ANU AGGARWAL

About Author

Birth Date : 11/01/1969


ANU AGGARWAL IS A FORMER INDIAN MODEL AND ACTRESS. SHE IS BEST KNOWN FOR HER WORKS IN AASHIQUI, THE CLOUD DOOR AND THIRUDA THIRUDA.

चित्रपट व मॉडिंलगच्या क्षेत्रात स्वतःची छाप उमटवणा ऱ्या अनू अगरवाल यांना बी.ए.ला सुवर्णपदक मिळाले. सामाजिक शास्त्रात त्यांनी एमबीए ही पदवी प्राप्त केली. मुंबईत वास्तव्यास असताना गोदरेज मार्व्हल साबणाच्या जाहिरातीत त्या मॉडल म्हणून झळकल्या आणि सुपर मॉडल म्हणून त्यांची प्रसिद्धी झाली. मॉडलिंगच्या क्षेत्रात त्या आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचल्या. एम टीव्हीवरही त्यांनी काम केलं. १९९०मध्ये ‘आशिकी’ या चित्रपटात त्यांनी नायिकेची भूमिका केली आणि त्या स्टार बनल्या. ‘क्लाउड डोअर’ या चित्रपटात त्यांनी प्रमुख भूमिका साकारली. तीस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये हा चित्रपट दाखवला गेला आणि समीक्षकांनीही या चित्रपटाचं कौतुक केलं; मात्र ग्लॅमरच्या शिखरावर असताना त्या मॉडलिंग व चित्रपट क्षेत्रापासून दूर गेल्या आणि योगाश्रमात राहू लागल्या. १९९९मध्ये त्यांना झालेल्या भीषण अपघातानंतर त्या कोमात गेल्या होत्या; पण त्यातून त्या बाहेर आल्या. सध्या अनू त्यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून स्व-उपचाराच्या मंत्राचा प्रसार करतात. तसेच पाच ते चौदा या वयोगटातील एचआयव्हीबाधित मुलींसाठी त्या काम करतात. मुंबईतील झोपडपट्ट्या हे त्यांच्या समाजकार्याचे क्षेत्र आहे. त्यांनी कॅन्सरवरही संशोधन केले आहे. जगभरातील वैज्ञानिक संशोधन परिषदांमध्ये त्या सहभागी झाल्या आहेत. ‘अनूप’नंतर त्या मुलांमधील सकारात्मक विकास या विषयावर दुसरे पुस्तक लिहीत आहेत. ‘अनू अगरवाल फाउंडेशन’साठी त्यांना ‘ASIA’S BLACK SWAN AWARD’ आणि ‘CSR AWARD’ने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच भारत सरकारतर्फे त्यांना ‘योगा अ‍ॅवॉर्ड’ने गौरवण्यात आले आहे. याव्यतिरिक्त अन्यही पुरस्कार त्यांना लाभले आहेत.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
ANUP Rating Star
Add To Cart INR 250

Latest Reviews

रुपाली सोनवणे

#रुक #जाना #नही लेखक: Dr. भावेश भाटिया शब्दांकन: Dr: सचिन पाचोरकर अनुवाद: सुप्रिया वकील ​अंथरून पाहून पाय पसरावे... अह्ह.. त्या निर्जीव अंथरुणासाठी आपल्या सजीव पावलांना का त्रास द्यावा? असेच एक जबरदस्त आत्मचरित्र वाचून संपवलं आणि एक ऊर्जा निर्माणकरून गेलं, पुस्तकाचं नाव आहे `रुक जाना नहीँ ​डॉ. भावेश भाटिया यांची ही प्रेरणादायी कहाणी. शाळेत असताना आलेलं अकाली अंधत्व आणि त्यानंतर खडखडीत खडतर जीवनाचा सुरू झालेला प्रवास, पण या प्रवासात खचलेल्या बालमनाला त्यांच्या आईने दिलेलं बळ, प्रेरणा व आत्मसन्मानाची शिकवण आणि स्वाभिमानाचे धडे लेखकास पुरे होते. हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. चांगल्या धडधाकट व्यक्तीवर संकट आल्यावर दूर दूर पळणारे नातलग, मित्र परिवार, जातभाई... दृष्टी गेलेल्या व्यक्तीस कितपत आधार देतील? पण एक ऑपरेटर ते एक उद्योजक, `सनराईज कॅण्डल`चा विस्तार आणि स्वतःबरोबर अनेक दृष्टिहीन व्यक्तींना स्वतःच्या पायावर उभं करून रोजगार देणारा हा अवलिया किती अडथळे पार करून आलाय हे जाणून घेण्यासाठी पुस्तक वाचायला हवंच. ​कुठलाही वशीला नाही की कोणाची सहानुभूती नाही, स्वबळावर विविध प्रयोग करत उद्योग यशस्वी करणं सोपं नाही. यात ज्या ज्या देवमाणसांनी हातभार लावला त्यांचा पण उल्लेख आहे, पण त्या देवमाणसांनी देखील कधीच उपकारिक भाषा न करता व स्वाभिमान न दुखावता कशी मदत करता येऊ शकते हे त्यांच्या कृतीतून दाखवून दिलंय. लेखक फक्त उद्योग उभारून थांबले नाहीत तर त्यांनी सामाजिक जाणीवेचं भान देखील ठेवलंय. महाबळेश्वरमध्ये सनराईज कॅण्डल नावाने त्यांनी भव्य असा उद्योग परिसर आणि म्युझियम सुरू केलंय, तेथे अनेक दृष्टिहीन व्यक्तींना रोजगार मिळाला आहे त्याचबरोबर सर्वजण स्वाभिमानाने कष्ट करून जगत आहेत. हजारो आयुष्य त्यांनी उजळून टाकली आहेत. दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कार सह एकून 46 पुरस्कारांचे ते मानकरी आहेत.विशेष म्हणजे सर्व पुरस्कार त्यांच्या योग्यतेनुसार दिले आहेत.. आणी अशा हजारो पुरस्कारांचे ते मानकरी आहेत असंच वाटत..त्यांच्या कामाची दखल रिलायन्स ग्रुप ने देखील घेतली आहे.व त्यांच्या पुस्तकास प्रस्तावना देखील नीता अंबानी यांनी दिली आहे.उद्योग करताना छोट्या छोट्या गोष्टी कसा प्रभाव करतात याच वर्णन देखील त्यांनी लिहिल आहे.. ​या कार्यात महत्त्वाचं योगदान त्यांच्या धर्मपत्नी नीता भाटिया यांनी दिलं आहे. दूरदृष्टी ठेवून आपल्या पतीस प्रोत्साहन देऊन, नवीन कल्पनेसह पाठिंबा देऊन त्यांना हुरूप देण्याचं काम त्यांनी केलंय. नीता भाटिया यांचं कर्तृत्व, त्यांचं पवित्र निस्वार्थी प्रेम या पुस्तकातून वाचताना आंतरिक वेगळी ऊर्जा मिळते. कलियुगातील देवी हा शब्द व मान त्यांना समर्पक वाटतो. पुस्तक सर्व वयोगटातील वाचक वाचू शकतात. मनाने खचलेल्या पण शरीराने धडधाकट असलेल्या प्रत्येक व्यक्तीने वरील पुस्तक नक्की वाचावं आणि आत्मसात करावं. एवढ्या उंचीवर असूनही जमिनीवर पाय असलेल व्यक्तिमत्व आहे. अगदी प्रेमळ पणे वागण बोलण सन्मान देण..ही दैवी देणगी त्यांच्या जवळ आहे. ...Read more