* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: AKASHVEDH
  • Availability : Notify Me
     
  • ISBN : 9788184980103
  • Edition : 2
  • Publishing Year : MARCH 2009
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 164
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
LIFE IS LIKE AN OCEAN IN WHICH RESTLESSNESS EBBS AND FLOWS IN TIDAL WAVES. BUT EVEN WITHIN THIS, THE SENSITIVE MAN TREADS A DIFFERENT PATH, SEEKING HIS OWN HEAVEN. A RAY OF LIGHT FALLING IN A MUNDANE COURTYARD CAN ILLUMINE AN ENTIRE LIFE. TALES THAT CAPTURE THE DELICATE PULSATIONS OF THE HUMAN MIND, HEART-WARMING TALES THAT KINDLE A SENSE OF ‘SELF’ THROUGH THE TUMULT OF EMOTIONS. A COLLECTION RENDERED BY THE TALENTED AND DELICATE PEN OF GIRIJA KEER!
जीवनाच्या अथांग सागरप्रवाहात अस्वस्थतेच्या लाटा भरती-ओहोटीसारख्या उठतात. त्यातच मनस्वी माणूस स्वत:चं आभाळ शोधून वेगळ्या पाऊलवाटेनं प्रवासाला जातो. रोजच्याच अंगणात आलेला एखादा नवीन किरण सारं जीवनच उजळून जातो. मानवी मनाची स्पंदनं अलगद टिपत, भावभावनांचे कल्लोळ उरात बाळगून `स्व` जागृत करणाऱ्या हृदयस्पर्शी कथा. गिरिजा कीर यांच्या हळुवार लेखणीतून साकारलेला प्रतिभासंपन्न आविष्कार!
गिरीजा कीर यांना कै.सौ. उषा प्रकाश मोहाडीकर समितीतर्फे `समाजभूषण पुरस्कार`.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #AKASHVEDH #AKASHVEDH #आकाशवेध #SHORTSTORIES #MARATHI #GIRIJAKEER #गिरिजाकीर "
Customer Reviews
  • Rating StarDAILY TARUN BHARAT 14-6-2009

    ‘आकाशवेध’- गिरिजा कीर यांनी लिहिलेल्या कथांचा संग्रह, मेहता पब्लिशिंग हाऊसने देखण्या स्वरूपात प्रकाशित केला आहे. कथा, कादंबरी, बालसाहित्य अशा विविध साहित्यबंधांचे लेखन करणाऱ्या गिरिजा कीर यांच्या साहित्याचे उर्दू, कन्नड, तेलगू, गुजराथी, इंग्लिश अशा वविध भाषांमध्ये भाषांतरही झाले आहे. समाजातील उन्मार्गी स्त्रिया, मुलं, गुन्हेगार, कामगार स्त्रिया व मुले, आदिवासी यांच्याशी संवाद साधणाऱ्या लेखिकेला साहित्यलेखन पुरस्कारासमवेत समाज सेवेसाठीही पुरस्कार प्राप्त झाले आहेत. विविध स्तरांतील मानवी मनोव्यापार आपल्या साहित्यातून, आविष्कृत करणाNया गिरिजा कीर यांचे अनुभव विश्व विशाल व वैविध्यपूर्ण आहे. लेखिकेने मानवी हृदयातील चांगुलपणा जसा डोळसपणे टिपला आहे, तसाच मानवी मनातील स्वार्थ, संकुचितता, आत्मवेंâद्रितता, लोभ, क्रौर्य सुज्ञपणे निरखिले आहे. ‘आकाशवेध’मधील कथांतून यांना अभिव्यक्ती मिळाली आहे. स्त्री-पुरुष स्वभावातील नैसर्गिक अंतर दर्शवीत व्यक्तिजीवनाचा- व्यक्तिमनाचा लेखिकेने घेतलेला वेध या कथातून दृग्गोचर होतो. व्यक्तिजीवनातील आर्थिक, व्यावहारिक, भावनिक, मानिसक पातळ्यांवरून निर्माण झालेल्या समस्या व समस्येसंदर्भातील व्यक्तिमनांच्या क्रिया- प्रतिक्रिया यांचे सूक्ष्म चित्रण करीत लेखिका अंतरंगाच्या गूढ- गहिNया, स्थूल- सूक्ष्म, सौम्य- प्रखर, भाव- विचारांना चित्रित करते. वेगानं बदलत गेलेली तरुण पिढीची मानसिकता केंद्रवर्ती ठेवून वेगवेगळ्या स्तरांवर तिची अभिव्यक्ती लेखिका करते. नात्यात दिराकडून पैशाची झालेली फसवणूक सहन करीत, वास्तवाचे चटके सोसत आपल्या लहान मुलाचे मोठा कलावंत होण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी त्याच्यात आत्मबळ जिद्द निर्माण करत त्याचे ध्येय त्याच्या पदरात टाकणारी प्रेमळ, खंबीर आई, अशा आईच्या संस्कारातून घडलेल्या कलावंताचा स्वजीवन सार्थकी लावण्याच्या हेतूने गरीब-गरजू व कलेत रस घेणाNया मुलांना स्वत:च्या कलेचं ज्ञान देण्याचा उदात्त विचार व नि:स्वार्थी मन, आणि मोठ्या कलावंताकडून कलाज्ञान मिळवूनही जीवनात पैसा मिळत नाही म्हणून तारणाऱ्याचाच विध्वंस करून टाकणारी नवी पिढी अशा दोन पराकोटीच्या विरोधी जाणिवा- विचार- प्रवृत्ती यांच्या ताणाबाण्यातून सूक्ष्म- स्थूल संघर्षाचे धागे विणत लेखिका त्याचं आकाश कथा आकृतीत बांधते. व्यवहाराच्या पातळीवरून आई-वडील यांच्याविषयी विचार करणारी आजची ही तरुण पिढी, पैशांचा सुकाळ पण माणुसकीचा अभाव असल्याने जिवाभावाच्या नात्याविषयी जेव्हा, ‘बायकोचं बाळंतपण करायला, बाळ सांभाळायला आया हवीच, शिवाय ती घरची, विश्वासू दोन साड्या आणि बदाम पिस्त्याची पाकिटं यात हा सौदा नक्कीच चांगला असा विचार करताना दिसते तेव्हा लेखिकेला यातना होतात़ नव्या, आधुनिक मनांची मानसिकता, आचार- विचार, जीवनशैली नाईलाजास्तव स्वीकारताना जुन्या पिढीला जाणवणारी हतबलता, अगतिकता, खेद, विस्मितता, तगमग इ. भावच्छटांचे रंगमिश्रण लेखिका चितारते. मध्यमवर्गीय, सुशिक्षित, सुसंस्कृत वर्गाच्या व दोन- तीन पिढ्यांची मानसिकता अधोरेखित करणाNया या कथा कवी मनाला उजळून टाकतात तर कधी कातरवंâपित अंतर्मुख करतात. जुन्या- आधुनिक- संक्रमण काळातील वातावरण त्या त्या व्यक्तिचित्रांच्या भोवताली असल्याने त्यांच्या मनोधारणा, कृती, उक्ती, जीवनधारणा यातून ही व्यक्तिचित्रे उठावदार, जिवंत व स्वाभाविक होऊन अवतरतात. ही व्यक्तिचित्रे समंजस असोत, जिद्दी, कणखर असोत, प्रेमळ-दयाशील असोत, क्रूर-आततायी असोत. परंतु प्रसंग, परिस्थिती व व्यक्ती धारणा यांना साजेसे वातावरण कथातून निर्माण होतेच आणि वेगवेगळ्या पातळ्यांवरून ते कथानकात असे एकजीव होते की, कथाशयात, सूक्ष्म संघर्ष, विरोध नाट्य निर्माण करत कथांना सरसता व परिणामकारकता प्रदान करते. सहजसुलभ, प्रासादिक, ओघवती शैली, अनभुवांचं सहज- मोकळेपणानं केलेलं चित्रदर्शी शब्दांकन कधी क्वचित कथातून येणारं आदर्शवादी, गूढ, अद्भुतरम्य वातावण, कवचित विनोदाचा होणारा शिडकावा कथात रंजकता निर्माण करतात. कथांची बांधणी उत्कृष्ट, अनुभवाचे थेट प्रक्षेपण करणारी शब्दशैली, स्वत:च आभाळ शोधायचा प्रयत्न करणाऱ्या या कथांतील माणसांना त्यांच्या विचारांना वाचकांसमोर दृश्य करतात हे या कथांचे यश म्हणावे लागेल. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

A-AMITABHCHA
A-AMITABHCHA by G.B. DESHMUKH Rating Star
प्रा. डॉ . वैशाली रवी देशमुख, अमरावती

वाचनाचे फायदे सांगताना प्रसिद्ध इंग्रजी लेखक फ्रान्सिस बेकन म्हणतो `रीडिंग मेकेथ अ फुल मॅन`. वाचनामुळे माणूस परिपूर्ण होतो. क्वचित एखादं असं पुस्तक हाती येतं जे वाचल्यानंतर ह्या परिपूर्णतेची , आत्यंतिक समाधानाची जाणीव होते . नुकतंच जी. बी. देशुख यांचं `अ- अमिताभचा` हे पुस्तक हाती पडलं एका बैठकीत ते वाचून संपवलं आणि काहीतरी माहितीपर तरीही दर्जेदार आणि साहित्यिक मूल्य असणारं पुस्तक वाचण्याचा आनंद प्राप्त झाला. सीमा आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात काम करून निवृत्त झालेल्या जीबी देशमुखांनी २०२० मध्ये अमिताभ बच्चनच्या कारकिर्दीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त त्यांच्या विविध ५० सिनेमातील भूमिकांचे विश्लेषण करणारे साप्ताहिक सदर दैनिक सकाळ मध्ये प्रकाशित केले. कोरोना काळात लिहिलेल्या या लेखमालेला त्यावेळी प्रचंड प्रतिसाद मिळाला. केवळ ज्येष्ठच नाही तर तरुण वाचकांनीही या लेखमालिकेला पसंतीची पावती दिली. २०२२ मध्ये मेहता पब्लिकेशनने अमिताभ बच्चनच्या एकूण ६२ सिनेमांवर आधारित लेख `अ अमिताभचा` या पुस्तक रूपाने प्रकाशित केले. १९६९ पासून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीला पाच दशकांपेक्षा अधिक काळ लोटला तरीही त्याचे सिनेरसिकांच्या भावविश्वावर असलेले अधिराज्य कायम आहे. ती जादू कमी ओसरण्याचं नावच घेत नाही तर ती दिवसेंदिवस वाढत आहे . किरकोळ शरीरयष्टी, भरमसाठ उंची आणि सौंदर्याच्या साचेबंद व्याख्येत न बसणारा चेहरा असलेला अमिताभ आणि त्याला मिळालेली अफाट लोकप्रियता याची सांगड घालणे सर्वसामान्य व्यक्तीच्या आकलनापलीकडचे आहे. अमिताभ बच्चनचे प्रचंड चाहते असलेले जी . बी देशमुख यांच्यासाठी `अ` हा अमिताभचाच आहे. परंतु केवळ एक चाहते म्हणून त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं नाही तर अमिताभ बच्चनचे जे गारुड कित्येक दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर आहे त्यामागची नेमकी कारणे कोणती असू शकतात हे अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने शोधण्याचा प्रयत्न त्यांनी या पुस्तकात केलेला आहे. एक रसिक, चोखंदळ प्रेक्षक, अभ्यासक आणि समीक्षक म्हणून या पुस्तकात लेखक आपल्या समोर येतात. `बेमिसाल` पासून `झुंड` या चित्रपटा पर्यंत अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीतील उत्तमोत्तम ६२ सिनेमांचा लेखकांनी या पुस्तकात परामर्ष घेतलेला आहे. या चित्रपटांमधील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित सर्व बाबींचे अत्यंत अभ्यास पूर्वक रसग्रहण केलेले आहे. `अमिताभ बच्चन चांगला कलाकार आहे` किंवा `अमुक अमुक चित्रपट चांगला आहे` असं जेव्हा एखादा सर्वसामान्य प्रेक्षक म्हणतो त्यावेळेस हे आवडणं किंवा चांगलं असणं नेमकं का आहे याची उत्तरं देण्याचा प्रयत्न लेखकाने प्रत्येक लेखात केलेला आहे. प्रत्येक चित्रपटातील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित हायलाइट्स जसे की, एखादा उत्कट प्रसंग, गाणे, नृत्य, मारामारीचे दृश्य यावर लेखकाने प्रकाश टाकलेला आहे. आपण जर तो चित्रपट पाहिला असेल तर लेखकाने वर्णन केलेले प्रसंग जसेच्या तसे डोळ्यासमोर उभे राहतात आणि बघितला नसेल तर तो चित्रपट आपण पाहिलाच पाहिजे अशी तीव्र इच्छा मनात निर्माण होते. उदाहरणार्थ, शोले या चित्रपटातील रसग्रहणात ,चेहऱ्यावरचे रेषाही ढळू न देता अमिताभने फेकलेले वन लाइनर्स, बुद्धीची चमक दाखवणारे शांतपणे केलेले विनोद, हळुवार प्रेमासाठी त्याचं आतल्या आत झुरणं , मित्राच्या मांडीवर प्राणत्यागाचे उत्कट दृश्य, आणि पिढ्यानपिढ्या लक्षात राहिलेला मावशी लीला मिश्रा सोबतचा विनोदी संवाद यांचे परिणामकारक वर्णन करून त्यांनी अमिताभची उत्तुंग अभिनय क्षमता उलगडून दाखवली आहे. या पुस्तकाला वाचनीय बनवणारा एक घटक म्हणजे लेखकाने वापरलेली भाषा. अत्यंत साध्या, सोप्या आणि अनुभवातून आलेल्या शब्दातून लेखकाने अमिताभ बच्चन भूमिकांचा उत्तरोत्तर चढत जाणारा आलेख शब्दांकित केला आहे. लेखकाच्या भाषा प्रभुत्वाचे साक्ष देणारी अनेक वाक्य पुस्तकांमध्ये जागजागी आढळतात. एका ठिकाणी ते लिहितात, `अमिताभने सिनेमातील विनोदाची सूत्र हाती घेतली तेव्हापासून विनोदी कलाकारांवर जणू बेकारीचं संकट कोसळलं होतं. प्रेक्षकांना दिलेल्या मनोरंजनाच्या वचनाशी `नमक हलाली` करणाऱ्या प्रकाश मेहरा आणि अमिताभ या जोडीने प्रेक्षकांना `और हम नाचे बिन घुंगरू के` असा आनंद दिला होता. असेच एक सुंदर वाक्य- `अमिताभचा उंट मनोरंजनाचा अख्खा तंबू व्यापून बसला होता`. लेखकाच्या ओघवत्या आणि मनाला भिडणाऱ्या भाषा शैलीचं एक उदाहरण मिली चित्रपटाच्या रसग्रहणातील या परिषदेतून दिसून येत: "शेखरच्या मनावर चढलेली उदासीची पुटं अमिताभच्या कसदार अभिनयामुळे आपल्याला अस्वस्थ,उदास करून सोडतात. दारूच्या नशेतील अमिताभचं एक दृश्य मस्त जमलं होतं . मोबाईल, टीव्ही इत्यादी आधुनिक साधनं व्यवहारात येण्याच्या आधीचा तो काळ होता. मिली आजारामुळे घरात बंदिस्त झाल्यानंतर त्या दोघात नोकराच्या माध्यमातून जो पत्र व्यवहार होतो तो आजच्या मोबाईल चॅटिंग पेक्षाही प्रभावी वाटतो. रोज मिलीला वरच्या मजल्यावरून खालच्या मजल्यावर गुलदस्ता पाठवणारा अमिताभ एका चिठ्ठीत लिहितो `जो गुलदस्ता बनके खुद आ जाऊ तो कहा रखुं . ` हे रोमँटिसिझम खूप वरच्या स्तराचं होतं. अमर्याद दुःखाची वीण घट्ट करत जाताना किशोर कुमारच्या दर्दभऱ्या स्वरात `बडी सुनी, सुनी है जिंदगी ये जिंदगी` आणि `आये तुम याद मुझे गाने लगी हर धडकन` ही दोन गाणी वातावरण औदासिन्यानं भरून टाकतात. मनाचा चांगला पण लहानपणी आई वडिलांच्या बाबतीत घडलेल्या घटनेने आणि लोकांनी त्याकरिता डिवचल्यानं कच खाल्लेला, प्रेमाची आस लागलेला एक तरुण अमिताभने लाजवाब रंगवला होता. या पुस्तकाच्या रंजकतेत भर टाकणारा आणखी एक घटक म्हणजे लेखकाचे आत्मचरित्रात्मक निवेदन. प्रत्येक चित्रपटाच्या बाबतीत तो चित्रपट त्यांनी केव्हा पाहिला, कुणाबरोबर पाहिला,त्यावेळी ते किती वर्षांचे होते आणि त्या चित्रपटाचा त्यांच्या भावविश्वावर कसा परिणाम झाला याचा उल्लेख जागजागी केलेला आहे. लेखकाच्या पिढीतील वाचकांना यातून पुनः प्रत्ययाचा आनंद मिळतो. आणि आजच्या पिढीतील इतर वाचकांसाठीही ही बाब रंजक ठरते. पुस्तकाच्या मलपृष्ठावर लेखक म्हणतात, `1973 साली आम्ही पाचवीत असताना आम्हाला प्रथमच हिंदी सिनेमातील नायकाची `ये पोलीस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नही`, अशी आगळीवेगळी मिजास पडद्यावर बघायला मिळाली आणि आता निवृत्तीला आलो तर हाच अद्भुत माणूस आम्हाला `पिंक` या महिलाप्रधान सिनेमात `ना का मतलब सिर्फ ना होता है`, असं ठणकावतो, `बदला` ह्या रहस्यपटात तितक्याच जोरकसपणे `सबका सच अलग अलग होता है ,` असं तत्वज्ञान मांडतो आणि अगदी अलीकडच्या `झुंड` मध्ये झोपडपट्टीतील धटिंगण मुलांच्या घोळक्याला `झुंड नाही, टीम... `म्हणायची शिकवण देतो तेव्हा आजही त्याचं म्हणणं आमच्या हृदयात थेट उतरतं .` पुस्तक वाचत असताना लेखकाच्या अफाट निरीक्षणशक्तीचे आणि अभ्यासू वृत्तीचे दर्शन घडते . विविध दिग्दर्शकांनी अमिताभच्या अभिनयक्षमतेचा केलेला वापर , अमिताभच्या डोळ्यातून सशक्तपणे व्यक्त झालेले हृदयस्पर्शी भाव, वेगवेगळ्या चित्रपटात त्याने केलेला लाथेचा उपयोग, त्याची वैशिष्ट्यपूर्ण नृत्य, आणि भारदस्त आवाजातील संवाद आणि गाणी यांचं वर्णन वाचत असताना लेखकाची संशोधक वृत्ती तर जाणवतेच परंतु आपणही हे चित्रपट पाहून हा रसास्वाद घ्यायलाच हवा ही इच्छा वाचकांच्या मनात प्रकर्षाने निर्माण होते.यातच या पुस्तकाचे फार मोठे यश सामावले आहे हे नक्की! ...Read more

SAAD GHALATO KALAHARI
SAAD GHALATO KALAHARI by MARK & DELIA OWENS Rating Star
मोहन देशपांडे नागपुर

cry of kalahari ह्या पुस्तके अनुवाद हिंदी सर्वोत्तम (RD) मध्ये कित्येक वर्षापूर्वी वाचले होते. माझ्याजवळ, जपून ठेवलेल्या पुस्तकामधे ते पुस्तक गहाळ झाले. मग 4 वर्षापूर्वी हे पुस्तक मिळाले व विकत घेतले. ते अनेक वेळा वाचून काढले, तरी प्रत्येकवेळी वेगळा नंद होतो. ती तुमची रसाळ भाषेची किमया. ह्या मुळेच Deceiption valley एकदा तरी बघता यावी ही इच्छा तुमचे अभिनंदन व धन्यवाद... ...Read more