Mahavir Shah, Pune मा.रा.रा.श्री.विश्र्वास नांगरे पाटील साहेब,(l.P.S.)
सह आयुक्त, मुंबई पोलीस,
स.न.वि.वि.
सर आत्ताच आपले नवे पुस्तक " कर हर मैदान फतेह" वाचुन झाले.
अपेक्षेप्रमाणे हे ही पुस्तकं अतिशय उत्तम झाले आहे ,. कारण ते लिहण्या मागचा आपला हेतु अतिशय उदात्त आहे
या पुस्तकामुळे युवकांनाच काय पण सर्वच वयोगटातील विचारशिल व्यक्ती ना योग्य / अयोग्य काय करावे, काय करु नये याचे बहुमोल मार्गदर्शन मिळेल.
तसेच M.P.S.C./ U.P.S.C. च्या अभ्यासकांना आपण परीक्षा पास होउ पण नंतर चे ट्रेनिंग झेपेल का याचे प्रामाणिक उत्तर शोधण्यास भाग पाडेल व कदाचित त्यांना वस्तुस्थिती ची जाणिव होऊन त्यांना योग्य निर्णय घेऊन वेळीच त्यांच्या वेळ, पैसे इ.नुकसान व अपेक्षा भंगाचे दु:ख हि टळेल. सध्या या परिक्षेसाठी भाऊगर्दी आहे ती कमी होईल. या विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा फायदा उठवणारा सर्व प्रकारच्या बाजारु व्यक्ती व वृत्ती ना आळा बसेल.
काही अब्ज रुपये व तेव्हढेच मनुष्य तास वाचतील.
या साठी हा महाराष्ट्र आपला कायम ॠणी राहील.
तसेच आपण मोबाईल , इंटरनेट,सोशल मीडिया यांच्या गंभीर धोकादायक स्वरूप पण विस्ताराने उलगडून दाखवले आहे त्या मुळे हे पुस्तक संपूर्ण समाजालाही जागे करणारे आहे .
यामुळे हे पुस्तक प्रत्येक युवक युवती नी तर वाचलेच पाहिजे पण प्रत्येक कुटुंबाने , प्रत्येक व्यक्ती ने वाचुन स्वतः मध्दे आवश्यक त्या सुधारणा केल्या पाहिजेत.
हे पुस्तक " व्यक्तिमत्व विकास " साठी सर्वांगाने उत्कृष्ठ पुस्तक आहे.
आपले अत्यंत अभ्यासपूर्ण संदर्भासह ओघवते सादरीकरण खिळवून ठेवते .
आपल्या तल्लख स्मरणशक्ती चे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.
तसेच आपले माता पिता, गुरूजन , दोन्ही अकादमी मधले आपले ट्रेनर्स विषयी आपली कृतज्ञता अभिनंदनीय आहे.
इतके सुरेख पुस्तक सादर केल्या बद्दल आपले व प्रकाशक व संपूर्ण टीम चे खुप खुप आभार.
आपल्या भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा व पुन्हा एकदा खुप खुप धन्यवाद 🙏💐 ...Read more
KIRAN BORKAR अंगावर काटा आणणारे आत्मकथन....
हे आत्मकथन आहे एका ज्यूचे. जो नाझींच्या छळछावणीतून सुटून आलाय. माणुसकीचा अंत म्हणजे ज्यूची छळ छावणी. नाझीनी पद्धतशीरपणे केलेला ज्यूचा नरसंहार यातून दिसून येतो.कोवळ्या मुलांनी भरलेल्या गाड्या गॅस चेंबरकडे जात होत्या. भटटीचे इंधन म्हणून जिवंत माणसे वापरली जात होती. नाझीनी कित्येक लहान मुलांना आपली आई बहीण डोळ्यादेखत भट्टीत जळताना जबरदस्तीने पाहायला लावली. नाझींच्या क्रौर्याच्या कहाण्या अनेक पुस्तकातुन वाचल्या गेल्यात . ट्रान्सील्वानियातील सिघेट गावातील पंधरा वर्षाच्या ज्यू मुलाची ही कहाणी जी त्याने प्रत्यक्ष अनुभवली आहे. छळछावणीतील प्रत्यक्षात पाहिलेले दाहक अनुभव हा मुलगा आपल्याला सांगतो. सिघेट गावातील तो मुलगा आपले आई वडील आणि तीन बहिणी यांच्यासोबत राहतोय. एके दिवशी सिघेटमध्ये जर्मन सैनिक घुसले. त्यांनी सर्व ज्यूना पिवळा तारा धारण करायला लावला.त्यांना हॉटेल मंदिरात जाण्यास बंदी घातली. संध्याकाळी सहा नंतर घराबाहेर पडू नये असा आदेश काढला. ज्यूच्या बंदिस्त वसाहती उभारल्या गेल्या .त्यालाच घेटो नाव दिले गेले आणि एक दिवस त्या सर्वांना सिघेटमधून हद्दपार करण्यात आले. हद्दपार केलेल्या ज्यूना छळ छावणीत नेण्यात आले.तिथे स्त्री पुरुष लहान मुले याना वेगळे केले गेले. त्या नंतर कोणीही आपल्या कुटूंबातील स्त्री पुरुषांना पाहू शकले नाही. मग सुरू झाला फक्त छळ,अमानुष मारहाण ,जनावरांनाही मिळणार नाही इतकी क्रूर वागणूक. उपासमार आणि हाड गोठविणार्या थंडीत गुरांच्या डब्यातून हजारो किलोमीटरचा प्रवास. कित्येकजण त्या भयानक थंडी गारठून मेले.काहीजण फक्त बर्फ खाऊन जगले. गॅस चेंबरमध्ये आपला नंबर कधी येईल याची वाट पाहत राहिले. या छळछावणीतही त्या मुलाने आपल्या वडिलांची साथ सोडली नाही. प्रसंगी भयानक मार ही खाल्ला. कणाकणाने आपल्या वडिलांना मरताना त्याने पाहिले.शेवटी अमेरिकन सैन्याने त्या छळछावणीवर ताबा मिळवला आणि त्याची सुटका झाली . लेखकाने ओस्लो येथे १० डिसेंबर १९८६ रोजी नोबेल शांती पुरस्कार स्वीकारला . ...Read more