* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: DAYS OF GOLD & SEPIA
  • Availability : Available
  • Translators : ANJANI NARAVANE
  • ISBN : 9788184989236
  • Edition : 1
  • Publishing Year : NOVEMBER 2015
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 388
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :ANJANI NARAWANE COMBO SET-22 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Print Books:
THIS IS THE SAGA OF LALLJEE LAKHA AS HE RISES FROM HIS HUMBLE BEGINNINGS AS A PENNILESS ORPHAN IN HIS DESERT HOMELAND OF KUTCH TO AMASS A LARGE FORTUNE AS BOMBAY S COTTON KING . SET AGAINST THE EVENTFUL PERIOD BETWEEN INDIA S WAR FOR INDEPENDENCE IN 1857 AND THE FLEDGLING FREEDOM STRUGGLE OF THE EARLY TWENTIETH CENTURY, THIS SWEEPING TALE IS PEOPLED BY A VIBRANT ARRAY OF CHARACTERS MERCHANT PRINCES AND MAHARAJAS, COURTESANS AND SOOTHSAYERS, PIRATES, FREEDOM FIGHTERS AND SOLDIERS OF THE BRITISH RAJ. DAYS OF GOLD AND SEPIA PAINTS THE PORTRAIT OF A MAN OF COURAGE AND CHARACTER, AND IS THE STORY OF THE DISCOVERY OF LIFE, THE PAIN OF A PASSIONATE AND DOOMED LOVE AND FAMILY FEUDS, AND OF GREAT PERSONAL INTEGRITY AND HUMAN FRAILTY
हातात पुटकी कवडीही नसलेला अनाथ मुलगा, कच्छमधल्या वाळवंटातल्या अत्यंत गरीब परिस्थितीतून धडपडत वर येत येत संपत्ती व कीर्ती मिळवून मुंबईचा ‘कॉटन विंग’ कसा होतो, याचं चित्रण या कादंबरीत हातोटीने करण्यात आलं आहे. शिवाय १८५७ सालच्या हिंदुस्थानच्या पहिल्या स्वातंत्र्यसमरापासून सन १९४७मध्ये स्वातंत्र्याची पहाट उगवेपर्यंतचा अत्यंत चित्तथरारक कालखंडही यात प्रत्ययकारी पद्धतीने रेखाटला आहे. यात त-हेत-हेच्या मनोवेधक, धीट, कणखर मनाच्या, उत्साही व्यक्ती भेटतात – व्यापारसम्राट, राजे-महाराजे, गणिका, अचूक भाकितं सांगणारा योगी, समुद्रावरचे चाचे, स्वातंत्र्यसैनिक आणि ब्रिटिश राज्यकर्ते... ही एका अनावर प्रेमाच्या अटळ शोकान्तिकेचीही कहाणी आहे – यात चित्रण आहे, एका धैर्यवान, चारित्र्यवान माणसाचं, त्याच्या अत्यंत प्रामाणिक व्यक्तिमत्त्वाचं, विलक्षण उदार मनाचं, आणि मानवसुलभ मानसिक दौर्बल्याचंही... थक्क करून टाकणारी लालजी लखाची विलक्षण कथा खिळवून ठेवते!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #DAYSOFGOLD&SEPIA #DAYSOFGOLD&SEPIA #डेजऑफगोल्डअ‍ॅण्डसीपिया #FICTION #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #ANJANINARAVANE #अंजनीनरवणे #YASMEENPREMJI "
Customer Reviews
  • Rating StarShrikant Adhav

    DAYS OF GOLD & SEPIA by YASMEEN PREMJI यास्मिन प्रेमजी यांनी मूळ इंग्लिशमध्ये लिहिलेल्या ‘डेज ऑफ गोल्ड अँड सीपीया’ या कादंबरीचा अनुवाद अंजनी नरवणे यांनी केलाय. लालजी लखा या नायकाभोवती फिरणाऱ्या या कथानकात प्रचंड नाट्य, प्रेमवीरांची धडपड, त्यांचा वरह अशा विविध बाबी समोर येतात. हातात कवडीह नसलेला लालजी आपलं साम्राज्य कसं उभं करतो, ते यातून कळतं.पत्रकार आणि कथालेखिका आणि प्रख्यात उद्योगपती अझिम प्रेमजी यांच्या पत्नी यास्मिन प्रेमजी यांची ही रोचक कादंबरी. अंजनी नरवणे यांनी कादंबरीचा रसाळ अनुवाद केला आहे. गुजरातमधील कच्छच्या रणात अत्यंत गरीब परिस्थितीत जन्मलेला मुलगा संकटांशी सामना करत मोठा होो. मोठेपणी मुंबईचा कॉटन किंग म्हणून कीर्ती मिळवतो. या विलक्षण प्रवासाचीच ही कथा आहे. साधारणत: १८५७ ते १९४७ पर्यंतचा काळ कादंबरीत चित्रित केला आहे. या प्रवासात तो कसा घडतो, त्याला भेटणारी माणसे आदींचेही दर्शन त्यांतून घडते.सोनेरी दिवसांची गोष्ट... मुघल साम्राज्यात सुरत ही आर्थिक राजधानी होती. इंग्रजांच्या ईस्ट इंडिया कंपनीचे मुख्यालय सुरतलाच होते. पण सन १६७० साली शिवाजी महाराजांनी सुरत दुसऱ्यांदा लुटली आणि इंग्रजांनी आपला सगळा कारभार हळूहळू मुंबईला हलवला. इंग्रज पक्क व्यापारी. त्यांनी सगळीकडच्या व्यापारी जमातींना आमंत्रण देऊन सुरक्षिततेची हमी देऊन मुंबईत बोलावले. इथून पुढे मुंबईची व्यापारी भरभराट सुरू झाली. आपण मराठी माणसे सगळ्याच गुजराती भाषिकांना व्यापारी समजतो. पण खरे म्हणजे गुजरातमधले कच्छी लोक हे उत्तम व्यापारी. या कच्छी लोकांमध्ये हिंदू आणि मुसलमान दोघेही आहेत. त्यातल्या मुसलमानांची नावेही अर्धी हिंदू असतात. उदा. अझीम प्रेमजी. आजही मुंबईचा व्यापार फार मोठ्या प्रमाणात कच्छी व्यापाऱ्यांच्याच हातात आहे आणि अझीम प्रेमजी तर हिंदुस्थानच्या आय.टी. उद्योगाचे राजे म्हणून ओळखले जातात. आता मुंबईहून बंगळुरुला स्थायिक झालेले, मूळचे कच्छी इस्माईली शिया मुसलमान असलेले अझीम प्रेमजी संपूर्ण देशातले तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जातात. अझीम प्रेमजींचे वडील महम्मद हाशीम प्रेमजी हे कच्छहून मुंबईला आले. अफाट मेहनत, गोड बोलणे आणि मिळालेली संधी अचूक पकडण्याची हातोटी या भांडवलावर प्रेमजींनी मुंबईतले अग्रगण्य व्यापारी म्हणून स्थान मिळवले. पाकिस्तान बनल्यावर जीनांनी त्यांना तिकडे येण्याचा खूप आग्रह केला होता. प्रेमजींनी त्यांना ठाम नकार दिला. प्रस्तुत ‘डेज ऑफ गोल्ड अ‍ॅण्ड सीपिया’ या पुस्तकात लेखिका यास्मिन प्रेमजी म्हणजे अझीम प्रेमजींच्या पत्नी यांनी आपल्या कर्तबगार सासऱ्यांची जीवन कहाणीच चित्तारली आहे. मात्र ही हाशीम प्रेमजींचे चरित्र किंवा चरित्रात्मक कादंबरीही नाही. यास्मिन प्रेमजींचे माहेरचे घराणे चिनॉय हेही मुंबईतले एक जुने व्यापारी घराणे. त्यामुळे आपल्या सासऱ्यांच्या कहाणीत त्यांनी मुंबईच्या जुन्या हिंदू, मुसलमान, पारशी, ज्यु अशा अनेक व्यापाऱ्यांचे रंग मिसळले आहेत. कच्छचा आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यावरील झांजिबारशी फार पुरातन व्यापार आहे. त्यामुळे या कहाणीत कच्छ, मुंबई यांच्याबरोबर झांजिबारही येते.कच्छहून निष्कांचन अवस्थेत मुंबईत आलेला एक तरुण अविरत कष्ट करून हळूहळू मोठा होतोय. अशा मापाने बेतलेली ही कहाणी खरे म्हणजे एका महाकादंबरीचा विषय होता. कारण ती नायक लालजी लखा याचीच फक्त कथा नसून सतत भरभराटत राहणाऱ्या मुंबई शहराची कथा आहे. पुस्तक वाचनीय आहे. अंजनी नरवणे यांचा मराठी अनुवाद, चंद्रमोहन कुलकर्णी यांचे मुखपृष्ठ आणि मेहता प्रकाशनाची निर्मिती सुबक. ...Read more

  • Rating StarDAINIK SAMANA 24-04-2016

    सोनेरी दिवसांची गोष्ट... मुघल साम्राज्यात सुरत ही आर्थिक राजधानी होती. इंग्रजांच्या ईस्ट इंडिया कंपनीचे मुख्यालय सुरतलाच होते. पण सन १६७० साली शिवाजी महाराजांनी सुरत दुसऱ्यांदा लुटली आणि इंग्रजांनी आपला सगळा कारभार हळूहळू मुंबईला हलवला. इंग्रज पक्क व्यापारी. त्यांनी सगळीकडच्या व्यापारी जमातींना आमंत्रण देऊन सुरक्षिततेची हमी देऊन मुंबईत बोलावले. इथून पुढे मुंबईची व्यापारी भरभराट सुरू झाली. आपण मराठी माणसे सगळ्याच गुजराती भाषिकांना व्यापारी समजतो. पण खरे म्हणजे गुजरातमधले कच्छी लोक हे उत्तम व्यापारी. या कच्छी लोकांमध्ये हिंदू आणि मुसलमान दोघेही आहेत. त्यातल्या मुसलमानांची नावेही अर्धी हिंदू असतात. उदा. अझीम प्रेमजी. आजही मुंबईचा व्यापार फार मोठ्या प्रमाणात कच्छी व्यापाऱ्यांच्याच हातात आहे आणि अझीम प्रेमजी तर हिंदुस्थानच्या आय.टी. उद्योगाचे राजे म्हणून ओळखले जातात. आता मुंबईहून बंगळुरुला स्थायिक झालेले, मूळचे कच्छी इस्माईली शिया मुसलमान असलेले अझीम प्रेमजी संपूर्ण देशातले तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जातात. अझीम प्रेमजींचे वडील महम्मद हाशीम प्रेमजी हे कच्छहून मुंबईला आले. अफाट मेहनत, गोड बोलणे आणि मिळालेली संधी अचूक पकडण्याची हातोटी या भांडवलावर प्रेमजींनी मुंबईतले अग्रगण्य व्यापारी म्हणून स्थान मिळवले. पाकिस्तान बनल्यावर जीनांनी त्यांना तिकडे येण्याचा खूप आग्रह केला होता. प्रेमजींनी त्यांना ठाम नकार दिला. प्रस्तुत ‘डेज ऑफ गोल्ड अ‍ॅण्ड सीपिया’ या पुस्तकात लेखिका यास्मिन प्रेमजी म्हणजे अझीम प्रेमजींच्या पत्नी यांनी आपल्या कर्तबगार सासऱ्यांची जीवन कहाणीच चित्तारली आहे. मात्र ही हाशीम प्रेमजींचे चरित्र किंवा चरित्रात्मक कादंबरीही नाही. यास्मिन प्रेमजींचे माहेरचे घराणे चिनॉय हेही मुंबईतले एक जुने व्यापारी घराणे. त्यामुळे आपल्या सासऱ्यांच्या कहाणीत त्यांनी मुंबईच्या जुन्या हिंदू, मुसलमान, पारशी, ज्यु अशा अनेक व्यापाऱ्यांचे रंग मिसळले आहेत. कच्छचा आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यावरील झांजिबारशी फार पुरातन व्यापार आहे. त्यामुळे या कहाणीत कच्छ, मुंबई यांच्याबरोबर झांजिबारही येते. कच्छहून निष्कांचन अवस्थेत मुंबईत आलेला एक तरुण अविरत कष्ट करून हळूहळू मोठा होतोय. अशा मापाने बेतलेली ही कहाणी खरे म्हणजे एका महाकादंबरीचा विषय होता. कारण ती नायक लालजी लखा याचीच फक्त कथा नसून सतत भरभराटत राहणाऱ्या मुंबई शहराची कथा आहे. पुस्तक वाचनीय आहे. अंजनी नरवणे यांचा मराठी अनुवाद, चंद्रमोहन कुलकर्णी यांचे मुखपृष्ठ आणि मेहता प्रकाशनाची निर्मिती सुबक. ...Read more

  • Rating StarSAKAL 10-1-16

    यास्मिन प्रेमजी यांनी मूळ इंग्लिशमध्ये लिहिलेल्या ‘डेज ऑफ गोल्ड अँड सीपीया’ या कादंबरीचा अनुवाद अंजनी नरवणे यांनी केलाय. लालजी लखा या नायकाभोवती फिरणाऱ्या या कथानकात प्रचंड नाट्य, प्रेमवीरांची धडपड, त्यांचा विरह अशा विविध बाबी समोर येतात. हातात कवडीह नसलेला लालजी आपलं साम्राज्य कसं उभं करतो, ते यातून कळतं. ...Read more

  • Rating StarMAHARASHTRA TIMES 22-11-2015

    पत्रकार आणि कथालेखिका आणि प्रख्यात उद्योगपती अझिम प्रेमजी यांच्या पत्नी यास्मिन प्रेमजी यांची ही रोचक कादंबरी. अंजनी नरवणे यांनी कादंबरीचा रसाळ अनुवाद केला आहे. गुजरातमधील कच्छच्या रणात अत्यंत गरीब परिस्थितीत जन्मलेला मुलगा संकटांशी सामना करत मोठा होो. मोठेपणी मुंबईचा कॉटन किंग म्हणून कीर्ती मिळवतो. या विलक्षण प्रवासाचीच ही कथा आहे. साधारणत: १८५७ ते १९४७ पर्यंतचा काळ कादंबरीत चित्रित केला आहे. या प्रवासात तो कसा घडतो, त्याला भेटणारी माणसे आदींचेही दर्शन त्यांतून घडते. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

A-AMITABHCHA
A-AMITABHCHA by G.B. DESHMUKH Rating Star
प्रा. डॉ . वैशाली रवी देशमुख, अमरावती

वाचनाचे फायदे सांगताना प्रसिद्ध इंग्रजी लेखक फ्रान्सिस बेकन म्हणतो `रीडिंग मेकेथ अ फुल मॅन`. वाचनामुळे माणूस परिपूर्ण होतो. क्वचित एखादं असं पुस्तक हाती येतं जे वाचल्यानंतर ह्या परिपूर्णतेची , आत्यंतिक समाधानाची जाणीव होते . नुकतंच जी. बी. देशुख यांचं `अ- अमिताभचा` हे पुस्तक हाती पडलं एका बैठकीत ते वाचून संपवलं आणि काहीतरी माहितीपर तरीही दर्जेदार आणि साहित्यिक मूल्य असणारं पुस्तक वाचण्याचा आनंद प्राप्त झाला. सीमा आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात काम करून निवृत्त झालेल्या जीबी देशमुखांनी २०२० मध्ये अमिताभ बच्चनच्या कारकिर्दीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त त्यांच्या विविध ५० सिनेमातील भूमिकांचे विश्लेषण करणारे साप्ताहिक सदर दैनिक सकाळ मध्ये प्रकाशित केले. कोरोना काळात लिहिलेल्या या लेखमालेला त्यावेळी प्रचंड प्रतिसाद मिळाला. केवळ ज्येष्ठच नाही तर तरुण वाचकांनीही या लेखमालिकेला पसंतीची पावती दिली. २०२२ मध्ये मेहता पब्लिकेशनने अमिताभ बच्चनच्या एकूण ६२ सिनेमांवर आधारित लेख `अ अमिताभचा` या पुस्तक रूपाने प्रकाशित केले. १९६९ पासून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीला पाच दशकांपेक्षा अधिक काळ लोटला तरीही त्याचे सिनेरसिकांच्या भावविश्वावर असलेले अधिराज्य कायम आहे. ती जादू कमी ओसरण्याचं नावच घेत नाही तर ती दिवसेंदिवस वाढत आहे . किरकोळ शरीरयष्टी, भरमसाठ उंची आणि सौंदर्याच्या साचेबंद व्याख्येत न बसणारा चेहरा असलेला अमिताभ आणि त्याला मिळालेली अफाट लोकप्रियता याची सांगड घालणे सर्वसामान्य व्यक्तीच्या आकलनापलीकडचे आहे. अमिताभ बच्चनचे प्रचंड चाहते असलेले जी . बी देशमुख यांच्यासाठी `अ` हा अमिताभचाच आहे. परंतु केवळ एक चाहते म्हणून त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं नाही तर अमिताभ बच्चनचे जे गारुड कित्येक दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर आहे त्यामागची नेमकी कारणे कोणती असू शकतात हे अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने शोधण्याचा प्रयत्न त्यांनी या पुस्तकात केलेला आहे. एक रसिक, चोखंदळ प्रेक्षक, अभ्यासक आणि समीक्षक म्हणून या पुस्तकात लेखक आपल्या समोर येतात. `बेमिसाल` पासून `झुंड` या चित्रपटा पर्यंत अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीतील उत्तमोत्तम ६२ सिनेमांचा लेखकांनी या पुस्तकात परामर्ष घेतलेला आहे. या चित्रपटांमधील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित सर्व बाबींचे अत्यंत अभ्यास पूर्वक रसग्रहण केलेले आहे. `अमिताभ बच्चन चांगला कलाकार आहे` किंवा `अमुक अमुक चित्रपट चांगला आहे` असं जेव्हा एखादा सर्वसामान्य प्रेक्षक म्हणतो त्यावेळेस हे आवडणं किंवा चांगलं असणं नेमकं का आहे याची उत्तरं देण्याचा प्रयत्न लेखकाने प्रत्येक लेखात केलेला आहे. प्रत्येक चित्रपटातील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित हायलाइट्स जसे की, एखादा उत्कट प्रसंग, गाणे, नृत्य, मारामारीचे दृश्य यावर लेखकाने प्रकाश टाकलेला आहे. आपण जर तो चित्रपट पाहिला असेल तर लेखकाने वर्णन केलेले प्रसंग जसेच्या तसे डोळ्यासमोर उभे राहतात आणि बघितला नसेल तर तो चित्रपट आपण पाहिलाच पाहिजे अशी तीव्र इच्छा मनात निर्माण होते. उदाहरणार्थ, शोले या चित्रपटातील रसग्रहणात ,चेहऱ्यावरचे रेषाही ढळू न देता अमिताभने फेकलेले वन लाइनर्स, बुद्धीची चमक दाखवणारे शांतपणे केलेले विनोद, हळुवार प्रेमासाठी त्याचं आतल्या आत झुरणं , मित्राच्या मांडीवर प्राणत्यागाचे उत्कट दृश्य, आणि पिढ्यानपिढ्या लक्षात राहिलेला मावशी लीला मिश्रा सोबतचा विनोदी संवाद यांचे परिणामकारक वर्णन करून त्यांनी अमिताभची उत्तुंग अभिनय क्षमता उलगडून दाखवली आहे. या पुस्तकाला वाचनीय बनवणारा एक घटक म्हणजे लेखकाने वापरलेली भाषा. अत्यंत साध्या, सोप्या आणि अनुभवातून आलेल्या शब्दातून लेखकाने अमिताभ बच्चन भूमिकांचा उत्तरोत्तर चढत जाणारा आलेख शब्दांकित केला आहे. लेखकाच्या भाषा प्रभुत्वाचे साक्ष देणारी अनेक वाक्य पुस्तकांमध्ये जागजागी आढळतात. एका ठिकाणी ते लिहितात, `अमिताभने सिनेमातील विनोदाची सूत्र हाती घेतली तेव्हापासून विनोदी कलाकारांवर जणू बेकारीचं संकट कोसळलं होतं. प्रेक्षकांना दिलेल्या मनोरंजनाच्या वचनाशी `नमक हलाली` करणाऱ्या प्रकाश मेहरा आणि अमिताभ या जोडीने प्रेक्षकांना `और हम नाचे बिन घुंगरू के` असा आनंद दिला होता. असेच एक सुंदर वाक्य- `अमिताभचा उंट मनोरंजनाचा अख्खा तंबू व्यापून बसला होता`. लेखकाच्या ओघवत्या आणि मनाला भिडणाऱ्या भाषा शैलीचं एक उदाहरण मिली चित्रपटाच्या रसग्रहणातील या परिषदेतून दिसून येत: "शेखरच्या मनावर चढलेली उदासीची पुटं अमिताभच्या कसदार अभिनयामुळे आपल्याला अस्वस्थ,उदास करून सोडतात. दारूच्या नशेतील अमिताभचं एक दृश्य मस्त जमलं होतं . मोबाईल, टीव्ही इत्यादी आधुनिक साधनं व्यवहारात येण्याच्या आधीचा तो काळ होता. मिली आजारामुळे घरात बंदिस्त झाल्यानंतर त्या दोघात नोकराच्या माध्यमातून जो पत्र व्यवहार होतो तो आजच्या मोबाईल चॅटिंग पेक्षाही प्रभावी वाटतो. रोज मिलीला वरच्या मजल्यावरून खालच्या मजल्यावर गुलदस्ता पाठवणारा अमिताभ एका चिठ्ठीत लिहितो `जो गुलदस्ता बनके खुद आ जाऊ तो कहा रखुं . ` हे रोमँटिसिझम खूप वरच्या स्तराचं होतं. अमर्याद दुःखाची वीण घट्ट करत जाताना किशोर कुमारच्या दर्दभऱ्या स्वरात `बडी सुनी, सुनी है जिंदगी ये जिंदगी` आणि `आये तुम याद मुझे गाने लगी हर धडकन` ही दोन गाणी वातावरण औदासिन्यानं भरून टाकतात. मनाचा चांगला पण लहानपणी आई वडिलांच्या बाबतीत घडलेल्या घटनेने आणि लोकांनी त्याकरिता डिवचल्यानं कच खाल्लेला, प्रेमाची आस लागलेला एक तरुण अमिताभने लाजवाब रंगवला होता. या पुस्तकाच्या रंजकतेत भर टाकणारा आणखी एक घटक म्हणजे लेखकाचे आत्मचरित्रात्मक निवेदन. प्रत्येक चित्रपटाच्या बाबतीत तो चित्रपट त्यांनी केव्हा पाहिला, कुणाबरोबर पाहिला,त्यावेळी ते किती वर्षांचे होते आणि त्या चित्रपटाचा त्यांच्या भावविश्वावर कसा परिणाम झाला याचा उल्लेख जागजागी केलेला आहे. लेखकाच्या पिढीतील वाचकांना यातून पुनः प्रत्ययाचा आनंद मिळतो. आणि आजच्या पिढीतील इतर वाचकांसाठीही ही बाब रंजक ठरते. पुस्तकाच्या मलपृष्ठावर लेखक म्हणतात, `1973 साली आम्ही पाचवीत असताना आम्हाला प्रथमच हिंदी सिनेमातील नायकाची `ये पोलीस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नही`, अशी आगळीवेगळी मिजास पडद्यावर बघायला मिळाली आणि आता निवृत्तीला आलो तर हाच अद्भुत माणूस आम्हाला `पिंक` या महिलाप्रधान सिनेमात `ना का मतलब सिर्फ ना होता है`, असं ठणकावतो, `बदला` ह्या रहस्यपटात तितक्याच जोरकसपणे `सबका सच अलग अलग होता है ,` असं तत्वज्ञान मांडतो आणि अगदी अलीकडच्या `झुंड` मध्ये झोपडपट्टीतील धटिंगण मुलांच्या घोळक्याला `झुंड नाही, टीम... `म्हणायची शिकवण देतो तेव्हा आजही त्याचं म्हणणं आमच्या हृदयात थेट उतरतं .` पुस्तक वाचत असताना लेखकाच्या अफाट निरीक्षणशक्तीचे आणि अभ्यासू वृत्तीचे दर्शन घडते . विविध दिग्दर्शकांनी अमिताभच्या अभिनयक्षमतेचा केलेला वापर , अमिताभच्या डोळ्यातून सशक्तपणे व्यक्त झालेले हृदयस्पर्शी भाव, वेगवेगळ्या चित्रपटात त्याने केलेला लाथेचा उपयोग, त्याची वैशिष्ट्यपूर्ण नृत्य, आणि भारदस्त आवाजातील संवाद आणि गाणी यांचं वर्णन वाचत असताना लेखकाची संशोधक वृत्ती तर जाणवतेच परंतु आपणही हे चित्रपट पाहून हा रसास्वाद घ्यायलाच हवा ही इच्छा वाचकांच्या मनात प्रकर्षाने निर्माण होते.यातच या पुस्तकाचे फार मोठे यश सामावले आहे हे नक्की! ...Read more

SAAD GHALATO KALAHARI
SAAD GHALATO KALAHARI by MARK & DELIA OWENS Rating Star
मोहन देशपांडे नागपुर

cry of kalahari ह्या पुस्तके अनुवाद हिंदी सर्वोत्तम (RD) मध्ये कित्येक वर्षापूर्वी वाचले होते. माझ्याजवळ, जपून ठेवलेल्या पुस्तकामधे ते पुस्तक गहाळ झाले. मग 4 वर्षापूर्वी हे पुस्तक मिळाले व विकत घेतले. ते अनेक वेळा वाचून काढले, तरी प्रत्येकवेळी वेगळा नंद होतो. ती तुमची रसाळ भाषेची किमया. ह्या मुळेच Deceiption valley एकदा तरी बघता यावी ही इच्छा तुमचे अभिनंदन व धन्यवाद... ...Read more