* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: GARBHASANSKAR
  • Availability : Available
  • ISBN : 9788177668988
  • Edition : 19
  • Publishing Year : DECEMBER 2007
  • Weight : 100.00 gms
  • Pages : 148
  • Language : MARATHI
  • Category : PREGNANCY AND CHILD CARE
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
`GARBHASANSKAR` IS ACTUALLY CODE OF CONDUCT FOR A PREGNANT WOMAN AS DESCRIBED IN `AYURVEDA`. THIS BOOK PRESENTS THE AUTHOR`S GUIDELINES ABOUT EVERY MINUTE ASPECT IN A PREGNANT WOMAN`S LIFE. DR. BORKAR HAS STUDIED THIS SUBJECT IN DETAILS BEFORE PUTTING IT INTO WORDS. SHE GUIDES ABOUT THE DIET, THE LIFE-STYLE, THE THOUGHT PROCESS OF A PREGNANT LADY. THIS BOOK ALSO TELLS US ABOUT THE SPECIFIC MEDICINES THAT A PREGNANT LADY SHOULD TAKE DURING EACH MONTH OF HER PREGNANCY FOR AN OVERALL BETTER GROWTH OF THE CHILD. TODAY`S WORLD IS OF NUCLEAR FAMILIES. THIS BOOK WILL SURELY HELP AS A PREGNANCY GUIDE TO THE WOULD BE MOMS AND DADS AND ALSO WHO HAVE ALREADY PLANNED THEIR FAMILIES.
‘गर्भसंस्कार’ म्हणजे आयुर्वेदशास्त्राच्या आधारे वर्णन केलेली गर्भवती स्त्रीसाठीची आचारसंहिता (CODE OF CONDUCT) आहे. गर्भवती स्त्रीचा आहार-आचार-विचार यासंबंधीचे मार्गदर्शन, तसेच गर्भाच्या प्रत्येक महिन्याच्या वाढीनुसार व उत्कृष्ट अवयवनिर्मितीसाठी गर्भशास्त्रात सांगितलेली औषधे इत्यादींचा या पुस्तकात समावेश आहे. डॉ. गौरी बोरकर यांचे गर्भसंस्कारविषयक संशोधन पुस्तकरूपाने येत आहे. आजच्या ‘हम दो हमारे दो’ विंÂवा ‘हमारा एक’च्या जमान्यात हे पुस्तक PREGNANCY GUIDE उल्ग् म्हणून नक्कीच उपयुक्त ठरेल.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #GARBHASANSKAR #GARBHASANSKAR #गर्भसंस्कार #HEALTHCARE&PSYCHOLOGY #MARATHI #GAURIBORKAR #गौरीबोरकर "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK LOKSATTA 12-01-2008

    आई-बाप घडविणारे पुस्तक... ‘गर्भसंस्कार’ हे पुस्तकाचं नाव आणि लेखिका डॉ. गौरी बोरकर एवढं पाहिलं की गरोदर स्त्रियांना मार्गदर्शन करणारं हे पुस्तक आहे, हे कळतंच. विवाहित मध्यमवर्गीय मराठी तरुणींच्या डोळ्यांसमोरून लगेचच या विषयावरील अनेक सदरं, मासिक सापताहिकांतले लेख, क्वचित एक-दोन पुस्तकंही तरळून जातात अनुकूल पूर्वग्रह आणि वाचनाचा पूर्वांनुभव मनात ठेवून पुस्तक उघडल्यावर मात्र चांगल्या अर्थाने अपेक्षाभंग होतो. कारण गर्भावर संस्कार कसे करावेत, हे सांगण्यापुरतंच या पुस्तकाचं प्रयोजन नाही, तर सुजाण आई-बाप आणि आरोग्यपूर्ण कुटुंब घडवणारं हे पुस्तक आहे, हे त्याच्या पाना-पानांतून उलगडत जातं. बऱ्याच वाचकांना या डॉक्टर लेखिका यापूर्वी वर्तमानपत्री लिखाणातून भेटलेल्या आहेत. त्यामुळे त्या केवळ आजार, आहार आणि औषधाविषयीच सांगत नाहीत, जीवशैलीही घडवतात, हे आपल्याला माहीत आहेच. एका वाक्यात सांगायचं तर ‘गर्भसंस्कार : उद्याच्या बुद्धिमान व आरोग्यसंपन्न संततीसाठी’ हे पुस्तक बाळ आणि आई-बाप घडवणारं पुस्तक आहे. अपत्योत्सुक जोडप्याची आचारसंहिता कशी असावी, हे आयुर्वेदाशास्त्राच्या आधारे या पुस्तकात सांगितलेलं आहे. स्थळं पाहून किंवा प्रेमात पडून लग्न होतं तेव्हा प्रथम ते नवविवाहित पती-पत्नी परस्परांच्या चालीरीती, स्वभाव, नोकरी-व्यवसायातील प्राध्यान्यक्रम समजून घेण्यात व्यग्र होतात. दरम्यान, नव्या पाहुण्याची चाहूल लागते आणि आणखी काही समजून घेण्याचंही बाकी राहिलंय, असं त्यांना अस्पष्टपणे जाणवतं. ते नेमकं स्पष्ट करतं- ‘गर्भसंस्कार’, आपण सुशिक्षित असलो, विविध प्रकारचं वाचत, ऐकत, पाहत असलो, तरी आणखीही कितीतरी गोष्टी समजून घेणं बाकी आहेत, हे समजावून सांगतं हे पुस्तक! नवा जीवन जन्माला येण्याआधी पती व पत्नी दोघानीही शरीर व मन योग्य स्थितीत राखलं पाहिजे. याबाबत काय पावलं उचलावीत, शरीर-मनाचं आरोग्य कसं ओळखावं, हे सुरुवातीलाच विशद केलं आहे. गर्भधारणेसाठी आपली पूर्वतयारी झाली आहे, हे पक्कं झाल्यानंतर जोडप्याला त्यानुसार नियोजन करता येईल. प्रत्यक्ष गर्भधारणेसाठी काय काळजी घ्यावी, इथपासून गर्भवती स्त्रीचा आहार-विहार, गर्भाच्या वाढीचे दर महिन्यांतील टप्पे आणि त्या टप्प्यांतील दुखणी, वैशिष्ट्ये, बारकावे इथपर्यंत वैद्यकीय अंगाने या पुस्तकात विस्तृत चर्चा केलेली आहे. त्याचबरोबर संशोधित औषधे, आयुर्वेदोक्त औषधे, प्राणायाम, योगासने याबाबतही मार्गदर्शन केलेले आहे. गर्भवतीच आहार व आचरणातून पोटातल्या बाळावर एक प्रकारे संस्कार होतच असतात, त्याचबरोबर जाणीवपूर्वक संवाद साधून संस्कार कसे करता येतात, हेही यातून समजतं. प्रसतीपूर्व काळजी, सुलभ प्रसूती, प्रसूतीपश्चात घ्यावयाची काळजी याविषयीही वाचकांशी संवाद साधत लेखिकेने मार्गदर्शन केलं आहे. गर्भावरचे संस्कार या ठिकाणी पूर्ण होत नाहीत, तर अर्भकाच्या जन्मानंतरही त्याला दिसामाने वाढवताना पावलोपावली संस्कार आवश्यक असतात. शैशवाचा टप्पा पूर्ण होईपर्यंत त्याच्यावर संस्कार कसे करावेत, ते किती महत्त्वाचे आहेत, हे डॉ. बोरकर यांनी समजावलं आहे. ओघवती भाषा आणि सुटसुटीत प्रकरणे हे पुस्तकाचं वैशिष्ट्य. त्या-त्या प्रकरणातील महत्त्वाचा मजकूर प्रकरणाच्या शेवटी तक्त्याच्या रूपात देऊन तो ‘एका नजरेत’ समजावून घेण्याची सोय लेखिकेने केली आहे. त्यामुळे पुस्तकाची मांडणी साधी असली, तरी ते अत्यं उपयुक्त झाले आहे. संस्कृतप्रचुर शब्दांचा वापर टाळून (उदा. शीर्षके इ.) भाषेत आणखी सोपेपणा आणणे शक्य होते व त्यायोगे वाचकांच्या अधिक जवळ जाता आले असते. आज स्पर्धा हा परवलीचा शब्द झालेला असताना या धकाधकीच्या आयुष्यक्रमात थोडं थांबून आपल्याला काय हवं आहे, याचा मनाशी विचार करायला हे पुस्तक उद्युक्त करतं. एकाच अपत्यानंतर कुटुंबाचा आकार मर्यादित करण्याच्या आजच्या काळात त्या अपत्याकडून आई-वडिलांच्या अपेक्षाही वाढल्या आहेत. अपत्य सर्वगुणसंपन्न असावं आणि त्याचे सगळे गुण झळाळून समोर यावेत म्हणून त्यांचं आरोग्यही उत्तम असावं, असं पालकांना वाटतं. अशा परिस्थितीत आपलंही काही कर्तव्य आहे हे त्यांना जाणवलेलं नसतं. अशा पालकांना सावध करत हे पुस्तक सांगतं की, शाळेत जाणाऱ्या मुलांकडून स्पर्धेत टिकण्याची अपेक्षा करण्याअगोदर अनेक वर्षे आपण त्याकरता आवश्यक ती मशागत करायला हवी. अर्थात हे सारं आपल्या धर्मात, शास्त्रांत प्राचीन काळीच सांगून ठेवलेलं आहे. पुस्तकावर अभिप्राय देणाऱ्या डॉक्टरांनी- हे पुस्तक तरुणांनी लग्नापूर्वीच वाचावं, असं सुचविलं आहे. एकत्र कुटुंबपद्धती विरत चालल्यामुळे वडिलधाऱ्यांचे मार्गदर्शन अलभ्य होत असताना एका आश्वासक, अनुभवी स्नेह्याची भूमिकाही हे पुस्तक पार पाडतं. गैरसमज व अनाठायी गंड दूर करून ते गर्भवतीला धीर देतं, तसेच भावी पित्याला त्याच्या कर्तव्यांची जाणीव करून देतं. डॉ. बोरकर यांची अभ्यासू वृत्ती आणि समाजाला आपल्या परीने चांगलं देण्याची तळमळ पानोपानी जाणवत राहते. वाचकाच्या मनात आशादायक चित्र तयार करण्यात हे पुस्तक त्यामुळे यशस्वी होतं. -सुलेखा नलिनी नागेश ...Read more

  • Rating Stardr shalini kamble

    I read many books related to GARBHASANSKAR, but this book by Dr. Gauri Borkar is really authentic and scientific.

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RAZOR SHARP
RAZOR SHARP by ASHWIN SANGHI Rating Star
सुनील माने, पुणे

लेखक अश्विन सांघी “द रोझाबल लाइन” या पहिल्याच कादंबरीने खूप लोकप्रिय झाला. प्राचीन भारतीय दंतकथा/ऐतिहासिक संदर्भ घेऊन त्याच्याभोवती आजच्या काळात रहस्यपूर्ण कथा लिहिणारा अश्विन. Chanakya’s Chant, The Krishna Key, The Sialkot Saga, Keepers of the Kalacakra, The Vault of Vishnu, The Magicians of Mazda अशा एकापेक्षा एक सुंदर रहस्य कादंबर्या “भारत सिरीज़” नावाने खूप प्रसिद्ध झाल्या. या सर्व कादंबऱ्या मी इंग्लिश मधेच वाचल्या. यांचा मराठी अनुवाद मेहता पब्लिशिंग हाउस यांच्याकडे उपलब्ध आहे. अश्विन सांघीने या भारत सिरीज शिवाय एक नवीन थ्रिल्लर सिरीज (कुत्ता कदम) सुरू केली आहे. त्यांतील पहिली कादंबरी Razor Sharp. एक सिरियल किलर मुंबईत एकानंतर एक खून पाडतोय. पोलिस चक्रावले आहेत. 1. रविवार दि २ फेब्रुवारी , गोरेगाव पश्चिममधे रवि मेहराचा खून होतो. त्याची बायको खुशी कॅाल सेंटरचा जॅाब करून रात्री ११.३० ला परत येते. खूप वेळा बेल वाजवून दार न उघडल्यामुळे ती उघडून आत येते तर रवि रक्ताच्या थारोळ्यात मरून पडलेला असतो. त्याचे हात पाठीमागे नायलॅान दोरीने बांधलेले असतात. त्याच्या छातीत सुरा खुपसलेला असतो. त्याच्या तोंडात काहीतरी खाद्य पदार्थ असतो. 2. सोमवार दि १० फेब्रुवारी , लोअर परळमधे सुचंद्रा अग्रवालचा खून. तिची कामवाली आल्यावर दार न उघडल्यामुळे सोसायटीवाले दार तोडतात. आत सुचंद्राचा खून झालेला. हात नायलॅान दोरीने मागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात काहीतरी खाद्यपदार्थ. पोलिस चक्रावलेले. मग पोलिसखाते जागे होते. त्यांचा नावाजलेला अधिकारी जो सस्पेंड झालेला आहे, त्या प्रकाश कदम, DCP याला बोलावले जाते. राज्याचे गृहमंत्री ओंकार लोखंडे, त्यांचा माणूस कमिशनर चव्हाण आणि उपगृहमंत्री जयंत गायकवाड व त्यांचा माणूस SCP राणे, मुंबईचा डॅान भाऊ पाटील जो लोखंडेचाच माणूस असतो, हे सर्व या केसच्या मागावर लागतात. कदम हा राणेंच्या ओळखीचा खास ऑफिसर असतो म्हणून त्यालाही इन्व्हेस्टीगेशनला बोलावले जाते. 3. मंगळवार दि १८ फेब्रुवारी , ठाणे येथे मंगला शहाचा खून. तिच्या शेजारणीमुळे हे कळते. मंगलाचे हात नायलॅान दोरीने पाठीमागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात खाद्यपदार्थ. पोलिस अधिकारी शिंदे कदमबरोबर येतात. मंगलाच्या चेहऱ्याजवळ कदमला पेस्टिसाईडचा वास येतो. चेहरा निळसर झालेला. खून झाल्यावर बॅाडीला हलवलेले दिसते. तो ऑफिसमध्ये जुन्या खूनांचे फोटो तपासतो. त्यांचीही बॅाडी खून केल्यावर हलवलेली दिसते. चेहऱ्यावर निळसर झाक दिसते. तिन्ही खून “फिनेक” ब्रॅंडच्या चाकूने केलेले असतात. हे समान धागे कदम त्याची मुलगी केतुल बरोबर चर्चा करतो. केतुलची आई काही वर्षांपूर्वी कदमला सोडून गेलेली असते. ती भाऊ पाटीलची सावत्र बहीण असते. पण सध्या ती कुठे आहे व काय करते हे माहित नसते. केतुल कोर्टात काम करत असते तसेच ती “शक्ती” या NGO मधेही काम करते. शक्ती हे सोनापूरमधुन सुटका केलेल्या वेश्यांचे पुनर्वसन करत असते. निर्मल नावाचा तिचा मित्र एथिकल हॅकर असतो. तिच्यावर प्रेम करत असतो. कदमला हार्ट अटॅक येऊन गेलेला व स्टेंट बसवलेला असतो. Depression मुळे त्याची सायकॅालॅाजिस्टकडे ट्रिटमेंट चालू असते. कदमला या तिन्ही केसमधे आणखी एक धागा सापडतो. हे खून आठ दिवसांच्या अंतरावर झालेले असतात. म्हणजे पुढचा खून बुधवारी होणार असल्याचे तो राणे व शिंदेला सांगतो. 4. बुधवार दि २६ फेब्रुवारी, कांदिवली पश्चिम, लक्ष्मी बुधीराजाचा खून. तोच पॅटर्न. 5. गुरुवार दि ५ मार्च, खार पश्चिम, गुरुराज अदवानीचा खून सेम पॅटर्न. गुरूराज हा युट्युबवरचा प्रसिद्ध सिंगर असतो. 6. शुक्रवार दि १३ मार्च, ताडदेव, दिव्या शुक्रपाणीवर खूनी हल्ला होतो. पण ती जबर जखमी होते. ती फिटनेस ट्रेनर असल्यामुळे खुन्याबरोबर झटापट करते. पण चाकू पोटात घुसल्यामुळे ती जबर जखमी होते. हात बांधलेले असतानाही ती फोनवर “सिरी” ला तिच्या भावाला, ध्रुवला फोन लावायला सांगते. फोन लागतो व ती “हेल्प हेल्प” एव्हढेच बोलून बेशुद्ध होते. म्हणून खुनी पळून जातो. ध्रुव तिथे पोहोचून तिला हॅास्पिटलमधे ॲडमिट करतो. पोलिसांना तिथे खुन्याची बॅग सापडते. त्यांत नायलॅानची दोरी, बेगॅान स्प्रे व राजमाच्या बिया सापडतात. तिसऱ्या खुनाआधी पोलिस संशयित म्हणून राजू दाभाडेला अटक करतात. पण चौथ्या खूनाच्या वेळेस तो कस्टडीतच असतो. मग खूनी कोण? 7. शनिवार दि २१ मार्च, बान्द्रा पश्चिम, शनिया डिसौजाचा खून होतो. सेम मोडस ऑपरेंडी . 8. शनिवार दि २८ मार्च, चेंबूर, ७१ वर्षांच्या राहुल सिंह नावाच्या सिख व्यक्तिचा खून होतो. तीच पध्दत. यानंतर एक दिवस कदम KBC बघत असताना अमिताभ बच्चन एका सिनेमाचं गाणं लावून त्याचा पिक्चर ओळखायला सांगतात. ते गाणं असते- “सोमवार को हम मिले मंगलवार को नयन बुध को मेरी निंद खुली जुम्मेरात को चैन अरे शुक्र शनी कटे मुश्किलसे आज है इतवार सात दिनों में हो गया जैसे सात जनम का प्यार” आणि कदमच्या डोक्यात एकदम प्रकाश पडतो… अरे, हे सर्व खून असेच रविवार ते शनिवार एक एका वारी घडलेत! पण शनिवारी दोन खून कसे? याच्या मागे काही खगोलशास्त्र किंवा भविष्याचा तर संबंध नाही? कदमला आठवतं की शेजारी राहणारा डॉ. देसाईला पण भविष्य-खगोलशास्त्राची आवड व माहिती आहे. ( डॅाक्टर कडे सापडलेल्या नायलॅानचे रंगीत दोर व फिनेक कंपनीचा चाकू यामुळे एक संशयित म्हणून कदमने त्याला अटक करून पुछताछ केलेली असते) कदम लगेच डॅाक्टरांकडे जातो. त्यांची माफी मागून त्यांना या प्रश्नांत मदत करायला सांगतो. तो या सर्व खुनांचा सिक्वेन्स सांगतो. ते प्रत्येक वारी का घडले? मग शनिवारी दोन का? यापुढे कोणता वार? कुणाचा खून? डॅाक्टर सांगतात की भारतीय भविष्य व खगोल शास्त्रात नवग्रहांना खूप महत्व आहे. रवि, सोम(चंद्र), मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनि, राहू आणि केतु. यांचे रंग व धान्य वेगवेगळे असतात. त्या त्या ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी ते वापरले जातात. कदम ही माहिती लिहून घेतो. त्यावरून प्रत्येक खुनात वापरण्यात आलेले फिनेक कंपनीचे चाकू, वेगवेगळ्या रंगांचे नायलॅान दोर व तोंडातील पदार्थ यांचा संबंध जोडून एक तख्ता तयार करतोः- “रवि मेहरा-रविवार-सोनेरी दोर- तोंडात गहू-दिशा पूर्व सुचंद्रा-सोमवार-चंदेरी दोर-तोंडात तांदूळ-दिशा पश्चिम मंगला शाह-मंगळवार-लाल दोर-तोंडात तूर डाळ- दिशा दक्षिण लक्ष्मी बुधीराजा-बुधवार-हिरवा दोर-तोंडात हिरवे मूग-दिशा उत्तर गुरुराज अदवानी-गुरूवार-पिवळा दोर-तोंडात हरबरा डाळ-दिशा उत्तर पूर्व(ईशान्य) दिव्या शुक्रपाणी-शुक्रवार-पांढरा दोर-राजमा-दिशा दक्षिण पूर्व शनिया डिसौजा-शनिवार-काळा दोर-तोंडात काळे तिळ-दिशा उत्तर पश्चिम राहुल सिंग-शनिवार-निळा दोर-तोंडात उडीद दाळ-दिशा दक्षिण पश्चिम” आता उरला एकच ग्रह-केतु. केतुचा वार मंगळवार. ग्रे रंग, चना दाळ, दिशा दक्षिण पश्चिम. “केतु”म्हणजे कदमची मुलगी केतुलचा नंबर लागणार? आज तर मंगळवारच आहे! कदम घाबरून जातो! तो केतुलला फोन करतो पण तो बंद लागतो. ती सध्या कुठे आहे? कोर्टात? कदम आपल्या मुलीला वाचवतो का? खरा खुनी कोण असतो? तो पकडला जातो का? त्याचे यामागचा उद्देश काय असतो? याच्यामध्ये अजून कोण सामिल असतं का? याची उत्तरे मिळण्यासाठी वाचावी लागेल अश्विन सांघी यांची कादंबरी Razor Sharp. ...Read more

BANGARWADI
BANGARWADI by VYANKATESH MADGULKAR Rating Star
Sameer Kazi

सुंदर अशी कादंबरी माणदेशी बनगरवाडी तशी कोरडी रखरखती पण, यातील पात्रात मायेचा करुणेचाओलावा मनात घर करुन जातो