* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: ELMER
  • Availability : Available
  • Translators : VRUSHALI PATWARDHAN
  • ISBN : 9788184985405
  • Edition : 1
  • Publishing Year : APRIL 2014
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 160
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : CHILDREN LITERATURE
Quantity
Buying Options:
  • Print Books:
ELMER, ELMER ANI PAHUNA ANOLKHI MITRA,ELMER ANI HARAVLELA TEDDY, ELMER ANI VARA,ELMER ANI VILBER
एल्मर, एल्मर आणि अनोळखी पाहुणा मित्र, एल्मर आणि हरवलेला टेडी, एल्मर आणि वारा, एल्मर आणि विल्बर

No Records Found
No Records Found
Keywords
Customer Reviews
  • Rating StarLOKPRABHA - 4 MAY, 2018

    एल्मरच्या आनंदी विश्वाची रंजक सफर... एल्मर हा एक हत्ती, पण अंगावर पॅचवर्क असलेला! आहे की नाही गंमत! या पॅचवर्कवाल्या हत्तीच्या गोष्टीही गमतीशीर आहेत. एल्मरच्या या मजेशीर गोष्टींची छोटेखानी पुस्तकं लहानग्यांना वेगळ्याच विश्वात घेऊन जातील. मूळ डेव्हिडमॅकी यांच्या गोष्टींचा डॉ. वृषाली पटवर्धन यांनी सुरेख अनुवाद केला आहे. ... तर हा एल्मर... पॅचवर्कवाला हत्ती... या पॅचवर्कमध्ये काळा, पिवळा, निळा, लाल, सफेद असे नानाविध रंग आहेत. तो सर्वांमध्ये उठून दिसतो तो केवळ त्याच्या या वेगळ्या शरीरामुळेच नाही तर त्याच्या आनंदी स्वभावामुळेही तो सर्वांमध्ये वेगळा आहे. स्वत:ही आनंदी राहायचं आणि दुसऱ्यालाही आनंदी ठेवायचं हाच त्याच्या जीवनाचा फंडा आहे. त्याचा स्वभावही गमत्या आहे. सतत जोक्स करून तो दुसऱ्यांना हसवतो आणि आजूबाजूचं वातावरण आनंदी ठेवतो. एल्मरच्या या गोष्टीमधून खूप काही शिकण्यासारखं आहे. माणसाने आनंदी कसं राहावं, दुसऱ्याला समजून घ्यावं, लोकांना मदत करावी... अशी एक नाही तर अनेक गोष्टी एल्मरकडून शिकता येतील अशा आहेत. कांगारूला स्पर्धेत उंच उडी मारायला एल्मर शिकवतो आणि त्याला मदत करतो. हत्तीच्या पिल्लाचं हरवलेलं टेडी शोधण्याचं कामही एल्मर अगदी मनापासून करतो. तर त्याच्याचसारखं पॅचवर्क, पण सफेद-पांढऱ्या रंगाचं असलेल्या भावाला जमिनीवर आणतो. कांगारूला स्पर्धेसाठी केलेली मदत असो, वा एल्मरचा ‘फजिती डे’ असो, की सोसाट्याच्या वाऱ्यामुळे एल्मरचं उडणं असो... एल्मरची प्रत्येक गोष्टी लहानगेच नाहीत तर मोठी मंडळीही त्याचा आनंद करतील यात शंकाच नाही. डेव्हिड मॅकी यांच्या अफलातून कल्पनांप्रमाणेच त्यांच्या चित्रांनीही या गोष्टी अधिक वाचनीय आणि वेधक झाल्या आहेत. एल्मरच्या गमती-जमती या चित्रांमधून ठळकपणे आपल्या भावविश्वाचा ठाव घेतात. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more