS NOT A TEMPORARY ONE; ON THE CONTRARY IT IS GOING TO END THE ERA OF `SERVICE`. TODAY`S WORLD IS THE MOST SPEEDY ONE, ON THE TOP OF IT, WE HAVE TO PROVE OUR ABILITIES CONSTANTLY, WE ARE CONTINUOUSLY EXPECTED TO BE THE BEST. ON THE OTHER HAND, THOSE WHO HAVE BEEN FREED FROM THE `SERVICE` HAVE JOINED A NEW PATH, THEY ARE WORKING FREELY. THIS HAS GIVEN RISE TO VARIOUS MODES OF CAREER. THIS BOOK WILL PROVE TO BE AN EXCELLENT GUIDE; IT WILL HELP EACH ONE CONSIDERING THE PERSONAL ABILITIES, APTITUDES, ATTITUDES, AND THE NEW RISING NEEDS OF FINANCE. IT IS FULL OF PRACTICAL GUIDE LINES, EXAMPLES, AND EASY TECHNIQUES. THE BEST PART OF IT IS BASED ON THE VAST EXPERIENCE OF THE AUTHOR IN THIS FIELD. YOU WILL ALSO COME ACROSS THE GRAPH OF PEOPLE WHO HAVE BEEN THE BEST IN THEIR RESPECTIVE CAREER FIELDS. LIKE OTHER BOOKS IN THE MARKET, THIS ONE ALSO GUIDES ABOUT HOW TO FIND A JOB IN A TRADITIONAL MARKET BASED UPON SERVICES, BUT THE PECULIARITY OF THIS BOOK IS IT ALSO GUIDES ABOUT HOW TO STAND FIRMLY IN A `SERVICE-LESS` FINANCE SYSTEM.
आपल्यासमोर ‘नोकरीविरहित’ जगाचे भीषण वास्तव उभे ठाकले आहे. ही काही तात्पुरत्या स्वरूपाच्या मंदीची अवस्था नाही, तर ही ‘नोकरी’ नामक अस्तित्वाचीच अखेर आहे. शिवाय आजच्या वेगवान युगात परिवर्तनाला सामोरे जातानाच उच्च दर्जाची कामगिरी घडवून दाखवण्याचाही प्रचंड दबाव आहे. नोकरीच्या जोखडातून मुक्त झालेल्यांसाठी ‘कामा’चा मुक्त प्रवाह सुरू झाला आहे. त्यातून करिअरचे असंख्य नवे झगझगीत मार्ग उजळत आहेत. या टप्प्यावर वैयक्तिक स्वाभाविक कल, क्षमता व अर्थव्यवस्थेच्या नव्या गरजा यांना अनुरूप असे समृद्ध करिअर घडवण्यासाठी हे पुस्तक मोलाचे मार्गदर्शन करते. उपयुक्त व्यवहार्य सूचना, उदाहरणे, सोपी तंत्रे सांगणारे हे पुस्तक लेखकाच्या व्यवस्थापन क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभवावर आधारित आहे. आपापल्या क्षेत्रात यशस्वीतेची शिखरे गाठणाऱ्या सामन्यांतून असामान्य व्यक्तिमत्त्वांचा प्रेरणादायी करिअर-आलेखही या पुस्तकात पाहायला मिळतो. नोकरीवर आधारलेल्या पारंपरिक बाजारपेठेत नोकरी कशी शोधावी, याबाबत मार्गदर्शक पुस्तके उपलब्ध आहेत, पण नोकरीविरहित अर्थव्यवस्थेत टिकाव धरून राहण्यासाठी मार्गदर्शन करणारे साहित्य फारसे उपलब्ध नाही. हे पुस्तक ही उणीव भरून काढते.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #DESIGNYOURCAREER #DESIGNYOURCAREER #डिझाईनयुअरकरिअर #SELFHELPHEALTH&PERSONALDEVELOPMENT #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #SUPRIYAVAKIL #सुप्रियावकील #SHRINIVASPANDIT "
Customer Reviews
  • Rating StarMAHARASHTRA TIMES 24-06-2007

    मार्गदर्शक मात्र, क्लिष्ट… कोणतीतरी डिग्री घ्यायची आणि चांगला जॉब करायचा, असं स्वप्न आपल्यातील जवळजवळ प्रत्येक जण पाहत असतो. पण आजच्या ग्लोबलायझेशनच्या युगामुळे नोकऱ्यांचं प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे आहेत त्या नोकऱ्यांमध्ये आपली कामगिरी जास्तीत जासत प्रभावी व्हावी, यासाठी जो तो प्रयत्न करतो. अर्थातच यामुळे प्रचंड दबाव येतो. म्हणूनच अशा परिस्थितीत आवश्यक आहे ते करिअरच्या नवनवीन पर्यायांचा विचार करणं. त्याचबरोबर आपल्या क्षमता आणि कौशल्य, व्यक्तिमत्त्व, एखाद्या विषयातील रस आणि महत्त्वाचं म्हणजे अर्थव्यवस्थेची गरज व मागणी. या सर्व बाबी लक्षात घेऊनच आपलं करिअर कसं डिझाइन करता येईल. हेच सांगणारं हे पुस्तक आहे. आज गिरण्या किंवा कंपनीतील नोकऱ्या जाऊन आयटी, रिटेल, कॉल सेंटर्स यासारखी सेक्टर्स अस्तित्वात आली आहेत. यामुळे अर्थव्यवस्थेचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलला आहे. आज सर्व्हिस इंडस्ट्रीचा जमाना सेट होत आहे. अशा वातावरणात टिकून राहण्यासाठी नोकरी करण्यापेक्षा स्वत:चा रोजगार स्वत:च निर्माण करायला हवा. बाजारपेठ, आंतरराष्ट्रीय कंपन्यांचं आगमन आणि अत्त्याधुनिक टेक्नॉलॉजीच्या वापरामुळे यंत्रांचा वापर अधिक होणार आणि मनुष्यबळाची गरज कमी होत जाणार. ही परिस्थिती आताच लक्षात घेऊन त्यानुसार आपलं करिअर डिझाइन करायला हवं. सर्व्हिस सेक्टरच्या उदयामुळे आज आऊटसोर्सिंगच प्रमाण वाढत आहे. मात्र, अशा वेळेस अर्थव्यवस्था किंवा इतरांना दोष न देता ही परिस्थिती आपल्यावर का आली आहे. याचा विचार करायला हवा. त्यासाठी प्रस्थापित चौकटीबाहेर जाऊन विचार करा. स्वत:च्या सवयी, क्षमता, कौशल्यं तसंच दोष समजून घ्या. आपलं व्यक्तिमत्त्व जाणून घेतल्यावर स्वत:ला काय करायचं आहे, करिअरचं उद्दिष्ट काय, कोणत्या क्षेत्रात करिअर करणार, करिअर प्लान, आपलं वय, अनुभव आदी सर्व बाबींचा विचार करूनच स्वत:चं बस्तान कसं बसवायचं याचं मार्गदर्शन यात करण्यात आलं आहे. स्वत:च नेटवर्क ऑपरेट करून आपल्या कामाचं मार्केटिंग करत करिअर डिझाइन करण्याचा सल्ला लेखकाने यात दिला आहे. करिअर करताना या सर्व बाबी किती महत्त्वाच्या आहेत यांचं समुपदेशन यात करण्यात आलं असलं तरी पुस्तकाची भाषा क्लिष्ट आहे. पुस्तकाच्या शीर्षकावरून हे पुस्तक आजच्या युवा पिढीसाठी उपयुक्त असल्याचं जाणवतं, पण आजच्या युवकाला ही भाषा चटकन समजून घेणं कठीण ठरू शकतं. करिअर करण्यासाठी उपयुक्त क्षेत्र आणि त्यात कशा प्रकारे प्रवेश करायचा हे पुस्तकातून लगेच उमगत नाही. पुस्तकाची भाषा बोजड असणं, हे याचं कारण ठरेल. आज मार्गदर्शन, समुपदेशन करणारे सर्रास उपलब्ध असतात अशा जड भाषेत, समजण्यास कठीण अशा साच्यात पुस्तक लिहिणं टाळायला हवं होतं. स्वत:च्या सवयी, क्षमता, कौशल्यं तसंच दोष समजून घ्या. आपलं व्यक्तिमत्त्व जाणून घेतल्यावर स्वत:ला काय करायचं आहे, करिअरचं उद्दिष्ट काय, कोणत्या क्षेत्रात करिअर करणार, करिअर प्लान, आपलं वय, अनुभव आदी सर्व बाबींचा विचार करूनच स्वत:चं बस्तान कसं बसवायचं याचं मार्गदर्शन यात करण्यात आलं आहे. स्वत:च नेटवर्क ऑपरेट करून आपल्या कामाचं मार्केटिंग करत करिअर डिझाइन करण्याचा सल्ला लेखकाने यात दिला आहे. -मिताली तवसाळकर ...Read more

  • Rating StarSAKAL 22-11-2009

    जागतिकीकरणानंतर बदललेल्या आजच्या जगात नोकऱ्यांचे प्रमाण कमी होत चालले आहे. जगभर बोलबाला असलेल्या मंदीमुळे ही अवस्था आलेली नसून, आता नोकरी नावाची संकल्पनाच लोप पावत चाललेली आहे. या अवस्थेतही ज्यांच्याकडे काही करुन दाखवण्याची धमक आहे, अशांसाठी मात्र करअरचे मोठे महामार्ग उजळत आहे. या स्थितीत स्वाभाविक कल, क्षमता व अर्थव्यवस्थेच्या गरजा यांना अनुरुप असे करिअर घडविण्यासाठी ‘डिझाइन युअर करिअर’ हे श्रीनिवास पंडित यांचे पुस्तक मार्गदर्शन मिळते. लोकसंख्येचा आलेख भराभर वाढत चाललेल्या आजच्या जगात नोकरी लोप पावत चाललेली आहे. भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या देशात तर या परिस्थितीमुळे बेरोजगारांचे तांडे तयार झाले आहेत. रोजगारासाठी देशातंर्गत फिरणाऱ्या लोकांचा मुद्दा अग्रभागी आहे. अशा अवस्थेत बदलत्या जगाच्या परिप्रेक्षात नोकरीच्या संधी कमी होणार, हे आता जाणवायला हवे. नोकरीविरहित अर्थव्यवस्थेत टिकून राहण्यासाठी काय करावे लागेल. याचे मार्गदर्शन करणारे पुस्तक मेहता पब्लिशिंग हाऊसने गतवर्षी प्रकाशित केले आहे. या पुस्तकाचे मूळ इंग्लिश लेखक श्रीनिवास पंडित हे आहेत. तर मराठी अनुवाद सुप्रिया वकील यांनी केला आहे. पुस्तकाच्या सुरुवातीलाच असलेला स्वामी विवेकानंद यांचा विचार मनाला भावून जातो. तो विचार असा - ‘एखादी संकल्पना निवडा. त्या संकल्पनेला तुमचे जीवन बनवा. त्यावर विचार करा, तिचेच स्वप्न पाहा, ती संकल्पना पाहा, ती संकल्पना जगा. त्या संकल्पनेने अंतर्बाह्य भारून जा आणि इतर सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा. हा यशाचा मार्ग आहे. ‘या सुंदर व क्रियाशील विचाराने सुरू झालेला वाचनाचा प्रवास वाचकांना अनेक धक्के देत बदलत्या जगाचे वास्तव दर्शन घडवीत निघतो. लेखक म्हणतो, ‘आपल्या जगासमोर नोकऱ्या संपण्याचे जे वास्तव उभे ठाकले आहे, ते एक महासंकट आहे. तरीही ज्या लोकांची या बदलत्या जगाशी जुळवून घेण्याची तयारी आहे, अशांसाठी विपुल संधी आहेत.’ पुस्तकातील पहिले प्रकरण ‘नोकऱ्या नष्ट होतात, काम टिकून राहते,’ हे आहे. यात नोकरी संकल्पनेचे अस्तित्व कसे लोप पावते आहे याचे वर्णन. तसेच भारतातील निर्दयपणे नोकऱ्या हिरावणाऱ्या पाच कंपन्याची आकडेवारी दिलेली आहे. आगामी काळात सॉफ्टवेअर, डॉटकॉम्स, मल्टिमीडिया, करमणूक, किरकोळ व्यापार, आरोग्यसुविधा, विमा, दूरसंचार या क्षेत्रात पाच लाख कार्यसंधी निर्माण होण्याची लेखकाला आशा आहे. अशा प्रकारे काम शोधण्याच्या व करिअर घडविण्याच्या संधी उपलब्ध होणार आहेत. मात्र त्या नऊ ते पाच या वेळेच्या साच्यात मिळणार नाहीत. पुस्तकातील दुसरे प्रकरण म्हणजे ‘यू अँड कंपनी’ या प्रकरणात तुम्ही स्वत:च एक कंपनी, संस्था आहात, अशा रितीने स्वत:कडे पाहा, असा सल्ला लेखक देतो. इथून पुढे तुम्ही नोकरी किती वर्षे केली, हा बढतीचा निकष असणार नाही, तर तुम्ही काय कर्तृत्व गाजविले ते पाहिले जाईल. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more