संतोष रंगापुरेडॉ. एस. एल. भैरप्पा यांचे *आवरण* पुन्हा एकदा शांतपणे आणि विस्ताराने वाचून काढले आणि पुन्हा एकदा तोच अत्यवस्थ करणारा अनुभव आला, डोके सुन्न झाले. आपला धर्म, आपली संस्कृती विसरल्यास त्याचे किती गंभीर परिणाम होतात याचे भयचकित करणारे वर्णन भैरप्पा यांनी केले आहे. *आवरण* साठी भैरप्पा यांनी जवळ जवळ 200 ऐतिहासिक आणि दुर्मिळ अशा ग्रंथांचा संदर्भ घेतला आहे, 200 ग्रंथांचा अभ्यास करून सत्याचे अतिशय अभ्यासपूर्ण विवेचन करणे ही खरोखरच सोपी गोष्ट नाही. भैरप्पा यांच्या सारखे अभ्यासू लेखक आज समाजात आहेत आणि आपल्या धर्माचा, आपल्या अभिमानास्पद संस्कृतीचा परिचय त्यांच्या अफाट लेखणीतून आपल्याला करून देत आहेत याचा खरंच खूप अभिमान वाटतो,भैरप्पा यांचे प्रत्येक पुस्तक वाचून काढण्याचे ठरवलेच आहे.
अनेक वेगवेगळ्या इस्लामी राजवटींनी हिंदू संस्कृती, हिंदू मंदिरं विनाश करून संपूर्णपणे नष्ट करण्याचा पराकोटीचा प्रयत्न केला आणि तथाकथित पुरोगाम्यांनी याच टीपूला, बाबर ला, औरंगजेब ला भव्य दिव्य दाखवण्याचा सततचा खोटा इतिहास लिहून प्रयत्न केला आहे. राजकारण्यांनी पण त्यांचीच तळी उचलली कारण त्यांच्या अल्पसंख्य votebank ची त्यांना नेहमीच काळजी वाटत आली आहे. हिंदू votebank ची काळजी करण्याची त्यांना कधीच आवश्यकता वाटली नाही कारण त्यांनी हिंदूना आधीच जातीपातीत विभागून टाकले आहे. त्यामुळे अशा वातावरणात खोट्या इतिहासा बद्दल, इस्लामी उदात्तीकरणा बद्दल इतक्या परखडपणे लिहायला धैर्य लागते आणि भैरप्पांनी ते उदाहरणां सहीत, इतिहासातील अनेक सत्य दाखल्यांसहीत दाखवून दिले आहे.
*आवरण* सुरू होते ते लक्ष्मीच्या कहाणी पासून, बंगलोर पासून जवळच असलेल्या गावातून आलेली मुलगी पुण्यात फिल्म इन्स्टिटय़ूट मध्ये शिकता शिकता अमीर नावाच्या मुस्लीम मुलाच्या प्रेमात पडते आणि पुढे जाऊन इस्लाम स्वीकारून *रझिया* बनते. आधुनिक विचारसरणी आणि चित्रपट क्षेत्रात असल्याने पुढे जाऊन अमीरचे इस्लामिक चालीरीतींना अनुसरून वागणे आणि पुढे जाऊन एकूणच इस्लाम धर्मातील अनेक गोष्टींचा फोलपणा तिला लक्षात येतो. तिचे आप्पा हिंदू धर्माचे अभ्यासक असतात आणि त्यांच्या मृत्यूनंतर लक्ष्मी गावी येते आणि आप्पांची ग्रंथसंपदा चाळत असताना अप्पांचा प्रचंड अभ्यास त्यांची टिपणं पाहून लक्ष्मी स्तब्ध होऊन जाते. इस्लामिक अत्याचारांची मालिका मग ती बाबरी मस्जिद असो, औरंगजेबने काशी विश्वेश्वराचा विध्वंस करून उभी केलेली ज्ञानव्यापी मस्जिद असो किंवा टिपूने हिंदू रयतेवर केलेले अनन्वित अत्याचार असोत या सर्वच गोष्टींनी लक्ष्मी अस्वस्थ होते याच अनुषंगाने खरा इतिहास उजागर करण्यासाठी एक कादंबरी लिहिते, परंतु अशा स्फोटक सत्य लिखाणाला ना साहित्य वर्तुळातून, ना मीडिया कडून कुठूनच तिला सपोर्ट मिळत नाही, उलट अल्पसंख्य votebank दुखावण्याचा प्रयत्न केल्याने तिला अटक करण्याचा प्रयत्न होतो आणि हर प्रकारे त्रास दिला जातो हा संपूर्ण कथाक्रम वाचणे खूपच वेदनादायी आहे.
विस्मरणाने सत्य झाकोळून टाकणार्या मायेला *आवरण* म्हणतात आणि असत्य बिंबवणाऱ्या कार्याला विक्षेप म्हणतात. इतिहास आपल्याला अनेक गोष्टी शिकवतो, अनेक संदर्भ दाखवतो पण विदृप इतिहासाची पुनरावृत्ती होऊन द्यायची नसेल तर आपला वर्तमान नक्कीच बदलला पाहिजे, इतिहासातील चुका सुधारल्या पाहिजेत तरच त्या इतिहासाचा काहीतरी उपयोग आहे.
*आवरण* च्या पार्श्वभुमीवर आज काशी विश्वेश्वराचा जीर्णोद्धार बनारस ला गेलो असताना स्वतः डोळ्याने पाहिला त्यामुळे पुस्तक वाचताना खूप भरून येत होते जे इतक्या शेकडो वर्षात होऊ शकले नाही ते आपल्या डोळ्यांसमोर घडताना पाहून ऊर भरून येतो, आता पुढे राममंदिराची घटना देखील तितकीच ऐतिहासिक महत्त्व असलेली आणि सुखावणारी असेल.
प्रत्येकाने आवर्जून वाचावे असे *आवरण*, स्वतःला आतून बदलून टाकणारे *आवरण* नक्की वाचा 🙏🏻🙏🏻🙏🏻
संतोष रंगापुरे.
Abhinav Muleyबस एकदा नक्कीच वाचावी अशी कादंबरी
आपण अभ्यासक्रमात काय इतिहास शिकतो आणि आपल्याला काय शिकवलं बिंबवलं जात हे विचार करायला लावणारी , आदर्श सामाजिक मूल्य शिकवताना सत्यसत्याचा विवेक सदैव अवरणाखाली राहतो की काय असा प्रश्न स्वतःला विचारायला लावणारी कादंबरी
लेखकाची लेखन शैली आणि अभ्यास आपल्याला वाचताना हरवून टाकते
Nishigandha Joshi#bookrelatednishi#
आत्ताच "आवरण" ही डॉ. एस. एल्. भैरप्पा लिखित आणि उमा कुलकर्णी यांनी अनुवादित केलेली कादंबरी संपवली. वाचून सुन्न होणे म्हणजे काय याचा प्रत्यय आला.
कादंबरीची नायिका "लक्ष्मी" उर्फ रझिया, तिचा नवरा "आमिर", लक्ष्मीचे वडील "अप्पाजी", त्यांचे मित्र शेषराय शास्त्री आणि त्यांचा मुलगा प्रोफेसर शास्त्री ही कादंबरीतील प्रमुख पात्रे. कादंबरीचा काळ १९९० नंतरचा आणि त्यासाठी
अभ्यासलेल्या ग्रंथांचा काळ साधारण सोळाव्या शतकपासून चा.
लक्ष्मीचे धर्म बदलून रझिया होणे आणि आंतरधर्मीय विवाह करणे या संदर्भातून कादंबरीची सुरुवात होते. सत्य इतिहासाचा अभ्यास करत जातानाच राजकारणासाठी तो लपवून खोटा इतिहास लादला जातोय हे सत्य तिच्या तकलादू सुधारणावादी विचारांना हलवून सोडते. जसजशी अभ्यासात खोल बुडत जाते तसतसे तिला आणखीन जोराचे धक्के बसत जातात.
बाबरी मशीद पाडली त्याच्या भोवतालचा काळ आणि मुघल सम्राट औरंगजेब याचा काळ यांची संदर्भासाठी केलेली एकत्र गुंफण कादंबरीची परिणामकारकता वाढवते.
संपूर्ण हिंदुस्थानचा समृद्ध धार्मिक, सांस्कृतिक वारसा, ज्ञानकेंद्रे आणि त्याचा सोळाव्या शतकापासून बाहेरील आक्रमकांकडून झालेला विध्वंस हा कादंबरीचा मुख्य गाभा आहे.
अल्पसंख्यांक असलेल्या धर्माच्या मागासलेल्या रुढी, परंपरा, दुराभिमान, अशिक्षित मनोवृत्ती आणि जीवनपद्धती, असहिष्णुता यावर नायिकेच्या तर्फे लेखक प्रहार करतात. तत्कालीन राजकारण, समृद्ध आणि सहिष्णु परंपरेचा स्वार्थासाठी इतिहास बदलण्याचा समकालीन पुरोगामी आणि बुद्धिवादी लोकांचा अट्टाहास, त्यासाठी झालेली एकजूट, वाचकांना चीड आणल्याशिवाय रहात नाही.
वर्षानुवर्षे चांगले दडपण्यासाठी चाललेले, जनकल्याणाचे सोनेरी आवरण घातलेले कपटी कारस्थान वाचकांसमोर उघड होते. बुद्धिवादी, सेक्युलर म्हणवणाऱ्या लोकांचा मुखवटा टराटरा फाडते.
कादंबरी पूर्णतः सत्य संदर्भावर आधारलेली आहे. संदर्भ ग्रंथांची यादी कादंबरीत लेखकाने समाविष्ट केली आहे त्यामुळे कादंबरीला वास्तवाचा भक्कम आधार आहे.
थक्क करणारा लेखकाचा अभ्यास आणि त्याचबरोबर अपरिमित सांस्कृतिक हानी करण्याचे, खरा इतिहास जाणीवपूर्वक दडपण्याचे हे कारस्थान सुज्ञ वाचकाला सुन्न करून टाकते.
लेखकाने खरा सर्वधर्म विचार नायिकेच्या तर्फे मांडला आहे जो सशक्त राष्ट्र उभे करण्यासाठी अत्यंत उपयुक्त शकतो. कादंबरीचा खरा उद्देश हाच आहे असे मला वाटते.
प्रत्येकाने कर्तव्य म्हणून वाचावी अशी अभ्यासपूर्ण कादंबरी.
©️निशिगंधा
13/10/21.
Uday R. Thombareनुकतंच डॉ. एस.एल.भैरप्पा यांचं ` आवरण ` हे पुस्तक अगदी झपाटल्यासारखं वाचून काढलं. पुस्तकाच्या विषयाबद्दल काहीच कल्पना नव्हती. सुरुवात आणि शेवट यांत खूप फरक आहे. पण एकदा का पकड घेतली की माणूस अंतर्बाह्य ढवळून निघतो. आपण कधी कल्पनाही केली नसेल असा विषय अगदी मुद्देसूद, अनेक समर्पक संदर्भासहित कादंबरीतून समजावून दिला आहे. खरंतर पचनी पडेल असा विषय नाही. पण मोजक्या पात्रांभोवती फिरणारं कथानक अनेक वास्तवदर्शी गोष्टींचा उलगडा करत जातं आणि आपणही विचारचक्रात अडकत जातो.
अशा पद्धतीचं लिखाण पहिल्यांदाच वाचनात आलं आणि खूप भारावून गेलो.
अवश्य वाचावं असं पुस्तक.
धन्यवाद 🙏🏻
Sandeep Jadhavपुस्तक परिचय.... "आवरण"
एस. एल. भैरप्पा यांच्या "साक्षी" या अतिशय सुंदर कादंबरीनंतर माझ्या वाचनात आलेली "आवरण" ही त्यांची दुसरी कादंबरी. त्यांच्या लिखाणाचं वेगळेपण "साक्षी" या कादंबरी वाचनावेळीच जाणवलं होतं आणि त्याचीच पुन्हा एकदा प्रचिती आली "आवरण" ही त्यांची ऐतिहासिक कादंबरी वाचत असताना. भैरप्पांच्या पुस्तकांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं पुस्तक मानसिक पातळीवर वाचून संपत नाही असं वाटतं कारण पुस्तक वाचून झाल्यानंतर त्याचा विचार बराच वेळ आपल्या डोक्यात घोळतच राहतो. भारतासारख्या अतिशय प्राचीन सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा असणाऱ्या देशावर शेकडो वर्षांपूर्वी बऱ्याच परकीय मुस्लिम राजांनी आक्रमणे केली, सत्ता काबीज करून राज्य केलं. त्यांपैकी क्वचितच एखादा अपवाद वगळता सर्वच मुस्लिम राजांनी भारतातील हिंदूंवर इस्लाम लादून त्यांचे जबरदस्तीने इस्लामीकरण करण्याचा प्रयत्न केला. तरीही वेगवेगळ्या मुस्लिम बादशहांनी शेकडो वर्षें प्रयत्न करूनही हजारो वर्षांचा वारसा असणारी हिंदू संस्कृती, परंपरा, हिंदू धर्म टिकून राहिले. हिंदू धर्मातील लोकांचे मानसिक खच्चीकरण करण्यासाठी सर्वच मुस्लिम राजांनी एकच पद्धत वापरली आणि ती म्हणजे हिंदूंची प्रार्थनास्थळे नष्ट करणे, मंदिरे उध्वस्त करणे. यातूनच पुढे औरंजेबाने कोट्यवधी हिंदूंचे आराध्य दैवत असलेल्या काशी विश्वनाथाचे मंदीर जमीनदोस्त करून त्याजागी त्याच मंदिराचे खांब वापरून "ग्याणवापी मस्जिद" उभारली. यातून दुखावला गेलेला हिंदू हळूहळू एकवटू लागला आणि शेवटी इस्लामी सत्ता उलथवून टाकली. हे सत्तांतर होत असताना आणि झाल्यानंतरदेखील इतिहासात असं एकही उदाहरण नाही सापडणार जिथे हिंदू राजाने मुस्लिम लोकांचे जबरदस्तीने धर्मपरिवर्तन केलंय किंवा त्यांची प्रार्थनास्थळे नष्ट केलीत. एस. एल. भैरप्पांनी याच मुस्लिम आक्रमणाला आणि काशी विश्वनाथ मंदिराच्या विध्वंसाला केंद्रस्थानी ठेवून, बरेच ऐतिहासिक संदर्भ देऊन अगदी तटस्थपणे लिहिलेली ही ऐतिहासिक कादंबरी "आवरण". काही सेक्युलर लोकांना हे वाटणं साहजिक आहे की भैरप्पांनी या कादंबरीतून मांडलेले ऐतिहासिक मुद्दे, ऐतिहासिक घटना आज वर्तमानकाळात वावरताना भारतातील हिंदू-मुस्लिम सलोख्याला घातक ठरू शकतात पण त्यांनी इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मागे इतिहासात कुणीतरी केलेल्या चुकांसाठी आजचे लोक जबाबदार नाहीत हे जरी खरं असलं, तरी "आपण त्यांचे वारसदार" आहोत अशा भावनेत राहणाऱ्या लोकांनी त्यांच्या पुर्वजांनी केलेल्या कर्माची जबाबदारीसुद्धा स्वीकारली पाहिजे हेही तितकेच खरे आहे. इतिहासाकडून मिळवण्याइतकंच, त्याच्याकडून सोडवून घेणं हेसुद्धा परिपक्वतेचं द्योतक आहे. प्रत्येक धर्म, जाती आणि व्यक्तीला लागू पडणारी अशी ही गोष्ट भैरप्पांनी त्यांच्या या कादंबरी "आवरण" मधून लोकांपुढे आणली आहे. "आवरणचे" आणखी एक वेगळेपण म्हणजे या कादंबरी मधेच जन्म घेणारी आणखी एक कादंबरी.
Vidya Balvadkar#आवरण
#नक्की_वाचावे_अशी_कादंबरी
दोन दिवसांपुर्वीलेखक डाॅ.एस. एल भैरप्पा यांचे उमा कुलकर्णी यांनी अनुवादित केलेले “आवरण” वाचायला घेतले. साधारण रोज पन्नास पानच वाचायची या हिशोबाने कादंबरी हातात घेतली पण कादंबरी वाचायला सुरुवात केली आणि एका बैठकीत दिडशेच्यावर पानं वाचून झाली. पहाटेचे सहा वाजले होते तरी पुस्तक खाली ठेवावेस वाटत नव्हते. मन वेगळ्याच स्थितीत असल्याचे जाणवले. मनात दोनच वाक्य घोळत होती, “ विस्मरणाने सत्य झाकोळून टाकणार् या मायेला ‘आवरण’ म्हणतात आणि असत्य बिंबवणार् या कार्याला ‘विक्षेप’ असे म्हटले जाते. व्यक्तीगत पातळीवर चालणार् या क्रियेला ‘अविद्या’ आणि सामूहिक किंवा जागतिक पातळीवर चालणार् या क्रियेला ‘माया’ म्हणतात.” - एस. एल भैरप्पा. या वाक्यांवर राहून राहून मन विचार करत होते. सद्यपरिस्थिती पाहता आज प्रत्येक माणूस, समाज या आवरणात, विक्षेपात, अविद्येत आणि मायेत अडकलेला वाटला. असो हा मुद्दा नंतर आधी कादंबरीविषयी. रझियाचे आयुष्य असेच तर आहे. झोकोळलेले सत्याचे आवरण फोडून ती समाजासमोर सत्य मांडण्याचा प्रयत्न करते. एकटीच ठामपणे. ही कादंबरी जितकी रझियाची आहे तितकीच ती अप्पाजींची ही आहे. अप्पाजींनी अभ्यासलेल्या मूळ इतिहासाची. रझिया, मूळची लक्ष्मी नरसिंहम्मै गौडा ही बंडखोर तितकीच आत्मविचारी स्त्री. कांदबरीची सुरुवात होते ती हंपीवर डाॅक्युमेंट्री करायला आलेल्या आमिर आणि रझियापासून. बाबरी मशिद पाडल्यानंतर सरकारने अल्पसंख्यांकांना असुरक्षित वाटू नये यासाठीची डाॅक्युमेंट्री. लक्ष्मी उर्फ रझियाने या आधी अनेकदा हंपी पाहिलेली असते पण यावेळी मात्र भग्न उग्र नृसिंहाची मुर्ती, विजय विठ्ठल मंदिर तिला विचारमग्न बनवतात. आतमध्ये काहीतरी ढवळून निघावे अशी तिची अवस्था होते.खरंतर ज्यांनी ज्यांनी हंपी पाहिली आहे ते नक्कीच या प्रसंगाशी रिलेट होतील. मी स्वतः हंपी पाहताना तिथली मंदिरे भग्न मुर्त्या पाहताना पोटात खड्डा पडल्याचा अनूभव घेतला आहे. पुढे रझियाचा हा प्रवास तिचे गांधीवादी विचारसरणीचे अप्पाजी गेल्यानंतर त्यांनी केलेल्या अभ्यासिकेपाशी येऊन थांबतो. तो नुसताच थांबत नाही तर ती स्वतः त्या प्रचंड ग्रंथसंपदेचा अभ्यास सुरु करते. यात नवरा आमिर, मुलगा नाझीर यांच्यापासून थोडा दुरावा निर्माण होतो. आमिरच्या दुसर् या लग्नाचेही सत्य ती पचवते. यात तिच्या आयुष्यात माहेरच्या गावाचेच अप्पाजींचे मित्र असलेल्या शेष शास्त्रींचा मुलगा प्रो. शास्त्री या सगळ्या उलथापालथीचे साक्षीदार असतात नंतर ते तिचे व्याही बनतात. नंतर तिचे काशीला जाऊन अभ्यासपुर्वक कांदबरी लिहिणे, ज्या परिषदेत तिने तात्विक मुद्दे मांडून जो आत्मविश्वास दाखवला असतो त्या परिषदेच्या पुढच्या सत्रातून तिला वगळण्यात येते, शेवटी ती तिची कांदबरी पुर्ण करते तेव्हाही कोणीही ती छापायला तयार होत नाही. पण ती हार न मानता तिची कादंबरी छापून आणते. नंतर तिच्या कादंबरीवर एक लेख छापून येतो दंगे होतात व तिच्या पुस्तकावर बंदी येते तेव्हा आमिर तिच्या सत्याच्या बाजूने उभा राहतो. झाकोळलेले सत्य त्या आवरणातून बाहेर येणार का? की असेच असत्याचे अनेक आवरणं चढत राहणार या प्रश्नापाशी येऊन कादंबरी संपते. मूळ इतिहास सांगताना भैरप्पांनी दिलेले संदर्भ साधारण १३६ पुस्तकं आणि त्यातले बारकावे हे खरंच या कादंबरीला वेगळे रुप देतात. प्रत्येक संदर्भ त्यांनी अभ्यासपुर्वकच मांडल्याचे लक्षात येते. छत्रपती शिवाजी महाराजांचे एक दोन प्रसंग शिवाय बाजीराव पेशवे, नाना फडणवीस, राजा छत्रसाल, शिंदे(सिंदिया) अशा अनेक मराठावीरांचे प्रसंग वाचताना नकळत स्वाभिमानाने ऊर भरुन येतो तितकेच काही प्रसंग वाचताना आतमध्ये खोल काहीतरी तुटल्याची जाणीव ही होते. त्याकाळी गुलामांना खोजा बनवायचा प्रसंग वाचताना तर चर्र होते काळजात. कादंबरीचा प्रवाह इतका खोल आहे की शेवटी तुम्ही सुन्नपणे विचार करता. ही केवळ कादंबरी न राहता समाजमनाचा आरसाच आहे. शेवटी एकच प्रश्न मनात घोळत राहतो, सामूहिक पातळीवर चालवलेल्या मायेच्या, व्यक्तीगत पातळीवर असलेल्या अविद्येतून बिंबवलेल्या असत्याच्या विक्षेपाच्या मायेचे आवरण फोडून सत्य लोकांपर्यत पोहचेल?
©️विद्या बालवडकर
Sushant Choudharyतनिश्क ची जाहीरात ..... व माझ वाचून संपलेल कन्नड लेखक डॉ. भैरप्पा लिखीत व उमा कुलकर्णी यांनी अनुवादित केलेली "अवरण" कादंबरी संपवली व fb वर व्यक्त व्हायचा मोह अवरला नाही......तनिश्क च्या जाहीरातीवर केलेली टिका....पुरोगाम्यांना जिव्हारी लागत असेल तर .... अवरण वाचा मग react व्हा..... कधि कधि इतिहास पण वाचला पाहीजे व समजुन पण घेतला पाहीजे....
कादंबरीची नायिका "लक्ष्मी" उर्फ रझिया, तिचा नवरा "आमिर", दोघांचा धर्माच्या चालिरीती चे सिंमोलंघन करुन (लक्ष्मी ने बरका) लग्न केले.... लक्ष्मी चे वडील "अप्पाजी", त्यांची एकुलती एक कन्या.... आप्पाच्या तथाकथित बुरसटलेल्या विंचाराचा चक्का चूर करुन विवाह.... कादंबरीचा काळ १९९० नंतरचा विशेषतः बाबरी पाडल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्राने सामाजिक सलोखा तयार करणे साठी अमीर वर Documentary बनवन्याचे काम सोपलेले असते....script लिहन्याचे काय रझियाचे.....पण हंपी चे भग्न अवशेश पाहून तिला अस्वस्थ होते व सत्याच्या शोधात जाते.... आप्पाजी वारतात त्यांचे तीस वर्षे कसलेही संबंध राहत नाहीत पण ती त्यांचे काही विधी करते व आप्पा नी जमा केलेली ग्रंथ संपदा अभ्यासते. बाबर, अकबर, हुमांयू, शहाजहान व औरंगजेबा.... मंदीरांचा झालेला विनाश व सरकारने चालवलेले इतिहास बदलाचे कारस्थान यांची संदर्भासाठी केलेली एकत्र गुंफण कादंबरीची परिणामकारकता वाढवते. एखाद्या ऐतिहासिक पात्राचे उद्दातीकरन कस केले जाते याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे म्हैसूर चा टिपू सुलतान त्याला राष्ट्र अभिमानी दाखवताना त्याने केलेल्या हिंदू समाजाच्या कत्तली तसेच त्याने हिंदुस्थानाला काफीरां (हिंदू ) पासून मुक्त करण्यासाठी अफगाणी सुलतानांना पाठवलेली आमंत्रण ह्याचा कुठेही उल्लेख नसने. ह्याचा संदर्भ देऊन केलेले लिखान अगदी मन सुन्न करुन सोडते.....
संपूर्ण हिंदुस्थानचा समृद्ध धार्मिक, सांस्कृतिक वारसा, ज्ञानकेंद्रे आणि त्याचा चौदाव्या व त्या पुढील शतकापासून बाहेरील आक्रमकांकडून झालेला विध्वंस हा कादंबरीचा मुख्य गाभा आहे.
धर्माच्या मागासलेल्या रुढी, परंपरा, दुराभिमान, अशिक्षित मनोवृत्ती आणि जीवनपद्धती, असहिष्णुता यावर नायिकेच्या तर्फे लेखक प्रहार करतात. तत्कालीन राजकारण, समृद्ध आणि सहिष्णु परंपरेचा स्वार्थासाठी इतिहास बदलण्याचा समकालीन पुरोगामी आणि बुद्धिवादी लोकांचा अट्टाहास, त्यासाठी झालेली एकजूट, वाचकांना चीड आणल्याशिवाय रहात नाही.पुरोगामी व सेक्युलर वद्यांच्या सनसनित चपराक,
वर्षानुवर्षे चांगले दडपण्यासाठी चाललेले, जनकल्याणाचे सोनेरी आवरण घातलेले कपटी कारस्थान वाचकांसमोर उघड होते. बुद्धिवादी, सेक्युलर म्हणवणाऱ्या लोकांचा मुखवटा टराटरा फाडते. लेखकाने प्रत्येक गोष्टीची केलेली मांडणी हि संदर्भ घेऊन केलेली तसेच कादंबरी चे लिखान पूर्णतः सत्य संदर्भावर आधारलेली आहे. संदर्भ ग्रंथांची यादी कादंबरीत लेखकाने समाविष्ट केली आहे त्यामुळे कादंबरीला वास्तवाचा भक्कम आधार आहे. संदर्भ ग्रंथ वाचल्यावर तिची झालेली अवस्था व जगाला दाखवन्या साठी मुद्दाम हुन केलेले प्रयत्न ह्यात फार अंतर असते हे दाखवून देनारी कादंबरी.
डॉ. भैरप्पा यांचे वाचलेले हे चौथे पुस्तक..... पर्व, सार्थ, तडा व अवरण.... प्रतेक पालकाने (विशेष करुन मुलींच्या पालकाने) अवश्य वाचावी अशी कादंबरी....
ॲड. सुशांत चौधरी, उच्च न्यायालय औरंगाबाद.
Nishigandha Joshiआत्ताच "आवरण" ही डॉ. एस. एल्. भैरप्पा लिखित आणि उमा कुलकर्णी यांनी अनुवादित केलेली कादंबरी संपवली. वाचून सुन्न होणे म्हणजे काय याचा प्रत्यय आला.
कादंबरीची नायिका "लक्ष्मी" उर्फ रझिया, तिचा नवरा "आमिर", लक्ष्मीचे वडील "अप्पाजी", त्यांचे मित्र शेषराय शास्त्री आणि त्यांचा मुलगा प्रोफेसर शास्त्री ही कादंबरीतील प्रमुख पात्रे. कादंबरीचा काळ १९९० नंतरचा आणि त्यासाठी
अभ्यासलेल्या ग्रंथांचा काळ साधारण सोळाव्या शतकपासून चा.
बाबरी मशीद पाडली त्याच्या भोवतालचा काळ आणि मुघल सम्राट औरंगजेब याचा काळ यांची संदर्भासाठी केलेली एकत्र गुंफण कादंबरीची परिणामकारकता वाढवते.
संपूर्ण हिंदुस्थानचा समृद्ध धार्मिक, सांस्कृतिक वारसा, ज्ञानकेंद्रे आणि त्याचा सोळाव्या शतकापासून बाहेरील आक्रमकांकडून झालेला विध्वंस हा कादंबरीचा मुख्य गाभा आहे.
अल्पसंख्यांक असलेल्या धर्माच्या मागासलेल्या रुढी, परंपरा, दुराभिमान, अशिक्षित मनोवृत्ती आणि जीवनपद्धती, असहिष्णुता यावर नायिकेच्या तर्फे लेखक प्रहार करतात. तत्कालीन राजकारण, समृद्ध आणि सहिष्णु परंपरेचा स्वार्थासाठी इतिहास बदलण्याचा समकालीन पुरोगामी आणि बुद्धिवादी लोकांचा अट्टाहास, त्यासाठी झालेली एकजूट, वाचकांना चीड आणल्याशिवाय रहात नाही.
वर्षानुवर्षे चांगले दडपण्यासाठी चाललेले, जनकल्याणाचे सोनेरी आवरण घातलेले कपटी कारस्थान वाचकांसमोर उघड होते. बुद्धिवादी, सेक्युलर म्हणवणाऱ्या लोकांचा मुखवटा टराटरा फाडते.
कादंबरी पूर्णतः सत्य संदर्भावर आधारलेली आहे. संदर्भ ग्रंथांची यादी कादंबरीत लेखकाने समाविष्ट केली आहे त्यामुळे कादंबरीला वास्तवाचा भक्कम आधार आहे.
थक्क करणारा लेखकाचा अभ्यास आणि त्याचबरोबर अपरिमित सांस्कृतिक हानी करण्याचे, खरा इतिहास जाणीवपूर्वक दडपण्याचे हे कारस्थान सुज्ञ वाचकाला सुन्न करून टाकते.
प्रत्येकाने कर्तव्य म्हणून वाचावी अशी अभ्यासपूर्ण कादंबरी.
©️निशिगंधा
13/10/20.
Vrushali Shindeकादंबरीचा कालावधी हा साधारण बाबरी मशिद पाडली त्यावेळेचा आहे. बाबरी पाडल्यानंतर सगळ्या मुख्य हेरिटेज स्थळांचं चित्रण करून त्याचा प्रसार करण्याची तेव्हाच्या केंद्र सरकारची योजना होती. त्यातचं हम्पीच्या चित्रीकरणाचं काम "आमिर" ह्या नावाजलेल्या दिगदर्शकावर सोपवण्यात आल होतं आणि त्यात त्याला साथ देत होती त्याची पत्नी आणि सुप्रसिद्ध लेखिका "रझिया". documentary बनवताना त्यात मुस्लिम विरोधी भावना निर्माण नाही झाली पाहिजे हा सरकारच अलिखित नियम होता.
अलीकडे देशात हिंदू मूलतत्त्ववाद भडकत होता अशा परिस्थितीत देशातल्या समस्त अल्पसंख्यांकांच्या मनातील सुरक्षिततेची भावना द्रुढ व्हावी अशी तेव्हाच्या डाव्या विचारसरणीच्या पक्षांची आणि जातिनिरपेक्षवाद्यांची इच्छा होती.
ठरल्याप्रमाणे हम्पीला भेट दिल्यावर फोडलेली नरसिंहाची मूर्ती आणि भग्न झालेली मंदिरं पाहून रझिया सुन्न झाली. हे सगळं कोणी आणि का केलं हे माहिती असूनही तथाकथित secularist लोकांमुळे आपण सत्य जग समोर आणू शकत नाही ह्या भावनेनी ती हतबल झाली.
आमिर वरच्या प्रेमापोटी आपल्या धर्माशी आणि वडिलांशी असलेले संबंध तोडून रझियाला २८ वर्षे उलटून गेल्यानंतर सुद्धा ह्या हम्पीच्या फुटलेल्या नरसिंहाने पुरतं छळलं होत.
होय तुम्ही बरोबर वाचलंय🙂. कथेची नायिका रझिया मूळची लक्ष्मी नरसिंह गौडा. गांधीवादी विचारांनी भारावलेल्या,एखादं धार्मिक कृत्य करावं तितक्या निष्ठेने रोज सकाळी दोन तास सूत कताई करणाऱ्या नरसिंह अप्पांची एकुलती एक मुलगी. पुण्याच्या फिल्म इन्स्टिटयूट मध्ये शिकत असताना आमिर नामक समवयस्क मुलाच्या प्रेमात पडली. आमिर बद्दल नरसिंह अप्पांना समजल्यावर त्यांनी तिला अनेक मार्गांनी समजवण्याचा प्रयत्न केला परंतु आमिरच्या प्रेमात वाहवत गेलेल्या लक्ष्मीला अप्पांचा बोलणं म्हणजे म्हाताऱ्याचं फुटकळ पुराण वाटलं.
लग्नाच्या वेळी आमिर ने तिला धर्म बदलण्याचा आग्रह धरला, सुरवातीला तिने थोडा विरोध दर्शवला परंतु " धर्मावर माझाही विश्वास नाही. आपण दोघेही आधुनिक विचारसरणीचे आहोत. आता तू धर्म आणि नाव बदलणं हा केवळं धोरणाचा भाग आहे. गरिबांसाठी अफूची गोळी बनलेला धर्म आपल्याला कायमचा नष्ट करायचा आहे" असं आमिर ने समजावल्यावर ती तयार झाली. कुठे मानवता हाच धर्म मानणारा आमिर आणि कुठे संकुचित मनाचे अप्पा?? तिचा राग वाढत गेला. तिने हिंदू धर्म हा कसा जातीयवादी आहे, मानवतेचा शत्रू आहे हे जाहीर भाषणातून सांगायला सुरवात केली.तिच्या ह्या विचारांना जातिनिरपेक्षवाद्यांनी समर्थन देऊन उचलून धरलं.
लग्नाच्या वेळी आधुनिक वाटणारा आमिर लग्नांनंतर थोडा बदलला . पाच वेळा नमाज, रमजान चे उपवास, तब्लिकी नीतिनियम तिला बंधनकारक झाले. दरम्यान खऱ्या पुरावांच्या आधारे documentary बनवायचा लक्ष्मीचा मानस होता त्याला आमिरने फारकत घेतली त्यामुळे दोघांमध्ये दुरावा आला. त्यानंतर एकट्या पडलेल्या आमिरने शरियतचा दाखला देत दुसरं लग्न हि केलं. ह्या सगळ्या प्रकारामुळे तिला मानसिक धक्का बसला .
पुढे वडील गेल्याच कळल्यावर २८ वर्षांनी रझिया तिच्या मूळ गावी परत आली .तिथे तिच्या वडिलांनी २८ वर्षात वाचून काढलेली सगळी पुस्तकं तिने पहिली. पवित्र कुराणचा कन्नड अनुवाद, प्रवादि मोहम्मदची चार वेगवेगळी चरित्र ,सर विल्यम्स ,मार्टिन लिंग्स यांची पुस्तकं, खदीस यांचे खंड, अकबरनामा, बाद्शाहनामा, तुघलकनामा ह्यांसारखे भारत खंडावरील आपला विजय आणि यश यांविषयी मुसलमान इतिहासकारांनी लिहिलेलं बहुतेक सगळे ग्रंथ आणि खंड आणि त्यावर वाचल्याचा खुणा प्रत्येक पानावर होत्या . रझिया ते एक एक ग्रंथ वाचू लागली.
मुघल साम्रज्यात एक राजा अकबर सोडून बाकी सगळ्या राजांनी, खासकरून औरंगजेबाने जिहाद च्या नावाखाली मुस्लिमेत्तर लोकांची अमानुषपणे कत्तल केली, सनातन धर्माला संपवण्यासाठी तिथली मंदिर,स्तूप,जैन मंदीर यांचा नाश करून तिथले पंडीत ,आचार्य, भिक्षू, मुनींचा सामूहिक वध केला, जबरदस्तीने धर्मांतर केली. देवगढ सारख्या छोट्या राज्यावर आक्रमण करून तिथल्या राजपुत्राला अटक करून त्याच धर्मांतर केलं , इतकंच नव्हे त्याला हिजडा बनवलं.त्याच राजपूत राजपुत्राच्या अनुभवातून पुढचा इतिहास भैरप्पांनी उलगडला आहे .
इ .स . १६६९ मध्ये हिंदूंचं अत्यंत पवित्र स्थान काशी विश्वनाथ मंदीर पाडून औरंगजेबानी तिथे ज्ञानवापी मस्जिद बांधली . मंदिर पाडायचा फतवा निघालाय हे समजल्यावर काही स्थानिक ब्राह्मण पुजाऱ्यांनी निदान देव तरी वाचावा म्हणून शिवलिंग जवळच्या विहिरीत लपवलं. पुढे इ.स.१७७५ मध्ये राणी अहिल्याबाईंनी त्या शेजारीच विश्वनाथाची स्थापना केली. पण मंदिरा समोर असलेला नंदी अजूनही जुन्या विश्वनाथाकडे म्हणजे आत्ताच्या ज्ञानवापी मस्जिद कडे तोंड करून उभा आहे. त्याचा देव तिथून कधीचाच निघून गेलाय हे त्याला माहित असेल का ?
काशी मथुरा आयोध्या ह्या व्यतिरिक्त सुमारे ३०,००० मंदीरं नष्ट करण्यात आली हे संशोधनातून सिद्ध झालं आहे. परंतु vote बँकेच्या छुप्या हेतूमुळे राज्यकर्त्यांनी हे उजेडात येऊ नये ह्याचा पुरेसा बंदोबस्त केला आहे.
राष्ट्रिय एकात्मता साधण्यासाठी म्हणून सरकार कडून देशातील बुद्धीजीवी, कलाकार , शिक्षण तज्ञांची ३ दिवसांची सभा बोलवून खोटा इतिहास पुढे रेटण्याचा प्रयत्न होतो, तेव्हा रझिया पुराव्यानिशी या गोष्टीला विरोध करते. शास्त्रींसाठी ही घटना अनपेक्षित असते. पुढील परिषदेसाठी रझियाला डावलण्यात येते कादंबरीतला हा भाग देशातील विविध विद्यापीठांतील विचारवंत म्हणवून घेणाऱ्यांचे चारित्र्य उघडे पाडणारा आहे.
परिषदेतून बाहेर काढलं तरीही रझिया हार मानत नाही . ती तीचा ५ वर्षांचा अभ्यास पुस्तक रुपाने प्रकाशीत करते. रझियाची कादंबरी प्रकाशित झाल्यानंतर त्यावर हल्लकल्लोळ माजतो, दंगली उसळतात. त्या कादंबरीवर सरकार बंदी घालते, तेव्हा आमीरही रझियाच्या मदतील धावून येतो. कारण रझियाच्या कादंबरीने त्याचे डोळे उघडतात.
भैरप्पांनी इतिहासाचे दाखले देऊन भूतकाळाची आणि वर्तमानाची सांगड उत्तमपणे घातली आहे .त्यांचा अभ्यास वाखाणण्याजोगा आहे .जवळ जवळ १३६ दुर्मिळ ग्रंथांचा उल्लेख ह्या कांदबरीत सापडतो. पुस्तक वाचताना कुठेही ते कंटाळवाणं होत नाही. पुस्तकात.बऱ्याच ठिकाणी मराठा साम्राज्य,छत्रपती शिवाजी महाराज तसेच पेशवे बाजिराव बल्लाळ आणि राणी अहिल्याबाई होळकरांचा उल्लेख आहे. मराठा साम्राज्या मुळे हिंदू धर्म अबाधित राहिला हे वाचताना माझं मराठी मन नकळतपणे सुखवालं. महाराजांबद्दलचा आदर द्विगुणित झाला.
कोणत्याही धर्मा बद्दल मनात अजिबात तेढ नाही परंतु आमचा इतिहास आमच्या येणाऱ्या पिढ्यां पर्यंत आहे तसाच्या तसा पोहचावा एवढीच माफक अपेक्षा आहे. आम्हाला तो इतिहास नाही बघायचा जो तुम्हाला दाखवायचाय, आम्हाला तो इतिहास बघायचा जो आमच्या पूर्वजांच्या रक्तानी पावन झालाय, जो खरा आहे.
साधारण सहाव्या शतका पासून हा हिंदू धर्म परकीय आक्रमण झेलतो आहे आणि अजूनही अबाधित आहे.अशा वेळी गीतेतल्या २ ओळी प्रामुख्याने आठवतात .
यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत।
अभ्युत्थानधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्।।
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्।
धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे।।
Santosh Saknurखूप अप्रतिम पुस्तक,,, या पुस्तकाचा परिचय लिहायला माझी तेवढी शक्ती नाही
प्रचंड वादळ आहे या पुस्तकात,,,भारतीय लोकशाहीची लक्तरे,,सडके पुरोगामी,,धर्मांध शक्ती,,गलिच्छ राजकारण,,
खूप काही
प्रत्येक वाचन जिज्ञासूंनी वाचावेत असे अप्रतिम पुस्तक
Ram prasad Solankeआवरण आत्ताच वाचून झाल.. एक अप्रतिम पुस्तक वाचण्याचा अनुभव आला...
Sujata Batawle मी `आवरण` वाचली आहे . खुप सुंदर आहे. वाचताना मन सुन्न झालं होतं .
Neha Joshiआवरण अप्रतिम आहेच. तुम्ही म्हणालात तसं, शेवटी दिलेली संदर्भाची सूची वाचून थक्क व्हायला होतं. इतकं वाचन आणि अभ्यास करून हे लिखाण केलेलं असल्यामुळे आवरण त्या अर्थाने खूप special वाटते.
Smita Chinnurkar Ligadeआजच एस एल भैरप्पा यांचे आवरण हे पुस्तक वाचून पूर्ण झाले. आवरण या पुस्तकाचा review मी या ग्रुप वर वाचला होता. त्यामुळे ही कादंबरी वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली. ही कथा हिंदू-मुस्लीम या अतिशय संवेदनशील विषयावर आहे.
ह्या कादंबरीच्या शेवटी जी संदर्भ सूची दिली आहे ते पाहून दडपायला होतं कारण एक कादंबरी लिहिण्यासाठी , त्यातील सत्य घटना मांडण्यासाठी शेकडो पुस्तके संदर्भ म्हणून लेखकाने वापरली आहेत . यावरूनच आवरण ही कादंबरी किती उत्कृष्ट आहे हे समजते .
मला हे पुस्तक फार आवडलं . पहिल्या एक दोन दिवशी थोडं सावकाश वाचन झालं . त्यानंतर मात्र पुस्तक खाली ठेवावस वाटत नाही . कारण त्या कथेत आपण गुंतून जातो . सहसा मी मोठी कादंबरी वाचून झाली की लगेच दुसऱ्या दिवशी दुसरी कादंबरी सुरू करत नाही , कारण पहिल्या कादंबरीतून मन अजून बाहेर आलेले नसते . थोडक्यात त्या कथेचा हँग ओव्हर उतरलेला नसतो . त्यामुळे काही दिवस थांबून मग दुसरी कादंबरी सुरु करते .
Omkar JOshiकाही पुस्तकं सुन्न करून टाकतात,तुमच्या अस्तित्वावर प्रश्न उपस्थित करायला भाग पडतात,असाच एस एल भैरप्पा यांचं `आवरण` पुस्तकं वाचून सुन्न झालोय,काही प्रश्नांची उत्तरं मिळाली अन त्या पेक्षा अधिक प्रश्न ही पडले.....
हे पुस्तकं म्हणजे खरं तर दोन पुस्तकांचा एकत्रित प्रवास आहे,दोन धर्मांचा प्रवास आहे,धर्मांतराच्या गुंत्यात अडकलेल्या दोन व्यक्तिरेखांचा प्रवास आहे.प्रेमापोटी धर्मांतर केलेल्या आधुनिक स्त्रीचं प्रतिनिधित्व करणाऱ्या लक्ष्मी ची रझिया होते. तीस वर्षे सुखाचा संसार झालेला असतो आणि अशातच एका प्रोजेक्ट च्या निमित्ताने हम्पी ला येणं होतं,हम्पी मध्ये असलेल्या जीर्ण झालेल्या मंदिरांच्या अवशेषां ना निरखून पाहणाऱ्या आणि त्याच विचारात गुरफटून गेलेल्या मध्यमवयीन रझिया पासून मग कथानकाला सुरुवात होते आणि लेखक आपल्याला हा रोलर कोस्टर चा प्रवास घडवतो.
प्रत्येक पाना वर ही कादंबरी आपल्या मनाची पकड घेते,सगळी पात्र आपल्याशी बोलायला लागतात.आपण मात्र तठस्तपणे त्यांना वाचत राहतो. धर्मांतराच संकट ओढवलेल्या माणसाची काय अवस्था होते आणि ती वाचताना आपल्या मनाची होणारी घुसमट अगदी सहज जाणवते.
आज समाजात अशी लोकं आहेत ज्यांना आपल्या धर्माची लाज वाटते, स्वतः ला पुरोगामी सिद्ध करण्याच्या नादात ही मंडळी आपल्याच लोकांसाठी मोठं संकट होतात आणि त्या अनुषंगाने देशा साठी.
आज ह्या पुस्तकांन एक हिंदू म्ह्णून पूर्वजांनी धर्म रक्षणासाठी केलेल्या बलिदानाची सहजच जाणीव करून दिली.हे पुस्तकं आणखी बऱ्याच गोष्टीं वर प्रकाश टाकत आणि ते ही फार धक्कादायक आहे.
आणखी एक छत्रपती शिवाजी महाराज ह्यांचा भारतातील प्रत्येक हिंदू किती ऋणी आहे ते हे पुस्तक वाचल्यावर नक्कीच समजते आणि उर अभिमानाने भरून येतो.
Archana Bapat" आवरण " ही डॉक्टर एस. एल. भैरप्पा यांची कादंबरी नुकतीच वाचून संपवली.
समकालीन विषयांवर काही लिहिणे हे ऐतिहासिक लेखन करण्यापेक्षा सोपे असते.. समकालीन विषयांवर लिहिताना लेखक स्वतःची मते, स्वतःचा दृष्टीकोण जे आजूबाजूला दिसते आहे त्यावरून मांडू शकतो.. परंतु ऐतिहासिक लेखन करताना लेखकाला गतकालीन संदर्भ तावून सुलाखून घ्यावे लागतात.. अविरत संशोधन करावे लागते. संदर्भासाठी अनुकूल आणि प्रतिकूल अशी दोन्ही मते विचारात घ्यावी लागतात.. तपासून पहावी लागतात. डॉ. एस एल भैरप्पा यांनी वाचलेल्या संदर्भ ग्रंथांची यादी पाहिली तर जीव दडपून जातो...
प्रचंड मेहनत, चिकाटी, संदर्भांची अचूक मांडणी व कादंबरीत सहज मिसळून जाणारी, त्या प्रवाहात आपोआप येणारी ऐतिहासिक सत्ये या सगळ्या बाबी या कादंबरीला एक विशिष्ट दर्जा प्राप्त करून देतात..
लग्नाआधीच्या तरुण, प्रेमोत्सुक लक्ष्मीला, रझिया झाल्यानंतर बऱ्याच छोट्या छोट्या कौटुंबिक लढाया भावनिक व बौद्धिक पातळीवर लढाव्या लागतात..
वडिलांच्या निधनानंतर मात्र तिच्या आयुष्याला व आजवरच्या विचारांना एक वेगळीच कलाटणी मिळते आणि मग खरे द्वंद्व सुरू होते.. बाहेरील समाजही तिच्या वक्तृत्वाने, लेखनाने, लेखनात रेखाटलेल्या ऐतिहासिक सत्यामुळे ढवळून निघतो. सत्य ऐकून घ्यायची, खरा इतिहास जाणून घ्यायची कुणाचीच तयारी नसते... हा सगळा कथाभाग अतिशय प्रवाही व प्रभावी उतरला आहे..
दोन्ही धर्मातील प्लस मायनस पॉईंट्स अतिशय समतोलपणे मांडले आहेत. तरीही कादंबरी वाचत असताना काही ठिकाणी अंगावर भयाने काटा येतो, मन उद्विग्न होते. पान नंबर 226 व 227 वरील लक्ष्मीचे संदर्भासहित विवेचन वाचताना तर मन अतिशय विषण्ण होऊन जाते.
या कादंबरी मध्ये नायिका लिहीत असलेल्या कादंबरीचे उपकथानक आहे.. वाचताना आपल्याला एकदम संदर्भ लागत नाही.. लिंक तुटल्यासारखी वाटते. परंतु नंतर आपण त्याही कथानकात गुंतून जातो..
कन्नडमध्ये या कादंबरीच्या दोन वर्षात बावीस आवृत्त्या निघाल्या आहेत आणि तिच्यावर दहा पुस्तके प्रकाशित झाली आहेत ही माहिती अनुवादिका डॉ सौ उमा कुलकर्णी देतात.. अनुवाद अतिशय सुगम व ओघवता उतरला आहे.. आपण अनुवादित कादंबरी वाचतो आहोत हे जाणवतही नाही.
ANURADHA GOYAL (Anu Reviews) JUNE 4, 2019The book begins with the story of a filmmaker couple from Bangalore on a trip to make a film on Hampi. The woman here is the main protagonist of the story. From Hampi, the story goes back and forth in time and you travel with her to her personal past and her past that is also our collective past.
It is a story of a girl who changes her religion to get married and cuts off her ties with her father who lives in a village in Karnataka. After the father passes away, the daughter discovers his lifetime research on the history of India. Inadvertently she takes on the baton from him and starts studying the subject from where he left. Her life changes as she starts living in the village lost in the books.
The book brings out conflicts in the life of a couple who belong to two different religions. There is another couple where one person is from another country. From food habits to basic beliefs everything has to undergo a major change. The conflicts that come from belief systems do crop up sometime or the other. The story also highlights, how the children born are torn between different religions. They may choose to believe in one religion, but they never know where they belong.
At a society level, the conflicts that took place in the past can walk into your Present at any time. They may walk in from the books, from assignments you undertake, from artistic expressions around you or from simple conversations.
The question this book leaves you with is – can you disconnect yourself completely from your collective past? Communities with a tumultuous past, can they really live without that past walking in?
Pornima Deshpandeआवरण कादंबरी खुप सुंदर आहे वाचताना आपण नकळतपणे लक्ष्मी मध्ये गुंतत जातो.
Rama Khatavkarजबरदस्त पुस्तक आहे. प्रत्येकाने वाचलेच पाहिजे असे...
Sadashiv Kulkarniहे पुस्तक एकदा वाचायला घेतल्या वर वेळेचे भान राहत नाही,संग्रही ठेवण्या योग्य,
उमा कुलकर्णी याना तितकेच श्रेय जाते.
Shivaji Vinayak Nangareएस. एल. भैरवप्पा , कर्नाटकातील लेखक !
मुगल आक्रमकांनी भारतीय संस्कृतीच्या मानदंडांचा कसा विध्वंस केला,याबाबत अभ्यासपूर्ण पुस्तक .
जास्त काय लिहावे,शब्द पुरत नाहीत,वाचूनच पहा !अनुवादिकेनेही आपले काम चोख बजावले आहे. विषयाची लय कायम ठेवणारा शब्दसंग्रह वापरलाय !
Sachin Sanpurikar गेली तीन-चार दशके कन्नड भाषेतील सर्वाधिक खपाचे कादंबरीकार आहेत - डॉ. एस. एल. भैरप्पा
आजवर त्यांनी २१ कादंबऱ्या लिहिल्या आणि त्या सर्वच लोकप्रियही ठरल्या. भारतातल्या आघाडीच्या कादंबरीकारांमध्ये `भैरप्पा` यांचे स्थान वरचे आहे.
ते सिद्धहस्त लेखक आहेत. केवळ कल्पना आणि लालित्यशैलीच्या बळावर कादंबऱ्या प्रसवणाऱ्या लेखकांच्या कुळातले हे नाहीत. कुठल्याही विषयावर लिखाण करण्याआधी त्या विषयाचा सर्व अंगाने अभ्यास-वाचन करतात. भरपूर परिश्रम घेतात. त्या विषयातील तज्ज्ञांशी विचारविमर्ष करतात.
`पर्व` ही कादंबरी लिहिण्यापूर्वी त्यांनी तब्बल साडेसहा वर्षे महाभारतकालीन जीवनविषयक ग्रंथांचा अभ्यास केला होता!
कोट्यवधी हिंदूचे आद्य आराध्य दैवत असलेल्या काशी विश्वनाथाला दरवर्षी पंचवीस कोटी लोक जातात पण तिथे जी मस्जीद आहे तेच मूळचे `काशी विश्वनाथा`चे मंदीर आहे. आपण जिथे नमस्कार करतो ते मूळ मंदीर नाही हे लक्षात आल्यावर मूळ मंदिराच्या स्थळावर नमस्कार करण्याची इच्छा तीव्र होते.
कोट्यवधी भारतीयांच्या या इच्छेला सुप्रसिद्ध कन्नड कादंबरीकार डॉ एस.एल. भैरप्पा यांनी `आवरण` या कादंबरीतून वाचा फोडली आणि ती कादंबरी केवळ कन्नड वाचकांची न राहता भारतीयांची झाली. कन्नड भाषेत या कादंबरीच्या पंचवीस आवृत्या निघाल्या आणि अन्य भारतीय भाषांच्या आवृत्त्या दररोज वाढत आहेत.
फेब्रुवारी २००७ मध्ये `आवरण` प्रकाशित झाली. आणि २००९ पर्यंतच हिची २२ पुनर्मुद्रणे झाली!
तीन वर्षांत या कादंबरीवर १० चर्चासत्रे झाली.
या पुस्तकावर १० पुस्तके प्रकाशित झाली, त्यापैकी ४ पुस्तके ही `आवरण` वर टीका करणारी आहेत.
आवरणने कन्नड पुस्तकांच्या खपाचे आजवरचे सारे विक्रम मोडून काढले आहेत.
वाचकांनी या कादंबरीला डोक्यावर घेतले आहे, तर दुसऱ्या बाजूला ज्ञानपीठ पुरस्कार विजेते `यू.आर. अनंतमूर्ती`, `गिरीश कर्नाड`, `चंद्रशेखर कंबार` अशा नामवंत कन्नड लेखक-नाटककारांनी या कादंबरीवर टीकेची झोड उठवली आहे.
गंमत म्हणजे जी नामवंत विचारवंत मंडळी आवरणवर तुटून पडताहेत, टीका करताहेत, त्या प्रवृत्तीची पात्रे कादंबरीत आहेत! सत्य झाकोळणाऱ्या या प्रवृत्तीला पुराव्यानिशी उघडे पाडणे हा या कादंबरीचा गाभा आहे.
सत्य कोणाच्या रागालोभाची पर्वा करीत नाही. एका अर्थाने आवरण ही सत्यनिष्ठ कादंबरी आहे. _`हिडन टॉरिझन्स : 1000 ईयर्स ऑफ इंडियन सिव्हिलायझेशन`_ चे लेखक `एन.एस. राजाराम` यांनी `आवरण`ची तुलना `डॅन ब्राऊन` यांच्या विश्वविख्यात _`दा-विंची कोड`_ या कादंबरीशी केली आहे.
स्वार्थी आणि प्रभावी शक्तींनी खरा इतिहास दडपून ठेवून खोट्या इतिहासाचा प्रचार करणं, हे दोन्ही कलाकृतींमधील `समान सूत्र` आहे.
कादंबरीची सुरुवात `फ्लॅश बॅक` पद्धतीने होते. ही कादंबरी ऐतिहासिक आणि वर्तमान या दोन स्तरांवर उलगडत जाते. १९९२ साली बाबरी ढांचा पाडण्यात आल्यानंतर समाजात धार्मिक सलोखा निर्माण व्हावा यासाठी सरकार प्रयत्नशील असते. त्यानुसार प्राचीन वास्तू-शिल्पांवर आधारित माहितीपट निर्माण करण्याचे काम *`आमीर`* आणि *`रझिया कुरेशी`* यांच्यावर सोपविण्यात येते. माहितीपटाच्या प्राथमिक तयारीसाठी दोघेही *विजयनगर (हंपी)* येथे येतात. तेथील उद्ध्वस्त मंदिरे पाहून रझिया अंतर्मुख बनते.
`रझिया` ही पूर्वाश्रमीची हिंदू असते. *`लक्ष्मी`* तिचं आधीचं नाव. आमीरच्या प्रेमात पडून तिने धर्मांतर केलेले असते. घरातून वडिलांचा विरोध असूनही पुरोगामी विचारांच्या `प्राध्यापक शास्त्री` यांच्या प्रोत्साहनामुळे आणि आमीरच्या आधुनिक विचारांमुळे ती मुस्लिम बनते. हिंदू धर्मावर टीका करणे आणि प्रस्थापित विचारवंतांच्या वर्तुळात वावरणे यामुळे ती सतत प्रसिद्धीत असते. याच सुमारास विजयनगरच्या भग्न अवशेषांनी ती अंतर्मुख होऊन सत्य जाणण्याचा प्रयत्न करू लागते.
रझिया सत्यावर आधारित डॉक्युमेंटरीचा आग्रह धरू लागते अन् आमीर मात्र सत्याशी प्रतारणा करीत असल्याचे तिच्या ध्यानात येऊ लागते. दरम्यान तिच्या वडिलांचे - आप्पांचे निधन होते. लक्ष्मी तब्बल २८ वर्षांनंतर आपल्या गावी पोचते.
*कादंबरीला खऱ्या अर्थाने कलाटणी मिळते ती इथे...*
रझियाला छळणाऱ्या प्रश्नांची उत्तरे मिळण्याची आशा तिच्या मनात येथे निर्माण होते. तिच्या वडिलांनी एकत्रित केलेली ग्रंथसंपदा तिच्या हाती लागलेली असते. आप्पांनी काढलेली टिपणे आणि त्यांचा व्यासंग पाहून लक्ष्मी स्तिमित होते. तिथेच राहून अभ्यास करायचा निर्णय ती घेते.
लक्ष्मीने परधर्मात जाऊन विवाह केल्यानंतर आप्पांनी मुस्लिम धर्म, मुस्लिम चालीरीती, त्यांची आक्रमणे, भारतात आणि भारताबाहेर घडविलेला विध्वंस यांचा अभ्यास सुरू केलेला असतो. यावर आधारित एक गंभीर पुस्तक लिहायचा त्यांचा निर्धार असतो, पण त्यांच्या मृत्यूने ते काम अधुरे राहिलेले असते.
वडिलांनी जमविलेली पुस्तके आणि त्यांनी काढलेली टिपणे यांच्या सहाय्याने ते अधुरे काम पूर्ण करण्याचे लक्ष्मी ठरवते. _(ही कादंबरीतील कादंबरी फारच अप्रतिम आहे. ती स्वत: वाचण्याचा आनंद प्रत्येकाने घेतलाच पाहिजे.)_
दरम्यानच्या काळात आमीर रझियापासून मानसिकदृष्ट्या दूर होऊ लागतो. या वयात तो एका कोवळ्या मुस्लिम मुलीशी निकाह करतो. दरम्यान प्राध्यापक शास्त्री यांच्या आईचे निधन होते. या काळातील पुरोगामी म्हणवून घेणारे `प्राध्यापक शास्त्री` आणि आधुनिक विचारांचा बुरखा पांघरणारा `आमीर` यांचे चित्रण खूपच प्रत्ययकारी झाले आहे.
या पात्रांचे वर्तन वाचताना आजच्या समाजातील ढोंगी पुरोगामी विचारवंत-लेखक आपसूकच डोळ्यांसमोर तरळू लागतात. सध्याचे वास्तवच अत्यंत अचूकपणे लेखकाने या पात्रांच्या माध्यमातून समोर आणले आहे.
याच काळात `इतिहास पुनर्लेखना`विषयी प्रा. शास्त्री यांच्या अध्यक्षतेखाली सरकारकडून एका परिषदेचे आयोजन करण्यात येते. या परिषदेला रझियालाही आमंत्रण असते.
मुस्लिमांच्या तुष्टीकरणाचा इतिहास पुढे रेटण्याचा प्रयत्न होतो, तेव्हा रझिया पुराव्यानिशी या गोष्टीला विरोध करते. शास्त्रींसाठी ही घटना अनपेक्षित असते. पुढील परिषदेसाठी रझियाचा `पत्ता कट` होतो.
कादंबरीतला हा भाग देशातील विविध विद्यापीठांतील विचारवंत म्हणवून घेणाऱ्यांचे चारित्र्य उघडे पाडणारा आहे. इतिहासाचे पुनर्लेखन, भगवेकरण आदी वारंवार चर्चेत येणाऱ्या वादांमागील सत्य समजून घेण्यासाठी इतिहासाच्या अभ्यासकांनी हा भाग आवर्जून वाचलाच पाहिजे.
स्वत:ला निधर्मी, सेक्युलर समजणारे विचारवंतांचे खरे स्वरूप अतिशय जिवतंरीत्या कादंबरीच्या शेवटच्या भागात साकारले आहे.
लक्ष्मीच्या कादंबरीतील नायक रजपूत राजपुत्र आहे. युद्धात पराभव झाल्याने त्याला गुलाम म्हणून राहावे लागते आहे. त्याचे बीज फोडून त्याला खोजा म्हणून जनानखान्यात ठेवलेलं असतं. हा आता इस्लामच्या प्रभावाखाली आलेला असतो.
या खोजाच्या माध्यमातून लक्ष्मीची कादंबरी उलगडत जाते.
`या राजपुत्राच्या वाट्याला काय काय येतं?`
`काशी विश्वनाथाचे मंदिर उद्ध्वस्त होतानाचा प्रसंग`, `गंगेच्या किनारी भेटलेल्या साधूशी संवाद आणि त्यातून त्याच्या मनाला आलेली उभारी`...
हे सारं प्रत्यक्ष कादंबरीतच वाचा.
आता तो खोजा छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेने *स्वातंत्र्याचा बिगुल वाजविणाऱ्या* छत्रसालाकडे जायला निघतो आणि रझियाच्या कादंबरीचा शेवट होतो, पण त्या कादंबरीच्या प्रकाशनानंतर उठलेला हलकल्लोळ, वेगाने घडणाऱ्या घडामोडी *`आवरण`* च्या शेवटच्या भागात रेखाटले आहे.
`आवरण`मधील रझियाच्या कादंबरीला जो विरोध झाल्याचे `आवरण`मध्ये वर्णन आले आहे, तसाच विरोध `आवरण`ला होताना दिसत आहे. कादंबरीकाराचे हे यशच म्हटले पाहिजे!
`आवरण`मधील रझियाच्या कादंबरीवर सरकार बंदी घालते, तेव्हा आमीरही रझियाच्या मदतील धावून येतो. कारण रझियाच्या कादंबरीने त्याचे डोळे उघडतात.
रझियाने आपल्या कादंबरी लेखनासाठी ज्या इतिहास ग्रंथांचा आधार घेतलेला असतो, ती संदर्भग्रंथांची यादी न्यायालयीन लढ्यासाठी घेण्यात येते. १३६ ग्रंथांची सूची बनवून त्याआधारे कादंबरीवरील बंदीविरोधात न्यायालयीन लढा देण्याचा निर्धार लक्ष्मी आणि आमीर करतात आणि येथे आवरण कादंबरी समाप्त होते.
`भैरप्पा` यांची लेखनशैली वाचकाला खिळवून ठेवणारी आहे. कादंबरीतील वर्तमान संदर्भ खूपच बोलके आणि जिवंत आहेत. `गिरीश कर्नाड`, `यू.आर. अनंतमूर्ती` आदी विचारवंत आणि साहित्यिक मंडळींचे ढोंग उघड करणारी काही पात्रे कादंबरीत अतिशय जिवंतपणे साकारली आहेत.
काहीजणांना वाटते की, कादंबरीतील `प्राध्यापक शास्त्री` हे पात्र `यू.आर. अनंतमूर्ती` यांच्यावरच आधारलेले आहे. धर्मनिरपेक्षता, पुरोगामी, आधुनिक विचारांचे म्हणवून घेणारी ही मंडळी सत्याचा अपलाप कशा रीतीने करतात, हे `आवरण`मधून अतिशय खुबीने व प्रभावीपणे मांडले आहे. त्यामुळेच ही सेक्युलर टोळी `आवरण`वर तुटून पडताना दिसत आहे.
`आवरण`मधील भूमिका ही १३६ ग्रंथांच्या आधारे संदर्भपृष्ठांसह मांडल्याने सेक्युलरांच्या टीकेला वेगळे उत्तर देण्याची आवश्यकताच राहिलेली नाही, यात लेखकाचे चातुर्य दिसून येते.
मोजक्या शब्दांत मोठा आणि मार्मिक आशय व्यक्त करण्याची लेखकाची शैली वाचकास चिंतनाला प्रेरित करते. पुढील काही उदाहरणे पहा...
*_"विस्मरणाने सत्य झाकोळून टाकणाऱ्या मायेला `आवरण` म्हणतात आणि असत्य बिंबविणाऱ्या कार्याला `विक्षेप` असे म्हटले जाते. व्यक्तिगत पातळीवर चालणाऱ्या या क्रियेला `अविद्या` आणि सामूहिक अथवा जागतिक पातळीवर चालणाऱ्या या क्रियेला `माया` म्हटलं जातं.``_*
*_"...आपल्या व्यतिरिक्त इतर कुणाचीही आराधना करणाऱ्या भक्ताला तो सतत जाळणाऱ्या नरकात टाकून देतो. अशा प्रकारच्या देवाची निर्मिती करणारेही अशाच मत्सरी स्वभावाचे आहेत, असा याचा अर्थ नाही का होत? `मी फक्त एकटा आहे, तिथे इतर कुणाला जागाच नाही`, असं म्हणणारा; काम-क्रोध-मद-मत्सर असलेला देव निर्माण करणारा धर्म तरी कसला?"_*
*_"औरंगजेबानं विश्वनाथ मंदिराचा विध्वंस करून त्या जागी उभारलेल्या मशिदीचं, काटेरी कुंपण बांधून सशस्त्र सैनिक रक्षण करताहेत.``_*
*_"...मागे कुणीतरी केलेल्या चुकांसाठी आजचे जबाबदार नाहीत हे तर खरंच, पण मागच्याशी नातं जोडून `आपण त्यांचेच वारसदार` या भावनेत आपण अडकणार असू तर त्यांनी केलेल्या कर्माची जबाबदारीही स्वीकारावी लागेल.``_*
Ravji Lute गेली तीन-चार दशके कन्नड भाषेतील सर्वाधिक खपाचे कादंबरीकार आहेत - #डॉएसएलभैरप्पा!आजवर त्यांनी #21कादंबऱ्या लिहिल्या आणि त्या सर्वच लोकप्रियही ठरल्या. भारतातल्या आघाडीच्या कादंबरीकारांमध्ये भैरप्पा यांचे स्थान वरचे आहे. ते सिद्धहस्त लेखक आहेत. केवळ कल्पना आणि लालित्यशैलीच्या बळावर कादंबऱ्या प्रसवणाऱ्या लेखकांच्या कुळातले हे नाहीत. कुठल्याही विषयावर लिखाण करण्याआधी त्या विषयाचा सर्व अंगाने अभ्यास-वाचन करतात.भरपूर परिश्रम घेतात. त्या विषयातील तज्ज्ञांशी विचारविमर्ष करतात. "पर्व" ही कादंबरी लिहिण्यापूर्वी त्यांनी तब्बल साडेसहा वर्षे महाभारतकालीन जीवनविषयक ग्रंथांचा अभ्यास केला होता.
कोट्यवधी हिंदूचे आद्य आराध्य दैवत असलेल्या #काशी विश्वनाथाला दरवर्षी पंचवीस कोटी लोक जातात पण तिथे जी मस्जीद आहे तेच मूळचे काशी विश्वनाथाचे मंदीर आहे. आपण जिथे नमस्कार करतो ते मूळ मंदीर नाही हे लक्षात आल्यावर मूळ मंदिराच्या स्थळावर नमस्कार करण्याची इच्छा तीव्र होते. कोट्यवधी भारतीयांच्या या इच्छेला सुप्रसिद्ध कन्नड कादंबरीकार डॉ एस.एल. भैरप्पा यांनी #आवरण"या कादंबरीतून वाचा फोडली आणि ती कादंबरी केवळ कन्नड वाचकांची न राहता भारतीयांची झाली. कन्नड भाषेत पंचवीस आवृत्या निघाल्या आणि अन्य भारतीय भाषांच्या आवृत्त्या दररोज वाढत आहेत.
फेब्रुवारी 2007 मध्ये "आवरण" प्रकाशित झाली. #2009 पर्यंतच हिची #22पुनर्मुद्रणे झाली. तीन वर्षांत या कादंबरीवर 10 चर्चासत्रे झाली. या पुस्तकावर 10 पुस्तके प्रकाशित झाली, त्यापैकी 4 पुस्तके ही "आवरण`वर टीका करणारी आहेत. आवरणने कन्नड पुस्तकांच्या खपाचे आजवरचे सारे विक्रम मोडून काढले आहेत.
वाचकांनी या कादंबरीला डोक्यावर घेतले आहे, तर दुसऱ्या बाजूला ज्ञानपीठ पुरस्कार विजेते यू.आर. अनंतमूर्ती, गिरीश कर्नाड, चंद्रशेखर कंबार अशा नामवंत कन्नड लेखक-नाटककारांनी या कादंबरीवर टीकेची झोड उठवली आहे.
गंमत म्हणजे जी नामवंत विचारवंत मंडळी आवरणवर तुटून पडताहेत, टीका करताहेत त्या प्रवृत्तीची पात्रे कादंबरीत आहेत. सत्य झाकोळणाऱ्या या प्रवृत्तीला पुराव्यानिशी उघडे पाडणे हा या कादंबरीचा गाभा आहे.
सत्य कोणाच्या रागालोभाची पर्वा करीत नाही. एका अर्थाने आवरण ही सत्यनिष्ठ कादंबरी आहे. "हिडन टॉरिझन्स : 1000 ईयर्स ऑफ इंडियन सिव्हिलायझेशन`चे लेखक एन.एस. राजाराम यांनी आवरणची तुलना डॅन ब्राऊन यांच्या विश्वविख्यात *"दा-विंची कोड"* या कादंबरीशी केली आहे. स्वार्थी आणि प्रभावी शक्तींनी खरा इतिहास दडपून ठेवून खोट्या इतिहासाचा प्रचार करणं, हे दोन्ही कलाकृतींमधील समान सूत्र आहे.
कादंबरीची सुरुवात #फ्लॅश बॅकपद्धतीने होते. ही कादंबरी ऐतिहासिक आणि वर्तमान या दोन स्तरांवर उलगडत जाते. 1992 साली बाबरी ढांचा पाडण्यात आल्यानंतर समाजात धार्मिक सलोखा निर्माण व्हावा यासाठी सरकार प्रयत्नशील असते. त्यानुसार प्राचीन वास्तू-शिल्पांवर आधारित माहितीपट निर्माण करण्याचे काम आमीर आणि रझिया कुरेशी यांच्यावर सोपविण्यात येते. माहितीपटाच्या प्राथमिक तयारीसाठी दोघेही विजयनगर (हंपी) येथे येतात. तेथील उद्ध्वस्त मंदिरे पाहून रझिया अंतर्मुख बनते.
#रझिय ही पूर्वाश्रमीची हिंदू असते. लक्ष्मी तिचं आधीचं नाव. आमीरच्या प्रेमात पडून तिने धर्मांतर केलेले असते. घरातून वडिलांचा विरोध असूनही पुरोगामी विचारांच्या प्राध्यापक शास्त्री यांच्या प्रोत्साहनामुळे आणि आमीरच्या आधुनिक विचारांमुळे ती मुस्लिम बनते. हिंदू धर्मावर टीका करणे आणि प्रस्थापित विचारवंतांच्या वर्तुळात वावरणे यामुळे ती सतत प्रसिद्धीत असते. याच सुमारास विजयनगरच्या भग्न अवशेषांनी ती अंतर्मुख होऊन सत्य जाणण्याचा प्रयत्न करू लागते.
रझिया सत्यावर आधारित डॉक्युमेंटरीचा आग्रह धरू लागते अन् आमीर मात्र सत्याशी प्रतारणा करीत असल्याचे तिच्या ध्यानात येऊ लागते. दरम्यान तिच्या वडिलांचे - आप्पांचे निधन होते. लक्ष्मी तब्बल 28 वर्षांनंतर आपल्या गावी पोचते. कादंबरीला खऱ्या अर्थाने कलाटणी मिळते ती इथे. रझियाला छळणाऱ्या प्रश्नांची उत्तरे मिळण्याची आशा तिच्या मनात येथे निर्माण होते. तिच्या वडिलांनी एकत्रित केलेली ग्रंथसंपदा तिच्या हाती लागलेली असते. आप्पांनी काढलेली टिपणे आणि त्यांचा व्यासंग पाहून लक्ष्मी स्तिमित होते. तिथेच राहून अभ्यास करायचा निर्णय ती घेते. लक्ष्मीने परधर्मात जाऊन विवाह केल्यानंतर आप्पांनी मुस्लिम धर्म, मुस्लिम चालीरीती, त्यांची आक्रमणे, भारतात आणि भारताबाहेर घडविलेला विध्वंस यांचा अभ्यास सुरू केलेला असतो. यावर आधारित एक गंभीर पुस्तक लिहायचा त्यांचा निर्धार असतो, पण त्यांच्या मृत्यूने ते काम अधुरे राहिलेले असते. वडिलांनी जमविलेली पुस्तके आणि त्यांनी काढलेली टिपणे यांच्या सहाय्याने ते अधुरे काम पूर्ण करण्याचे लक्ष्मी ठरवते. ही कादंबरीतील कादंबरी फारच अप्रतिम आहे. ती स्वत: वाचण्याचा आनंद प्रत्येकाने घेतलाच पाहिजे.
दरम्यानच्या काळात आमीर रझियापासून मानसिकदृष्ट्या दूर होऊ लागतो. या वयात तो एका कोवळ्या मुस्लिम मुलीशी निकाह करतो. दरम्यान प्राध्यापक शास्त्री यांच्या आईचे निधन होते. या काळातील पुरोगामी म्हणवून घेणारे प्राध्यापक शास्त्री आणि आधुनिक विचारांचा बुरखा पांघरणारा आमीर यांचे चित्रण खूपच प्रत्ययकारी झाले आहे. या पात्रांचे वर्तन वाचताना आजच्या समाजातील ढोंगी पुरोगामी विचारवंत-लेखक आपसूकच डोळ्यांसमोर तरळू लागतात. सध्याचे वास्तवच अत्यंत अचूकपणे लेखकाने या पात्रांच्या माध्यमातून समोर आणले आहे.
याच काळात इतिहास पुनर्लेखनाविषयी प्रा. शास्त्री यांच्या अध्यक्षतेखाली सरकारकडून एका परिषदेचे आयोजन करण्यात येते. या परिषदेला रझियालाही आमंत्रण असते. मुस्लिमांच्या तुष्टीकरणाचा इतिहास पुढे रेटण्याचा प्रयत्न होतो, तेव्हा रझिया पुराव्यानिशी या गोष्टीला विरोध करते. शास्त्रींसाठी ही घटना अनपेक्षित असते. पुढील परिषदेसाठी रझियाचा पत्ता कट होतो. कादंबरीतला हा भाग देशातील विविध विद्यापीठांतील विचारवंत म्हणवून घेणाऱ्यांचे चारित्र्य उघडे पाडणारा आहे. इतिहासाचे पुनर्लेखन, भगवेकरण आदी वारंवार चर्चेत येणाऱ्या वादांमागील सत्य समजून घेण्यासाठी इतिहासाच्या अभ्यासकांनी हा भाग आवर्जून वाचलाच पाहिजे.
स्वत:ला निधर्मी, #सेक्युलर समजणारे विचारवंतांचे खरे स्वरूप अतिशय जिवतंरीत्या कादंबरीच्या शेवटच्या भागात साकारले आहे.
लक्ष्मीच्या कादंबरीतील नायक रजपूत राजपुत्र आहे. युद्धात पराभव झाल्याने त्याला गुलाम म्हणून राहावे लागते आहे. त्याचे बीज फोडून त्याला खोजा म्हणून जनानखान्यात ठेवलेलं असतं. हा आता इस्लामच्या प्रभावाखाली आलेला असतो. या खोजाच्या माध्यमातून लक्ष्मीची कादंबरी उलगडत जाते. या राजपुत्राच्या वाट्याला काय काय येतं? काशी विश्वनाथाचे मंदिर उद्ध्वस्त होतानाचा प्रसंग, गंगेच्या किनारी भेटलेल्या साधूशी संवाद आणि त्यातून त्याच्या मनाला आलेली उभारी हे सारं प्रत्यक्ष कादंबरीतच वाचा. आता तो खोजा छ. शिवरायांच्या प्रेरणेने स्वातंत्र्याचा बिगुल वाजविणाऱ्या छत्रसालाकडे जायला निघतो आणि रझियाच्या कादंबरीचा शेवट होतो, पण त्या कादंबरीच्या प्रकाशनानंतर उठलेला हलकल्लोळ, वेगाने घडणाऱ्या घडामोडी "आवरण`च्या शेवटच्या भागात रेखाटले आहे. आवरणमधील रझियाच्या कादंबरीला जो विरोध झाल्याचे आवरणमध्ये वर्णन आले आहे, तसाच विरोध आवरणला होताना दिसत आहे. कादंबरीकाराचे हे यशच म्हटले पाहिजे.
आवरणमधील रझियाच्या कादंबरीवर सरकार बंदी घालते, तेव्हा आमीरही रझियाच्या मदतील धावून येतो. कारण रझियाच्या कादंबरीने त्याचे डोळे उघडतात. रझियाने आपल्या कादंबरी लेखनासाठी ज्या इतिहास ग्रंथांचा आधार घेतलेला असतो, ती संदर्भग्रंथांची यादी न्यायालयीन लढ्यासाठी घेण्यात येते. 136 ग्रंथांची सूची बनवून त्याआधारे कादंबरीवरील बंदीविरोधात न्यायालयीन लढा देण्याचा निर्धार लक्ष्मी आणि आमीर करतात आणि येथे आवरण कादंबरी समाप्त होते.
भैरप्पा यांची लेखनशैली वाचकाला खिळवून ठेवणारी आहे. कादंबरीतील वर्तमान संदर्भ खूपच बोलके आणि जिवंत आहेत. गिरीश कर्नाड, यू.आर. अनंतमूर्ती आदी विचारवंत आणि साहित्यिक मंडळींचे ढोंग उघड करणारी काही पात्रे कादंबरीत अतिशय जिवंतपणे साकारली आहेत. काहीजणांना वाटते की, कादंबरीतील प्राध्यापक शास्त्री हे पात्र यू.आर. अनंतमूर्ती यांच्यावरच आधारलेले आहे. धर्मनिरपेक्षता, पुरोगामी, आधुनिक विचारांचे म्हणवून घेणारी ही मंडळी सत्याचा अपलाप कशारीतीने करतात, हे "आवरण`मधून अतिशय खुबीने व प्रभावीपणे मांडले आहे. त्यामुळेच ही सेक्युलर टोळी "आवरण`वर तुटून पडताना दिसत आहे. "आवरण`मधील भूमिका ही 136 ग्रंथांच्या आधारे संदर्भपृष्ठांसह मांडल्याने सेक्युलरांच्या टीकेला वेगळे उत्तर देण्याची आवश्यकताच राहिलेली नाही, यात लेखकाचे चातुर्य दिसून येते.
वमोजक्या शब्दांत मोठा आणि मार्मिक आशय व्यक्त करण्याची लेखकाची शैली वाचकास चिंतनाला प्रेरित करते. पुढील काही उद्धरणे पाहा...
"विस्मरणाने सत्य झाकोळून टाकणाऱ्या मायेला "आवरण` म्हणतात आणि असत्य बिंबविणाऱ्या कार्याला "विक्षेप` असे म्हटले जाते. व्यक्तिगत पातळीवर चालणाऱ्या या क्रियेला "अविद्या` आणि सामूहिक अथवा जागतिक पातळीवर चालणाऱ्या या क्रियेला "माया` म्हटलं जातं.``
... आपल्या व्यतिरिक्त इतर कुणाचीही आराधना करणाऱ्या भक्ताला तो सतत जाळणाऱ्या नरकात टाकून देतो. अशा प्रकारच्या देवाची निर्मिती करणारेही अशाच मत्सरी स्वभावाचे आहेत, असा याचा अर्थ नाही का होत? मी फक्त एकटा आहे, तिथे इतर कुणाला जागाच नाही, असं म्हणणारा; काम-क्रोध-मद-मत्सर असलेला देव निर्माण करणारा धर्म तरी कसला?``
#औरंगजेबानं विश्वनाथ मंदिराचा विद्ध्वंस करून त्या जागी उभारलेल्या मशिदीचं, काटेरी कुंपण बांधून सशस्त्र सैनिक रक्षण करताहेत.``
""... मागे कुणीतरी केलेल्या चुकांसाठी आजचे जबाबदार नाहीत हे तर खरंच, पण मागच्याशी नातं जोडून "आपण त्यांचेच वारसदार` या भावनेत आपण अडकणार असू तर त्यांनी केलेल्या कर्माची जबाबदारीही स्वीकारावी लागेल.``
Shrikant Adhavगेली तीन-चार दशके कन्नड भाषेतील सर्वाधिक खपाचे कादंबरीकार आहेत - *डॉ. एस. एल. भैरप्पा.*
आजवर त्यांनी २१ कादंबऱ्या लिहिल्या आणि त्या सर्वच लोकप्रियही ठरल्या. भारतातल्या आघाडीच्या कादंबरीकारांमध्ये `भैरप्पा` यांचे स्थान वरचे आहे.
ते सिद्धहस्त लेखक आहेत. केवळ कल्पना आणि लालित्यशैलीच्या बळावर कादंबऱ्या प्रसवणाऱ्या लेखकांच्या कुळातले हे नाहीत. कुठल्याही विषयावर लिखाण करण्याआधी त्या विषयाचा सर्व अंगाने अभ्यास-वाचन करतात. भरपूर परिश्रम घेतात. त्या विषयातील तज्ज्ञांशी विचारविमर्ष करतात.
*`पर्व`* ही कादंबरी लिहिण्यापूर्वी त्यांनी तब्बल साडेसहा वर्षे महाभारतकालीन जीवनविषयक ग्रंथांचा अभ्यास केला होता!
कोट्यवधी हिंदूचे आद्य आराध्य दैवत असलेल्या काशी विश्वनाथाला दरवर्षी पंचवीस कोटी लोक जातात पण *तिथे जी मस्जीद आहे तेच मूळचे `काशी विश्वनाथा`चे मंदीर आहे.* आपण जिथे नमस्कार करतो ते मूळ मंदीर नाही हे लक्षात आल्यावर मूळ मंदिराच्या स्थळावर नमस्कार करण्याची इच्छा तीव्र होते.
कोट्यवधी भारतीयांच्या या इच्छेला सुप्रसिद्ध कन्नड कादंबरीकार डॉ एस.एल. भैरप्पा यांनी *`आवरण`* या कादंबरीतून वाचा फोडली आणि ती कादंबरी केवळ कन्नड वाचकांची न राहता भारतीयांची झाली. कन्नड भाषेत या कादंबरीच्या पंचवीस आवृत्या निघाल्या आणि अन्य भारतीय भाषांच्या आवृत्त्या दररोज वाढत आहेत.
फेब्रुवारी २००७ मध्ये *`आवरण`* प्रकाशित झाली. आणि २००९ पर्यंतच हिची *२२ पुनर्मुद्रणे* झाली!
तीन वर्षांत या कादंबरीवर १० चर्चासत्रे झाली.
या पुस्तकावर १० पुस्तके प्रकाशित झाली, त्यापैकी ४ पुस्तके ही *`आवरण`वर टीका करणारी आहेत.*
आवरणने कन्नड पुस्तकांच्या खपाचे आजवरचे सारे विक्रम मोडून काढले आहेत.
वाचकांनी या कादंबरीला डोक्यावर घेतले आहे, तर दुसऱ्या बाजूला ज्ञानपीठ पुरस्कार विजेते `यू.आर. अनंतमूर्ती`, `गिरीश कर्नाड`, `चंद्रशेखर कंबार` अशा नामवंत कन्नड लेखक-नाटककारांनी या कादंबरीवर टीकेची झोड उठवली आहे.
गंमत म्हणजे जी नामवंत विचारवंत मंडळी आवरणवर तुटून पडताहेत, टीका करताहेत, त्या प्रवृत्तीची पात्रे कादंबरीत आहेत! *सत्य झाकोळणाऱ्या या प्रवृत्तीला पुराव्यानिशी उघडे पाडणे* हा या कादंबरीचा गाभा आहे.
सत्य कोणाच्या रागालोभाची पर्वा करीत नाही. एका अर्थाने आवरण ही *सत्यनिष्ठ* कादंबरी आहे. _`हिडन टॉरिझन्स : 1000 ईयर्स ऑफ इंडियन सिव्हिलायझेशन`_ चे लेखक `एन.एस. राजाराम` यांनी `आवरण`ची तुलना `डॅन ब्राऊन` यांच्या विश्वविख्यात _`दा-विंची कोड`_ या कादंबरीशी केली आहे.
स्वार्थी आणि प्रभावी शक्तींनी खरा इतिहास दडपून ठेवून खोट्या इतिहासाचा प्रचार करणं, हे दोन्ही कलाकृतींमधील `समान सूत्र` आहे.
कादंबरीची सुरुवात `फ्लॅश बॅक` पद्धतीने होते. ही कादंबरी ऐतिहासिक आणि वर्तमान या दोन स्तरांवर उलगडत जाते. १९९२ साली बाबरी ढांचा पाडण्यात आल्यानंतर समाजात धार्मिक सलोखा निर्माण व्हावा यासाठी सरकार प्रयत्नशील असते. त्यानुसार प्राचीन वास्तू-शिल्पांवर आधारित माहितीपट निर्माण करण्याचे काम *`आमीर`* आणि *`रझिया कुरेशी`* यांच्यावर सोपविण्यात येते. माहितीपटाच्या प्राथमिक तयारीसाठी दोघेही *विजयनगर (हंपी)* येथे येतात. तेथील उद्ध्वस्त मंदिरे पाहून रझिया अंतर्मुख बनते.
`रझिया` ही पूर्वाश्रमीची हिंदू असते. *`लक्ष्मी`* तिचं आधीचं नाव. आमीरच्या प्रेमात पडून तिने धर्मांतर केलेले असते. घरातून वडिलांचा विरोध असूनही पुरोगामी विचारांच्या `प्राध्यापक शास्त्री` यांच्या प्रोत्साहनामुळे आणि आमीरच्या आधुनिक विचारांमुळे ती मुस्लिम बनते. हिंदू धर्मावर टीका करणे आणि प्रस्थापित विचारवंतांच्या वर्तुळात वावरणे यामुळे ती सतत प्रसिद्धीत असते. याच सुमारास विजयनगरच्या भग्न अवशेषांनी ती अंतर्मुख होऊन सत्य जाणण्याचा प्रयत्न करू लागते.
रझिया सत्यावर आधारित डॉक्युमेंटरीचा आग्रह धरू लागते अन् आमीर मात्र सत्याशी प्रतारणा करीत असल्याचे तिच्या ध्यानात येऊ लागते. दरम्यान तिच्या वडिलांचे - आप्पांचे निधन होते. लक्ष्मी तब्बल २८ वर्षांनंतर आपल्या गावी पोचते.
*कादंबरीला खऱ्या अर्थाने कलाटणी मिळते ती इथे...*
रझियाला छळणाऱ्या प्रश्नांची उत्तरे मिळण्याची आशा तिच्या मनात येथे निर्माण होते. तिच्या वडिलांनी एकत्रित केलेली ग्रंथसंपदा तिच्या हाती लागलेली असते. आप्पांनी काढलेली टिपणे आणि त्यांचा व्यासंग पाहून लक्ष्मी स्तिमित होते. तिथेच राहून अभ्यास करायचा निर्णय ती घेते.
लक्ष्मीने परधर्मात जाऊन विवाह केल्यानंतर आप्पांनी मुस्लिम धर्म, मुस्लिम चालीरीती, त्यांची आक्रमणे, भारतात आणि भारताबाहेर घडविलेला विध्वंस यांचा अभ्यास सुरू केलेला असतो. यावर आधारित एक गंभीर पुस्तक लिहायचा त्यांचा निर्धार असतो, पण त्यांच्या मृत्यूने ते काम अधुरे राहिलेले असते.
वडिलांनी जमविलेली पुस्तके आणि त्यांनी काढलेली टिपणे यांच्या सहाय्याने ते अधुरे काम पूर्ण करण्याचे लक्ष्मी ठरवते. _(ही कादंबरीतील कादंबरी फारच अप्रतिम आहे. ती स्वत: वाचण्याचा आनंद प्रत्येकाने घेतलाच पाहिजे.)_
दरम्यानच्या काळात आमीर रझियापासून मानसिकदृष्ट्या दूर होऊ लागतो. या वयात तो एका कोवळ्या मुस्लिम मुलीशी निकाह करतो. दरम्यान प्राध्यापक शास्त्री यांच्या आईचे निधन होते. या काळातील पुरोगामी म्हणवून घेणारे `प्राध्यापक शास्त्री` आणि आधुनिक विचारांचा बुरखा पांघरणारा `आमीर` यांचे चित्रण खूपच प्रत्ययकारी झाले आहे.
या पात्रांचे वर्तन वाचताना आजच्या समाजातील ढोंगी पुरोगामी विचारवंत-लेखक आपसूकच डोळ्यांसमोर तरळू लागतात. सध्याचे वास्तवच अत्यंत अचूकपणे लेखकाने या पात्रांच्या माध्यमातून समोर आणले आहे.
याच काळात `इतिहास पुनर्लेखना`विषयी प्रा. शास्त्री यांच्या अध्यक्षतेखाली सरकारकडून एका परिषदेचे आयोजन करण्यात येते. या परिषदेला रझियालाही आमंत्रण असते.
मुस्लिमांच्या तुष्टीकरणाचा इतिहास पुढे रेटण्याचा प्रयत्न होतो, तेव्हा रझिया पुराव्यानिशी या गोष्टीला विरोध करते. शास्त्रींसाठी ही घटना अनपेक्षित असते. पुढील परिषदेसाठी रझियाचा `पत्ता कट` होतो.
कादंबरीतला हा भाग देशातील विविध विद्यापीठांतील विचारवंत म्हणवून घेणाऱ्यांचे चारित्र्य उघडे पाडणारा आहे. इतिहासाचे पुनर्लेखन, भगवेकरण आदी वारंवार चर्चेत येणाऱ्या वादांमागील सत्य समजून घेण्यासाठी इतिहासाच्या अभ्यासकांनी हा भाग आवर्जून वाचलाच पाहिजे.
स्वत:ला निधर्मी, सेक्युलर समजणारे विचारवंतांचे खरे स्वरूप अतिशय जिवतंरीत्या कादंबरीच्या शेवटच्या भागात साकारले आहे.
लक्ष्मीच्या कादंबरीतील नायक रजपूत राजपुत्र आहे. युद्धात पराभव झाल्याने त्याला गुलाम म्हणून राहावे लागते आहे. त्याचे बीज फोडून त्याला खोजा म्हणून जनानखान्यात ठेवलेलं असतं. हा आता इस्लामच्या प्रभावाखाली आलेला असतो.
या खोजाच्या माध्यमातून लक्ष्मीची कादंबरी उलगडत जाते.
`या राजपुत्राच्या वाट्याला काय काय येतं?`
`काशी विश्वनाथाचे मंदिर उद्ध्वस्त होतानाचा प्रसंग`, `गंगेच्या किनारी भेटलेल्या साधूशी संवाद आणि त्यातून त्याच्या मनाला आलेली उभारी`...
हे सारं प्रत्यक्ष कादंबरीतच वाचा.
आता तो खोजा छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेने *स्वातंत्र्याचा बिगुल वाजविणाऱ्या* छत्रसालाकडे जायला निघतो आणि रझियाच्या कादंबरीचा शेवट होतो, पण त्या कादंबरीच्या प्रकाशनानंतर उठलेला हलकल्लोळ, वेगाने घडणाऱ्या घडामोडी *`आवरण`* च्या शेवटच्या भागात रेखाटले आहे.
`आवरण`मधील रझियाच्या कादंबरीला जो विरोध झाल्याचे `आवरण`मध्ये वर्णन आले आहे, तसाच विरोध `आवरण`ला होताना दिसत आहे. कादंबरीकाराचे हे यशच म्हटले पाहिजे!
`आवरण`मधील रझियाच्या कादंबरीवर सरकार बंदी घालते, तेव्हा आमीरही रझियाच्या मदतील धावून येतो. कारण रझियाच्या कादंबरीने त्याचे डोळे उघडतात.
रझियाने आपल्या कादंबरी लेखनासाठी ज्या इतिहास ग्रंथांचा आधार घेतलेला असतो, ती संदर्भग्रंथांची यादी न्यायालयीन लढ्यासाठी घेण्यात येते. १३६ ग्रंथांची सूची बनवून त्याआधारे कादंबरीवरील बंदीविरोधात न्यायालयीन लढा देण्याचा निर्धार लक्ष्मी आणि आमीर करतात आणि येथे आवरण कादंबरी समाप्त होते.
`भैरप्पा` यांची लेखनशैली वाचकाला खिळवून ठेवणारी आहे. कादंबरीतील वर्तमान संदर्भ खूपच बोलके आणि जिवंत आहेत. `गिरीश कर्नाड`, `यू.आर. अनंतमूर्ती` आदी विचारवंत आणि साहित्यिक मंडळींचे ढोंग उघड करणारी काही पात्रे कादंबरीत अतिशय जिवंतपणे साकारली आहेत.
काहीजणांना वाटते की, कादंबरीतील `प्राध्यापक शास्त्री` हे पात्र `यू.आर. अनंतमूर्ती` यांच्यावरच आधारलेले आहे. धर्मनिरपेक्षता, पुरोगामी, आधुनिक विचारांचे म्हणवून घेणारी ही मंडळी सत्याचा अपलाप कशा रीतीने करतात, हे `आवरण`मधून अतिशय खुबीने व प्रभावीपणे मांडले आहे. त्यामुळेच ही सेक्युलर टोळी `आवरण`वर तुटून पडताना दिसत आहे.
`आवरण`मधील भूमिका ही १३६ ग्रंथांच्या आधारे संदर्भपृष्ठांसह मांडल्याने सेक्युलरांच्या टीकेला वेगळे उत्तर देण्याची आवश्यकताच राहिलेली नाही, यात लेखकाचे चातुर्य दिसून येते.
मोजक्या शब्दांत मोठा आणि मार्मिक आशय व्यक्त करण्याची लेखकाची शैली वाचकास चिंतनाला प्रेरित करते. पुढील काही उदाहरणे पहा...
*_"विस्मरणाने सत्य झाकोळून टाकणाऱ्या मायेला `आवरण` म्हणतात आणि असत्य बिंबविणाऱ्या कार्याला `विक्षेप` असे म्हटले जाते. व्यक्तिगत पातळीवर चालणाऱ्या या क्रियेला `अविद्या` आणि सामूहिक अथवा जागतिक पातळीवर चालणाऱ्या या क्रियेला `माया` म्हटलं जातं.``_*
*_"...आपल्या व्यतिरिक्त इतर कुणाचीही आराधना करणाऱ्या भक्ताला तो सतत जाळणाऱ्या नरकात टाकून देतो. अशा प्रकारच्या देवाची निर्मिती करणारेही अशाच मत्सरी स्वभावाचे आहेत, असा याचा अर्थ नाही का होत? `मी फक्त एकटा आहे, तिथे इतर कुणाला जागाच नाही`, असं म्हणणारा; काम-क्रोध-मद-मत्सर असलेला देव निर्माण करणारा धर्म तरी कसला?"_*
*_"औरंगजेबानं विश्वनाथ मंदिराचा विध्वंस करून त्या जागी उभारलेल्या मशिदीचं, काटेरी कुंपण बांधून सशस्त्र सैनिक रक्षण करताहेत.``_*
*_"...मागे कुणीतरी केलेल्या चुकांसाठी आजचे जबाबदार नाहीत हे तर खरंच, पण मागच्याशी नातं जोडून `आपण त्यांचेच वारसदार` या भावनेत आपण अडकणार असू तर त्यांनी केलेल्या कर्माची जबाबदारीही स्वीकारावी लागेल.``_*
Ravji Lute कोट्यवधी हिंदूचे आद्य आराध्य दैवत असलेल्या #काशी_विश्वनाथाला दरवर्षी पंचवीस कोटी लोक जातात पण तिथे जी मस्जीद आहे तेच मूळचे काशी विश्वनाथाचे मंदीर आहे. आपण जिथे नमस्कार करतो ते मूळ मंदीर नाही. हे लक्षात आल्यावर मूळ मंदिराच्या स्थळावर नमस्कार करण्याची इच्छा तीव्र होते. कोट्यवधी भारतीयांच्या या इच्छेला सुप्रसिद्ध कन्नड कादंबरीकार डॉ एस.एल. भैरप्पा यांनी "आवरण"या कादंबरीतून वाचा फोडली आणि ती कादंबरी केवळ कन्नड वाचकांची न राहता भारतीयांची झाली. कन्नड भाषेत पंचवीस आवृत्या निघाल्या आणि अन्य भारतीय भाषांच्या आवृत्त्या दररोज वाढत आहेत.
फेब्रुवारी 2007 मध्ये "आवरण" प्रकाशित झाली. 2009 पर्यंतच हिची 22 पुनर्मुद्रणे झाली. तीन वर्षांत या कादंबरीवर 10 चर्चासत्रे झाली. या पुस्तकावर 10 पुस्तके प्रकाशित झाली, त्यापैकी 4 पुस्तके ही "आवरण`वर टीका करणारी आहेत. आवरणने कन्नड पुस्तकांच्या खपाचे आजवरचे सारे विक्रम मोडून काढले आहेत.
वाचकांनी या कादंबरीला डोक्यावर घेतले आहे, तर दुसऱ्या बाजूला ज्ञानपीठ पुरस्कार विजेते यू.आर. अनंतमूर्ती, गिरीश कर्नाड, चंद्रशेखर कंबार अशा नामवंत कन्नड लेखक-नाटककारांनी या कादंबरीवर टीकेची झोड उठवली आहे.
गंमत म्हणजे जी नामवंत विचारवंत मंडळी आवरणवर तुटून पडताहेत, टीका करताहेत त्या प्रवृत्तीची पात्रे कादंबरीत आहेत. सत्य झाकोळणाऱ्या या प्रवृत्तीला पुराव्यानिशी उघडे पाडणे हा या कादंबरीचा गाभा आहे.
सत्य कोणाच्या रागालोभाची पर्वा करीत नाही. एका अर्थाने आवरण ही सत्यनिष्ठ कादंबरी आहे. "हिडन टॉरिझन्स : 1000 ईयर्स ऑफ इंडियन सिव्हिलायझेशन`चे लेखक एन.एस. राजाराम यांनी आवरणची तुलना डॅन ब्राऊन यांच्या विश्वविख्यात *"दा-विंची कोड"* या कादंबरीशी केली आहे. स्वार्थी आणि प्रभावी शक्तींनी खरा इतिहास दडपून ठेवून खोट्या इतिहासाचा प्रचार करणं, हे दोन्ही कलाकृतींमधील समान सूत्र आहे.
कादंबरीची सुरुवात फ्लॅश बॅकपद्धतीने होते. ही कादंबरी ऐतिहासिक आणि वर्तमान या दोन स्तरांवर उलगडत जाते. 1992 साली बाबरी ढांचा पाडण्यात आल्यानंतर समाजात धार्मिक सलोखा निर्माण व्हावा यासाठी सरकार प्रयत्नशील असते. त्यानुसार प्राचीन वास्तू-शिल्पांवर आधारित माहितीपट निर्माण करण्याचे काम आमीर आणि रझिया कुरेशी यांच्यावर सोपविण्यात येते. माहितीपटाच्या प्राथमिक तयारीसाठी दोघेही विजयनगर (हंपी) येथे येतात. तेथील उद्ध्वस्त मंदिरे पाहून रझिया अंतर्मुख बनते.
रझिय ही पूर्वाश्रमीची हिंदू असते. लक्ष्मी तिचं आधीचं नाव. आमीरच्या प्रेमात पडून तिने धर्मांतर केलेले असते. घरातून वडिलांचा विरोध असूनही पुरोगामी विचारांच्या प्राध्यापक शास्त्री यांच्या प्रोत्साहनामुळे आणि आमीरच्या आधुनिक विचारांमुळे ती मुस्लिम बनते. हिंदू धर्मावर टीका करणे आणि प्रस्थापित विचारवंतांच्या वर्तुळात वावरणे यामुळे ती सतत प्रसिद्धीत असते. याच सुमारास विजयनगरच्या भग्न अवशेषांनी ती अंतर्मुख होऊन सत्य जाणण्याचा प्रयत्न करू लागते.
रझिया सत्यावर आधारित डॉक्युमेंटरीचा आग्रह धरू लागते अन् आमीर मात्र सत्याशी प्रतारणा करीत असल्याचे तिच्या ध्यानात येऊ लागते. दरम्यान तिच्या वडिलांचे - आप्पांचे निधन होते. लक्ष्मी तब्बल 28 वर्षांनंतर आपल्या गावी पोचते. कादंबरीला खऱ्या अर्थाने कलाटणी मिळते ती इथे. रझियाला छळणाऱ्या प्रश्नांची उत्तरे मिळण्याची आशा तिच्या मनात येथे निर्माण होते. तिच्या वडिलांनी एकत्रित केलेली ग्रंथसंपदा तिच्या हाती लागलेली असते. आप्पांनी काढलेली टिपणे आणि त्यांचा व्यासंग पाहून लक्ष्मी स्तिमित होते. तिथेच राहून अभ्यास करायचा निर्णय ती घेते. लक्ष्मीने परधर्मात जाऊन विवाह केल्यानंतर आप्पांनी मुस्लिम धर्म, मुस्लिम चालीरीती, त्यांची आक्रमणे, भारतात आणि भारताबाहेर घडविलेला विध्वंस यांचा अभ्यास सुरू केलेला असतो. यावर आधारित एक गंभीर पुस्तक लिहायचा त्यांचा निर्धार असतो, पण त्यांच्या मृत्यूने ते काम अधुरे राहिलेले असते. वडिलांनी जमविलेली पुस्तके आणि त्यांनी काढलेली टिपणे यांच्या सहाय्याने ते अधुरे काम पूर्ण करण्याचे लक्ष्मी ठरवते. ही कादंबरीतील कादंबरी फारच अप्रतिम आहे. ती स्वत: वाचण्याचा आनंद प्रत्येकाने घेतलाच पाहिजे.
दरम्यानच्या काळात आमीर रझियापासून मानसिकदृष्ट्या दूर होऊ लागतो. या वयात तो एका कोवळ्या मुस्लिम मुलीशी निकाह करतो. दरम्यान प्राध्यापक शास्त्री यांच्या आईचे निधन होते. या काळातील पुरोगामी म्हणवून घेणारे प्राध्यापक शास्त्री आणि आधुनिक विचारांचा बुरखा पांघरणारा आमीर यांचे चित्रण खूपच प्रत्ययकारी झाले आहे. या पात्रांचे वर्तन वाचताना आजच्या समाजातील ढोंगी पुरोगामी विचारवंत-लेखक आपसूकच डोळ्यांसमोर तरळू लागतात. सध्याचे वास्तवच अत्यंत अचूकपणे लेखकाने या पात्रांच्या माध्यमातून समोर आणले आहे.
याच काळात इतिहास पुनर्लेखनाविषयी प्रा. शास्त्री यांच्या अध्यक्षतेखाली सरकारकडून एका परिषदेचे आयोजन करण्यात येते. या परिषदेला रझियालाही आमंत्रण असते. मुस्लिमांच्या तुष्टीकरणाचा इतिहास पुढे रेटण्याचा प्रयत्न होतो, तेव्हा रझिया पुराव्यानिशी या गोष्टीला विरोध करते. शास्त्रींसाठी ही घटना अनपेक्षित असते. पुढील परिषदेसाठी रझियाचा पत्ता कट होतो. कादंबरीतला हा भाग देशातील विविध विद्यापीठांतील विचारवंत म्हणवून घेणाऱ्यांचे चारित्र्य उघडे पाडणारा आहे. इतिहासाचे पुनर्लेखन, भगवेकरण आदी वारंवार चर्चेत येणाऱ्या वादांमागील सत्य समजून घेण्यासाठी इतिहासाच्या अभ्यासकांनी हा भाग आवर्जून वाचलाच पाहिजे.
स्वत:ला निधर्मी, सेक्युलर समजणारे विचारवंतांचे खरे स्वरूप अतिशय जिवतंरीत्या कादंबरीच्या शेवटच्या भागात साकारले आहे.
लक्ष्मीच्या कादंबरीतील नायक रजपूत राजपुत्र आहे. युद्धात पराभव झाल्याने त्याला गुलाम म्हणून राहावे लागते आहे. त्याचे बीज फोडून त्याला खोजा म्हणून जनानखान्यात ठेवलेलं असतं. हा आता इस्लामच्या प्रभावाखाली आलेला असतो. या खोजाच्या माध्यमातून लक्ष्मीची कादंबरी उलगडत जाते. या राजपुत्राच्या वाट्याला काय काय येतं? काशी विश्वनाथाचे मंदिर उद्ध्वस्त होतानाचा प्रसंग, गंगेच्या किनारी भेटलेल्या साधूशी संवाद आणि त्यातून त्याच्या मनाला आलेली उभारी हे सारं प्रत्यक्ष कादंबरीतच वाचा. आता तो खोजा छ. शिवरायांच्या प्रेरणेने स्वातंत्र्याचा बिगुल वाजविणाऱ्या छत्रसालाकडे जायला निघतो आणि रझियाच्या कादंबरीचा शेवट होतो, पण त्या कादंबरीच्या प्रकाशनानंतर उठलेला हलकल्लोळ, वेगाने घडणाऱ्या घडामोडी "आवरण`च्या शेवटच्या भागात रेखाटले आहे. आवरणमधील रझियाच्या कादंबरीला जो विरोध झाल्याचे आवरणमध्ये वर्णन आले आहे, तसाच विरोध आवरणला होताना दिसत आहे. कादंबरीकाराचे हे यशच म्हटले पाहिजे.
आवरणमधील रझियाच्या कादंबरीवर सरकार बंदी घालते, तेव्हा आमीरही रझियाच्या मदतील धावून येतो. कारण रझियाच्या कादंबरीने त्याचे डोळे उघडतात. रझियाने आपल्या कादंबरी लेखनासाठी ज्या इतिहास ग्रंथांचा आधार घेतलेला असतो, ती संदर्भग्रंथांची यादी न्यायालयीन लढ्यासाठी घेण्यात येते. 136 ग्रंथांची सूची बनवून त्याआधारे कादंबरीवरील बंदीविरोधात न्यायालयीन लढा देण्याचा निर्धार लक्ष्मी आणि आमीर करतात आणि येथे आवरण कादंबरी समाप्त होते.
भैरप्पा यांची लेखनशैली वाचकाला खिळवून ठेवणारी आहे. कादंबरीतील वर्तमान संदर्भ खूपच बोलके आणि जिवंत आहेत. गिरीश कर्नाड, यू.आर. अनंतमूर्ती आदी विचारवंत आणि साहित्यिक मंडळींचे ढोंग उघड करणारी काही पात्रे कादंबरीत अतिशय जिवंतपणे साकारली आहेत. काहीजणांना वाटते की, कादंबरीतील प्राध्यापक शास्त्री हे पात्र यू.आर. अनंतमूर्ती यांच्यावरच आधारलेले आहे. धर्मनिरपेक्षता, पुरोगामी, आधुनिक विचारांचे म्हणवून घेणारी ही मंडळी सत्याचा अपलाप कशारीतीने करतात, हे "आवरण`मधून अतिशय खुबीने व प्रभावीपणे मांडले आहे. त्यामुळेच ही सेक्युलर टोळी "आवरण`वर तुटून पडताना दिसत आहे. "आवरण`मधील भूमिका ही 136 ग्रंथांच्या आधारे संदर्भपृष्ठांसह मांडल्याने सेक्युलरांच्या टीकेला वेगळे उत्तर देण्याची आवश्यकताच राहिलेली नाही, यात लेखकाचे चातुर्य दिसून येते.
मोजक्या शब्दांत मोठा आणि मार्मिक आशय व्यक्त करण्याची लेखकाची शैली वाचकास चिंतनाला प्रेरित करते. पुढील काही उद्धरणे पाहा...
"विस्मरणाने सत्य झाकोळून टाकणाऱ्या मायेला "आवरण` म्हणतात आणि असत्य बिंबविणाऱ्या कार्याला "विक्षेप` असे म्हटले जाते. व्यक्तिगत पातळीवर चालणाऱ्या या क्रियेला "अविद्या` आणि सामूहिक अथवा जागतिक पातळीवर चालणाऱ्या या क्रियेला "माया` म्हटलं जातं.``
आपल्या व्यतिरिक्त इतर कुणाचीही आराधना करणाऱ्या भक्ताला तो सतत जाळणाऱ्या नरकात टाकून देतो. अशा प्रकारच्या देवाची निर्मिती करणारेही अशाच मत्सरी स्वभावाचे आहेत, असा याचा अर्थ नाही का होत? मी फक्त एकटा आहे, तिथे इतर कुणाला जागाच नाही, असं म्हणणारा; काम-क्रोध-मद-मत्सर असलेला देव निर्माण करणारा धर्म तरी कसला?``
औरंगजेबानं विश्वनाथ मंदिराचा विद्ध्वंस करून त्या जागी उभारलेल्या मशिदीचं, काटेरी कुंपण बांधून सशस्त्र सैनिक रक्षण करताहेत.
मागे कुणीतरी केलेल्या चुकांसाठी आजचे जबाबदार नाहीत हे तर खरंच, पण मागच्याशी नातं जोडून "आपण त्यांचेच वारसदार` या भावनेत आपण अडकणार असू तर त्यांनी केलेल्या कर्माची जबाबदारीही स्वीकारावी लागेल.``
Chandrakant Kavathekar ही कादंबरी भैरप्पांची एक उत्कृष्ट कलाकृती आहे,यात मुस्लिमांच्या आक्रमकतेच अत्यंत भीषण व वास्तव चित्रण असल्याने डाव्या पुरोगामी मंडळींनी या कादंबरीच्या विरोधात काहूर माजवल होतं,त्याबद्दल बोलताना भैरप्पानी एकच सांगितलं की मी लिहिलंय ते खोटं आहे हे सिद्ध करून दाखवा,जे की कुणाला जमलं नाही व कादंबरी लोकप्रियतेचे एक एकेक शिखर पार करत गेलीय.
Ravji Lute हिंदू धर्माला केवळ विरोध करून चालणाऱ्या पुरोगामी लोकांचा भुरका फाडणारी एक लोकप्रिय कादंबरी!
मूळ कन्नड असली तरीही मराठी भाषांतर उत्तम! २३ पेक्षा जास्त वेळा छपाई!!
मूल्य:२८०₹ पार्सल खर्च :२०₹ एकूण ३००₹ होम डिलिव्हरी
संपर्क:9421605019 वर व्हॉटसअप करून संपर्क साधावा.
ही कादंबरी भैरप्पांची एक उत्कृष्ट कलाकृती आहे,यात मुस्लिमांच्या आक्रमकतेच अत्यंत भीषण व वास्तव चित्रण असल्याने डाव्या पुरोगामी मंडळींनी या कादंबरीच्या विरोधात काहूर माजवल होतं,त्याबद्दल बोलताना भैरप्पानी एकच सांगितलं की मी लिहिलंय ते खोटं आहे हे सिद्ध करून दाखवा,जे की कुणाला जमलं नाही व कादंबरी लोकप्रियतेचे एक एकेक शिखर पार करत गेलीय.
Govind Kulkarniह्या मध्ये नायिका स्वतः मुस्लिम धर्म स्वीकारून त्यांतील बारकावे मोठ्या परिषदे मध्ये उघडकीला आणते.त्या मध्ये अत्याचारा पासून मूर्ती भंजना पर्यंत सर्व कांहीं आहे.तिच्या वडिलांनी स तिचाशी संबध तोडलेले असतांना,ते बरींच माहिती काढून टिपणं काढतात ते केवळ लेकीच्या प्रेमा पोटी.नायिका तो पूर्ण अभ्यास करून परिषदेत मांडते. त्या अगोदर एक प्रोफेसर हिंदू असून सुद्धा कम्युनिस्ट विचार सरणीचे. तिला त्यांचे विचार पटतात. पण वडिलांनी काढलेल्या टिपणानं ती पूर्णपणे झपाटली जाते आणि सर्व खरं काय ते परिषदेत पुराव्यानिशी मांडते.सभागृह अवाक होतं.
Kaushik Lele मुस्लीम राजवटीतील धर्मवेड आणि अत्याचारांबद्दल भयानक सत्य स्पष्ट बोलणारी, प्रश्न विचारणारी; विचार करायला लावणरी. हिंदू-मुस्लिम प्रत्येकाने वाचली पाहिजे अशी कादंबरी.
तिचा इंग्रजी अनुवादही उपलब्ध आहे
Rupali Siddhapathaki-Pethkar Mi pan vachatiye khup chan aahe
Minesh Adivarekar Ho khupach apratim ahr
Swapnil Kakade ह्यांच `पर्व` वाचलंय मी. तुफान लेखक आहे हा 😎
Madhuri Ingle अप्रतिम सुंदर
Kaushik Lele साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक डॉ. एस. एल. भैरप्पा यांची हिंदू-मुस्लीम संबंध विशेषतः मुस्लीम राजवटीत झालेल्या निंद्य-क्रूर घटनांचा मागोवा घेणारी ही कादंबरी आहे.
बाबरी मशीद पाडल्यावर देशात पुन्हा एकदा धार्मिक सलोखा वाढावा यासाठी प्रचारकी ढंगाची माहितीपट (डॉक्युमेंटरी) करायचं काम एका टीमला दिलं जातं. त्यातले लेखन-दिग्दर्शन करणारे नवरा बायको मुस्लीम जोडपं असतं. त्यातली बायको- रझिया ही लग्नाआधीची हिंदू -लक्ष्मी. कर्नाटकातल्या एका गंधिवादी कुटुंबात वाधलेली एक हिंदू मुलगी. ती बुद्धीवादी, उच्चशिक्षित असते. कॉलेजमध्ये तिच्या वर्गातल्या एका मुस्लीम मुलाच्या प्रेमात पडते. घरच्यांचा विरोध झुगारून त्या मुलाशी लग्न करते. एक प्राध्यापक तिला पाठिंबा देतात.ते जन्माने हिंदू पण धर्म न मानणारे, स्वततःला समाजवादी, पुरोगामी म्हणणारे असतात. जीर्णवादी हिंदू धर्म सोडून ती कशी समानतेचा मुस्लिम धर्म स्वीकारते आहे हे पटवतात. लग्नामुळे घरच्यांशी संबंध तुटतात ते कायमचेच.
लग्नानंतर तिला दोन्ही धर्मातले चांगले वाईट फरक जाणवू लागतात. बुरखा घालायची सक्ती, कुंकू लावयला विरोध, बाहेर पडायला विरोध, अशा सासरकडच्यांच्या आणि मुस्लिम समाजाच्या मागासलेपणाला तोंड देत ती आपला कलेचा प्रवास सुरू ठेवते.
माहितीपटात मुस्लीम राजवट कशी चांगली होती, सर्वधर्मीय कसे सुखेनैव नांदत होते, हिंदूंमधल्या शैव-वैष्णव आणि इतर पंथांच्या वादातून त्यांनीच मुसलमानांकरवी दुसऱ्या पंथांची देवळं कशी फोडून घेतली असं खोटंनाटं पसरवण्याचा प्रय्त्न सुरू असतो. तिचं बुद्धीवादी मन त्याने अस्वस्थ होतं. अशात तिच्या वडीलांचं निधन होतं आणि तिला पुन्हा आपल्या गावी जायला मिळतं. तिला कळतं की आपल्या लग्नामुळे अस्वस्थ झालेले वडील आपल्या लग्नापासून आज पर्यंत इस्लामचा, इस्लामच्या इतिहासाचा, मुसलमान राजवटीचा प्रचंड अभ्यास करत होते. त्यांनी खूप ग्रंथसंपदा वाचली आहे, टिपणं काढली आहेत. यामुळे अवाक् झालेली तीही हा सगळा अभ्यास स्वतः करायचं ठरवते. त्या अभ्यासातून तिला भारतीय इतिहासातील एका काळ्या पर्वाची सत्यता कळते. हा इतिहास ती एका कादंबरीच्या रूपाने आणायचं ती ठरवते. तिच्या कादंबरीतल्या प्रकरणांतून आपल्याला दिसतो काळाकुट्ट इतिहास - मुस्लीम आक्रमण आणि त्यात झालेले अत्याचार. असंख्य हिंदूचे जबरदस्तीने केलेल धर्मांतरण. लाखोंच्या कत्तली. लाखो हिंदू स्त्रीयांची विटंबना, गुलाम आणि वेश्या म्हणून जनानखान्यात भरती. कोवळ्या मुलांचे जबरदस्ती निर्बीजिकरण करून त्यांना हिजडे बनवून जनानखान्यावर झालेल्या नेमणूका. मुस्लिमेतरांवर लादलेला जिझीया कर. राज्य टिकवण्यासाठी सुलतानाला हिंदू राजकन्या देण्याच्या घटना तर कुठे शीलारक्षणासाठी केलेला जोहार. आणि सहस्त्रावधी देवळांचा विध्वंस.
रझियाच्या कादंबरीचं मुख्य पात्र आहे एक रजपूत राजकुमार जो एका युद्धात मुसलमानांकडून पकडला जातो. त्याच्या डोळ्यादेखत राजाचं विष्णूमंदीर पाडलं जातं. त्याला नबरदस्तीने खोजा(हिजडा) बनवलं जातं. मुसलमान बनवलं जातं. आधी मुस्लीम सुलतानाच्या वासना विकृतीचा बळी तो पडतो आणि जनानखान्यात नोकरीला नेमला जातो. पुढे त्याच्या डोळ्यादेखत घडतो औरंगजेबाच्या आदेशाने काशीच्या विश्वनाथ मंदिराचा विध्वंस. त्याच्या डोळ्यांनी बघिततलेला वृत्तांत तो सांगतो. पुजारी आधल्या रात्रीच शंकरांची पिंड विहिरीत विसर्जित करतात. दुसऱ्या दिवशी तोफा डागून मदीराच्या भिंती पाडल्या जातात. मुख्य रचना तशीच ठेवून तिचं मशिदीत रूपांतर होतं. पुढे मथुरा आणि सर्वत्र मंदिरंचा नाश करण्याचा सपाटा सुरू होतो.
कादंबरी एकिकडे लिहीत असताना रझियाच्या आयुष्यातही वेगवेगळ्या घटना घडतात. आपल्या आजी-आजोबांपाशी जास्त वाढलेला तिचा मुलगा कट्टर मुसलमान होतो. नवरा तलाक देऊन दुसरी बायको करतो. ती ज्या बुद्धीजीवी वर्गातल्या परीषदांमध्ये जाते तिथे कुणिही मुलसमान कालखंडाची सत्य परिस्थिती मांडत नाही. सगळं कसं अलबेल होतं, इंग्रजांनी दुही माजवली हेच जनतेला कसं पटवलं पाहिजे याचा खल करतात. तिला लग्नासाठी पाठिंबा देणारे प्राध्यापक शास्त्री सुद्धा कसे सत्याशी अप्रामणिक आणि स्वार्थी बुद्धीवादी आहेत हे प्रत्ययाला येतं.
तिला धर्माविषयी विषेशतः मुस्लीम धर्माविषयी प्रश्नचिन्ह उभी रहतात. आपलाच धर्म सर्वश्रेष्ट असा अहंकार का ? तो दुसऱ्यावर लादायची जबरदस्ती का ? त्याला इस्लामच्या इतिहासातच कसा आधार आहे. आणि हा विध्वंस आम्ही केला इथल्या लोकांना आमच्या धर्मात कसं ओढलं, मंदिरं कशी पाडली हे सर्व मुस्लिम राजेच आपल्या चरित्रात, बखरीत अगदी अभिमनाने सांगतात तर ते नाकारण्याचा दुटप्पी पणा हे तथाकथित पुरोगामी का करतात. या चुका मान्य करून इतिहासातून धडा घेऊन त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी का प्रयत्न होत नाहीत. खोटेपणाच्या पायावर उभं केलेलं असं सामंजस्य किती टिकणार.
असं हे पुस्तक खऱ्या गोष्टी निर्भीडपणे आणि तरीही कलात्मकतेने मांडतं. विध्वंस आपल्या डोळ्यासमोर उभं करतं कुठलीही बटबटीत, जहाल भाषा न वापरता. धर्मश्रद्धांवर प्रश्न उपस्थित करतं उपहास-चेष्टा न करता. धर्मश्रद्धा आणि त्यांची सुरुवात झाली तेव्हाच्या समाजाची नैतिकतआ याची तात्त्विक चर्चा करतं.
ही कादंबरी असली तरी कल्पित नाही. कादंबरीच्या शेवटी दहा पानी संदर्भग्रंथांची सूची दिली आहे. त्यात मोगलकाळातील पुस्तकं आहेत; इंग्रजांची आहेत; इस्लामवर अभ्यासपूर्ण पुस्तकं आहेत. हे पुस्तक भाषांतर आहे असं कुठेच जाणवत नाही इतका सहजपणा भाषांतरात आहे.
खरंच प्रत्येक हिंदूने हे वाचलंच पाहिजे पण मुसलमानानेही हे वाचलंच पाहिजे. खरा इतिहास समजून घेतलाच पाहिजे. तेव्हा काय झालं ? का झालं ? ते पुन्हा होऊ शकेल का ? ते पुन्हा होऊ द्यायचं आहे का? नसेल तर काय करायला पाहिजे ? आपल्या धर्मश्रद्धांचा फेर-विचार मुस्लिम धर्मियांनी केला पाहिजे. मायेचं आवरण भेदून निखालस सत्य ओळखलं पाहिजे.
इतकं परखड लिहिणारं पुस्तक आपल्या तथाकथित "सेक्युलर" देशात प्रसिद्ध कसं होऊ शकलं, त्यावर बंदी कशी आली नाही हेच विशेष. उलट दोन वर्षांत वीस आवृत्त्यांचा पल्ला मूळ कन्नड कादंबरी ने गाठला आहे.
SAPTAHIK SAKAL 17-4-2010आपल्या इतिहासातून धर्म आणि जातीला वगळताच येत नाही. जात–धर्माविषयी परखडपणे आपली मते मांडणारे, अभ्यासपूर्ण विवेचन करणारे लेखक खूप कमी आहेत. अशा लेखकांमध्ये कन्नड लेखक डॉ. एस. एल. भैरप्पा यांचा समावेश होतो. आंतरधर्मीय विवाह करून लक्ष्मीची रझिया बनते, तेव्हाही धर्माच्या नावाखाली होणाऱ्या दंगली, तेढ याकडे ती तठस्थपणे पाहू शकत नाही. ती आणि तिचा नवरा- आमीर स्वत:ला पुरोगामी म्हणत असले, तरीही प्रसंग येताच आपली धार्मिक मुळे हरवू शकत नाहीत. हंपीमध्ये कामानिमित्त नवऱ्याबरोबर गेलेली रझिया शोध घेऊ लागते, देशातील जातीय आणि धार्मिक दंगलीमागच्या मुळाचा, इतिहासाचा संदर्भांच्या शोध आणि अभ्यासाची ही कहाणी रझियाच्या जीवनाबरोबरच पुढे सरकत राहते आणि वेगळे वळण घेते, अनपेक्षित!
कर्नाटकमधील कर्मठ हिंदू घरात जन्मलेली लक्ष्मी आंतरधर्मीय विवाह करण्याचा निर्णय घेते, तेव्हा तिचे वडील हादरून जातात. फिल्म इन्स्टिट्युमध्ये शिकत असताना अमीरशी तिचे सूर जुळतात आणि ती त्याच्याशी विवाह करते. अमीरच्या आई-वडिलांच्या आग्रहास्तव लक्ष्मीचा धर्म बदलणे, नाव बदलणे, अशा अनेक गोष्टींना लक्ष्मी ‘पुरोगामी’ नवऱ्याच्या आग्रहास्तव तोंड देते. माहेर तुटलेले, गावाची नाळ तुटलेली, अशातच मुलाचा जन्म अशा प्रसंगांना तोंड देताना लक्ष्मीला गावची माती, तेथील परंपरा आठवतात. इतिहासाचा नेमका शोध घेताना रझियाचे आयुष्य पुढे सरकत राहते. तिचे वैवाहिक आयुष्यही संकटात सापडते. तरीही ती अभ्यासाचा धागा सोडत नाही. आपल्या पात्रांच्या माध्यमातून एखादा संवेदनशील विषय मांडणे आणि त्याचा मूळ गाभा न विस्कटता वाचकांच्या मनाची पकड घेता येणे, यामुळे या मूळ कादंबरीने अवघ्या दोन वर्षांत वीस आवृत्त्यांचा पल्ला गाठला आहे. केवळ भारतातच नव्हे; तर जगभर घडणाऱ्या धार्मिक तेढीच्या पार्श्वभूमीवर ही कादंबरी बहुचर्चित ठरली. या कादंबरीला केवळ ‘फिक्शन’ म्हणता येत नाही, कारण यातील पात्रे लेखकाच्या कल्पनाविश्वातील असली तरीही यातील संदर्भ इतिहासकालीन तपशीलांशी जोडलेले आहेत. त्यामुळे या पुस्तकातील ‘संदर्भग्रंथां’ची यादीही लक्षात राहते.
SAKAL 27-6-2010मराठी वाचकांसाठी एस. एल. भैरप्पा हे नाव नवीन नाही. ‘वंशवृक्ष’, ‘धर्मश्री’, ‘पर्व’, ‘मंद्र’, ‘मी भैरप्पा’ या त्यांच्या साहित्यकृतींनी मराठी वाचकांच्या मनात घर केलेले आहेच. त्यांची लेखनशैली वेगळी अहो. ती वाचकांना गुंतवून ठेवतेच; परंतु त्याचबरोबर सनातन मूल्ये, तत्त्वज्ञान याबाबत चर्चा घडवून आणते. याच शैलीतील त्यांची ‘आवरण’ ही कादंबरी कर्नाटकात गाजते आहे. त्या त्या काळातील आक्रमक राज्यकर्ते, हिंदु-मुस्लिम तेढ आणि अलीकडच्या काळातील ‘सेक्युलरिझम’ आदींचा ऊहापोह करणाऱ्या या कादंबरीने कर्नाटकातील साहित्यिक आणि वैचारिक वर्तुळात वाद घडवून आणला आहे. ही कादंबरी उमा कुलकर्णी यांनी आता मराठीत आणली आहे.
‘आवरण’ ही कादंबरी ‘धर्मश्री’ किंवा ‘वंशवृक्ष’पेक्षा पूर्णत: भिन्न आहे. या दोन्ही कादंबऱ्यांमधील कथेची वीण अगदी घट्ट आहे. धर्म, जीवनविषयक तत्त्वज्ञान, मूल्ये आदींची चर्चा त्या कथांमध्ये अगदी चपखल बसते. ‘आवरण’मध्ये ही चर्चा अधिक प्रमाणात होताना दिसते. शिवाय या कादंबरीत दोन समांतर कथा आहेत. एक आजच्या काळातील लक्ष्मी उर्फ रझियाची, तर दुसरी मोगल काळात औरंगजेबाच्या आक्रमकांना बळी पडलेल्या राजपूत युवराजाची. विविध ‘इझम्स’च्या चष्म्यातून इतिहासाकडे पाहताना कशी गफलत होते अन् त्यामुळे इतिहास कसा व्यक्ती वा विचारसापेक्ष बनला आहे हे दोन कथांच्या माध्यमातून भैरप्पा यांनी मांडले आहे. अर्थातच त्याला त्यांच्या अभ्यासाची आणि चिंतनाची जोड आहे.
कादंबरीची सुरुवात रझियाच्या गोष्टीने होते. कर्नाटकातील नरसापूरच्या नरसिंह गौडांची मुलगी लक्ष्मी पुण्यातील फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये शिकताना आमीर कुरेशीच्या प्रेमात पडते. ती आमीरशी लग्न करायचे ठरवते तेव्हा नरसिंह गौडा कडाडून विरोध करतात आणि तिच्याशी असलेले सर्व नाते तोडतात. लक्ष्मी रझिया बनून आमीरच्या घरी येते, मात्र त्या घरातील वातावरणही पारंपरिकच असते. तरीही आमीरसाठी तडजोड करीत ती राहते. ते दोघेही चित्रपट क्षेत्रात काम करीत असतात. बंगळूरूच्या सामाजिक जीवनात, तेथील पुरोगामी वर्तुळात, प्रा. शास्त्रींसारख्या बुद्धिवादी मंडळींत त्यांचे एक आगळे स्थान निर्माण झालेले असते.
विजयनगर साम्राज्याच्या अवशेषावर लघुपट करण्यासाठी ते हंपीमध्ये जातात, तेव्हा नरसिंहाच्या भग्न मूर्तीने रझिया अस्वस्थ होते. मूर्तिभंजन कोणी केले असेल, हा प्रश्न तिला भेडसावू लागतो. पटकथालेखनासाठीही तिला त्याचे उत्तर हवे असते. दुसरीकडे तिच्यात आणि आमीरमध्ये अधूनमधून खटके उडत असतात. या अस्वस्थतेच्या काळातच तिच्या वडलांची निधनाची बातमी तिला कळते. मधल्या काळात तिच्या गांधीवादी वडलांनी इतिहासाचा अभ्यास सुरू केलेला असतो. त्यांनी अनेक टिपणेही काढलेली असतात. गावी गेल्यावरच तिला त्याची माहिती होते. त्यांच्याकडील मोठ्या ग्रंथसंग्रहातून ती हंपीमधील प्रश्नाचे उत्तर शोधू लागते. या शोधयात्रेतच तिला इतिहासाचे आकलन होते आणि त्यामुळे तिचे विचार बदलू लागतात. या बदललेल्या विचारांची ‘पुरोगामी वर्तुळातून कुचेष्टा होते. उपेक्षा होते. आजच्या काळातील धर्मनिरपेक्षतावादी आणि प्रतिगामी मंडळीतील संघर्षही भैरप्पांनी या कादंबरीत रंगविला आहे.
DAINIK PRABHAT 21-2-2010कन्नड भाषेतील ज्येष्ठ लेखक डॉ. एस. एल. भैरप्पा यांनी पर्व, मंद्र आणि वंशवृक्ष या कादंबऱ्यांच्या माध्यमातून मराठी वाचकांशी आपला संबंध प्रस्थापित केला आहे. सार्थ पाठोपाठ आलेली आवरण ही दुसरी ऐतिहासिक कादंबरी. अवघ्या दोन वर्षांत २० आवृत्त्यांचा पल्ला गाठणारी डॉ. एस. एल. भैरप्पा यांची ‘आवरण’ ही कादंबरी उमा कुलकर्णी यांनी अनुवादित केली आहे. या कादंबरीत देशाच्या इतिहासात चुका आणि सोड, आक्रमण आणि हार यांची कधी न संपणारी आवर्तने दिसतात. याचा अर्थ असा नाही की भूतकाळ आणि भविष्यकाळ कायमचे गोठलेले असतात. या महत्त्वाच्या तत्त्वावर लेखक भैरप्पा ‘आवरण’ या कादंबरीला बेततात. जगभर घडणारया अनेक वाईट घटनांच्या पार्श्वभूमीवर ही कादंबरी बहुचर्चित ठरली असून वाचकांना बांधून ठेवते.
SAHITYA CHAPRAK Dec 2010अवघ्या दोन वर्षांत २२ आवृत्त्यांचा पल्ला गाठणारी, वाचकांच्या ‘स्व’त्त्वाला हाक देऊन जागं करणारी कादंबरी - ‘आवरण’. डॉ. एस. एल. भैरप्पा या विख्यात कन्नड साहित्यिकाची ही बहुचर्चित कादंबरी. या कादंबरीने हजारो वाचकांच्या हृदयाचा ठाव घेतला आहे तर अनेक मतलबींची झोपही उडवली आहे. ही कादंबरी आता मराठीतही उपलब्ध आहे. या कादंबरीविषयी...
गेली तीन-चार दशके कन्नड भाषेतील सर्वाधिक खपाचे कादंबरीकर आहेत - डॉ. एस. एल. भैरप्पा. आजवर त्यांनी २१ कादंबऱ्या लिहिल्या आणि त्या सर्वच लोकप्रियही ठरल्या. भारतातल्या आघाडीच्या कादंबरीकारांमध्ये भैरप्पा यांचे स्थान वरचे आहे. ते सिद्धहस्त लेखक आहेत. केवळ कल्पना आणि लालित्यशैलीच्या बळावर कादंबऱ्या प्रसवणाऱ्या लेखकांच्या कुळातले ते नाहीत. कुठल्याही विषयावर लिखाण करण्याआधी त्या विषयाचा सर्व अंगाने अभ्यास-वाचन करतात. भरपूर परिश्रम घेतात. त्या विषयातील तज्ज्ञांशी विचारविमर्ष करतात. ‘पर्व’ ही कादंबरी लिहिण्यापूर्वी त्यांनी तब्बल साडेसहा वर्षे महाभारतकालीन जीवनविषयक ग्रंथांचा अभ्यास केला होता.
सत्य कोणाच्या रागालोभाची पर्वा करीत नाही. एका अर्थाने आवरण ही सत्यनिष्ठ कादंबरी आहे. ‘हिडन टॉरिझन्स १००० इयर्स ऑफ इंडियन सिव्हिलायझेशन’चे लेखक एन. एस. राजाराम यांनी आवरणची तुलना डॅन ब्राऊन यांच्या विश्वविख्यात ‘दा विंची कोड’ या कादंबरीशी केली आहे. स्वार्थी आणि प्रभावी शक्तींनी खरा इतिहास दडपून ठेवून खोट्या इतिहासाचा प्रचार करणं, हे दोन्ही कलाकृतींमधील समान सूत्र आहे.
कादंबरीची सुरुवात फ्लॅश बॅक ऐतिहासिक आणि वर्तमान या दोन स्तरांवर उलगडत जाते. १९९२ साली बाबरी ढांचा पाडण्यात आल्यानंतर समाजात धार्मिक सलोखा निर्माण व्हावा यासाठी सरकार प्रयत्नशील असते. त्यानुसार प्राचीन वास्तू-शिल्पांवर आधारित माहितीपट निर्माण करण्याचे काम आमीर आणि रझिया कुरेशी यांच्यावर सोपविण्यात येते. माहितीपटाच्या प्राथमिक तयारीसाठी दोघेही विजयनगर हंपी येथे येतात. तेथील उद्ध्वस्त मंदिरे पाहून रझिया अंतर्मुख बनते.
रझिया ही पूर्वाश्रमाची हिंदू असते. लक्ष्मी तिचं आधीचं नाव. आमीरच्या प्रेमात पडून तिने धर्मांतर केलेले असते. घरातून वडिलांचा विरोध असूनही पुरोगामी विचारांच्या प्राध्यापक शास्त्री यांच्या प्रोत्साहनामुळे आणि आमीरच्या आधुनिक विचारांमुळे ती मुस्लिम बनते. हिंदू धर्मावर टीका करणे आणि प्रस्थापित विचारवंतांच्या वर्तुळात वावरणे यामुळे ती सतत प्रसिद्धीत असते. याच सुमारास विजयनगरच्या भग्न अवशेषांनी ती अंतर्मुख होऊन सत्य जाणण्याचा प्रयत्न करू लागते.
स्वत:ला निधर्मी, सेक्युलर समजणारे विचारवंतांचे खरे स्वरूप अतिशय जिवतंरित्या कादंबरीच्या शेवटच्या भागात साकारले आहे.
लक्ष्मीच्या कादंबरीतील नायक रजपूत राजपुत्र आहे. युद्धात पराभव झाल्याने त्याला गुलाम म्हणून राहावे लागते आहे. त्याचे बीज फोडून त्याला खोजा म्हणून जनानखान्यात ठेवलेलं असतं. हा आता इस्लामच्या प्रभावाखाली आलेला असतो. या खोजाच्या माध्यमातून लक्ष्मीची कादंबरी उलगडत जाते. या राजपुत्राच्या वाट्याला काय काय येतं काशी विश्वनाथाचे मंदिर उद्ध्वस्त होतानाचा प्रसंग, गंगेच्या किनारी भेटलेल्या साधूशी संवाद आणि त्यातून त्याच्या मनाला आलेली उभारी हे सारं प्रत्यक्ष कादंबरीतच वाचा. आता तो खोजा छ. शिवरायांच्या प्रेरणेने स्वातंत्र्याचा बिगुल वाजविणाऱ्या छत्रसालाकडे जायला निघतो आणि रझियाच्या कादंबरीचा शेवट होतो, पण त्या कादंबरीच्या प्रकाशनानंतर उठलेला हलकल्लोळ, वेगाने घडणाऱ्या घडामोडी ‘आवरण’च्या शेवटच्या भागात रेखाटले आहे. आवरणमधील रझियाच्या कादंबरीला जो विरोध झाल्याचे ‘आवरण’मध्ये वर्णन आले आहे, तसाच विरोध ‘आवरण’ला होताना दिसत आहे. कादंबरीकाराचे हे यशच म्हटले पाहिजे. ‘आवरण’मधील रझियाच्या कादंबरीवर सरकार बंदी घालते, तेव्हा आमीरही रझियाच्या मदतीला धावून येतो. कारण रझियाच्या कादंबरीने त्याचे डोळे उघडतात. रझियाने आपल्या कादंबरी लेखनासाठी ज्या इतिहास ग्रंथांचा आधार घेतलेला असतो, ती संदर्भग्रंथांची यादी न्यायालयीन लढ्यासाठी घेण्यात येते. १३६ ग्रंथांची सूची बनवून त्याआधारे कादंबरीवरील बंदीविरोधात न्यायालयीन लढा देण्याचा निर्धार लक्ष्मी आणि आमीर करतात आणि येथे आवरण कादंबरी समाप्त होते.
भैरप्पा यांची लेखनशैली वाचकाला खिळवून ठेवणारी आहे. कादंबरीतील वर्तमान संदर्भ खूपच बोलके आणि जिवंत आहेत. गिरीश कर्नाड, यू. आर. अनंतमूर्ती आदी विचारवंत आणि साहित्यिक मंडळींचे ढोंग उघड करणारी काही पात्रे कादंबरीत अतिशय जिवंतपणे साकारली आहेत. काही जणांना वाटते की, कादंबरीतील प्राध्यापक शास्त्री हे पात्र यू. आर. अनंतमूर्ती यांच्यावरच आधारलेले आहे. धर्मनिरपेक्षता, पुरोगामी, आधुनिक विचारांचे म्हणवून घेणारी ही मंडळी सत्याचा अपलाप कशा रीतीने करतात, हे ‘आवरण’मधून अतिशय खुबीने व प्रभावीपणे मांडले आहे.
‘आवरण’मधील भूमिका ही १३६ ग्रंथांच्या आधारे संदर्भपृष्ठांसह मांडल्याने सेक्युलरांच्या टीकेला वेगळे उत्तर देण्याची आवश्यकताच राहिलेली नाही, यात लेखकाचे चातुर्य दिसून येते.
मोजक्या शब्दांत मोठा आणि मार्मिक आशय व्यक्त करण्याची लेखकाची शैली वाचकास चिंतनाला प्रेरित करते. पुढील काही उदाहरणे पाहा...
‘‘विस्मरणाने सत्य झाकोळून टाकणाऱ्या मायेला ‘आवरण’ म्हणतात आणि असत्य बिंबविणाऱ्या कार्याला ‘विक्षेप’ म्हटले जाते. व्यक्तिगत पातळीवर चालणाऱ्या या क्रियेला ‘अविद्या’ आणि सामूहिक अथवा जागतिक पातळीवर चालणाऱ्या या क्रियेला ‘माया’ म्हटलं जातं.’’
‘‘.... आपल्या व्यतिरिक्त इतर कुणाचीही आराधना करणाऱ्या भक्ताला तो सतत जाळणाऱ्या नरकात टाकून देतो. अशा प्रकारच्या देवाची निर्मिती करणारेही अशाच मत्सरी स्वभावाचे आहेत, असा याचा अर्थ नाही का होत मी फक्त एकटा आहे, तिथे इतर कुणाला जागाच नाही, असं म्हणणारा, काम-क्रोध-मद-मत्सर असलेला देव निर्माण करणारा धर्म तरी कसला?’’
‘‘औरंगजेबानं विश्वनाथ मंदिराचा विध्वंस करून त्या जागी उभारलेल्या मशिदीचं, काटेरी कुंपण बांधून सशस्त्र सैनिक रक्षण करताहेत.’’
‘‘... मागे कुणीतरी केलेल्या चुकांसाठी आजचे जबाबदार नाहीत हे तर खरंच, पण मागच्याशी नातं जोडून ‘आपण त्यांचेच वारसदार’ या भावनेत आपण अडकणार असू तर त्यांनी केलेल्या कर्माची जबाबदारीही स्वीकारावी लागेल.’’
Pramod Vasantgadkarनमस्कार,
नुकतेच माझ्या भावाने मला उमा कुलकर्णी यांचे अनुवादित " आवरण" वाचले . एका नविनच विषयाची मला माहित झाली व हे पुस्तक खूप ज्ञानवर्धक वाटले . गेली ४० वर्षे मी भारताभाहेर रहतोय. मी त्यातील सविस्तरपणे मांडलेल्या मुद्द्यामुळे अत्यंत प्रभावित झालो. याच्या अनेक आवृत्या निघतील व निघाव्यात तसे झाल्यास मला या पुस्तकात ज्या चुका वा दोष दिसलेत ते मी अत्यंत नम्रतेने देतो. कृपया हे लेखिकेस जरूर दाखवावेत व चुका सुधाराव्यात . सोयीसाठी पुस्तकातील पान क्रमांक कंसात देत आहे.
१) सूट (२०७) त्या इंग्रजी शब्दात्च्या स्पेलिंग मध्ये शेवटी "e" असून ( suite) उच्चार चक्क "स्वीट " आहे. सर्व भारतीय " सूट " म्हणताना त्यांची कीव करावीशी वाटते. त्याचा suit शी काही संबंध नाही .
२) बुफे (२२८) उच्चार "बफे"आहे . ( अमेरिका व इंग्लंड मध्ये).
३) मंत्रालय (२३३). सर्वत्र व सर्रास हा अत्यंत चुकीचा उच्चार का केला जातो? तेथे हजारोंनी मराठी शिक्षक असतांना अजून कोणी हि चूक सुधारायला किंवा त्या इमारती वरील ही मोठी चूक उघडकीस आणायला किंवा त्या विषयी आंदोलन करायला अजून का धजले नाही?
मंत्री - अधिक -आलय; म्हणजे इ - अधिक - आ आल्यास त्याचे परिवर्तन " या " सामान्य रूपाने निर्माण होणाऱ्या समासात होते.
म्हणून, मंत्री- अधिक - आलय बरोबर " मंत्र्यालय " होते.
४) शब्दकोशात " अमिर " मधली मी दीर्घ दाखवली आहे. ( वीरकर)
५) पहिलच पान: डेविड फ्राले मधील स्पेलिंग काहीका असेना (lay), उच्चार फ्राली करतात.
असो.
प्रवादी (स), महंमद (स) हे अनेक ठिकाणी आले असून त्यातील कंसातील स चा अर्थ मला तरी कळला नाही. कृपया मला खुलासा कराल का?
पुष्कळसे परिच्छेद खूप लांब आहेत. काही ठिकाणी नव्या प्रकरणात पाठच्या घटनांची उजळणी आहे. पण नंतर नवे प्रकरण चालू झाल्यावर बोलू घातलेली व्यक्ती नेमकी कोण आहे हे नीट काळात नाही व त्या मुळे वाचनाची गोडी कमी होते.
आपले विचार जरूर कळवा .
आपला नम्र,
प्रमोद वा. वसंतगडकर
r k kulkarniEverey so called Hindu should read this.