* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: TANTRADNYANACHI MULAKSHARE BHAG - 2
  • Availability : Available
  • ISBN : 9789387789838
  • Edition : 1
  • Publishing Year : FEBRUARY 2013
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 176
  • Language : MARATHI
  • Category : SCIENCE
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
MAN HAS AN UNBREAKABLE RELATIONSHIP WITH NATURE BY BIRTH. MAN EVOLVED BY EXPERIENCING VARIOUS FORMS OF NATURE. HE STUDIED THIS EXPERIENCE TO THE BEST OF HIS BRILLIANT INTELLECT. MANY SMALL AND BIG EXPERIMENTS WERE DONE BY MISTAKE. THIS EXPERIMENT WAS THE STEP OF SCIENCE AND TECHNOLOGY. THE DETAILED AND EASY TO UNDERSTAND INFORMATION ABOUT HOW MAN TOOK STRONG STEPS FROM THIS STEP AND CREATED HUNDREDS OF THOUSANDS OF TOOLS FOR HIMSELF IS THE `PRIMITIVES OF TECHNOLOGY`.
माणसाचे निसर्गाशी जन्मत:च अतूट नाते आहे. निसर्गाच्या विविध रूपांचे अनुभव घेत माणूस उत्क्रांत होत गेला. आपल्या तल्लख बुद्धीचा उत्तम उपयोग करत त्याने या अनुभवाचा विशेष अभ्यास केला. चुकतमाकत अनेक छोटे-मोठे प्रयोग केले. हे प्रयोग म्हणजेच विज्ञान-तंत्रज्ञानाची पाऊलवाट होती. या पाऊलवाटेवरून माणसाने दमदार पावले टाकली आणि स्वत:साठी शेकडो-हजारो साधने कशी निर्माण केली, याबाबतची तपशीलवार व सुबोध शैलीत लिहिलेली माहिती म्हणजे `तंत्रज्ञानाची मुळाक्षरे`.
अ.भा.म.प्र.संघ उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती प्रशस्तिपत्र २००६-०७
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TANTRADNYANACHIMULAKSHAREBHAG-2 #TANTRADNYANACHIMULAKSHAREBHAG-2 #तंत्रज्ञानाचीमुळाक्षरे- भाग२ #SCIENCE #MARATHI #KAVITABHALERAO #कविताभालेराव "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK AIKYA 26-08-2007

    कविता भालेराव यांनी महत्त्वाच्या शोधांची माहिती देणारे एक सदर वृत्तमान चालवले. त्यात सुमारे पावणेदोनशे, शोधांचा समावेश झाला. सौरऊर्जा, उपग्रह, झेरॉक्स, अग्निबाण, यंत्रमानव, लेसर, विमान, मायक्रोवेव्ह ओव्हन वगैरे अत्याधुनिक शोधांनी आपल्या जीवनात जशी करांती केली तशीच प्राचीन मध्ययुगीन काळापासून माणसाने दैनंदिन जीवनातील सुखसुविधांच्या दृष्टीने शोधून काढलेल्या चाक, कागद, मासेमारी, तराजू, आगकाडी, साबन, बटन, समत, काच, विणकाम, घड्याळ, कुलूप, चष्मा, पूल, गलबत, होकायंत्र, सूक्ष्मदर्शक, सायकल, सिग्नल, रबर, बॉलपेन, स्टेथॉस्कोप, धान्य कापणी यंत्र, शिवणयंत्र या प्राथमिक शोधांनीही मानवी संस्कृतीला आकार दिला. विजेचा बल्ब, टाइपरायटर, प्लॅस्टिक, लिफ्ट, कॅमेरा, सिनेमा, टेपरेकॉर्ड, फ्रीज, वॉशिंग मशीन मानवी जीवन सुखावह, रंजक आणि आरोग्यपूर्ण बनवण्याच्या दिशेने मोठी झेप घेतली. या सर्व शोधांच्या हकिकती वाचणे म्हणजे आपल्या मानवी संस्कृतीच्या विकासाची रुपरेखा जाणून घेणे. या पुस्तकात शोधांची माहिती देताना कुठलाही विशिष्ट क्रम पाळलेला नाही किंवा विषयानुसार वर्गीकरणाचाही अवलंब केलेला नाही. सदर म्हणून ज्या क्रमाने पुस्तकात ते दिले आहेत. त्यामुळे कुठलेही पान उघडून वाचू लागले तरी चालते. पहिल्या पानापासून सलग तीनशे पाने कादंबरीप्रमाणे वाचण्याची येथे गरज नाही. कुठला शोध कुठल्या वर्षी लागला आणि तो कोणी लावला याचा कालक्रम शेवटी दिला आहे. माहिती आणि मनोरंजन या दोन्ही दृष्टींनी ‘तंत्रज्ञानाची मुळाक्षरे’ हे पुस्तक कुमार वाचकांना उपयुक्त ठरेल. या शोधांच्या तपशिलातून खूपच गमतीदार माहिती मिळते. अनेक शोध योगायोगाने लागले. करायला गेलो एक आणि झाले भलतेच असा प्रकारही दिसतो. कोणाच्या डोक्यात कुठली कल्पना येईल याचा नेम नसतो. पण ती कल्पना सुचल्यावर ती प्रत्यक्ष व्यवहारात आणण्यासाठी त्या व्यक्तीने कधीकधी आपले उभे आयुष्य वेचलेले दिसते; तर कधी, कधी त्या कल्पनेला वेगळेच फाटे फुटले असेही दिसते. माणसाला जाणवणाऱ्या समस्या, माणसाच्या गरजा या शोधांना जन्म देतात, अमुक अमुक सोय असायला हवी होती. अशी कल्पना मनात यावी आणि कोणीतरी ती पूर्ण करण्याचा वसा घ्यावा असा प्रकारही दिसतो. कुठल्याही मजकुराची, चित्राची प्रत जशीच्या तशी मिळावी असे न्यूयॉर्क इलेक्ट्रॉनिक कंपनीच्या पेटंट विभागात काम करणाऱ्या वेस्टर एफ कार्लसनला वाटले. कारण पेटंटसाठी अर्ज करताना कागदपत्रांच्या बऱ्याच प्रती द्याव्या लागत. त्या प्रती करण्याचे काम कंटाळवाणे वाटे. फोटो काढायचे तंत्र तर अवगत होते. पण ते वाटेल त्या मजकुराच्या स्वस्तात प्रती काढण्याच्या दृष्टीने व्यावहारिक नव्हते. तेव्हा भौतिकशास्त्राच्या पदवीधर असलेल्या कार्लसनने गंधकाचा लेप लावलेल्या विद्युतभारित काचेच्या प्लेटवर मजकूर लिहिलो कागद काही काळ ठेवून बाजूला केला. तेव्हा त्या प्लेटवर ती अक्षरे उमटलेली दिसली. आता ती अक्षरे काचेच्या प्लेटवरून कागदावर कशी उमटतात हा पुढचा टप्पा त्यासाठी त्याने प्रयोग केले. १९३८ साली तीन वर्षांच्या प्रयोगानंतर त्याला त्यात यश आले. पहिले झेरॉक्स मशीन तयार झाले. या यंत्राचे उत्पादन व्यापारी तत्त्वावर व्हावे म्हणून अनेक कारखानदारांना तो भेटला. १९४४ मध्ये जोसेफ विल्सनने त्याला मदतीचा हात दिला. सेलोनियन हे प्रकाशाला संवेदनशील असणारे मूलद्रव्य त्यांनी बॅटेले इन्स्टिट्यूटच्या प्रयोगशाळेत शोधून काढले. १९६० साली झेरॉक्स ९१४ हे ऑफिस कॉपियर तयार झाले. कार्लसने हे मशीन अवाढव्य आकाराचे आणि कॉपी करण्यासाठी बराच वेळ खाणारे होते. पण ते काही काळ एकमेवाद्वितीय म्हणून वापरात राहिले. झेरॉक्स कॉर्पोरशेनला खूप कमाई करून देणारे ठरले. पुढे १९७३ मध्ये कॅनन या जपानी कंपनीने रंगीत झेरॉक्स मशीन काढले. १९८६ मध्ये लेसर कलर कॉपियर तयार केले. पॅनॅसॉनिक कंपनीने पॉकेट फोटोकॉपियर तयार केला. झेरॉक्ससारख्या एका नव्याच तंत्रज्ञानाचा हा विस्मयकारक विकास कार्लसनच्या आरंभीच्या कल्पनेपासून दोन-तीन दशकांच्या अविरत संशोधनाद्वारे झाला. त्याला स्पर्धक कंपन्यांनीही सतत सुधारण करून आज लहान मुलही हे मशीन सहजपणे हाताळू शकेल इतके सोयीस्कर, सोपे बनवले आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूतांनी पृथ्वीवरील प्रत्येक वस्तू बनली आहे. माणसाने या सर्वांचा उपयोग करून घेतला आहे. सूर्य हा पृथ्वीवरील जीवसृष्टीच्या ऊर्जेचे उगमस्थान. सूर्याची उपासना भारतात प्रचीन काळापासून सुरू आहे. सौरऊर्जेचा उपयोग अंतर्गोल ढालींच्या माध्यमातून करून आर्किंमिडीजने रोमनांना लढाईत हरवले. या अंतर्गोल ढालींवर सूर्याचे किरण केंद्रित होत. त्यामुळे रोमन सैनिकांना ग्रीकांच्या सैन्याशर मुकाबला करणे अवघड जाई. सूर्यशक्तीचा उपयोग करण्यासाठी माणूस वेगवेगळे प्रयोग करीत राहिला. १७१४ मध्ये आन्तान लव्हाशिए या फ्रेंच संशोधकाने सौरऊर्जेवर चालणारी भट्टी तयार करून तिच्यात धातू वितळता येतात हे दाखवून दिले. १८८० मध्ये सौरशक्तीवर चालणारे वाफेचे इंजिन तयार केले गेले. सूर्याच्या उष्णतेने पाणी तापविण्यासाठी सौरबंबाचा वापर मात्र विसाव्या शतकांत सुरू झाला. सौरऊर्जेचा वापर करून स्वयंपाक करणे, पाणी गरम करणे, वीज निर्माण करणे यासाठी आता सर्रास होऊ लागला आहे. सौरऊर्जेसाठी लागणारी पॅनल्स अजून महाग आहेत; ती स्वस्त व सुटसुटीत करता आली तर भारतासारख्या देशात वीजनिर्मितीचा प्रश्न सुटण्यास मदत होईल. हवेचे गुणधर्म ठाऊक असले तरी ते तपासून पाहण्यासाठी साधने उपकरणे उपलब्ध नव्हती. १६४०मध्ये हवेचा दाब मोजण्यासाठी पहिला दाबमापक गॅलिलिओचा शिष्य टॉरीसेली याने तयार केला. हवेला वजन असते आणि हवा जागा व्यापते हे त्यावरून सिद्ध झाले. पुढे रॉबर्ट बॉयले याने हवेचा दाब आणि घनता यांचा संबंध गणिती भाषेत मांडला. १७७० मध्ये हवेतील वेगवेगळ्या वायूचे घटक शोधण्याचे काम सुरू झाले. जोसेफ प्रीस्टले याने १७७४ मध्ये ऑक्सिजनचा शोध लावला. हा वायू ज्वलनक्रियेला मदत करतो हे त्याच्या लक्षात आले. लव्हॉयझर या शास्त्रज्ञाने ‘आम्ल तयार करणारे’ या अर्थाचा ऑक्सिजन हा शब्द त्यासाठी वापरला. तो रुढ झाला. १८००च्या आसपास हवेचे नायट्रोजन, कार्बन डायऑक्साइड, ऑक्सिजन, अरगॉन वगैरे घटक आणि त्यांचे प्रमाण याबद्दल बरीचशी निश्चिती झाली. १८१८ मध्ये वायूचे द्रवात रुपांतर करण्याची कल्पना मायकेल फॅरडेला सुचली. हायड्रोजन सल्फाइडला द्रवरुप देण्यात त्याला यश आले. ऑक्सिजनचे द्रवात रुपांतर करण्याचे तंत्र कायलिटेट या फ्रेंच लोहाराने त्यानंतर साठ वर्षांनी शोधून काढले. द्रवरुप ऑक्सिजन साठवण्यासाठी जेम्स देवार याने निवांत बाटली- थर्मासचा शोध लावला. श्वसनाचा त्रास असणाऱ्या रुग्णांसाठी रेस्पिरेटर किंवा व्हेंटिलेटरचा उपयोग करतात. नाकातून नळ्या घालून रुग्णाला ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो. नाकावर मास्क बसवणेही शक्य होते. अशा कितीतरी शोधांची प्राथमिक माहिती आणि त्या, त्या शोधातील प्रगतीचे टप्पे या पुस्तकातील छोट्या छोट्या लेखांत नोंदवले आहेत. कुठलेही पान उघडावे आणि वाचावे. त्या विशिष्ट शोधाची माहिती मिळवावी यासाठी हे पुस्तक फारच उपयुक्त आहे. ...Read more

  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे आपले दैनंदिन जीवन अतिशय सुकर झाले आहे. लिफ्टपासून फोटो कॉपीपर्यंत आणि लिफ्टपासून रेफ्रिजरेटरपर्यंत किती तरी विज्ञानदूत आपले कष्ट हलके करत आहेत. ही साधने वापरताना ती कशी तयार झाली असतील, कोणत्या परिस्थितीत त्यांची निर्मिती ाली असेल, असे प्रश्न आपल्याला पडतात. ही जिज्ञासापूर्ती करण्यासाठीच कविता भालेराव यांनी ‘तंत्रज्ञानाची मुळाक्षरे’ हे पुस्तक आणले आहे. ‘युवा सकाळ’ मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखांचे हे पुस्तक वाचनीय आहे. भरपूर संशोधन आणि मेहनत दिसत असली, तरी ही माहिती अतिशय सोप्या शब्दांत आणि रंजकपणे मांडल्याने पुस्तक जड किंवा कंटाळवाणे वाटत नाही. कविता भालेराव यांनी निवडलेले विषय ही या पुस्तकाची खासियत, साबण, निर्लेप तवा, चष्मा, लिफ्ट, सिग्नल, स्टेथोस्कोप, झिप वेल्क्रो, कुलूप, पेन, शिलाई मशिन अशा एरवी वाचायला न मिळणाऱ्या विषयांची निवड त्यांनी केली आहे. ही साधने कशी तयार झाली, त्या वेळची परिस्थिती, सुरुवातीची साधने कशी होती, त्यात बदल कसे होत गेले इत्यादी गोष्टींचा वेध त्यांनी घेतला आहे. त्यापैकी अनेक साधनांची आता पुढची पिढी आली आहे किंवा येऊ घातली आहे. तो भविष्याचा धागाही या लेखांमध्ये जोडलेला असल्याने ही केवळ भूतकाळाची सफर ठरत नाही, तर वर्तमानाची माहिती आणि भविष्याची चुणूक यांचाही आनंद त्यात मिळतो. विषयांचे वैविध्य आणि कुतूहल वाढवणारी शीर्षके यामुळे पुस्तक वाचताना मजा येते. जवळजवळ नव्वद साधनांची ‘मुळाक्षरे’ पुस्तकात आहेत. इंटरनेटवर आणि इंग्रजीमध्ये विज्ञानावर खूप माहिती वाचायला मिळत असली, तरी मराठी पुस्तकांत मात्र विज्ञानविषयक लेखन मात्र तुलनेने खूपच कमी आहे. या पार्श्वभूमीवर विज्ञानप्रेमींच्या संग्रहात हे पुस्तक असायलाच हवे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more