* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
IN DAY-TO-DAY LIFE, WE COME ACROSS MANY WORDS AND DEFINITIONS. THE STUDENTS LEARN MANY THEOREMS AND OBSERVE MANY APPARATUS IN THEIR SCHOOLS. BUT, IF WE GIVE IT A SERIOUS THOUGHT THEN WE WILL REALIZE THAT MANY OF THEM ARE NOT FULLY AWARE OF THE MEANINGS OF THIS NAMES, DEFINITIONS OR APPARATUS. THE WHOLE PURPOSE BEHIND THE PUBLICATION OF THE BOOK "A TO Z` WAS TO HELP EVERYONE TO OVERCOME THIS DIFFICULTY. IN THIS BOOK, WE HAVE STARTED WITH THE MEANINGS AND EXPLANATIONS OF WORDS IN AN ALPHABETICAL ORDER. WE HAVE TRIED TO MAKE IT EASIER BY DRAWING FIGURES WHEREVER NECESSARY. THE AUTHOR HAS SO FAR WRITTEN DIFFERENT BOOKS ABOUT THE SCIENTIFIC TOYS, AND EXPERIMENTS. WE ARE SURE THAT THE READERS WILL ENJOY THIS BOOK AS WELL.
रोजच्या व्यवहारात विज्ञानातील अनेक शब्द, संज्ञा वापरल्या जातात. शालेय विद्याथ्र्यांच्या अभ्यासक्रमात विज्ञानावर आधारित अनेक सिद्धांत व उपकरणे अभ्यासली जातात; परंतु त्यांंचे अर्थ कित्येकदा माहीत नसतात. त्यासाठीच ‘A ूर्द ैं विज्ञान’ची निर्मिती झाली आहे. या पुस्तकात इंग्रजी ‘A’ या आद्याक्षरापासून र्‘ैं’ पर्यंत जास्तीत जास्त शब्दांची आवश्यक त्या ठिकाणी आकृती काढून समजण्यास सोपी अशी मांडणी केली आहे. वैज्ञानिक खेळण्यांची, प्रयोगांची मनोरंजक पुस्तके देणाNया डी. एस्. इटोकर यांचे हे वेगळे पुस्तक बाल, कुमार वाचकांबरोबर आबालवृद्धांनाही आवडेल असा विश्वास वाटतो.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #ATOZVIDNYAN #ATOZVIDNYAN #ATOZ #विज्ञान #SCIENCE #MARATHI #D.S.ITOKAR #डी.एस.इटोकर "
Customer Reviews
  • Rating StarShekhar Kadge

    Best E-BOOK OFF WORLD`S

  • Rating StarDAINIK DESHDOOT 14-12-2008

    आजचे युग हे विज्ञान युग आहे. या युगात विज्ञानाची नवनवी क्षितीजं सामोरी येत आहेत; पण याने अचंबित होण्यापेक्षा आपल्या इतिहासात डोकवायला हवे. त्यासाठी इतिहासाचे ज्ञान हवे. आपल्याकडे वेदकाळात विज्ञान प्रगत अवस्थेत होतं. अणू-परमाणू यांचा विचार, खगोल, भविषय यांचा अभ्यास, वैद्यकशास्त्र तंत्रज्ञान या अनेक क्षेत्रांत भारतीय शिखरावर होते, परंतु सततची आक्रमणं आणि जेत्यांची भूमिका, आपला न्यूनगंड यामुळे आपली संस्कृती दुय्यम मानून आपण दुर्लक्ष केले अन् पाश्चात्यांपुढे मान डोलवून ते सांगणारे विज्ञान आजचे सत्य मानू लागले. चीनमध्ये उत्खननात अल्युमिनियमची भांडी सापडली. हडप्पा मोहंजोदडोचा इतिहास अजून काय सांगतो? रामायण-महाभारत काळातील विमानं, शस्त्र-अस्त्र यांची वर्णने नीट वाचून वेध घेतला तर किती वेगळं सत्य सामोरं येतं. गुरुशिष्य, परंपरा, ज्ञान दडवण्याची वृत्ती, शहरीकरण, मनातला स्वत:चा देश व संस्कृतीबाबतचा न्यूनगंड, ग्रंथालये, विश्वविद्यालयांचा नाश, जाळपोळ इ. मुळे आपलं ज्ञानभांडार नाहिसे झाले. या पुस्तकाच्या दोन भागात पृथ्वीवरील विविध भागांत, विविध क्षेत्रांत प्राचीन काळी विज्ञान आणि तंत्रज्ञानाची जी प्रगती झाली होती आणि ज्या प्रगतीचे सबळ पुरावे उपलब्ध आहेत अशाच प्रगतीचा विचार केला आहे. आद्य रुग्णालये, शस्त्रक्रिया, आरसे, साबण, सौंदर्य प्रसाधने, दागिने, शिवणकाम, फॅशन, उद्यानशास्त्र, लटकत्या बागा, खेळ, खगोलशास्त्र, भविष्यदर्शी हाडे आणि चिनी संस्कृती अशा या पुस्तकाच्या अनुक्रमणिकेचा वेध घेतला तरी पुस्तकाचे मूल्य लक्षात येते. या साऱ्या मांडणीत इतिहास अपरिहार्यपणे येतोच. साम्राज्यांची पडझड, वेगळ्या धर्माचा परिचय यामुळे लोकजीवनावर होणारा परिणाम, त्यांचे जीवनमान, राहणी याच्या वाचनातून आजच्या काळाशी संदर्भ लावत वाचत गेल्यास आपल्यासमोर अनेकविध जीवनाचे पैलू स्पष्ट होत जातात. इ.स.पू. १९०० च्या सुमारास शेतकरी फळे काढण्यासाठी माकडे कामाला लावत होते. नांगराचा पहिला पुरावा इ.स.पू. ३००० च्या जवळपास मिळतो. इ.स. १०० ते ८८० च्या दरम्यान एस्किमो हस्तीदंतात कोरलेले गॉगल्स वापरत. खय्याम म्हटल्यावर शायरी आठवते; पण मुळात तो एक प्राचीन खगोल शास्त्रज्ञ होता असे अनेक संदर्भ, पुरावे या पुस्तकात वाचकाला अडकवून ठेवतात. या पुस्तकाच्या दुसNया भागात पण साडेचार हजार वर्षापूर्वीचे माहिती तंत्रज्ञान हा पहिला लेख. यानंतर दळणवळण, रस्ते, जलमार्ग, नकाशे, नौदल, दीपगृह, होकायंत्र, रणगाडे, कुपनलिका विद्युत घट, तोफा, धरण, कालवे, शेती औजारे अन शेवटचा लेख आहे आपल्या पूर्वजांचं तंत्रज्ञान आणि आपण. अशाप्रकारे नामशेष झालेल्या प्राचीन तंत्रज्ञानाची अपूर्व ओळख या पुस्तकातून करून दिलेली आहे. आपल्या देशाचा हा अपूर्व ज्ञानठेवा या पुस्तकातून मांडलेला आहे. तो पुढच्या पिढीला माहिती व्हायला हवा म्हणून ही पुस्तके घ्यायला हवीतच. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MI GALIB BOLTOY
MI GALIB BOLTOY by SHABBIR ROMANI Rating Star
लोकमत २५.९.२०२३

शब्बीर रोमानी हे व्यवसायाने वकील. मातृभाषा अर्थात उर्दू आणि शिक्षण मराठी माध्यमातून झालेले. २०१८ मध्ये प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या उर्दू पुस्तकाला, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालच्या साहित्य अकादमी केंद्राचे पुरस्कार लाभले आहेत. आता मिर्झागालिबवरचे नवे पुस्तक, `मी गालिब बोलतोय...!` लक्ष वेधून घेत आहे. गालिबच्या एका शेरची पहिली ओळ घेऊन सांगायचे झाल्यास, जिक्र गालिबचा आणि खूबसूरत बयान लेखकाचे असे या पुरस्काराबद्दल म्हणता येईल. मिर्जा असदुल्ला खां,`गालिब` या श्रेष्ठ शायरची शायरी, त्याचे पत्रलेखन, चरित्र यावर आजवर शेकडो पुस्तक प्रसिद्ध आहेत. लेखकाने प्रस्तावनेत नमूद केल्यानुसार गालिबवर अनेक लेखकांनी लिहिले आहे. मराठी, हिंदी-उर्दू लेखकांची ते तपशील पाहून आचंबा वाटतो. शिवाय शब्बीर रोमानी यांनी इथे आपल्या लेखनाचे प्रयोजन सांगताना म्हटले आहे, कि गालिबबद्दल अनेक उलट-सुलट प्रकारच्या कहाण्या, विनोद, (कसलेही शेर गालिबच्या नावाने सांगत राहणे) प्रचलित आहेत; त्यामुळे गालिबची कथा, त्याच्या पत्रांमधल्या मनोरंजक गप्पा-गोष्टी आणि त्याच्याशी निगडित आठवणी हे सगळं साध्या सोप्या भाषेत लिहिण्याचा प्रयत्न म्हणजे हे पुस्तक. सर्वसामान्य माणसाच्या जगण्यातल्या सर्व भावछटा गालिबच्या काव्यातून दिसत असतात. पुस्तक वाचताना गालिबची प्रकृती, त्याची विनोद बुद्धी, संवेदनशील वृत्ती हे आपल्याला जाणवत राहते, आणि लेखकाची तळमळसुद्धा. या पुस्तकाचे वैशिष्टय म्हणजे, मोठी प्रकरण टाळून किस्से सांगावेत अशी रचना. शिवाय लेखकाची साधी-सरळ भाषा, यामुळे शायरीची आणि गालिबबद्दलची सर्वसाधारण माहिती आणि कुतुहूल असणाऱ्या वाचकांना हे पुस्तक रंजक वाटेल. सहसा गालिबचे गाजलेले शेर, किस्से हे आपल्या वाचनात असतात. या पुस्तकात गालिबचे अनेक दुर्मिळ शेर, शिवाय फारसी रचनाही या पुस्तकात समाविष्ट असल्याने त्याला एक संदर्भ ग्रंथाचेही स्वरूप आलेले आहे. गालिबला आंबे फार आवडायचे, `मिर्झा गालिब` या गाजलेल्या चित्रपटातला तो प्रसंग आजही लक्षात आहे. आंबे खाताना एक मित्र गालिबला तुच्छतेने म्हणतो, `आम तो गधेभी नही खाते!` त्यावर गालिबने त्वरित उत्तर देतो. `सिर्फ गधेही नाही खाते!` शब्बीर रोमानी यांनी हा प्रसंग व विनोद म्हणून सांगितला नाही, तर त्याचे तपशिलाने वर्णन तर केलेच शिवाय आंब्यावरची गालिबची मोठी गजल त्यांनी दिलेली असल्याने त्या किश्श्याला एक गांभीर्य आलेले आहे. असाच एक किस्सा, ते कलकत्त्याला असताना साध्या चिकणी-सुपारीवर गालिबला कुणी छेडले होते, यावर तुमची शायरी होऊन जाऊ द्या! असे आवाहन केले. या सुपारीच्या दिसण्या-असण्यावरच्या अफलातून शायरीची भली मोठी झलकच गालिबने पेश केली! गालिबच्या एक महत्वाचा शेर आहे. जिक्र ऊस परी-वंश का और फार बयां अपना बन गया रिकीब आखिर, था जो राजदां अपना त्या परिच्या सौंदर्याचे वर्णन आणि तेही माझ्या भाषेतून, माझ्याकडून ऐकले आणि माझा जवळचा असा मित्र आता या प्रेमाच्या नात्यात माझा प्रतिस्पर्धी झाला (आता तो तिच्यावर प्रेम करायला लागला) कलकत्त्याला गालिब दीडेएक वर्ष राहिला होता. तिथल्या धनिकांनी मुशायरे, मुजरे आयोजित केलेले असायचे, गालिबचा तिथे सन्मानही व्हायचा. गालिबने या बद्दल फार जिव्हाळ्याने लिहिले आहे. या मुशायऱ्यामध्ये गालिबचे फारसीचे काव्यवाचन ऐकून फारसी भाषेचे तज्ञ त्याच्यावर नाराज झाल्याची आठवण आहे! गालिबच्या तोंडून फारसीचे कौतुक ऐकून लोकांनी आक्षेप घेतला! गालिब हा आपल्या दुःख, विवंचनेवर हसणारा अद्भुत असा कलावंत होता. हा शेर वाचल्यावर आपल्याला मुन्शी प्रेमचंद यांच्या `पूस कि रात` मधला हलकू आठवतो! मिर्झा गालिबच्या कुतुहूल असणाऱ्या वाचकांना हा संग्रह आवडण्यासारखाच आहे. लेखनातल्या भाषिक काही त्रुटी वगळल्यास, गालिबचे किस्से, त्याची शायरी हे सगळे रोचक आहे. ...Read more

MRUTYUNJAYEE
MRUTYUNJAYEE by RATNAKAR MATKARI Rating Star
पुस्तकप्रेमी

मीना कश्यप शाह *मृत्युंजयी* भयकथा हा रत्नाकर मतकरींच्या लेखनाचा हातखंडा. मी दहावीच्या सुट्टीत असताना भयकथा वाचायला सुरुवात केली आणि त्यांनी मला पुरात झपाटून टाकलं होतं. ही पुस्तकं असायचीही सुटसुटीत जाडीची. त्यामुळे जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी पुस्तक लगणाऱ्या मला सगळीकडे ती घेऊन जात येत असत. क्लास मध्ये लवकर पोहोचले - वाच पुस्तक, बससाठी उभी आहे, वाच पुस्तक; झोप येत नाही, वाच (हे बहुदा चक्राकार रित्या सुरु राहायचं, झोप नाही म्हणून वाचायचं आणि वाचत असायचे म्हणून झोप नाही... त्या वयात असं सगळं चालायचं - लहानपण देगा देवा...) मृत्युंजयी सुरु केली तेव्हा आधीच खेकडा, रंगांधळा वाचून झालं होतं. अजूनही एक संपवलं होतं, पण नाव नाही आठवत (बहुतेक कबंध). त्या पार्श्वभूमीवर मृत्युंजयी फार आवडलं नाही, आणि खरं तर त्यामुळे रत्नाकर मतकरींच्या भयकथा वाचणं थांबलं. अलीकडेच हे इ-बुक मिळालं किंडल वर, पुन्हा वाचलं - आतासुद्धा शेवटच्या परिच्छेदात काय वळण मिळतं त्याची उत्सुकता होती, पण एकूणच माझा patience खूपच कमी झालाय त्यामुळे skip reading, quick reading करत पुस्तक पटकन वाचून संपलं. मृत्यू, अखेर, शेवट ही भावना प्रत्येकासाठी भीतीदायकच. त्या भीतीवर बेतलेल्या कथा ह्या संग्रहात आहेत. अतिमानवीय, फँटसी, भुताटकी अशा धक्कातंत्राचा उपयोग अनेक लेखक करतात. पण मतकरीचं वैशिष्ठय असं, की ते जळमटं सारखी कथा लिहून जातात. मृत्युंजयी मधील कथांमध्ये मृत्यूची अनेक रूपं दिसतात, कथा जिवंत माणसांच्या - पण मृत्यूची चाहूल, त्याची भीती, कधी त्याचं हवेहवेपण, कधी त्याच्याकडे आपणहून जाणे, अशा अनेक रंगढंगांनी मतकरी गूढता कायम ठेवतात. ह्या पुस्तकातील, मृत्यू अवतीभवती असलेल्या प्रत्येक कथेत, आपणा सर्वांना नक्कीच सुप्त आकर्षण वाटत असलेल्या अनेक गूढ गोष्टी येतातच... मृत्यूवर विजय मिळवण्यासाठी करण्याची अतिमानवीय साधना... स्त्री-पुरुषातील शारीरिक आणि मानसिक ओढ... पूर्वी केलेल्या चुका आणि त्याबद्दलचा सल... जुलमाचा प्रतिशोध... अतिमानवीय शक्तींनी झपाटणे... भूतबाधा, भूतांशी गाठभेट... मृत्यूच्या अनेकविध तऱ्हा... मानसिक संतुलन ढळणे... आणि तत्सम. ह्या कथाप्रकारात महत्वाचं असतं, ते शेवटच्या काही वाक्यांमधे कथेला दिलेलं वळण आणि त्यामुळे वाचकाला बसलेला धक्का. रत्नाकर मतकरींच्या गूढकथा म्हणूनच खूप प्रभावी ठरतात. आता मात्र हे धक्का तंत्र बऱ्याच जागी पाहायला मिळतं - OTT वरच्या अनेक चित्रपट किंवा नाट्यमालांमधे हे तंत्र कथाकार वापरतात, आणि लोकांना हे पहायला खरंच खूप आवडतं, म्हणूनच त्या प्रसिद्ध होतात. अलीकडचं उदाहरण "वाळवी" चित्रपट! मृत्युंजयी मधे देखील काही कथा असा आनंद देऊन जातात. पण असं आहे ना "अति सर्वत्र वर्जयेत" - त्यामुळे बऱ्याच कथांच्या शेवटचा अंदाज लागतो आणि त्यांचा प्रभाव कमी होतो. सुरुवातीला जी गूढकथांची पुस्तकं मी वाचली, तेव्हा हे धक्कातंत्र मला नवीन होतं, त्यामुळे त्यात हा अंदाज लागत नव्हता. कदाचित मृत्युंजयी तेव्हा वाचलं आणि आताही वाचलं ते ह्या तंत्राचा अति वापर झाल्यावर वाचलं गेलं म्हणून असेल, पण कमी प्रभावी वाटलं हे खरं. अर्थात प्रत्येक गोष्टीत (सध्या इतर कथांमधे फारसे न सापडणारे) एक समान सूत्र आहे - ते म्हणजे, *वाईटाचं कधीच भलं होत नाही*. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, कधीही उचलून वाचायला सुरुवात करून काही मिनिटात एक गोष्ट संपते. सध्याच्या व्यग्र काळात हे पुस्तक पुन्हा वाचायला सोपे गेले, नक्कीच. आणि मी पुन्हा एकदा ह्या कथाप्रकाराकडे आकर्षितही झाले आहे... पुन्हा सगळी गूढकथांची पुस्तकं वाचायला हवीत. ...Read more