* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788177666953
  • Edition : 5
  • Publishing Year : JUNE 1994
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 176
  • Language : MARATHI
  • Category : ESSAYS
  • Available in Combos :SHIVAJI SAWANT COMBO SET - 10 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS IS A COLLECTION OF CREATIVE WRITING FROM THE AUTHOR OF THE BEST SELLER, `MRITYUNJAYA`- SHIVAJI SAWANT.
हा आहे ‘मृत्युंजयकार’ शिवाजी सावंत यांच्या विविधरंगी ललितलेखनाचा संच : ‘शेलका साज’! इथं सावंतांच्या खास रसश्रीमंत शैलीत वेध घेतलेले महाराष्ट्रवैभव कविश्रेष्ठ कुसुमाग्रज जसे भेटतील, तसाच लेखकाला चकवा देऊ बघणारा वाचक अशी झूल पांघरलेला लपंगाही भेटेल. छ. शिवराय, शंभूराजे, महाराणी येसूबाई, सरलष्कर संताजी घोरपडे यांच्या जीवनझुंजीतील आजवर मराठी वाचक मनाला अज्ञात राहिलेल्या मनामनांच्या अणीदार वंगोऱ्यांना केलेला रसबाळा, तरल ललितस्पर्श भेटेल. तसाच कसा होता - असेल शिवकालीन रणसंमुख सामान्य मावळा यावर टाकलेला डोळस व वास्तव प्रकाशझोत असेल. इथं आर्य चाणक्याचा वेगळ्याच दृष्टीनं केलेला विचार दिसेल, तसंच, दीनदलितांना ‘आधारवड’ झालेल्या राजर्षी शाहूंचं क्षणदर्शन घडेल. सावंतांनी कथा मोजक्याच बेतल्या. मालिश, भिजाणे यांतून त्यांचं या आकृतिबंधाचं बळ दिसेल. ‘मुकी’ ही कथा तर अल्बर्ट कामूची आठवण करून देईल - यासाठीच या संचाचं शीर्षक : शेलका साज!!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#अशी मने असे नमुने #छावा #छावा #कांचनकण #कवडसे #मोरावळा #मृत्युंजय-नाटक #शेलका साज #युगंधर #ASHI MANE ASE NAMUNE #CHHAVA - NATAK #CHHAWA #KANCHANKAN #KAVADASE #MORAVALA #MRUTYUNJAY - NATAK #SHELKA SAJ #YUGANDHAR
Customer Reviews
  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    जळतानाही जगाला उजळण्याचा तेजोमंत्र देणारी तेजोनिधी व्यक्तित्वे... मृत्युंजय’ची पताका मानानं मिरवत आणि एकेक भाषा पादाक्रांत करीत शिवाजी सावंत आपलं स्थान पक्कं करीत भारतीय सारस्वतात घोडदौड करीत आहेत. आता युगंधर श्रीकृष्णाचा त्यांचा प्रदीर्घ प्रकल्प आकर घेतो आहे. प्रचंड शिल्पकाम करताना अधूनमधून गंमत म्हणून या दगडावर चार छिन्न्या मार, त्या दगडातून एखादी छोटी कलाकृती घडव असाही त्यांचा खेळ रुचिपालट करण्यासाठी चालूच असतो. मग ते कार्यक्रमांची आमंत्रणे घेतात, संमेलनांना जातात; लहानमोठ्या प्रकाशनांमध्ये रस घेतात. छोटेखानी दिवाळी अंकांचेही लेख याच झटक्यात पूर्ण करतात. पण प्रत्येक कामात आपला जीव ओतूनच ते करायचे हा त्यांचा बाणा आहे. त्यामुळे छोटा लेख असो, भाषण असो की अन्य काही कार्यक्रम असो, सावंतांची त्यातली गुंतवणूक ही अर्जुनाला दिसणाऱ्या पोपटाच्या डोळ्यासारखी नेमकी असते आणि सारे काही रसवंत करायची त्यांची प्रतिज्ञा असते. ‘शेलका साज’ हा त्यांच्या २२ लेखांचा संग्रह. हा साज शेलका असल्याने त्यात सर्व प्रकारचा ऐवज आहे. किल्ले सुधागडावर कवी कुलेशाला संभाजी महाराज बोलावतात, उरभेट देतात आणि औरंगजेबाचा पुत्र शाहजादा अकबर आपल्या जन्मदात्याविरुद्ध बंडाचा प्रस्ताव घेऊन आला असताना त्याला संभाजी महाराज कसे रोखतात - त्याची कहाणी ‘किल्ले सुधागड’ यात सावंत सांगतात. रायगडच्या बालेकिल्ल्यातल्या खासे महालात श्री शिवाजीराजे अखेरच्या दुखण्यात कसे दिवस काढत होते याचे चित्रदर्शी वर्णन करून त्यांच्या धीरोदात्त व्यक्तिमत्त्वाचे दर्शन सावंत घडवतात. ‘‘आरक्त देखिजे डोळा, ग्रासिले, सूर्यमंडळा सूर्यमंडळा, सूर्यमंडळा, जगदंबा! चैत्री पुनवेचा, हनुमान जयंतीचा सूर्य रायगडाच्या बालेकिल्ल्याच्या ऐन माथ्यावर असताना महाराजांनी रायगडाच्या हनुमंतानी उड्डाणी झेप घेतली. सूर्यमंडळ कब्जा करण्यासाठी’’ असा भारावून टाकणारा शेवट सावंत करतात. ‘शिवभक्त सरलष्कर’ ही हकीकत आहे १६६५ सालची, औरंगजेबाच्या ब्रम्हपुरच्या छावणीतली. संताजी घोरपडे याच्या पराक्रमाची. म्हसवडच्या नागोजीराव माने यांचा पुत्र सिधोजी याने संताजीबद्दल छत्रपती राजारामाचे मन कलुषित केले. त्यांनी धनाजी जाधवाला सरसेनापती पद दिले. आणि पुढे शिवपिंडीच्या पूजेत मग्न असलेल्या संताजीच्या मानेवर नागोजीने तलवारीने आघात करून त्याचा बळी घेतला. औरंगजेबाकडे ते शिर घेऊन जातो. तेथे येसूबाई संताजीचं शिर तबकात पाहून डोळ्यात अश्रू ढाळत म्हणतात, ‘‘सरलष्कर, तुम्ही खरे शिवभक्त. आजवर आम्हांस मुजरा केलात, आता या क्षणी आमचा मुजरा रुजू करून घ्या.’’ औरंगजेब मनात म्हणतो, ‘‘ऐसी एकभी बहू-बेटी-बेगम हमारे तैमूर खानदानमें क्यों नही पैदा होती? ये मुल्क कभी नही शिकस्त लेगा - जहाँ ऐसे सालार है - ऐसी मलिकाएं है। ऐसे शाहजादे है। तौबा! हम लौटेंगे लाल किले देहली या नही?’’ पुस्तकात सगळ्याच ऐतिहासिक कथा आहेत असे मात्र नाही. ‘शिवकालीन मावळा’ हा मावळ्याचे खाणे, पेहराव, जगणे, लढणे, याची माहिती देणारा लेख आहे. तर शिवरायांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू दाखवणारा गूढरम्य मनफूल हा लेख आहे. ३ एप्रिल १६८० रोजी शिवरायांनी रायगडावर चैत्री पुनवेला आगमन केले. चंद्र हा कल्पनाशक्तीचा कारक. शिवरायांच्या मनाचं फूलही त्या आकाशातल्या चंद्राच्या लाटांवर हेलकावे खात असावे असे सावंत सुचवतात. शिवरायांची तरल कल्पनाशक्ती अनेक प्रसंगात दिसते, तिचे चंद्रभावाच्या प्रभावाच्या रूपात सावंत स्पष्टीकरण - समर्थन करू पाहतात. संभाजीच्या मनाचे शल्यही मांडतात. शिवराजांना चाणक्य नीती ज्ञात होती. चाणक्यासारखा कोणी त्यांना भेटला असता तर महाराष्ट्रात एक नवे पर्व सुरू झाले असते असे सावंतांना वाटते. चाणक्याची अर्थशास्त्रीय बुद्धिमत्ता आणि शिवरायांची सर्वसामान्यांबद्दलची राजस कणव यांची सांगड पडली असती तर दुग्धशर्करा योगच या देशातील समाजपुरुषाने चाखला असता. शिवरायांचा प्रधान अण्णाजी दत्तो याचा तो वकूब नव्हता; अण्णाजीने जमीनधारा पद्धत जमिनीची प्रत बघून सरकारी धारा वसूल करणे ही वापरली; त्याऐवजी प्रत्येक किल्ला धनधान्याने समृद्ध करावा व गवतकाडीने बंदिस्त करावा, शेतकऱ्याला जमिनीचा कस वाढवायला सहाय्य करावे - उत्पादनक्षमता वाढवावी - असा शिवरायांचा मानस होता. पण अण्णाजीला तो विचार प्रत्यक्षात आणता आला नाही असे सावंतांचे प्रतिपादन आहे. अण्णाजी दत्तो याला ते महाराष्ट्रातील शेतीच्या दुरावस्थेबद्दल जबाबदार धरतात. कामगार नेते मनोहर कोतवाल, पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील, अस्पृश्यांचा आधारवड राजर्षी शाहू महाराज यांच्यावरचेही लेख या संग्रहात आहेत. एका वाचकाने कसा गंडा घातला याचा किस्सा ‘चलाख’मध्ये आला आहे. ऐतिहासिक ललित लेखन - एक विचार, मी आणि कविता हे दोन लेख साहित्यविषयक चिंतन प्रकट करतात, तर शेवटी ‘तू नसतीस तर’ ही कविता आईबद्दलच्या कृतज्ञतेच्या भावनेने ओथंबून निथळणारी आहे. ‘‘जळतानाही जगाला उजळण्याचा तेजोमंत्र सूर्याला देणारी, केवळ तूच’’ असे म्हणून ‘‘तू केवळ एक व्यक्ती किंवा जीव नसून’’, तू एक जीवनतत्त्व व जीवनसत्य आहेस असे सावंत म्हणतात. ‘‘तू आहेस एक अतितापासून ते अनागतापर्यंतचे एक जीवनतत्त्व, एक जीवनसत्य. ज्याचे एकमेव नाव आहे व असू शकते आई!’’ सावंतांचा हा ‘कोल्हापुरी’ शेलका साज भरजरी आहे; भव्य आहे; आणि भारावून टाकणाराही आहे. दुसऱ्या आवृत्तीत तो अधिकच नेटका व चकमकीत होऊन चमकतो आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

A-AMITABHCHA
A-AMITABHCHA by G.B. DESHMUKH Rating Star
प्रा. डॉ . वैशाली रवी देशमुख, अमरावती

वाचनाचे फायदे सांगताना प्रसिद्ध इंग्रजी लेखक फ्रान्सिस बेकन म्हणतो `रीडिंग मेकेथ अ फुल मॅन`. वाचनामुळे माणूस परिपूर्ण होतो. क्वचित एखादं असं पुस्तक हाती येतं जे वाचल्यानंतर ह्या परिपूर्णतेची , आत्यंतिक समाधानाची जाणीव होते . नुकतंच जी. बी. देशुख यांचं `अ- अमिताभचा` हे पुस्तक हाती पडलं एका बैठकीत ते वाचून संपवलं आणि काहीतरी माहितीपर तरीही दर्जेदार आणि साहित्यिक मूल्य असणारं पुस्तक वाचण्याचा आनंद प्राप्त झाला. सीमा आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात काम करून निवृत्त झालेल्या जीबी देशमुखांनी २०२० मध्ये अमिताभ बच्चनच्या कारकिर्दीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त त्यांच्या विविध ५० सिनेमातील भूमिकांचे विश्लेषण करणारे साप्ताहिक सदर दैनिक सकाळ मध्ये प्रकाशित केले. कोरोना काळात लिहिलेल्या या लेखमालेला त्यावेळी प्रचंड प्रतिसाद मिळाला. केवळ ज्येष्ठच नाही तर तरुण वाचकांनीही या लेखमालिकेला पसंतीची पावती दिली. २०२२ मध्ये मेहता पब्लिकेशनने अमिताभ बच्चनच्या एकूण ६२ सिनेमांवर आधारित लेख `अ अमिताभचा` या पुस्तक रूपाने प्रकाशित केले. १९६९ पासून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीला पाच दशकांपेक्षा अधिक काळ लोटला तरीही त्याचे सिनेरसिकांच्या भावविश्वावर असलेले अधिराज्य कायम आहे. ती जादू कमी ओसरण्याचं नावच घेत नाही तर ती दिवसेंदिवस वाढत आहे . किरकोळ शरीरयष्टी, भरमसाठ उंची आणि सौंदर्याच्या साचेबंद व्याख्येत न बसणारा चेहरा असलेला अमिताभ आणि त्याला मिळालेली अफाट लोकप्रियता याची सांगड घालणे सर्वसामान्य व्यक्तीच्या आकलनापलीकडचे आहे. अमिताभ बच्चनचे प्रचंड चाहते असलेले जी . बी देशमुख यांच्यासाठी `अ` हा अमिताभचाच आहे. परंतु केवळ एक चाहते म्हणून त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं नाही तर अमिताभ बच्चनचे जे गारुड कित्येक दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर आहे त्यामागची नेमकी कारणे कोणती असू शकतात हे अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने शोधण्याचा प्रयत्न त्यांनी या पुस्तकात केलेला आहे. एक रसिक, चोखंदळ प्रेक्षक, अभ्यासक आणि समीक्षक म्हणून या पुस्तकात लेखक आपल्या समोर येतात. `बेमिसाल` पासून `झुंड` या चित्रपटा पर्यंत अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीतील उत्तमोत्तम ६२ सिनेमांचा लेखकांनी या पुस्तकात परामर्ष घेतलेला आहे. या चित्रपटांमधील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित सर्व बाबींचे अत्यंत अभ्यास पूर्वक रसग्रहण केलेले आहे. `अमिताभ बच्चन चांगला कलाकार आहे` किंवा `अमुक अमुक चित्रपट चांगला आहे` असं जेव्हा एखादा सर्वसामान्य प्रेक्षक म्हणतो त्यावेळेस हे आवडणं किंवा चांगलं असणं नेमकं का आहे याची उत्तरं देण्याचा प्रयत्न लेखकाने प्रत्येक लेखात केलेला आहे. प्रत्येक चित्रपटातील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित हायलाइट्स जसे की, एखादा उत्कट प्रसंग, गाणे, नृत्य, मारामारीचे दृश्य यावर लेखकाने प्रकाश टाकलेला आहे. आपण जर तो चित्रपट पाहिला असेल तर लेखकाने वर्णन केलेले प्रसंग जसेच्या तसे डोळ्यासमोर उभे राहतात आणि बघितला नसेल तर तो चित्रपट आपण पाहिलाच पाहिजे अशी तीव्र इच्छा मनात निर्माण होते. उदाहरणार्थ, शोले या चित्रपटातील रसग्रहणात ,चेहऱ्यावरचे रेषाही ढळू न देता अमिताभने फेकलेले वन लाइनर्स, बुद्धीची चमक दाखवणारे शांतपणे केलेले विनोद, हळुवार प्रेमासाठी त्याचं आतल्या आत झुरणं , मित्राच्या मांडीवर प्राणत्यागाचे उत्कट दृश्य, आणि पिढ्यानपिढ्या लक्षात राहिलेला मावशी लीला मिश्रा सोबतचा विनोदी संवाद यांचे परिणामकारक वर्णन करून त्यांनी अमिताभची उत्तुंग अभिनय क्षमता उलगडून दाखवली आहे. या पुस्तकाला वाचनीय बनवणारा एक घटक म्हणजे लेखकाने वापरलेली भाषा. अत्यंत साध्या, सोप्या आणि अनुभवातून आलेल्या शब्दातून लेखकाने अमिताभ बच्चन भूमिकांचा उत्तरोत्तर चढत जाणारा आलेख शब्दांकित केला आहे. लेखकाच्या भाषा प्रभुत्वाचे साक्ष देणारी अनेक वाक्य पुस्तकांमध्ये जागजागी आढळतात. एका ठिकाणी ते लिहितात, `अमिताभने सिनेमातील विनोदाची सूत्र हाती घेतली तेव्हापासून विनोदी कलाकारांवर जणू बेकारीचं संकट कोसळलं होतं. प्रेक्षकांना दिलेल्या मनोरंजनाच्या वचनाशी `नमक हलाली` करणाऱ्या प्रकाश मेहरा आणि अमिताभ या जोडीने प्रेक्षकांना `और हम नाचे बिन घुंगरू के` असा आनंद दिला होता. असेच एक सुंदर वाक्य- `अमिताभचा उंट मनोरंजनाचा अख्खा तंबू व्यापून बसला होता`. लेखकाच्या ओघवत्या आणि मनाला भिडणाऱ्या भाषा शैलीचं एक उदाहरण मिली चित्रपटाच्या रसग्रहणातील या परिषदेतून दिसून येत: "शेखरच्या मनावर चढलेली उदासीची पुटं अमिताभच्या कसदार अभिनयामुळे आपल्याला अस्वस्थ,उदास करून सोडतात. दारूच्या नशेतील अमिताभचं एक दृश्य मस्त जमलं होतं . मोबाईल, टीव्ही इत्यादी आधुनिक साधनं व्यवहारात येण्याच्या आधीचा तो काळ होता. मिली आजारामुळे घरात बंदिस्त झाल्यानंतर त्या दोघात नोकराच्या माध्यमातून जो पत्र व्यवहार होतो तो आजच्या मोबाईल चॅटिंग पेक्षाही प्रभावी वाटतो. रोज मिलीला वरच्या मजल्यावरून खालच्या मजल्यावर गुलदस्ता पाठवणारा अमिताभ एका चिठ्ठीत लिहितो `जो गुलदस्ता बनके खुद आ जाऊ तो कहा रखुं . ` हे रोमँटिसिझम खूप वरच्या स्तराचं होतं. अमर्याद दुःखाची वीण घट्ट करत जाताना किशोर कुमारच्या दर्दभऱ्या स्वरात `बडी सुनी, सुनी है जिंदगी ये जिंदगी` आणि `आये तुम याद मुझे गाने लगी हर धडकन` ही दोन गाणी वातावरण औदासिन्यानं भरून टाकतात. मनाचा चांगला पण लहानपणी आई वडिलांच्या बाबतीत घडलेल्या घटनेने आणि लोकांनी त्याकरिता डिवचल्यानं कच खाल्लेला, प्रेमाची आस लागलेला एक तरुण अमिताभने लाजवाब रंगवला होता. या पुस्तकाच्या रंजकतेत भर टाकणारा आणखी एक घटक म्हणजे लेखकाचे आत्मचरित्रात्मक निवेदन. प्रत्येक चित्रपटाच्या बाबतीत तो चित्रपट त्यांनी केव्हा पाहिला, कुणाबरोबर पाहिला,त्यावेळी ते किती वर्षांचे होते आणि त्या चित्रपटाचा त्यांच्या भावविश्वावर कसा परिणाम झाला याचा उल्लेख जागजागी केलेला आहे. लेखकाच्या पिढीतील वाचकांना यातून पुनः प्रत्ययाचा आनंद मिळतो. आणि आजच्या पिढीतील इतर वाचकांसाठीही ही बाब रंजक ठरते. पुस्तकाच्या मलपृष्ठावर लेखक म्हणतात, `1973 साली आम्ही पाचवीत असताना आम्हाला प्रथमच हिंदी सिनेमातील नायकाची `ये पोलीस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नही`, अशी आगळीवेगळी मिजास पडद्यावर बघायला मिळाली आणि आता निवृत्तीला आलो तर हाच अद्भुत माणूस आम्हाला `पिंक` या महिलाप्रधान सिनेमात `ना का मतलब सिर्फ ना होता है`, असं ठणकावतो, `बदला` ह्या रहस्यपटात तितक्याच जोरकसपणे `सबका सच अलग अलग होता है ,` असं तत्वज्ञान मांडतो आणि अगदी अलीकडच्या `झुंड` मध्ये झोपडपट्टीतील धटिंगण मुलांच्या घोळक्याला `झुंड नाही, टीम... `म्हणायची शिकवण देतो तेव्हा आजही त्याचं म्हणणं आमच्या हृदयात थेट उतरतं .` पुस्तक वाचत असताना लेखकाच्या अफाट निरीक्षणशक्तीचे आणि अभ्यासू वृत्तीचे दर्शन घडते . विविध दिग्दर्शकांनी अमिताभच्या अभिनयक्षमतेचा केलेला वापर , अमिताभच्या डोळ्यातून सशक्तपणे व्यक्त झालेले हृदयस्पर्शी भाव, वेगवेगळ्या चित्रपटात त्याने केलेला लाथेचा उपयोग, त्याची वैशिष्ट्यपूर्ण नृत्य, आणि भारदस्त आवाजातील संवाद आणि गाणी यांचं वर्णन वाचत असताना लेखकाची संशोधक वृत्ती तर जाणवतेच परंतु आपणही हे चित्रपट पाहून हा रसास्वाद घ्यायलाच हवा ही इच्छा वाचकांच्या मनात प्रकर्षाने निर्माण होते.यातच या पुस्तकाचे फार मोठे यश सामावले आहे हे नक्की! ...Read more

SAAD GHALATO KALAHARI
SAAD GHALATO KALAHARI by MARK & DELIA OWENS Rating Star
मोहन देशपांडे नागपुर

cry of kalahari ह्या पुस्तके अनुवाद हिंदी सर्वोत्तम (RD) मध्ये कित्येक वर्षापूर्वी वाचले होते. माझ्याजवळ, जपून ठेवलेल्या पुस्तकामधे ते पुस्तक गहाळ झाले. मग 4 वर्षापूर्वी हे पुस्तक मिळाले व विकत घेतले. ते अनेक वेळा वाचून काढले, तरी प्रत्येकवेळी वेगळा नंद होतो. ती तुमची रसाळ भाषेची किमया. ह्या मुळेच Deceiption valley एकदा तरी बघता यावी ही इच्छा तुमचे अभिनंदन व धन्यवाद... ...Read more