* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Notify Me
     
  • ISBN : 9788177668568
  • Edition : 5
  • Publishing Year : NOVEMBER 2007
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 100
  • Language : MARATHI
  • Category : SCIENCE
  • Available in Combos :D.S.ITOKAR COMBO SET-13 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
IN DAY-TO-DAY LIFE, WE COME ACROSS MANY WORDS AND DEFINITIONS. THE STUDENTS LEARN MANY THEOREMS AND OBSERVE MANY APPARATUS IN THEIR SCHOOLS. BUT, IF WE GIVE IT A SERIOUS THOUGHT THEN WE WILL REALIZE THAT MANY OF THEM ARE NOT FULLY AWARE OF THE MEANINGS OF THIS NAMES, DEFINITIONS OR APPARATUS. THE WHOLE PURPOSE BEHIND THE PUBLICATION OF THE BOOK "A TO Z` WAS TO HELP EVERYONE TO OVERCOME THIS DIFFICULTY. IN THIS BOOK, WE HAVE STARTED WITH THE MEANINGS AND EXPLANATIONS OF WORDS IN AN ALPHABETICAL ORDER. WE HAVE TRIED TO MAKE IT EASIER BY DRAWING FIGURES WHEREVER NECESSARY. THE AUTHOR HAS SO FAR WRITTEN DIFFERENT BOOKS ABOUT THE SCIENTIFIC TOYS, AND EXPERIMENTS. WE ARE SURE THAT THE READERS WILL ENJOY THIS BOOK AS WELL.
रोजच्या व्यवहारात विज्ञानातील अनेक शब्द, संज्ञा वापरल्या जातात. शालेय विद्याथ्र्यांच्या अभ्यासक्रमात विज्ञानावर आधारित अनेक सिद्धांत व उपकरणे अभ्यासली जातात; परंतु त्यांंचे अर्थ कित्येकदा माहीत नसतात. त्यासाठीच ‘A ूर्द ैं विज्ञान’ची निर्मिती झाली आहे. या पुस्तकात इंग्रजी ‘A’ या आद्याक्षरापासून र्‘ैं’ पर्यंत जास्तीत जास्त शब्दांची आवश्यक त्या ठिकाणी आकृती काढून समजण्यास सोपी अशी मांडणी केली आहे. वैज्ञानिक खेळण्यांची, प्रयोगांची मनोरंजक पुस्तके देणाNया डी. एस्. इटोकर यांचे हे वेगळे पुस्तक बाल, कुमार वाचकांबरोबर आबालवृद्धांनाही आवडेल असा विश्वास वाटतो.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #ATOZVIDNYAN #ATOZVIDNYAN #ATOZ #विज्ञान #SCIENCE #MARATHI #D.S.ITOKAR #डी.एस.इटोकर "
Customer Reviews
  • Rating StarShekhar Kadge

    Best E-BOOK OFF WORLD`S

  • Rating StarDAINIK DESHDOOT 14-12-2008

    आजचे युग हे विज्ञान युग आहे. या युगात विज्ञानाची नवनवी क्षितीजं सामोरी येत आहेत; पण याने अचंबित होण्यापेक्षा आपल्या इतिहासात डोकवायला हवे. त्यासाठी इतिहासाचे ज्ञान हवे. आपल्याकडे वेदकाळात विज्ञान प्रगत अवस्थेत होतं. अणू-परमाणू यांचा विचार, खगोल, भविषय यांचा अभ्यास, वैद्यकशास्त्र तंत्रज्ञान या अनेक क्षेत्रांत भारतीय शिखरावर होते, परंतु सततची आक्रमणं आणि जेत्यांची भूमिका, आपला न्यूनगंड यामुळे आपली संस्कृती दुय्यम मानून आपण दुर्लक्ष केले अन् पाश्चात्यांपुढे मान डोलवून ते सांगणारे विज्ञान आजचे सत्य मानू लागले. चीनमध्ये उत्खननात अल्युमिनियमची भांडी सापडली. हडप्पा मोहंजोदडोचा इतिहास अजून काय सांगतो? रामायण-महाभारत काळातील विमानं, शस्त्र-अस्त्र यांची वर्णने नीट वाचून वेध घेतला तर किती वेगळं सत्य सामोरं येतं. गुरुशिष्य, परंपरा, ज्ञान दडवण्याची वृत्ती, शहरीकरण, मनातला स्वत:चा देश व संस्कृतीबाबतचा न्यूनगंड, ग्रंथालये, विश्वविद्यालयांचा नाश, जाळपोळ इ. मुळे आपलं ज्ञानभांडार नाहिसे झाले. या पुस्तकाच्या दोन भागात पृथ्वीवरील विविध भागांत, विविध क्षेत्रांत प्राचीन काळी विज्ञान आणि तंत्रज्ञानाची जी प्रगती झाली होती आणि ज्या प्रगतीचे सबळ पुरावे उपलब्ध आहेत अशाच प्रगतीचा विचार केला आहे. आद्य रुग्णालये, शस्त्रक्रिया, आरसे, साबण, सौंदर्य प्रसाधने, दागिने, शिवणकाम, फॅशन, उद्यानशास्त्र, लटकत्या बागा, खेळ, खगोलशास्त्र, भविष्यदर्शी हाडे आणि चिनी संस्कृती अशा या पुस्तकाच्या अनुक्रमणिकेचा वेध घेतला तरी पुस्तकाचे मूल्य लक्षात येते. या साऱ्या मांडणीत इतिहास अपरिहार्यपणे येतोच. साम्राज्यांची पडझड, वेगळ्या धर्माचा परिचय यामुळे लोकजीवनावर होणारा परिणाम, त्यांचे जीवनमान, राहणी याच्या वाचनातून आजच्या काळाशी संदर्भ लावत वाचत गेल्यास आपल्यासमोर अनेकविध जीवनाचे पैलू स्पष्ट होत जातात. इ.स.पू. १९०० च्या सुमारास शेतकरी फळे काढण्यासाठी माकडे कामाला लावत होते. नांगराचा पहिला पुरावा इ.स.पू. ३००० च्या जवळपास मिळतो. इ.स. १०० ते ८८० च्या दरम्यान एस्किमो हस्तीदंतात कोरलेले गॉगल्स वापरत. खय्याम म्हटल्यावर शायरी आठवते; पण मुळात तो एक प्राचीन खगोल शास्त्रज्ञ होता असे अनेक संदर्भ, पुरावे या पुस्तकात वाचकाला अडकवून ठेवतात. या पुस्तकाच्या दुसNया भागात पण साडेचार हजार वर्षापूर्वीचे माहिती तंत्रज्ञान हा पहिला लेख. यानंतर दळणवळण, रस्ते, जलमार्ग, नकाशे, नौदल, दीपगृह, होकायंत्र, रणगाडे, कुपनलिका विद्युत घट, तोफा, धरण, कालवे, शेती औजारे अन शेवटचा लेख आहे आपल्या पूर्वजांचं तंत्रज्ञान आणि आपण. अशाप्रकारे नामशेष झालेल्या प्राचीन तंत्रज्ञानाची अपूर्व ओळख या पुस्तकातून करून दिलेली आहे. आपल्या देशाचा हा अपूर्व ज्ञानठेवा या पुस्तकातून मांडलेला आहे. तो पुढच्या पिढीला माहिती व्हायला हवा म्हणून ही पुस्तके घ्यायला हवीतच. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RAZOR SHARP
RAZOR SHARP by ASHWIN SANGHI Rating Star
सुनील माने, पुणे

लेखक अश्विन सांघी “द रोझाबल लाइन” या पहिल्याच कादंबरीने खूप लोकप्रिय झाला. प्राचीन भारतीय दंतकथा/ऐतिहासिक संदर्भ घेऊन त्याच्याभोवती आजच्या काळात रहस्यपूर्ण कथा लिहिणारा अश्विन. Chanakya’s Chant, The Krishna Key, The Sialkot Saga, Keepers of the Kalacakra, The Vault of Vishnu, The Magicians of Mazda अशा एकापेक्षा एक सुंदर रहस्य कादंबर्या “भारत सिरीज़” नावाने खूप प्रसिद्ध झाल्या. या सर्व कादंबऱ्या मी इंग्लिश मधेच वाचल्या. यांचा मराठी अनुवाद मेहता पब्लिशिंग हाउस यांच्याकडे उपलब्ध आहे. अश्विन सांघीने या भारत सिरीज शिवाय एक नवीन थ्रिल्लर सिरीज (कुत्ता कदम) सुरू केली आहे. त्यांतील पहिली कादंबरी Razor Sharp. एक सिरियल किलर मुंबईत एकानंतर एक खून पाडतोय. पोलिस चक्रावले आहेत. 1. रविवार दि २ फेब्रुवारी , गोरेगाव पश्चिममधे रवि मेहराचा खून होतो. त्याची बायको खुशी कॅाल सेंटरचा जॅाब करून रात्री ११.३० ला परत येते. खूप वेळा बेल वाजवून दार न उघडल्यामुळे ती उघडून आत येते तर रवि रक्ताच्या थारोळ्यात मरून पडलेला असतो. त्याचे हात पाठीमागे नायलॅान दोरीने बांधलेले असतात. त्याच्या छातीत सुरा खुपसलेला असतो. त्याच्या तोंडात काहीतरी खाद्य पदार्थ असतो. 2. सोमवार दि १० फेब्रुवारी , लोअर परळमधे सुचंद्रा अग्रवालचा खून. तिची कामवाली आल्यावर दार न उघडल्यामुळे सोसायटीवाले दार तोडतात. आत सुचंद्राचा खून झालेला. हात नायलॅान दोरीने मागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात काहीतरी खाद्यपदार्थ. पोलिस चक्रावलेले. मग पोलिसखाते जागे होते. त्यांचा नावाजलेला अधिकारी जो सस्पेंड झालेला आहे, त्या प्रकाश कदम, DCP याला बोलावले जाते. राज्याचे गृहमंत्री ओंकार लोखंडे, त्यांचा माणूस कमिशनर चव्हाण आणि उपगृहमंत्री जयंत गायकवाड व त्यांचा माणूस SCP राणे, मुंबईचा डॅान भाऊ पाटील जो लोखंडेचाच माणूस असतो, हे सर्व या केसच्या मागावर लागतात. कदम हा राणेंच्या ओळखीचा खास ऑफिसर असतो म्हणून त्यालाही इन्व्हेस्टीगेशनला बोलावले जाते. 3. मंगळवार दि १८ फेब्रुवारी , ठाणे येथे मंगला शहाचा खून. तिच्या शेजारणीमुळे हे कळते. मंगलाचे हात नायलॅान दोरीने पाठीमागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात खाद्यपदार्थ. पोलिस अधिकारी शिंदे कदमबरोबर येतात. मंगलाच्या चेहऱ्याजवळ कदमला पेस्टिसाईडचा वास येतो. चेहरा निळसर झालेला. खून झाल्यावर बॅाडीला हलवलेले दिसते. तो ऑफिसमध्ये जुन्या खूनांचे फोटो तपासतो. त्यांचीही बॅाडी खून केल्यावर हलवलेली दिसते. चेहऱ्यावर निळसर झाक दिसते. तिन्ही खून “फिनेक” ब्रॅंडच्या चाकूने केलेले असतात. हे समान धागे कदम त्याची मुलगी केतुल बरोबर चर्चा करतो. केतुलची आई काही वर्षांपूर्वी कदमला सोडून गेलेली असते. ती भाऊ पाटीलची सावत्र बहीण असते. पण सध्या ती कुठे आहे व काय करते हे माहित नसते. केतुल कोर्टात काम करत असते तसेच ती “शक्ती” या NGO मधेही काम करते. शक्ती हे सोनापूरमधुन सुटका केलेल्या वेश्यांचे पुनर्वसन करत असते. निर्मल नावाचा तिचा मित्र एथिकल हॅकर असतो. तिच्यावर प्रेम करत असतो. कदमला हार्ट अटॅक येऊन गेलेला व स्टेंट बसवलेला असतो. Depression मुळे त्याची सायकॅालॅाजिस्टकडे ट्रिटमेंट चालू असते. कदमला या तिन्ही केसमधे आणखी एक धागा सापडतो. हे खून आठ दिवसांच्या अंतरावर झालेले असतात. म्हणजे पुढचा खून बुधवारी होणार असल्याचे तो राणे व शिंदेला सांगतो. 4. बुधवार दि २६ फेब्रुवारी, कांदिवली पश्चिम, लक्ष्मी बुधीराजाचा खून. तोच पॅटर्न. 5. गुरुवार दि ५ मार्च, खार पश्चिम, गुरुराज अदवानीचा खून सेम पॅटर्न. गुरूराज हा युट्युबवरचा प्रसिद्ध सिंगर असतो. 6. शुक्रवार दि १३ मार्च, ताडदेव, दिव्या शुक्रपाणीवर खूनी हल्ला होतो. पण ती जबर जखमी होते. ती फिटनेस ट्रेनर असल्यामुळे खुन्याबरोबर झटापट करते. पण चाकू पोटात घुसल्यामुळे ती जबर जखमी होते. हात बांधलेले असतानाही ती फोनवर “सिरी” ला तिच्या भावाला, ध्रुवला फोन लावायला सांगते. फोन लागतो व ती “हेल्प हेल्प” एव्हढेच बोलून बेशुद्ध होते. म्हणून खुनी पळून जातो. ध्रुव तिथे पोहोचून तिला हॅास्पिटलमधे ॲडमिट करतो. पोलिसांना तिथे खुन्याची बॅग सापडते. त्यांत नायलॅानची दोरी, बेगॅान स्प्रे व राजमाच्या बिया सापडतात. तिसऱ्या खुनाआधी पोलिस संशयित म्हणून राजू दाभाडेला अटक करतात. पण चौथ्या खूनाच्या वेळेस तो कस्टडीतच असतो. मग खूनी कोण? 7. शनिवार दि २१ मार्च, बान्द्रा पश्चिम, शनिया डिसौजाचा खून होतो. सेम मोडस ऑपरेंडी . 8. शनिवार दि २८ मार्च, चेंबूर, ७१ वर्षांच्या राहुल सिंह नावाच्या सिख व्यक्तिचा खून होतो. तीच पध्दत. यानंतर एक दिवस कदम KBC बघत असताना अमिताभ बच्चन एका सिनेमाचं गाणं लावून त्याचा पिक्चर ओळखायला सांगतात. ते गाणं असते- “सोमवार को हम मिले मंगलवार को नयन बुध को मेरी निंद खुली जुम्मेरात को चैन अरे शुक्र शनी कटे मुश्किलसे आज है इतवार सात दिनों में हो गया जैसे सात जनम का प्यार” आणि कदमच्या डोक्यात एकदम प्रकाश पडतो… अरे, हे सर्व खून असेच रविवार ते शनिवार एक एका वारी घडलेत! पण शनिवारी दोन खून कसे? याच्या मागे काही खगोलशास्त्र किंवा भविष्याचा तर संबंध नाही? कदमला आठवतं की शेजारी राहणारा डॉ. देसाईला पण भविष्य-खगोलशास्त्राची आवड व माहिती आहे. ( डॅाक्टर कडे सापडलेल्या नायलॅानचे रंगीत दोर व फिनेक कंपनीचा चाकू यामुळे एक संशयित म्हणून कदमने त्याला अटक करून पुछताछ केलेली असते) कदम लगेच डॅाक्टरांकडे जातो. त्यांची माफी मागून त्यांना या प्रश्नांत मदत करायला सांगतो. तो या सर्व खुनांचा सिक्वेन्स सांगतो. ते प्रत्येक वारी का घडले? मग शनिवारी दोन का? यापुढे कोणता वार? कुणाचा खून? डॅाक्टर सांगतात की भारतीय भविष्य व खगोल शास्त्रात नवग्रहांना खूप महत्व आहे. रवि, सोम(चंद्र), मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनि, राहू आणि केतु. यांचे रंग व धान्य वेगवेगळे असतात. त्या त्या ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी ते वापरले जातात. कदम ही माहिती लिहून घेतो. त्यावरून प्रत्येक खुनात वापरण्यात आलेले फिनेक कंपनीचे चाकू, वेगवेगळ्या रंगांचे नायलॅान दोर व तोंडातील पदार्थ यांचा संबंध जोडून एक तख्ता तयार करतोः- “रवि मेहरा-रविवार-सोनेरी दोर- तोंडात गहू-दिशा पूर्व सुचंद्रा-सोमवार-चंदेरी दोर-तोंडात तांदूळ-दिशा पश्चिम मंगला शाह-मंगळवार-लाल दोर-तोंडात तूर डाळ- दिशा दक्षिण लक्ष्मी बुधीराजा-बुधवार-हिरवा दोर-तोंडात हिरवे मूग-दिशा उत्तर गुरुराज अदवानी-गुरूवार-पिवळा दोर-तोंडात हरबरा डाळ-दिशा उत्तर पूर्व(ईशान्य) दिव्या शुक्रपाणी-शुक्रवार-पांढरा दोर-राजमा-दिशा दक्षिण पूर्व शनिया डिसौजा-शनिवार-काळा दोर-तोंडात काळे तिळ-दिशा उत्तर पश्चिम राहुल सिंग-शनिवार-निळा दोर-तोंडात उडीद दाळ-दिशा दक्षिण पश्चिम” आता उरला एकच ग्रह-केतु. केतुचा वार मंगळवार. ग्रे रंग, चना दाळ, दिशा दक्षिण पश्चिम. “केतु”म्हणजे कदमची मुलगी केतुलचा नंबर लागणार? आज तर मंगळवारच आहे! कदम घाबरून जातो! तो केतुलला फोन करतो पण तो बंद लागतो. ती सध्या कुठे आहे? कोर्टात? कदम आपल्या मुलीला वाचवतो का? खरा खुनी कोण असतो? तो पकडला जातो का? त्याचे यामागचा उद्देश काय असतो? याच्यामध्ये अजून कोण सामिल असतं का? याची उत्तरे मिळण्यासाठी वाचावी लागेल अश्विन सांघी यांची कादंबरी Razor Sharp. ...Read more

BANGARWADI
BANGARWADI by VYANKATESH MADGULKAR Rating Star
Sameer Kazi

सुंदर अशी कादंबरी माणदेशी बनगरवाडी तशी कोरडी रखरखती पण, यातील पात्रात मायेचा करुणेचाओलावा मनात घर करुन जातो