VIDNYAN NAVALAI (6 BOOKS) (ANTARAL, APLE PURVAJ, BHUGOL, KHAGOL,PASHU-PAKASHI ANI PRANIJAGAT) by DR.BAL PHONDKE

* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788177669725
  • Edition : 4
  • Publishing Year : JULY 2008
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 192
  • Language : MARATHI
  • Category : CHILDREN LITERATURE
  • Available in Combos :DR.BAL PHONDKE COMBO SET - 17 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Print Books:
N/A
एका उडत्या बोटीनं एका सागरी विमानाला आकाशात नेल होत. आवाजाच्या वेगापेक्षा आपण जास्त वेगाने उड्डाण करू शकतो. हौशी लोकांच्या रॉकेट बनवायच्या स्पर्धा असतात. सॅटर्न ५ या रॉकेटची उंची तीन मजली इमारतीइतकी होती. अंतराळात जवळजवळ दोन लाख टाकाऊ पदार्थांचा कचरा आहे. विश्वास नाही ना बसत? हीच तर विद्यानाची नवलाई आहे. अशा कितीतरी आश्चर्यजनक गोष्टींचा हा नजराणा म्हणजे वैज्ञानिक अलिबाबाची अदभूत गुहांच! आणि ती उघडण्यासाठी कोणाच्याही मंत्राची आवश्यकता नाही. फक्त हि पान उलटा आणि हवी तितकी रत्न लुटा.

No Records Found
No Records Found
Keywords
Customer Reviews
  • Rating StarNEWS PAPER REVIEW

    प्रसिद्ध मानसशास्त्र डॉ. सिम्मंड फ्रॉइड याने माणसाच्या मनाचे प्रकट मन व अप्रकट मन असे कप्पे दर्शवून त्याच्या मनाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि मग माणसाच्या मनाच्या तळघरातील अनेक गूढ, विसंगत, चमत्कारिक विचार विकार व वर्तन यांचा परस्पर संबंध जोडण्याचही प्रयत्न होऊ लागला. माणूस स्वत:शी संवाद साधू लागला तर मनाच्या अंतराळातील चक्राकार फिरत असलेल्या अनेक आश्चर्यकारक गोष्टींचा कार्यकारणभाव तो स्वत:च लावू शकतो. वर्षानुवर्षे मनात जपलेली रहस्ये उलगडून दाखवावी, अशी उर्मी येते. ‘अंतराळ’ कादंबरी म्हणजे मनाच्या अशाच एका अवस्थेत प्रथमपुरुषी निवेदनातून केलेले अंतर्मनाचे प्रगटीकरण. कादंबरीची सुरुवात वर्तमानातली. निवेदक आत्म्याशी संवाद साधत पन्नास वर्षांच्या आयुष्यातले अनुभव सांगतो. या आत्मनिवेदनात सर्वसामान्य माणसाच्या जीवनातील घटना, समस्या, संघर्ष आहे. कादंबरीचा कालखंड हा स्वातंत्र्यप्राप्तीनंतरचा व सरंजामशाहीचा सरता कालखंड. राजकीय सत्तांतरामुळे काळानुरूप होणारे समाजव्यवस्थेतील बदलांचे उल्लेख कादंबरीत येतात. यातील राणे कुटुंब म्हणजे सरंजामशाही व्यवस्थेचा नमुना. या सरंजामशाहीच्या खुणा, पिढ्यान्पिढ्या रक्तात भिनलेली वैशिष्टये, गुण-अवगुण हे प्रसंग, घटना, संवाद यातून व्यक्त होत राहते. नीतिअनीतीचे मापदंड सरंजामशाहीला लागू नसतात, असे अभिमानाने व धाष्र्टयाने सांगणारा तरुण आजच्या तरुण पिढीच्या बेताल वर्तनावर कोरडे ओढतो हा केवढा विरोधाभास! कादंबरीलेखनाचा उद्देश आत्मनिवेदनाचा आहे पण यात केवळ व्यक्तिगत, कौटुंबिक जीवनाचा पट नाही. त्यास राजकीय स्थित्यंतराची, तत्कालीन परिस्थितीची पाश्र्वभूमी आहे. गांधी-नेहरूंच्या विचारांचा जबरदस्त पगडा असलेली पिढी व नंतरची ध्येयशून्य, तत्त्वशून्य, चंगळवादास बळी पडत चाललेली तरुण पिढी यांच्यातील वैचारिक मतभेद, संघर्ष हे सारे केवळ निवेदनाच्या पातळीवर न राहता परिणामकारक ठरते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरचे देशातले अनिश्चिततेचे वातावरण, औद्योगिकीकरण, दुष्ट प्रवृत्तींचा प्रादुर्भाव, भ्रष्टाचार यांचा कोवळ्या पिढीवर होणारा परिणाम, आदर्शवाद, उच्च नीतिमूल्ये व निराशा, किळसवाणी स्पर्धा, वशिलेबाजी, हिंसाचार, जातीयता, तत्त्वांची पायमल्ली आधोरेखित होतो. गांधीयुगातील पात्रे, त्यांच्या वेदना परिस्थितीशी तडजोड करण्यातली अगतिकता या वास्तवातली दाहकता वाचकांच्या हृदयापर्यंत पोहोचते. कारण ही निव्वळ टीका नाही. कृतिशीलता पिढीच्या अंत:करणाची ही तळमळ आहे. प्रस्तुत कादंबरीतील पुजारी मास्तरांचे पात्र स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर भारताचे चित्र डोळ्यासमोर उभे करते. या पिढीचा मानसिक संघर्ष, तुटलेपण, निराशावाद मास्तरांच्या भावनांच्या उद्रेकातून व्यक्त होते. राजकीय व सामाजिक परिस्थितीवर मास्तर कोरडे ओढतात. ‘‘आजची तरुण पिढी मरण्याआधीच वृद्धांना मारून टाकते,’’ या शब्दात वृद्धांची कालची, आजची व उद्याची समस्या तीव्रतेने मांडली जाते, अशा पिचल्या गेलेल्या पिढीचा संताप ‘गोरी साम्राज्यशाही जाऊन गहूवर्णी साम्राज्यशाही आली,’ अशा शब्दात व्यक्त होतो. गांधीजीसारख्या युगपुरुषाच्या अस्तानंतर त्यांची तत्त्वेही काळाच्या ओघात वाहून जातात हे कठोर वास्तव स्वीकारणे भाग पडते. कादंबरीत येणारे सामाजिक संदर्भ त्यांचे अवलोकन वर्ण धर्माधिष्ठित समाजातील दोन भिन्न संस्कृतीतले अंतर यांचे चित्रण आहे. सरंजामशाही म्हणजे मुक्त वर्तनास मिळालेला परवाना अशी पारंपरिक, बेछूट मनोवृत्ती, तरुण पिढीचे अनिर्बंध स्वातंत्र्य, शिस्तीचा अभाव तर दुसरीकडे पारंपरिक रुढीरीतीरिवाजांशी घट्ट पाळेमुळे असलेली महत्त्वाकांक्षी ब्राह्मणी संस्कृती यांचे चित्रण निवेदक करतो. स्वत:च्या कुळाबद्दलचा अभिमान व्यक्त करताना ब्राह्मणी संस्कृतीवर उपहास गर्भ टीकाही करतो. भौतिक सुखसोयीविषयी वाटते आकर्षण, नैतिक अध:पतन, बदलती नीतीमूल्ये यांचा तरुण पिढीच्या आचारविचारांवर होणारा परिणाम व त्यामुळे निर्माण होणारा कौटुंबिक व सामाजिक स्तरावरील संघर्ष घटनांच्या माध्यमातून चित्रित केला जातो. निवेदक व सरंजामशाहीतील शेवटचा शिलेदार सरंजामशाहीच्या अस्ताची झळा त्यासही लागलेली आढळते. एकीकडे या संस्कृतीच्या प्रभावाखालील असलेले त्याचे व्यक्तिमत्त्व तर दुसरीकडे पुआरे मास्तरांचा, माक्र्सवाद वगैरे सुधारणावाद्यांचा प्रभाव असलेले व्यक्तिमत्त्व यामुळे दुहेरीपण जाणवते. स्वभावत: असलेली पराकोटीची संवेदनशीलता झोवूâन देण्याची वृत्ती यामुळे त्याच्या विचारात नैतिक गोंधळलेपण आहे. ‘मी प्रामुख्याने बुद्धजीवी नाही. बुद्धीच्या पातळीवर जगत नाही. संवेदनाच्या पातळीवर जगतो. या निवेदनातून तो ‘स्व’चा शोध घेत आहे, असे दिसते. म्हणून भावनाप्रधानतेमुळे ब्राह्मण मुलीशी प्रेमलग्न करतो पण त्याच्या विचारात परिपक्वता नसल्याने झोवूâन देण्याच्या वृत्तीतून प्रौढपणीही स्त्रीविषयक अनावर आकर्षणातून आवेगाने ओढला जातो. शरीर पातळीवर प्रेम, आकर्षण, तारुण्यातील कोमल भावनांना आवाहन करून निर्माण झालेले प्रेम व प्रौढ वयातील आवेगाने केलेले प्रेम अशा प्रेमाच्या विविध अवस्था, छटा, रंग यांचे अनुभव धिटाईने व्यक्त केले आहेत. व्यक्तिस्वातंत्र्याची चाहूल व भविष्यातील उद्रेक तरुण पिढीच्या विशेषत: निवेदक व नंद्या (भिन्न) यांच्या संवादातून जाणवते. निवेदनाच्या भात्यास कधी कधी सार्वकालिक परिमाण लाभतं. मूल्य बदलत असताना चर्चेला वाव नसतो. वेगवेगळ्या मूल्यांचं घर्षण सुरु झालं की, तिथं तडजोड अशक्य असते. त्यावेळी मौन हाच उत्तम मार्ग असतो. एकाच व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू येथे पाहावयास मिळतात. पाश्चात्य विचारसरणीच्या प्रभावातून व्यक्तिवादाचा उदय व वर्णधर्माधिष्ठित समाजास छेद देऊन निर्मितीचे स्वप्न बघणे, शोषण करणाऱ्या व्यक्ति व व्यवस्था नष्ट झाल्या पाहिजेत या माक्र्सवादी विचारांचा प्रभाव असे हे अनेक रंगी व्यक्तिमत्त्व, आदर्शवाद, तंगळवाद, भोगवाद यांच्या गोंधळात सापडलेले त्याचे विचार आहेत. त्यात अपरिपक्वता आहे असेच दिसून येते. ‘आपण हिंदू ना! आपल्याला जगाविषयी आस्थाच नाही’ आपल्याला आस्था पुढच्या जन्माची विंâवा मोक्षाची! अशा शब्दात हिंदू धर्म तत्त्वज्ञानावर उपहासगर्भ टीका तो करतो. आपल्या लेखनाचा हेतू मांडताना ‘‘हा मीपणाचा शोध नाही, त्याहीपेक्षा मी ते सेलिब्रेट करीत आहे. पन्नास वर्षांच्या जीवनाचा एका दृष्टीने ऊहापोह करायचा आहे.’’ माणसातील पराकोटीच्या संवेदनशीलतेमुळे एखाद्या धक्कादायक घटनेचा खास परिणाम होऊन त्या माणसाचा मानसिक तोल ढळू शकतो. कणखर व्यक्तिमत्त्व नसल्यास ही शक्यता अधिक असते यास मानसशास्त्राचा आधार आहे. अशाच एका अत्यंत भावनाप्रधान, अतिसंवेदनशील, आदर्शवादी, चंगळवादी अशा रसायनांनी घडलेल्या व्यक्तिचे हे आत्मनिवेदन या आत्मनिवेदनाला अभिनिवेश नाही पण उत्कट भावनांचे प्रगटीकरण आहे. एक प्रकारचा कबुलीजबाब आहे. प्रौढ वयातही एका स्त्रीमुळे मानसिक तोल ढळू शकणाऱ्या दुबळ्या व्यक्तिचा आत्मशोधही आहे. याच स्वभावविशेषांचा वारसा घेऊन चौकटीबाहेर पाऊल टाकण्याचा वेडेपणा करणाऱ्या आपल्या लेकीला सावध करणाऱ्या वत्सल पित्याचा हा इशाराही असेल. म्हणून लेखकाच्या समर्थ लेखणीतून उतरलेले हे निवेदन वाचकांच्या मनाच्या अंतराळात एक आवर्त निर्माण करते. अनेक विषयांना स्पर्श करून जाणारी ही कादंबरी एका सामान्याचे आत्मप्रगटीकरण असूनही व्यक्तिकेंद्री नाही. त्यास सामाजिक, राजकीय संदर्भ आहेत. या सर्व परिस्थितीत, प्रभावात घडलेल्या एका व्यक्तीची ही जीवन कहाणी तर आहेच पण त्याच्या मनाचा प्रवासही आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

ANUWADATUN ANUSARJANAKADE
ANUWADATUN ANUSARJANAKADE by LEENA SOHONI Rating Star
कौशिक लेले

पुस्तक – अनुवादातून अनुसर्जनाकडे (Anuwadatun Anusarjanakade) लेखिका – लीना सोहोनी (Leena Sohoni) भाषा – मराठी पाने – २३९ प्रकाशन – मेहता पब्लिशिंग हाऊस. फेब २०२४ छापील किंमत – रु. ३७०/- ISBN – 9789357205337 ह्या परिचयाची माझी वेबसाईट लिंक htps://learnmarathiwithkaushik.com/courses/anuwadatun-anusarjanakade/ मराठी पुस्तकांमध्ये सध्या इतर भाषांतून अनुवादित झालेली पुस्तके सुद्धा मोठ्या संख्येने दिसतात. एखादा सरस अनुवाद वाचताना आपल्या डोक्यात सुद्धा आपल्या आवडीच्या परभाषेतल्या पुस्तकांची यादी तयार होते. ही पुस्तकं सुद्धा मराठीत आली तर काय मजा येईल असं वाटतं. भाषा हा ज्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे त्यांची इच्छा एक पुढचं पाऊल टाकेल. आपणही स्वतः असा अनुवाद केला तर ? आपल्यालाही दोन्ही भाषा चांगल्या येत आहेत मग अनुवाद का करू नये ? हे पिल्लू डोक्यात शिरेलच. असा अनुवाद करायचा स्वतः काही प्रयत्न केला की लक्षात येईल की हे किती किचकट काम आहे. चांगला अनुवाद करायचा असेल तर सराव लागेल. अभ्यास लागेल. त्याची काही तंत्र मंत्र शिकून घ्यावी लागतील. एखाद्या चांगल्या जाणकार व्यक्तीचं, अनुभवी व्यक्तीचं मार्गदर्शनही मिळायला हवं. जर तुमच्याही मनात अशा भावना आल्या असतील तर लीना सोहोनी यांचं “अनुवादाकडून अनुसर्जनाकडे” हे पुस्तक तुम्हाला नक्की आवडेल. लीना सोहोनी हे नाव मराठीत अनुवादिका म्हणून प्रसिद्ध आहे. आत्तापर्यंत त्यांनी अनुवाद केलेली पन्नासच्यावर पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचा अनुभव व अधिकार वेगळा सांगायला नको. त्यांचे हे पुस्तक "अनुवादातून अनुसर्जनाकडे" पुस्तकाचा पहिला भागात लीना सोनी यांनी आपल्या अनुवादाच्या प्रवासाचं सिंहावलोकन केलं आहे. त्यांनी अनुवादाची सुरुवात कशी केली, त्यात प्रगती कशी झाली हे लिहिलं आहे. अनुवादामुळे प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर, सुधा मूर्ती, किरण बेदी यांच्याशी जुळलेले संबंध आणि त्यांच्या भेटीची वर्णनं आहेत. ह्या प्रवासात “मेहता पब्लिशिंग हाऊस” या प्रकाशन संस्थेचा भरभक्कम पाठिंबा त्यांना मिळाला. सुनील मेहता आणि अनिल मेहता यांच्याबरोबरच्या आठवणी सुद्धा पुस्तकात आहेत. पुढच्या भागात अनुवाद या विषयाची एखाद्या शास्त्रीय शोधनिबंधाप्रमाणे माहिती दिलेली आहे. यात अनुवाद प्रक्रियेकडे अतिशय बारकाईने बघितलं आहे. ढोबळमानाने बघितलं तर, अनुवाद म्हणजे तर एका भाषेतल्या शब्दांच्या ऐवजी दुसऱ्या भाषेतले शब्द वापरणे. पण प्रत्येक वेळी एका शब्दाच्या बदल्यात दुसरा भाषेतला एक शब्द असं होतंच असं नाही. त्यामुळे काही वेळा शब्दाची फोड करून दाखवावी लागते. तर काही वेळा मूळ मोठं वाक्य लहान होऊ शकतं. कदाचित तिथे पूर्णपणे वेगळीच शब्दयोजना वाक्यरचना होऊ शकते. या प्रत्येक प्रकाराला एक विशिष्ट शास्त्रीय नाव (पारिभाषिक संज्ञा) आहे हे आपल्याला पुस्तक वाचून कळतं. जे शब्दांच्या बाबतीत तेच वाक्यांच्या बाबतीत. मूळ भाषेतल्या शब्दांसाठी नवीन शब्द वापरून वाक्य तयार झालं तरी ते वाचकाला सहज वाटलं पाहिजे. नाहीतर आपण लगेच म्हणू, “अनुवाद खूप बोजड झाला आहे; ठोकळेबाज झाला आहे”. हे टाळायचं तर वाक्यरचना सुद्धा सुधारायला पाहिजे. याची उदाहरणे पुस्तकात दिली आहेत आणि त्या अनुषंगाने पारिभाषिक संज्ञा (terminology) काय आहे हे मराठी आणि इंग्रजी दोन्हीत दिलं आहे. शब्द, वाक्य ह्यांना लावलेल्या कसोटीचा विस्तार करून ती कसोटी “संकल्पनां”ना लावायला पाहिजे. एखाद्या भाषेत, एखाद्या समाजात असणाऱ्या संकल्पना, प्रथा-परंपरा मराठी भाषेत नसतील तर अनुवाद करताना ते जसंच्या तसं ठेवायचं का तिथे काही वेगळी संकल्पना वापरायची ? का तळ टीप देऊन स्पष्टीकरण द्यायचं? असे एकाच गोष्टीकडे बघण्याचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. हा मुद्दा आपण सोदाहरण स्पष्ट केला आहे. हा ऊहापोह वाचल्यासार अनुवादासाठी दोन्ही भाषांवर आपली किती चांगली पकड पाहिजे हे वाचकाच्या लक्षात येईल. त्याचबरोबर जे पुस्तक आपण वाचतोय त्याची पार्श्वभूमी, त्यातल्या प्रसंगाची सामाजिक पार्श्वभूमी, आणि लेखकाला काय ध्वनीत करायचे आहे हे सगळं समजणं सुद्धा किती महत्त्वाचं हे लक्षात येईल. म्हणजे अनुवाद प्रक्रिया दिसताना शब्दांची दिसली तरी “शब्दांच्या पलीकडले” अनुवादकाला पकडता आले तरच मूळ कृतीला न्याय मिळेल. हे या पुस्तकाच्या वाचनातून अधोरेखित होतं. पुस्तकाचा प्रकारानुसार अनुवादकासमोर असणारी आव्हाने सुद्धा बदलतात. कथा-कादंबरीचा अनुवाद वेगळा तर कवितेचा अनुवाद वेगळा. कारण कवितेमध्ये भावभावनांना महत्त्व आहे तितकेच महत्त्व शब्द, लय, शब्दचमत्कृती यांनाही आहे. म्हणूनच तर ते पद्य आहे गद्य नाही. लीनाजींनी ह्याचाही परामर्श घेतला आहे. नाटकाचा अनुवाद करताना येणारी आव्हाने अजून वेगळी. परिणामकारक संवाद, नेपथ्य, पात्रांची देहबोली, त्याचा प्रेक्षकांवर होणारा परिणाम या सगळ्याचा विचार करून अनुवाद करावा लागतो. म्हणूनच, अनुवाद म्हणजे प्रत्येक वेळी “शंभर टक्के पुस्तक जसेच्या तसे” असं नसतं. तर काही वेळा ते रूपांतर ठरतं. काही वेळा तो स्वैर अनुवाद ठरतो. तर काही वेळा मूळ कलाकृतीवर आधारित नवीन कलाकृती ठरते. हे सुद्धा कितीतरी उदाहरणे देऊन स्पष्ट केले आहे. हे सगळे मुद्दे एकमेकांशी निगडित आहेत त्यामुळे पुस्तकात बऱ्याच वेळा मुद्द्यांची पुनरावृत्ती झाली आहे असं मला वाटलं. ती पुनरुक्ती टाळून कदाचित थोडी पानं कमी करता आली असती. पण मुद्दा वाचकाच्या मनावर ठसावा, कुठलंही विशिष्ट प्रकरण वाचायला घेतले तरी ते त्या मुद्द्यापुरतं पूर्ण असावं हा त्यामागचा हेतू असेल. पुस्तकात पुढे अनुवादकांना नोकरी, व्यवसायाच्या काय संधी आहेत; कुठल्या संस्था याबद्दलचं शिक्षण देतात; कुठले कोर्सेस उपलब्ध आहेत याबद्दलचा तपशील आहे. अनुवाद करायला सुरुवात करायची असेल तर मजकूरनिवड, प्रकाशकांशी संपर्क, परवानगी ह्याचे मार्गदर्शन आहे. त्यांनतर शाळेत आपण जे प्राथमिक व्याकरण शिकतो; म्हणजे कर्ता, कर्म, क्रियापद, ॲक्टिव-पॅसिव्ह व्हॉइस, वेगवेगळे काळ इत्यादींच्या व्याख्या देऊन सगळ्याची उजळणी केली आहे. ज्याला अनुवाद क्षेत्रात उतरायचे आहे त्याला व्याकरणाचा अजून बराच अभ्यास करावा लागणारच आहे. आणि पुस्तकाचा उद्देश व्याकरण शिकवणं नाही तर अनुवादकासाठी व्याकरण अत्यावश्यक आहे हे ठसवणं आहे. त्यामुळे व्याकरणाचा भाग पुस्तकात नसता तरी चालला असता असं मला वाटलं. पुस्तकातील काही पाने वर दिलेल्या लिंकवर शेअर केली आहेत. म्हणजे तुम्हाला पुस्तकाची, लेखनशैलीची अजून चांगली कल्पना येईल. त्यात पुढील मुद्द्यांबद्दलची पाने आहेत १) अनुवादिका म्हणून येणारे कटुगोड अनुभव. २) प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर ह्यांच्या पुस्तकांचा मराठी अनुवाद लीनाजींनी केला आहे. त्यातून जेफ्री आर्चर ह्यांच्याशी भेटीगाठी झाल्या त्यातला एक प्रसंग. ३) अनुवादाचे वर्गीकरण/प्रकार सांगणाऱ्या प्रकरणातली दोन पाने. अनुवाद प्रक्रियेची किती बारकाईने तांत्रिक चिकित्सा केली आहे हे लक्षात येईल. ४) नाटकाचा अनुवाद करताना येणारी आव्हाने ह्याबद्दलच्या प्रकरणातली दोन पाने. लीना सोहोनींचे आत्मकथन असणारा पुस्तकाचा पहिला भाग सर्व वाचकांना वाचायला आवडेलच. पुस्तकाचा दुसरा भाग तांत्रिक आहे. तो सर्वसामान्य वाचकाला वाचायला आवडेलच असं नाही. पण तो वाचल्यावर अनुवादक म्हणून काम करताना किती कटकटी असतात, काय व्यवधानं सांभाळावी लागतात हे वाचकाच्या लक्षात येईल. त्यातून अनुवादकांकडे व त्यांच्या कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन अजून कौतुकाचा आणि कृतज्ञतेचा होईल हे निश्चित. ज्यांना अनुवाद करायचा आहे, या क्षेत्रात शिरायचं आहे किंवा तशी उमेदवारी सुरू झाली आहे त्यांना हा भाग मार्गदर्शक ठरेल. जाण वाढवेल हे नक्की. त्यामुळे या पुस्तकाच्या वाचनातून अनुवादाचा किडा काही वाचकांच्या डोक्यात गेला आणि त्यातून नवे अनुवादक मराठीत निर्माण झाले तर ते सोन्याहून पिवळे ! मराठीत कथा,कादंबऱ्या, चरित्र, सामाजिक विषयांची चर्चा ह्या पद्धतीचे लेखन भरपूर होत असतं. पण ह्या पुस्तकाप्रमाणे शास्त्रीय/तांत्रिक चिकित्सा करणारी, गंभीरपणे शिकवणारी पुस्तकं कमी दिसतात. ती प्रकाशित झाली तरी ती क्रमिक पाठ्यपुस्तक किंवा “अभ्यासाचे पुस्तक” या प्रकारात ढकलली जातात आणि दुर्लक्षित होतात. पण या पुस्तकाच्या लेखिका आणि प्रकाशक यांनी हे पुस्तक मुख्यधारेतल्या पुस्तकाप्रमाणे सादर केलं आहे. त्यातून हे पुस्तक जास्त वाचलं जाईल; जास्त लोकांना विचार प्रवृत्त करेल असं मला वाटतं. अशा प्रकारची पुस्तकं मराठीत प्रकाशित होणे हे मराठी भाषेला ज्ञानभाषा करण्यासाठी मोठे योगदान आहे. त्याबद्दल प्रकाशक आणि लेखिका दोघांचेही एक मराठी भाषा प्रेमी म्हणून मी मनापासून आभार मानतो. —————————— मी दिलेली पुस्तक श्रेणी —————————— अनुवाद करणारे असाल किंवा करायची इच्छा असेल तर आवा ( आवर्जून वाचा ) इतरांनी जवा ( जमल्यास वाचा ) ——————————— आवा ( आवर्जून वाचा ) जवा ( जमल्यास वाचा ) वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक ) नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक ) ...Read more

OMKARACHI REKH JANA
OMKARACHI REKH JANA by MANJUSHRI GOKHALE Rating Star
सौ. जस्मिन जोगळेकर

आमच्या पुस्तकप्रेमी समुहावरचा एकही दिवसाचा खंड न पडता सलग 1730 वा पुस्तक परिचय पुस्तक प्रेमी समूह,पुस्तक परिचय अभियान: एकही दिवस खंड पडू न देता पुस्तकांचा परिचय हे पुस्तकप्रेमी समूहाचे यश ! पुस्तक सत्र:- ३ सप्ताह क्रमांक:- २४८ पुस्तक क्रमांक: १७३० दिनांक: १०/०३/२०२५ पुस्तकाचे नांव:- ओंकाराची रेख जना लेखक:- मंजुश्री गोखले पहिली आवृत्ती: फेब्रुवारी २०१२ पृष्ठ संख्या : ३०८ मूल्य: रु. ३२० प्रकाशन: मेहता पब्लिशिंग हाऊस परिचयकर्ती: सौ. जस्मिन जोगळेकर एखाद्या गोष्टीसाठी वेळ यावी लागते म्हणतात, तसं काहीसं झालं माझं. खरंतर पुस्तक वाचनाच्या बाबतीत असं व्हायला नको होतं पण झालं. `हे खूप सुंदर पुस्तक आहे, तुम्ही वाचाच` म्हणून एक पुस्तक आमच्या हाती आलं. अर्थात ज्यांनी सांगितलं त्यांनी त्यांच्या संग्रहातलं पुस्तक दिलं होतं. तसं बरेच दिवस होतं आमच्याकडे. नवऱ्याने वाचून खूपच सुंदर आहे, वाच नक्की सांगितलं देखील मला. पण पुस्तक परत द्यायची वेळ आली तरी वाचलं गेलं नाही. तरी ते नाव डोक्यात फिट बसलं होतं. अखेर एक दिवस ते एकच पुस्तक नव्हे तर त्याच लेखिकेची चार पुस्तकं विकतच घेऊन आले आणि मग ती वेळ आली…. त्या पुस्तकाच्या, पुस्तकातील भाषेच्या आणि त्या लेखिकेच्या प्रेमात पडण्याची. पुस्तक होतं…मंजुश्री गोखले यांनी संत जनाबाईंवर लिहिलेलं `ओंकाराची रेख जना`. `विठू माझा लेकुरवाळा`, `धरिला पंढरीचा चोर` अशा अभंग रचनेतून जनाबाई आपल्या ओळखीच्या आहेत. किंवा विठूराया त्यांना हर कामात मदत करत असतो वगैरे माहीत आहे. पण त्यांचं संपूर्ण चरित्र सगळ्यांना माहीत असेलच असं नाही. ते माहीत करून देण्याचं सुरेख काम या कादंबरीने केलं आहे. जनाबाईंच्या जन्मापूर्वीची आणि नंतरचीही त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती, छोट्या जनाला मागे ठेऊन दुखण्याने तिला सोडून गेलेली तिची आई, त्यानंतरची बिकट वेळ याचं वर्णन वाचताना डोळ्यातलं पाणी थांबत नाही. पुढेही काही प्रसंग असे आहेत…भागाबाईचं वागणं असेल किंवा सुळावर चढवायचा प्रसंग असेल… डोळ्यात पाणी येतच राहतं. पण एवढं होऊनही त्यांची पंढरीरायावरची भक्ती मात्र गाढ होती. जनाईसुध्दा त्याला पाहायला आतुर होती. सोसले चटके l पोटी नाही घास l विठ्ठलाची आस l जनाईला ll भेटीसाठी त्याच्या l गोळा तनमन l धाडे आवतान l विठूराया ll अखेर विठुरायाकडून आमंत्रण आल्यावर बापलेक पंढरीची वाट चालू लागतात. काळया देवाला पाहायला आसुसलेली जना आणि लेकीला कायमचं परक्या घरी सोडून यायचं या विचाराने जडावलेला दमा… नशिबाची रेख l भिवरेच्या काठी l विठूराया ओढी l जनाईची ll दोघांचा प्रवास विठ्ठलाच्या विश्वासावर सुरू होतो. पुढं जनाईला दामाशेटींच्या घरी सोडून देणं, त्या घराने जनाला आपलंच म्हणणं, नामदेवांसोबत तिचं मोठं होणं अशा कितीतरी प्रसंगांनी सुखावून जायला होतं. तेव्हाची सामाजिक परिस्थिती, जनाचं अतिशूद्र असणं आणि त्यातून स्त्री असणं…त्यासाठी तिला झेलावे लागणारे त्रास, संत म्हणून मोठेपण मिळाल्यावरही त्यांच्यावर आलेला चोरीचा आळ… त्रास होतो वाचताना. जनाची आणि विठ्ठलाची पहिली भेट आणि तिथून त्यांच्यात दृढ होत जाणारे नाते…वाचताना शहारून जायला होतं. जना ते संत जनाबाई हा प्रवास, त्यात जनाबाईंनी रचलेले अभंग, ज्ञानदेवादि भावंडांचा सहवास आणि मुख्य म्हणजे नामदेव आणि जनाबाई यांचे नाते… गुरू शिष्य ऐसी l जोडी कौतुकाची l जनी नामयाची l संतांमधे ll याबद्दल पुस्तकात आलेले उल्लेख मन लावून वाचण्यासारखे आहेत. विठ्ठलाच्या चरणी झालेला जनाबाईंच्या जीवनाचा शेवट म्हणजे तर 🙏 वृंदा कोमेजली l स्तब्ध वारा पाणी l ओघळले मणी l मंजिऱ्यांचे ll थरारली वीट l कंप राऊळाला l श्वास ओलावला l क्षणभर ll आज नाही घाई l विठोबाला काही l जनाईच येई l चरणाशी ll शांता शेळके यांनी अनुवाद केलेलं `चौघीजणी` जसं मनात कायमचं घर करुन बसलं आहे, त्या जोडीला आता `ओंकाराची रेख जना` हे ही अत्यंत आवडीचं झालं आहे. यापूर्वी संत साहित्य किंवा संतांवर लिहिलेलं साहित्य फारसं वाचलं नव्हतं. लताजी किंवा भीमसेनजींमुळे घराघरात पोहोचलेले अभंग तेवढे माहीत होते. त्यामुळं जनाबाईंवर लिहिलेल्या या पुस्तकाबाबत उत्सुकता होतीच. पहिल्या प्रकरणाच्या अगदी पहिल्या ओळीपासून या पुस्तकाशी जी बांधली गेले ते शेवटपर्यंत. पुस्तकातील सगळं वर्णन अगदी बारीक सारीक तपशील देऊन पुढं जात राहतं आणि त्यात आपल्याला गुंतवून ठेवतं. सुरुवातीची काही प्रकरणं तर डोळ्यात अश्रुंच्या धारा घेऊन, पुसट अक्षरं समोर ठेऊन वाचावी लागतात. प्रसंग सगळे l तपशिलासवे l डोळ्यात आसवे l वाचुनिया ll भाषा ही साजिरी l सत्य हेच वाटे l प्रसंग तो घडे l आसपास ll एकूणच पुस्तकातलं वर्णन इतकं जिवंत आहे की सगळे प्रसंग आपल्या आसपास घडताहेत असंच वाटत राहतं कायम. दमा - कुरुंडचं दुर्दैवी आयुष्य, पोटी मूल नसल्याचं त्यांचं दुःख, विठ्ठलाला त्यासाठी साकडं घालण्यासाठी त्यांनी केलेला पंढरपूरचा प्रवास असो किंवा जनाबाईंच्या खोलीत येऊन विठ्ठलाने त्यांच्याशी मारलेल्या गप्पा, त्यांना कामात केलेली मदत…. सगळे अगदी सगळे प्रसंग आपणच जगतोय असं वाटावेत इतके मनाला भिडून जातात. काही ठिकाणं तर अशी… `अरे विठ्ठला, गडबडीत भलतंच काय उचलतोस. तुझा रत्नहार आणि शेला तर घेऊन जा`...असं आपणच विठ्ठलाला हाक मारून सांगावं असं वाटायला लागतं वाचताना. भाषा, वर्णनशैली फार साजिरी आहे. पुस्तकातला `साजिरी` हा शब्द एकदम आवडून गेलाय. एखादा चेहरा पाहिल्यावर कसं आपल्याला कळून जातं ना की, ही व्यक्ती मायाळू आहे किंवा तुसडी आहे वगैरे…तसं पुस्तकाच्या सुरुवातीलाच यातल्या भाषेबद्दल आपुलकी, प्रेम वाटायला लागतं. भाषा साधी पण सुंदर, शब्दांचा वापर असा की यापेक्षा वेगळा शब्द इथं शोभला नसता असं वाटायला लागेल असा. अनवाणी पायाला चटके बसावेत इतकं हवामान अजून बदललं नव्हतं…यासाठी `अजून मातीने माया सोडली नव्हती`... किती सुरेख वाक्य आहे ना! अशी कितीतरी वाक्य आपल्याला त्यांच्या प्रेमात पाडायला लावणारी यात सापडतील. एकूणच सांगायचं झालं तर पुस्तक अप्रतिम आणि सगळ्यांनी आवर्जून वाचावं असंच आहे. एकाच लेखकाची पुस्तकं सलग एका मागोमाग एक अशी माझ्याकडून वाचली जात नाहीत. पण आता खुणावतंय ते… `जोहार मायबाप जोहार`. ...Read more