* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: INDIA@70:SNAPSHOTS SINCE INDEPENDENCE
  • Availability : Available
  • Translators : JOSEPH TUSKANO
  • ISBN : 9789353173203
  • Edition : 1
  • Publishing Year : OCTOBER 2019
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 400
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : NON-FICTION
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
ENTER THE PORTAL THAT WILL EXPORT YOU ALL THE WAY TO THAT HISTORIC STROKE OF THE MIDNIGHT HOUR! THE YEAR 1947 WAS ONE OF CHANGE. AFTER ALMOST 200 YEARS OF BRITISH RULE, INDIA BECAME A UNITED POLITICAL ENTITY. ONLY ONE QUESTION RANG LOUD: WHAT TYPE OF NATION WOULD THE NEW INDIA BE? THIS BOOK TRACES THE COUNTRY’S WHIRLWIND JOURNEY, GIVING US A LOOK AT THE LAST SEVENTY YEARS. AGAINST A POLITICAL BACKDROP, IT PROVIDES GLIMPSES OF INDIA’S VAST AND RICH CULTURE, ITS MANY LANGUAGES AND REMARKABLE DIVERSITY, ITS EMINENT PERSONALITIES AND NOTABLE ACHIEVEMENTS IN ALL SPHERES. FEATURING BITE-SIZED INFORMATION, FUN FACTS, CHARMING ILLUSTRATIONS AND DETAILED MAPS, THIS SPECIAL BOOK SUMS UP THE LOGS OF INDIA’S INDEPENDENCE IN A FITTING WAY.
स्वतंत्र भारताचा सखोल समीक्षात्मक आढावा.. देशाचा सत्तर वर्षांतला झंझावाती प्रवास... फाळणीपासून ते १९६२ सालचं चीनचं आक्रमण, आणीबाणीपासून ते कलामांची छाप, लोकपाल विधेयक ते नोटाबंदीचे धोरण; या साऱ्या आठवणींचा लेखाजोखा यात समाविष्ट आहे. त्यातून भारत देशाची विस्तीर्ण अन् समृद्ध संस्कृती आणि नजरेत भरणारी सार्वभौम प्रगती यांची ओळख होते.

No Records Found
No Records Found
Keywords
#INDIA AT70 #ROSHENDALAL #JOSEPHTUSKANO # COUNTINGOF PEOPLE #EMERGENCY #ISRO #LIBERATIONOFGOA #KHALISTAN #इंडियाअॅटसेव्हन्टी #सत्तरीतलाभारत #रोशनदलाल #जोसेफतुस्कानो #संदर्भग्रंथमाहितीपर #आणीबाणी #इस्रो #गोवामुक्ती #खलिस्तान
Customer Reviews
  • Rating Star महाराष्ट्र टाइम्स संवाद

    सत्तरीच्या लेखाजोखा.... डॉ. रोशन दलाल या इंग्रजी लेखिका असून त्यांची `पुफीन हिस्टरी ऑफ वर्ल्ड` आणि `रीलिजन्स ऑफ इंडिया` ही अभ्यासपूर्ण व संशोधनात्मक पुस्तक गाजली आहेत. पुस्तकांच्या याच रांगेत त्यांच्या `INDIA AT 70` या पुस्तकाचा देखील समावेश करवा लागेल. याच नव्या पुस्तकाचा जेष्ठ विज्ञान लेखक जोसेफ तुस्कानो यांनी केलेला मराठी अनुवाद `सत्तरीतील भारत` नुकताच प्रसिद्ध झाला आहे. १४ ऑगस्ट १९४७ रोजी मध्यरात्री ब्रिटिशांचा युनियन जॅक जाऊन भारताचा तिरंगी झेंडा अस्मानात विहार करू लागला. त्या रोमहर्षक ऐतिहासिक दिवसापासून गेली ७० वर्ष भारत खंडात ज्या ज्या राजकीय सामाजिक, साहित्यिक, ऐतिहासिक, आर्थिक, आरोग्य, व कला- क्रीडा विषयक घडामोडी घडलेल्या आहेत, त्या साऱ्यांचा या पुस्तकात धांडोळा घेण्यात आला आहे. या प्रत्येक क्षेत्रात भारताने केलेल्या प्रगतीचा आढावा या पुस्तकात प्रामाणिकपणे घेण्यात आलेला आहे. एखाद्या व्यक्तीने आपल्या वयाची सत्तरी पार करणे हि सर्वसामान्य घटना असते; मात्र एखाद्या देशाने सत्तरीची हि घोडदौड करणं खूप अभूतपूर्व आणि ऐतिहासिक घटना असते. या पुस्तकात गेल्या सत्तर वर्षातल्या काळातील प्रत्येक वर्षी घडलेल्या घटनांवर दृष्टिक्षेप टाकण्यात आलं आहे. भारतातील राजकीय पार्शवभूमीवर या देशातील भव्य-दिव्य समृद्ध संस्कृती, ख्यायकीर्त व्यक्ती आणि सर्व क्षेत्रातील यशोगाथा यांचा मागोवा अभ्यासू वृत्तीने घेतलेला आहे. प्रत्येक प्रकरणाचा प्रारंभ त्या त्या वर्षीच्या मुख्य राजकीय घटनेवर प्रकाशझोत टाकून केलेला आहे. तदनंतर निवडक व्यक्ती आणि त्या यावर्षीच्या सांस्कृतिक, साहित्यिक, कला-क्रीडा विषयक घटना उद्धृत केल्या आहेत. अखेरीस काही ठळक घटनांचा नाममात्र उल्लेख केला आहे आणि त्याचबरोबर समर्पक छायाचित्रे, रेखाटने दिलेली आहेत. हि सारी माहिती पेश करताना लेखिकेने पानोपानी तळटीपेच्या रूपात संदर्भग्रंथांची सूचीही देण्याचा सुज्ञपना दाखवला आहे. त्यामुळे जिज्ञासू व अभ्यासू वाचक अधिक माहितीसाठी मूळ स्रोताकडे जाऊ शकतात. कोणत्याही देशाची प्रतिमा ही चित्रपट, साहित्य, संगीत, नृत्य आणि चित्रकला अशा विविध क्षेत्रात घडलेल्या घटनांतून अधोरेखित होत असते. त्या घटनांतून संबोधित राष्ट्राची समृद्धी, श्रीमंती व विकासाकडे केलेल्या वाटचालीचाच प्रत्यय येत असतो. या पुस्तकातील अभ्यासपूर्ण, संशोधनात्मक माहितीमुळे वाचकांच्या ज्ञानात नक्कीच भर पडेल. या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे आपण हवे ते पान उघडावे आणि त्या त्या वर्षी घडलेल्या मनोवेधक घटना वाचून इतिहासाच्या काळात वावरावे, वर्तमानकाळाच्या प्रकाशात भविष्याचा वेध घेत राहावे. साध्या सोप्या ओघवत्या, पण लालित्यपूर्ण भाषेत पुस्तकाची मांडणी केलेली आहे. तिथे अनुवादकाचे कसब नजरेत भरते. ...Read more

  • Rating StarMaharashtra times 24th May 2020

    सत्तर वर्षांचा लेखाजोखा... ... डॉ. रोशन दलाल या प्रसिद्ध इंग्रजी लेखिका असून त्यांची `पुफिन हिस्टरी ऑफ इंडिया`, `पुफिन हिस्टरी ऑफ वर्ल्ड` आणि `रीलिजन्स ऑफ इंडिया` ही अभ्यासपूर्ण व संशोधनात्मक पुस्तकं गाजली आहेत. पुस्तकांच्या याच रांगेत त्यांच्य `India at 70` या पुस्तकाचादेखील समावेश करावा लागेल. याच नव्या पुस्तकाचा ज्येष्ठ विज्ञान लेखक जोसेफ तुस्कानो यांनी केलेला मराठी अनुवाद `सत्तरीतला भारत` नुकताच प्रसिद्ध झाला आहे. १४ ऑगस्ट १९४७ रोजी मध्यरात्री ब्रिटिशांचा युनियन जॅक जाऊन भारताचा तिरंगी झेंडा अस्मानात विहार करू लागला. त्या रोमहर्षक ऐतिहासिक दिवसापासून गेली ७० वर्षं भारत खंडात ज्या ज्या राजकीय, सामाजिक, साहित्यिक, ऐतिहासिक, आर्थिक, आरोग्य व कला-क्रीडा विषयक घडामोडी घडलेल्या आहेत, त्या साऱ्यांचा या पुस्तकात धांडोळा घेण्यात आला आहे. या प्रत्येक क्षेत्रात भारताने केलेल्या प्रगतीचा आढावा या पुस्तकात प्रामाणिकपणे घेण्यात आलेला आहे. एखाद्या व्यक्तीने आपल्या वयाची सत्तरी पार करणे ही सर्वसामान्य घटना असते; मात्र एखादया देशाने सत्तरीची घोडदौड करणं खूप अभूतपूर्व आणि ऐतिहासिक घटना असते. या पुस्तकात गेल्या सत्तर वर्षातल्या काळातील प्रत्येक वर्षी घडलेल्या घटनांवर दृष्टिक्षेप टाकण्यात आला आहे. भारतातील राजकीय पार्श्वभूमीवर या देशातील भव्य-दिव्य समृद्ध संस्कृती, ख्यायकीर्त व्यक्ती आणि सर्व क्षेत्रातील यशोगाथा यांचा मागोवा अभ्यासू वृत्तीने घेतलेला आहे. प्रत्येक प्रकरणाचा प्रारंभ त्या त्या वर्षीच्या मुख्य राजकीय घटनेवर प्रकाशझोत टाकून केलेला आहे. तद्नंतर निवडक व्यक्ती आणि त्या वर्षीच्या सांस्कृतिक, साहित्यिक, कला-क्रीडा विषयक घटना उद्धृत केल्या आहेत. अखेरीस काही ठळक घटनांचा नाममात्र उल्लेख केला आहे आणि त्याचबरोबर समर्पक छायाचित्रे, रेखाटने दिलेली आहेत. ही सारी माहिती पेश करताना लेखिकेने पानोपानी तळटिपेच्या रूपात संदर्भग्रंथांची सूचीही देण्याचा सुज्ञपणा दाखवला आहे. त्यामुळे जिज्ञासू व अभ्यासू वाचक अधिक माहितीसाठी मूळ स्रोताकडे जाऊ शकतात. कोणत्याही देशाची प्रतिमा ही चित्रपट, साहित्य, संगीत, नृत्य आणि चित्रकला अशा विविध क्षेत्रात घडलेल्या घटनांतून अधोरेखित होत असते. त्या घटनांतून संबंधित राष्ट्राची समृद्धी, श्रीमंती व विकासाकडे केलेल्या वाटचालीचाच प्रत्यय येत असतो. या पुस्तकातील अभ्यासपूर्ण, संशोधनात्मक माहितीमुळे वाचकांच्या ज्ञानात नक्कीच भर पडेल. या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे आपण हवे ते पान उघडावे आणि त्या त्या वर्षी घडलेल्या मनोवेधक घटना वाचून इतिहासाच्या काळात वावरावे, वर्तमानकाळाच्या प्रकाशात भविष्याचा वेध घेत राहावे. साध्या सोप्या ओघवत्या, पण लालित्यपूर्ण भाषेत पुस्तकाची मांडणी केलेली आहे. तिथे अनुवादकाचे कसब नजरेत भरते. प्रस्तुत पुस्तक शिक्षक, विद्यार्थी, लेखक, पत्रकार, पालक, साऱ्यांसाठी उपयुक्त आहे. तसेच आयएएस, आपीएस, यांसारख्या स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणाऱ्यांसाठीही ते मार्गदर्शक ठरू शकते. -जॉन गोन्सालविस ...Read more

  • Rating StarDAINIK LOKMAT (MANTHAN) 03-NOV-2019

    राष्ट्राच्या वैशिष्टपूर्ण इतिहासाचा आढावा १९४७ हे साल स्थित्यंतराचं ठरलं. सुमारे २०० वर्षांच्या ब्रिटिश राजवटीनंतर भारत देशाला एक स्वतंत्र राजकीय अस्तित्व मिळाले. त्यावेळी एक प्रश्न भेडसावत होता. हा नवा भारत देश कुठल्या प्रकारचे राज्य असेल? या प्रश्ाचं उत्तर हवं असेल, तर या पुस्तकाचं एकेक पान चाळत जा म्हणजे गेल्या सत्तर वर्षातला झंझावती प्रवास तुमच्या नजरेस पडेल. फाळणीपासून १९६२ सालचं चीनचं आक्रमण, आणीबाणीपासून ते कलामची छापे, लोकपाल बिलापासून ते नोटबंदीचे धोरण, या सार्या आठवणी या पुस्तकातील पाना-पानांतून दर्शनास येतात. त्यातून आपल्या देशाची विस्तीर्ण अन् समृद्ध संस्कृती, भिन्न भाषांतील वेगळेपण आणि उल्लेखनीय विविधता, राजकीय घडामोडी, भारदस्त व्यक्तिमत्त्वे आणि नजरेत भरणारी सार्वभौम प्रगती यांची ओळख होती. सत्याची कास धरून थोडक्यात मजकूरात पेश केलेली ही माहिती चित्रे आणि आलेख यांनी सजवलेली आहे व स्वतंत्र भारताची ओळख करून देण्यास ती समर्थ आहे. भारतवर्षाची ही कहाणी स्वातंत्र्योत्तर काळातली, गेल्या ७० वर्षांची कहाणी आहे. थोडक्यात काय तर, या ग्रथांत सातत्यानं नवे रूप घेत गेलेल्या आवेशपूर्ण भारतवर्षाचे रुप प्रतिबिंबीत झालेले दिसेल. ...Read more

  • Rating Starजॉन गोन्सालविस

    सत्तर वर्षांचा जोखालेखा ऐवज... डॉ. रोशन दलाल या उच्चविद्याविभूषित असून शाळांपासून ते विश्वविद्यालयापर्यंत त्यांनी शिक्षिका म्हणून ज्ञानदानाची भूमिका बजावली आहे. त्याच वेळी त्यांनी ‘पुफिन हिस्टरी ऑफ इंडिया’, ‘दी पुफिन हिस्टरी ऑफ वर्ल्ड’, दी रिलिजन्स फ इंडिया’ ही त्यांची अभ्यासपूर्ण संशोधनात्मक मार्गदर्शक अशी गाजलेली पुस्तके नजरेआड करता येणार नाहीत. ‘India At 70’ या इंग्रजी पुस्तकाचाही त्यात समोवश करावा लागेल. या पुस्तकाचा मराठी अनुवाद ‘सत्तरीला भारत’ या नावाने विज्ञान लेखक जोसेफ तुस्कानो यांनी आपल्या सिद्धहस्त लेखणीतून साकारला आहे. मेहता पब्लिशिंग हाऊस या ख्यातनाम प्रकाशनाने प्रकाशित केलेले आहे. १४ ऑगस्ट १९४७ रोजीच्या मध्यरात्री ब्रिटिशांचा युनियक जॅक झेंडा जाऊन भारताचा तिरंगी झेंडा अस्मानात विहार करू लागला. त्या रोमहर्षक, ऐतिहासिक दिवसापासून गेली ७० वर्षे भारत खंडात ज्या ज्या राजकीय, सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, आर्थिक, शैक्षणिक, आरोग्य व क्रिडा विषयक घडामोडी घडलेल्या आहेत. या प्रत्येक क्षेत्रात भारत देशाने केलेल्या प्रगतीचा आढावा या पुस्तकात प्रामाणिकपणे होण्याचा प्रयत्न स्पृहणीय आहे. एखाद्या व्यक्तीने आपल्या वयाची ‘सत्तरी’ पार करणे ही सर्वसामान्य घटना असते; मात्र एखाद्या देशाने ‘सत्तरी’ची घोडदौड करणे हे खूप अभूतपूर्व, ऐतिहासिक घटना असते. या पुस्तकात गेल्या सत्तर वर्षातल्या काळातील प्रत्येक वर्षी घडलेल्या घटनांवर दृष्टीक्षेप टाकण्यात आला आहे. भारतातील राजकीय पार्श्वभूमीवर या देशातली भव्य, दिव्य, समृद्ध, संस्कृती वैविध्यपूर्ण विविधता, विविध भाषा, ख्यातकिर्त व्यक्ती आणि सर्व क्षेत्रांतली यशोगाथा यांचा मागोवा प्रामाणिकपणे व अभ्यासू मनोवृत्तीने घेतलेला दिसून येतो. प्रत्येक प्रकरणाचा प्रारंभ त्या त्या वर्षाच्या मुख्य राजकीय घटनेवर प्रकाशझोत टाकून केलेला आहे. तद्नंतर निवडक व्यक्तिमत्त्वे आणि त्या वर्षीच्या सांस्कृतिक, साहित्यिक, क्रीडाविषयक घटना यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. अखेरीस काही ठळक घटनांचा नाममात्र उल्लेख आहे. त्याचवेळी समर्पक छायाचित्रे, रेखाटने दिलेली आहेत. आणि हे देत असताना तळटीप म्हणून पानोपानी संदर्भग्रंथांची सूचीही देण्याचा सूज्ञपणा दाखवला आहे. त्यामुळे जागृत, जिज्ञासू व अभ्यासू वाचकांना मूलस्त्रोताकडे जाता येऊ शकते. कोणत्याही देशाची प्रतिमा ही चित्रपट, साहित्य, संगीत, नृत्य आणि कला या विविध क्षेत्रांत घडलेल्या घटनांतून आविष्कृत होत असते. त्या त्या घडलेल्या घटनांमुळे संबंधित देशाची समृद्धी, श्रीमंती व विकासाकडे केलेली वाटचाल याचा प्रत्यय येत असतो. त्यामुळे ‘मी एक भारतवासी’ म्हणून हे सर्व वाचून उरात अभिमान भरून येतो. भारतातील या महान विभूती व त्यांनी केलेल्या कार्यामुळे आदर दुणावतो. या अभ्यासपूर्ण, संशोधनात्मक माहितीमुळे काही वाचकांच्या ज्ञानाची उजळणी होईल. काही वाचकांच्या ज्ञानात अधिक भर पडेल, काही वाचकांची जिज्ञासा अधिक जागृत होऊन अधिक जाणून घेण्याची जाणीव वृद्धिंगत होईल. या पुस्तकात विविध अंगाने परामर्श घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. ‘‘मी जर पशु-पक्ष्यांवर प्रेम करत नसेल तर मी परमेश्वरावर देखील प्रेम करत नसतो.’’ असे कळकळीने सांगणारे शिक्षणतज्ज्ञ साधू वासवानी भेटतात. ‘‘मुलांना वाचनातून प्रथम जगातील जादूई किमयेची माहिती मिळाली पाहिजे.’’ असे आवर्जून भाष्य करणारे भारताचे माजी राष्ट्रपती झाकीर हुसेन आपल्याला प्रभावित करतात. तसेच ‘मिस वर्ल्ड’’ हा किताब जिंकणारी पहिली एशियन तरुणी रिरा फारियाची त्यांच्या प्रेमकहाणीचे दर्शन घडले. ‘भारत माझा देश आहे’, ही राष्ट्रीय प्रतिज्ञा लिहिणारे तेलगू लेखक पी. व्ही. सुब्बाराव सोबत ‘उडणारा शीख म्हणजे मिल्खा सिंग आपल्या नजरेत भरतो. त्याचवेळी कवयित्री कमला दास यांच्या कवितेच्या ओळीही मनाला साद घालतात– ‘मी आहे लाखो मृत्युंची प्रतिनिधी सुकून गेलल्या बियांच्या झुपक्यासारखी गळून पडेल मातीत, पुन्हा रुजवण्यासाठी आणखीन कुणाच्या तरी आठवणीत’ या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे आपण हवं ते पान उघडावे आणि त्या-त्या वर्षी घडलेल्या वैशिष्ट्यपूर्ण घटना वाचून इतिहासाच्या काळात वावरत असताना वर्तमानकाळाच्या प्रकाशात भाविष्याचा वेध घेऊ शकतो. साध्या, सोप्या, ओघवत्या पण ललित्यपूर्ण भाषेत पुस्तकाची मांडणी केलेली आहे. सदर पुस्तक शिक्षक, विद्यार्थी, प्राध्यापक, अभ्यासक, पत्रकार, लेखक व पालक यांना जसे उपयुक्त आहे तसेच IAS, IPS विविध स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांना उपयुक्त ठरेल. तसेच गेला बाजार, ‘कौन बनेगा करोडपती’ विविध प्रश्नमंजूषा स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यासाठी मार्गदर्शक ठरेल. या पुस्तकात गेल्या ७० वर्षांतील स्वातंत्र्योत्तर काळातील राजकारण, समाजकारण, अर्थकारण, खेळ, संगीत, साहित्य इ. क्षेत्रांतील ठळक घटनांचा उहापोह आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more