* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: DWIDAL
  • Availability : Available
  • ISBN : 9789386175519
  • Edition : 1
  • Publishing Year : OCTOBER 2016
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 144
  • Language : MARATHI
  • Category : SCIENCE FICTION
  • Available in Combos :DR.BAL PHONDKE COMBO SET - 16 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
SCIENCE, TECHNOLOGY AND POLICE STARTED WORKING TOGETHER SINCE THE TIME THE FINGER PRINTS WERE USED TO REACH A CULPRIT. THEREAFTER, THE CONTINUOUS PROGRESS OF SCIENCE AND TECHNOLOGY HAS HELPED THE POLICE FORCE WITH EXTREMELY INNOVATIVE WAYS TO REACH TO THE CORE OF ANY CRIME. WITH THIS GROWING KNOWLEDGE THE POLICE BECAME SMARTER. BUT HOW COULD THE CULPRITS NOT LEARN ALL THE NEW WAYS? THEY ALSO HAVE LEARNED TO KEEP THEMSELVES UPDATED WITH THE LATEST IN SCIENCE AND TECHNOLOGY. IN A WAY, THIS CAN BE CONSIDERED AS A RACE BETWEEN THE POLICE TASK AND THE CULPRITS. WHILE THE POLICE FORCE TRIES TO MAKE USE OF THE LATEST TECHNOLOGY TO EXPLORE THE TRACKS LED BEHIND BY THE CULPRITS IF THEY GET GUIDANCE FROM A SCIENTIST THEN THE EXPLORATION IS MORE FRUITFUL AND QUICK. AMRUTRAO MOHITE AND DR. KAUSHIK COME TOGETHER FOR AN INVESTIGATION AND MAKE THE JOURNEY THRILLING REVEALING THE CHALLENGES.
‘द्विदल’ या कथासंग्रहातील दोन कथांपैकी पहिली कथा आहे नार्सिसस. सदर कथा ही जागतिक कीर्तीचे वैज्ञानिक डॉ. अमर बोस व त्यांची पत्नी शर्मिला बोस या पात्रांभोवती फिरते. डॉ. बोस यांना ‘मोटर न्यूरॉन डिसीज’ नावाचा असाध्य आजार जडल्यामुळे त्यांचे शरीर सर्व संवेदना हरवून बसले आहे. या स्थितीतही केवळ आपल्या विलक्षण बुद्धीच्या जोरावर त्यांनी संशोधन करून विज्ञान जगतात आपला ठसा उमटवलेला असतो. त्यांची पत्नी शर्मिलादेखील वैज्ञानिक असते; परंतु बिछान्याला खिळलेल्या पतीसाठी, पतीची प्रतिभा चमकावी म्हणून तिने आपल्या करिअरचा त्याग केलेला असतो. स्वतःचे मन मारून, सर्व सुखांचा त्याग करून शर्मिला आपल्या पतीच्या सेवेसाठी दिवसरात्र तत्पर असते. अमेरिकेत राहणारे बोस पती-पत्नी व्याख्यानांच्या निमित्ताने भारतातील ‘इाQन्स्टट्यूट ऑफ सायन्स’च्या ‘गेस्ट हाऊस’मध्ये उतरलेले असताना एका रात्री डॉ. बोस यांच्यावर हल्ला होतो. संशयाची सुई सर्वप्रथम त्यांच्या पत्नी शर्मिला बोस यांच्यावरच रोखली जाते. त्यातूनच डॉ. कौशिक व कमिशनर अमृतराव यांच्यासमोर बोस पती-पत्नीच्या नात्यातला कडवटपणा समोर येतो. परंतु तरीही वैज्ञानिक दृष्टिकोन व तंत्रज्ञानाच्या साहाय्याने डॉ. कौशिक व अमृतराव यशस्वीपणे खऱ्या हल्लेखोरापर्यंत पोहोचतात. ‘द्विदल’मधील दुसरी कथा आहे ‘कोव्हॅलंट बाँड.’ ही कथा माधवी, जयंतीबेन आणि दहा वर्षांची एक मुलगी यांच्याभोवती फिरते. एक दहा वर्षांची मुलगी आणि तिच्यावर हक्क सांगणाNया दोन माता. वैज्ञानिकदृष्ट्या दोन्ही माता या त्या मुलीच्या खऱ्या (जैविक) माताच असताना कोणाचा त्या मुलीवर खरा हक्क आहे, हा गुंता सोडवण्यात कमिशनर अमृतराव आणि डॉ. कौशिक कितपत यशस्वी होतात, हे बघणं औत्सुक्याचे ठरते. दोन्हीही कथा वेगळा विषय घेऊन पुढे येताना दिसतात. आजच्या काळात विज्ञानामुळे निर्माण झालेले प्रश्न विज्ञानच सोडवते. केवळ विचारांची योग्य तर्वÂसंगती लावणे आवश्यक आहे, हेच ‘द्विदल’मधील कथा सुचवतात.

No Records Found
No Records Found
Keywords
#DWIDAL #BAL PHONDKE #SCIENCE FICTION #MEDICAL FICTION #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%
Customer Reviews
  • Rating StarLOKPRABHA - 11 MAY 2018

    नव्या युगाच्या विज्ञानकथा... पूर्वी हाताच्या बोटांचे ठसे, श्वानाने घेतलेला वास किंवा रक्ताचे रिपोर्ट्स यांचाच काय तो गुन्ह्याच्या शोधांमध्ये उपयोग होत होता. आता विज्ञान आणि तंत्रज्ञान यांची बरीच प्रगती झाली आहे आणि त्यातून उपलब्ध झालेल्या नवनवीन यंतरणांचा अधिकाधिक वापर गुन्ह्यांच्या तपासासाठी केला जातो. पोलिसांच्या तपासाला कुणा वैज्ञानिकाची जोड मिळाली तर तो तपास कसा चित्तथरारक होतो याची झलक डॉ. बाळ फोंडके यांनी आपल्या ‘द्विदल’ या पुस्तकात समर्पकरीत्या मांडलंय. ‘नार्सिसस’ आणि ‘कोव्हेलेंट बॉण्ड’ या नव्या युगाच्या दोन विज्ञानकथा अनोख्या आहेत. ‘नार्सिसस’ म्हणजे स्वत:च स्वत:च्या प्रतिमेचाही हेवा करावा इतका, की आपणच आपलं आयुष्य संपवावं. या कथेमध्ये लेखकांनी मानवी मनाच्या प्रसिद्धीच्या ईर्षेचा आणि हव्यासाचा मांडलेला सिद्धांत खरा आहे, हे पटवण्यासाठी आत्मक्लेशाची गाठलेली परिसीमा अत्यंत रोमहर्षक पद्धतीने उलगडली आहे. ही कथा वाचकांना उत्सुकतेच्या शिखरावर नक्कीच पोहचवेल यात शंका नाही. या पुस्तकातील दुसरी कथा आहे ‘कोव्हेलेंट बॉण्ड’. कथेच्या शीर्षकातच रसायन शास्त्राच्या व्याख्येनुसार ‘शेअिंरगने होणारा बॉण्ड.’ हा बॉण्ड अत्यंत मजबूत असतो व कोणत्याही रासायनिक प्रक्रियेने तो सहजपणे तुटत नाही. असा हा बॉण्ड सर्वांत मजबूत असतो. दोन्ही भावबंध स्वतंत्ररीत्या अपूर्ण असतात. एक वेगळाच, थक्क करणारा विचार ही कथा देऊन जाते. -मनीषा फडके ...Read more

  • Rating StarKiran Borkar, Vachan Veda 23.9.17

    विज्ञान गुन्हेगारी कथा असे याचे वर्णन करता येईल.गुन्हेगारांच्या शोधासाठी विज्ञानाचा वापर कसा करता येईल याची माहिती लेखकाने अतिशय सोप्या पद्धतीने सांगितली आहे.यात दोन कथा आहेत.खुर्चीत विकलांग बनून असलेल्या शात्रज्ञावर घरात हल्ला होतो .तो कोणी केला याच उकल विज्ञानाच्या साहाय्याने केली जाते .तर टेस्ट ट्यूब बेबी किंवा सोरोगेट आईचे भविष्यात येणारे संभाव्य धोके ,दुष्परिणाम कसे असू शकतात याची कथा ही मनोरंजनात्मक पद्धतीने मांडली आहे .तंत्रज्ञान किती पुढे गेले आहे हे पाहून आपण अचंबित होतो . ...Read more

  • Rating StarDAINIK SAMANA 25-06-2017

    वैज्ञानिक रहस्यकथा... प्रसिद्ध शास्त्रज्ञ तसेच विविध विषयांचे व्यासंगी लेखक म्हणून मराठी साहित्य क्षेत्रात डॉ. बाळ फोंडके यांचे एक वेगळे ठळक असे स्थान आहे. त्यांचे विज्ञानविषयक लेख, कथा, सदरे, पुस्तके आणि शोधनिबंध प्रसिद्ध आणि वाचकप्रिय आहेत. विज्ञा विषय लोकप्रिय करण्यात त्यांचा मोलाचा वाटा असून याबाबत त्यांना अनेक पारितोषिकेही प्राप्त झाली आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञानाने बराच मोठा पल्ला गाठला आहे. त्यातून उपलब्ध नवनवीन यंत्रणांचा अधिकाधिक वापर गुन्ह्यांच्या तपासासाठी पोलीस खुबीने करून घेतात, पण गुन्हेगारही या तंत्रज्ञानाचा गैरवापर करू लागले आहेत. अशा वेळी पोलिसांच्या मदतीला जर एखाद्या वैज्ञानिकाची साथ मिळाली तर गुन्ह्याचा तपास अधिक चित्तथरारक होईल. डॉ. बाळ फोंडके यांच्या विज्ञान कथेतील नायक आयुक्त अमृतराव मोहिते आणि डॉ. कौशिक या जोडगोळीने अनेक मोहिमा यशस्वी केल्या आहेत. या जोडीच्या दोन मोहिमांची कहाणी म्हणजेच द्विदल कथासंग्रह. ‘नर्सिसस’ या पहिल्या कथेत अमृतराव मोहिते यांनी एका संशोधकाने केलेल्या गुन्ह्यांचा पर्दाफाश ज्या चलाखीने केला आहे ते वाचताना वाचकाची उत्कंठा वाढत जाते. कथानकात आंतरराष्ट्रीय कीर्तीचे प्रा. बोस मेंदू आणि चेतासंस्था यांच्या संशोधनात माहीर होते. आपल्या संशोधनाविषयी ते समकक्ष विद्वानांशीच नव्हे तर सर्वसामान्यांनाही तो विषय प्रासादिक भाषेत ते समजावून सांगत. त्यांच्या एका जाहीर व्याख्यानात अमृतरावांनी हजेरी लावली. संपूर्ण शरीरात चैतन्याचा अभाव असणारी व्यक्ती प्रा. बोस असल्याचे कळल्यावर त्यांना धक्काच बसतो. त्यांची सुविद्य पत्नीही संशोधक असून त्यांनी आपल्या या पतीकरिता आपले संपूर्ण करीयर सोडून दिल्याचेही त्यांना कळते. याच दौऱ्यात गेस्ट हाऊसवर प्रा. बोस दांपत्य राहत असताना प्राध्यापकांवर जीवघेणा हल्ला होतो. फक्त मेंदू तल्लख असून सगळे शरीर गलितगात्र असताना प्रा. बोस यांच्या झालेल्या हल्ल्याचा क्लिष्ट तपास अमृतराव आणि डॉ. कौशिक ज्या चित्तथरारक पद्धतीने करतात त्यात वाचकांना गुंतवून ठेवण्यात लेखक यशस्वी झालेत. ‘कोव्हॅलंट बॉण्ड’ या दुसऱ्या कथेत टेस्ट ट्यूब बेबी टेक्नोलॉजी व सरोगेट मदर या असिस्टेड रिप्रॉडक्शन टेक्निकचा उपयोग करून अपत्यप्राप्ती झालेल्या दोन महिलांच्या आयुष्यात पुढे काय गुंतागुंत होते, त्यातून हे प्रकरण कायद्याच्या चौकटीत कशा तऱ्हेने येते, यावर ही कथा बेतली आहे. अशा फर्टिलिटी क्लिनिक्समध्ये एखादी झालेली चूक एकाच नव्हे तर दोन कुटुंबांशी कशी भावनिकदृष्ट्या वाताहत करू शकते हे वाचताना आपणही अस्वस्थ होतो. काही वेळेला शारीरिकदृष्ट्या निकोप असूनही काही दांपत्यांना मूल होत नाही. ते अशा क्लिनिक्सचा रस्ता धरतात. अशाच एका क्लिनिकमध्ये नोंदीतील झालेल्या चुकीमुळे दोन स्त्रियांच्या आयुष्यात प्रचंड भावनिक उलथापालथ होते. ती केस आयुक्त अमृतरावांकडे येते. डॉ. कौशिक यांच्या मदतीने त्या मुलीची खरी आई कोण हे सत्य वाचताना वाचकांच्याही मनात हुरहूर निर्माण होते. टेस्ट ट्यूब बेबी या प्रक्रियेबद्दल सामान्य माणसाला अज्ञात असलेली वैज्ञानिक माहिती लेखकाने देऊन वाचकांना आनंदही दिला आहे. पोलिसांच्या तपासाला एखाद्या वैज्ञानिकाची मदत मिळाली तर तपास कसा चित्तथरारक होईल याची झलक या दोन्ही कथांमधून वाचायला मिळते. पुस्तक हातात घेतल्यानंतर ते संपूर्ण वाचूनच आपण थांबतो. आपणही त्या तपासकार्याचा एक भाग होऊन जातो हेच या कथासंग्रहांचे यश म्हणता येईल. सतीश भावसार यांनी चित्तारलेले मुखपृष्ठ विषयाला समर्पक आहे. -प्रतिमा ओतूरकर ...Read more

  • Rating StarSAPTAHIK SAKAL 01-07-2017

    उत्कंठावर्धक विज्ञान कथा... विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा सातत्याने वाहणारा प्रवाह वेगवान असतो. त्यातून निष्पन्न होणाऱ्या सुखसोई-सेवासुविधा सर्वसामान्यांसाठी उपयुक्त असतात. हे जरी खरं असलं तरी त्यांच्या मागील संकल्पनांची ओळख सामान्य वाचकांना होणंगरजेचं असतं. अभिनव शोधांची माहितीही आपल्याला व्हावी म्हणून विज्ञान कथा हे एक प्रभावी माध्यम ठरतं. त्यामध्ये गोष्ट तर गुंफलेली असतेच, पण विज्ञानाच्या वाटचालीवर आधारलेले भविष्यकाळाचे पडसाद त्या कथांमध्ये उमटलेले असतात. या कथांमध्ये विज्ञान सहजतेने आणि सुलभतेने डोकावत असते. यामुळे वाचकांच्या मनामध्ये वैज्ञानिक साहित्य औत्सुक्य निर्माण करते. विज्ञानकथांची अशी काही बलस्थाने लक्षात आल्यामुळे त्यांचे साहित्यिक मूल्य वाढत आहे. सुदैवाने गेल्या काही वर्षात विज्ञान-तंत्रज्ञानावर आधारलेल्या कथा किंवा कादंबऱ्यांमुळे मराठी साहित्य विश्वात मोलाची भर पडलेली आहे. मराठी विज्ञानकथाकारांमधील एक ज्येष्ठ लेखक डॉ. बाळ फोंडके यांचा ‘द्विदल’ हा कथासंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. त्यामध्ये नव्या युगांच्या दोन प्रदीर्घ पण उत्कंठावर्धक विज्ञान कथा समाविष्ट आहेत. दोन्ही कथांमध्ये पोलीस अधिकारी अमृतराव मोहिते आणि त्यांना नेहमीच गुन्हे-अन्वेषणाच्या कामी आधारस्तंभ म्हणून लाभलेल्या विज्ञाननिष्ठ डॉ. कौशिक यांच्या चातुर्याची कसोटी पणाला लागलेली दिसते. ‘नर्सिसस’ ही पहिली कथा अमेरिकेत कार्यरत असणाऱ्या शास्त्रज्ञ अमर बोस यांच्यावर बेतलेली आहे. सुरुवातीला त्याचं वैज्ञानिक कार्य आणि त्याचबरोबर त्यांचं ‘आत्मा-देह-चैतन्य-ऊर्जा’ आदी संकल्पनावरील सखोल चिंतन प्रकट झालंय. मेंदू तल्लख असला तरी ते ‘मोटर न्युरॉन डिसीज’मुळे बहुतांशी विकलांग आहेत. त्यांचं व्यक्तिमत्त्व लक्षात घेताना वाचकांना ज्येष्ठ खगोल-गणिती स्टीफन हॉकिंग आठवण होईल. प्रो. बोसांच्या मते आपल्या देहाला फारसं महत्त्व नाही; केवळ मेंदूला आपले कार्य करता यावे म्हणून चेतासंस्थेला ऊर्जा पुरवण्याव्यतिरिक्त देह काही करत नाही. भारतातील एका प्रयोगशाळेत ते आपली पत्नी शर्मिलासह अभ्यास दौरा करण्यासाठी आलेले असताना त्यांचं आम जनतेसाठी एक व्याख्यान आयोजित करण्यात आलेले होते. विषय होता – ‘द सर्च फॉर द सोल’, म्हणजे ‘आत्म्याचा शोध’! हा विषय निश्चितच भारतीयांचे कुतूहल चाळवणारा असल्याने गर्दीचे भरगच्च झालेल्या हॉलमध्ये कमिशनर अमृतराव आणि डॉ. कौशिकदेखील उपस्थित होते. स्पष्ट बोलता येत नसल्याने प्रो. बोस व्हील चेअरवरील संगणकाच्या साह्याने ‘स्पीच सिंथेसायझर’ वापरून व्याख्यान देत होते. त्यांचे व्याख्यान ‘मेट्यालिक’ आवाजात पण सुबोध आणि मननिय असल्याने चांगलेच गाजले. त्याच दिवशी रात्री संस्थेने दिलेल्या आणि पूर्ण सुरक्षित असलेल्या निवासस्थानी प्रो. बोस निद्राधीन झाले. तथापि दुर्दैवाने दुसऱ्या दिवशी त्यांच्या पत्नीला प्रो. बोस यांचा रक्तबंबाळ झालेला देह दिसला. त्यांना तर कोणीही उघड असे शत्रू नव्हते. जगभर पसरू शकणारी ही बातमी गुप्त ठेवणं आणि या मागील रहस्य शोधण्याचे कार्य आव्हानात्मक होतं. संशयित बरेच होते. अर्थातच डॉ. कौशिक आणि अमृतराव यांनी रहस्यभेद करून ‘चक्षुर्वै सत्यम्’ असा गुन्हेगार शोधून काढलाच. ही कथा मुख्यत: वैज्ञानिक मनोविश्लेषण करणारी आहे. या कथेच्या ‘नर्सिसस’ या नावाच ‘शोध’ मात्र वाचकांनीच घ्यायला हवा! ‘कोव्हॅलंट बॉण्ड’ असं दुसऱ्या कथेचं नाव आहे. रसायनशास्त्रातील अणूंचे होणारे परस्पर ‘बॉण्डिंग’ (बंधन) वेगवेगळ्या प्रकारचे असते. त्यातील ‘कोव्हॅलंट बॉण्ड’ हा खूप पक्का, आणि सहसा अतूट असतो. आई आणि तिचे मूल यांच्यातील नातेसंबंधातील धागे हे ‘कोव्हॅलंट’ असले तरी आधुनिक वैद्यकशास्त्रातील (अशा नाजूक) धाग्यांना ‘कंगोरे’ असू शकतात. पूर्वीच्या कथांमध्ये एखाद्या बालकाचा बाप नक्की कोण असावा, हे शोधून काढायची समस्या असे. कारण आई निश्चितपणे माहिती असते. या कथेतील मोनिका माझीच आहे, असं दोन मातांना वाटतं. मग मोनिकाची आई नेमकी कोणती आहे? अमृतराव आणि डॉ. कौशिक यांनी हे शोधून काढलं आहे. वाचकांना संभ्रमित करणारी ही कथा ‘कोव्हॅलंट बॉण्डिंग’ नेमकं कोठे आहे, याचा उलगडा करते. सध्याच्या आणि भावी काळामध्ये सरोगेट माता, ‘मायटोकाँड्रिया’ (ऊर्जा यंत्रणा) दान करणारी माता आणि अजूनही काही पद्धतीच्या माता उद्भवणार आहेत. साहजिकच नाते-संबंधातील धागे-दोरे नाजूक बनू शकतात. ‘द्विदल’सारख्या वैज्ञानिक कथा संग्रहामध्ये लेखकांनी ‘परिशिष्ट’ समावेश करून अगदी संक्षिप्त स्वरूपात कथाबीज मागील (आधुनिक) विज्ञान-तंत्रज्ञानाचे विवरण करावे, असे मला वाटते. दोन्ही कथा रहस्यमय आहेत, पण त्या भक्कम वैज्ञानिक पायावर आधारलेल्या आहेत. त्यात मुखपृष्ठावर दर्शविलेल्या पिस्तूलाला फारसं महत्त्व नाही. डॉ. बाळ फोंडके यांनी त्यांच्या खास शैलीत सादर केलेल्या दोन्ही कथा वाचकांना खिळवून ठेवतील, यात शंका नाही. -डॉ. अनिल लचके ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more

I HAVE A DREAM
I HAVE A DREAM by RASHMI BANSAL Rating Star
Krishna Diwate

‘स्टे हंग्री स्टे फूलीश’ आणि ‘कनेक्ट द डॉटस’ या बेस्ट सेलर पुस्तकाच्या लेखिका ‘समाजातल्या परंपरागत समस्या सोडवण्याचा नवा मार्ग शोधून काढणार्‍या वीस सामाजिक उद्योजकांच्या प्रेरणादायी कहाण्या’ हे वाक्य पुस्तकाचे पहिले पान उघडले आणि दिसले. त्यामुळे माझ कुतुहल चाळवले आणि ते पुस्तक वाचायला सुरुवात केली. मनोगतात लेखिका म्हणतात की, आता नव्या दमाचे, डोक्याने आणि मनाने ही विचार करणारे काही जण एखाद्याच्या नजरेतील दुःख ओळखतात, पेटून उठतात; पण ते त्याच्यावर विचार एखाद्या उद्योजकाप्रमाणे करतात. म्हणून ते ‘सामाजिक उद्योजक.’ नफा मिळविण्याचा हव्यास नसला तरी ते बिझनेस मधील तत्वे वापरून ती गोष्ट साध्य करतात. हे काही तरी वेगळे आपण वाचत आहोत असे मला वाटले. त्यामुळेच ते पुस्तक वाचायला घेतले. ह्या मध्ये वीस लोकांची चरीत्रे आहेत. ते सर्व भारतीय, उच्चशिक्षित तरूण तरूणी आहेत. कोणी त्यातील शास्त्रज्ञ आहेत तर कोणी मरिन बायोलॉजिस्ट, आयआयटी, आयआयएम ग्रॅज्युएट आहेत पण कोणत्या कोणत्या सामाजिक प्रश्नाने ते अस्वस्थ झाले आणि नेहमीच्या मार्गाने न जाता वेगळीच वाट पकडली. पुस्तकात ‘रेनमेकर्स,’ ‘चेंजमेकर्स’ व ‘स्पिरिच्युअल कॅपिटॅलिस्ट’ असे तीन भाग आहेत. प्रत्येकात अनुक्रमे अकरा,सहा व तीन व्यक्तीमत्वांची ओळख करून दिली आहे. ‘सुलभ’ ही आधुनिक टॉयलेटस उभारणारे बिंदेश्वर पाठक ह्याच्या चरित्राने पुस्तकाची सुरुवात होते. जातीने बिहारमधील ब्राह्मण. पण लहानपणी टॉयलेटस साफ करणार्‍याला हात लावला त्यामुळे आजीने अक्षरशः शेण, गोमुत्र खायला लावले. पण त्याच बिंद्रेश्वरांनी अगदी योगायोगाने ह्याच क्षेत्रात काम करण्याचे ठरविले. अर्थात ही वाट निश्चितच सोपी नव्हती. अनेक हालअपेष्टा सोसत, जगाचे धक्के खात, अनेक समस्यांना तोंड देत आपले स्वप्न ‘सुलभ शौचालयाच्या’ माध्यमातून सुरु केले. तो सगळा खडतर प्रवास अर्थात पुस्तकातूनच वाचायला हवा. त्यासाठी त्यांनी केवळ ती यंत्रणा तयार केली नाही तर ती टॉयलेटस बांधून, त्यासाठी लागणारी प्रेरणा, शिक्षण, संभाषण, ट्रेनिंग, पाठपुरावा अशा सर्वच गोष्टी ‘सुलभ’ तर्फेच संभाळल्या जातात. सध्या ही संस्था स्वबळावर चालते. 100 ते 125 कोटी इतके तिचे वर्षाचे उपन्न आहे. इतकेच नाही पूर्वी जे लोक सफाईचे काम करत असत त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च संस्था करत आहे. ‘सुलभ पब्लिक स्कूल’ नावाने शाळा सुरु केली आहे. तरूणांसाठी व्होकेशनल क्लासेस चालवले जातात. म्हणजे मिळालेला नफा पुन्हा त्याच सफाई कामगारांच्या कल्याणासाठी वापरला जातो. टॉयलेटस बांधून भरपूर पैसा मिळवता येतो हे वाक्य पचायला जरा जडच जाते. अनिता आहुजा ही दिल्लीत सुखवस्तू कुटूंबात रहाणारी सामान्य स्त्री. पण कचरा वेचणार्‍या मुलांचे हाल पाहून त्यांच्यासाठी काही तरी करावे असे तिने ठरविले. तिने 1998 मध्ये कॉन्झर्व्ह नावाची संस्था उभी केली. व त्यातून पहिला प्रोजेक्ट सुरु केला तो म्हणजे आजुबाजूच्या परिसरातील कचरा उचलून त्याचे कंपोस्टखत तयार करणे. कचरा गोळा करण्यासाठी चांगल्या ढकलगाड्या आणल्या, युनिफॉर्म, आय कार्डची सोय केली. 2002 पर्यंत एक पूर्ण वेळ काम करणारी मोठी संस्था बनली. त्याचवेळी त्यांनी प्लॅस्टीकच्या कचर्‍यावर प्रयोग सुरु केले. तिचे पती शलभ ह्यांनी बिटस पिलानी मधून इंजिनिअरींग केले आहे. त्यांच्या मदतीने तिने फॅक्टरी सुरु करण्याचे ठरविले. शलभने मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक शीटस निर्मिती करू शकेल असे मशीन तयार केले. त्यासाठी अर्थातच अनेक प्रश्न समोर उभॆ राहिले. चुका झाल्या, ठोकरा खाल्या पण त्यातून वाट काढत त्यांनी चिकाटीने प्रयत्न सुरुच ठेवले. आज दोघे मिळून कचर्‍यातील प्लॅस्टिक पिशव्या वापरून आकर्षक अशा हॅडबॅगस तयार करण्याचा कारखाना चालवतात. जे लोक सुरुवातीला केवळ कचरा उचलण्याचे काम करत होते, त्यांच्या काही कौशल्य दिसले की त्यांना वेगळे काढून ट्रेनिंग दिले जाते. मशीनवर असिस्टंटचे काम करू लागतात त्यातून काही लोक तर ग्रुप लिडर ही झाले आहेत. कटींग करणॆ, क्वालिटी तपासणॆ, फिनिंशींग, पॅकिंग अशी सर्व महत्वाची कामे ते करतात. आता ते कामगार झाल्यामुळॆ त्यांना चांगला पगार, प्रॉव्हिडंट फंड, ओव्हरटाईम अशा सुविधा मिळू लागल्या त्यापेक्षा ही जास्त त्यांना समाजात प्रतिष्ठा मिळाली. त्यांच्या साठी हे नवीनच आहे. अनिता व शलभ दोघॆही मेहनत घेतात पण एनजीओ असून ही भरपूर पैसा कमावणे त्यांना चुकीचे वाटत नाही. कारण आज ह्या एका उद्योगामुळे कित्येक कुटूंबाची आर्थिक स्थिती बदलून गेली आहे. अशीच अजून एक प्रेरणादायी कथा दिल्लीतील रंगसूत्र कंपनी चालविणार्‍या सुमिता घोस ह्यांची. स्वतः ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यावर मास्टर इन इकॉनॉमिक्स ची पदवी घेतल्यावर संजॉय घोस ह्या या आय आर एम मधून शिक्षण घेतलेल्या ध्येयवादी तरूणाशी लग्न केले. पण दुर्दैवाने आसाममध्ये काम करत असताना त्यांची 1998 मध्ये उल्फाच्या अतिरेक्यांनी हत्या केली. त्यानंतर अनेक टक्केटोणपे खात, दोन लहान मुलांचा संभाळ करत सुमिताने ‘रंगसूत्र’ नावाची कंपनी काढली. त्याच्या मार्फत ती खॆडॆगावातल्या लोकांकडून कापड, शोभॆच्या वस्तू, बनवून घेते आणि त्या फॅब ईंडीयासारख्या प्रसिध्द कंपन्यांना विकते. जैसलमेर, बारमेर जिल्ह्यातले कारागिर तिच्यासोबत काम करत आहेत. अजून एक अशीच ध्येयवादी तरूणी म्हणजे इशिता खन्ना. डेहराडून मध्ये जन्म झालेली एक सर्वसामान्य मुलगी. पण निसर्गसंवर्धन आणि भूगोल या विषयांची आवड असलेली. म्हणूनच तिने आपल्या ग्रॅज्युएशन नंतर टाटा इंन्स्टीट्यूट मधून मास्टर्स केले. पर्यावरण क्षेत्रातच काम करायचे आहे हे निश्चित ठरवून तिने काही वर्षे नोकरी केली. त्यानंतर 2002 मध्ये नोकरी सोडून आपल्या दोन मित्रांसोबत स्पिती व्हॅलीमध्ये मूस नावाची एन्जीओ सुरु केली. तेथील स्थानिक महिलांचे ग्रुपस करून त्यांना तिथे असणार्‍या सीबक थॉर्न ह्या फळांच्या लागवडीचे ट्रेनिंग दिले. त्यावर प्रक्रिया करायला शिकवले. ही झाडॆ मातीला धरून ठेवतात त्यामुळे धूप रोखली जाते, शिवाय नायट्रोजन ही धरून ठेवत असल्याने जमिनीचा पोत सुधारतो. त्यामुळे ह्या फळांवर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे तिथल्या बायकांना चांगला रोजगार मिळू लागला. त्याचबरोबर तिने स्थानिक तरूणांना पर्यटकांना ट्रेक किंवा जीप सफारीसाठी नेणे, कॅम्प लावणे, गरज पडल्यास प्रथमोपचार करणे ही कामे ही करायला शिकवले. कारण हळूहळू तिथे पर्यटन वाढू लागले. ते इको-फ्रेंडली करण्याकडॆ तिच्या इकोस्पियर संस्थेचा भर आहे. आता दरवर्षी पर्यटनातून 35 ते 40 लाखाचे उत्पन्न मिळते.आणि त्यातून नफा ही मिळतो. इकोस्पियर संस्थेने शेजारच्य़ा ‘लाहुल’ व्हॅलीमध्ये ही विकास कामे सुरु केली आहेत. पर्वतावर तयार होणार्‍या कचर्‍याच्या समस्येवरही तिला काहीतरी करायचे आहे. तिची संस्था लोकांना मुद्दाम तिथले लोक किती अवघड परिस्थितीत रहातात हे दाखवते. अतिशय थंडीत तिथे तापमान मायनस 35 पर्यंत खाली गेल्यावर हॅंडपंपने पाणी काढणे सुध्दा किती कठीण होते हे सांगितले जाते. तेव्हा आपल्यासारख्य़ा पर्यटकांना काय काय करता येईल याबद्दल ती जागरूकता निर्माण करते. मूळात हे पुस्तक 2012 साली लिहिलेले आहे. त्यामुळे आता ह्या वेगवेगळ्या प्रकारचे काम करणार्‍या संस्थेचे काम या दहा वर्षात खूपच वाढले असेल यात काही शंका नाही. दीनबंधू साहू हे मरिन बायोलॉजिस्ट आहेत पण ते प्रयोगशाळेतून बाहेर पडून समाजासाठी काम करतात. ‘प्रोजेक्ट चिलका’ ह्या त्यांच्या संस्थेमार्फत ओरिसातील लोकांना समुद्राची शेती करायला शिकवतात. ओरिसा मधील पुरी येथे जन्म झालेल्या दीनबंधूनी अतिशय हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेतल्यानंतर दिल्लीत एमएसीला ॲडमिशन घेतली. परंतु योगायोगाने १९८७ मध्ये अंटार्क्टिक वर जाण्याची संधी मिळाली. नंतर पीएचडी पूर्ण केल्यानंतर अनेक देशांमध्ये नोकरी निमित्ताने फिरले. पण तरीही शेवटी दिल्ली युनिव्हर्सिटी मध्ये प्रोफेसर म्हणून काम सुरू केले. त्यांना समुद्री वनस्पती बद्दल विशेष आस्था होती; पण त्या बद्दल आपल्या देशात फारशी जागरूकता नव्हती. ही लागवड पर्यावरण पूरक असते शिवाय त्यातून स्थानिक लोकांना उत्पन्नाचे साधन मिळते. त्यासाठी डिएसटीने निधी मंजूर केला. मग त्यांनी चिल्का सरोवराची पहाणी केली, त्यामध्ये वाढू शकतील अशा चार जातींची निवड करून स्थानिक लोकांना समजेल अशा सोप्या भाषेत माहिती दिली. प्रात्यक्षिके दाखवली, वर्कशॉप्स घेतली. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना रोजगार मिळू लागला. यातूनच पर्यावरण संरक्षण ही होऊ लागले. यातून त्यांना प्रत्यक्ष कांहीं आर्थिक फायदा होत नसला तरी ते म्हणतात, की आम्हाला दोघांना दिल्लीत चांगली नोकरी आहे. त्यामुळे पैसे कमावणे हा उद्देश नाही; पण अजून तीस वर्षांनंतर मला मी काही तरी काम केलेले दिसेल. असे जर काहीच तुम्हाला दिसणार नसेल तर जगायचे कशाला? भूषण पुनानी हे असेच अत्यंत बुध्दीमान विद्यार्थी. मेडीकलची ॲडमिशन हुकल्यामुळे डेअरी कोर्ससाठी ॲडमिशन घेतली. तिथे ही विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळविला. नंतर पीएचडी केले. ग्रामविकास शिकण्यासाठी आयआयएम मध्ये एमबीए केले. हे झाल्यावर 1979 मध्ये ब्लाईंड स्कूल मध्ये दोन वर्षांसाठी नोकरी सुरु केली ती सुधा ह्याच हेतूने की मॅनेजमेंट शिकताना जी थेअरी शिकलो ती विकासाच्या क्षेत्रात वापरता येईल का? हळूहळू त्यांना अनेक लोक मिळत गेले. सर्वांनी मिळून आज संस्था खूप मोठी केली आहे.त्यांनी काम सुरु केले तेव्हा फक्त एक कॅपस होता, आज गुजरात मध्ये आठ कॅपस आहेत. दहा लाख मूल्य असलेली संस्था आज दोन कोटी रुपयांची आहे. अपंग लोकांनी स्वावलंबी व्हावे ह्यासाठी संस्था काम करते. दृष्टीहीन मुली ब्यूटी पार्लरसारखे कोर्स चालवतात, फिजिओथेरपी शिकून सेंटर मध्ये काम करतात. विकास साधण्यासाठी योग्य व्यवस्थापनेची गरज असते हे त्यांनी दाखवून दिले आहे. हजारो लोकांच्या आयुष्यात नवा प्रकाश निर्माण करून त्यांना सामान्य आयुष्य जगण्याची संधी मिळवून दिली आहे. अशी ही एकापेक्षा एक वेगवेगळ्या प्रकारची माणसे. कोणत्या तरी ध्येयाने पछाडलेली . सामाजिक कार्य करत असतानाच त्या लोकांचे कल्याण कसे होईल असा विचार करणारी. लेखिकेने त्या सर्वांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या आहेत, त्यांचे काम प्रत्यक्ष पाहून जाणून घेतले आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित गोळा करून आपल्यासमोर मांडली आहे. त्यामुळेच त्या मनोगतात म्हणतात, ‘तुमचं आयुष्य कसे ही असले तरी इतरांसाठी एखादा क्षण द्या. इतरांना प्रेम, आनंद, चांगुलपण द्या. जितकं द्याल तितकं तुम्हाला परत मिळेल.’ हेच वाक्य मलाही अतिशय उर्जा देऊन गेले. माझ्याकडे जे आहे, जे मला देणे शक्य आहे ते निरपेक्षपणे ज्यांना गरज आहे त्याला देणे ह्या सारखा आनंद अजून काय असणार? ह्याच वाक्याने मी आपली ह्या आठवड्यात रजा घेते. उद्या पासून सुरु होणार्‍या नवीन सत्रासाठी सारिका ताईंना हार्दिक शुभेच्छा. ...Read more