* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788177666953
  • Edition : 5
  • Publishing Year : JUNE 1994
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 176
  • Language : MARATHI
  • Category : ESSAYS
  • Available in Combos :SHIVAJI SAWANT COMBO SET - 11 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS IS A COLLECTION OF CREATIVE WRITING FROM THE AUTHOR OF THE BEST SELLER, `MRITYUNJAYA`- SHIVAJI SAWANT.
हा आहे ‘मृत्युंजयकार’ शिवाजी सावंत यांच्या विविधरंगी ललितलेखनाचा संच : ‘शेलका साज’! इथं सावंतांच्या खास रसश्रीमंत शैलीत वेध घेतलेले महाराष्ट्रवैभव कविश्रेष्ठ कुसुमाग्रज जसे भेटतील, तसाच लेखकाला चकवा देऊ बघणारा वाचक अशी झूल पांघरलेला लपंगाही भेटेल. छ. शिवराय, शंभूराजे, महाराणी येसूबाई, सरलष्कर संताजी घोरपडे यांच्या जीवनझुंजीतील आजवर मराठी वाचक मनाला अज्ञात राहिलेल्या मनामनांच्या अणीदार वंगोऱ्यांना केलेला रसबाळा, तरल ललितस्पर्श भेटेल. तसाच कसा होता - असेल शिवकालीन रणसंमुख सामान्य मावळा यावर टाकलेला डोळस व वास्तव प्रकाशझोत असेल. इथं आर्य चाणक्याचा वेगळ्याच दृष्टीनं केलेला विचार दिसेल, तसंच, दीनदलितांना ‘आधारवड’ झालेल्या राजर्षी शाहूंचं क्षणदर्शन घडेल. सावंतांनी कथा मोजक्याच बेतल्या. मालिश, भिजाणे यांतून त्यांचं या आकृतिबंधाचं बळ दिसेल. ‘मुकी’ ही कथा तर अल्बर्ट कामूची आठवण करून देईल - यासाठीच या संचाचं शीर्षक : शेलका साज!!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#अशी मने असे नमुने #छावा #छावा #कांचनकण #कवडसे #मोरावळा #मृत्युंजय-नाटक #शेलका साज #युगंधर #ASHI MANE ASE NAMUNE #CHHAVA - NATAK #CHHAWA #KANCHANKAN #KAVADASE #MORAVALA #MRUTYUNJAY - NATAK #SHELKA SAJ #YUGANDHAR
Customer Reviews
  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    जळतानाही जगाला उजळण्याचा तेजोमंत्र देणारी तेजोनिधी व्यक्तित्वे... मृत्युंजय’ची पताका मानानं मिरवत आणि एकेक भाषा पादाक्रांत करीत शिवाजी सावंत आपलं स्थान पक्कं करीत भारतीय सारस्वतात घोडदौड करीत आहेत. आता युगंधर श्रीकृष्णाचा त्यांचा प्रदीर्घ प्रकल्प आकर घेतो आहे. प्रचंड शिल्पकाम करताना अधूनमधून गंमत म्हणून या दगडावर चार छिन्न्या मार, त्या दगडातून एखादी छोटी कलाकृती घडव असाही त्यांचा खेळ रुचिपालट करण्यासाठी चालूच असतो. मग ते कार्यक्रमांची आमंत्रणे घेतात, संमेलनांना जातात; लहानमोठ्या प्रकाशनांमध्ये रस घेतात. छोटेखानी दिवाळी अंकांचेही लेख याच झटक्यात पूर्ण करतात. पण प्रत्येक कामात आपला जीव ओतूनच ते करायचे हा त्यांचा बाणा आहे. त्यामुळे छोटा लेख असो, भाषण असो की अन्य काही कार्यक्रम असो, सावंतांची त्यातली गुंतवणूक ही अर्जुनाला दिसणाऱ्या पोपटाच्या डोळ्यासारखी नेमकी असते आणि सारे काही रसवंत करायची त्यांची प्रतिज्ञा असते. ‘शेलका साज’ हा त्यांच्या २२ लेखांचा संग्रह. हा साज शेलका असल्याने त्यात सर्व प्रकारचा ऐवज आहे. किल्ले सुधागडावर कवी कुलेशाला संभाजी महाराज बोलावतात, उरभेट देतात आणि औरंगजेबाचा पुत्र शाहजादा अकबर आपल्या जन्मदात्याविरुद्ध बंडाचा प्रस्ताव घेऊन आला असताना त्याला संभाजी महाराज कसे रोखतात - त्याची कहाणी ‘किल्ले सुधागड’ यात सावंत सांगतात. रायगडच्या बालेकिल्ल्यातल्या खासे महालात श्री शिवाजीराजे अखेरच्या दुखण्यात कसे दिवस काढत होते याचे चित्रदर्शी वर्णन करून त्यांच्या धीरोदात्त व्यक्तिमत्त्वाचे दर्शन सावंत घडवतात. ‘‘आरक्त देखिजे डोळा, ग्रासिले, सूर्यमंडळा सूर्यमंडळा, सूर्यमंडळा, जगदंबा! चैत्री पुनवेचा, हनुमान जयंतीचा सूर्य रायगडाच्या बालेकिल्ल्याच्या ऐन माथ्यावर असताना महाराजांनी रायगडाच्या हनुमंतानी उड्डाणी झेप घेतली. सूर्यमंडळ कब्जा करण्यासाठी’’ असा भारावून टाकणारा शेवट सावंत करतात. ‘शिवभक्त सरलष्कर’ ही हकीकत आहे १६६५ सालची, औरंगजेबाच्या ब्रम्हपुरच्या छावणीतली. संताजी घोरपडे याच्या पराक्रमाची. म्हसवडच्या नागोजीराव माने यांचा पुत्र सिधोजी याने संताजीबद्दल छत्रपती राजारामाचे मन कलुषित केले. त्यांनी धनाजी जाधवाला सरसेनापती पद दिले. आणि पुढे शिवपिंडीच्या पूजेत मग्न असलेल्या संताजीच्या मानेवर नागोजीने तलवारीने आघात करून त्याचा बळी घेतला. औरंगजेबाकडे ते शिर घेऊन जातो. तेथे येसूबाई संताजीचं शिर तबकात पाहून डोळ्यात अश्रू ढाळत म्हणतात, ‘‘सरलष्कर, तुम्ही खरे शिवभक्त. आजवर आम्हांस मुजरा केलात, आता या क्षणी आमचा मुजरा रुजू करून घ्या.’’ औरंगजेब मनात म्हणतो, ‘‘ऐसी एकभी बहू-बेटी-बेगम हमारे तैमूर खानदानमें क्यों नही पैदा होती? ये मुल्क कभी नही शिकस्त लेगा - जहाँ ऐसे सालार है - ऐसी मलिकाएं है। ऐसे शाहजादे है। तौबा! हम लौटेंगे लाल किले देहली या नही?’’ पुस्तकात सगळ्याच ऐतिहासिक कथा आहेत असे मात्र नाही. ‘शिवकालीन मावळा’ हा मावळ्याचे खाणे, पेहराव, जगणे, लढणे, याची माहिती देणारा लेख आहे. तर शिवरायांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू दाखवणारा गूढरम्य मनफूल हा लेख आहे. ३ एप्रिल १६८० रोजी शिवरायांनी रायगडावर चैत्री पुनवेला आगमन केले. चंद्र हा कल्पनाशक्तीचा कारक. शिवरायांच्या मनाचं फूलही त्या आकाशातल्या चंद्राच्या लाटांवर हेलकावे खात असावे असे सावंत सुचवतात. शिवरायांची तरल कल्पनाशक्ती अनेक प्रसंगात दिसते, तिचे चंद्रभावाच्या प्रभावाच्या रूपात सावंत स्पष्टीकरण - समर्थन करू पाहतात. संभाजीच्या मनाचे शल्यही मांडतात. शिवराजांना चाणक्य नीती ज्ञात होती. चाणक्यासारखा कोणी त्यांना भेटला असता तर महाराष्ट्रात एक नवे पर्व सुरू झाले असते असे सावंतांना वाटते. चाणक्याची अर्थशास्त्रीय बुद्धिमत्ता आणि शिवरायांची सर्वसामान्यांबद्दलची राजस कणव यांची सांगड पडली असती तर दुग्धशर्करा योगच या देशातील समाजपुरुषाने चाखला असता. शिवरायांचा प्रधान अण्णाजी दत्तो याचा तो वकूब नव्हता; अण्णाजीने जमीनधारा पद्धत जमिनीची प्रत बघून सरकारी धारा वसूल करणे ही वापरली; त्याऐवजी प्रत्येक किल्ला धनधान्याने समृद्ध करावा व गवतकाडीने बंदिस्त करावा, शेतकऱ्याला जमिनीचा कस वाढवायला सहाय्य करावे - उत्पादनक्षमता वाढवावी - असा शिवरायांचा मानस होता. पण अण्णाजीला तो विचार प्रत्यक्षात आणता आला नाही असे सावंतांचे प्रतिपादन आहे. अण्णाजी दत्तो याला ते महाराष्ट्रातील शेतीच्या दुरावस्थेबद्दल जबाबदार धरतात. कामगार नेते मनोहर कोतवाल, पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील, अस्पृश्यांचा आधारवड राजर्षी शाहू महाराज यांच्यावरचेही लेख या संग्रहात आहेत. एका वाचकाने कसा गंडा घातला याचा किस्सा ‘चलाख’मध्ये आला आहे. ऐतिहासिक ललित लेखन - एक विचार, मी आणि कविता हे दोन लेख साहित्यविषयक चिंतन प्रकट करतात, तर शेवटी ‘तू नसतीस तर’ ही कविता आईबद्दलच्या कृतज्ञतेच्या भावनेने ओथंबून निथळणारी आहे. ‘‘जळतानाही जगाला उजळण्याचा तेजोमंत्र सूर्याला देणारी, केवळ तूच’’ असे म्हणून ‘‘तू केवळ एक व्यक्ती किंवा जीव नसून’’, तू एक जीवनतत्त्व व जीवनसत्य आहेस असे सावंत म्हणतात. ‘‘तू आहेस एक अतितापासून ते अनागतापर्यंतचे एक जीवनतत्त्व, एक जीवनसत्य. ज्याचे एकमेव नाव आहे व असू शकते आई!’’ सावंतांचा हा ‘कोल्हापुरी’ शेलका साज भरजरी आहे; भव्य आहे; आणि भारावून टाकणाराही आहे. दुसऱ्या आवृत्तीत तो अधिकच नेटका व चकमकीत होऊन चमकतो आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RAZOR SHARP
RAZOR SHARP by ASHWIN SANGHI Rating Star
सुनील माने, पुणे

लेखक अश्विन सांघी “द रोझाबल लाइन” या पहिल्याच कादंबरीने खूप लोकप्रिय झाला. प्राचीन भारतीय दंतकथा/ऐतिहासिक संदर्भ घेऊन त्याच्याभोवती आजच्या काळात रहस्यपूर्ण कथा लिहिणारा अश्विन. Chanakya’s Chant, The Krishna Key, The Sialkot Saga, Keepers of the Kalacakra, The Vault of Vishnu, The Magicians of Mazda अशा एकापेक्षा एक सुंदर रहस्य कादंबर्या “भारत सिरीज़” नावाने खूप प्रसिद्ध झाल्या. या सर्व कादंबऱ्या मी इंग्लिश मधेच वाचल्या. यांचा मराठी अनुवाद मेहता पब्लिशिंग हाउस यांच्याकडे उपलब्ध आहे. अश्विन सांघीने या भारत सिरीज शिवाय एक नवीन थ्रिल्लर सिरीज (कुत्ता कदम) सुरू केली आहे. त्यांतील पहिली कादंबरी Razor Sharp. एक सिरियल किलर मुंबईत एकानंतर एक खून पाडतोय. पोलिस चक्रावले आहेत. 1. रविवार दि २ फेब्रुवारी , गोरेगाव पश्चिममधे रवि मेहराचा खून होतो. त्याची बायको खुशी कॅाल सेंटरचा जॅाब करून रात्री ११.३० ला परत येते. खूप वेळा बेल वाजवून दार न उघडल्यामुळे ती उघडून आत येते तर रवि रक्ताच्या थारोळ्यात मरून पडलेला असतो. त्याचे हात पाठीमागे नायलॅान दोरीने बांधलेले असतात. त्याच्या छातीत सुरा खुपसलेला असतो. त्याच्या तोंडात काहीतरी खाद्य पदार्थ असतो. 2. सोमवार दि १० फेब्रुवारी , लोअर परळमधे सुचंद्रा अग्रवालचा खून. तिची कामवाली आल्यावर दार न उघडल्यामुळे सोसायटीवाले दार तोडतात. आत सुचंद्राचा खून झालेला. हात नायलॅान दोरीने मागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात काहीतरी खाद्यपदार्थ. पोलिस चक्रावलेले. मग पोलिसखाते जागे होते. त्यांचा नावाजलेला अधिकारी जो सस्पेंड झालेला आहे, त्या प्रकाश कदम, DCP याला बोलावले जाते. राज्याचे गृहमंत्री ओंकार लोखंडे, त्यांचा माणूस कमिशनर चव्हाण आणि उपगृहमंत्री जयंत गायकवाड व त्यांचा माणूस SCP राणे, मुंबईचा डॅान भाऊ पाटील जो लोखंडेचाच माणूस असतो, हे सर्व या केसच्या मागावर लागतात. कदम हा राणेंच्या ओळखीचा खास ऑफिसर असतो म्हणून त्यालाही इन्व्हेस्टीगेशनला बोलावले जाते. 3. मंगळवार दि १८ फेब्रुवारी , ठाणे येथे मंगला शहाचा खून. तिच्या शेजारणीमुळे हे कळते. मंगलाचे हात नायलॅान दोरीने पाठीमागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात खाद्यपदार्थ. पोलिस अधिकारी शिंदे कदमबरोबर येतात. मंगलाच्या चेहऱ्याजवळ कदमला पेस्टिसाईडचा वास येतो. चेहरा निळसर झालेला. खून झाल्यावर बॅाडीला हलवलेले दिसते. तो ऑफिसमध्ये जुन्या खूनांचे फोटो तपासतो. त्यांचीही बॅाडी खून केल्यावर हलवलेली दिसते. चेहऱ्यावर निळसर झाक दिसते. तिन्ही खून “फिनेक” ब्रॅंडच्या चाकूने केलेले असतात. हे समान धागे कदम त्याची मुलगी केतुल बरोबर चर्चा करतो. केतुलची आई काही वर्षांपूर्वी कदमला सोडून गेलेली असते. ती भाऊ पाटीलची सावत्र बहीण असते. पण सध्या ती कुठे आहे व काय करते हे माहित नसते. केतुल कोर्टात काम करत असते तसेच ती “शक्ती” या NGO मधेही काम करते. शक्ती हे सोनापूरमधुन सुटका केलेल्या वेश्यांचे पुनर्वसन करत असते. निर्मल नावाचा तिचा मित्र एथिकल हॅकर असतो. तिच्यावर प्रेम करत असतो. कदमला हार्ट अटॅक येऊन गेलेला व स्टेंट बसवलेला असतो. Depression मुळे त्याची सायकॅालॅाजिस्टकडे ट्रिटमेंट चालू असते. कदमला या तिन्ही केसमधे आणखी एक धागा सापडतो. हे खून आठ दिवसांच्या अंतरावर झालेले असतात. म्हणजे पुढचा खून बुधवारी होणार असल्याचे तो राणे व शिंदेला सांगतो. 4. बुधवार दि २६ फेब्रुवारी, कांदिवली पश्चिम, लक्ष्मी बुधीराजाचा खून. तोच पॅटर्न. 5. गुरुवार दि ५ मार्च, खार पश्चिम, गुरुराज अदवानीचा खून सेम पॅटर्न. गुरूराज हा युट्युबवरचा प्रसिद्ध सिंगर असतो. 6. शुक्रवार दि १३ मार्च, ताडदेव, दिव्या शुक्रपाणीवर खूनी हल्ला होतो. पण ती जबर जखमी होते. ती फिटनेस ट्रेनर असल्यामुळे खुन्याबरोबर झटापट करते. पण चाकू पोटात घुसल्यामुळे ती जबर जखमी होते. हात बांधलेले असतानाही ती फोनवर “सिरी” ला तिच्या भावाला, ध्रुवला फोन लावायला सांगते. फोन लागतो व ती “हेल्प हेल्प” एव्हढेच बोलून बेशुद्ध होते. म्हणून खुनी पळून जातो. ध्रुव तिथे पोहोचून तिला हॅास्पिटलमधे ॲडमिट करतो. पोलिसांना तिथे खुन्याची बॅग सापडते. त्यांत नायलॅानची दोरी, बेगॅान स्प्रे व राजमाच्या बिया सापडतात. तिसऱ्या खुनाआधी पोलिस संशयित म्हणून राजू दाभाडेला अटक करतात. पण चौथ्या खूनाच्या वेळेस तो कस्टडीतच असतो. मग खूनी कोण? 7. शनिवार दि २१ मार्च, बान्द्रा पश्चिम, शनिया डिसौजाचा खून होतो. सेम मोडस ऑपरेंडी . 8. शनिवार दि २८ मार्च, चेंबूर, ७१ वर्षांच्या राहुल सिंह नावाच्या सिख व्यक्तिचा खून होतो. तीच पध्दत. यानंतर एक दिवस कदम KBC बघत असताना अमिताभ बच्चन एका सिनेमाचं गाणं लावून त्याचा पिक्चर ओळखायला सांगतात. ते गाणं असते- “सोमवार को हम मिले मंगलवार को नयन बुध को मेरी निंद खुली जुम्मेरात को चैन अरे शुक्र शनी कटे मुश्किलसे आज है इतवार सात दिनों में हो गया जैसे सात जनम का प्यार” आणि कदमच्या डोक्यात एकदम प्रकाश पडतो… अरे, हे सर्व खून असेच रविवार ते शनिवार एक एका वारी घडलेत! पण शनिवारी दोन खून कसे? याच्या मागे काही खगोलशास्त्र किंवा भविष्याचा तर संबंध नाही? कदमला आठवतं की शेजारी राहणारा डॉ. देसाईला पण भविष्य-खगोलशास्त्राची आवड व माहिती आहे. ( डॅाक्टर कडे सापडलेल्या नायलॅानचे रंगीत दोर व फिनेक कंपनीचा चाकू यामुळे एक संशयित म्हणून कदमने त्याला अटक करून पुछताछ केलेली असते) कदम लगेच डॅाक्टरांकडे जातो. त्यांची माफी मागून त्यांना या प्रश्नांत मदत करायला सांगतो. तो या सर्व खुनांचा सिक्वेन्स सांगतो. ते प्रत्येक वारी का घडले? मग शनिवारी दोन का? यापुढे कोणता वार? कुणाचा खून? डॅाक्टर सांगतात की भारतीय भविष्य व खगोल शास्त्रात नवग्रहांना खूप महत्व आहे. रवि, सोम(चंद्र), मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनि, राहू आणि केतु. यांचे रंग व धान्य वेगवेगळे असतात. त्या त्या ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी ते वापरले जातात. कदम ही माहिती लिहून घेतो. त्यावरून प्रत्येक खुनात वापरण्यात आलेले फिनेक कंपनीचे चाकू, वेगवेगळ्या रंगांचे नायलॅान दोर व तोंडातील पदार्थ यांचा संबंध जोडून एक तख्ता तयार करतोः- “रवि मेहरा-रविवार-सोनेरी दोर- तोंडात गहू-दिशा पूर्व सुचंद्रा-सोमवार-चंदेरी दोर-तोंडात तांदूळ-दिशा पश्चिम मंगला शाह-मंगळवार-लाल दोर-तोंडात तूर डाळ- दिशा दक्षिण लक्ष्मी बुधीराजा-बुधवार-हिरवा दोर-तोंडात हिरवे मूग-दिशा उत्तर गुरुराज अदवानी-गुरूवार-पिवळा दोर-तोंडात हरबरा डाळ-दिशा उत्तर पूर्व(ईशान्य) दिव्या शुक्रपाणी-शुक्रवार-पांढरा दोर-राजमा-दिशा दक्षिण पूर्व शनिया डिसौजा-शनिवार-काळा दोर-तोंडात काळे तिळ-दिशा उत्तर पश्चिम राहुल सिंग-शनिवार-निळा दोर-तोंडात उडीद दाळ-दिशा दक्षिण पश्चिम” आता उरला एकच ग्रह-केतु. केतुचा वार मंगळवार. ग्रे रंग, चना दाळ, दिशा दक्षिण पश्चिम. “केतु”म्हणजे कदमची मुलगी केतुलचा नंबर लागणार? आज तर मंगळवारच आहे! कदम घाबरून जातो! तो केतुलला फोन करतो पण तो बंद लागतो. ती सध्या कुठे आहे? कोर्टात? कदम आपल्या मुलीला वाचवतो का? खरा खुनी कोण असतो? तो पकडला जातो का? त्याचे यामागचा उद्देश काय असतो? याच्यामध्ये अजून कोण सामिल असतं का? याची उत्तरे मिळण्यासाठी वाचावी लागेल अश्विन सांघी यांची कादंबरी Razor Sharp. ...Read more

BANGARWADI
BANGARWADI by VYANKATESH MADGULKAR Rating Star
Sameer Kazi

सुंदर अशी कादंबरी माणदेशी बनगरवाडी तशी कोरडी रखरखती पण, यातील पात्रात मायेचा करुणेचाओलावा मनात घर करुन जातो