* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9789391151065
  • Edition : 2
  • Publishing Year : AUGUST 2021
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 96
  • Language : MARATHI
  • Category : CHILDREN LITERATURE
  • Sub Category : PICTURE BOOKS, ACTIVITY BOOKS & LEARNING MATERIAL
Quantity
Buying Options:
  • Print Books:
CHUTAKICHA JAG IS A NOVEL BY THE AUTHOR FARUK KAZI. IT PORTRAYS THE MYSTERIOUS HAPPENINGS IN THE LIFE OF THE PROTAGONIST CHUTAKI. CHUTAKI IS A SMALL SCHOOL GOING GIRL FROM A HAPPY, LOVING FAMILY. BUT ONE DAY ONE DANGEROUS MONSTER ENTERS INTO HER LIFE. HER LIFE BECOMES MISERABLE. THIS NEW STRUGGLE IS AN EYE OPENER TRAVEL WHICH KEEPS READERS ENGAGED THROUGH THE SURPRISING EVENTS.
आपल्या अब्बूवर जीवापाड प्रेम करणारी पाच वर्षाची छोटी चुटकी अतिशय जिद्दी मुलगी आहे. ती जितकी अल्लड आहे त्याहून समजूतदार आणि सक्षम व्यक्तिमत्व म्हणून आपल्या भेटीला येते. लहान वयातही येणाऱ्या आव्हानांना, संकटाना भिडण्याची क्षमता तिच्यात असून निरागसपणा आणि सत्य ही तिची ताकद आहे. शांतता आणि प्रेम ह्या बुद्धाने दिलेल्या देणग्यांच्या साथीने जी तिचं जग सुंदर करण्याचा प्रयत्न करते. या पुस्तकातून नायिका म्हणून वाचकांसमोर आलेली चुटकी संघर्ष तर करतेच पण जिंकूनही दाखवते.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#CHUTAKICHAJAG #FARUKKAZI #CHILDRENLITERATURE #MARATHIBOOKS #ONLINEBOOKS #MEHTAPUBLISHINGHOUSE #CHILDRENSTORIES #चुटकीचंजन #फारूककाझी #बालसाहित्य #मराठीपुस्तके #मराठीकादंबरी #मेहतापब्लिशिंगहाऊस
Customer Reviews
  • Rating StarSantosh Lonvire

    मुलांना आनंद देणारं, विचार करायला संधी आणि अवकाश देणारं, कल्पकतेला पंख देणारं... मित्राचं हे अद्भूत `चुटकीचं जग` आलंय दोस्ताच्या हातात...

  • Rating Starनिमिष दौंड

    कथा ही अल्पवयीन मुलीच्या आयुष्यातील घडामोडींवर आहे .एक मासेमारी आणि जमिनीची देवता इर्डा यांची मुलगी म्हणजे ही चुटकी . लेखकांनी सुरुवातीला चुटकी ची पूर्ण पार्श्वभूमी स्पष्ट दिली तसेच लेखन करताना त्यांनी सुरुवातीच्या भागात जी वाचकाला पुढचे पुस्तक पूर्णवाचायला प्रेरणा मिळाली पाहिजे तिचा विचार करूनच लेखन केले . सुरुवातीला चुटकी चे अब्बू, बाजी आणि चुटकी यांच्यातील जग (विश्व )लेखकांनी अधोरेखित केले परंतु त्यातही त्यांनी अनेक मजेशीर प्रसंग टाकल्याने "मुसा" या पात्राबद्दलचे गुढ आणि चुटकीचा स्वभाव जाणता येतो . त्यानंतर "नूहबाबा" या पात्राची एन्ट्री होते आणि रोमांचकता वाढत जाते. नूहबाबांचे व्यक्तिमत्व, त्यांचे घर तसेच त्यांचे गूढरम्य संवाद यामुळे चुटकी जशी गोंधळते त्याचप्रमाणे वाचकही गोंधळात पडतो; मग जेव्हा चुटकीला ते अद्भुत पदक मिळतं त्यापासून खर्‍या व रोमांचक प्रवासाला सुरुवात होते. वाचकांना अजून खिळवून ठेवण्यासाठी मध्येच चुटकीला पडलेले स्वप्न खरच त्याचं काम योग्यरीत्या पार पाडतं . यानंतरचा भाग म्हणजे "मुसा" आणि महाराणी "ईर्डा" यांचा 5 वर्षांआधी चा इतिहास .लेखकांनी हा विषय अगदी योग्य वळणावर सुरु केला त्यामुळे मुसा बदद्ल च्या गूढतेचे कंटाळ्यात रूपांतर झाले नाही आणि वाचकाला गोष्टीतील डीएनए मिळाला .त्यामुळे इंटरेस्ट टिकून राहिला .मुसा पदभार स्वीकारतो व राणीला शोधायला जातो . तेव्हा वाचकाची एकरुपता एवढी वाढलेली असते की शत्रूला जणू काही आपणच मारतोय असा आभास होतो . मुळात गोष्टीची मूळ संकल्पना ही नवीन नाही म्हणजे "अर्धे माणसंआणिअर्धे देव ". परंतु गोष्टीची टाईम लाईन आणि इतर घटकांमुळे त्यात नावीन्य निर्माण झाले तसेच काही अंधारातील प्राण्यांची वर्णने तर त्यांच्या जवळील शक्ती यामुळे वाचताना खूप मजा आली . तर शांतता, प्रेम इत्यादी भावना यांचा सतत सतत प्रत्यय येत राहिल्याने वाचकही वरील भावनांबद्दल नक्कीच विचार करतो. चुटकी चे जग हे पुस्तक मीही वाचले आणि मी ते संपूर्ण दिवसातच संपवले. लेखकाने एका वाचकाला एका दिवसात पुस्तक पूर्ण करण्यासाठी लावलेलं वेड हेच खरे लेखकाचे यश . ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
डॉ. जयंत वडतकर.अमरावती

मेळघाटचा एन्सायक्लोपिडीया असलेले निवृत्त वनाधिकारी श्री. रविंद्र वानखडे यांच्या अनुभवांवर आधारित कुलामामाच्या देशात हे पुस्तक वाचले तेव्हापासून या पुस्तकाचे लेखक श्री. जी. बी. देशमुख यांना भेटण्याची इच्छा होती. इच्छाशक्ती असली की योग जुळून येतो असं महणतात. रविंद्र वानखडे सरांच्या माध्यमातूनच तो योग जुळून आला. माझ्या एक पुस्तकाचे प्रकाशन बाबत वानखडे सरांशी चर्चा करीत असताना त्यांनी लेखकाचा संदर्भ दिला व जी.बी. ना भेटून घ्या असे सांगितले. भेट घडून आली. अगदी सहज, घरगुती भेट झाली, गप्पा रंगल्या. यावेळी जी. बी. देशमुख यांनी त्यांचे पहिले पुस्तक महारुद्र मला भेट दिले. आमच्या चर्चेतून आणि आंतरराष्ट्रीय फुटबॉल मथला मराठमोळा झंझावात महारुद्र, हे या पुस्तकाचे शीर्षक वाचून पुस्तकाचा विषय थोडक्यात समजला. लेखकाचे वडील भीमराव देशमुख यांनी फुटबॉलपटू म्हणून गाजविलेल्या कारकीदींचा आढावा या पुस्तकात होता. एका मुलाने आपल्या वडिलांवर लिहिलेले पुस्तक कसे असेल? असा प्रश्न अन पुस्तक, दोन्ही घेऊन घरी आलो. भेट मिळालेले पुस्तक वेळ मिळाला तसे एका बैठकीत वाचून काढले. आता गल्ली गल्लीत जसं क्रिकेट खेळल्या व बघितले जाते तसं स्वातंत्र्य पुर्व काळात वऱ्हाडात फुटबॉल खेळला जात असे. गावागावांत टीम असायच्या, सामने अर्थात स्पर्धा भरवल्या जात असत. स्वातंत्र्यपूर्व काळात अशाच रुपयांमधून चमकत, वऱ्हाडाच्या ग्रामीण भागातील एका खेळाडूने थेट मुंबईतील फुटबॉल क्लब व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मुसंडी मारत आपल्या खेळाचा व व्यक्तीमत्त्वाचा ठसा उमटविला होता. तो काळ होता १९३० ते १९५० चा. त्या वल्लीचे नाव होतं भिमराव देशमुख. जी. बी. देशमुख यांनी त्यांच्या वडिलांवर लिहिलेले महारुद्र पुस्तक काही फक्त भिमराव देशमुख यांची जीवन चरित्र नाही. स्वातंत्र्य मिळण्याच्या साधारण वीस वर्षा पुर्वी ३० ते ५० च्या दशकात आपल्या देशातील खेळाची स्थिती कशी होती. विशेषतः वऱ्हाडाच्या ग्रामीण भागातील स्थिती कशी होती. कुठले खेळ खेळले जात असत. स्पर्धा कशा भरवल्या जात असत. शाळा आणि शिक्षण कसं होतं. आर्थिक स्थिती कशी होती. अमरावती जिल्ह्यातील कोणत्या गावात फुटबॉलच्या नावाजलेल्या टीम होत्या. अमरावती कशी होती याची माहिती सुद्धा या पुस्तकातून वाचायला मिळते. पुस्तकाच्या पहिल्याच प्रकरणात भीमराव यांचे व्यक्तिमत्व कसं होतं हे सांगण्यासाठी लेखकाने बाबा म्हणून जरी त्यांची ओळख करून दिली असली तरी पुढील सर्व प्रकरणातून त्यांनी भीमराव अशा एकेरी उल्लेखातून हे व्यक्तिमत्व साकारले आहे. वऱ्हाडातल्या आपल्या सवयीनुसार प्रसिद्धी पासून दूर राहिलेल्या एका नामवंत फुटबॉलपटूची कारकीर्द व फुटबॉल पश्चात कौटुंबिक कारकीर्द तटस्तपणे मांडण्यात लेखक यशस्वी झाले आहेत हे आधीच सांगून टाकतो. अमरावती जिल्ह्यातील खारतळेगाव येथील फुटबॉलच्या टीम मध्ये भीमराव देशमुख यांची कारकीर्द सुरु झाली. ती १९३० सालापासून त्यावेळी ते जेमतेम विशीत होते. प्रथम शालेय स्पर्धापासून पुढे क्लब स्पर्धा पासून भीमरावने आपल्या खेळाचा ठसा उमटविला हळूहळू ख्याती विदर्भांत पोहोचली, भीमराव यांचा खेळ बघण्यासाठी लोक खास वेळ काढून येऊ लागेल, १९३८-३९ मध्ये विदर्भात झालेल्या काही स्पर्धात मुबंईच्या काही टीम सहभागी झाल्या होत्या, त्यामुळे नावाजलेल्या ब्रिटीश खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळाली. मुंबईच्या इंग्रजांच्या टीमला वऱ्हाडातील भीमराव यांच्या टीमने हरविले. वायएमसिए, मुंबईच्या अलेक्झांडर नावाच्या कप्तानाने भीमरावच्या खेळाने प्रभावित होऊन खारतळेगावच्या चार खेळाडूंना मुंबईच्या टीम कडून खेळण्याचे निमंत्रण दिले. १९४० ला भीमराव सह चार खेळाडू मुंबईत पोहोचले. अलेक्झांडरने त्यांना सराव शिबिरीत घातले. पुढील वर्षात भीमराव वायएमसिए टीम कडून खेळण्यासाठी करारबद्ध झाले. जशा आयपीएल मध्ये आज वेगवेगळ्या टीम खेळतात तसे त्यावेळी मुंबईत फुटबॉलचे क्लब होते. पुढील १० वर्षे अनेक टीम कडून खेळत अनेक स्पर्धा गाजविल्या. भीमराव यांचेवर तेव्हाच्या इंग्रजी वृत्तपत्रांतून रकाने छापले जाऊ लागले. मुंबईतील आपल्या १२ वर्षाच्या कार्यकाळात क्लब स्पर्धामधून त्यांनी ४०० सामने खेळले, तब्बल २५० गोल मारलेत. भीमराव वेगवेगळ्या स्पर्धामधून खेळत मैदान गाजवत होते. त्यातूनच १९४८ च्या ऑलम्पिक स्पर्धेच्या टीम मध्ये निवड झाली मात्र एका सराव सामन्यात पाय फॅक्चर झाल्याने देशाकडून खेळण्याची संधी हुकली. पुढील वर्षात भीमराव हे भारतीय टीम सोबत मलेशिया, कंबोडिया, इंडोनेशिया, म्यानमार, फिलिपिन्स, हाँगकाँग, थायलंड अशा देशात खेळले, या दौऱ्यातील २० पैकी १९ सामने जिंकले. भीमराव आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू झाले होते. इतके खेळून भीमराव यांचेकडे आर्थिक नियोजन नसल्याने परिस्थिती जेमतेमच होती. अशातच १९५१ साली त्यांनी निवृत्ती घेतली. अमरावती मध्ये परत आल्यावर त्यांनी आपला संसार थाटला, आर्थिक पाठबळ नसल्याने फुटकळ व्यवसाय केले. मात्र मी कधीकाळी आंतरराष्ट्रीय खेळाडू होते याचा कधी उल्लेख सुद्धा केला नाही, प्रसिद्धी पासून ते कायमच दूर राहिले. या काळात भीमराव यांच्या पत्नी अंजीरा यांनी जबाबदारीनं संसार सांभाळला. मुलांना मोठे केले. भीमराव शेवटपर्यंत मेहनत करीत राहिले. समाजात चांगले स्थान निर्माण केले. मात्र ते इतके मोठे फुटबॉलपटू होते ते अमरावतीकरांना काही माहिती झाले नाही. भीमराव यांच्या निधनानंतर या आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूचे कार्य पुढील पिढीला माहित व्हावे या उद्देशाने जी. बी. देशमुख यांनी या पुस्तकातून आपल्या तीर्थरुपांचे भावचित्र अगदी सोप्या सरळ भाषेत शब्दबद्ध करून महारुद्र च्या रूपाने वाचकांसमोर ठेवले. या लिखाणासाठी त्यांनी मुंबईत जाऊन त्या काळातील टाईम्स वृत्तपत्रांतील भीमराव यांचा उल्लेख असलेली कात्रणे मिळविली, त्यांच्या समवेत खेळलेल्या खेळाडूंना व पत्रकारांना भेटले, अमरावती मधील त्यांच्या समवयस्क परिचितांकडून त्यांची माहिती गोळा केली. त्यासाठी त्यांनी अथक अशी मेहनत घेतली. व २००५ साली हे पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकाच्या पुढील आवृत्ती मेहता प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केल्याने ते पुस्तक महाराष्ट्रभर पोहोचले. या निमित्त्याने भीमराव यांचे कार्य, त्यांचा फुटबॉल खेळातील झंझावात मराठी माणसाला माहिती झाला. अमरावतीकर या नात्याने मला तर आपल्या मातीतील माणूस त्या काळात आंतरराष्ट्रीय पातळीवर झेंडा गाडून आल्याचा अभिमान वाटला. अशा अनेक अर्थाने महारुद्र महत्वाचे आहे. ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
सलिल तांबे

ज्यांना गोष्टींची आवड आहे अशा मुलांसाठी ही मेजवानी आहेच, पण आपल्या पाल्यांमध्ये संवेदनशीलता आणि निसर्गाप्रती आदर जोपासण्यासाठी मोठ्यांनीही हे पुस्तक वाचायला हवे. प्रदूषणाविरुद्ध लहान हातांनी दिलेला लढा असो किंवा निसर्गाचा खरा आनंद पिशवीत भरून आणण्यापक्षा मनात कसा साठवावा, हे सांगणारा दृष्टिकोन असो; हे पुस्तक प्रत्येक वाचकाला समृद्ध करते. पुस्तकातील प्रत्येक कथा संपताना आपल्याला जगण्याकडे बघण्याची एक नवी दृष्टी देऊन जाते. यातलं काही गूढ, काही थरार आणि खूप सारे हळवे प्रसंग अनुभवण्यासाठी तुम्हाला हे पुस्तक स्वतः वाचायलाच हवं. म्हणूनच, आपल्या संग्रही असावा असा हा `हाटूमुटूचा चंद्र` तुम्ही एकदा नक्की अनुभवा! चला तर मग, आपणही शोधूया आपला स्वतःचा ‘हाटूमुटूचा चंद्र’! ...Read more