* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: SHELKA SAJ
  • Availability : Available
  • ISBN : 9788177666953
  • Edition : 5
  • Publishing Year : JUNE 1994
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 176
  • Language : MARATHI
  • Category : ESSAYS
  • Available in Combos :SHIVAJI SAWANT COMBO SET - 10 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS IS A COLLECTION OF CREATIVE WRITING FROM THE AUTHOR OF THE BEST SELLER, `MRITINJAYA`.
हा आहे ‘मृत्युंजयकार’ शिवाजी सावंत यांच्या विविधरंगी ललितलेखनाचा संच : ‘शेलका साज’! इथं सावंतांच्या खास रसश्रीमंत शैलीत वेध घेतलेले महाराष्ट्रवैभव कविश्रेष्ठ कुसुमाग्रज जसे भेटतील, तसाच लेखकाला चकवा देऊ बघणारा वाचक अशी झूल पांघरलेला लपंगाही भेटेल. छ. शिवराय, शंभूराजे, महाराणी येसूबाई, सरलष्कर संताजी घोरपडे यांच्या जीवनझुंजीतील आजवर मराठी वाचक मनाला अज्ञात राहिलेल्या मनामनांच्या अणीदार वंगोऱ्यांना केलेला रसबाळा, तरल ललितस्पर्श भेटेल. तसाच कसा होता - असेल शिवकालीन रणसंमुख सामान्य मावळा यावर टाकलेला डोळस व वास्तव प्रकाशझोत असेल. इथं आर्य चाणक्याचा वेगळ्याच दृष्टीनं केलेला विचार दिसेल, तसंच, दीनदलितांना ‘आधारवड’ झालेल्या राजर्षी शाहूंचं क्षणदर्शन घडेल. सावंतांनी कथा मोजक्याच बेतल्या. मालिश, भिजाणे यांतून त्यांचं या आकृतिबंधाचं बळ दिसेल. ‘मुकी’ ही कथा तर अल्बर्ट कामूची आठवण करून देईल - यासाठीच या संचाचं शीर्षक : शेलका साज!!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#अशी मने असे नमुने #छावा #छावा #कांचनकण #कवडसे #मोरावळा #मृत्युंजय-नाटक #शेलका साज #युगंधर #ASHI MANE ASE NAMUNE #CHHAVA - NATAK #CHHAWA #KANCHANKAN #KAVADASE #MORAVALA #MRUTYUNJAY - NATAK #SHELKA SAJ #YUGANDHAR
Customer Reviews
  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    जळतानाही जगाला उजळण्याचा तेजोमंत्र देणारी तेजोनिधी व्यक्तित्वे... मृत्युंजय’ची पताका मानानं मिरवत आणि एकेक भाषा पादाक्रांत करीत शिवाजी सावंत आपलं स्थान पक्कं करीत भारतीय सारस्वतात घोडदौड करीत आहेत. आता युगंधर श्रीकृष्णाचा त्यांचा प्रदीर्घ प्रकल्प आकर घेतो आहे. प्रचंड शिल्पकाम करताना अधूनमधून गंमत म्हणून या दगडावर चार छिन्न्या मार, त्या दगडातून एखादी छोटी कलाकृती घडव असाही त्यांचा खेळ रुचिपालट करण्यासाठी चालूच असतो. मग ते कार्यक्रमांची आमंत्रणे घेतात, संमेलनांना जातात; लहानमोठ्या प्रकाशनांमध्ये रस घेतात. छोटेखानी दिवाळी अंकांचेही लेख याच झटक्यात पूर्ण करतात. पण प्रत्येक कामात आपला जीव ओतूनच ते करायचे हा त्यांचा बाणा आहे. त्यामुळे छोटा लेख असो, भाषण असो की अन्य काही कार्यक्रम असो, सावंतांची त्यातली गुंतवणूक ही अर्जुनाला दिसणाऱ्या पोपटाच्या डोळ्यासारखी नेमकी असते आणि सारे काही रसवंत करायची त्यांची प्रतिज्ञा असते. ‘शेलका साज’ हा त्यांच्या २२ लेखांचा संग्रह. हा साज शेलका असल्याने त्यात सर्व प्रकारचा ऐवज आहे. किल्ले सुधागडावर कवी कुलेशाला संभाजी महाराज बोलावतात, उरभेट देतात आणि औरंगजेबाचा पुत्र शाहजादा अकबर आपल्या जन्मदात्याविरुद्ध बंडाचा प्रस्ताव घेऊन आला असताना त्याला संभाजी महाराज कसे रोखतात - त्याची कहाणी ‘किल्ले सुधागड’ यात सावंत सांगतात. रायगडच्या बालेकिल्ल्यातल्या खासे महालात श्री शिवाजीराजे अखेरच्या दुखण्यात कसे दिवस काढत होते याचे चित्रदर्शी वर्णन करून त्यांच्या धीरोदात्त व्यक्तिमत्त्वाचे दर्शन सावंत घडवतात. ‘‘आरक्त देखिजे डोळा, ग्रासिले, सूर्यमंडळा सूर्यमंडळा, सूर्यमंडळा, जगदंबा! चैत्री पुनवेचा, हनुमान जयंतीचा सूर्य रायगडाच्या बालेकिल्ल्याच्या ऐन माथ्यावर असताना महाराजांनी रायगडाच्या हनुमंतानी उड्डाणी झेप घेतली. सूर्यमंडळ कब्जा करण्यासाठी’’ असा भारावून टाकणारा शेवट सावंत करतात. ‘शिवभक्त सरलष्कर’ ही हकीकत आहे १६६५ सालची, औरंगजेबाच्या ब्रम्हपुरच्या छावणीतली. संताजी घोरपडे याच्या पराक्रमाची. म्हसवडच्या नागोजीराव माने यांचा पुत्र सिधोजी याने संताजीबद्दल छत्रपती राजारामाचे मन कलुषित केले. त्यांनी धनाजी जाधवाला सरसेनापती पद दिले. आणि पुढे शिवपिंडीच्या पूजेत मग्न असलेल्या संताजीच्या मानेवर नागोजीने तलवारीने आघात करून त्याचा बळी घेतला. औरंगजेबाकडे ते शिर घेऊन जातो. तेथे येसूबाई संताजीचं शिर तबकात पाहून डोळ्यात अश्रू ढाळत म्हणतात, ‘‘सरलष्कर, तुम्ही खरे शिवभक्त. आजवर आम्हांस मुजरा केलात, आता या क्षणी आमचा मुजरा रुजू करून घ्या.’’ औरंगजेब मनात म्हणतो, ‘‘ऐसी एकभी बहू-बेटी-बेगम हमारे तैमूर खानदानमें क्यों नही पैदा होती? ये मुल्क कभी नही शिकस्त लेगा - जहाँ ऐसे सालार है - ऐसी मलिकाएं है। ऐसे शाहजादे है। तौबा! हम लौटेंगे लाल किले देहली या नही?’’ पुस्तकात सगळ्याच ऐतिहासिक कथा आहेत असे मात्र नाही. ‘शिवकालीन मावळा’ हा मावळ्याचे खाणे, पेहराव, जगणे, लढणे, याची माहिती देणारा लेख आहे. तर शिवरायांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू दाखवणारा गूढरम्य मनफूल हा लेख आहे. ३ एप्रिल १६८० रोजी शिवरायांनी रायगडावर चैत्री पुनवेला आगमन केले. चंद्र हा कल्पनाशक्तीचा कारक. शिवरायांच्या मनाचं फूलही त्या आकाशातल्या चंद्राच्या लाटांवर हेलकावे खात असावे असे सावंत सुचवतात. शिवरायांची तरल कल्पनाशक्ती अनेक प्रसंगात दिसते, तिचे चंद्रभावाच्या प्रभावाच्या रूपात सावंत स्पष्टीकरण - समर्थन करू पाहतात. संभाजीच्या मनाचे शल्यही मांडतात. शिवराजांना चाणक्य नीती ज्ञात होती. चाणक्यासारखा कोणी त्यांना भेटला असता तर महाराष्ट्रात एक नवे पर्व सुरू झाले असते असे सावंतांना वाटते. चाणक्याची अर्थशास्त्रीय बुद्धिमत्ता आणि शिवरायांची सर्वसामान्यांबद्दलची राजस कणव यांची सांगड पडली असती तर दुग्धशर्करा योगच या देशातील समाजपुरुषाने चाखला असता. शिवरायांचा प्रधान अण्णाजी दत्तो याचा तो वकूब नव्हता; अण्णाजीने जमीनधारा पद्धत जमिनीची प्रत बघून सरकारी धारा वसूल करणे ही वापरली; त्याऐवजी प्रत्येक किल्ला धनधान्याने समृद्ध करावा व गवतकाडीने बंदिस्त करावा, शेतकऱ्याला जमिनीचा कस वाढवायला सहाय्य करावे - उत्पादनक्षमता वाढवावी - असा शिवरायांचा मानस होता. पण अण्णाजीला तो विचार प्रत्यक्षात आणता आला नाही असे सावंतांचे प्रतिपादन आहे. अण्णाजी दत्तो याला ते महाराष्ट्रातील शेतीच्या दुरावस्थेबद्दल जबाबदार धरतात. कामगार नेते मनोहर कोतवाल, पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील, अस्पृश्यांचा आधारवड राजर्षी शाहू महाराज यांच्यावरचेही लेख या संग्रहात आहेत. एका वाचकाने कसा गंडा घातला याचा किस्सा ‘चलाख’मध्ये आला आहे. ऐतिहासिक ललित लेखन - एक विचार, मी आणि कविता हे दोन लेख साहित्यविषयक चिंतन प्रकट करतात, तर शेवटी ‘तू नसतीस तर’ ही कविता आईबद्दलच्या कृतज्ञतेच्या भावनेने ओथंबून निथळणारी आहे. ‘‘जळतानाही जगाला उजळण्याचा तेजोमंत्र सूर्याला देणारी, केवळ तूच’’ असे म्हणून ‘‘तू केवळ एक व्यक्ती किंवा जीव नसून’’, तू एक जीवनतत्त्व व जीवनसत्य आहेस असे सावंत म्हणतात. ‘‘तू आहेस एक अतितापासून ते अनागतापर्यंतचे एक जीवनतत्त्व, एक जीवनसत्य. ज्याचे एकमेव नाव आहे व असू शकते आई!’’ सावंतांचा हा ‘कोल्हापुरी’ शेलका साज भरजरी आहे; भव्य आहे; आणि भारावून टाकणाराही आहे. दुसऱ्या आवृत्तीत तो अधिकच नेटका व चकमकीत होऊन चमकतो आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

राधेय.... लेखक रणजित देसाई... मित्र कसा असावा...कर्णासारखा दातृत्व कसं असावं...कर्णासारखं असा हा कर्ण... त्याला अंगराज म्हणावं, दान देणारा दाता म्हणावं, राधेय म्हणावं कि कौतेय... काहीही म्हणा पण कर्णासारखा दाता कर्णानंतर कधी झाला नाही आणि कधी होणरही नाही... रणजित देसाई लिखीत कर्णचरीत्र राधेय आज हातावेगळं झालं ते अश्रुभरल्या नयनांनी...ज्याचा अंत करायला स्वतः देवाधिदेव कृष्णाला अर्जुनाचं सारथ्य करावं लागलं यातच अंगराज कर्णांचं विरत्व अधोरेखीत होत आहे. जन्मापासुन ज्याला केवळ सुतपुत्र म्हणुन वागणुक मिळाली असा तो कर्ण स्वतःच्या बळावर इतका महान लढवय्या बनला. पुस्तकाच्या प्रास्ताविकात देसाईंनी म्हटलं आहे की राधेय मधला कर्ण महाभारतात शोधायची गरज नाही. प्रत्येकाच्या मनातच तो दडलेला असतो, कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत, तर त्यात हा कर्ण दिसेल. त्याचं दु:खं, पोरकेपण आणि त्यातून पार होवून एक अनोखी ऊंची गाठणारं त्याचं दातृत्व, व्यक्तित्व याचं एक भव्य, शोकात्म चित्र राधेय मधून उभं राहतं. राधेय या कादंबरीत रणजित देसाईंच्या शब्दांनी कर्णाची अनेक रुपे अनुभवता आली. त्यामध्ये राधाई आणि वृषाली सोबतचा कर्ण, दुर्यौधनासोबतचा कर्ण, कृष्णासोबतचा कर्ण, रणांगणावरचा कर्ण आणि नदीकाठी पाठमोरा ऊभा राहत दान करत असलेला कर्ण अशा अनेक रुपांनी प्रत्येकवेळी वेगळा भासला. वृषसेन आणि चक्रधराच्या मृत्युने हळवा झालेला कर्णही वाचकाच्या डोळ्यातही पाणी आणवतो... समोर मृत्यु दिसत असताना सुध्दा केवळ दिलेल्या वचनामुळे हातातील धनुष्याचा त्याग करुन शस्त्रहिन हेणारा कर्ण रणजित देसाईंच्या शब्दांमुळे आजन्म लक्षात राहील. कर्णासारखं होणं कुणालाही कदापि शक्य नाही पण त्यातला एखादा जरी चांगला गुण अंगी बाळगण्याचा प्रयत्न प्रत्येकाने नक्कीच केला पाहीजे... प्रत्येकाच्या संग्रही असावं आणि एकदा तरी वाचावं असं पुस्तक रणजित देसाई लिखीत...राधेय... © विश्वजित शिंत्रे. ...Read more

BAJIND
BAJIND by PAHILWAN GANESH MANUGADE Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

काही पुस्तकं अशी असतात कि कितीही वेळा वाचली तरीही त्या पुस्तकाचा कंटाळा येत नाही. पुन्हा पुन्हा वाचावं असं वाटतं आणि त्याची पारायणं होतचं राहतात. असचं एक पुस्तक म्हणजे *पै.गणेश मानुगडे* लिखीत *बाजिंद.* *बाजिंद* हे एक असं रसायन आहे जे प्रत्ेकाला अक्षरशः वेड लावतं. साधारण चार पाच वर्षांपुर्वी पहील्यांदा वाचलं होतं, त्यानंतर बर्‍याचवेळा आणि आज पुन्हा एकदा. त्याबद्दलची एक सुंदर आठवण म्हणजे माझ्या बहिणीच्या गरोदरपणाच्या दिवसात ग्रहण लागलं होतं आणि त्या ग्रहणकाळात तिला मी *बाजिंद* वाचुन दाखवलं होतं, असं हे पुस्तक. कुस्ती, प्रेमकथा, हेरगिरी, गुढ रहस्यमय बाजिंदचं जंगल, पशु-पक्षी व हिंस्र जनावरांची भाषा, बहीर्जी नाईक आणि अवघ्या हिंदुस्थानाचे आणि मराठी मनाचे आराध्यदैवत *श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज* असा या पुस्तकाचा प्रवास. शेवटाला अंगावर काटा आला कि समजावं आपण या पुस्तकाच्या प्रेमात पडलोय. रायगडच्या डोंगरदरीत वसलेल्या धनगरवाडीचा सखाराम धनगर आणि त्याच्यासोबत मल्हारी, सर्जा आणि नारायण निघालेत छत्रपती शिवरायांना भेटायला. कारण टकमक टोकावरुन ज्या गद्दारांचा कडेलोट व्हायचा ती प्रेतं येऊन पडायची ती थेट धनगरवाडीच्या आसपासच्या जंगलात आणि त्यामुळे आसपासच्या परीसरात जंगली जनावरांचा सुळसुळाट खुप वाढला होता. त्यांची मेजवानी व्हायची पण जर कधी कडेलोट नसायचा तेव्हा ती हिंस्त्र जनावरं आसपासच्या लोकवस्तीत शिरायची. हिच कैफियत मांडायला सखाराम धनगर आणि इतर मंडळी रायगडी निघतात. त्यानंतरचा त्यांचा प्रवास आणि कथा वाचकाला इतकी गुरफटवुन टाकते कि शेवटच्या पानावरची शेवटची ओळ कधी वाचुन संपते, कळतही नाही. त्यांची स्वराज्यहेर खंडोजीची भेट मग सावित्री, वस्तादकाका, वाचतानाही भितीदायक दिसणारं जंगल, कधीही न पाहीलेलं महादेवाचं मंदीर, खंडोजीचा असणारा ट्विस्ट आणि मग बहिर्जी नाईक आणि मग थेट रायगड आणि महाराज, सगळं प्रत्यक्षात आपल्यासमोर घडतयं कि असा भास निर्माण करणारं असं हे पुस्तक. एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी कथा, एकदा वाचली कि पुन्हा एकदा वाचण्याचा मोह आवरता येत नाही अशी कथा, ज्यामध्ये असं बरचं काही जे वाचल्याशिवाय कळणार नाही. अजुन एक असं कि सातासमुद्रापार जगातील अव्वल गणली जाणारी इस्त्राईलची गुप्तहेर संघटना मोसाद यांच्या अभ्यासक्रमात बहिर्जी नाईक आणि आपलं हेरखातं शिकवलं जातं अशी अभिमान वाटणारी घटना आपल्या राज्यात घडलीय त्याचीच हि गोष्ट...बाजिंद... ...इकडे खंडोजीने सावित्रीला उचलुन जंगलातुन बरेच बाहेर आणले होते. पुढे डोंगराची कडेतुट होती आणि हजारो हात खोल फेसाळणार्‍या नदीचे विशाल पात्र...खंडोजीने एकदा मागे पाहीले आणि ताडले कि शिर्क्यांची फौज पाठलाग करत आहे...त्याने कशाचाही विचार न करता सावित्रीसह स्वतःला त्या कडेतुट वरुन त्या विशाल नदीच्या पात्रात झोकुन दिले...आणि... त्यासाठी वाचा *पै.गणेश मानुगडे* लिखीत...*बाजिंद..!!!* © विश्वजीत श्रीपती शिंत्रे. मु.पो.इंचनाळ, ता.गडहिंग्लज,जि.कोल्हापुर ०९९२२३१३९१९ ...Read more