* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9789391151065
  • Edition : 2
  • Publishing Year : AUGUST 2021
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 96
  • Language : MARATHI
  • Category : CHILDREN LITERATURE
  • Sub Category : PICTURE BOOKS, ACTIVITY BOOKS & LEARNING MATERIAL
Quantity
Buying Options:
  • Print Books:
CHUTAKICHA JAG IS A NOVEL BY THE AUTHOR FARUK KAZI. IT PORTRAYS THE MYSTERIOUS HAPPENINGS IN THE LIFE OF THE PROTAGONIST CHUTAKI. CHUTAKI IS A SMALL SCHOOL GOING GIRL FROM A HAPPY, LOVING FAMILY. BUT ONE DAY ONE DANGEROUS MONSTER ENTERS INTO HER LIFE. HER LIFE BECOMES MISERABLE. THIS NEW STRUGGLE IS AN EYE OPENER TRAVEL WHICH KEEPS READERS ENGAGED THROUGH THE SURPRISING EVENTS.
आपल्या अब्बूवर जीवापाड प्रेम करणारी पाच वर्षाची छोटी चुटकी अतिशय जिद्दी मुलगी आहे. ती जितकी अल्लड आहे त्याहून समजूतदार आणि सक्षम व्यक्तिमत्व म्हणून आपल्या भेटीला येते. लहान वयातही येणाऱ्या आव्हानांना, संकटाना भिडण्याची क्षमता तिच्यात असून निरागसपणा आणि सत्य ही तिची ताकद आहे. शांतता आणि प्रेम ह्या बुद्धाने दिलेल्या देणग्यांच्या साथीने जी तिचं जग सुंदर करण्याचा प्रयत्न करते. या पुस्तकातून नायिका म्हणून वाचकांसमोर आलेली चुटकी संघर्ष तर करतेच पण जिंकूनही दाखवते.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#CHUTAKICHAJAG #FARUKKAZI #CHILDRENLITERATURE #MARATHIBOOKS #ONLINEBOOKS #MEHTAPUBLISHINGHOUSE #CHILDRENSTORIES #चुटकीचंजन #फारूककाझी #बालसाहित्य #मराठीपुस्तके #मराठीकादंबरी #मेहतापब्लिशिंगहाऊस
Customer Reviews
  • Rating StarSantosh Lonvire

    मुलांना आनंद देणारं, विचार करायला संधी आणि अवकाश देणारं, कल्पकतेला पंख देणारं... मित्राचं हे अद्भूत `चुटकीचं जग` आलंय दोस्ताच्या हातात...

  • Rating Starनिमिष दौंड

    कथा ही अल्पवयीन मुलीच्या आयुष्यातील घडामोडींवर आहे .एक मासेमारी आणि जमिनीची देवता इर्डा यांची मुलगी म्हणजे ही चुटकी . लेखकांनी सुरुवातीला चुटकी ची पूर्ण पार्श्वभूमी स्पष्ट दिली तसेच लेखन करताना त्यांनी सुरुवातीच्या भागात जी वाचकाला पुढचे पुस्तक पूर्णवाचायला प्रेरणा मिळाली पाहिजे तिचा विचार करूनच लेखन केले . सुरुवातीला चुटकी चे अब्बू, बाजी आणि चुटकी यांच्यातील जग (विश्व )लेखकांनी अधोरेखित केले परंतु त्यातही त्यांनी अनेक मजेशीर प्रसंग टाकल्याने "मुसा" या पात्राबद्दलचे गुढ आणि चुटकीचा स्वभाव जाणता येतो . त्यानंतर "नूहबाबा" या पात्राची एन्ट्री होते आणि रोमांचकता वाढत जाते. नूहबाबांचे व्यक्तिमत्व, त्यांचे घर तसेच त्यांचे गूढरम्य संवाद यामुळे चुटकी जशी गोंधळते त्याचप्रमाणे वाचकही गोंधळात पडतो; मग जेव्हा चुटकीला ते अद्भुत पदक मिळतं त्यापासून खर्‍या व रोमांचक प्रवासाला सुरुवात होते. वाचकांना अजून खिळवून ठेवण्यासाठी मध्येच चुटकीला पडलेले स्वप्न खरच त्याचं काम योग्यरीत्या पार पाडतं . यानंतरचा भाग म्हणजे "मुसा" आणि महाराणी "ईर्डा" यांचा 5 वर्षांआधी चा इतिहास .लेखकांनी हा विषय अगदी योग्य वळणावर सुरु केला त्यामुळे मुसा बदद्ल च्या गूढतेचे कंटाळ्यात रूपांतर झाले नाही आणि वाचकाला गोष्टीतील डीएनए मिळाला .त्यामुळे इंटरेस्ट टिकून राहिला .मुसा पदभार स्वीकारतो व राणीला शोधायला जातो . तेव्हा वाचकाची एकरुपता एवढी वाढलेली असते की शत्रूला जणू काही आपणच मारतोय असा आभास होतो . मुळात गोष्टीची मूळ संकल्पना ही नवीन नाही म्हणजे "अर्धे माणसंआणिअर्धे देव ". परंतु गोष्टीची टाईम लाईन आणि इतर घटकांमुळे त्यात नावीन्य निर्माण झाले तसेच काही अंधारातील प्राण्यांची वर्णने तर त्यांच्या जवळील शक्ती यामुळे वाचताना खूप मजा आली . तर शांतता, प्रेम इत्यादी भावना यांचा सतत सतत प्रत्यय येत राहिल्याने वाचकही वरील भावनांबद्दल नक्कीच विचार करतो. चुटकी चे जग हे पुस्तक मीही वाचले आणि मी ते संपूर्ण दिवसातच संपवले. लेखकाने एका वाचकाला एका दिवसात पुस्तक पूर्ण करण्यासाठी लावलेलं वेड हेच खरे लेखकाचे यश . ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

वा. पां. जाधव अमरावती

`अमरावतीचे छप्पन स्वभाव एक मनोरंजक काव्यसंग्रह` `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे अमरावतीचे सुप्रसिद्ध साहित्यिक श्री जी. बी. देशमुख यांचे अमरावती नगरीचा सहज स्वभाव व ह्या नगरीच्या वेगळ्या ओळखीवर आधारित मनोरंजक पुस्तक वाचले. वाचून भरपूर मनोरंजन झाले. खर काय लिहावे या लेखकाबद्दल, मन गोंधळले. ऐतिहासिक असो, प्रवास वर्णन असो, व्यक्ती विशेष असो, अनुभवात्मक घटना घडामोडी असो कशावरही सहज लिखाण करणारा हा लेखक आहे. आता तर त्यांनी लेखनाला विनोद प्रचुर फोडणी देऊन `अमरावतीचे छप्पन स्वभाव` या काव्यसंग्रहातून अमरावतीकरांना मनोरंजनाची मेजवानीच दिली आहे. प्रत्येक शहराची व त्या शहरातील वैशिष्ट्यांची एक वेगळीच ओळख असते. दिवस जातात, काळ लोटतो, पिढ्या बदलतात मात्र जुन्या स्मृतीची चिन्हे नवीन येणाऱ्या पिढीच्या मनात गुढ निर्माण करत कायम हाक देत राहतात. अमरावतीही त्याला अपवाद नाही. बापट चौकात चौक नाही, त्या जागेवर चौरस्ता नसून टी-पॉइंट आहे, खापर्डे बगीचा म्हणून आजही ओळख आहे मात्र तेथे बगिचा नाही किंवा प्रसिद्ध गांधी चौकात गांधीचा पुतळा अथवा स्मृतीदर्शक चिन्ह अथवा उल्लेख नाही मात्र गांधी चौक अशीच ओळख जनमानसात आहे. अशा एक ना अनेक विसंगत नाम दर्शक ओळख असलेली उदाहरणे त्यात सप्रमाण आहेत. पण खरी गंमत म्हणजे कधी काळी घडलेला इतिहास त्यामध्ये दडलेला आहे हे निश्चित. या सोबतच अमरावतीकरांच्या स्वभावातला स्थायी मजेदारपणाच्या एक एका हटके गुण वैशिष्ट्याच्या गमती लेखकाने हुबेहूब अधोरेखित केलेल्या आहेत. आणि त्यावरुन तत्सम रचनांचा उहापोह लेखकाने पुस्तकात केला असावा. विदेशात स्थाईक झालेल्या मूळ अमरावतीकरांना लेखकाने लिहिलेल्या गमती मनोरंजनात्मक वाटाव्या एवढी किमया जी.बी. च्या सहज लेखनाने दाखवली आहे. अमरावतीचे अग्रगण्य वृत्तपत्र दै. हिंदुस्थान मध्ये लेखकाने सतत ६ महीणे लिहीलेल्या काव्य सदरात अमरावतीच्या जनमानसाच्या हृदयाच्या ठाव घेणाऱ्या काव्य रचनांचा आठवणींनी महापूर ओसंडून गेला होता. विशेष म्हणजे ह्यात कुठेही अनावश्यक अभिनीवेष नव्हता. उलट गमतीत केलेले आत्मपरिक्षण मात्र काही प्रमाणात होते. वयस्क अमरावतीकर रसिकांना या रचना ताज्या करून त्यांच्या तारुण्यात घेऊन गेल्या हेच खरे. जी बी देशमुख या लेखकास मिळालेल्या सकारात्मक प्रतिक्रियां वरून दिसून येते. . सदर पुस्तकातील काव्यमय रचना वाचतांना अमरावतीच्या माणसाच्या वऱ्हाडभोळ्या स्वभावाची प्रचीती येते आणि वेगळाच आनंद देऊन जाते. निखळ मनोरंजन करत गुदगुल्या करणारा असा हा काव्यसंग्रह आहे. अमरावती शहराची ऐतिहासिक वैशिष्टे काव्यरूपात वाचण्याचा आनंद अमरावतीकरांना ते जिथं असतील त्या गावात, परगावात, परदेशात पुस्तक मागवून घेता येईल. ...Read more

ज्योती चेडे, मुंबई.

अमरावतीच्या वैशिष्ट्यांवर आधारीत खुमासदार छप्पन्न कवितांच्या संग्रहातील प्रत्येक कविता वाचत असताना अमरावतीच्या वातावरणाची धुंदी आपसुकच मनावर चढु लागली. सगळ्याच कविता सुंदर आहेत. एकेक कविता अमरावतीचे अप्रतिम वर्णन करते. प्रत्येक कवितेचा शेवट कुठेतरी गंभीर विचार करायला भाग पाडतो आणि मन गलबलून जाते. सगळ्याच कविता सुंदर आहेत पण माझ्या मनाला भावलेल्या व भिडलेल्या कविता आहेत `अमरावतीतल्या गमती`, `अमरावतीचे शिक्षण`, `अमरावतीचे हजरजबाबी`, `अमरावतीचे वेडे`, `अमरावतीच्या काकू` व बाकी सगळ्या. `अमरावतीचे वेडे` या कवितेत उल्लेखीत शेवटचा अश्रुंचा एक थेंब जरुर राखला जाईल. तसेच `अमरावतीच्या काकूं` ची उर्जा उरात भरून उरेल. जीवन देणाऱ्या विहीरीने कोणाचेही जीवन घेऊ नये, अशी सद्भावना मनात जागेल. अमरावतीकर जगात कुठेही असो त्यांच्या मनात एका कोपऱ्यात राजकमल चौक असतोच हे सत्य मनावर कोरले जाईल. प्रत्येक अमरावतीकराने ह्या कविता जगाव्यात. त्यासाठी हे पुस्तक संग्रही ठेवावे आणि परगावी राहणाऱ्या आपल्या अमरावतीकर आप्तेष्टांना भेटी दाखल द्याव्या. ...Read more