* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788177662894
  • Edition : 5
  • Publishing Year : MARCH 2001
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 236
  • Language : MARATHI
  • Category : SCIENCE
  • Available in Combos :NIRANJAN GHATE COMBO SET - 17 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
TODAY WE SEE COMPETITION IN EACH AND EVERY FIELD OF LIFE. IF YOU WANT TO SUSTAIN IN THIS WORLD THEN YOU NEED TO HAVE KNOWLEDGE ABOUT EACH AND EVERYTHING. IN TODAY`S WORLD GENERAL KNOWLEDGE IS BECOME THE KEY WORLD, THE VARIOUS COMPETITIVE EXAMS, THE VARIOUS QUIZ PROGRAMMES ORGANISED ON THE T.V. ARE ALSO RESPONSIBLE TO THIS. GENERAL KNOWLEDGE IS NOT SOMETHING THAT WE CAN LEARN BY HEART IN A DAY OR TWO. ESPECIALLY, WHEN YOU WANT TO LEARN SOMETHING THAT IS RELATED TO SCIENCE AND IF YOU ACQUIRE KNOWLEDGE OF OTHER THINGS RELATED TO THE TOPIC THAT YOU ARE INTERESTED IN, THEN IT BECOMES EASIER TO LEARN AND REMEMBER THE MAIN INFORMATION. WE USE MANY THINGS, WE COME ACROSS MANY THINGS, WE MAKE USE OF THE VARIOUS PROPERTIES OF SUBSTANCES, BUT HOW MANY OF US CAN ANSWER QUESTIONS RELATED TO THESE PROPERTIES? DO YOU KNOW HOW THE HOTNESS OF CHILLY IS COUNTED? THOSE WHO USE CHILLY POWDER WON`T BE ABLE TO ANSWER THIS QUESTION, BUT IF YOU HAVE READ THIS BOOK THEN YOU SURELY WILL BE ABLE TO ANSWER THIS.THIS BOOK IS A COLLECTION OF MANY STRANGE, PECULIAR, QUEER THINGS. IT CONSISTS OF SCIENTIFIC INFORMATION AND ANSWERS TO MANY QUESTIONS RELATED TO GEOGRAPHY.
सध्याच्या स्पर्धात्मक जगात चौफेर ज्ञानास खूप महत्त्व प्राप्त झालं आहे. स्पर्धापरीक्षा, दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील प्रश्नोत्तराचे कार्यक्रम यांमुळं सामान्यज्ञान हा परवलीचा शब्द बनला आहे. जनरल नॉलेज हे काही एका दिवसात पाठ करून प्राप्त होणारं ज्ञान नव्हे. विशेषत: वैज्ञानिक माहिती मिळवताना अगदी एकाच प्रश्नाचं उत्तर माहिती करून घेताना आजूबाजूचे संदर्भ माहिती झाले, तर उत्तर लक्षात ठेवणं सोपं जातं. तिखटाचा तिखटपणा मोजण्याचं परिमाण कोणतं? या प्रश्नाचं उत्तर तिखट खाणाऱ्यांना देता येणार नाही; पण हे पुस्तक वाचणारा ते उत्तर नक्कीच देऊ शकेल. हे पुस्तक म्हणजे अशा बयाच चित्रविचित्र वैज्ञानिक माहितीचे आणि भौगोलिक प्रश्नांच्या उत्तरांचे भांडार असल्याने ते घरोघरी नक्कीच उपयुक्त ठरेल.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAMANA 10-06

    असंख्य ज्ञानक्षेत्रांची ओळख करून देणारे पुस्तक... कौन बनेगा करोडपतीमुळे सध्या सामान्य ज्ञान किंवा आपल्या नेहमीच्या सोप्या मराठीत जनरल नॉलेजला एकदम बरकतीचे दिवस आले आहेत. करोडपतीच्या चालीवर इतर नटांचेही तसेच कार्यक्रम चालू झाले आहेत. हे सगळे कार्यक्र न चुकता पाहून आणि विविध नियतकालीकांनी तत्परतेने सुरू केलेले जनरल नॉलेजचे स्तंभ वाचून करोडपती बनण्याची स्वप्ने बघणारे लोक घरोघर आहेत. या असल्या जनरल नॉलेजमधून कदाचित माहिती वाढत असेल, पण ज्ञान वाढत नाही. ‘यू.एफ.ओ. म्हणजे काय,’ या प्रश्नाच्या उत्तरातून अनआयडेंटिफाईड फ्लार्इंग आब्जेक्ट हे त्या शब्दाचं दीर्घरूप म्हणजेच उडत्या तबकड्या एवढीच माहिती मिळेल; पण उडत्या तबकड्या ही काय भानगड आहे, हे अजिबात कळणार नाही. आणि प्रश्नोत्तरांच्या असल्या ठरीव कार्यक्रमांमध्ये बसूदेखील शकणार नाही असं ज्ञानाचं क्षेत्र तर अफाट आहे. उदाहरणार्थ, माणसांच्या अंगावर प्राण्यांप्रमाणे केस का नसतात? कुत्री झोपण्यापूर्वी स्वत:भोवती वर्तुळाकार का फिरतात? जाड माणसं अधाशी असतात का? उचकी कशामुळे लागते? पैसा कसा जन्मला? बेडूक फक्त चिखलात राहतात का? या झाल्या आपल्या सभोवतालच्या जगात हरघडी दिसणाऱ्या घटना. शिवाय आज आपल्या नित्य परिचयाच्या झालेल्या, पण दोन-तीनशे वर्षांपूर्वी अस्तित्वातच नसलेल्या वैज्ञानिक शोधांबद्दलचे ज्ञान, ऐतिहासिक काळापासून आजपर्यंत सतत घडत असलेल्या घटनांबद्दलचे ज्ञान, मानवाच्या काही स्वभावैशिष्ट्यांचे ज्ञान, असे ज्ञानाचे क्षेत्र सतत वाढतच जाते. एखाद्या क्षेत्राबद्दलचे ज्ञान आपण मिळवायला लागलो की लक्षात येते, आपले अज्ञानच अफाट आहे. म्हणूनच न्यूटनसारखा महान शास्त्रज्ञही एकदा म्हणाला होता की, मी आजवर मिळवलेले ज्ञान म्हणजे ज्ञानाच्या अफाट पसरलेल्या सागराच्या काठावरचा वाळूचा एक कण आहे. विविध विषयांवर सतत लिखाण करणारे सुप्रसिद्ध स्तंभलेखक निरंजन घाटे यांचे प्रस्तुत ‘जिज्ञासापूर्ती’ हे पुस्तक म्हाजे माणसाला नेहमीच कुतूहल वाटणाऱ्या विविध क्षेत्रांमधल्या नाना प्रकारच्या ज्ञानाचा संग्रह आहे. या पुस्तकात दिलेली माहिती वाचल्यानंतर केवळ प्रश्नोत्तरांच्या पोपटपंचीपेक्षा बराच जास्त, बराच सखोल असा ज्ञानाचा खजिना वाचकाला मिळतो. अर्थात या सखोलतेला मर्यादा आहेच. लेखक सर्वसामान्य वाचकासाठी लिहितो आहे. त्यामुळे त्या वाचकाला पचेल, रुचेल, ज्ञानाबरोबरच त्याचं मनोरंजनही होईल, त्या त्या विषयातले वाचकांचे कुतुहल वाढून त्या विषयावरचं आणखी मोठे आणि तपशीलवार पुस्तक वाचण्याची इच्छा वाचकाच्या ठायी निर्माण होईल, अशा रोखाने हे लेखन केलेले आहे. दाढीचा इतिहास, वस्तऱ्यांचा इतिहास, कोलंबसाने अमेरिकेचा शोध लावला, इजिप्तची प्रसिद्ध राणी क्लिओपात्रा, येशू खिस्त खरोखरच खिसमसच्या दिवशी जन्मला का? असे ऐतिहासिक विषय यात आहेत. पृथ्वीचे दिवसेंदिवस तापत जाणारे वातावरण, पृथ्वीवर येणारे हिमयुग, प्लास्टिकचे प्रदूषण, ट्रान्झिस्टर, मंगळावरची सजीव सृष्टी, चंद्रावरचे पाणी, विश्वाचे वय असे वैज्ञानिक विषय आहेत. माणसाच्या अंगावर केस नसणे, माणसाच्या अंगावर रोमांच उभे राहणे, माणसाला टक्कल पडणे, माणसाला गुलाबाचे फूल सर्वाधिक आवडणे असे मानवी वर्तनाशी संबंधित विषय आहेत. आपले हे विश्व : म्हणजे कल्पनातीत चित्रविचित्र वस्तूंचा एक अफलातून अजबखाना आहे ही गोष्ट जिज्ञासापूर्तीमधल्या तऱ्हेतऱ्हेच्या विचित्र गोष्टी वाचल्यावर अधिकच पटू लागते. अशा विचित्र गोष्टी आणखी माहिती करून घ्याव्यात आणि आपले सामान्य ज्ञान अद्ययावत करावे अशी जिज्ञासा वाचकांच्या मनात निर्माण होते. आपल्याकडची शिक्षणपद्धती ही पोटार्थी माणसे निर्माण करते. आपल्याला विविध प्रकारचे, विविध क्षेत्रांचे ज्ञान मिळावे ही माणसाची नैसर्गिक इच्छा या शिक्षण पद्धतीत मारून टाकली जाते. या शिक्षणपद्धतीचा कर्ता लॉर्ड मेकॉले याचे तेच उद्दिष्ट होते. म्हणून तर स्वातंत्र्य मिळून पन्नास वर्षे झाल्यानंतरही आमच्या समाजात ज्ञानवंतांपेक्षा पोटभरून लोकच जास्त आहेत. युरोप आणि अमेरिका आमच्यापेक्षा प्रगत आहेत याच्या अनेक कारणांपैकी एक महत्त्वाचे कारण म्हणजे तिथल्या समाजाची अफाट ज्ञानपिपासा. तिथल्या शाळा-महाविद्यालयांमधून अक्षरश: असंख्य ज्ञानक्षेत्रांचा सखोल अभ्यास सतत सुरू असतो. त्यांचे वैज्ञानिक चंद्रावर पाय ठेवतात हे उगीच नाही. आमच्याकडचे हुशार लोक चंद्राची तुलना आपल्या प्रेयसीच्या मुखड्याशी करण्यातच सगळी बुद्धी वाया घालवीत असतात. अशा पोटभरू मानसिकतेतून वाचकाला बाहेर काढून त्याला असंख्य ज्ञानक्षेत्रांची ओळख करून देणारे, त्या ज्ञानक्षेत्रांबद्दलचे कुतूहल त्यांच्या मनात जागवून आपल्याला आवडेल त्या क्षेत्रात आणखी खोल शिरण्याची इच्छा त्याच्या मनात जागवणारे असे हे पुस्तक आहे. मुखपृष्ठ, मांडणी, मुद्रण आदी तांत्रिक बाबी उत्कृष्ट. मेहता पब्लिशिंग हाऊसची आणखी एक उत्तम, दर्जेदार निर्मिती. -मल्हार कृष्ण गोखले ...Read more

  • Rating StarDAINIK KESARI 06-06-2004

    बहुविध विषयांमधील ‘जिज्ञासापूर्ती’... जिज्ञासा हा मनुष्यस्वभावाचा अविभाज्य भाग आहे. प्रत्येकाला सतत काही ना काही प्रश्न पडत असतात. ते विज्ञानाशी संबंधित असतात, इतिहासाशी, भूगोलाशी वा संस्कृतीशी नि प्रश्न पडला की त्याचे उत्तर शोधण्यासाठी तो धडपडतो. अा सर्व जिज्ञासूंसाठी निरंजन घाटे यांनी ‘जिज्ञासूपूर्ती’ नावाचे पुस्तक लिहिले आहे. केवळ प्रश्न नि त्याचे ठोकळेबाज उत्तर असला हा प्रकार नव्हे. तर साठ वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरे देताना त्या विषयाशी निगडीत अन्य माहितीही घाटे देतात. घाटे हे आघाडीचे विज्ञानलेखक असले तरी प्रस्तुत पुस्तकात केवळ विज्ञान विषयकच माहिती आहे असे नव्हे. म्हणजे प्राणवायू कोठून येतो, हे सांगतानाच घाटे दुसऱ्या एखाद्या प्रकरणात ‘दाढी महात्म्य’ ही सांगतात. पृथ्वीच्या वातावरणाच्या वाढत्या तापमानापासून मंगळवार सजीव आहेत की नाही, येथपर्यंत बहुविध विषयांना लेखकाने स्पर्श केला आहे. नोबेल पारितोषिक सर्वांना ठाऊक असते; पण इग्नोबल पारितोषिकाविषयी या पुस्तकात वाचायला मिळेल. इव्हच्या ‘सफरचंदा’च्या गोष्टीतील. अन्वयार्थ ते उलगडून दाखवितात. येशू खिस्ताचा जन्म २५ डिसेंबर नव्हे, तर जुलै किंवा ऑक्टोंबरमध्ये झाला असावा, असा अभ्यासकांचा कयास आहे, त्याविषयी ते लिहितात (पृ. ७९) तेथेच ट्रान्झिस्टरने जग बदलल्याचे दाखलेही देतात. (पृ. १११) विषयांमधील वैविध्यतेमुळे प्रत्येकाला त्यात आपल्याला हवे ते काही ना काही अवश्य मिळेल. जिज्ञासूंना आपली जिज्ञासापूर्ती झाल्याचा अनुभव येईल. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more