IN THE BOOK ‘DOORCHI MATI, JAVALCHI NATI’ (DISTANT SOIL, CLOSE BONDS), AUTHOR UMESH KADAM HAS ELOQUENTLY EXPRESSED THE OPPORTUNITY HE GAINED TO CONNECT WITH PEOPLE OF INDIAN ORIGIN LIVING ABROAD AND THOSE ACCUSTOMED TO A FOREIGN LIFESTYLE—AN EXPERIENCE THAT TRANSCENDS WORDS. THIS NARRATIVE OFFERS INSIGHT INTO HOW A LONG JOURNEY—WHICH BEGAN WITH SECURING A COMMONWEALTH SCHOLARSHIP FOR THE POSTGRADUATE PROGRAM IN INTERNATIONAL LAW AT THE RENOWNED LONDON SCHOOL OF ECONOMICS AND POLITICAL SCIENCE (LSE)—EVOLVED FROM MERE ACQUAINTANCES OR CONNECTIONS MADE THROUGH OTHERS INTO A CLOSE, PERSONAL BOND.
राष्ट्रकुल शिष्यवृत्ती मिळवून ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अॅन्ड पॉलिटिकल सायन्स,’ म्हणजेच एलएसई या विख्यात संस्थेतील ‘आंतरराष्ट्रीय कायद्याचा पदव्युत्तर अभ्यासक्रम’ इथून सुरू झालेला दूरचा प्रवास हा, प्रत्यक्ष ओळखीतून अथवा कुणा दुसऱ्यामार्फत झालेल्या ओळखीतून कसा जवळच्या नात्यामाध्ये परावर्तित होत गेला याचा अनुभव यातून मिळतो. ‘सॅम’सारख्या पसिस्थितीने स्थलांतरीत झालेल्या व्यक्तीची कथा असेल- वृद्धत्व आलं तरी स्वकष्टाने कमाई करून मुलांच्या पाठीशी उभी राहणारी ‘रोझमेरी’ असेल- भारतीय वंशाच्या मुलाच्या प्रेमात पडून, त्याच्या बाहिणीमुळे सुखी संसारास दुरावलेली आणि ३५वर्षं त्याच्या नावचं मंगळसुत्र घालून एकटी जगणारी ‘अॅलिस’ असेल किंवा अगदी ‘कोरियन किमची आणि सोजू’ यांच्याशी जडलेलं गहिरं नातं असेल; या सर्वांमधून लेखकाची सुटका कधीही होणार नाही किंबहुना लेखकाची तशी इच्छाही नाही असेच या संपूर्ण पुस्तकातून दिसून येते.