* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: KATHARUPI KHAGOLSHASTRA
  • Availability : Available
  • ISBN : 9788177666205
  • Edition : 4
  • Publishing Year : NOVEMBER 2005
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 128
  • Language : MARATHI
  • Category : SCIENCE
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
FROM ANCIENT TIMES, THE GLITTERING STARS IN THE HEAVENS HAVE INTRIGUED MAN. AFTER YEARS OF OBSERVATION AND STUDY, HE HAS TRIED TO RELATE THEIR SHAPES TO DIFFERENT ANIMALS AND OBJECTS AND NAME THEM ACCORDINGLY. THE ADVANCED STUDIES IN SCIENCE AND TECHNOLOGY HAVE SINCE IMPROVED OUR UNDERSTANDING OF THESE HEAVENLY BODIES. THE BOOK DESCRIBES DIFFERENT TYPES OF STARS AND VARIABLE STARS, NOVAE, SUPERNOVAE, NEBULAE, ETC. IT EXPLAINS THE PRECESSION OF EARTH IN DETAIL. SUN AND MOON TRY TO MAINTAIN THE EARTH UPRIGHT WITH THEIR GRAVITATIONAL PULL ON ITS SMALL EQUATORIAL BULGE. THE PULL GIVES EARTH`S AXIS A WOBBLE CALLED PRECESSION (PARANCHAN GATI IN SANSKRIT.) BECAUSE OF EARTH`S PRECESSION, OUR SO CALLED STATIONARY POLE STAR WILL NO MORE BE OUR POLE STAR AFTER A FEW THOUSAND YEARS. WHEN THE EGYPTIAN PYRAMIDS WERE BEING BUILT, THE STAR THUBAN FROM THE CONSTELLATION DRACO WAS OUR POLE STAR. THE STAR VEGA FROM THE CONSTELLATION LYRA NEAR SYGNUS WILL BE OUR FUTURE POLE STAR. MOST OF THE WESTERN BOOKS WRITTEN SO FAR ON ASTRONOMY REFER TO STORIES FROM THE GREEK, ROMAN, EGYPTIAN, KHALIDIAN AND ARABIC MYTHOLOGIES. HOWEVER, WHAT SETS THIS BOOK APART IS THE INNUMERABLE CITATIONS IT CONTAINS FROM THE HINDU MYTHOLOGY. THE AUTHOR HAS TRIED TO EXPLAIN DIFFERENT CONSTELLATIONS AND THEIR NAMES THROUGH MYTHOLOGICAL STORIES FROM DIFFERENT CIVILIZATIONS. ALSO, THE UNIQUE CONVERSATIONAL STYLE OF THE BOOK SHOULD KEEP THE READER ENGAGED THROUGHOUT.
खगोलशास्त्रासारख्या चित्तवेधक आणि मनोरंजक विषयाची मुलांना ओळख व्हावी तसेच या विषयात त्यांना आवड उत्पन्न व्हावी या उद्देशाने हे पुस्तक लिहिले आहे. कुठलेही शास्त्र कथारूपात सांगितले तर ते समजायला अधिक सोपे जाते. नकळत त्यातून त्या विषयात रुची निर्माण होते.
राजा केळकर राज्य पुरस्कार २००६
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #KATHARUPIKHAGOLSHASTRA #KATHARUPI KHAGOLSHASTRA #कथारूपीखगोलशास्त्र #SCIENCE 3MARATHI #LEENADAMALE #लीनादामले "
Customer Reviews
  • Rating StarMAHARASHTRA TIMES 22-05-2006

    वेध गच्चीवरच्या आकाशाचा… भारताने अवकाश युगात प्रवेश केल्याला बराच काळ लागला असला तरी त्याला आत्ता कुठे जागतिक मान्यता मिळू लागली आहे. २००८च्या भारतीय चांद्रयान मोहिमेत खुद्द अमेरिकेने सामील होऊन भारताच्या अवकाश तंत्रज्ञानाला सलामी दिली आहे. या पारश्वभूमीवर समाजात निव्वळ विज्ञाननिष्ठा रुजणंच आवश्यक नाही तर विज्ञानाच्या विविध अंगाउपांगाविषयी औत्स्युक्य निर्माण होणंही आवश्यक आहे. यासाठी शाळांतून प्राथामिक शिक्षणाची पातळीवरून जसे प्रयत्न होण्याची आवश्यकता आहे तशीच प्रसार माध्यमं, ग्रंथमाध्यम यातूनही प्रसार होण्याची आवश्यकता आहे. भारतातल्या ग्रंथनिर्मितीत विज्ञानविषयक ग्रंथांना महत्त्वाचं स्थान आहे. मराठीतही असे प्रयत्न जाणीवपूर्वक होताना दिसतात. विज्ञानकथा, विज्ञानाच्या विविध शाखांची ढोबळ आणि विस्तृत चर्चा करणारी, माहिती देणारी पुस्तकं मराठीत नित्यनेमाने प्रसिद्ध होत असतात आणि ती खपतही असतात. विज्ञान शाखांतही खगोलशास्त्राचं मराठी वाचकांना विशेष आकर्षण वाटतं. हा विषय मराठीजनांमध्ये लोकप्रिय करण्याचं श्रेय जयंत नारळीकरांना द्यावं लागेल. त्यांनी ललित लिखाणातून हा विषय मराठी लोकांपर्यंत पोहोचवल्यानंतर त्याची शास्त्रीय माहिती देण्याचं काम या क्षेत्रातल्या अन्य जाणकरांनी व तज्ज्ञांनी घेतली आहे. अलिकडेच प्रसिद्ध झालेली खगोलशास्त्रविषयक तीन पुस्तकं ही जबाबदारी योग्य रितीने पार पाडतात. ‘तारकांच्या विश्वात’ (पराग अळवणी), ‘अंतरिक्षाचा वेध’ (सुधा रिसबुड) आणि ‘कथारुपी खगोलशास्त्र’ (लीना दामले) ही ती तीन पुस्तकं आहेत. शालेय आणि महाविद्यालयीन पातळीवरच्या विद्यार्थ्याना खगोलशास्त्राविषयी जे कुतूहल वाटतं किंवा त्याबाबत त्यांना जे प्रश्न पडतात, शंका असतात त्यांचं समाधान करण्यास ही पुस्तकं समर्थ आहेत. ‘तारकांच्या विश्वात’ हे पुस्तक रात्री अंगणात झोपल्यावर दिसणाऱ्या चमचमणाऱ्या आकाशाविषयी मनात निर्माण होणाऱ्या हजोर प्रश्नांना उत्तरं देण्याचा प्रयत्न करतं. आकाशाचं निरीक्षण कसं करावं, कुठल्या दिशेला कुठला तारा, ग्रह केव्हा असतो, तो कसा ओळखावा, ताऱ्यांचे प्रकार किती, त्यांचं वर्गिकरण, नाव आदी विस्तृत माहिती नकाशा व चित्रासह या पुस्तकात देण्यात आली आहे. पुस्तकात प्रत्येक ताराकापुंजाचा पानभर आकाराचा नकाशा, त्यांची माहिती त्याच्याविषयी कथा आदी सर्व माहिती देण्यात आली आहे. ज्यांना आकाश निरीक्षणाची हौस आहे त्याच्या हाती कायम असावं असं हे पुस्तक आहे. एकदा ग्रह-ताऱ्यांची ओळख पटली की मन त्यांच्याजवळच थांबत नाही. त्यांच्या पलिकडेही या अवकाशात काय आहे, याचा शोध ते घेऊ लागतं. या विशाल अवकाशाची व्याप्ती किती, त्याच्या पोकळीत ग्रह-ताऱ्यांखेरीज आणखी काय दडलं आहे, आणखी सौरमाला आहेत का, अन्य ग्रहांवर जीवसृष्टी आहे का, आपल्या सौरमालेतले ग्रह कसे आहेत, डोळ्यासमोर दिसणाऱ्या ताऱ्याचा प्रकाश किती अब्ज वर्षांपूर्वी निघाला आहे. उल्का, युफो हे काय आहेत. गॅलॅक्सी म्हणजे काय, धूमकेतूचं रहस्य काय, ब्लॅक होल म्हणजे काय, या विश्वाची रचना कशी झाली आहे असे ग्रह-तारकांसारखे असंख्य प्रश्न आपल्याला पडतात. या प्रश्नांची उत्तर ‘अंतरिक्षाचा वेध’ या पुस्तकातून बऱ्याच प्रमाणात मिळतात. सुधा रिसबूड यांनी गोष्टीवेल्हाळपणे ही सर्व माहिती दिली आहे. हि दोन्ही पुस्तकं काहींना शास्त्रीय किंवा जड वाटत असतील तर हाच विषय अधिक सोप्या आणि पटकन समजेल अशा भाषेत म्हणजे गोष्टीरुपाने लीना दामले यांनी ‘कथारूपी खगोलशास्त्र’ या पुस्तकात मांडला आहे. आकाशातली नक्षत्रं, राशी, तारकासमूह, यांच्याबद्दलची माहिती लेखिकेने कथा व संवादाच्या माध्यमातून सांगितली आहे. त्यामुळे हे पुस्तक बोजड वाटत नाही. विशेषत: शाळकरी मुलांना ते वाचायला आवडेल व या विषयाची त्यांच्यात रुचीही निर्माण करेल. या पुस्तकातही नकाशे व चित्रं दिली असल्यामुळे विषय समजायला मदत होते. या उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलींनी ही तिन्ही पुस्तकं वाचली तर त्यांचा वेळ मजेत जाईलच पण खगोलशास्त्राविषयीचं त्यांचं कुतूहलही वाढेल आणि अधिक माहिती मिळवायची ओढ लागेल. मेहता पब्लिशिंग हाऊसने या तिन्ही पुस्तकांची निर्मिती अत्यंत उत्कष्टपणे केली आहे. -दिवाकर देशपांडे ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more