* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: DESIGN YOUR CAREER
  • Availability : Available
  • Translators : SUPRIYA VAKIL
  • ISBN : 9788177668353
  • Edition : 3
  • Publishing Year : MAY 2007
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 140
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : SELF HELP, HEALTH & PERSONAL DEVELOPMENT
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
IN TODAY`S WORLD, THE WORST PROBLEM IS UNEMPLOYMENT. THIS PHASE IS NOT A TEMPORARY ONE; ON THE CONTRARY IT IS GOING TO END THE ERA OF `SERVICE`. TODAY`S WORLD IS THE MOST SPEEDY ONE, ON THE TOP OF IT, WE HAVE TO PROVE OUR ABILITIES CONSTANTLY, WE ARE CONTINUOUSLY EXPECTED TO BE THE BEST. ON THE OTHER HAND, THOSE WHO HAVE BEEN FREED FROM THE `SERVICE` HAVE JOINED A NEW PATH, THEY ARE WORKING FREELY. THIS HAS GIVEN RISE TO VARIOUS MODES OF CAREER. THIS BOOK WILL PROVE TO BE AN EXCELLENT GUIDE; IT WILL HELP EACH ONE CONSIDERING THE PERSONAL ABILITIES, APTITUDES, ATTITUDES, AND THE NEW RISING NEEDS OF FINANCE. IT IS FULL OF PRACTICAL GUIDE LINES, EXAMPLES, AND EASY TECHNIQUES. THE BEST PART OF IT IS BASED ON THE VAST EXPERIENCE OF THE AUTHOR IN THIS FIELD. YOU WILL ALSO COME ACROSS THE GRAPH OF PEOPLE WHO HAVE BEEN THE BEST IN THEIR RESPECTIVE CAREER FIELDS. LIKE OTHER BOOKS IN THE MARKET, THIS ONE ALSO GUIDES ABOUT HOW TO FIND A JOB IN A TRADITIONAL MARKET BASED UPON SERVICES, BUT THE PECULIARITY OF THIS BOOK IS IT ALSO GUIDES ABOUT HOW TO STAND FIRMLY IN A `SERVICE-LESS` FINANCE SYSTEM.
आपल्यासमोर ‘नोकरीविरहित’ जगाचे भीषण वास्तव उभे ठाकले आहे. ही काही तात्पुरत्या स्वरूपाच्या मंदीची अवस्था नाही, तर ही ‘नोकरी’ नामक अस्तित्वाचीच अखेर आहे. शिवाय आजच्या वेगवान युगात परिवर्तनाला सामोरे जातानाच उच्च दर्जाची कामगिरी घडवून दाखवण्याचाही प्रचंड दबाव आहे. नोकरीच्या जोखडातून मुक्त झालेल्यांसाठी ‘कामा’चा मुक्त प्रवाह सुरू झाला आहे. त्यातून करिअरचे असंख्य नवे झगझगीत मार्ग उजळत आहेत. या टप्प्यावर वैयक्तिक स्वाभाविक कल, क्षमता व अर्थव्यवस्थेच्या नव्या गरजा यांना अनुरूप असे समृद्ध करिअर घडवण्यासाठी हे पुस्तक मोलाचे मार्गदर्शन करते. उपयुक्त व्यवहार्य सूचना, उदाहरणे, सोपी तंत्रे सांगणारे हे पुस्तक लेखकाच्या व्यवस्थापन क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभवावर आधारित आहे. आपापल्या क्षेत्रात यशस्वीतेची शिखरे गाठणाNया सामन्यांतून असामान्य व्यक्तिमत्त्वांचा प्रेरणादायी करिअर-आलेखही या पुस्तकात पाहायला मिळतो. नोकरीवर आधारलेल्या पारंपरिक बाजारपेठेत नोकरी कशी शोधावी, याबाबत मार्गदर्शक पुस्तके उपलब्ध आहेत, पण नोकरीविरहित अर्थव्यवस्थेत टिकाव धरून राहण्यासाठी मार्गदर्शन करणारे साहित्य फारसे उपलब्ध नाही. हे पुस्तक ही उणीव भरून काढते.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #DESIGNYOURCAREER #DESIGNYOURCAREER #डिझाईनयुअरकरिअर #SELFHELPHEALTH&PERSONALDEVELOPMENT #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #SUPRIYAVAKIL #सुप्रियावकील #SHRINIVASPANDIT "
Customer Reviews
  • Rating StarMAHARASHTRA TIMES 24-06-2007

    मार्गदर्शक मात्र, क्लिष्ट… कोणतीतरी डिग्री घ्यायची आणि चांगला जॉब करायचा, असं स्वप्न आपल्यातील जवळजवळ प्रत्येक जण पाहत असतो. पण आजच्या ग्लोबलायझेशनच्या युगामुळे नोकऱ्यांचं प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे आहेत त्या नोकऱ्यांमध्ये आपली कामगिरी जास्तीत जासत प्रभावी व्हावी, यासाठी जो तो प्रयत्न करतो. अर्थातच यामुळे प्रचंड दबाव येतो. म्हणूनच अशा परिस्थितीत आवश्यक आहे ते करिअरच्या नवनवीन पर्यायांचा विचार करणं. त्याचबरोबर आपल्या क्षमता आणि कौशल्य, व्यक्तिमत्त्व, एखाद्या विषयातील रस आणि महत्त्वाचं म्हणजे अर्थव्यवस्थेची गरज व मागणी. या सर्व बाबी लक्षात घेऊनच आपलं करिअर कसं डिझाइन करता येईल. हेच सांगणारं हे पुस्तक आहे. आज गिरण्या किंवा कंपनीतील नोकऱ्या जाऊन आयटी, रिटेल, कॉल सेंटर्स यासारखी सेक्टर्स अस्तित्वात आली आहेत. यामुळे अर्थव्यवस्थेचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलला आहे. आज सर्व्हिस इंडस्ट्रीचा जमाना सेट होत आहे. अशा वातावरणात टिकून राहण्यासाठी नोकरी करण्यापेक्षा स्वत:चा रोजगार स्वत:च निर्माण करायला हवा. बाजारपेठ, आंतरराष्ट्रीय कंपन्यांचं आगमन आणि अत्त्याधुनिक टेक्नॉलॉजीच्या वापरामुळे यंत्रांचा वापर अधिक होणार आणि मनुष्यबळाची गरज कमी होत जाणार. ही परिस्थिती आताच लक्षात घेऊन त्यानुसार आपलं करिअर डिझाइन करायला हवं. सर्व्हिस सेक्टरच्या उदयामुळे आज आऊटसोर्सिंगच प्रमाण वाढत आहे. मात्र, अशा वेळेस अर्थव्यवस्था किंवा इतरांना दोष न देता ही परिस्थिती आपल्यावर का आली आहे. याचा विचार करायला हवा. त्यासाठी प्रस्थापित चौकटीबाहेर जाऊन विचार करा. स्वत:च्या सवयी, क्षमता, कौशल्यं तसंच दोष समजून घ्या. आपलं व्यक्तिमत्त्व जाणून घेतल्यावर स्वत:ला काय करायचं आहे, करिअरचं उद्दिष्ट काय, कोणत्या क्षेत्रात करिअर करणार, करिअर प्लान, आपलं वय, अनुभव आदी सर्व बाबींचा विचार करूनच स्वत:चं बस्तान कसं बसवायचं याचं मार्गदर्शन यात करण्यात आलं आहे. स्वत:च नेटवर्क ऑपरेट करून आपल्या कामाचं मार्केटिंग करत करिअर डिझाइन करण्याचा सल्ला लेखकाने यात दिला आहे. करिअर करताना या सर्व बाबी किती महत्त्वाच्या आहेत यांचं समुपदेशन यात करण्यात आलं असलं तरी पुस्तकाची भाषा क्लिष्ट आहे. पुस्तकाच्या शीर्षकावरून हे पुस्तक आजच्या युवा पिढीसाठी उपयुक्त असल्याचं जाणवतं, पण आजच्या युवकाला ही भाषा चटकन समजून घेणं कठीण ठरू शकतं. करिअर करण्यासाठी उपयुक्त क्षेत्र आणि त्यात कशा प्रकारे प्रवेश करायचा हे पुस्तकातून लगेच उमगत नाही. पुस्तकाची भाषा बोजड असणं, हे याचं कारण ठरेल. आज मार्गदर्शन, समुपदेशन करणारे सर्रास उपलब्ध असतात अशा जड भाषेत, समजण्यास कठीण अशा साच्यात पुस्तक लिहिणं टाळायला हवं होतं. स्वत:च्या सवयी, क्षमता, कौशल्यं तसंच दोष समजून घ्या. आपलं व्यक्तिमत्त्व जाणून घेतल्यावर स्वत:ला काय करायचं आहे, करिअरचं उद्दिष्ट काय, कोणत्या क्षेत्रात करिअर करणार, करिअर प्लान, आपलं वय, अनुभव आदी सर्व बाबींचा विचार करूनच स्वत:चं बस्तान कसं बसवायचं याचं मार्गदर्शन यात करण्यात आलं आहे. स्वत:च नेटवर्क ऑपरेट करून आपल्या कामाचं मार्केटिंग करत करिअर डिझाइन करण्याचा सल्ला लेखकाने यात दिला आहे. -मिताली तवसाळकर ...Read more

  • Rating StarSAKAL 22-11-2009

    जागतिकीकरणानंतर बदललेल्या आजच्या जगात नोकऱ्यांचे प्रमाण कमी होत चालले आहे. जगभर बोलबाला असलेल्या मंदीमुळे ही अवस्था आलेली नसून, आता नोकरी नावाची संकल्पनाच लोप पावत चाललेली आहे. या अवस्थेतही ज्यांच्याकडे काही करुन दाखवण्याची धमक आहे, अशांसाठी मात्र करअरचे मोठे महामार्ग उजळत आहे. या स्थितीत स्वाभाविक कल, क्षमता व अर्थव्यवस्थेच्या गरजा यांना अनुरुप असे करिअर घडविण्यासाठी ‘डिझाइन युअर करिअर’ हे श्रीनिवास पंडित यांचे पुस्तक मार्गदर्शन मिळते. लोकसंख्येचा आलेख भराभर वाढत चाललेल्या आजच्या जगात नोकरी लोप पावत चाललेली आहे. भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या देशात तर या परिस्थितीमुळे बेरोजगारांचे तांडे तयार झाले आहेत. रोजगारासाठी देशातंर्गत फिरणाऱ्या लोकांचा मुद्दा अग्रभागी आहे. अशा अवस्थेत बदलत्या जगाच्या परिप्रेक्षात नोकरीच्या संधी कमी होणार, हे आता जाणवायला हवे. नोकरीविरहित अर्थव्यवस्थेत टिकून राहण्यासाठी काय करावे लागेल. याचे मार्गदर्शन करणारे पुस्तक मेहता पब्लिशिंग हाऊसने गतवर्षी प्रकाशित केले आहे. या पुस्तकाचे मूळ इंग्लिश लेखक श्रीनिवास पंडित हे आहेत. तर मराठी अनुवाद सुप्रिया वकील यांनी केला आहे. पुस्तकाच्या सुरुवातीलाच असलेला स्वामी विवेकानंद यांचा विचार मनाला भावून जातो. तो विचार असा - ‘एखादी संकल्पना निवडा. त्या संकल्पनेला तुमचे जीवन बनवा. त्यावर विचार करा, तिचेच स्वप्न पाहा, ती संकल्पना पाहा, ती संकल्पना जगा. त्या संकल्पनेने अंतर्बाह्य भारून जा आणि इतर सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा. हा यशाचा मार्ग आहे. ‘या सुंदर व क्रियाशील विचाराने सुरू झालेला वाचनाचा प्रवास वाचकांना अनेक धक्के देत बदलत्या जगाचे वास्तव दर्शन घडवीत निघतो. लेखक म्हणतो, ‘आपल्या जगासमोर नोकऱ्या संपण्याचे जे वास्तव उभे ठाकले आहे, ते एक महासंकट आहे. तरीही ज्या लोकांची या बदलत्या जगाशी जुळवून घेण्याची तयारी आहे, अशांसाठी विपुल संधी आहेत.’ पुस्तकातील पहिले प्रकरण ‘नोकऱ्या नष्ट होतात, काम टिकून राहते,’ हे आहे. यात नोकरी संकल्पनेचे अस्तित्व कसे लोप पावते आहे याचे वर्णन. तसेच भारतातील निर्दयपणे नोकऱ्या हिरावणाऱ्या पाच कंपन्याची आकडेवारी दिलेली आहे. आगामी काळात सॉफ्टवेअर, डॉटकॉम्स, मल्टिमीडिया, करमणूक, किरकोळ व्यापार, आरोग्यसुविधा, विमा, दूरसंचार या क्षेत्रात पाच लाख कार्यसंधी निर्माण होण्याची लेखकाला आशा आहे. अशा प्रकारे काम शोधण्याच्या व करिअर घडविण्याच्या संधी उपलब्ध होणार आहेत. मात्र त्या नऊ ते पाच या वेळेच्या साच्यात मिळणार नाहीत. पुस्तकातील दुसरे प्रकरण म्हणजे ‘यू अँड कंपनी’ या प्रकरणात तुम्ही स्वत:च एक कंपनी, संस्था आहात, अशा रितीने स्वत:कडे पाहा, असा सल्ला लेखक देतो. इथून पुढे तुम्ही नोकरी किती वर्षे केली, हा बढतीचा निकष असणार नाही, तर तुम्ही काय कर्तृत्व गाजविले ते पाहिले जाईल. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more