ANU AGGARWAL

About Author

Birth Date : 11/01/1969


ANU AGGARWAL IS A FORMER INDIAN MODEL AND ACTRESS. SHE IS BEST KNOWN FOR HER WORKS IN AASHIQUI, THE CLOUD DOOR AND THIRUDA THIRUDA.

चित्रपट व मॉडिंलगच्या क्षेत्रात स्वतःची छाप उमटवणा ऱ्या अनू अगरवाल यांना बी.ए.ला सुवर्णपदक मिळाले. सामाजिक शास्त्रात त्यांनी एमबीए ही पदवी प्राप्त केली. मुंबईत वास्तव्यास असताना गोदरेज मार्व्हल साबणाच्या जाहिरातीत त्या मॉडल म्हणून झळकल्या आणि सुपर मॉडल म्हणून त्यांची प्रसिद्धी झाली. मॉडलिंगच्या क्षेत्रात त्या आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचल्या. एम टीव्हीवरही त्यांनी काम केलं. १९९०मध्ये ‘आशिकी’ या चित्रपटात त्यांनी नायिकेची भूमिका केली आणि त्या स्टार बनल्या. ‘क्लाउड डोअर’ या चित्रपटात त्यांनी प्रमुख भूमिका साकारली. तीस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये हा चित्रपट दाखवला गेला आणि समीक्षकांनीही या चित्रपटाचं कौतुक केलं; मात्र ग्लॅमरच्या शिखरावर असताना त्या मॉडलिंग व चित्रपट क्षेत्रापासून दूर गेल्या आणि योगाश्रमात राहू लागल्या. १९९९मध्ये त्यांना झालेल्या भीषण अपघातानंतर त्या कोमात गेल्या होत्या; पण त्यातून त्या बाहेर आल्या. सध्या अनू त्यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून स्व-उपचाराच्या मंत्राचा प्रसार करतात. तसेच पाच ते चौदा या वयोगटातील एचआयव्हीबाधित मुलींसाठी त्या काम करतात. मुंबईतील झोपडपट्ट्या हे त्यांच्या समाजकार्याचे क्षेत्र आहे. त्यांनी कॅन्सरवरही संशोधन केले आहे. जगभरातील वैज्ञानिक संशोधन परिषदांमध्ये त्या सहभागी झाल्या आहेत. ‘अनूप’नंतर त्या मुलांमधील सकारात्मक विकास या विषयावर दुसरे पुस्तक लिहीत आहेत. ‘अनू अगरवाल फाउंडेशन’साठी त्यांना ‘ASIA’S BLACK SWAN AWARD’ आणि ‘CSR AWARD’ने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच भारत सरकारतर्फे त्यांना ‘योगा अ‍ॅवॉर्ड’ने गौरवण्यात आले आहे. याव्यतिरिक्त अन्यही पुरस्कार त्यांना लाभले आहेत.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
ANUP Rating Star
Add To Cart INR 250

Latest Reviews

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
डॉ शिंदे निलेश, अमरावती

`कुलमामाच्या देशात` वाचून काढले. प्रत्येक कथा खुप वाचनीय आहे. `कपारीत वाघोबा` मध्ये रवींद्र वानखडे ह्यांनी पहाटे चार ते 10 नुसती भ्रमंती केली आहे.. सकाळची सूर्यकिरण अंगावर पडली असताना वाघ बघायला भेटणं ही एक अप्रूप वाटणारी गोष्ट आहे. `डरकाळीचा रार` वानखडे साहेबांनी बेलसरें सोबत अनुभवला आहे. `जिवाची पर्वा` न करता वानखडे साहेब पाळण्यात विसावले होते. गव्याच्या पिलावर वाघीणीने हल्ला केला नाही.. हे वानखडे साहेबांनी स्वतः बघितले व आम्हाला देखील समजले.. वाघाच्या पंजाची कशी प्रतिकृती तयार करतात हे सांगितले परंतू मला लक्षात आले नाही (मी प्रत्यक्ष बोलून जाणून घेईन). `मेहमान रह गया` या कथेत वाघाने माणसाची शिकार कशी केली त्यानंतर वनविभागाने बसची सोय करून मुलांना मदत कशी झाली हे देखील सांगितले व आपल्या सारखे वन अधिकारी काय करू शकतो हे प्रांजळ पणे नमूद केले आहे.. सेमडोह येथील गजराजाची कथा अजून देखील लोक सांगतात त्यातील तुम्ही त्याला वाचवयाचा प्रयत्न केला परंतू तो नियतीला मान्य नसेल. बाणा का घुंगरू- मधील हल्ला व घटना मन विचलित करणारी वाटली व मेळघाट मधील वन कर्मचारी किती कामसू आहेत हे त्या वरून दिसले.. मला बाणा ढाप प्रत्यक्ष बघायला आवडेल.. `रानगव्यांची कवायत` मध्ये रानगवे स्वतःच रक्षण कश्या पद्धतीनं करतात हे मला पहिल्यांदा समजले.. कोकटु इथं तीन दिवस आपण वाघ बघण्याची केलेली हॅट्रिक ही जंगलाने तुम्हा वनाधिकार्‍यास दिलेली सलामी आहे. `शिकार हो गया` - माहुल वेलीचा कसा उपयोग केला जातो व पोळी तयार करतात हे देखील वेगळी गोष्ट वाटली.. आपण सांबर शिकार कशी थांबवली व वन्यजीवनाची साखळी अबाधित राखली.. वाघ खेकडे मारून खातो हे ऐकून नवल वाटले.. असा सॉलिड वन अधिकारी मेळघाटला लाभला हे या कथां मधून मला समजलं व प्रत्येक वाचकाला हे जंगल, इथले लोक या विषयी कायम आकर्षण निर्माण करत राहील.. ...Read more

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
श्री. बाबाराव घोरमाडे, अमरावती

अमरावती जिल्हा मधील एका सामान्य खेड्यातील, एक अलौकिक असामान्य अशा फुटबॉल खेळाडूचे हे व्यक्तिचरित्र. १९४० ते १९५१ हा कालखंड म्हंजे तसाही भारतीया करीता त्यातल्या त्यात ग्रामीण भागाकरिता खडतर कालखंड. अशा विपरीत परिस्थितीत शैक्षणिक आर्थिक सामाजिक मारगदर्शन इत्यादी पाठबळ चा अभाव असताना सुद्धा आतंरराष्ट्रीय दर्जा चा खेळाडू निर्माण होणे हे ते चरित्र नायक चे असामान्य व्यक्तिमत्व अधोरेखित होते. समाधानाची आनंदाची बाब ही की हे पुस्तक रूपाने प्रसिध्द करण्याचे काम चरित्र नायक चे सुपुत्र श्री गजाननराव उर्फ जी बी देशमुख यांनी केले. हे सर्व काही अंशी कर्ज ओझे हलके करण्यासारखे आहे लेखकाला या करीता खूप मेहनत करून माहिती संकलित करावी लागली. एखादी थप्पड बनती थी........ बडे बेआबरू होकर घरी आलो........पण कहाणी मे ट्विस्ट अभि बाकी था..... प्रसंगी चे वाक्य रचना , कोसळणाऱ्या धबधबा सारखे निखळ आनंद देऊन गेले . मेहता पब्लिशिंग ने लॉन्च केले म्हणजे सर्वदूर मराठी माणसाचे पर्यंत पोहोचले आहे वाचनीय आहे प्रत्येकाने वाचावे.विसावा शतकातील पुर्वाध, विपरीत परिस्थितीतही किती कष्ट करावे लागले असतील? धन्य ते.. ...Read more