* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: AKASHVEDH
  • Availability : Available
  • ISBN : 9788184980103
  • Edition : 2
  • Publishing Year : MARCH 2009
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 164
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
LIFE IS LIKE AN OCEAN IN WHICH RESTLESSNESS EBBS AND FLOWS IN TIDAL WAVES. BUT EVEN WITHIN THIS, THE SENSITIVE MAN TREADS A DIFFERENT PATH, SEEKING HIS OWN HEAVEN. A RAY OF LIGHT FALLING IN A MUNDANE COURTYARD CAN ILLUMINE AN ENTIRE LIFE. TALES THAT CAPTURE THE DELICATE PULSATIONS OF THE HUMAN MIND, HEART-WARMING TALES THAT KINDLE A SENSE OF ‘SELF’ THROUGH THE TUMULT OF EMOTIONS. A COLLECTION RENDERED BY THE TALENTED AND DELICATE PEN OF GIRIJA KEER!
जीवनाच्या अथांग सागरप्रवाहात अस्वस्थतेच्या लाटा भरती-ओहोटीसारख्या उठतात. त्यातच मनस्वी माणूस स्वत:चं आभाळ शोधून वेगळ्या पाऊलवाटेनं प्रवासाला जातो. रोजच्याच अंगणात आलेला एखादा नवीन किरण सारं जीवनच उजळून जातो. मानवी मनाची स्पंदनं अलगद टिपत, भावभावनांचे कल्लोळ उरात बाळगून `स्व` जागृत करणाऱ्या हृदयस्पर्शी कथा. गिरिजा कीर यांच्या हळुवार लेखणीतून साकारलेला प्रतिभासंपन्न आविष्कार!
गिरीजा कीर यांना कै.सौ. उषा प्रकाश मोहाडीकर समितीतर्फे `समाजभूषण पुरस्कार`.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #AKASHVEDH #AKASHVEDH #आकाशवेध #SHORTSTORIES #MARATHI #GIRIJAKEER #गिरिजाकीर "
Customer Reviews
  • Rating StarDAILY TARUN BHARAT 14-6-2009

    ‘आकाशवेध’- गिरिजा कीर यांनी लिहिलेल्या कथांचा संग्रह, मेहता पब्लिशिंग हाऊसने देखण्या स्वरूपात प्रकाशित केला आहे. कथा, कादंबरी, बालसाहित्य अशा विविध साहित्यबंधांचे लेखन करणाऱ्या गिरिजा कीर यांच्या साहित्याचे उर्दू, कन्नड, तेलगू, गुजराथी, इंग्लिश अशा वविध भाषांमध्ये भाषांतरही झाले आहे. समाजातील उन्मार्गी स्त्रिया, मुलं, गुन्हेगार, कामगार स्त्रिया व मुले, आदिवासी यांच्याशी संवाद साधणाऱ्या लेखिकेला साहित्यलेखन पुरस्कारासमवेत समाज सेवेसाठीही पुरस्कार प्राप्त झाले आहेत. विविध स्तरांतील मानवी मनोव्यापार आपल्या साहित्यातून, आविष्कृत करणाNया गिरिजा कीर यांचे अनुभव विश्व विशाल व वैविध्यपूर्ण आहे. लेखिकेने मानवी हृदयातील चांगुलपणा जसा डोळसपणे टिपला आहे, तसाच मानवी मनातील स्वार्थ, संकुचितता, आत्मवेंâद्रितता, लोभ, क्रौर्य सुज्ञपणे निरखिले आहे. ‘आकाशवेध’मधील कथांतून यांना अभिव्यक्ती मिळाली आहे. स्त्री-पुरुष स्वभावातील नैसर्गिक अंतर दर्शवीत व्यक्तिजीवनाचा- व्यक्तिमनाचा लेखिकेने घेतलेला वेध या कथातून दृग्गोचर होतो. व्यक्तिजीवनातील आर्थिक, व्यावहारिक, भावनिक, मानिसक पातळ्यांवरून निर्माण झालेल्या समस्या व समस्येसंदर्भातील व्यक्तिमनांच्या क्रिया- प्रतिक्रिया यांचे सूक्ष्म चित्रण करीत लेखिका अंतरंगाच्या गूढ- गहिNया, स्थूल- सूक्ष्म, सौम्य- प्रखर, भाव- विचारांना चित्रित करते. वेगानं बदलत गेलेली तरुण पिढीची मानसिकता केंद्रवर्ती ठेवून वेगवेगळ्या स्तरांवर तिची अभिव्यक्ती लेखिका करते. नात्यात दिराकडून पैशाची झालेली फसवणूक सहन करीत, वास्तवाचे चटके सोसत आपल्या लहान मुलाचे मोठा कलावंत होण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी त्याच्यात आत्मबळ जिद्द निर्माण करत त्याचे ध्येय त्याच्या पदरात टाकणारी प्रेमळ, खंबीर आई, अशा आईच्या संस्कारातून घडलेल्या कलावंताचा स्वजीवन सार्थकी लावण्याच्या हेतूने गरीब-गरजू व कलेत रस घेणाNया मुलांना स्वत:च्या कलेचं ज्ञान देण्याचा उदात्त विचार व नि:स्वार्थी मन, आणि मोठ्या कलावंताकडून कलाज्ञान मिळवूनही जीवनात पैसा मिळत नाही म्हणून तारणाऱ्याचाच विध्वंस करून टाकणारी नवी पिढी अशा दोन पराकोटीच्या विरोधी जाणिवा- विचार- प्रवृत्ती यांच्या ताणाबाण्यातून सूक्ष्म- स्थूल संघर्षाचे धागे विणत लेखिका त्याचं आकाश कथा आकृतीत बांधते. व्यवहाराच्या पातळीवरून आई-वडील यांच्याविषयी विचार करणारी आजची ही तरुण पिढी, पैशांचा सुकाळ पण माणुसकीचा अभाव असल्याने जिवाभावाच्या नात्याविषयी जेव्हा, ‘बायकोचं बाळंतपण करायला, बाळ सांभाळायला आया हवीच, शिवाय ती घरची, विश्वासू दोन साड्या आणि बदाम पिस्त्याची पाकिटं यात हा सौदा नक्कीच चांगला असा विचार करताना दिसते तेव्हा लेखिकेला यातना होतात़ नव्या, आधुनिक मनांची मानसिकता, आचार- विचार, जीवनशैली नाईलाजास्तव स्वीकारताना जुन्या पिढीला जाणवणारी हतबलता, अगतिकता, खेद, विस्मितता, तगमग इ. भावच्छटांचे रंगमिश्रण लेखिका चितारते. मध्यमवर्गीय, सुशिक्षित, सुसंस्कृत वर्गाच्या व दोन- तीन पिढ्यांची मानसिकता अधोरेखित करणाNया या कथा कवी मनाला उजळून टाकतात तर कधी कातरवंâपित अंतर्मुख करतात. जुन्या- आधुनिक- संक्रमण काळातील वातावरण त्या त्या व्यक्तिचित्रांच्या भोवताली असल्याने त्यांच्या मनोधारणा, कृती, उक्ती, जीवनधारणा यातून ही व्यक्तिचित्रे उठावदार, जिवंत व स्वाभाविक होऊन अवतरतात. ही व्यक्तिचित्रे समंजस असोत, जिद्दी, कणखर असोत, प्रेमळ-दयाशील असोत, क्रूर-आततायी असोत. परंतु प्रसंग, परिस्थिती व व्यक्ती धारणा यांना साजेसे वातावरण कथातून निर्माण होतेच आणि वेगवेगळ्या पातळ्यांवरून ते कथानकात असे एकजीव होते की, कथाशयात, सूक्ष्म संघर्ष, विरोध नाट्य निर्माण करत कथांना सरसता व परिणामकारकता प्रदान करते. सहजसुलभ, प्रासादिक, ओघवती शैली, अनभुवांचं सहज- मोकळेपणानं केलेलं चित्रदर्शी शब्दांकन कधी क्वचित कथातून येणारं आदर्शवादी, गूढ, अद्भुतरम्य वातावण, कवचित विनोदाचा होणारा शिडकावा कथात रंजकता निर्माण करतात. कथांची बांधणी उत्कृष्ट, अनुभवाचे थेट प्रक्षेपण करणारी शब्दशैली, स्वत:च आभाळ शोधायचा प्रयत्न करणाऱ्या या कथांतील माणसांना त्यांच्या विचारांना वाचकांसमोर दृश्य करतात हे या कथांचे यश म्हणावे लागेल. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
डॉ. जयंत वडतकर.अमरावती

मेळघाटचा एन्सायक्लोपिडीया असलेले निवृत्त वनाधिकारी श्री. रविंद्र वानखडे यांच्या अनुभवांवर आधारित कुलामामाच्या देशात हे पुस्तक वाचले तेव्हापासून या पुस्तकाचे लेखक श्री. जी. बी. देशमुख यांना भेटण्याची इच्छा होती. इच्छाशक्ती असली की योग जुळून येतो असं महणतात. रविंद्र वानखडे सरांच्या माध्यमातूनच तो योग जुळून आला. माझ्या एक पुस्तकाचे प्रकाशन बाबत वानखडे सरांशी चर्चा करीत असताना त्यांनी लेखकाचा संदर्भ दिला व जी.बी. ना भेटून घ्या असे सांगितले. भेट घडून आली. अगदी सहज, घरगुती भेट झाली, गप्पा रंगल्या. यावेळी जी. बी. देशमुख यांनी त्यांचे पहिले पुस्तक महारुद्र मला भेट दिले. आमच्या चर्चेतून आणि आंतरराष्ट्रीय फुटबॉल मथला मराठमोळा झंझावात महारुद्र, हे या पुस्तकाचे शीर्षक वाचून पुस्तकाचा विषय थोडक्यात समजला. लेखकाचे वडील भीमराव देशमुख यांनी फुटबॉलपटू म्हणून गाजविलेल्या कारकीदींचा आढावा या पुस्तकात होता. एका मुलाने आपल्या वडिलांवर लिहिलेले पुस्तक कसे असेल? असा प्रश्न अन पुस्तक, दोन्ही घेऊन घरी आलो. भेट मिळालेले पुस्तक वेळ मिळाला तसे एका बैठकीत वाचून काढले. आता गल्ली गल्लीत जसं क्रिकेट खेळल्या व बघितले जाते तसं स्वातंत्र्य पुर्व काळात वऱ्हाडात फुटबॉल खेळला जात असे. गावागावांत टीम असायच्या, सामने अर्थात स्पर्धा भरवल्या जात असत. स्वातंत्र्यपूर्व काळात अशाच रुपयांमधून चमकत, वऱ्हाडाच्या ग्रामीण भागातील एका खेळाडूने थेट मुंबईतील फुटबॉल क्लब व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मुसंडी मारत आपल्या खेळाचा व व्यक्तीमत्त्वाचा ठसा उमटविला होता. तो काळ होता १९३० ते १९५० चा. त्या वल्लीचे नाव होतं भिमराव देशमुख. जी. बी. देशमुख यांनी त्यांच्या वडिलांवर लिहिलेले महारुद्र पुस्तक काही फक्त भिमराव देशमुख यांची जीवन चरित्र नाही. स्वातंत्र्य मिळण्याच्या साधारण वीस वर्षा पुर्वी ३० ते ५० च्या दशकात आपल्या देशातील खेळाची स्थिती कशी होती. विशेषतः वऱ्हाडाच्या ग्रामीण भागातील स्थिती कशी होती. कुठले खेळ खेळले जात असत. स्पर्धा कशा भरवल्या जात असत. शाळा आणि शिक्षण कसं होतं. आर्थिक स्थिती कशी होती. अमरावती जिल्ह्यातील कोणत्या गावात फुटबॉलच्या नावाजलेल्या टीम होत्या. अमरावती कशी होती याची माहिती सुद्धा या पुस्तकातून वाचायला मिळते. पुस्तकाच्या पहिल्याच प्रकरणात भीमराव यांचे व्यक्तिमत्व कसं होतं हे सांगण्यासाठी लेखकाने बाबा म्हणून जरी त्यांची ओळख करून दिली असली तरी पुढील सर्व प्रकरणातून त्यांनी भीमराव अशा एकेरी उल्लेखातून हे व्यक्तिमत्व साकारले आहे. वऱ्हाडातल्या आपल्या सवयीनुसार प्रसिद्धी पासून दूर राहिलेल्या एका नामवंत फुटबॉलपटूची कारकीर्द व फुटबॉल पश्चात कौटुंबिक कारकीर्द तटस्तपणे मांडण्यात लेखक यशस्वी झाले आहेत हे आधीच सांगून टाकतो. अमरावती जिल्ह्यातील खारतळेगाव येथील फुटबॉलच्या टीम मध्ये भीमराव देशमुख यांची कारकीर्द सुरु झाली. ती १९३० सालापासून त्यावेळी ते जेमतेम विशीत होते. प्रथम शालेय स्पर्धापासून पुढे क्लब स्पर्धा पासून भीमरावने आपल्या खेळाचा ठसा उमटविला हळूहळू ख्याती विदर्भांत पोहोचली, भीमराव यांचा खेळ बघण्यासाठी लोक खास वेळ काढून येऊ लागेल, १९३८-३९ मध्ये विदर्भात झालेल्या काही स्पर्धात मुबंईच्या काही टीम सहभागी झाल्या होत्या, त्यामुळे नावाजलेल्या ब्रिटीश खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळाली. मुंबईच्या इंग्रजांच्या टीमला वऱ्हाडातील भीमराव यांच्या टीमने हरविले. वायएमसिए, मुंबईच्या अलेक्झांडर नावाच्या कप्तानाने भीमरावच्या खेळाने प्रभावित होऊन खारतळेगावच्या चार खेळाडूंना मुंबईच्या टीम कडून खेळण्याचे निमंत्रण दिले. १९४० ला भीमराव सह चार खेळाडू मुंबईत पोहोचले. अलेक्झांडरने त्यांना सराव शिबिरीत घातले. पुढील वर्षात भीमराव वायएमसिए टीम कडून खेळण्यासाठी करारबद्ध झाले. जशा आयपीएल मध्ये आज वेगवेगळ्या टीम खेळतात तसे त्यावेळी मुंबईत फुटबॉलचे क्लब होते. पुढील १० वर्षे अनेक टीम कडून खेळत अनेक स्पर्धा गाजविल्या. भीमराव यांचेवर तेव्हाच्या इंग्रजी वृत्तपत्रांतून रकाने छापले जाऊ लागले. मुंबईतील आपल्या १२ वर्षाच्या कार्यकाळात क्लब स्पर्धामधून त्यांनी ४०० सामने खेळले, तब्बल २५० गोल मारलेत. भीमराव वेगवेगळ्या स्पर्धामधून खेळत मैदान गाजवत होते. त्यातूनच १९४८ च्या ऑलम्पिक स्पर्धेच्या टीम मध्ये निवड झाली मात्र एका सराव सामन्यात पाय फॅक्चर झाल्याने देशाकडून खेळण्याची संधी हुकली. पुढील वर्षात भीमराव हे भारतीय टीम सोबत मलेशिया, कंबोडिया, इंडोनेशिया, म्यानमार, फिलिपिन्स, हाँगकाँग, थायलंड अशा देशात खेळले, या दौऱ्यातील २० पैकी १९ सामने जिंकले. भीमराव आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू झाले होते. इतके खेळून भीमराव यांचेकडे आर्थिक नियोजन नसल्याने परिस्थिती जेमतेमच होती. अशातच १९५१ साली त्यांनी निवृत्ती घेतली. अमरावती मध्ये परत आल्यावर त्यांनी आपला संसार थाटला, आर्थिक पाठबळ नसल्याने फुटकळ व्यवसाय केले. मात्र मी कधीकाळी आंतरराष्ट्रीय खेळाडू होते याचा कधी उल्लेख सुद्धा केला नाही, प्रसिद्धी पासून ते कायमच दूर राहिले. या काळात भीमराव यांच्या पत्नी अंजीरा यांनी जबाबदारीनं संसार सांभाळला. मुलांना मोठे केले. भीमराव शेवटपर्यंत मेहनत करीत राहिले. समाजात चांगले स्थान निर्माण केले. मात्र ते इतके मोठे फुटबॉलपटू होते ते अमरावतीकरांना काही माहिती झाले नाही. भीमराव यांच्या निधनानंतर या आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूचे कार्य पुढील पिढीला माहित व्हावे या उद्देशाने जी. बी. देशमुख यांनी या पुस्तकातून आपल्या तीर्थरुपांचे भावचित्र अगदी सोप्या सरळ भाषेत शब्दबद्ध करून महारुद्र च्या रूपाने वाचकांसमोर ठेवले. या लिखाणासाठी त्यांनी मुंबईत जाऊन त्या काळातील टाईम्स वृत्तपत्रांतील भीमराव यांचा उल्लेख असलेली कात्रणे मिळविली, त्यांच्या समवेत खेळलेल्या खेळाडूंना व पत्रकारांना भेटले, अमरावती मधील त्यांच्या समवयस्क परिचितांकडून त्यांची माहिती गोळा केली. त्यासाठी त्यांनी अथक अशी मेहनत घेतली. व २००५ साली हे पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकाच्या पुढील आवृत्ती मेहता प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केल्याने ते पुस्तक महाराष्ट्रभर पोहोचले. या निमित्त्याने भीमराव यांचे कार्य, त्यांचा फुटबॉल खेळातील झंझावात मराठी माणसाला माहिती झाला. अमरावतीकर या नात्याने मला तर आपल्या मातीतील माणूस त्या काळात आंतरराष्ट्रीय पातळीवर झेंडा गाडून आल्याचा अभिमान वाटला. अशा अनेक अर्थाने महारुद्र महत्वाचे आहे. ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
सलिल तांबे

ज्यांना गोष्टींची आवड आहे अशा मुलांसाठी ही मेजवानी आहेच, पण आपल्या पाल्यांमध्ये संवेदनशीलता आणि निसर्गाप्रती आदर जोपासण्यासाठी मोठ्यांनीही हे पुस्तक वाचायला हवे. प्रदूषणाविरुद्ध लहान हातांनी दिलेला लढा असो किंवा निसर्गाचा खरा आनंद पिशवीत भरून आणण्यापक्षा मनात कसा साठवावा, हे सांगणारा दृष्टिकोन असो; हे पुस्तक प्रत्येक वाचकाला समृद्ध करते. पुस्तकातील प्रत्येक कथा संपताना आपल्याला जगण्याकडे बघण्याची एक नवी दृष्टी देऊन जाते. यातलं काही गूढ, काही थरार आणि खूप सारे हळवे प्रसंग अनुभवण्यासाठी तुम्हाला हे पुस्तक स्वतः वाचायलाच हवं. म्हणूनच, आपल्या संग्रही असावा असा हा `हाटूमुटूचा चंद्र` तुम्ही एकदा नक्की अनुभवा! चला तर मग, आपणही शोधूया आपला स्वतःचा ‘हाटूमुटूचा चंद्र’! ...Read more