* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9789357208154
  • Edition : 2
  • Publishing Year : AUGUST 1978
  • Weight : 130.00 gms
  • Pages : 136
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :MAHADEV MORE COMBO SET - 27 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
`THE CHARACTERS IN THE STORIES `CHINDHI`, `PUTALI`, `DAU`, `VASANA`, `MADHOSINHA`, `EK HASYA ANI EK KHOON` IN THE COLLECTION OF STORIES -`THRILLS` WRITTEN BY MAHADEV MORE BEHAVE IN AN INHUMAN WAY AND INSTIGATE PEOPLE OF THE SOCIETY AS WELL. SOME OF THEM ENDURE SUFFERING AND INJUSTICE, WHILE OTHERS RESORT TO VIOLENCE TO HANDLE THE SITUATION. `PUTALI`, A POOR DANCER, LEADS A LIFE OF STRUGGLE BY CARRYING A GUN, KILLING AND ROBBING. THE LAWYER IN `RAHASYA` IS RIDDLED BY HIS CLIENT-MRS. NEELA DESHPANDE. INSTEAD OF SOLVING HER MYSTERIOUS CONFUSION, MR.LAWYER GETS ENTANGLED IN IT HIMSELF. IN THE STORY `SOOD`, LAKHANSINGH, RAGHUVEER SINGH AND SUBASINGH, DESTROY THEIR LIVES DUE TO MUTUAL DIFFERENCES AND REVENGE. JASPAL SINGH FROM A PUNJABI FAMILY DIES IN ‘NIYATI ANI NYAY’.SO WHO IS THE MURDERER- JASPAL`S BROTHER-IN-LAW-MAHENDRA SINGH OR- PALWINDER KAUR? THIS MYSTERY CONTINUES TO HAUNT. “ AANIBANITIL GOSHTA” IS THE STORY OF FRAUDSTER PREMSHANKAR. HE PRETENDS TO BE A FAKE GOVERNMENT OFFICIAL, SPEAKS ENGLISH AND EVERYONE IS STUNNED TO SEE THE SCAM HE CREATES. THUS, MAHADEV MORE`S STORIES PORTRAY THRILL ANDMYSTERY IN REAL LIFE WITH PASSION.
महादेव मोरे लिखित ‘थ्रिल्स’ या कथासंग्रहातील ‘चिंधी’, ‘पुतळी’,‘दाऊ’, ‘वासना’,‘माधोसिंह’,‘एक हास्य आणि एक खून’ या कथांतील पात्रे मानवतेला हरताळ फासतात आणि मग समाजातील माणसेच पेटून उठतात. त्यांतील काही दु:ख-अन्याय सहन करतात, तर काही स्वत: हत्यारं उचलतात.‘पुतळी’ ही गरीब नर्तकी हाती बंदूक घेऊन खून-लूटमार करत संघर्षमय आयुष्य जगते. ‘रहस्य मधील वकिलाला त्याची अशिल-मिसेस नीला देशपांडे अजब कोड्यातच टाकते. तिचा गुंता सोडवण्याऐवजी वकीलमहाशय स्वत:च त्यात गुरफटत जाऊन फसतात. ‘सूड’मधील लाखनसिंह, रघुवीरसिंह, सुबासिंह यांच्यातल्या आपापसांतील वितुष्टांमुळे-सूड भावनेने त्यांची आयुष्ये उद्ध्वस्त होतात. ‘नियती आणि न्याय’ मधून पंजाबी कुटुंबातील जसपालसिंहचा मृत्यू होतो. जसपालच्या पत्नीचा चुलतभाऊ-महेंद्रसिंग,हा खून करतो का,की- पलविंदरकौर? हे गूढ सतावत राहते. ‘आणीबाणीतील गोष्ट’ ही तोतया प्रेमशंकरची. इंग्रजी भाषा बोलून, खोटा सरकारी अधिकारी बनून, तो जो धुमाकूळ घालतो, ते पाहून सर्वच थक्क होतात. अशा प्रकारे महादेव मोरे यांच्या कथेतून थ्रील, थरार व रहस्याचे वास्तव दर्शन उत्कटतेने होते.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#थ्रिल्स #महादेव मोरे #ग्रामीण # कथासंग्रह #मराठीसाहित्य #मेहतापब्लिशिंगहाऊस #मराठीपुस्तके #THRILLS #MAHADEV MORE #STORIES #MARATHI LITERATURE #MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHI BOOKS
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

BACKSTAGE
BACKSTAGE by MONTEK SINGH AHLUWALIA Rating Star
महाराष्ट्र टाईम्स.. ६.९.२०२६

भारताच्या आर्थिक सुधारणांवर अनेक पुस्तके आजवर प्रसिद्ध झाली आहेत. काहींमध्ये आकडेवारीचे जंजाळ असते, काही धोरणांचे विश्लेषण करतात, तर काही विशिष्ट नेत्यांची जाहिरातबाजी करतात. मात्र माँटेकसिंग अहलुवालिया यांचे `बॅकस्टेज : भारताच्या उच्च वाढीच्या र्षांमागची कहाणी` हे पुस्तक या सगळ्यांपेक्षा वेगळे ठरते. कारण हे पुस्तक भारताच्या आर्थिक परिवर्तनाची कथा बाहेरून पाहणाऱ्या अभ्यासकाने नव्हे, तर त्या परिवर्तनाच्या केंद्रस्थानी उभ्या असलेल्या व्यक्तीने सांगितलेली आहे. जी. बी. देशमुख यांनी मूळ इंग्रजी पुस्तकाचा केलेला मराठी अनुवाद सरस उतरला आहे. पुस्तकाच्या सुरुवातीलाच माँटेकसिंग एक गोष्ट स्पष्ट करतात, ती म्हणजे, हे पुस्तक आत्मकथन नाही. आत्मप्रौढी मिरवण्यासाठी नव्हे, तर भारताच्या आर्थिक सुधारणांचा प्रवास समजावून सांगण्यासाठी अहलुवालिया हे पुस्तक लिहितात. विषयाच्या अनुषंगाने पुस्तकात त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील संदर्भ येतात, पण ते आर्थिक आणि राजकीय घडामोडी समजावून सांगण्यापुरतेच. सिकंदराबादमधील मध्यमवर्गीय वातावरणातून सुरू झालेला त्यांचा प्रवास दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, ऑक्सफर्ड, जागतिक बँक, अर्थ मंत्रालय, योजना आयोग आणि अखेर देशाच्या सर्वोच्च आर्थिक धोरणनिर्मितीच्या केंद्रापर्यंत पोहोचतो. हा प्रवास वाचताना स्वतंत्र भारताच्या आर्थिक विचारसरणीचा विकासक्रम उलगडत जातो. पुस्तकाचे केंद्रस्थान अर्थातच १९९१च्या आर्थिक संकटाचे आहे. त्यावेळी देशाकडे काही आठवड्यांच्या आयातीपुरताही डॉलर शिल्लक नव्हता. सोन्याचा साठा गहाण ठेवण्याची वेळ आली होती आणि आर्थिक दिवाळखोरीची शक्यता प्रत्यक्ष समोर उभी होती. अशावेळी सरकारने घेतलेले निर्णय, त्यामागील तणाव, राजकीय अनिश्चितता आणि प्रशासकीय संघर्ष यांचे वर्णन पुस्तकात अत्यंत जिवंतपणे आले आहे. नाणेनिधी किंवा जागतिक बँकेच्या दबावामुळे या सुधारणा झाल्याची धारणा माँटेकसिंग ठामपणे नाकारतात. हे पुस्तक आर्थिक सुधारणांना कोणत्याही प्रकारच्या विचारधारेच्या चष्म्यातून पाहत नाही. लेखक ना मुक्त बाजाराचे अंधसमर्थन करतात, ना राज्यनियंत्रित व्यवस्थेचे. त्यांचा दृष्टिकोन व्यवहारवादी आहे. भारतासारख्या लोकशाही देशात सुधारणा एका झटक्यात होत नाहीत; त्या राजकीय वास्तवाशी जुळवून घेत हळूहळू पुढे सरकतात, हे ते वारंवार. अधोरेखित करतात. पुस्तकात अनेक ठिकाणी `सुधारणा` हा आर्थिक नव्हे, तर राजकीय प्रक्रियेचाही विषय आहे, हे प्रकर्षाने जाणवते. अहलुवालिया या पुस्तकात अनेक व्यक्ती, अधिकारी, अर्थतज्ज्ञ आणि राजकीय नेत्यांच्या योगदानाचा उल्लेख करतात. नरसिंह राव, मनमोहन सिंग, पी. चिदंबरम, यशवंत सिन्हा, जसवंत सिंह यांच्यापासून ते विविध सनदी अधिकाऱ्यांपर्यंत अनेकांची भूमिका ते प्रामाणिकपणे नोंदवतात. योजना आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून काम करताना अहलुवालिया यांनी जवळून अनुभवलेला काळ येथे उभा राहतो. सन २००४ ते २०११ या काळातील उच्च आर्थिक वाढ, दारिद्रयनिर्मूलनातील प्रगती, पायाभूत सुविधांमध्ये झालेली वाढ आणि ग्रामीण विकासाच्या कार्यक्रमांचे मूल्यमापन ते करतात. विशेषतः भारताने सलग अनेक वर्षे सात ते आठ टक्क्यांच्या दरम्यान वाढ नोंदवली, ती केवळ जागतिक परिस्थितीचा. परिणाम नव्हती; १९९० नंतरच्या सुधारणांनी घातलेल्या पायावर उभे राहून ती शक्य झाली, हा त्यांचा युक्तिवाद पटण्याजोगा वाटतो. मात्र पुस्तकाचे खरे सामर्थ्य यशोगाथेत नाही, तर आत्मपरीक्षणात आहे. यूपीए-२ दरम्यान निर्माण झालेली निर्णयप्रक्रियेतील अडचण, गुंतवणुकीतील वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक मंदी, भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे निर्माण झालेले वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक थेट भाष्य करतात. अनुवादक जी. बी. देशमुख यांनी मूळ पुस्तकातील आर्थिक संकल्पना सहज आणि प्रवाही मराठीत मांडल्या आहेत. यात कृत्रिमता जाणवत नाही. आर्थिक विषयावरील पुस्तक असूनही भाषा जड वाटत नाही. आर्थिक सुधारणांच्या व्यापक सामाजिक परिणामांचा स्वतंत्र आणि सविस्तर ऊहापोह येथे अपेक्षेपेक्षा कमी आढळतो. मात्र, हे पुस्तक ज्या उद्देशाने लिहिले गेले आहे त्या उद्देशात ते अत्यंत यशस्वी ठरते. `बॅकस्टेज` हे केवळ पुस्तक नाही; ते भारताच्या आर्थिक परिवर्तनाचा प्रत्यक्षदर्शी दस्तऐवज आहे. १९९१ नंतर भारताने घेतलेल्या वळणाचा अर्थ समजून घ्यायचा असेल, उच्च वाढीच्या वर्षामागील वास्तविक कथा जाणून घ्यायची असेल आणि धोरणनिर्मितीच्या पडद्यामागे काय घडत असते याचा मागोवा घ्यायचा असेल, तर हे पुस्तक अभ्यासणे आवश्यक ठरते. भारतीय अर्थव्यवस्थेच्या आर्थिक सुधारणांचा इतिहास आणि त्यांचे परिणाम समजून घेण्यासाठी हे पुस्तक एक महत्त्वाचा संदर्भग्रंथ म्हणून ओळखले जाऊ शकते. मराठीत उपलब्ध असलेला हा अनुवाद त्या दृष्टीने विशेष स्वागतार्ह आहे. ...Read more

HACHYUKISUNASKI
HACHYUKISUNASKI by ABA MAHAJAN Rating Star
Dinesh

This is a different planet. This is a different world. And this is a truly different book. I loved it. You should also buy it and read it. I’m sure you will love it too. Hachyukisunaski is a fantastic Book.