* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: INDIA @ 70
  • Availability : Available
  • Translators : JOSEPH TUSKANO
  • ISBN : 9789353173203
  • Edition : 1
  • Publishing Year : OCTOBER 2019
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 400
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : NON-FICTION
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
ENTER THE PORTAL THAT WILL EXPORT YOU ALL THE WAY TO THAT HISTORIC STROKE OF THE MIDNIGHT HOUR! THE YEAR 1947 WAS ONE OF CHANGE. AFTER ALMOST 200 YEARS OF BRITISH RULE, INDIA BECAME A UNITED POLITICAL ENTITY. ONLY ONE QUESTION RANG LOUD: WHAT TYPE OF NATION WOULD THE NEW INDIA BE? THIS BOOK TRACES THE COUNTRY’S WHIRLWIND JOURNEY, GIVING US A LOOK AT THE LAST SEVENTY YEARS. AGAINST A POLITICAL BACKDROP, IT PROVIDES GLIMPSES OF INDIA’S VAST AND RICH CULTURE, ITS MANY LANGUAGES AND REMARKABLE DIVERSITY, ITS EMINENT PERSONALITIES AND NOTABLE ACHIEVEMENTS IN ALL SPHERES. FEATURING BITE-SIZED INFORMATION, FUN FACTS, CHARMING ILLUSTRATIONS AND DETAILED MAPS, THIS SPECIAL BOOK SUMS UP THE LOGS OF INDIA’S INDEPENDENCE IN A FITTING WAY.
स्वतंत्र भारताचा सखोल समीक्षात्मक आढावा.. देशाचा सत्तर वर्षांतला झंझावाती प्रवास... फाळणीपासून ते १९६२ सालचं चीनचं आक्रमण, आणीबाणीपासून ते कलामांची छाप, लोकपाल विधेयक ते नोटाबंदीचे धोरण; या साऱ्या आठवणींचा लेखाजोखा यात समाविष्ट आहे. त्यातून भारत देशाची विस्तीर्ण अन् समृद्ध संस्कृती आणि नजरेत भरणारी सार्वभौम प्रगती यांची ओळख होते.

No Records Found
No Records Found
Keywords
#INDIA AT70 #ROSHENDALAL #JOSEPHTUSKANO # COUNTINGOF PEOPLE #EMERGENCY #ISRO #LIBERATIONOFGOA #KHALISTAN #इंडियाअॅटसेव्हन्टी #सत्तरीतलाभारत #रोशनदलाल #जोसेफतुस्कानो #संदर्भग्रंथमाहितीपर #आणीबाणी #इस्रो #गोवामुक्ती #खलिस्तान
Customer Reviews
  • Rating Star महाराष्ट्र टाइम्स संवाद

    सत्तरीच्या लेखाजोखा.... डॉ. रोशन दलाल या इंग्रजी लेखिका असून त्यांची `पुफीन हिस्टरी ऑफ वर्ल्ड` आणि `रीलिजन्स ऑफ इंडिया` ही अभ्यासपूर्ण व संशोधनात्मक पुस्तक गाजली आहेत. पुस्तकांच्या याच रांगेत त्यांच्या `INDIA AT 70` या पुस्तकाचा देखील समावेश करवा लागेल. याच नव्या पुस्तकाचा जेष्ठ विज्ञान लेखक जोसेफ तुस्कानो यांनी केलेला मराठी अनुवाद `सत्तरीतील भारत` नुकताच प्रसिद्ध झाला आहे. १४ ऑगस्ट १९४७ रोजी मध्यरात्री ब्रिटिशांचा युनियन जॅक जाऊन भारताचा तिरंगी झेंडा अस्मानात विहार करू लागला. त्या रोमहर्षक ऐतिहासिक दिवसापासून गेली ७० वर्ष भारत खंडात ज्या ज्या राजकीय सामाजिक, साहित्यिक, ऐतिहासिक, आर्थिक, आरोग्य, व कला- क्रीडा विषयक घडामोडी घडलेल्या आहेत, त्या साऱ्यांचा या पुस्तकात धांडोळा घेण्यात आला आहे. या प्रत्येक क्षेत्रात भारताने केलेल्या प्रगतीचा आढावा या पुस्तकात प्रामाणिकपणे घेण्यात आलेला आहे. एखाद्या व्यक्तीने आपल्या वयाची सत्तरी पार करणे हि सर्वसामान्य घटना असते; मात्र एखाद्या देशाने सत्तरीची हि घोडदौड करणं खूप अभूतपूर्व आणि ऐतिहासिक घटना असते. या पुस्तकात गेल्या सत्तर वर्षातल्या काळातील प्रत्येक वर्षी घडलेल्या घटनांवर दृष्टिक्षेप टाकण्यात आलं आहे. भारतातील राजकीय पार्शवभूमीवर या देशातील भव्य-दिव्य समृद्ध संस्कृती, ख्यायकीर्त व्यक्ती आणि सर्व क्षेत्रातील यशोगाथा यांचा मागोवा अभ्यासू वृत्तीने घेतलेला आहे. प्रत्येक प्रकरणाचा प्रारंभ त्या त्या वर्षीच्या मुख्य राजकीय घटनेवर प्रकाशझोत टाकून केलेला आहे. तदनंतर निवडक व्यक्ती आणि त्या यावर्षीच्या सांस्कृतिक, साहित्यिक, कला-क्रीडा विषयक घटना उद्धृत केल्या आहेत. अखेरीस काही ठळक घटनांचा नाममात्र उल्लेख केला आहे आणि त्याचबरोबर समर्पक छायाचित्रे, रेखाटने दिलेली आहेत. हि सारी माहिती पेश करताना लेखिकेने पानोपानी तळटीपेच्या रूपात संदर्भग्रंथांची सूचीही देण्याचा सुज्ञपना दाखवला आहे. त्यामुळे जिज्ञासू व अभ्यासू वाचक अधिक माहितीसाठी मूळ स्रोताकडे जाऊ शकतात. कोणत्याही देशाची प्रतिमा ही चित्रपट, साहित्य, संगीत, नृत्य आणि चित्रकला अशा विविध क्षेत्रात घडलेल्या घटनांतून अधोरेखित होत असते. त्या घटनांतून संबोधित राष्ट्राची समृद्धी, श्रीमंती व विकासाकडे केलेल्या वाटचालीचाच प्रत्यय येत असतो. या पुस्तकातील अभ्यासपूर्ण, संशोधनात्मक माहितीमुळे वाचकांच्या ज्ञानात नक्कीच भर पडेल. या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे आपण हवे ते पान उघडावे आणि त्या त्या वर्षी घडलेल्या मनोवेधक घटना वाचून इतिहासाच्या काळात वावरावे, वर्तमानकाळाच्या प्रकाशात भविष्याचा वेध घेत राहावे. साध्या सोप्या ओघवत्या, पण लालित्यपूर्ण भाषेत पुस्तकाची मांडणी केलेली आहे. तिथे अनुवादकाचे कसब नजरेत भरते. ...Read more

  • Rating StarMaharashtra times 24th May 2020

    सत्तर वर्षांचा लेखाजोखा... ... डॉ. रोशन दलाल या प्रसिद्ध इंग्रजी लेखिका असून त्यांची `पुफिन हिस्टरी ऑफ इंडिया`, `पुफिन हिस्टरी ऑफ वर्ल्ड` आणि `रीलिजन्स ऑफ इंडिया` ही अभ्यासपूर्ण व संशोधनात्मक पुस्तकं गाजली आहेत. पुस्तकांच्या याच रांगेत त्यांच्य `India at 70` या पुस्तकाचादेखील समावेश करावा लागेल. याच नव्या पुस्तकाचा ज्येष्ठ विज्ञान लेखक जोसेफ तुस्कानो यांनी केलेला मराठी अनुवाद `सत्तरीतला भारत` नुकताच प्रसिद्ध झाला आहे. १४ ऑगस्ट १९४७ रोजी मध्यरात्री ब्रिटिशांचा युनियन जॅक जाऊन भारताचा तिरंगी झेंडा अस्मानात विहार करू लागला. त्या रोमहर्षक ऐतिहासिक दिवसापासून गेली ७० वर्षं भारत खंडात ज्या ज्या राजकीय, सामाजिक, साहित्यिक, ऐतिहासिक, आर्थिक, आरोग्य व कला-क्रीडा विषयक घडामोडी घडलेल्या आहेत, त्या साऱ्यांचा या पुस्तकात धांडोळा घेण्यात आला आहे. या प्रत्येक क्षेत्रात भारताने केलेल्या प्रगतीचा आढावा या पुस्तकात प्रामाणिकपणे घेण्यात आलेला आहे. एखाद्या व्यक्तीने आपल्या वयाची सत्तरी पार करणे ही सर्वसामान्य घटना असते; मात्र एखादया देशाने सत्तरीची घोडदौड करणं खूप अभूतपूर्व आणि ऐतिहासिक घटना असते. या पुस्तकात गेल्या सत्तर वर्षातल्या काळातील प्रत्येक वर्षी घडलेल्या घटनांवर दृष्टिक्षेप टाकण्यात आला आहे. भारतातील राजकीय पार्श्वभूमीवर या देशातील भव्य-दिव्य समृद्ध संस्कृती, ख्यायकीर्त व्यक्ती आणि सर्व क्षेत्रातील यशोगाथा यांचा मागोवा अभ्यासू वृत्तीने घेतलेला आहे. प्रत्येक प्रकरणाचा प्रारंभ त्या त्या वर्षीच्या मुख्य राजकीय घटनेवर प्रकाशझोत टाकून केलेला आहे. तद्नंतर निवडक व्यक्ती आणि त्या वर्षीच्या सांस्कृतिक, साहित्यिक, कला-क्रीडा विषयक घटना उद्धृत केल्या आहेत. अखेरीस काही ठळक घटनांचा नाममात्र उल्लेख केला आहे आणि त्याचबरोबर समर्पक छायाचित्रे, रेखाटने दिलेली आहेत. ही सारी माहिती पेश करताना लेखिकेने पानोपानी तळटिपेच्या रूपात संदर्भग्रंथांची सूचीही देण्याचा सुज्ञपणा दाखवला आहे. त्यामुळे जिज्ञासू व अभ्यासू वाचक अधिक माहितीसाठी मूळ स्रोताकडे जाऊ शकतात. कोणत्याही देशाची प्रतिमा ही चित्रपट, साहित्य, संगीत, नृत्य आणि चित्रकला अशा विविध क्षेत्रात घडलेल्या घटनांतून अधोरेखित होत असते. त्या घटनांतून संबंधित राष्ट्राची समृद्धी, श्रीमंती व विकासाकडे केलेल्या वाटचालीचाच प्रत्यय येत असतो. या पुस्तकातील अभ्यासपूर्ण, संशोधनात्मक माहितीमुळे वाचकांच्या ज्ञानात नक्कीच भर पडेल. या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे आपण हवे ते पान उघडावे आणि त्या त्या वर्षी घडलेल्या मनोवेधक घटना वाचून इतिहासाच्या काळात वावरावे, वर्तमानकाळाच्या प्रकाशात भविष्याचा वेध घेत राहावे. साध्या सोप्या ओघवत्या, पण लालित्यपूर्ण भाषेत पुस्तकाची मांडणी केलेली आहे. तिथे अनुवादकाचे कसब नजरेत भरते. प्रस्तुत पुस्तक शिक्षक, विद्यार्थी, लेखक, पत्रकार, पालक, साऱ्यांसाठी उपयुक्त आहे. तसेच आयएएस, आपीएस, यांसारख्या स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणाऱ्यांसाठीही ते मार्गदर्शक ठरू शकते. -जॉन गोन्सालविस ...Read more

  • Rating StarDAINIK LOKMAT (MANTHAN) 03-NOV-2019

    राष्ट्राच्या वैशिष्टपूर्ण इतिहासाचा आढावा १९४७ हे साल स्थित्यंतराचं ठरलं. सुमारे २०० वर्षांच्या ब्रिटिश राजवटीनंतर भारत देशाला एक स्वतंत्र राजकीय अस्तित्व मिळाले. त्यावेळी एक प्रश्न भेडसावत होता. हा नवा भारत देश कुठल्या प्रकारचे राज्य असेल? या प्रश्ाचं उत्तर हवं असेल, तर या पुस्तकाचं एकेक पान चाळत जा म्हणजे गेल्या सत्तर वर्षातला झंझावती प्रवास तुमच्या नजरेस पडेल. फाळणीपासून १९६२ सालचं चीनचं आक्रमण, आणीबाणीपासून ते कलामची छापे, लोकपाल बिलापासून ते नोटबंदीचे धोरण, या सार्या आठवणी या पुस्तकातील पाना-पानांतून दर्शनास येतात. त्यातून आपल्या देशाची विस्तीर्ण अन् समृद्ध संस्कृती, भिन्न भाषांतील वेगळेपण आणि उल्लेखनीय विविधता, राजकीय घडामोडी, भारदस्त व्यक्तिमत्त्वे आणि नजरेत भरणारी सार्वभौम प्रगती यांची ओळख होती. सत्याची कास धरून थोडक्यात मजकूरात पेश केलेली ही माहिती चित्रे आणि आलेख यांनी सजवलेली आहे व स्वतंत्र भारताची ओळख करून देण्यास ती समर्थ आहे. भारतवर्षाची ही कहाणी स्वातंत्र्योत्तर काळातली, गेल्या ७० वर्षांची कहाणी आहे. थोडक्यात काय तर, या ग्रथांत सातत्यानं नवे रूप घेत गेलेल्या आवेशपूर्ण भारतवर्षाचे रुप प्रतिबिंबीत झालेले दिसेल. ...Read more

  • Rating Starजॉन गोन्सालविस

    सत्तर वर्षांचा जोखालेखा ऐवज... डॉ. रोशन दलाल या उच्चविद्याविभूषित असून शाळांपासून ते विश्वविद्यालयापर्यंत त्यांनी शिक्षिका म्हणून ज्ञानदानाची भूमिका बजावली आहे. त्याच वेळी त्यांनी ‘पुफिन हिस्टरी ऑफ इंडिया’, ‘दी पुफिन हिस्टरी ऑफ वर्ल्ड’, दी रिलिजन्स फ इंडिया’ ही त्यांची अभ्यासपूर्ण संशोधनात्मक मार्गदर्शक अशी गाजलेली पुस्तके नजरेआड करता येणार नाहीत. ‘India At 70’ या इंग्रजी पुस्तकाचाही त्यात समोवश करावा लागेल. या पुस्तकाचा मराठी अनुवाद ‘सत्तरीला भारत’ या नावाने विज्ञान लेखक जोसेफ तुस्कानो यांनी आपल्या सिद्धहस्त लेखणीतून साकारला आहे. मेहता पब्लिशिंग हाऊस या ख्यातनाम प्रकाशनाने प्रकाशित केलेले आहे. १४ ऑगस्ट १९४७ रोजीच्या मध्यरात्री ब्रिटिशांचा युनियक जॅक झेंडा जाऊन भारताचा तिरंगी झेंडा अस्मानात विहार करू लागला. त्या रोमहर्षक, ऐतिहासिक दिवसापासून गेली ७० वर्षे भारत खंडात ज्या ज्या राजकीय, सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, आर्थिक, शैक्षणिक, आरोग्य व क्रिडा विषयक घडामोडी घडलेल्या आहेत. या प्रत्येक क्षेत्रात भारत देशाने केलेल्या प्रगतीचा आढावा या पुस्तकात प्रामाणिकपणे होण्याचा प्रयत्न स्पृहणीय आहे. एखाद्या व्यक्तीने आपल्या वयाची ‘सत्तरी’ पार करणे ही सर्वसामान्य घटना असते; मात्र एखाद्या देशाने ‘सत्तरी’ची घोडदौड करणे हे खूप अभूतपूर्व, ऐतिहासिक घटना असते. या पुस्तकात गेल्या सत्तर वर्षातल्या काळातील प्रत्येक वर्षी घडलेल्या घटनांवर दृष्टीक्षेप टाकण्यात आला आहे. भारतातील राजकीय पार्श्वभूमीवर या देशातली भव्य, दिव्य, समृद्ध, संस्कृती वैविध्यपूर्ण विविधता, विविध भाषा, ख्यातकिर्त व्यक्ती आणि सर्व क्षेत्रांतली यशोगाथा यांचा मागोवा प्रामाणिकपणे व अभ्यासू मनोवृत्तीने घेतलेला दिसून येतो. प्रत्येक प्रकरणाचा प्रारंभ त्या त्या वर्षाच्या मुख्य राजकीय घटनेवर प्रकाशझोत टाकून केलेला आहे. तद्नंतर निवडक व्यक्तिमत्त्वे आणि त्या वर्षीच्या सांस्कृतिक, साहित्यिक, क्रीडाविषयक घटना यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. अखेरीस काही ठळक घटनांचा नाममात्र उल्लेख आहे. त्याचवेळी समर्पक छायाचित्रे, रेखाटने दिलेली आहेत. आणि हे देत असताना तळटीप म्हणून पानोपानी संदर्भग्रंथांची सूचीही देण्याचा सूज्ञपणा दाखवला आहे. त्यामुळे जागृत, जिज्ञासू व अभ्यासू वाचकांना मूलस्त्रोताकडे जाता येऊ शकते. कोणत्याही देशाची प्रतिमा ही चित्रपट, साहित्य, संगीत, नृत्य आणि कला या विविध क्षेत्रांत घडलेल्या घटनांतून आविष्कृत होत असते. त्या त्या घडलेल्या घटनांमुळे संबंधित देशाची समृद्धी, श्रीमंती व विकासाकडे केलेली वाटचाल याचा प्रत्यय येत असतो. त्यामुळे ‘मी एक भारतवासी’ म्हणून हे सर्व वाचून उरात अभिमान भरून येतो. भारतातील या महान विभूती व त्यांनी केलेल्या कार्यामुळे आदर दुणावतो. या अभ्यासपूर्ण, संशोधनात्मक माहितीमुळे काही वाचकांच्या ज्ञानाची उजळणी होईल. काही वाचकांच्या ज्ञानात अधिक भर पडेल, काही वाचकांची जिज्ञासा अधिक जागृत होऊन अधिक जाणून घेण्याची जाणीव वृद्धिंगत होईल. या पुस्तकात विविध अंगाने परामर्श घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. ‘‘मी जर पशु-पक्ष्यांवर प्रेम करत नसेल तर मी परमेश्वरावर देखील प्रेम करत नसतो.’’ असे कळकळीने सांगणारे शिक्षणतज्ज्ञ साधू वासवानी भेटतात. ‘‘मुलांना वाचनातून प्रथम जगातील जादूई किमयेची माहिती मिळाली पाहिजे.’’ असे आवर्जून भाष्य करणारे भारताचे माजी राष्ट्रपती झाकीर हुसेन आपल्याला प्रभावित करतात. तसेच ‘मिस वर्ल्ड’’ हा किताब जिंकणारी पहिली एशियन तरुणी रिरा फारियाची त्यांच्या प्रेमकहाणीचे दर्शन घडले. ‘भारत माझा देश आहे’, ही राष्ट्रीय प्रतिज्ञा लिहिणारे तेलगू लेखक पी. व्ही. सुब्बाराव सोबत ‘उडणारा शीख म्हणजे मिल्खा सिंग आपल्या नजरेत भरतो. त्याचवेळी कवयित्री कमला दास यांच्या कवितेच्या ओळीही मनाला साद घालतात– ‘मी आहे लाखो मृत्युंची प्रतिनिधी सुकून गेलल्या बियांच्या झुपक्यासारखी गळून पडेल मातीत, पुन्हा रुजवण्यासाठी आणखीन कुणाच्या तरी आठवणीत’ या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे आपण हवं ते पान उघडावे आणि त्या-त्या वर्षी घडलेल्या वैशिष्ट्यपूर्ण घटना वाचून इतिहासाच्या काळात वावरत असताना वर्तमानकाळाच्या प्रकाशात भाविष्याचा वेध घेऊ शकतो. साध्या, सोप्या, ओघवत्या पण ललित्यपूर्ण भाषेत पुस्तकाची मांडणी केलेली आहे. सदर पुस्तक शिक्षक, विद्यार्थी, प्राध्यापक, अभ्यासक, पत्रकार, लेखक व पालक यांना जसे उपयुक्त आहे तसेच IAS, IPS विविध स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांना उपयुक्त ठरेल. तसेच गेला बाजार, ‘कौन बनेगा करोडपती’ विविध प्रश्नमंजूषा स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यासाठी मार्गदर्शक ठरेल. या पुस्तकात गेल्या ७० वर्षांतील स्वातंत्र्योत्तर काळातील राजकारण, समाजकारण, अर्थकारण, खेळ, संगीत, साहित्य इ. क्षेत्रांतील ठळक घटनांचा उहापोह आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more