* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: KATHARUPI KHAGOLSHASTRA
  • Availability : Available
  • ISBN : 9788177666205
  • Edition : 4
  • Publishing Year : NOVEMBER 2005
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 128
  • Language : MARATHI
  • Category : SCIENCE
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
FROM ANCIENT TIMES, THE GLITTERING STARS IN THE HEAVENS HAVE INTRIGUED MAN. AFTER YEARS OF OBSERVATION AND STUDY, HE HAS TRIED TO RELATE THEIR SHAPES TO DIFFERENT ANIMALS AND OBJECTS AND NAME THEM ACCORDINGLY. THE ADVANCED STUDIES IN SCIENCE AND TECHNOLOGY HAVE SINCE IMPROVED OUR UNDERSTANDING OF THESE HEAVENLY BODIES. THE BOOK DESCRIBES DIFFERENT TYPES OF STARS AND VARIABLE STARS, NOVAE, SUPERNOVAE, NEBULAE, ETC. IT EXPLAINS THE PRECESSION OF EARTH IN DETAIL. SUN AND MOON TRY TO MAINTAIN THE EARTH UPRIGHT WITH THEIR GRAVITATIONAL PULL ON ITS SMALL EQUATORIAL BULGE. THE PULL GIVES EARTH`S AXIS A WOBBLE CALLED PRECESSION (PARANCHAN GATI IN SANSKRIT.) BECAUSE OF EARTH`S PRECESSION, OUR SO CALLED STATIONARY POLE STAR WILL NO MORE BE OUR POLE STAR AFTER A FEW THOUSAND YEARS. WHEN THE EGYPTIAN PYRAMIDS WERE BEING BUILT, THE STAR THUBAN FROM THE CONSTELLATION DRACO WAS OUR POLE STAR. THE STAR VEGA FROM THE CONSTELLATION LYRA NEAR SYGNUS WILL BE OUR FUTURE POLE STAR. MOST OF THE WESTERN BOOKS WRITTEN SO FAR ON ASTRONOMY REFER TO STORIES FROM THE GREEK, ROMAN, EGYPTIAN, KHALIDIAN AND ARABIC MYTHOLOGIES. HOWEVER, WHAT SETS THIS BOOK APART IS THE INNUMERABLE CITATIONS IT CONTAINS FROM THE HINDU MYTHOLOGY. THE AUTHOR HAS TRIED TO EXPLAIN DIFFERENT CONSTELLATIONS AND THEIR NAMES THROUGH MYTHOLOGICAL STORIES FROM DIFFERENT CIVILIZATIONS. ALSO, THE UNIQUE CONVERSATIONAL STYLE OF THE BOOK SHOULD KEEP THE READER ENGAGED THROUGHOUT.
खगोलशास्त्रासारख्या चित्तवेधक आणि मनोरंजक विषयाची मुलांना ओळख व्हावी तसेच या विषयात त्यांना आवड उत्पन्न व्हावी या उद्देशाने हे पुस्तक लिहिले आहे. कुठलेही शास्त्र कथारूपात सांगितले तर ते समजायला अधिक सोपे जाते. नकळत त्यातून त्या विषयात रुची निर्माण होते.
राजा केळकर राज्य पुरस्कार २००६
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #KATHARUPIKHAGOLSHASTRA #KATHARUPI KHAGOLSHASTRA #कथारूपीखगोलशास्त्र #SCIENCE 3MARATHI #LEENADAMALE #लीनादामले "
Customer Reviews
  • Rating StarMAHARASHTRA TIMES 22-05-2006

    वेध गच्चीवरच्या आकाशाचा… भारताने अवकाश युगात प्रवेश केल्याला बराच काळ लागला असला तरी त्याला आत्ता कुठे जागतिक मान्यता मिळू लागली आहे. २००८च्या भारतीय चांद्रयान मोहिमेत खुद्द अमेरिकेने सामील होऊन भारताच्या अवकाश तंत्रज्ञानाला सलामी दिली आहे. या पारश्वभूमीवर समाजात निव्वळ विज्ञाननिष्ठा रुजणंच आवश्यक नाही तर विज्ञानाच्या विविध अंगाउपांगाविषयी औत्स्युक्य निर्माण होणंही आवश्यक आहे. यासाठी शाळांतून प्राथामिक शिक्षणाची पातळीवरून जसे प्रयत्न होण्याची आवश्यकता आहे तशीच प्रसार माध्यमं, ग्रंथमाध्यम यातूनही प्रसार होण्याची आवश्यकता आहे. भारतातल्या ग्रंथनिर्मितीत विज्ञानविषयक ग्रंथांना महत्त्वाचं स्थान आहे. मराठीतही असे प्रयत्न जाणीवपूर्वक होताना दिसतात. विज्ञानकथा, विज्ञानाच्या विविध शाखांची ढोबळ आणि विस्तृत चर्चा करणारी, माहिती देणारी पुस्तकं मराठीत नित्यनेमाने प्रसिद्ध होत असतात आणि ती खपतही असतात. विज्ञान शाखांतही खगोलशास्त्राचं मराठी वाचकांना विशेष आकर्षण वाटतं. हा विषय मराठीजनांमध्ये लोकप्रिय करण्याचं श्रेय जयंत नारळीकरांना द्यावं लागेल. त्यांनी ललित लिखाणातून हा विषय मराठी लोकांपर्यंत पोहोचवल्यानंतर त्याची शास्त्रीय माहिती देण्याचं काम या क्षेत्रातल्या अन्य जाणकरांनी व तज्ज्ञांनी घेतली आहे. अलिकडेच प्रसिद्ध झालेली खगोलशास्त्रविषयक तीन पुस्तकं ही जबाबदारी योग्य रितीने पार पाडतात. ‘तारकांच्या विश्वात’ (पराग अळवणी), ‘अंतरिक्षाचा वेध’ (सुधा रिसबुड) आणि ‘कथारुपी खगोलशास्त्र’ (लीना दामले) ही ती तीन पुस्तकं आहेत. शालेय आणि महाविद्यालयीन पातळीवरच्या विद्यार्थ्याना खगोलशास्त्राविषयी जे कुतूहल वाटतं किंवा त्याबाबत त्यांना जे प्रश्न पडतात, शंका असतात त्यांचं समाधान करण्यास ही पुस्तकं समर्थ आहेत. ‘तारकांच्या विश्वात’ हे पुस्तक रात्री अंगणात झोपल्यावर दिसणाऱ्या चमचमणाऱ्या आकाशाविषयी मनात निर्माण होणाऱ्या हजोर प्रश्नांना उत्तरं देण्याचा प्रयत्न करतं. आकाशाचं निरीक्षण कसं करावं, कुठल्या दिशेला कुठला तारा, ग्रह केव्हा असतो, तो कसा ओळखावा, ताऱ्यांचे प्रकार किती, त्यांचं वर्गिकरण, नाव आदी विस्तृत माहिती नकाशा व चित्रासह या पुस्तकात देण्यात आली आहे. पुस्तकात प्रत्येक ताराकापुंजाचा पानभर आकाराचा नकाशा, त्यांची माहिती त्याच्याविषयी कथा आदी सर्व माहिती देण्यात आली आहे. ज्यांना आकाश निरीक्षणाची हौस आहे त्याच्या हाती कायम असावं असं हे पुस्तक आहे. एकदा ग्रह-ताऱ्यांची ओळख पटली की मन त्यांच्याजवळच थांबत नाही. त्यांच्या पलिकडेही या अवकाशात काय आहे, याचा शोध ते घेऊ लागतं. या विशाल अवकाशाची व्याप्ती किती, त्याच्या पोकळीत ग्रह-ताऱ्यांखेरीज आणखी काय दडलं आहे, आणखी सौरमाला आहेत का, अन्य ग्रहांवर जीवसृष्टी आहे का, आपल्या सौरमालेतले ग्रह कसे आहेत, डोळ्यासमोर दिसणाऱ्या ताऱ्याचा प्रकाश किती अब्ज वर्षांपूर्वी निघाला आहे. उल्का, युफो हे काय आहेत. गॅलॅक्सी म्हणजे काय, धूमकेतूचं रहस्य काय, ब्लॅक होल म्हणजे काय, या विश्वाची रचना कशी झाली आहे असे ग्रह-तारकांसारखे असंख्य प्रश्न आपल्याला पडतात. या प्रश्नांची उत्तर ‘अंतरिक्षाचा वेध’ या पुस्तकातून बऱ्याच प्रमाणात मिळतात. सुधा रिसबूड यांनी गोष्टीवेल्हाळपणे ही सर्व माहिती दिली आहे. हि दोन्ही पुस्तकं काहींना शास्त्रीय किंवा जड वाटत असतील तर हाच विषय अधिक सोप्या आणि पटकन समजेल अशा भाषेत म्हणजे गोष्टीरुपाने लीना दामले यांनी ‘कथारूपी खगोलशास्त्र’ या पुस्तकात मांडला आहे. आकाशातली नक्षत्रं, राशी, तारकासमूह, यांच्याबद्दलची माहिती लेखिकेने कथा व संवादाच्या माध्यमातून सांगितली आहे. त्यामुळे हे पुस्तक बोजड वाटत नाही. विशेषत: शाळकरी मुलांना ते वाचायला आवडेल व या विषयाची त्यांच्यात रुचीही निर्माण करेल. या पुस्तकातही नकाशे व चित्रं दिली असल्यामुळे विषय समजायला मदत होते. या उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलींनी ही तिन्ही पुस्तकं वाचली तर त्यांचा वेळ मजेत जाईलच पण खगोलशास्त्राविषयीचं त्यांचं कुतूहलही वाढेल आणि अधिक माहिती मिळवायची ओढ लागेल. मेहता पब्लिशिंग हाऊसने या तिन्ही पुस्तकांची निर्मिती अत्यंत उत्कष्टपणे केली आहे. -दिवाकर देशपांडे ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more